November 2021

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर येथील अल्पवयीन मुलीस फूस लावुन पळवुन  नेवुन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका जणा विरुध्द श्रीरामपुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे       बेलापुर ऐनतपुर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजुर शेख याने आठ दिवसापूर्वी फूस लावून पळवुन नेले होते त्या बाबत बेलापुर पोलीसांनी भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर मुलगी ही देहरे येथे असल्याचे समजताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नातेवाईकांनी त्या मुलीस पोलीसांच्या स्वाधीन केले त्यानंतर पोलीसांनी पळवुन नेणारा असलम शेख यास ताब्यात घेतले त्यानंतर पहील्या दाखल गुन्ह्यात भादवि कलम 376 बाल लैंगिक अत्याचार पोस्को आदि वाढीव कलम लावण्यात आले असुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे निखील तमनर पोपट  भोईटे हरीष पानसंबळ यांनी त्या मुलीचा शोध घेवुन तीला ताब्यात घेतले त्या नंतर काही वेळाने  पळवुन नेणारा असलम शेख यास ताब्यात घेण्यात आले असुन त्यास अटक करण्यात आली आहे पुढील तपास  पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनि विठ्ठल पाटील हवालदार लोटके करत आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- संक्रापुर तालुका राहुरी येथील तमाशा कलावंत शाहीर संभाजीराव जाधव यांच्या मुलांनी  तयार केलेल्या" वायली" या लघुपटास गोवा शाँर्ट फिल्म फेस्टिवल 2021 चा सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट पुरस्कार मिळाला असुन ग्रामीण भागातील कलाकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे  


प्रणव वाणी यांनी दिग्दर्शित केलेल्या वायली लघुपटास गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट पुरस्कार नुकताच मिळाला आहे या लघुपटात

ग्रामीण भागातील कौटुंबिक समस्या मांडल्या आहेत. कौटुंबिक वाद आणि आपापल्या पालकांमधील मतभेद झालेले मनभेद तसेच या वादाचा दोन चुलत भावांच्या सुंदर नात्यावर कसा परिणाम होतो हे हृदयस्पर्शी चित्र लघुपटमध्ये दाखवले आहे.

   वायली लघुपटाचे कथा लेखन स्वतः प्रणव वाणी यांनी आणि पटकथा लेखन शुभम वाणी यांनी केले होते लघुपटाची निर्मिती प्रा. मोहन वाणी यांनी केली. कॅमेरामन म्हणून  सुखदेव आढाव यांनी काम केले या लघुपटास सत्यजित सराफ यांनी संगीत दिले आहे.

या लघुपटाची निवड लंडन, मध्यप्रदेश, पुणे व इतर ठिकाणी झाली आहे. या लघुपटात संजय जाधव, रवींद्र जाधव शशिकला जाधव, सिंड्रेला परेरा, यांची प्रमुख भूमिका आहे. तसेच सत्यजित थेटे, पार्थ शेळके या बाल कलाकरांनी भूमिका साकारली आहे. सुप्रसिद्ध तमाशा कलावंत शाहीर संभाजी जाधव याच्या मार्गदर्शनाखाली या कलाकारांनी ही शाँर्टफिल्म तयार केली होती या कामी संभाजी गायकर यांचीही मोलाची मदत मिळाली  ग्रामिण भागातील कलाकारांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल

माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष प्रसिद्ध तमाशा फडमालक रघुवीर खेडकर तसेच सांक्रापुरचे सरपंच रामा पांढरे यांनी अभिनंदन केले.

ग्रामिण भागातील कलाकारांनी तयार केलेल्या वायली लघुपटास मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व कलाकारांचे कौतुक होत आहे.



बेलापूर ( प्रतिनिधी ) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रग्रंथ असल्याचे उद़्गार बेलापुर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख डाँक्टर बी एन पवार यांनी काढले.बेलापुर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने "भारतीय संविधान दिन" संपन्न करण्यात आला त्या वेळी  ते बोलत होते.भारतीय राज्यघटनेचा इतिहास त्यांनी  विशद करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकला.या लोकशाही समाज व्यवस्थेत न्याय,समता,स्वातंत्र,बंधुता ही मुल्य प्रवर्धित करुन ही राज्यघटना डॉ.आंबेडकर यांनी जनतेप्रती अर्पण केली आहे. सर्व जाती, धर्म, भाषा ,पंथ यांना मार्गदर्शक ठरावा असा एकमेव ग्रंथआहे . हे भारतीय संविधान देशातील सर्वात लहान संस्था गाव पातळीवरील ग्रामपंचायत ते देशाची सर्वोच्च संस्था संसद ,न्यायपालिका ,प्रसारमाध्यमे यांच्यासह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला मार्गदर्शन करते .26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकार करून 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाचा अंमलबजावणी करण्यात आली. सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य ,न्याय ,स्वातंत्र्य ,बंधुता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. कलम 14 ते 18 समानतेचा हक्क ,कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क ,कलम 23 ते 24 शोषणाविरुद्ध हक्क, कलम 25 ते 28 धर्मस्वातंत्र्याचा हक्क ,कलम 29 ते 31 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 32 ते 35 उपायोजनांचा हक्क या बाबी आहेत आपण सर्वांनी संविधान वाचावे तसेच,भारतीय संविधानाचे प्रचारक व प्रसारक व्हावे असेही त्यांनी सांगितले.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ गुंफा कोकाटे यांच्या हस्ते  भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले  .महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींनी स्वच्छता मोहिम यशस्वीपणे पार पाडली.कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी  प्रा.चंद्रकांत कोतकर ,सहकार्यक्रम अधिकारी प्रा.रुपाली उंडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापक इतर सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुरच्या सुजाण नागरीकांनी बहुमताने गांवकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता दिली आता गावाचा विकास करण्याची जबाबदारी आमची आहे त्यामुळे आता गावाच्या विकासालाच प्राधान्य देणार असल्याचे मत जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले.  दरवर्षी प्रमाणे गणपती गल्ली बेलापुर येथे अंगारकी चतुर्थी निमित्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी सत्काराला उत्तर देताना नवले बोलत होते या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  दिलीप काळे पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे माजी सरपंच भरत साळूंके सुनील मुथा  रणजीत श्रीगोड डाँक्टर सुधीर काळे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी मंडळाचे संस्थापक कै .मनोज श्रीगोड  यांना अदरांजली  अर्पण करण्यात आली  त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकमान्य मंडळाचे उपेंद्र कुलकर्णी सतीश काळे डाँक्टर सुधीर काळे योगेश शिंदे राजु काळे रघुनाथ वाघ शशिकांत औटी भगीरथ मुंडलीक राजु सुर्यवंशी आदिंसह लोकमान्य महीला मंचच्या महीलांनी विशेष परिश्रम घेतले या वेळी जनता अघाडीचे नेते आबासाहेब नवले रविंद्र खटोड प्रफुल्ल डावरे राजाभाऊ काळे योगेश दायमाप्रभात कुऱ्हे समर्थ शिंदे विनीत दायमा आभिषेक बैरागी सुभाष अमोलीक  हरिप्रसाद मंत्री बाबुलाल मंत्री सुनिल डाकले प्रसाद कुलकर्णी रवि कडू मुस्ताक शेख प्रंशात मुंडलीक योगेश दायमा किशोर खरोटे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपेंद्र कुलकर्णी यांनी केले तर किरण बैरागी यांनी आभार मानले.


शिर्डी (प्रतिनिधी)-7 ऑक्टोबर 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आलेले असून करोनाच्या पार्श्वभुमीवर संस्थानचे श्री साईप्रसादालय बंद ठेवण्यात आलेले होते. संस्थानच्यावतीने श्री साईप्रसादालय व लाडू प्रसाद वाटप सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात आला होता. या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळाली असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी दिली. 26 नोव्हेंबर 2021 पासून श्री साईप्रसादालय भाविकांना प्रसाद भोजनाकरिता सुरु करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बानायत यांनी दिली.श्रीमती बानायत म्हणाल्या, जगभरात, देश व राज्यात आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने दिनांक 05 एप्रिल 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. पुन्हा राज्य शासनाने दिनांक 07 ऑक्टोंबर 2021 पासून काही अटी शर्तीवर धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन संस्थानचे श्री साईप्रसादालय व भाविकांना लाडू वाटप बंद ठेवण्याबाबात जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखा, अहमदनगर यांनी आदेश पारित केलेले होते.मात्र साईभक्त व शिर्डी ग्रामस्थ यांच्याकडून श्री साईप्रसादालय सुरु करण्याबाबत वारंवार मागणी होत होती. त्यानुसार संस्थानच्यावतीने दिनांक 08 नोव्हेंबर 2021 व दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्या प्रस्तावास अनुसरुन दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येवुन भाविकांसाठी श्री साईप्रसादालय व लाडु प्रसाद वाटपास काही अटी शर्तीवर परवानगी देण्यात आलेली आहे.उद्या शुक्रवार 26 नोव्हेंबर 2021 पासून श्री साईप्रसादालय भाविकांना प्रसाद भोजनाकरीता सुरु करण्यात येणार असून सर्व साईभक्तांनी कोवीड-19 च्या नियमांचे पालन करुन प्रसाद भोजनाचा लाभ घ्यावा. तसेच सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.



श्रीरामपूर : नजीकच्या काळात होवू घातलेल्या विविध निवडणूकांमध्ये मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये या करिता राज्य निवडणूक आयोगातर्फे नवमतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम जाहीर केला असून जास्तीत जास्त नवमतदारांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात अनिल पवार यांनी म्हटले आहे की,०१ जानेवारी २०२२ वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार म्हणून यादीत नाव समविष्ट करू शकतो.नाव नोंदणीसाठी संपूर्ण मतदार संघात मतदार केंद्रनिहाय केंद्रस्तरीय अधिकारी नेमले आहेत.०५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याने आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत,तसेच विविध राजकीय पक्ष पदाधिकारी ,पत्रकार,सामाजिक संस्था यांनी मतदार जागृती करावी असे आवाहनही  अनिल पवार यांनी केले आहे.

आगामी बहुतेक मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका २०२२ मध्ये होत असून यासाठी ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

दिनांक २७ व २८ नोव्हेंबर या दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर करण्यात आले आहे.यात नाव नोंदणीसह यादीत पूर्वीपासून नावे असलेल्या मतदारांना आपल्या नावातील दुरुस्ती करता येणे शक्य आहे.सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अशोक उगले स्वतंत्रपणे निवडणूक शाखेत मदतकक्ष उभारून मतदारांच्या शंकांचे निरसन करत आहेत.दि. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा कोणताही व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी भारत निवडणूक आयोग यांचेकडून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावीत तसेच आपल्या भागातील अथवा कुटुंबातील मयत व्यक्ती, दुबार, समान नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी आपल्या भागातील बी. एल. ओ. अथवा निवडणूक शाखेत विहित नमुन्यात अर्ज दाखल करावा असे आवाहन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रवाशासाठी सुरक्षित व सुखरुप सेवा देणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप अजुनही सुरुच असुन या संपास शेवगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पाठींबा दर्शविला असुन शासनाने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेवुन संपावर तोडगा काढावा अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.संघटनेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की सध्या संपूर्ण राज्यात एस टी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांंचा शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसह विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरुच आहे अनेक कर्मचारी आपल्या कुटुंबासह या आंदोलनात सहभागी झालेले आहेत या आंदोलनामुळे दळणवळण व्यवस्था ठप्प झालेली आहे खाजगी प्रवासी वहातुक करणारे सर्व सामान्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत सर्व सामान्यांना परवडणारी ही एकमेव सोय असतानाही शासनाने त्यांच्या मगणीकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यांचे आंदोलन लांबल्यामुळे आता प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे विशेषकरुन विद्यार्थी दिव्यांग तसेच जेष्ठ नागरीक यांना मोठ्या सांकटाला तोंड द्यावे लागत आहे तरी शासनाने त्यांच्या योग्य मागण्यांची दखल घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहै या निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे तालुकाध्यक्ष बाबा कराड देविदास बटुळे श्रीकांत मोडके राजेंद्र वाल्हेकर ज्ञानदेव ठाकरे रामकिसन फुंदे शिवाजी काळे विठ्ठल गव्हाणे विक्रम गरड डी आर उंदरे एस टी कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप लबडे जगन्नाथ पवार रसाळ आदिंच्या सह्या आहेत.



श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे.याकरिता दिनांक 18 नोव्हेंबर 2021 पासून “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडीच्या” वतीने गांधी पुतळा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.आज दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी उपोषणाच्या 05 व्या दिवशी सकाळच्या सुमारास एक उपोषणकर्ते श्री.योगेश सोनार यांची प्रकृती खालावल्याने सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

         ह्या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ या आमरण उपोषणाची 05 व्या दिवशी योग्य ती दखल घेतली. श्रीरामपूर चे तहसीलदार मा.श्री.प्रशांत पाटील,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.संजय सानप व श्रीरामपुर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.मधुकर साळवे यांनी तात्काळ उपोषणस्थळी भेट दिली व “ सर्व अवैध धंदे बंद केले असून कोठे अवैध धंदे चालू झाले तर तुम्ही त्या अवैध धंद्यांची माहिती आम्हाला द्यावी आम्ही त्यांच्यावर तात्काळ कारवाई करू” अशा स्वरूपाचे लेखी पत्र चंद्रशेखर(चंदू) आगे यांना प्रशासनाने दिले.

त्यामुळे आमरण उपोषणाची योग्य ती दखल घेतल्यामुळे व पोलिसांनी लेखी पत्र देऊन कोणी अवैध धंदे चालू केले तर निदर्शनास आणुन द्यावे त्यांच्यावर कारवाई करू असे लेखी पत्र दिल्याने “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”चे उपोषणकर्ते चंद्रशेखर आगे व दीपक संत यांनी यावेळेस उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले.यावेळी उसाचा रस उपोषणकर्त्यांना पाजुन प्रशासनाने या उपोषणाला पूर्णविराम दिला. दरम्यान साखर कामगार रुग्णालयात दाखल असलेले उपोषणकर्ते शिवप्रहार प्रतिष्ठान चा मावळा श्री.योगेश सोनार यांची प्रकृती स्थिर असल्याचे कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री.जगधने यांनी सांगितले आहे.

आज रोजी उपोषण स्थळी स्वर्गीय अप्पासाहेब गांगड मित्र मंडळाच्या वतीने भेट देण्यात आली.



श्रीरामपूर:- Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत  गोंधवणी परिसरात, वडारवाडा येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने  पोलिसांनी सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील  कच्चे रसायन, 7800  लिटर ,तयार गावठी हातभट्टी दारू 248  लिटर   व तसेच 50 किलो नवसागर , देशी दारू, तसेच 450  किलो गुळ एक टेंपो व  एक दुचाकी असा एकूण 6,43,955  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात  आले आहे . त्यानुसार,

1) श्रीकांत प्रभाकर काळे, रा कदम वस्ती  श्रीरामपूर

2)  सागर माणिक शिंदे, रा. गोंधवणी ता श्रीरामपूर

3)  भीमराव काळे रा अशोक नगर ता  श्रीरामपूर

4)   दत्तात्रेय जानकीराम मंचरे रा वैजापूर

5) दीपक वसंत शेलार रा अशोक नगर

6)  अशोक काशिनाथ शिंदे( फरार)

7) बाप्पू नागू गायकवाड ( फरार)

8) अर्जुन फुलारे ( फरार) सर्व  राहणार गोंधवणी वडारवाडा ता श्रीरामपूर   यांचेविरुध्द  महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(फ) ( क) ,( ड), (  इ) नुसार P.C.  नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीनुसार  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन  व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय श्रीरामपूर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  मा.गणेश पाटील ,पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क  यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p  संदीप मिटके, Dy s.p. नितेश शेंडे ( राज्य उत्पादन शुल्क),P.I. कोल्हे, P.I.  हुलगे, P.I, वाजे व इतर अधिकारी व अंमलदार आदींनी केली.


श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद निवडणूक प्रक्रिया काल न्यायालयाच्या निर्देशानुसार व नियमानुसार पूर्ण करण्यात आली. मात्र सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आला असून सदरचा निकाल बुधवार दि. 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत जाहीर करणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी अनिल पवार यांनी दिली. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्याबाबतचे अपिल उच्च न्यायालयात करणार असल्याची माहिती माजी सभापती दीपक पटारे यांनी दिली.पंचायत समितीचे सभापती पद विखे गट व काँग्रेसकडून प्रतिष्ठेचे करण्यात आले होते. त्यामुळे या निवडणुकीला विषेश महत्व प्राप्त झाले होते. दोन्ही गटाकडून निवडणूक प्रक्रियेनंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला.पंचायत समितीच्या सभापती संगिता शिंदे यांना अपात्र ठरविण्यात आले. यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. हे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वंदना मुरकुटे या पदाच्या प्रबळ दावेदार होत्या. शिंदे यांच्या अपात्रतेसाठी त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी दि. 9 नोव्हेंबर रोजी या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याला विखे गटाचे माजी सभापती दीपक पटारे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.पंचायत समितीत 50 टक्क्यापेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याचे आपल्या याचिकेत नमूद केले आहे. याप्रकरणी खंडपीठाने दि. 18 नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक प्रक्रिया घेण्यास मान्यता देत निकाल जाहीर करण्यास मात्र मनाई केली. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार, सहाय्यक तथा गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.यावेळी काँग्रेसच्यावतीने वंदना मुरकुटे यांनी दोन व विखे गटाच्यावतीने कल्याणी कानडे, वैशाली मोरे यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वंदना मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड.समीम बागवान यांनी काम पाहिले,व कल्याणी कानडे यांच्यावतीने अ‍ॅड. आर. डी. जोंधळे तर वैशाली मोरे यांच्यावतीने अ‍ॅड. एस. बी. काकड यांच्या मार्फत्त पंचायत समितीत 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याने सदरचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरावा, असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिला.वंदना मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड.समीम बागवान यांनी काम पाहिले 



श्रीरामपुर  (प्रतिनिधी )- श्रीरामपूर शहर व तालूक्यातील अवैध धंद्याचा सुळसुळाट झाल्यामुळे तरुण पिढी बरबाद होत चालाली आहे त्यामुळे शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी शिवप्रहार प्रतिष्ठाण युवा अघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.या बाबत उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की शहर व तालुक्यात अवैध व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन दारु मटका गुटखा जुगार तर दररोज सुरुच आहेत त्यातच आता काँम्प्यूटर लाँटरीची भर पडली आहे अनेक बेरोजगार तरुण शालेय विद्यार्थी या झटपट लाँटरीचे बळी ठरत आहे शिक्षणाच्या नावाखाली आई वडीलाकडून पैसे उकळून हे गेम खेळले जात आहे या अवैध व्यवसायामुळे अनेकांचे प्रपंच उध्वस्त झालेले आहेत नशेच्या अहारी गेल्यामुळे अनेकांना वेगवेगळे आजार जडले आहे या सर्व प्रकारास जबाबदार कोण? असा सवाल शिवप्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला असुन हे अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी शिवप्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे  . प्रशासनाकडुन दोन दिवसात यावर कठोर कारवाई झाली नाही व शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले नाही तर श्रीरामपुरातील महात्मा गांधी पुतळयाजवळ लोकशाही

मार्गाने सर्व नियमांचे पालण करून आमरण उपोषण करण्यात येईल.असेही निवेदनात म्हटले आहे.



राहाता :-मोठ्या शहरा पाठोपाठ आता राहाता शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही व्हाईटनर नशेच्या जीवघेण्या व्यसनांमध्ये तरुणाई अडकल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. व्हाईटनरच्या या नशेमध्ये 14 ते 18 वर्षाच्या अनेक मुलांच्या आरोग्याची दुर्दशा होत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.तंबाखू, सिगारेट, गुटखा, मद्यपान करणार्‍यांना व्यसन लागले असा आपल्याकडे सहज समत आहे. अशांची संख्या प्रामुख्याने मोठी आहे. परंतु सध्या राहाता परिसरात शाही खोडण्यासाठी वापरण्यात येणारे व्हाईटनर रुमालवर टाकून त्याचा गंध घेऊन नशा करणारे तरुण परिसरात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. प्रामुख्याने 16 ते 25 वयोगटातील तरुणांना हे व्यसन लागले आहे. राहाता तालुक्यात शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे तसेच तालुक्यात बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे.परप्रांतीय तरुण रोजगारासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या संगतीत राहून येथील तरुणांनी अनेक व्यसने लावून घेतली आहेत. यामध्ये व्हाईटनरची नशा सध्या चर्चेचा व तितकाच गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थी शाळेत न जाता हे व्यसन करतात. हल्ली जनरल स्टोअर्समध्ये व्हाईटनरची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. काही वर्षांपूर्वी कोरॅक्स, आयोडेक्स औषध सेवन करून तरुण वर्ग व्यसनाधीन झाला होता. व्हाईटनर रुमालावर टाकून त्याचा गंध घेऊन व्यसनाचा फंडा परिसरात तरुणांच्या हाती लागला आहे. या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.राहाता शहरासह तालुक्यात अवैध गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे. राहाता शहरात परराज्यातून गुटखा मोठ्या प्रमाणात शहरात विक्रीसाठी आणला जातो व तो तालुक्यातील विविध ठिकाणी विक्रीसाठी दिला जातो. शहरात अवैधरित्या गुटखा विक्रीचे रॅकेट मोठ्या प्रमाणात असताना पोलीस प्रशासन या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. अनेकदा पोलिसांनी होलसेल गुटखा विक्री करणार्‍यांना रंगेहाथ पकडले, परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.राहाता शहरात बस स्थानक, व्यापारी संकुल, नगरपरिषद बगीच्या, कातनाला, पाण्याच्या टाकी परिसर, पिंपळस खटकळी कॅनॉल रोड या ठिकाणी अनेक तरुण

रात्रीच्यावेळी व्हाईटनर, मद्यपान, धूम्रपान अशा विविध नशा करताना दिसतात. शिर्डीत काही वर्षापूर्वी व्हाईटनरची नशा करणार्‍या मुलांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी तात्पुरती कारवाई करून काही काळ या नशेबाज तरुणांवर अंकुश ठेवला होता. परंतु पुन्हा नशा करणार्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळा व महाविद्यालयात मुलांना प्रबोधन करणे गरजेचे आहे अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे. राहाता तालुक्यात बेकायदा मद्यविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गावठी दारूची विक्री रहिवासी परिसरात राजरोसपणे सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. बेकायदा मद्यविक्रीला एक प्रकारचा परवाना मिळवायचे चित्र आहे. बेकायदा मद्यविक्रीमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. पोलीस प्रशासनाने या बाबींकडे गांभिर्याने लक्ष देऊन सर्व अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असुन नागरीकाबरोबरच तरुण पिढी तसेच विद्यार्थीही या अवैध धंद्याचे बळी  ठरत आहे        बेलापुर गावात मटका अन गुटखा जोरात सुरु होताच त्यातच आणखी भर पडली ती झटपट लाँटरी बिंगो गेम टायगरा गेम अशा झटपट पैशाचे अमीष दाखविणारे संगणकीय जुगार गावात सुरु झाले असुन शालेय विद्यार्थी या जुगाराचे बळी ठरत आहेत शाळेच्या नावावर पालकाकडून पैसे उकळायचे अन हे गेम खेळत बसायचे असे प्रकार गावात सुरु झाले असुन त्या दुकाना उघडण्या आगोदरच नागरीक शालेय विद्यार्थी दुकानासमोर दुकान उघडण्याची वाट पहात असतात या बाबत गावातील जागृक नागरीकाकडे काही

शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीची शहनिशा केली असता त्यात सत्यता आढळून आली आहे त्या नंतर बेलापुर पोलीसांना या बाबत जाब विचारण्यात आला असता त्यांनी कानावर हात ठेवले मात्र वरीष्ठाकडे तक्रार करणार असल्याचे सांगीतल्यावर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले असुन हे आवैध धंदे तातडीने बंद करावे अशी मागणी पालकांनी केली आहे या बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस अधिक्षक यांना निवेदन पाठविण्यात आले आहे


बेलापुर  (प्रतिनिधी  )-भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आणि के.के.आय(बुधरानी) हाॅस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने बेलापूरात ५६ वे मोफत मोतीबिंदु शिबीर संपन्न होत असुन या शिबीराचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. भागवत प्रतिष्ठाण व स्वास्तिक गृपच्या  संयुक्त विद्यमाने तसेच के के बुधराणी हाँस्पीटल पुणे यांच्या सहकार्याने दर महीन्याच्या तिसऱ्या बुधवारी मोफत मोतीबिंदु शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे  शिबीराची सुरुवात झाल्यापासुन दर महीन्याला खंड न पडता हे शिबीर भरविले जात असुन आनेक गोरगरीब होतकरु नागरीकांना यां शिबीराचा लाभ मिळाला असल्याचे आयोजक अभिषेक खंडागळे यांनी सांगितले बेलापुर गावात काळे हाॅस्पिटल, गणपती गल्ली, बेलापुर बु. या ठिकाणी आज बुधवार दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ५६ वे मोफत मोतीबिंदु निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तरी याची माहिती आपल्या गावात व परिसरात जास्तीत जास्त नागरिकांना होईल व जास्तीत जास्त नागरिक शिबिरात सहभागी होतील यासाठी सहकार्य करण्याचे अवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तपासणीसाठी येताना रुग्णांनी आधार कार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, कोरोना चाचणी(RTPCR)रिपोर्ट सोबत आणावे असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे. 


बेलापुर  (प्रतिनिधी  )-भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आणि के.के.आय(बुधरानी) हाॅस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने बेलापूरात ५६ वे मोफत मोतीबिंदु शिबीर संपन्न होत असुन या शिबीराचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे                                        भागवत प्रतिष्ठाण व स्वास्तिक गृपच्या  संयुक्त विद्यमाने तसेच के के बुधराणी हाँस्पीटल पुणे यांच्या सहकार्याने दर महीन्याच्या तिसऱ्या बुधवारी मोफत मोतीबिंदु शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे  शिबीराची सुरुवात झाल्यापासुन दर महीन्याला खंड न पडता हे शिबीर भरविले जात असुन आनेक गोरगरीब होतकरु नागरीकांना यां शिबीराचा लाभ मिळाला असल्याचे आयोजक अभिषेक खंडागळे यांनी सांगितले बेलापुर गावात काळे हाॅस्पिटल, गणपती गल्ली, बेलापुर बु. या ठिकाणी उद्या बुधवार दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ५६ वे मोफत मोतीबिंदु निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तरी याची माहिती आपल्या गावात व परिसरात जास्तीत जास्त नागरिकांना होईल व जास्तीत जास्त नागरिक शिबिरात सहभागी होतील यासाठी सहकार्य करण्याचे अवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तपासणीसाठी येताना रुग्णांनी आधार कार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, कोरोना चाचणी(RTPCR)रिपोर्ट सोबत आणावे असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

बेलापूर - शिव चरित्राचे चालते बोलते व्यासपीठ, संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने इतिहासपर्वतील युगाचा अस्त झाला. शिव पंढरीचा वारकरी शिव चरणी लीन झाला अश्याच शब्दात बेलापूरकरांनी व शिवप्रेमींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.बाबासाहेब पुरंदरे हे १५ वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर जिल्हा प्रचारक होते त्यामुळे बाबासाहेबांचे घनिष्ट संबंध असल्याने नगर,बेलापूर, पुणतांबा, कोपरगाव, संगमनेर अनेक जुन्या कार्यकर्त्यांची खडा ना खडा माहिती होती. त्यावेळी त्यांनी नगर जिल्ह्यात ६० वर्षाच्या गत कालीनं आठवणींना पुरंदरे यांनी उजळा दिला होता.३ मार्च १९८४ (रंगपंचमी) रोजीच म्हणजेच सुमारे ३६ वर्षापूर्वी बाबासाहेब पुरंदरे हे छत्रपती शिवाजी

महाराजांच्या पुतळ्याचे अनावर कार्यासाठी बेलापूरला आले असताना त्यांना बेलापूर करांच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले होते या सन्मानपत्राचे लेखन पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे वरिष्ठ पत्रकार व बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कराव खंडागळे, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे निवेदक पत्रकार व वरिष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर गवले यांनी केले होते. ७ वर्षापूर्वी बाबासाहेब पुरंदरे हे भारतीय संस्कृती सेवा प्रतिष्ठानतर्फे महनीय कार्याच्या गौरवार्थ प्रस्तीष्ठेचा मानला जाणारा स्व.पंडित मदन गोपालजी व्यास पुरस्कार स्विकारण्यासाठी लोकवंध बाबासाहेब पुरंदरे दि. ०२/०३/२०१५ रोजी नगरला आले असता बेलापूरचे सुपुत्र पंडित रमाकांतजी व्यास यांच्या अहमदनगर च्या निवास्थानी जाऊन

बेलापूरकरांनी बाबासाहेबांची भेट घेतली.सुमारे ३१ वर्षापूर्वी बेलापूरकरांनी दिलेले प्रत बाबासाहेबांनी स्विकारली व सन्मानाची दुर्मिळ प्रत पाहून बाबासाहेब भारावलेग्रामास्थ्यांनी दिलेल्या सन्मानाच्या प्रतीवर स्वाक्षरी करून ही प्रत व्यवस्थित जतन करून ठेव असे विष्णुपंत डावरे यांना सांगताना गहिवरून आले होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय कार्यालयीन प्रमुख शामजी जाजू, पंडित रामाकांतजी व्यास, विष्णुपंत डावरे, रणजीत श्रीगोड, adv. विजयराव साळुंके, सुभाष सीमानी, कंजीशेठ टाक, बाळकृष्ण दायमा, शर्माजी,सोमनाथ टाक, यावेळी आदी उपस्थित होते.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget