गेल्या काही दिवसापुर्वीच निमगाव खैरी गावा लगतच एक शेळी देखील बिबट्या ने फस्त केली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी दुपारच्या वेळी मेंढ्या चारत असलेल्या कळपातुन भर दुपारी मेंढी ओढत जवळच्या ऊसात घेऊन गेला होता. ,त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली होती त्यानुसार वनविभागाने पिंजरा लावल्याने बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता.
वनपाल बी.एस. गाडे , वनरक्षक गोरख सुराशे, श्री लांडे व इतर कर्मचाऱ्या सह परिसरातील शेतकरी - ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने हा बिबट्या जेरबंद झाल्याने परीसरातील शेतकरी व वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र पुन्हा हाच बिबट्या अनेक नागरिकांना दिसल्याने नागरिकांतुन तीव्र संताप व्यक्त केला आहे वन विभागाने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन संबधीत सर्वच जबाबदार कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी परीसरातील नागरिक करत आहेत.
:
*जिल्हाभर बिबट्याचे हल्ले वाढले असुन अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्यात निष्पाप लहान मुले, वृद्ध यांचे बळी गेल्याच्या घटना ताज्या असुन शासनस्तरावर योग्य निर्णय होऊन एखाद्या अभयारण्यात बिबट्यांची व्यवस्था होणे गरजेचे असुन निमगांव खैरी भागात पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला अवघ्या ४ कि.मी. वर असलेल्या नाऊर भागात सोडणे ही गंभीर बाब असुन या संदर्भात राज्यमंत्री तथा वन मंत्री प्राजक्त तनपुरे यांचेशी संपर्क झाला असुन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचेशी संपर्क साधुन मुजोर अधिकाऱ्या वर कारवाई ची मागणी करणार असल्याचे महाराष्ट्र ग्रामिण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष
बाळासाहेब नवगिरे*यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
दरम्यान जाफराबाद चे सरपंच संदिप शेलार यांनी वनपाल श्री. गाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बिबट्या संदर्भात उडवा उडवीचे उत्तरे देऊन तुम्हाला कुणही मंत्र्याकडे वनमंत्री, मुख्यमंत्री यांच्या सह वरिष्ठा कडे कुठे तक्रार करायची असेल तर करा, माझी बदलीची तयारी आहे, अशी भाषा सरकारी कर्मचाऱ्याने वापरल्याने तिव्र सांताप व्यक्त होत आहे संबधित बिबट्या हा जखमी अवस्थेत होता, या बिबट्यावर प्राथमिक उपचार करणे गरजेचे असतांना तसेच त्यावर पाणी मारणे गरजेचे असुन सुद्धा या बिबट्याची कोणतीही प्राथमिक काळजी न घेता हा जखमी बिबट्या तसाच सोडून देणे, ही वनविभागाची गंभीर चुक असल्याचे यावेळी नागरिकां मधुन बोलले जात होते . तसेच हा जखमी बिबट्या कोणा वर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेची चौकशी करण्याची मागणी नागरीकाकडून केली जात आहे
Post a Comment