बेलापूरच्या 'सत्यमेव जयते' ग्रुपची पाणी देण्याची आग्रही मागणी!
बेलापूर (प्रतिनिधी):
बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याच्या दुभाजकामध्ये लावलेली तसेच दुतर्फा लावलेली झाडे वेळेवर पाणी न दिल्यामुळे जळून चालली आहेत.त्याचबरोबर झाडांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळया देखील गायब झालेल्या आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने झाडांचे संगोपन होईल अशी व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी बेलापूर येथील 'सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुप' च्या वतीने पत्रकार देविदास देसाई यांनी केली आहे.
सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की पर्यावरणाचे संतुलन रहावे त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस समोरुन येणाऱ्या वाहनांच्या प्रखर लाईटच्या प्रभाव पडू नये या करीता कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता दुभाथकामध्ये ही झाडे लावण्यात आली होती. सध्या कडक उन्हाळा सुरु झाला असून झाडांना वेळेवर पाणी न दिल्यामुळे झाडे वाळत चालली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावुन त्यां झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराला देण्यात आली होती.पावसाळ्यात संबंधीत ठेकेदाराने झाडे लावली पण नंतर त्या झाडाकडे ढुंकूनही पाहीले नाही. लावलेल्या झाडापैकी केवळ पाच दहा टक्केच झाडे कशीबशी तग धरुन आहे. अनेक झाडे पूर्णपणे वाळली असून, काही शेवटच्या घटका मोजत आहेत. शासनाचा पैसा खर्च करून लावलेली ही झाडे जगविणे संबधीत ठेकेदाराची जबाबदारी आहे.
या संदर्भात 'सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुप' च्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या झाडांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि त्यांची योग्य निगा ठेवावी, असे आवाहन केले आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर सर्व झाडे नष्ट होतील, व केलेला खर्च वाया जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पर्यावरण रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या या ग्रुपने प्रशासनाला तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला झाडाला पाणी देण्याबाबत आदेश करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.या निवेदनावर देविदास देसाई सह अभिषेक खंडागळे ,राधेश्याम अंबिलवादे, संजय भोंडगे, हाजी इस्माईल शेख ,इरफान शेख, किरण गागरे, दिपक क्षत्रिय,सचिन वाघ,विष्णुपंत डावरे ,किरण शेलार,दिलीप अमोलिक, भगीरथ मुंडलीक ,विलास नागले,प्रा निजाम शेख,सचिन देवरे,सचिन कणसे, पुंजाहरी सुपेकर,महेश कुऱ्हे, सोमनाथ जावरे, बाबुलाल पठाण, जाकीर शेख, रवींद्र करपे, विशाल आंबेकर, महेश ओहोळ, गोपी दाणी, दिलीप दुधाळ,बाबासाहेब काळे,अर्जुन डूकरे आदिंसह सदस्यांनी केले आहे


Post a Comment