November 2020

शिर्डी (प्रतिनिधी) -शिर्डी जवळील डोराळे गावामध्ये पैशाच्या घेण्यावरून एका तरुणाचा खून करण्यात आला असून त्यामुळे शिर्डी डोराळे परिसरातील नागरिकांमधून खळबळ उडाली आहे ,ही घटना शुक्रवारी 27 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान येथे घडली आहे,

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील शिर्डी नजीक असणारे डोराळे या गावात एका तरुणाचा पैशाच्या घेण्यावरून खून करण्यात आला आहे, यासंदर्भात फिर्यादी प्रवीण माधव धारे( वय 25) राहणार जवळके यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला असून यामध्ये म्हटले आहे की आरोपी चांगदेव पूजा डांगे, शंकर चांगदेव डांगे, अमोल चांगदेव डांगे रा,डोराळे यांनी हा खून केला आहे, दिनांक 27 नोव्हेंबर शुक्रवार रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान योगेश सोपान दंवगे (वय28) राहणार पाथरे वारेगाव तालुका सिन्नर व फिर्यादी प्रवीण महादेव धारे या दोघांना शिवा रहाणे यांच्याकडून पैसे घेतले व ते घेण्यासाठी या तिघांनी या पैशाच्या देवाण घेवाण वरून प्रवीण महादेव धारे व योगेश सोपान दवंगे यांना शिवीगाळ करत धरुन हातातील धारदार शस्त्राने वार केले ,आरोपी चांगदेव पूजा डांगे ,शंकर चांगदेव डांगे, अमोल चांगदेव डांगे यांनी योगेश सोपान दवंगे याला पकडून यांच्यावर धारदार शस्त्राने पोटावर, छातीवर वार केल्याने गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे ,या घटनेमुळे शिर्डी डोराळे परिसरात मात्र खळबळ उडाली आहे,चांगदेव डांगे ,शंकर डांगे, अमोल डांगे राहणार डोराळे यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन 755 / 2020भादवि कलम 302/ 307/ 504// 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही घटना घडताच घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव , पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे,सपोनि मिथुन घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली, आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली आहे, यासंदर्भात शिर्डी चे पोलीस निरीक्षक प्रवीण चंद लोखंडे हे अधिक तपास करीत आहेत, शिर्डी मध्ये देशमुख परिवर काही दिवसांपूर्वीच एक खून झाला होता व आता दुसरा हा खून शिर्डीजवळ होत आहे त्यामुळे शिर्डी व परिसरात नागरिकांमधून मोठी खळबळ निर्माण झाली आहे,




श्रीरामपुर  (प्रतिनिधी )-:श्रीरामपूर तालुक्यातील निमगांव खैरी - चितळी शिवारातील दिघी चारी जवळील शेतरस्त्याच्या कडेला लावलेल्या पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यास वनविभागाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोडल्याचे सांगितल्यामुळे एकच बिबट्या दोन ठिकाणी सोडलाच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे                 निमगाव खैरी चितळी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला . या भागात बिबट्याची प्रंचड दहशत झाली होती. बिबट्या जेरबंद झाल्याचे समजल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह निमगाव खैरी- चितळी येथुन अनेकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

    गेल्या काही दिवसापुर्वीच निमगाव खैरी गावा लगतच एक शेळी देखील बिबट्या ने फस्त  केली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी दुपारच्या वेळी मेंढ्या चारत असलेल्या  कळपातुन भर दुपारी मेंढी ओढत जवळच्या ऊसात घेऊन गेला होता.  ,त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली होती   त्यानुसार वनविभागाने पिंजरा लावल्याने बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता.

 वनपाल बी.एस. गाडे , वनरक्षक गोरख सुराशे, श्री लांडे व इतर कर्मचाऱ्या सह परिसरातील शेतकरी - ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने हा बिबट्या जेरबंद झाल्याने परीसरातील शेतकरी व वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र पुन्हा हाच बिबट्या अनेक नागरिकांना दिसल्याने नागरिकांतुन तीव्र संताप व्यक्त केला आहे वन विभागाने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन  संबधीत सर्वच जबाबदार कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी परीसरातील नागरिक करत आहेत.

*जिल्हाभर बिबट्याचे हल्ले वाढले असुन अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्यात निष्पाप लहान मुले, वृद्ध यांचे बळी गेल्याच्या घटना ताज्या असुन शासनस्तरावर योग्य निर्णय होऊन एखाद्या अभयारण्यात बिबट्यांची व्यवस्था होणे गरजेचे असुन निमगांव खैरी भागात पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला अवघ्या ४ कि.मी. वर असलेल्या नाऊर भागात सोडणे ही गंभीर बाब असुन या संदर्भात राज्यमंत्री तथा वन मंत्री प्राजक्त तनपुरे यांचेशी संपर्क झाला असुन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचेशी संपर्क साधुन मुजोर अधिकाऱ्या वर कारवाई ची मागणी करणार असल्याचे महाराष्ट्र ग्रामिण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष 

बाळासाहेब नवगिरे*यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले 

दरम्यान जाफराबाद चे सरपंच संदिप शेलार यांनी वनपाल श्री. गाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बिबट्या संदर्भात उडवा उडवीचे उत्तरे देऊन तुम्हाला कुणही मंत्र्याकडे वनमंत्री, मुख्यमंत्री यांच्या सह वरिष्ठा कडे  कुठे तक्रार करायची असेल तर करा, माझी बदलीची तयारी आहे, अशी भाषा सरकारी कर्मचाऱ्याने वापरल्याने तिव्र सांताप व्यक्त होत आहे संबधित बिबट्या हा जखमी अवस्थेत होता, या बिबट्यावर प्राथमिक उपचार करणे गरजेचे असतांना तसेच त्यावर पाणी मारणे गरजेचे असुन सुद्धा या बिबट्याची कोणतीही प्राथमिक काळजी न घेता हा जखमी बिबट्या तसाच सोडून देणे, ही वनविभागाची गंभीर चुक असल्याचे यावेळी नागरिकां मधुन बोलले जात होते . तसेच हा जखमी बिबट्या कोणा वर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेची चौकशी करण्याची मागणी नागरीकाकडून केली जात आहे


बेलापूरात दुषित पाणीपुरवठ्या विरोधात शोले स्टाईल आंदोलनाचा इशारा 

    बेलापूर : - ( प्रतिनिधी ) गेल्या अनेक दिवसांपासून बेलापूरकरांना दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असून त्यात सुधारणा न झाल्यास पाणीपुरवठ्याच्या मुख्य टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा अशोक कारखाण्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी 

ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

       निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या साथीचे रोग चालू आहे. त्यातच एक ते दिड महिन्यापासून गावात पिण्यासाठी दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाणीसाठा मुबलक असताना , ऐन दिवाळीतही नागरिकांना अशाच दुषित पाण्याचा पुरवठा केला गेला. पाणी मुबलक असताना जारचे पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तळ्याचे व इतर श्रोतांच्या  पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावे व त्वरित पाणीपुरवठा सुधरावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

     वेळोवेळी सांगूनही यात सुधारणा होत नसल्याने पुढील आठ दिवसात पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास ग्रामस्थांसह मुख्य पाण्याच्या टाकीवर चढून सामुदायिक शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभिषेक खंडागळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेनावर भास्कर बंगाळ , प्रसाद खरात , शांतवन अमोलिक , महेश कुऱ्हे , दादासाहेब कुताळ आदिंच्या सह्या आहेत.

अहमदनगर - शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी राज्याच्या राजकारणात भूकंप आणला. त्यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. यावर, आमची कसल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे. मात्र, असे असले तरी, सत्तारांच्या या ऑफरमुळे विखेपाटील शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चांना आता राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. अब्दुल सत्तार हे एका कार्यक्रमासाठी श्रीरामपूरमध्ये आले असता त्यांनी विखे पाटलांना ही ऑफर दिली.विखे पाटील हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी शिवसेनेत यावे आणि राज्याचे नेतृत्व करावे. मात्र, मी तर शिवसेनेत फक्त ऑफर देणारा आहे. परंतू आमचे पक्ष प्रमुख अंतिम निर्णय घेतात आणि पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य राहील. या अगोदरही विखे पाटील शिवसेनेत होते. त्यांनाही शिवसेनेचा अनुभव आहे. राज्य सरकारमध्ये अशा नेत्यांची गरज आहे आणि निश्चितपणे त्याचा परिणाम भविष्यात दिसेल,असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.सत्तार यांच्या ऑफर नंतर, काही वेळातच राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया आली. अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र असून पक्षविरहित आमची मैत्री आहे. आज ग्रामीण विकास विभागाचा कार्यक्रम होता पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करायचे होते. यासाठी अब्दुल सत्तार यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.खरे तर विखे पाटील भाजपमध्ये जात असताना त्यांच्या सोबत कोण-कोण जाणार? अशी जोरदार चर्चा होत होती. यात अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले आणि विखे पाटील भाजपमध्ये गेले. अब्दुल सत्तार यांच्या ऑफरवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टिकरण दिले असले, तरी राजकारणात काहीही होवू शकते. त्यामुळे ते उद्या शिवसेनेत दिसले तर नवल नाही, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अहमदनगर : गेल्या २० दिवसांपासून रिक्त असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी अनिल कटके यांना नियुक्ती मिळाली आहे. ते कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यातून बदलून आले आहेत. याशिवाय इतर सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्याही जिल्हांतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केल्या आहेत. काही अधिकारी नव्याने बदलून आले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक दिलीप पवार यांची ३१ आॅक्टोबर रोजी पुणे ग्रामीणला बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त होते. या महत्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, तसेच उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले. त्यात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती मिळाली. कटके यांच्याकडे कोपरगाव शहर व तालुका अशा दोन्ही पोलीस ठाण्यांचा पदभार होता. आता हे दोन्ही पदभार शिर्डीचे निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. याशिवाय नियंत्रण कक्षातील निरीक्षक संजय सानप यांची तात्पुरत्या स्वरूपात टू प्लस पथकात नेमणूक करण्यात आली आहे. जामखेडचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांना नगर येथील दहशतवादी विरोधी पथकात तात्पुरते संलग्न करण्यात आले आहे. घारगाव ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांची श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात, कर्जतचे सपोनि मनोहर इडेकर यांची नगरला तोफखाना ठाण्यात बदली झाली. तोफखान्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट यांची श्रीरामपूर शहर ठाण्यात, भिंगारचे उपनिरीक्षक पंकज शिंदे यांची संगमनेर शहर ठाण्यात बदली झाली. हे अधिकारी नव्याने हजर सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे हे पाथर्डी ठाण्यात, सपोनि सुनील बडे हे जामखेड ठाण्यात, सपोनि शाहिदखान पठाण हे बीडीडीएस येथे, सपोनि दिलीप तेजनकर हे श्रीगोंदा ठाण्यात, सपोनि दिलीप शिरसाठ हे जिल्हा विशेष शाखेत नव्याने हजर झाले. याशिवाय उपनिरीक्षक रणजित गट हे श्रीगोंदा ठाण्यात, मधुकर शिंदे राहुरी ठाण्यात, अनिल गाडेकर हे ट्रायल मॉनेटरिंग सेलमध्ये, नवनाथ दहातोंडे हे मानवसंसाधन विभागात, अशोक लाड हे शिर्डीत साई मंदिरात, तर उपनिरीक्षक दीपक पाठक हे एमआयडीसी ठाण्यात नव्याने हजर झाले आहेत. 

शिर्डी : आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत गुन्हेगारी राज हळूहळू डोके वर काढू लागली आहे. गुरूवारी रात्री काही गुंडांनी निमगाव हद्दीतील देशमुख चारी जवळील राहणाऱ्या रवींद्र साहेबराव माळी (वय-३७ ) या किराणा दुकानदाराचा मानेवर चाकूने वार करून खून केला आहे.या प्रकरणी अकरा जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.शिर्डीच्या शासकीय गेस्ट हाऊस समोरील देशमुख चारी येथे निमगाव हद्दीमध्ये रवींद्र साहेबराव माळी यांचे व आरोपी यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याची तक्रार शिर्डी पोलीस स्टेशनला रवींद्र साहेबराव माळी यांनी केली होती. याचा राग धरून अजय वैजनाथ भांगे, विशाल रमेश पाटील, रविंद्र बनसोडे, समीर शेख, अज्जु पठाण, रंजना वैजनाथ भांगे, ललिता रमेश पाटील, सुनील लोखंडे, अक्षय शिंदे, महेश गायकवाड, कुणाल जगताप आदी अकरा जणांनी १९ नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजेदरम्यान देशमुख चारीजवळ माळी यास तीन जणांनी पकडून त्याच्यावर चाकूने वार केले.  घटना कळताच पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तातडीने निर्णय घेत परिसरात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाच आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले असुन उर्वरितांचा शोध सुरू आहे. मयत रविंद्र माळी यांचा मुलगा रोहित माळी याने दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- फ्रेंड्स फाँर एव्हर ग्रुप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने एक पणती जवानो के नाम हा उपक्रम राबविण्यात आला असुन आचार्य गोविंददेवगिरीजी महाराज ऊर्फ आचार्य किशोरजी व्यास पत्रकार देविदास देसाई व बेलापुर पोलीसांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन शहीद जवान व कोरोना काळात शहीद झालेल्या कोरोना योद्ध्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली         फ्रेंड्स फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने गेल्या पाच वर्षापासुन पाडव्याच्या दिवशी एक पणती शहीद जवानो के नाम हा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून राबविला जात आहे  या वर्षी महंत गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास पत्रकार देविदास देसाई बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके साईनाथ राशिनकर हरिष पानसंबळ रामेश्वर ढोकणे यांच्या हस्ते दिप पेटविण्यात आले या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे अजय डाकले पंडीत महेशजी व्यास खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळुंके  दिलीप दायमा उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिषेक खंडागळे प्रफुल्ल काळे गोपाल जोशी मयुर साळुंके राजेश सुर्यवंशी योगेश जाधव सुभाष शेलार साईनाथ शिरसाठ शशिकांत तेलोरे महेश कुर्हे विष्णूकांत लखोटीया संदीप जाधव निशिकांत लखोटीया विजय कोठारी प्रभात कुर्हे प्रशांत मुंडलीक विकास खोसे सुरेश जाधव विशाल श्रीगोड विशाल वर्मा श्रीनिवास हिरवे गोरख कुमावत राम कुर्हे जयेंद्र खटोड रविंद्र कुर्हे वेणूगोपाल सोमाणी सुमीत सोमाणी महेश उंडे श्रीकांत भागवत रामेश्वर कोतकर आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

शिर्डी - राज्य सरकारने येत्या पाडव्याला, १६ नोव्हेंबर रोजी साईमंदीर उघडण्याचा निर्णय घेवुन जगभरातील भाविकांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. मंदीरे उघडण्यासाठी फारच कमी वेळ मिळाल्याने राज्यभरातील मोठ्या मंदीर व्यवस्थापनांची धावपळ होणार आहे.पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डी बाहेरील भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी केले. यावेळी डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे व मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी उपस्थीत होते.कोरोनामुळे १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता साईमंदीर बंद करण्यात आले होते. तब्बल २४२ दिवसांनी पाडव्याला साईमंदीर उघडणार आहे. सूरवातीला  सहा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने रोज दर्शन घेता येईल. हळुहळु ही संख्या वाढवण्यात येईल.६५ वर्षावरील वृद्धांना दर्शनाची अनुमती नसेल. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था असेल. भाविकाला ताप असेल तर त्यास तत्काळ संस्थान रूग्णालयात दाखल करण्यात येईल. भाविक कोरोना बाधित आढळला तर त्याला संस्थानच्या कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल. रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांमधुन किमान पन्नास भाविकांना आठवडाभराने फोन करून तब्येती विषयी फिडबॅक घेतला जाणार आहे.भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदीरात जावुन दर्शन घेता येईल मात्र चावडी आणि मारूती मंदीरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल. समाधी दर्शनानंतर बॅरिगेटींग मधुन पाच नंबर गेटने भाविकांना बाहेर पाठवले जाईल. भाविकांना मंदीरात हार, प्रसाद आदी पुजा साहित्य नेता येणार नाही. सत्यनारायण, अभिषेक पुजा, ध्यानमंदीर, पारायण कक्ष बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना केवळ उदी देण्यात येईल, बुंदी प्रसाद किंवा दर्शन रांगेतील कॅन्टीन मध्ये चहा-बिस्कीटे मिळणार नाही. कोरोनाचा संसर्ग कमी होताच हळुहळु भाविकांना पुर्वी प्रमाणे दर्शन व अन्य सुविधा मिळतील. प्रसादालय व भक्तनिवास सुरू करण्यात येणार आहे. भक्तनिवासात रोज एकाआड एक रूम देण्यात येणार आहे.  राज्य सरकारच्या निर्णयाचे साईनगरीत फटाके फोडून व मिठाई वाटून स्वागत करण्यात आले.

पुणे : वानवडीतील खुनाच्या प्रयत्नातील फरार असलेल्या आरोपीकडून आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन  स्वारगेट पोलिसांनी ११ पिस्तुले आणि ३१ काडतुसे असा एकूण ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. या आरोपींनी विकलेल्या दोन पिस्तुलांचा वापर वानवडी आणि वेल्हे येथील गोळीबाराच्या गुन्ह्यात करण्यात आला आहे.बारक्या ऊर्फ प्रमोद श्रीकांत पारसे (वय १९, रा. आंबेगाव पठार), राजू अशोक जाधव (वय २०, रा. माणगाव, ता़ हवेली), बल्लुसिंग करतारसिंग शिकलीगर (वय ४९, रा.निमखेडी, जि़ बुलढाणा), लादेन ऊर्फ सोहेल मोदीन आसंगी (वय २४, रा. टेल्को कॉलनी, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर, उपायुक्त सागर पाटील यांनी माहिती दिली. वानवडी परिसरात काही दिवसांपूर्वी वाळु सप्लायरवर भरदिवसा गोळीबार झाला होता. त्या गुन्ह्यातील आरोपीला पिस्तुल पुरविणारा व सध्या फरार असलेल्या आरोपी बारक्या हा स्वारगेट येथील पीएमपी बसस्थानकावर मित्राची वाट पहात थांबला असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बारक्या याला पकडले. त्याच्याकडून २ गावठी पिस्तुले आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने राजू जाधव याला एकूण १३ गावठी पिस्तुल व काडतुसे विकण्यास दिल्याचे सांगितले. त्यानुसार राजू जाधव याला पकडून त्याच्याकडून १ गावठी पिस्तुल व ४ काडतुसे जप्त करण्यात आली. प्रमोद व राजू यांनी त्याच्या ओळखीच्या लादेन याला ४ पिस्तुले विकल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी लादेन याला पकडून त्याच्याकडून ३ पिस्तुल व ८ काडतुसे जप्त केली. त्याने राजू जाधव याच्याबरोबर बुलढाणा येथे जाऊन बल्लुसिंग शिकलीगर याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिकलीगर याला अटक केली़.लादेन याने त्यातील पिस्तुल संदीप धुमाळ याला विकल्याचे सांगितले़ धुमाळ याने वेल्ह्यामध्ये त्यामधून गोळीबार केला होता़ त्याला ग्रामीण पोलिसांनी पकडले असून पिस्तुल जप्त केले आहे़ राजू आणि बारक्या हे दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत़ राजू याचे नातेवाईक बुलढाणा जिल्ह्यातील निमखेडा येथे राहणारे आहेत़ तेथे त्यांची शिकलीगर याच्याशी ओळख झाली होती़ त्यातून त्यांनी त्याच्याकडून पिस्तुले आणून येथे दुप्पट किमंतीला विकली होती़ ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, हवालदार महेंद्र जगताप, पंढरीनाथ शिंदे, अरुण पाटील, रामचंद्र गुरव, विजय कुंभार, विजय खोमणे, महेश बारवकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, अमित शिंदे, वैभव शितकाल, महेश काटे, भूषण उंडे, बाबासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांनी केली़.

शहरातील गुन्हेगारांना धाक राहिल्या नसल्याने, यापूर्वी अनेक अवैध व्यवसाय शहरात राजरोसपणे सुरू होती, मात्र पोलीस उपविभागीय कार्यालयाचा पदभार डीवायएसपी संदीप मिटके ,तसेच शहर पोलीस ठाण्याचा पदभार प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी घेतल्यानंतर, शहरात पोलीस कारवाई होतांना दिसू लागली आहे. ज्यात पंचशील लॉज येथील व्यवसाय, सिल्व्हर स्पून येथील अवैध दारू साठा, या पाठोपाठ रात्री ८: ३० वाजेच्या सुमारास शिवाजीरोड परिसरातील उच्चभृ वस्तीत, सुरू असलेल्या जुगार आड्डयावर पोलिसांचा छापा टाकत कारवाई केली,त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले जात आहे. सदरचा जुगार अड्डा यापूर्वी देखील सुरू असताना, पोलिसांशी असलेल्या हित संबंधामुळे याठिकाणी कारवाई होत नव्हती, परंतु शहराला लाभलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी , जुगार आड्डयावर छापा टाकल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था चांगल्या हातात असल्याचे बोलले जात आहे, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शहरातील जुगार आड्डयावर पोलिसांचा छापा टाकला, ज्यात ६ प्रतिष्ठित घरातील लोकांना जुगार खेळतांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून त्यांच्या कडून, २१ हजार ४९० रुपयांच्या रोख रक्कमेसह तसेच, मोबाईल गाड्या असा एकूण १ लाख ९६ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय, सदरची कारवाई डीवायएसपी संदीप मिटके ,IPS पोलीस अधिकारी आयुष नोपाणी तसेच पोलीस कर्मचारी जोसेफ साळवी,गणेश ठोकळ, प्रशांत बारसे, अमोल गायकवाड, शरद आहिरे आदींनी यशस्वी केलीय, पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये सिंधी समाज श्री साई झुलेलाल ट्रस्ट च्या वतीने श्री साई झुलेलाल भव्य दिव्य अशा मंदिराचे भूमिपूजन राज्याचे माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे, या कार्यक्रमाला शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे तसेच दक्षिण नगर चे खासदार डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे, त्याचप्रमाणे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी व माजी राज्यमंत्री डॉक्टर

गुर्मुखदास जगवाणी त्याचप्रमाणे शिर्डीचे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व सिंधी समाज बांधवांचे राज्यातील प्रतिष्ठित नेते व शिर्डीतील इतर पक्षांचेही सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत या शिर्डी येथील श्री साई झुलेलाल  भव्य दिव्य मंदिराचे भूमिपूजन होणार आहे, येथिल  सिंधी समाज साई झुलेलाल ट्रस्ट यांच्या मार्फत हे श्री साई झुलेलाल मंदिर भव्य दिव्य शिर्डीत बनवण्यात येणार आहे व त्याचे भूमिपूजन गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे ,अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये श्री साई झुलेलाल मंदिर होत असल्यामुळे राज्यातील व इतर राज्यातील सिंधी बांधवांमध्ये मोठा आनंद आहे, कोरोनामुळे हा भूमिपूजनाचा कार्यक्रम कोरोनाच्या अटी व शर्ती ठेवून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, सिंधी समाज श्री साई झुलेलाल ट्रस्टचे  संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी छत्तुमल ईश्वरदास केशवनी यांच्या प्रेरणेने हे श्री साई झुलेलाल मंदिराचे भूमिपूजन होत  असल्याची माहिती श्री सिधी समाज श्री साई झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम परसवानी, उपाध्यक्ष गोपीचंद फुंदवाणी, यांनी एका पत्रकाद्वारे दिली असून हा कार्यक्रम शिवाजीनगर शिर्डी येथे संपन्न होणार आहे, या कार्यक्रमासाठी श्री सिधीं समाज श्री साई झुलेलाल ट्रस्टचे गोविंद गरुर, खूपचंद फतणानी, सुरेश केशवानी ,रमेश प्रेमानी ,ओम प्रकाश प्रेमानी गिरीश मेवानी, नरेश दादावानी, श्याम थावानी, वासुदेव रोहरा, विजय ग्वालानी, आदी सदस्य व पदाधिकारी हे या भूमिपूजन कार्यक्रमाच्या तयारीसाठी परिश्रम घेत आहेत, या भव्य दिव्य श्री साई झुलेलाल मंदिरामुळे शिर्डी शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे,

 

बेलापुर(वार्ताहर)कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण बांधील असुन आपल्या आसापास  अवैध धंदे सूरू असल्यास किंवा कुणाचे कोणत्याही प्रकारे दबाव आणुन  शोषण होत असल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्रीरामपूर शहराचे  प्रशिक्षणार्थी आयपीएस पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी केले आहे.*

*बेलापुर येथील पोलीस चौकीत  स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी  नोपाणी यांनी मुक्त संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.*

*ते पुढे म्हणाले की,छोट्या छोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मोठमोठे गुन्हे घडतात त्यामुळे पोलिसात आलेल्या सर्व तक्रारी गांभीर्याने नोंदविण्यात याव्यात अशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील मोठी गुन्हेगारी रोखता येईल. लोकांनी पोलिसांशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास बिनधास्पतणे आपणाशी भ्रमणध्वनी क्रमांक 8459864520 वर संपर्क साधावा त्याची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल.वाळू मटका जुगार वा अन्य काही अवैध व्यवसाय सुरु असल्यास पोलीस स्टेशनशी अथवा माझ्याशी संपर्क करावा असेही नोपाणी यांनी स्पष्ट केले.पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे यावेळी उपस्थित होते.*

यावेळी झालेल्या चर्चेत माजी सरपंच भरत साळुंके यांनी झेंडा चौकात ट्रॅफिक पोलीस नियुक्त करण्याची मागणी केली. तसेच अन्य काही मुद्द्यांवर झालेल्या चर्चेत सर्वश्री.टॅक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील मुथा,पत्रकार देविदास देसाई, प्रा. ज्ञानेश गवले, नवनाथ कुताळ,बाजार समितीचे संचालक सुधीर नवले,अशोक कारखाना संचालक अभिषेक खंडागळे, अशोक गवते,अशोक पवार, अजय डाकले, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कु-हे ,पोलीस पाटील अशोक प्रधान, ,अकबर सय्यद आदींनी सहभाग नोंदविला.*

*यावेळी सर्वश्री व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रशांत लड्डा व शांतीलाल हिरण ,प्रसाद खरात ,पत्रकार दिलीप दायमा, सुहास शेलार,अशोक शेलार, किशोर कदम आदी उपस्थित होते.*

*बेलापुर पत्रकार संघ ,ग्रामस्थ व विविध संघटनांच्या वतीने यावेळी नोपाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस हवालदार अतुल लोटके, पो. नाईक. रामेश्वर ढोकणे,पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे, हरिश पानसंबळ, निखिल तमनर,साईनाथ राशीनकर आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.


श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली   उपविभागीय अधिकारी संदिप मिटके भापोसे आयुष नोपाणी  यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले पंचशील सिल्वर स्पून  या हॉटेलवर छापा टाकून  विस हजार रुपयांची दारू जप्त केलेली आहे  त्याचप्रमाणे दोन आरोपी ताब्यात घेतले असून एक फरार असल्याची माहिती आयपीएस अधिकारी आयुष नोपानी  यांनी दिली आहे.  या कारवाईमुळे शहरात अवैधरित्या  धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे या दोन कारवाईमुळे श्रीरामपुर शहरातील नागरिकांकडून  पोलीस प्रशासनाचे मोठे कौतुक केले जात आहे, धडाकेबाज कारवाई करत विस हजाराची बेकायदेशीर दारु जप्त करुन दोन जणांना अटक केली आहे. 


श्रीरामपुर  (प्रतिनिधी )-श्रीरामपुर शहरात असलेल्या एका लाँजवर पोलीसांनी छापा टाकून तीन महीलासह एका पुरुषाला ताब्यात ताब्यात घेतले असुन अवैध धंदे बंद करण्याचा पोलीसांनी विडाच उचलला आहे                                               श्रीरामपुर शहरात पोलीसांनी लाखोचा गुटखा पकडला ती गुटख्याची कारवाई वादात सापडली त्या नंतर पोलीस अधिकार्यांच्या तातडीने बदल्या झाल्या त्यातच नेवाशाहुन एक तडजोडी बाबत अधिकार्याची  क्लिप व्हायरल झाली या सर्व बाबीची पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी गांभिर्याने दखल घेवुन एखाद्या  पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरु असल्याचे आढळल्यास त्यास सबंधीत अधिकार्यास जबाबदार धरण्यात येईल असे फर्मानच पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी काढले आहे श्रीरामपुरला उपविभागीय अधिकारी म्हणून संदीप मिटके यांची तर शहर पोलीस स्टेशनला प्रशिक्षणार्थी भापोसे आयुष नोपाणी यांची नेमणूक करण्यात आली असुन या दोन्ही अधिकाऱ्यांमुळे अवैध व्यवसाय करणारांचे धाबे दणाणले आहे गुटख्यानंतर पोलीसांनी मटका देखील बंद केला असुन या पुढे अवैध व्यवसाय करणारांवर धाडाकेबाज कारवाई करण्याचा विडाच उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी उचलला आहे शहरातील शिवाजी रोडवर असणार्या लाँजवर देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहीती पोलीसांना मिळताच त्या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकला त्या वेळी तीन महीला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले या वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

श्रीरामपुर  (वार्ताहर)-संपूर्ण जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या गुटखा प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी टाकलेल्या एकलहरे  गुटखा छापा प्रकरणात काल शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने उशिरा श्रीरामपूर एस टी डेपोच्या निवृत्त कर्मचारी अन्सार आजम शेख  सह अरुण गांगुर्डे यांना ताब्यात घेतले  असल्याचे पोलीस सूत्राकडून समजते  

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागे लगत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये पोलीस यंत्रणेने प्रथमतः 54 लाखांचा  गुटखा  जप्त केला पुन्हा दोन दिवसानंतर याच भागातील एका बंद खोलीत दहा अकरा लाखाचा गुटखा असल्याची माहिती तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली होती. पोलीस पथकाने या बंद खोलीतुन 11 लाख 66 हजारांचा गुटखा सुगंधी तंबाखू पुन्हा जप्त केली.

परिसरात दोन वेगवेगळे छापे पडले पहिल्या ठिकाणी जो अवैध गुटखा सापडला त्या ठिकाणच्या मालकाचा शोध पोलीस यंत्रणेला एका आठवड्यानंतर लागला तर दुसऱ्या छापा ठिकाणच्या मालकाचा शोध अर्धा महिना लोटूनही लागत नव्हता मात्र काल पोलिसांनी  ताब्यात घेतलेल्या अन्सार आजम शेख हाच गुटखा प्रकरणाचा स्थानिक गुटखा किंग असल्याचे समजले आहे.

गुटखा छापा  ठिकाणी  गेल्या सहा महिन्यापासून गुटखा साठवून करून स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांना दिला जात असे, सदर गुटखा कनेक्शन संगमनेर मधून असल्याचे समजते , हा गुटखा  कोल्हार मार्गे याठिकाणी येत होता,  ताब्यात घेतलेल्या अन्सार आजम शेख मुळे आता अस्सल आरोपी समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे एकलहरेचे अस्सल गुटखा किंग पर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना यश आले असल्याची चर्चा  परिसरात सुरू आहे

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी अर्ध्या कोटींहून अधिक गुटखा जप्त झाला, त्या ठिकाणच्या मालक, चालकांपर्यन्त  पोलीस प्रशासन  पोहचलेले असल्याचे दिसून येत आहे. 

या गुटख्याच्या अवैध व्यवसायात तीन प्रमुख भागीदार असल्याचे बोलले जात आहे, हे तिघे अनुक्रमे बेलापूर, एकलहरे व संगमनेरचे आहे.  यापैकी संगमनेरचा जावई हा आपल्या बेलापूरच्या  सासऱ्यासोबत संलग्न राहून एकलहरेतील तिसऱ्या भागिदारासोबत जावई कोल्हार मार्गे गुलाबाच्या बागे लगत असलेल्या पत्र्याचा शेडमध्ये मध्यरात्री मोठमोठ्या ट्रकमधुन वहातुक करुन गुटख्याच्या साठवणूक  करीत होता  एकलहरेतील भागीदार आपल्या तीन भावांच्या मदतीने रातोरात  श्रीरामपूर शहरासह संपूर्ण तालुक्यातील गुटखा वितरणाचे काम करीत असे, 

ज्या ठिकाणी गुटखा साठवून अवैध व्यवसाय चालू होता, त्याच्या लगत गुलाबाचा बाग असल्याने गाडीच्या आतील भागात गुटख्याच्या गोण्या व बाहेरील बाजूस गुलाबाचे फुले भरून वाहतूक होत असल्याचे  परिसरात बोलले जात आहे.एकलहरे गुटखा कनेक्शन दुरवर पसरले असुन खोलवर तपास केल्यास बरेच मोठे मासे गळाला लागु शकतात या गुटखा प्रकरणात काहींनी मध्यस्थांचीही भूमिका बजावली असुन फार मोठी तडजोड झाल्याचीही आता जोर धरु लागली आहे.


राहुरी विद्यापीठ, दि. 03 नोव्हेंबर, 2020 प्रतिनिधी मिनाष पटेकर राहुरी:_महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे काम बंद आंदोलनाच्या दुसर्या दिवशी समन्वय संघाचे सर्व पदाधिकारी, विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी एकत्र येवून प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार घोषणा देत परिसर दणानुन टाकला. सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी आणि आश्वासीत प्रगती योजना लागू व्हावी यासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राच्या 10 जिल्ह्यातील 27 संशोधन केंद्रे, 82 योजनेत्तर योजना, 45 अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, नऊ कृषि महाविद्यालये, आठ कृषि तंत्र विद्यालये, दोन माळी प्रशिक्षण केंद्रे, चार विभागीय विस्तार केंद्रे, पाच जिल्हा विस्तार केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस उत्सपुर्तपणे घोषणा देत बंद सुरु ठेवला. 

काम बंद आंदोलनाच्या दुसर्या दिवशी विद्यापीठ मध्यवर्ती परिसारातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी एकत्र येत मोर्चा काढला व पुर्ण विद्यापीठामध्ये घोषणा देत प्रशासकीय इमारतीसमोर सर्व कर्मचारी जमले. यावेळी या मोर्चाचे नतृत्व समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. सी.डी. देवकर, उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. महाविरसिंग चौहान, सहसचिव डॉ. संजय कोळसे यांनी केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे आणि डॉ. सी.डी. देवकर यांनी सातवा वेतन आयोग आणि आश्वासती प्रगती योगनाचे निवेदन कुलगुरु आणि कुलसचिव यांना दिले. आंदोलनाला उत्तर देतांना कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले कर्मचार्यांच्या मागन्या रास्त आहे. राज्यात सर्व शासकीय कार्यालयांना सातवा वेतन आयोग लागु झाला असून राज्यातील कृषि विद्यापीठे याच्यातून वंचीत राहिले आहे. नुकतीच झालेल्या 48 वी कृषि संशोधन आणि विकास समिती बैठकीमध्ये सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजना संदर्भात मी कृषि मंत्री आणि कृषि सचिवांबरोबर याबद्दल बोललो आहे. आपल्या मागन्यांचा शासन स्तरावर विचार होणार असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी आंदोलकांना

उत्तर देतांना कुलसचिव श्री. मोहन वाघ म्हणाले आत्तापर्यंत समन्वय संघाने दिलेले सर्व निवेदने आपण मंत्रालय स्तरावर पाठविले आहे. मंत्रालयातील अधिकार्यांबरोबर विद्यापीठ प्रशासन संपर्कात असून लवकरच समारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रसंगी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर म्हणाले समन्वय संघ दोन वर्षापासून सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजनासंदर्भात शासन दरबारी मागन्या मांडत आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सातवा वेतन आयोगाची फाईल तयार होवून वर्ष झाले आहे. त्यात ज्या तृटी निघाल्या त्याची पुर्तता करुन दिलेली असून देखील फाईल लाल फितीत अडकली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकवर्ग कर्मचार्यांच्या फाईलला ज्या तृटी होत्या त्या देखील चार महिन्यापुर्वी पुर्ण करण्यात आल्या. तरी देखील शासन दरबारी दिरंगाई का होत आहे हे न उलगडणारे कोडे आहे. विद्यापीठातील कर्मचार्यांची सहनशक्ती संपली असून नाविलाजास्तव आंदोलन करुन विद्यापीठ कर्मचारी आपला रोष व्यक्त करत आहे. तरी सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजना पुर्वलक्षी प्रभावाने लवकरात लवकर लागु व्हावी. 

यावेळी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. याप्रसंगी डॉ. महाविरसिंग चौहान, डॉ. उत्तम कदम, डॉ. चांगदेव वायाळ व श्री. वराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी समन्वय संघाचे गणेश मेहेत्रे, मच्छिंद्र बाचकर, महेश घाडगे, जनार्धन आव्हाड, मच्छिंद्र बेल्हेकर, संजय ठाणगे, एकनाथ बांगर, बाबासाहेब अडसुरे, जनार्धन आव्हाड, व सौ. सुरेखा निमसे इ. पदाधिकारी उपस्थित होते. आजचा मोर्चा पदव्युत्तर महाविद्यालयापासून जोरदार घोषणाबाजी करत अभियांत्रिकी महाविद्यालय येथे घोषणा देवून प्रशासकीय इमारतीसमोर ठिया आंदोलन केले. या मोर्चामध्ये मध्यवर्ती परिसरातील सर्व अधिकारी व कर्मचारी सामाजीक आंतर राखत मोठ्या संख्येने उपस्थित होते.






श्रीरामपूर -  कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्या सह देशभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने, मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या उपचाराकरिता रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने, महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, संघटनेचे अध्यक्ष अशोक जोशी,उपाध्यक्ष संतोष कोठारी, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अबूभाई कुरेशी,सचिव हजी अमीन शेख ,खजिनदार तुकाराम ताक, जलील भाई शेख, फरीद शेख,नगरसेवक मुख्तार शाह, आदींच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले, यावेळी जवळपास २०० लोकांनी रक्तदान केले, सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास खासदार सदाशिव लोखंड, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सदिच्छा भेट दिली ,तसेच नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दूरध्वनी व्दारे शुभेच्छा संदेश दिला,सदरच्या भव्य रक्तदान शिबीरस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून ,२०० नागरिकांनी यावेळी रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.



 

शिर्डी (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हामध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे ,वाळूतस्करी तसेच गुन्हेगारीला  लगाम घालण्यांचे व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने आपण यापुढे करणार आहोत .असे आश्वासन अहमदनगर जिल्ह्याला नवीन आलेले कर्तव्यदक्ष असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

  अहमदनगर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी शिर्डीत आले होते. त्यांनी शिर्डी पोलीस उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पाचही पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीला पोलिस उप विभागीय अधिकारी संजय सातव

तसेच शिर्डी, कोपरगाव शहर, कोपरगाव ग्रामीण, राहाता ,लोणी, पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी उपस्थित होते .यावेळी उत्तर नगर जिल्हा तसेच शिर्डी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमध्ये, शहरांमध्ये अवैध धंदे ,अवैध व्यवसाय, वाळूतस्करी ,गुन्हेगारी या सर्वांचा आढावा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतला, यापुढे या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे, वाळू तस्करी, गुन्हेगरी त्वरित बंद व्हावेत, यासाठी सक्त सूचना त्या त्या पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना यावेळी देण्यात आल्याचे  समजते. त्यानंतर  या आढावा बैठकीनंतर शिर्डी पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक जितेश लोकचंदाणी, अध्यक्ष किशोर पाटणी, कार्याध्यक्ष राजेंद्र बनकर, सदस्य हेमंत शेजवळ, विनोद जवरेनी त्यांचा शिर्डीत प्रथम सत्कार करुन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद न घेता स्वतः शिर्डी पत्रकार संघाला आपणच या उत्तर नगर जिल्ह्यातील प्रश्न, समस्या ,अवैध धंद्या बाबत वेळोवेळी माहिती द्या, सर्वांच्या सहकार्याने आपण अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंदे वाळूतस्करी, गुन्हेगारी मोडून काढू, नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, पत्रकार ,पोलीस अधिकारी, नागरिक या सर्वांनी समन्वय साधून अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे ,आपला तसा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी पत्रकारांचेही सहकार्य आवश्यक आहे. असे यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच शिर्डीत आल्यामुळे त्यांनी साईबाबा मंदिर बंद असल्यामुळे बाहेरूनच लांबून दर्शन घेतले, सोलापूर हुन अहमदनगरला बदलून आलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यामध्ये प्रथम बदल्यांचा दणका पोलीस अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर आता ते अवैध धंदे ,गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे त्यांची धडकी अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारांनी ,वाळूतस्करांनी घेतली आहे. त्या धर्तीवर उत्तर नगर जिल्ह्यातील शिर्डीचा त्यांचा आजचा हा दौरा महत्त्वाचा ठरला आहे .त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत आढावा बैठकीत पोलीस निरीक्षकांना सक्त सूचना करत अवैध धंदे त्वरित बंद करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत असे समजते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget