Latest Post

श्रीरामपूरःई.पी.एस ९५ योजनेतील सारूवजनिक व खाजगी क्षेञातील निवृत्तीधारकांच्या मगणीनुसार अर्थसंकल्पात निवृत्तीवेतन वाढिसाठी काहिच तरतूद केली नाही.याचे निषेधार्थ व निवृत्तीवेतन वाढिची मागणीकडे सरकारचे रक्ष वेधण्यासाठी आता ९ ते ११ मार्च दरम्यन दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात येणार असून निवृत्तीधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रिय संघर्ष समितीचे पश्चिम भारत प्रमुख सुभाष पोखरकर यांनी केले.          

          बाभळेश्वर येथील  यशवंतराव चव्हाण सभागृहात ईपीएस ९५ पेन्शन धारकांच्या मेळाव्यास संबोधित करताना श्री.पोखारकर बोलत होते.मेळाव्यास जिल्हाध्यक्ष श्री.संपत समिंदर, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती आशाताई शिंदे,नगर शहर कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख, शिर्डी अध्यक्ष श्री दशरथ पवार सर, संगमनेर अध्यक्ष श्री अशोक देशमुख यांनी संबोधित केले.चर्चेत श्री शिवाजी शितोळे, श्री राठोड श्री इनामदार श्री कडू यांनी सहभाग घेतला.

           पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी कमांडर  राऊत यांचे नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच अर्थसंकल्पात  तरतूद न झाल्याने दि.९ ते ११ मार्च २०२६ ला दिल्लीमध्ये जंतरमंतर वर होणा-या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.     

        यावेळी श्री. लक्ष्मण हासे, श्री. अरसुळे, श्री. अर्जुन जाधव, श्री. सुरेश कटारिया, श्री. रायभान तुपे , श्री. चेडे, श्री. खंडीझोड श्री. केशव वर्पे यांची विशेष उपस्थिती होती.प्रास्ताविक श्री चिंतामणी यांनी केले तर आभार श्री गोविंद जगताप यांनी मानले.

बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु असलेल्या घरकुल बांधकामास आसाम राज्याच्या शिष्टमंडळाने भेट दिली.कामाची पाहाणी केल्यानंतर सदर घरकुल वसाहतीबद्दल प्रशंसोदगार काढले.बेलापूरची घरकुल योजना हि पथदर्शक असून अशा पध्दतीचा पॕटर्न सर्वञ राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आसाम राज्याचे ग्रामविकास विभागाचे सहआयुक्त धृवज्योती नाथ यांनी केले.                                                                आसाम राज्याच्या शासकीय शिष्टमंडळाने बेलापूरच्या घरकुल वसाहतीस भेट दिली.सदरच्या शिष्टमंडळामध्ये श्री.धृबज्योती नाथ(सहआयुक्त, पंचायतराज व ग्रामविकास आयुक्तालय,आसाम)श्री. रणजीत दास(एस.पी.ई.पंतप्रधान ग्रामीण आवास योजना ,आसाम), श्री.निलोतनाथ मिश्रा(एस.पी.ई.पंतप्रधान ग्रामीण आवास योजना,आसाम) यांचेसह अहिल्यानगर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे श्री.किरण साळवे आदि सहभागी होते.          यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच सौ. मीनाताई साळवी, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी घरकुल कामाबाबत सविस्तर माहिती दिली. सदर प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर बेलापूरची घरकुल योजना पथदर्शक असून हा पॕटर्न सर्वञ अवलंबला जावा असे मत या प्रतिनिधींनी व्यक्त केले.                       यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे, इंजिनिअर विकास पगारे,हर्षल दांगट,गणेश गोरे, शरद त्रिभुवन,जालिंदर कुऱ्हे, भाऊसाहेब कुताळ,पुरुषोत्तम भराटे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,अँड.अरविंद साळवी,जाकीर हसन शेख,मोहसीन सय्यद,प्रभात कुऱ्हे,शफिक बागवान,जाकीर शेख,शफिक शेख,सौरभ बनकर,दादासाहेब कुताळ,बबन गायकवाड,विशाल सुरडकर, सुनिल हिवराळे,संतोष मगर,आकाश वाद्ये, अमजद शेख,ग्रामपंचायत कर्मचारी सचिन साळुंके,बाबासाहेब प्रधान आदी उपस्थित होते.*

बेबेलापूर (प्रतिनिधी)- कसलीही माहिती उपलब्ध नसताना मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेवुन बेलापूर पोलीसांनी त्या व्यक्तीस नातेवाईकांच्या ताब्यात दिले मनोरुग्ण मुलाला पहाताच आई व भावाला गहीवरुन आले . पोलीसातील माणूस आजही जिवंत असल्याची भावना आई अलका ससाणे यांनी व्यक्त केली.                             वाहेगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथील सोमनाथ नंदकुमार ससाणे हा मनोरुग्ण आहे .त्या अवस्थेत त्याने घर सोडले व भटकत भटकत तो उक्कलगाव येथे पोहोचला. येथील शिंदे वस्तीत गेल्यावर त्याने आरडाओरड सुरु केली अशोक शिंदे ,शुभम शिंदे,वैभव शिंदे, प्रमोद शिंदे यांनी तातडीने युवा नेतृत्व युवराज थोरात यांना माहिती दिली. युवराज थोरात पोलीस पाटील हिराबाई मोरे , इंद्रजित मुसमाडे ,मुकेश जगधने, दिपक पवार ,सोन्या खेमनर यांच्या सह शिंदे वस्तीवर पोहोचले त्यांना वाटले चोर असावा परंतु तो निरर्थक बडबड करीत होता. तो काहीही बोलू लागला. कुणाच्याही घरात जावु लागला रस्त्यावर बसुन लोळू लागला .युवराज थोरात व पोलीस पाटील हिराबाई मोरे यांनी तातडीने बेलापुर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संपत बडे यांना या बाबत माहिती दिली संपत बडे तातडीने तेथे आले त्यावेळेस योगेश ससाने याच्या खिशात काहीही आढळून आले नाही. त्याला माहिती विचारली असता तो केवळ ससाने इतकेच सांगत होता त्यामुळे काय करावे हा प्रश्न बडे यांना पडला त्यांनी त्याला खोदून खोदून विचारले परंतु त्याला काही नाव गाव पत्ता काहीच सांगता येत नव्हते व तो वेगळीच काहीतरी बडबड करीत होता. बडे यांनी गृहरक्षक दलाचे महेश थोरात, रणजीत थोरात,  व हर्षल इंगळे यांच्या सहकार्याने त्यास बेलापूर पोलीस स्टेशन येथे आणले. तेथे त्याला नाश्ता दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक वार तपासणी केली असता त्याच्या खिशात एक बारीक कागद सापडला त्यावर कुणाचा तरी नंबर होता पोलीस कॉन्स्टेबल बडे यांनी त्या नंबर वर संपर्क साधला असता त्यांनी देखील मी संबंधितास  ओळखत नाही माझ्या परिचयाचा नाही असे सांगितले परंतु बडे यांनी त्याच्याकडे पाठपुरावा केला असता त्याने त्या गावातील एका व्यक्तीचा नंबर दिला. बडे यांनी संबंधित व्यक्तीच्या फोनवर फोन केला असता त्याने सदर इसम आमच्या गावातीलच असून तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले व त्याच्या भावाचा व आईचा नंबर दिला पोलिसांनी तातडीने त्याचा भाऊ योगेश याचेशी संपर्क साधला भाऊ मिळाल्याचे समजताच दोघांनाही अतिशय आनंद झाला ते तातडीने बेलापूर येथे येण्यास रवांना झाले तोपर्यंत त्याची काळजी घेण्याची विनंती देखील आईने पोलिसांना केली  पहाटे दोन वाजता त्याची आई अलका नंदकुमार ससाने व  भाऊ योगेश बेलापूर पोलीस स्टेशनला आले व भावाला ताब्यात घेतले त्यावेळी आईचा व भावाचा आनंद गगनात मावेना त्यांनी मुलाला शोधून दिल्याबद्दल पोलिसांना धन्यवाद दिले. पोलीस आपले कर्तव्य चूक बजावत असून आपल्या मनोरुग्ण मुलाला सुखरूप कुटुंबाच्या ताब्यात दिल्याबद्दल आई अलका नंदकुमार ससाने हिने बेलापूर पोलिसांना धन्यवाद दिले ससाने कुटुंबीयाचे आनंदाश्रू पाहून पोलीस कॉन्स्टेबल बडे व होमगार्ड रणजीत थोरात महेश थोरात हर्षल इंगळे यांनाही गहिवरून आले

श्रीरामपूर (प्रतिनिधी):सेवा हीच खरी इबादत या विचाराने प्रेरित होऊन स्वर्गीय गुरुवर्य, वडीलधारी ‘मोठे बाबा’ आणि स्वर्गीय जुबेर भाई बिनसाद बाबा यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ‘दवा आणि दुवा’ ही समाजसेवेची चळवळ आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे. दोन्ही मार्गदर्शक आज हयात नसतानाही, त्यांच्या विचारांचा आणि सेवावृत्तीचा वारसा जपत हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था आजही गोरगरिबांच्या आरोग्यासाठी भक्कमपणे उभी आहे.

याच परंपरेचा भाग म्हणून श्रीरामपूर शहरातील आझाद मैदान येथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था आणि राहता येथील डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गरजू, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार हेमंत ओगले व नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या सेवाभावी परंपरेचे विशेष कौतुक करत, “अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकी जिवंत राहते,” अशी भावना व्यक्त केली.


गोरगरिबांसाठी आरोग्यसेवेचा आधार

या शिबिरामागील प्रमुख उद्देश म्हणजे गरिब, वंचित आणि उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांपर्यंत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचवणे हा आहे. याच भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून, दरवर्षी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात येते, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

तज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार

या शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, मूत्ररोग, किडनी, मेंदू, मणक्याचे विकार, कान-नाक-घसा (ENT), दंतशस्त्रक्रिया व मधुमेह अशा विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.


डॉ. रहमत दारूवाले आणि डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय टीमने सेवाभावाने या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर समाधान आणि आशेचे भाव दिसून आले.

सेवेची परंपरा पुढे नेणारे हात

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत होते. स्वर्गीय मार्गदर्शकांनी दिलेला सेवा, समर्पण आणि माणुसकीचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यामागे स्पष्टपणे जाणवत होता.

‘दवा आणि दुवा’ म्हणजे केवळ उपचार नाही, तर आधार

आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे उपचार खर्च परवडत नाही, तिथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम अनेक गरजूंसाठी आशेचा किरण ठरत आहे.

या स्तुत्य कार्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान आणि आशीर्वाद व्यक्त होत असून, “ही परंपरा अशीच अखंड सुरू राहो,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

बेलापूर-( प्रतिनिधी)-गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुलात सुरु असलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे पित्त खवळलेल्या सत्ताधाऱ्यांनी पत्रकबाजी सुरु केली असुन ही पत्रकबाजी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे माजी सरपंच महेंद्र साळवी व सदस्य रमेश अमोलीक यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .साळवी व अमोलीक यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की घरकुलाच्या चौकशी करीता गटविकास अधिकारी म्हस्के यांनी उपोषण सोडविताना ज्या बारा  मागण्या केल्या होत्या त्यात सत्यता असल्यामुळे चौकशी समीतीची नियुक्ती करुन सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या चौकशी समीतीमुळे आपली लबाडी उघड होण्याच्या भितीमुळे सत्ताधारी गडबडले आहेत ही बाब नागरिकांच्या लक्षात येणार असल्याने चुकीच्या पद्धतीच्या कामावरील लक्ष विचलित करण्यासाठी गावातील काहींना  हाताशी धरून गटविकास अधिकारी मस्के साहेब यांना निवेदन देऊन चौकशीसाठी राजकीय दबाव आणला जात आहे तसेच माजी सरपंच भरत साळुंके व सभापती सुधीर नवले यांच्या खाजगी बांधकामाची चौकशीचे आदेश घेण्यात आले .मुळात बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये बांधकाम कायदेशीर  कि बेकायदेशीर हे पाहण्याचा अधिकार ग्रामपंचायत प्रशासनाला आहे  यांच्या बांधकामाची चौकशी सरपंच व ग्रामसेवक यानी करणे गरजेचे असताना चौकशीचा फार्स कशासाठी आम्ही मांडलेल्या मुद्द्यापैकी घरकुलाच्या बाबत सरपंचांना गावातील गावकरी मडळाचे पुढारी व ठेकेदार चुकीची माहिती दिलेली दिसते कारण माननीय ना राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी शासनाकडून बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतला जी जमीन देण्यात आली त्यामध्ये काही अटी शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मुख्य अट हि बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत च्या नावे जमीन झाल्यानंतर सदरच्या जमिनीचा लेआउट तयार करून नगरचना विभाग श्रीरामपूर यांचे कडून रेखांकन मंजूर करून सदरील भूमिहीन लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीने पाचशे स्क्वेअर फुट जागा वाटप करण्यात यावी असे असताना ग्रामसभेत दोन तास चर्चा करून ज्या लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीत भाग घ्यायचा आहे त्यांच्या सोबत काढुनी 500फुट जागा त्यांच्या ताब्यात द्यावी असे ठरलेले असताना खाजगी ठेकेदाराकडे एक लाख 35 हजार रुपये रोख स्वरूपात जमा करणारे हे कोण असा सवाल साळवी व अमोलीक यांनी केला असून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गरीबांच्या घरकुलासाठी जमीन देवुन ही सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे लाभार्थी घरकुलापासुन वंचित राहु शकतात.  रेखांकन मंजूर न करता घरकुल बांधण्याची घाई का केली जात आहे तसेच सुमारे 400 लाभार्थींची ओटीपी नंबर घेऊन वाळू कोणाच्या बांधकामावर गेली किंवा त्याची विक्री करण्यात आली याची चौकशी होणे गरजेचे आहे तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवेदन दिलेले होते. त्या नीवेदनातील सर्व बाबी समजून सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून याची सत्यता जाणून घेतली व ती केलेली मागणी योग्य असल्यामुळे  तालुक्यामध्ये कुठल्याही गावांमध्ये चुकीच्या पद्धतीने काम होऊन देणार नाही मागील एक वर्षांमध्ये मा आमदार हेमंत ओगले यांनी बेलापूर ग्रामपंचायत परिसरात एक कोटी दहा लाख रुपयांची कामे मंजूर केली असून यावर्षी एक कोटीचे विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेले आहेत.असे असताना जर कुणी आंदोलन करण्याची धमकी देत असेल तर प्रति आंदोलन करण्याची आमची तयारी आहे मागील चार दिवसांपूर्वी मा गटविकास अधिकारी श्रीरामपूर पंचायत समिती यांनी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच यांच्या पत्रावरून लाभार्थींना दुसरा हप्ता देण्यात यावा अशी मागणी केली होती ती जर बरोबर असेल तर गटविकास अधिकारी श्रीरामपूर यांनी जोपर्यंत रेखांकन मंजूर होऊन जागावाटप होत नाही व जिओ टॅगिंग संबंधित लाभार्थींच्या व ग्राम विकास अधिकारी यांच्या फोटोसह मला उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत दुसरा हप्ता देणार नाही अशा आशयाचे पत्र बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतला देण्यात आलेले आहे बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये मागील पाच वर्षांमध्ये कोणत्या नेत्याचे चिरंजीव काम करतात हे नागरिकांना वेगळे सांगण्याची गरज नाही कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा अधिकाऱ्यांना इतर गावातील कामांच्या नावाने ब्लॅकमेलिंग करून बिले काढण्याचा धडाका संबंधित गावपुढ्यार्यानी केलेला आहे सरपंच सौ साळवी यांनी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील झालेल्या कामांची पाहणी करून चौकशी करावी आपला बोलवता धनी कोण आहे हे सर्व जनतेला माहित आहे व सर्व जनतेला झेंडा चौकात वरील सर्व कागदपत्र घेऊन मी दाखवायला तयार आहे त्यामुळे बेलापूर येथील नागरिकांनी या गाव पुढ्याया पासुन  सावध राहावे असे आव्हान माजी सरपंच महेंद्र साळवी व ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी केले आहे

बेलापूरःबेलापूरची घरकुल योजना पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा. यांचे संकल्पनेनुसार सुरु आहे.सदर योजनेबाबात आमदारांना बिल्डर लाॕबीकडून चुकीची माहिती दिली जात असल्याने आमदार अधिकाऱ्यांवर दबाव आणून आडकाठी आणित आहेत.वास्तविक सदर योजनेच्या स्वरुपास व योजनेस आमदारांनी आमसभेमध्ये संमती दिली.आता तेच  गोरगरीबांच्या सदर योजनेस सहकार्य करणेऐवजी ह्या योजनेत बाधा आणित आहेत.यामुळे गोरगरीब बेघरांना योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.त्यामुळे आमदारांनी चुकीची माहिती देणा-यांच्या सांगण्यावरुन घरकुलाचे कामात बाधा आणल्यास घरकुल योजनेच्या  लाभार्थ्यांचा आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सरपंच  मिनाताई साळवी यांनी दिला आहे.               सौ.साळवी म्हणाल्या की,बेलापूरची घरकुल योजना हि राज्यात आदर्श ठरावी यासाठी नाम.विखे पा. व नाम.गोरे यांनी काही मार्गदर्शक सुचना केल्या.सदर योजनेबाबत आमदारांनी आयोजित केलेल्या आमसभेत सविस्तर चर्चा देखिल झाली.यावेळी योजनेचे सविस्तर स्वरुप व तपशील सविस्तरपणे मांडण्यात आला.तेव्हा आमदारांनी त्यास संमती दिली. माञ या योजनेमुळे बिल्डर लाॕबीच्या हितसंबंधास  बाधा येणार असल्याने  सुधीर नवले,भरत साळुंके ,रविन्द्र खटोड आदि नेत्यांनी काही जणांना चिथावणी देवून मोर्चे,उपोषणे करायला लावले.तसेच या कानभ-या नेत्यांनी आमदारांना चुकीची माहिती देवून अधिका-यांवर दबाव आणणे भाग पाडले.अशाच त-हेने या महाभागांनी महिलांच्या सार्वजनिक शौचालयाला विरोध करुन ते काम बंद पाडले.एकीकडे हे महाभाग स्वतःला नाम.विखे पा.यांचे सरर्थक म्हणवतात तर दुसरीकडे नाम.विखे पा.यांच्या संकल्पनेतील घरकुल योजनेस विरोध करण्याचा  दुटप्पीपणा करतात असा आरोप सौ.साळवी यांनी केला.                                                             घरकुल योजनेचे काम चुकीच्या पध्दतीने होत असल्याचा आरोप तथ्यहिन असून हि निवडणुका जवळ आल्याने होणारी राजकीय स्टंटबाजी आहे.आरोप करणारांनी तक्रारीत नमुद केल्यानुसार  घरकुल योजना राबवायची तर उपलब्ध जागेत फक्त ५३७ इतकीच घरकुले बसतील.यामुळे ५०० लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागेल.या वंचित ५०० लाभार्थ्यांना घरकुले देण्याची जबाबदारी आमदार व तक्रार करणारे घ्यावयास तयार आहेत काय आसा सवाल सौ.साळवींनी उपस्थित केला.                    अशी वस्तुस्थिती असल्याने आमदारांनी या योजनेच्या कामाची समक्ष  पाहणी करुन योजनेची सविस्तर माहिती घ्यावी. चुकीच्या माहितीला बळी पडून स्वतःची अडचण करुन घेवू नये.अशाचत-हेने काहिजणांच्या चुकीच्या माहितीवरुन आमदारांनी टिळकनगर इंडस्ट्रिजबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने त्यांना कामगारांसह नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते.तसेच नंतर दिलगीरी व्यक्त करावी लागली होती याची आठवण ठेवून आमदारांनी चुकीच्या माहितीच्या आधाराने घरकुल योजनेत बाधा आणून गोरगरीब लाभार्थींचा रोष पत्करु नये.अशाच पध्दतीने दत्तनगर येथे रो हऊसिंग पध्दतीचे काम केले जात आहे.तोच पॕटर्न नाम.विखे पा.यांचे सुचनेवरुन स्विकारुन घरकुलांचे काम सुरु आहे.तेव्हा आमदारांनी बिल्डर लाॕबीच्या दिशाभुलीला बळी पडून गोरगरीबांना उघड्यावर पाडू नये असे.उलट या योजनेस मार्गदर्शन  व सहकार्य करावे.तसेच ग्रामस्थांनी आमदारांना मते दिली असल्याने गावातील अरुणकुमार वैद्यपथ,मेनरोड-केशव गोविंद मंदिर रस्ता,कु-हे वस्ती, जामा मशिद - गणपती  मंदिर-ते महादेव मंदिर रस्ता आदि रस्त्यांचे कामांना आमदारनिधी द्यावा असे आवाहन सौ.साळवी यांनी केले आहे.

बेलापूर (प्रतिनिधी):येथील छ.शिवाजी महाराज चौकात   भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त  ह.भ.प. मोहन खानविलकर महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजन तर बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे  यांचे हस्ते सृष्टीचे शिल्पकार मानल्या जाणाऱ्या विश्वकर्मा महाराजांच्या प्रतिमेचेवस पुष्पहार अर्पण करण्यात आले.               

     प्रतिमा पूजनानंतर  उपस्थितांनी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी भरत साळुंके ,अभिषेक खंडागळे ,रविन्द्र खटोड, प्रकाश कुऱ्हे, पञकार नवनाथ कुताळ,सुहास शेलार,दिलिप दायमा, बाळू शेठ खातीजी, चंद्रकांत पाटील नाईक,  रमेश अमोलिक, श्रीराम शर्मा, संजय शर्मा, सुरज शर्मा, प्रशांत लढा, राधेश शर्मा, राजेंद्र पोपळघट, जालिंदर शिंदे, गोविंद गाडेकर, शफिक आतार, नितीन शर्मा, दत्तात्रय कुऱ्हे, सोमनाथ शिरसाठ, महादेव गाडेकर, ऋषी वाकचौरे, रामभाऊ वाकचौरे, गोविंद भराटे आणि सुनील कुऱ्हे आदिंसह  ग्रामस्थ व कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापूर ( प्रतिनिधी)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर बु!! मराठी शाळा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .शाळेतील सर्व मुली व मुले यांचे  कवायत व लेझीम घेण्यात आली उद्देशकांचे वाचन व असाक्षरता प्रतिज्ञा घेण्यात आली. ध्वजारोहण पोलीस पाटील अशोक प्रधान व  बोरुडे सर यांच्या हस्ते करण्यात आले विविध गुणदर्शन स्पर्धेत सहभागी असणाऱ्या मुला-मुलींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले, या वेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनोगत, देशभक्तीपर गीत गायन सादर  केले, बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने मुलांना रेवडी ( खाऊ) वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे व राजाभाऊ काळे, मोकाशी दादा, श्रीमती निमसे ताई यांच्या वतीने देखील खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी माजी. जि. प. सदस्य श्री शरद  नवले पाटील , व माजी उपसरपंच व  ग्रामपंचायत सदस्य  श्री. अभिषेक खंडागळे पाटील, श्री. अरुण पाटील नाईक, सरपंच श्रीमती मीनाताई साळवी, शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.तुफेल अहमद सय्यद,शाळा व्यवस्थापन समिती मुली अध्यक्ष निमसे ताई व माजी विद्यार्थी संघ मेळावा अध्यक्ष श्री. शाहरुख भाई शेख, उपाअध्यक्ष, राज गुडे, कृष्ण भागवत  अंगणवाडी सेविका शेलार ताई, तेलोरे ताई, बेलापूर मुले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उदमले मॅडम, उपमुख्यधापिका सौ. अंत्रे मॅडम, शिंदे मॅडम, देवढे मॅडम बेलापूर मुली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दहिवाळ मॅडम उपमुख्याध्यापिका सौ. भवार मॅडम, श्रीमती. परदेशी मॅडम दोन्ही शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

बेलापूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील 11 गावामध्ये स्री पुरुष जन्मदरा मध्ये मोठ्या प्रमाणात विषमता आहे. मुलीचा जन्मदर घटण्यामागील कारणांचा शोध घेवून कोणी जर काही गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला बेलापूर खुर्द ग्रामपंचायत च्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध योजना व मुलीचा जन्मदर वाढण्याबाबत उपाय व मार्गदर्शन या विषयावर आयोजित केलेल्या चर्चा सत्रात अध्यक्षपदावरून ते बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी किरण सावंत ,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ,गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, महिला बाल विकास अधिकारी शोभाताई शिंदे सरपंच सविता राजुळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे म्हणाले की बेलापूर खुर्द या गावात मुलींचा

जन्मदर अतिशय कमी असून या मागील उपाय शोधणे आवश्यक आहे गावात व परिसरात कोणी गैरप्रकारे गर्भलिंग निदान चाचणी करत असेल तर त्याचे विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे कृत्य कुणी महिला दलाल हे करत असतील तर त्याची माहिती पोलीस खात्याला किंवा महसूल विभागाला द्या आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल उपस्थित पालकांना देखील विनंती आहे की मुलगा व मुलगी यामध्ये फरक करू नका मुलगी घराची लक्ष्मी आहे. तिच्या जन्माचे स्वागत करा आज मुलींची संख्या कमी असल्यामुळे अनेक मुले विवाह पासून वंचित आहेत यात महिलांची ही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. हा विषय आरोग्य विभागाचा असला तरी सामाजिक  व कायदेशीर भान आपल्याला ठेवावे लागणार आहे ग्रामपंचायत स्तरावर देखील मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे असे उपक्रम सर्व ठिकाणी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी किरण पाटील सावंत म्हणाले की एक महिला जी घर व्यवस्थित चालू शकते तालुक्याचे जिल्ह्याचे व देशाचे नेतृत्व करू शकते त्यामुळे महिलेला कमजोर समजू नका. स्री व पुरुष यांना समान वागणूक द्या मनातील नकारात्मक भावना काढून टाका आज सर्व स्तरावर मुली जोमाने काम करताना दिसत आहे त्यामुळे मुलींचा जन्मदर कसा वाढेल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे शासनाचे देखील या बाबीकडे लक्ष असणार आहे. कुणी चुकीचं काही करत असेल तर त्याला नक्कीच शासन केले जाईल असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना महिला बालविकास अधिकारी शोभा शिंदे म्हणाल्या  की मुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागणार आहे त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी करू नका. मुलीला गर्भातच मारू नका. त्याकरता शासनाने लेक लाडकी योजना राबविली आहे ग्रामपंचायत  व सामाजिक स्तरावर मुलीच्या जन्माचे स्वागत करून समाज जागृती होणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या यावेळी गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, वरिष्ठ पत्रकार मारुतराव राशिनकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.या वेळी द्वारकनाथ बडवे कैलास वाकडे गोरखनाथ बडधे, सुरेश महाडिक, सोमनाथ वाकडे, गोरख भगत, ग्रामसेवक राजेंद्र मेहत्रे विलास भालेराव, प्रशांत शहाणे, समीर सय्यद, रामदास बडधे, बाबुराव फुंदे ,सौ स्वाती घोरपडे, मानसी थोरात, उषा गुलदगड ,मनीषा थोरात , प्रियंका थोरात कल्पना भगत ग्रामपंचायत ऑपरेटर वर्षा सगळगीळे, आरोग्य विभागाचे डॉक्टर ममता धीवर, आरोग्य सेवक गिरीश जाधव, विमलताई माने ,संगीता पुजारी, अंबिका भालेराव, कल्पना भगत, आदीसह अंगणवाडी सेविका शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली भगत यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र बारहाते यांनी केले शेवटी उपसरपंच एडवोकेट दिपक बारहाते यांनी आभार मानले

बेबेलापूर (प्रतिनिधी )-जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेलापूरच्या विकासासाठी व गोरगरिबांच्या घरकुलाकरीता विनामूल्य जमीन दिली. परंतु सत्ताधारी स्वतः चे खिसे भरण्याच्या  व श्रेय लाटण्याच्या नादात घरकुल योजनेलाच हरताळ फासत असल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड व माजी सरपंच  भरत साळुंके महेंद्र साळवी, रमेश अमोलीक यांनी पत्रकार परिषदेत केला.       बेलपुरात एकाच दिवशी दोन आमरण उपोषण सुरू झाले व त्याच दिवशी ते उपोषण सुटले याबाबत सत्ताधाऱ्याकडून खुलासे करण्यात आले त्या खुलाशाला उत्तर देण्याकरता बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हे आरोप करण्यात आले यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी सरपंच महेंद्र साळवी व ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश आमोलिक यांनी सांगितले की शासनाने गोरगरिबा करता घरकुल योजना सुरू केली परंतु सत्ताधारी त्या योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वसुली करत आहेत घरकुल योजना पारदर्शक पद्धतीने राबविणे आवश्यक असताना सत्ताधारी मनमानी पद्धतीने कामकाज करत आहेत वास्तविक सर्व घरकुल लाभार्थ्यांची चिठ्ठ्या टाकून कोणाचे घरकुल किती नंबरला आहे हे निश्चित केले पाहिजे होते.प्रत्येक लाभार्थ्यांना नियमानुसार 500 चौरस फुट जागा वाटप करुन देणे आवश्यक होते परंतु तसे न करता मनमानी पद्धतीने घरकुल वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर कॉलनी बांधण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लाभार्थ्याकडून पैसे उकळण्यात येत आहेत .या कामाचा ठेका खाजगी व्यक्तीला देण्यात आला असुन त्या व्यक्तीची नेमणूक कशी केली त्याच दर्जाच्या व्यक्ती गावात नव्हत्या का? संबंधित व्यक्ती लाभधारकाकडून १३५०००रुपये वसलं करत आहेत त्याना वसुलीचे अधिकार कुणी दिले.लाभधारकाकडून सक्तीने संमतीपत्र कुणी लिहून घेतले त्यामुळे ही वसुली पुर्ण पुणे बेकायदेशीर आहे तसेच या घरकुल योजनेची लेआउट मंजूर नाही घरकुल योजने करीता आवश्यक त्या विभागाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही बेलापूर ग्रामपंचायतीने सर्व कायदेशीर प्रक्रियां डावलून खाजगी ठेकेदाराची नेमणूक करून सरपंच उपसरपंच व सत्ताधारी यांनी संगनमताने व चुकीच्या पद्धतीने घरकुल योजना राबवून लाभार्थ्यांचे फसवणूक सुरू केलेली आहे त्यामुळे हे लाभार्थी पैसे देऊनही घरकुला पासून वंचित राहू शकतात.लेआऊट मंजुरी शिवाय जागावाटप न करता बांधकाम सुरु राहील्यास लाभार्थ्यांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे या योजनेची निष्पक्ष चौकशी करावी व चुकीचे नियमाला डावलून काम करणारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यांनी केली आहे.

बेलापूरःराष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त काशी येथील मनकर्णिका घाट येथील नरसिंह मठ आयोजित श्रीमद कथेदरम्यान वैदिक विद्यार्थी महेश दायमा याचा विशेष गौरव करण्यात आला.            काशी येथील मनकर्णिका पिठाने श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे.याप्रसंगी आळःदी येथील तपोवनव्दारा आयोजित वैदिक परिक्षेत रामजन्मभुमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी यांचे हस्ते सुवर्णमुद्रिका प्राप्त आचार्य महेश दायमा यांस सन्मानित,करण्यात आले.सध्या महेश दायमा काशी येथे वैदिक शिक्षण घेत आहे.                             महेश दायमा हा पञकार दिलिप दायमा यांचा मुलगा आहे.त्याच्या या सन्मानाबद्दल पञकार भास्कर खंडागळे,मारुतीराव राशिनकर ,रणजीत श्रीगोड,अशोक गाडेकर,सुनिल मुथा,नवनाथ कुताळ,देविदास देसाई,ज्ञानेश गव्हले,सुनिल नवले,विष्णुपंत डावरे,सुहास शेलार,दिपक क्षञिय,गोविंद साळुंके ,आतिश देसर्डा,शरद पुजारी,शफिक बागवान,भारत थोरात आदिंनी अभिनंदन केले आहे.

बेलापूर ( प्रतिनिधी )-बेलापूर ग्रामपंचायत  हद्दीतील बेलापूर बुद्रुक व ऐनतपुर  येथील भरत अशोक साळुंके यांच्या मालकीच्या विविध गट नंबर मधील बांधकामाची माहिती नकाशे मिळावे तसेच बेलापूर बुद्रुक हद्दीतील संस्कृती मंगल कार्यालयाची व्यापारी दराने पट्टी आकारण्यात येऊन सन 2004 पासून त्याची वसुली करण्यात यावी या मागणीकरता मयूर प्रकाश खरात व सुरज रणनवरे हे बेलापूर ग्रामपंचायत उपोषण बसले असून आज बेलापूर ग्रामपंचायत कार्यालय समोर एकाच वेळी दोन उपोषणे सुरू झालेले आहेत. बेलापूर ग्रामपंचायत कार्यालय समोर आज दोन  मागण्याकरिता दोन ठिकाणी आमरण उपोषण सुरू झाले असून मयूर प्रकाश खरात व सुरज मायकल रणवरे यांनी आपल्याला विविध माहिती वेळेत न मिळाल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण सुरू केलेले आहे त्यांची मागणी अशी आहे की बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील भरत अशोक साळुंके यांच्या मालकीच्या गट नंबर 3/1/2 या गटामध्ये रहिवाशी प्रयोजनासाठी झालेल्या बिनशेती क्षेत्राचे मंजूर रेखांकन बांधकाम परवानगी तसेच सर्व कागदपत्राची सत्यप्रत मिळावी त्याचबरोबर बेलापूर बुद्रुक अंतर्गत साळुंखे यांच्या मालकीचे गट नंबर 44/2/16 या गटामध्ये वाणिज्य प्रयोजनासाठी झालेल्या बिन शेती क्षेत्राचे मंजूर रेखांकन नकाशे बांधकाम परवानगी तसेच सर्व संदर्भातील कागदपत्रे मिळावी त्याचबरोबर साळुंके यांच्या गट नंबर तीन ऑब्लिक एक ऑब्लिक दोन या गटातील रहिवासी प्रयोजनासाठी झालेल्या बिनशेती क्षेत्राचे मंजूर रेखांकन कसे मिळावे त्याचबरोबर साळुंखे यांच्या गट नंबर 153/2 मध्ये बेलापूर बुद्रुक हद्दीतील संस्कृती मंगल कार्यालय बांधलेले असून  मंगल कार्यालयात पट्टी ही व्यापारी दराने आकारण्यात यावी. समोर असलेल्या सद्गुरु मंगल कार्यालयाला 25000 पट्टी आहे मग संस्कृती मंगल कार्यालयाला 5000  पट्टीच का असा सवाल त्यांनी केला आहे त्याचबरोबर सन 2004 पासून नवीन व्यापारी दराने आकारणी करून त्याची वसुली करण्यात यावी या मागणी करतात घरात व रणवरे हे उपोषणास बसलेले आहेत गावात एकाच वेळी दोन उपोषण सुरू झाल्यामुळे नागरिकात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे

बेलापूर -(प्रतिनिधी)- बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत ने अकराशे घरकुलाचे बांधकाम सुरू केले असून घरकुलाची जागा कुणाचेही नावावर नसताना चुकीच्या पद्धतीने बांधकाम सुरू केले याबाबत वारंवार निवेदन देऊनही काहीच कारवाई झाली नाही त्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 21 जानेवारी पासून ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे .उपोषणाबाबत त्यांनी सर्व संबंधितांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की बेलापूर ग्रामपंचायत घरकुल रेखांकन व जागावाटप याबाबत गांभीर्याने घेणे टाळत आहेत. बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतने घरकुल बांधकाम सुरू करताना जो गाजावाजा केला तो केवळ दिखाऊ पणा होता. घरकुल कॉलनी बांधकाम करत असताना नियमानुसार काम केले नाही. आपण कोणाच्या आदेशाने हे काम चालू केले व चालू केलेले काम कोणाचे आहे हे सांगू शकत नाही. ग्रामपंचायतच्या 31 डिसेंबर रोजी झालेल्या मासीक बैठकीत सदस्य भरत साळुंके व रमेश अमोलीक यांनी लेआउट बाबत विषय मांडला होता ज्या अभियंतेकडून ले,आऊट केले आहे तो अभियंता व गावातील विविध अभियंते जे विषयात तज्ञ आहेत आणि त्यात काम करत आहेत तसेच नगररचना विभागातील अधिकारी यांची एकत्रित बैठक घ्यावयाचे ठरले होते.परंतु तसे केले नाही. ज्या लोकांना कॉलनीत घर बांधण्याची ऐपत नाही अशा लोकांना 500 चौरस फूट जागा वाटून देण्याचे ठरलेले असतानाही जागा वाटप करून न देता घरकुल कॉलनीचे काम जोरात सुरू केलेले आहे हे करत असताना सर्व नियम धाब्यावर बसवलेले आहे घरकुल वाटप करताना चिठ्ठ्या टाकून घरकुल वाटप केले पाहिजे होते . परंतु यातही वशिलेबाजी होताना दिसत असल्याचा आरोप अमोलीक यांनी केला आहे आपला स्वार्थ साधना करता सुमारे अकराशे घरकुल कुणाचे नावावर जागा नसतानाही त्या जागेवर घरकुलाचे बांधकाम सुरू केलेले आहे याबाबत वारंवार निवेदन देऊनही काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले घरकुलाचे काम थांबून अगोदर घरकुलाची जागा वाटप करून मगच बांधकाम केले जावे या मागणी करता त्या देशामुळे आजपासून बेलापूर ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे

लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी 'वृत्तपत्र' हा चौथा स्तंभ मानला जातो.  अनेकदा काहिजण कोणत्याही घटनेसाठी पत्रकाराला जबाबदार धरतात. त्यांच्यावर दबाव आणतात किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. आजही श्री.विक्रम नाईक यांनी पञकारावर अप्रस्तुत टिका केली आहे.पञकारांवर आरोप केले आहेत.याचा प्रथमतः बेलापूर प्रेस क्लब निषेध करीत आसून श्री.नाईक यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त करावी अशी मागणी करीत आहे.                     

आम्ही पत्रकार कुणाचे 'पगारी' नोकर नाही किंवा कोणाचे बाःधिल नाही. पञकाराने काय करावे हे शहाणपण कोणी शिकवायची गरज नाही.बेलापूर प्रेस क्लबचे  पत्रकार सदस्य समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून काम करत असतात.

बातमीची निवड हा पत्रकाराचा विशेष अधिकार आहे. कोणती बातमी प्रसिद्ध करावी आणि कोणती करू नये, हा सर्वस्वी त्या पत्रकारांचा आणि त्यांच्या संपादकांचा निर्णय असतो. बातमीचे महत्त्व, तिची सत्यता आणि समाजावर होणारा परिणाम तपासूनच बातमी लावली जाते. पत्रकारावर कोणत्याही बाह्य व्यक्तीने किंवा शक्तीने बातमीसाठी दबाव आणणे हे बेकायदेशीर आणि नैतिकतेच्या विरोधात आहे.

पत्रकार संरक्षण कायद्या सारखे पत्रकारांचे कायदेशीर कवच तरी काही अतिउत्साही व्यक्ती पत्रकारांना उद्देशून अपशब्द वापरतात किंवा टिकाटिपणी करतात.  महाराष्ट्र सरकारने 'पत्रकार संरक्षण कायदा' (२०१७) लागू केला असून त्यातील प्रमुख तरतुदीनुसार कलम ३ व ४: पत्रकारावर हिंसाचार करणे किंवा त्याच्या कामात अडथळा आणणे हा गंभीर गुन्हा आहे. कलम ५ नुसार सदर गुन्हे हे 'दखलपात्र  आहेत.                            तुमच्या राजकारणात पञकारांना आणू नका.पञकारांना राजकारणाशी काहिही घेणेदेणे नाही.दुसरे व्यक्ती वा नागरिक म्हणून पञकार स्वतंञ आहे.त्याची व्यक्ती म्हणून राजकीय विचारधारा असणे हा त्याचा नागरी अधिकार आहे.तेव्हा नागरीक म्हणून पञकाराने कोणी कोणाची  बाजू घ्यवी वा कोणाचे समर्थन करावे हा व्यक्तीगत प्रश्न आहे.त्याबाबत आक्षेप घेण्याचा कोणालाही अधिकार नाही.यापुढे अशाप्रकारची टिका प्रेस क्लबचे पञकार  सहन करणार नाहित,याची दखल घ्यावी.   याविषयी अनेक पत्रकार संघटनांनी  जाहीर निषेध करत वरिष्ठ अधिकारी यांना भेट घेणार असल्याची माहिती देखील दिली आहे कोणीही पत्रकारावर राजकीय ताबा आणू नये पत्रकारांना त्यांचे काम करून द्यावे या पद्धतीचे लवकरच निवेदन संबंधित प्रशासनाकडे माहिती मिळत आहे यावेळी            भास्कर खंडागळे(अध्यक्ष), सुहास शेलार(उपाध्यक्ष),रणजित श्रीरामपूर (सचिव),सुनिल मुथा(कोषाध्यक्ष ),विष्णुपंत डावरे(सहसचिव),सदस्यःअशोक गाडेकर,ज्ञानेश्वर गव्हले,देवीदास देसाई,नवनाथ कुताळ,सुनिल नवले,दिपक क्षञिय,दिलिप दायमा,गणेश साळुंके,शरद पुजारी,आतिष देसर्डा

सत्ता, पैसा आणि संपूर्ण यंत्रणा विरोधात असतानाही केवळ ११ मतांच्या फरकाने झालेला पराभव हा साधा निकाल राहिलेला नाही, तर तो संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. समोर दोन वेळा आमदार राहिलेले, साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे वजनदार नेते होते. त्यांनी सगळी ताकद पणाला लावली, तरीही विरोधकाला संपवू शकले नाहीत, हेच या निकालाचे मोठे वास्तव आहे.

“मी ११ मतांनी हरलो आहे, पण भीतीने नाही, झुकून नाही, विकून नाही,” अशा ठाम शब्दांत उमेदवाराने आपली भूमिका मांडली. हा निकाल एकच गोष्ट स्पष्ट करतो — जुन्या राजकारणाची मक्तेदारी आता हादरली आहे. लोकांचा आवाज दबवता येत नाही, उलट तो अधिक बुलंद होत चालला आहे.

पराभव जरी स्वीकारावा लागला असला, तरी गावागावात एकच चर्चा — ‘११ मतांची हळहळ’ सुरू आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या उमेदवाराने थेट कारखानदारी आणि प्रस्थापित सत्तेला टक्कर दिली. पराभव असूनही जनतेच्या नजरेत ते ‘हिरो’ ठरले आहेत. “आज हरलो असेन, पण उद्याच्या लढाईसाठी अधिक ठाम, अधिक आक्रमक आणि अधिक सज्ज आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या निकालानंतर स्वीकृत नगरसेवक पदाच्या न्याय्य हक्काचा प्रश्नही चर्चेत आला आहे. “हा न्याय कोण देणार?” असा सवाल उपस्थित होत असून, विखे साहेब न्याय देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकूणच, हा पराभव नसून तो सामान्य माणसाच्या संघर्षाचा विजय मानला जात आहे. ही लढाई इथे थांबत नाही, तर खऱ्या अर्थाने आता सुरू झाली आहे, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.


कोपरगाव : समता पतसंस्थेची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने काही विरोधकांनी थकबाकीदारांच्या माध्यमातून दाखल केलेल्या समता पतसंस्थेची चौकशी सहकार मंत्रालयाने अखेर थांबविली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल माहिती व कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्यानंतर सहकार मंत्रालयाकडून ही चौकशी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सत्याचाच विजय झाला असून समता पतसंस्थेला अडचणीत आणण्याचा डाव उधळला असल्याचे मत समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले.ते पुढे म्हणाले की, विरोधकांच्या पाठबळावर थकबाकीदारांनी संस्थेविरोधात चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या तक्रारी दाखल केल्याचा आरोप केला आहे. या अगोदर देखील याच थकबाकीदारांनी संस्थे विरोधात सहकार खात्याकडे अर्ज दाखल करून ही संस्थेला क्लीन चीट दिलेले आहे. त्या चौकशीत संस्थेविरोधात काहीही निष्पन्न झालेले नव्हते. तसेच याच थकबाकीदारांनी हायकोर्ट, जिल्हा कोर्टात देखील संस्थेविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. परंतु चुकीच्या याचिका दाखल केल्या असता हायकोर्टानेच त्या याचिका फेटाळून त्या थकबाकीदारांना ५० हजारापर्यंत दंड ठोठावलेला आहे.समता पतसंस्थेच्या वतीने ॲड.विजय गवांदे यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, समता पतसंस्थेची वसुली कठोर व कायदेशीर करण्यात येत असते. सहकार मंत्रालयात याचिका दाखल केलेल्या थकबाकीदारांची वसुली देखील कायदेशीर करण्यात आली आहे. सहकार मंत्रालयात याचिका दाखल केलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्तेची किंमत ठरवून त्यांच्या समक्ष विक्री करण्यात आली होती. ठरलेल्या किमतीपेक्षा अधिक किमतीने त्यांच्या जप्त केलेली मालमत्ता विकण्यात आली नसून थकबाकीदारांची कोणतीही फसवणूक झाली नाही. याउलट काका कोयटे कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी कोपरगाव सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक रिंगणात असल्यामुळे त्यांची बदनामी विरोधकांनी त्या थकबाकीदारांना एकत्र आणून चालू केली आहे. विरोधकांकडून सहकार आयुक्त कार्यालयावर दबाव आणून ही चौकशी लावण्यात आली आणि संस्थेच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु विरोधकांनी काका कोयटे यांना विरोध करण्यासाठी थकबाकीदारांच्या माध्यमातून संस्थेची चौकशी लावली असून त्या थकबाकीदारांची देखील चौकशी करण्यात यावी.तसेच समता पतसंस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून सहकार खात्याने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे सभासद व ग्राहकांच्या विश्वासावर पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने कार्यरत असून संस्थेच्या आर्थिक व्यवहारात कोणतीही अनियमितता नसल्याचे यापूर्वीही प्रत्येक वर्षी होणाऱ्या ऑडिटमध्ये अ दर्जा मिळून स्पष्ट झाले आहे. मात्र, कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये संस्थेचे चेअरमन काका कोयटे कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत असल्यामुळे विरोधकांचा थकबाकीदारांच्या माध्यमातून संस्थेचा अपप्रचार व अफवा, सोशल मीडियावर बदनामी करण्याचा डाव चालु असल्याची माहिती संस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल यांनी दिली.याबाबत जेष्ठ संचालक जितूभाई शहा म्हणाले की, विरोधकांनी संजय चंद्रकांत मोरे, वसंत मधुकर घोडके, ओमप्रकाश बाबूआप्पा खके या थकबाकीदारांना एकत्र करून सहकार मंत्रालयात चौकशीची याचिका दाखल केली होती. सहकार मंत्रालयात थकबाकीदारांनी केलेल्या चौकशी अर्जाची प्रत संस्थेला ८ डिसेंबर २०२५ रोजी संस्थेला प्राप्त झाली. त्याच दिवशी समता पतसंस्थेचे म्हणणे ऐकून न घेता विरोधकांच्या दडपणाखाली हा आदेश सहकार मंत्रालयाने दिला.त्यानंतर संस्थेच्या वतीने १० डिसेंबर २०२५ रोजी थकबाकीदारांच्या विरोधात सहकार मंत्रालयात याचिका दाखल केली. प्रसंगी ज्यांनी सहकार मंत्रालयाकडे चौकशीची याचिका दाखल केली होती ते थकबाकीदार संजय चंद्रकांत मोरे, वसंत मधुकर घोडके, ओमप्रकाश बाबूआप्पा खके सुनावणी दरम्यान सहकार मंत्रालयात उपस्थित होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समक्ष सहकार मंत्रालयात झालेल्या सुनावणीत समता पतसंस्थेची चौकशी थांबविली आहे.निवडणूक काळात थकबाकीदारांच्या तक्रारीवरून सहकार खात्याकडून लावण्यात आलेल्या चौकशीमागे तथ्य नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने सदर चौकशी थांबविण्यात आली आहे.आम्ही देखील थकीत कर्जदारांनी संस्थेची केलेल्या बदनामी विरोधात न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सांगितले. या निर्णयामुळे समता पतसंस्थेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त झाल्याची भावना सभासद व ग्राहकांमध्ये व्यक्त होत आहे.समता पतसंस्थेने भविष्यातही कायदेशीर चौकटीत राहूनच कार्य सुरू ठेवणार असून कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा अफवांना बळी न पडता सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी व्यक्त केला आहे.



श्रीरामपूर (प्रतिनिधी) - वृत्तपत्र क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारारा ज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर 'दर्पण पुरस्कार' येथील दैनिक स्नेहप्रकाशचे मुख्य संपादक प्रकाश बापूराव कुलथे यांना जाहीर झाला आहे. ६ जानेवारी पत्रकार दिनी सदरचा पुरस्कार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव असलेल्या कोकणातील पोंभुर्ले,ता.देवगड,जि.सिंधुदुर्ग येथे स्मारक म्हणूनउभारलेल्या दर्पण सभागृहात समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या पत्रकारांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.राज्यातील अनेक नामवंत संपादक व ज्येष्ठ पत्रकारांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील महाराष्ट्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

श्री.प्रकाश कुलथे हे गेली ३५ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत.स्नेहप्रकाश प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले असून आत्तापर्यंत शेकडो पुस्तके प्रकाशित करून लेखकांना प्रोत्साहित केले आहे.


श्री.प्रकाश बापुराव कुलथे यांनी आपल्या यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या सामाजिक वृत्तपत्रे क्षेत्रात अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते

 दैनिक स्नेहप्रकाश चे मुख्य संपादक असून साप्ताहिक वर्ल्ड सामना चे संस्थापक संपादक, वृत्तपत्र व प्रसार माध्यम राज्य अधीस्विकृती समिती, महाराष्ट्र शासन सदस्य,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी चे विश्वस्त,श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर लाड सुवर्णकार संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक चे उपाध्यक्ष,महाराष्ट्र संपादक परिषद,मुंबई चे कार्याध्यक्ष,

महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा श्रीरामपूर चे कार्याध्यक्ष, श्रीरामपूर पत्रकार संघाचे सचिव, हिंद सेवा मंडळाच्या क. जे. सोमैय्या हायस्कुल, श्रीरामपूर चे सदस्य म्हणून काम पाहत असून नुकतीच त्यांची इंडियन लँग्वेजेस न्युज पेपर असोसिएशन (इलना) या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

यापूर्वी पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार हा वृत्तपत्र क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देखील त्यांना आता जाहीर झाला आहे.श्रीरामपूर शहर तसेच जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने हा संपूर्ण श्रीरामपूरकरांचा सन्मान आहे असे मानले जात आहे.श्री कुलथे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील तील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –  तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घटना काल घडली. उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील शिव आरोग्य सेना प्रमुख म्हणून ओळख असलेले आणि सामाजिक उपक्रमांमुळे तालुक्यात विशेष लोकप्रियता मिळवलेले डॉ. महेश शिरसागर यांनी काल भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला हा प्रवेश सोहळा केवळ मोठ्या उत्साहातच नाही, तर भविष्यातील राजकीय ध्रुवीकरणाचे संकेत देणारा ठरला.


 श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नामदार विखे पाटील हे श्रीरामपूर दौऱ्यावर असताना   हा पक्ष प्रवेश करण्यात आला  डॉ. महेश शिरसागर यांनी शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून तालुक्यात रुग्णसेवा, आरोग्य शिबिरे, रक्तदान, सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीतील  राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


यावेळी बोलताना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “श्रीरामपूरचा विकास, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांमध्ये हा प्रवेश निर्णायक ठरेल. युवकांना नेतृत्व मिळावे आणि सामाजिक कार्याला दिशा मिळावी, या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपच्या माध्यमातून श्रीरामपूरचा विकास अधिक वेगाने होईल.”


दरम्यान डॉ. शिरसागर यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “ही केवळ राजकीय पायरी नाही तर समाजसेवेच्या कार्याला नवा आयाम देण्याचे पाऊल आहे. जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनेच मी प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात विविध चर्चांना चांगलीच उधाण आले आहे. आगामी निवडणुका, नगरपालिकेतील सत्ताकारण आणि विविध गट-तटबंदीच्या पार्श्वभूमीवर शिरसागर यांचे पक्षप्रवेश हे प्रस्थापित राजकीय घटकांसाठी धक्का मानला जात आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर लगेचच शहरात चर्चा वाढली असून, “श्रीरामपूर आता नव्या राजकीय पर्वाकडे वाटचाल करत आहे,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. राजकीय वातावरणात बदलाचे संकेत देणाऱ्या या घटनाक्रमामुळे श्रीरामपूरचे राजकारण अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार हे निश्चित!

श्रीरामपूर प्रतिनिधी - अहिल्या नगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांचे विश्वासू सहकारी ॲङ समिन बागवान यांनी काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश केला.


गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेस पक्षात् सक्रिय, एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत होते.

2019 व 2024 च्या विधानसभा निवड नुकित सक्रिय सहभागी,जाहीर सभामधून उत्कृष्ट मुद्देसूद मांडनी करुन काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यातत्यांचा सिंहाचा वाटा होता.

 नगरपालिका निवडणुकीत पक्षश्रेष्टी कडून दखल न घेता अन्याय झाल्याने नाराज नाराज होते.पालकमंत्री विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे यांनी भारतीय जनता पक्षाची दीन दलित,मुस्लिम-अल्पसंख्याक,शेतकरी यांच्या बाबतीत असणारी सर्व समावेशक भूमिका पसंत पड़ल्याने व भविष्यात अल्पसंख्याक समाजाचा असणारा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी एक उत्तम समन्वयकाची भूमिका घेऊन वाटचाल करण्यासाठी तसेच आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा कायदेशीर, सामाजिक,राजकीय व वैद्यकीय सेवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळवुन देण्याचा मानस ठेऊन जाहीर प्रवेश केला. 

या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री पालक मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ॲडवोकेट बागवान यांच्या प्रवेशाबद्द्ल आंनद व्यक्त करुन निश्चित न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष नितिन दिनकर, दिपक पटारे, इंद्रनाथ पाटील थोरात,संजय फंड, श्रीनिवास बिहानी,रवि पाटील,केतन खोरे,आशिष धनवटे,नारायण डावखर, मुख़्तार शाह,नजीर मुलानी,महेबुब कुरैशी,हाजी इस्माइल,मोहसिन शेख,मेहबूब प्यारे,मुदस्सर शेख,तौफीक शेख,शरद नवले,अभिषेक खंडागळे,नाना शिंदे,नीतिन भागडे,दिपक चव्हाण,विराज भोसले,बंडु शिंदे,राहुल आठवाल आदि उपस्थित होते. या प्रसंगी समिन बागवान यांचे समवेत अनेक सहकाऱ्यानी जाहीर प्रवेश केला.

सदर प्रवेश हा कॉंग्रेस पक्षासाठी धक्का समजला जात असून बागवान हे एक उत्कृष्ट वक्ते असून उत्तम संघटन कौशल्य व सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर पक्षा सोबत जोड़ला जाईल यात शंका नाही असे या प्रसंगी अनेक उपस्थितांनी बोलून दाखवले.

एडवोकेट बागवान यांच्या प्रवेशाने वार्ड नंबर दोन तसेच संजय नगर भागातील गणिते बदलणार असल्याचे सांगितले जात आहे.

सिन्नर (जि. नाशिक) येथील पोलिस ठाण्यात जी.डी. क्रमांक 041 नुसार बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप दामोदर रूपते (वय 40 वर्षे) हे दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारास 8 वाजता आपल्या घरीून – उद्योग भवन, सिन्नर, जि. नाशिक येथून कोणास काहीही न सांगता बाहेर पडले असून ते परत घरी आले नाहीत. प्रदीप रूपते यांचे वर्णन पुढीलप्रमाणे : उंची : 5 फूट 6 इंच रंग : सावळा चेहरा : उभट केस : काळे, छोटे वेषभूषा : राखाडी रंगाची नाईट पॅंट आणि पिवळ्या रंगाचा टी-शर्ट याबाबत मनोज दामोदर रूपते (वय 45 वर्षे, व्यवसाय – व्यापारी) यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद (रजी. क्र. 147/2025) करून दिली आहे. सदर व्यक्तीचा शोध सुरू असून, कोणाला प्रदीप रूपते यांची माहिती मिळाल्यास सिन्नर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असा सिन्नर पोलिस ठाण्याचा आवाहन आहे. 📞 संपर्क : 9860158354 तपास अधिकारी : पो. हवालदार हरीश रामेश आव्हाड स्रोत : सिन्नर पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget