April 2023

बेलापूरःकृषी उत्पन्न बाजार समिती हि शेतक-यांशी निगडीत आहे.या संस्थेच्या माध्यमातून शेतक-यांचे प्रश्न सोडवायचे आहेत तसेच अनेक विकास कामे करावयाची आहेत.यासाठी सत्तेचे पाठबळ लागते.त्यासाठीच महसूल मंञी श्री.राधाकृष्ण विखे,मी आणि करण ससाणे यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही  कायम जनतेत असतो म्हणूनच आम्हाला सत्ता मिळते हे केवळ निवडणूकांच्या वेळी अवतरणारांनी ध्यानात ठेवावे असे  प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.                                       कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील श्रीरामपूर सहकार विकास पॕनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे आयोजित मेळव्यात श्री.मुरकुटे बोलत होते.जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे,भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे,साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर,माजी सभापती नानासाहेब पवार,डीपी.डी.सी चे सदस्य बाबासाहेब दिघे,जि.प.सदस्य शरद नवले,लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ,भास्कर खंडागळे, रवी खटोड ,सुधीर नवले,अभिषेक खंडागळे, राम पोळ, आदी उपस्थित होते.                              श्री.मुरकुटे म्हणाले की,श्रीरामपूरची बाजार समितीला उर्जितावस्था मिळवून द्यायची आहे.मुख्य बाजार समितीसह बेलापूर व टाकळीभान येथील उपबाजार समिती येथे  जनावरांचे बाजार,कांदा मार्केट सुरु करणे यासह अनेक विकास कामे करावयाची आहेत.तालुक्यात खंडकरी व आकारी पडीत शेतक-यांचे प्रश्न प्रलंबित आहेत.अनेक गावांची गावठाण हद्द संपली आहे.गावठाण हद्द वाढीसाठी शेती महामंडळाची जागा मिळवायची आहे.हे सर्व प्रश्न महसूल मंञ्यांशी निगडीत आहेत.महसूल मंञ्यांनी या प्रश्नी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.शेतक-यांचे प्रश्न सोडविणेसाठीच आम्ही युती केली आहे.सत्तेसाठी आम्ही झुकत नाही तर आम्ही नादी लागणारांना घुडगे टेकावयास लावतो.  जनतेचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्हाला सत्ता मिळते हे आमच्यावर बिनबुडाचे आरोप करणारांनी ध्यानात घ्यावे असे श्री.मुरकुटे  म्हणाले.                                                           स्वागत व प्रास्ताविक साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर यांनी केले.देवीदास देसाई यांनी सूञ संचलन केले तर सरपंच महेन्द्र साळवी यांनी आभार मानले.कार्यक्रमास भरत साळुंके,जालिंदर कु-हे,प्रकाश नाईक,शेषराव पवार,भगवान सोनवणे,भाऊसाहेब कुताळ,किशोर नवले,शिवाजी वाबळे,ज्ञानदेव वाबळे,पंडीतराव बोंबले,भास्कर बंगाळ,दत्ता कु-हे ,विलास मेहेञे,प्रकाश नवले,सुधाकर खंडागळे,बाळासाहेब वाबळे,अनिल नाईक,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,रमेश अमोलिक, प्रभात कु-हे,पुरुषोत्तम भराटे,वैभव कु-हे,प्रसाद खरात,सुरेश कु-हे,रामचंद्र राशिनकर,विलास कु-हे ,प्रकाश कु-हे, असिफ बागवान,हाजी ईस्माइलभाई शेख,मोहसीन सय्यद,जीना शेख, जाकीर शेख,आयजुभाई शेख,सुरेश अमोलिक सचिन अमोलिक,रावसाहेब अमोलिक,किशोर बोरुडे,अन्तोन आमोलिक,दिलिप अमोलिक ,प्रशांत लढ्ढा,शांतिलाल हिरण,प्रदीप शेलार,सुभाष शेलार,वैभव कु-हे,अमोल गाढे,महेश कु-हे,सचिन वाघ,विशाल आंबेकर आदिंसह ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रसिद्ध पार्श्वगायीका अनुराधाताई पौडवाल यांना शनि महाराज जयंती निमित्त बेलापुर व शनि शिंगणापूर येथे भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले असुन या निमंत्रणाचा त्यांनी स्विकार केला असल्याची माहीती बेलापुर येथील शनि मंदिराचे पुजारी दिपक वैष्णव यांनी दिली आहे.शनि महाराजांची जयंती १९ मे रोजी येत असुन त्या निमित्ताने आपण अहमदनगर जिल्ह्यात येवुन शनि शिंगणापूर तसेच पुरातन  बेलापुर येथील शनि मंदिरास भेट द्यावी अशी विनंती शनि शिंगणापूरचे पोलीस पाटील अँड .सयाराम बानकर व बेलापुर शनि मंदिराचै पुजारी दीपक वैष्णव यांनी मुंबई येथील अनुराधाताई पौडवाल यांच्या घरी जावुन शनि मंदिरास भेट देण्याचे निमंत्रण दिले शनि शिंगणापूर येथील शनि महात्म्य सर्वांना माहीत आहे त्याच बरोबर श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथे शनी महाराजाची एकमेव मूर्ती असुनअतिशय जागृत असे हे देवस्थान आहे त्यामुळे मूर्ती रुपात असणाऱ्या बेलापुर येथील शनि मंदिरासह आपण भेट द्यावी अशी विनंती मदिंराचे पुजारी दिपक वैष्णव व रामभाऊ जगताप यांनी केली या वेळी बोलताना अनुराधाताई पौडवाल म्हणाल्या की शनि महाराजांच्या दर्शनाला जाण्याचा योग खऱ्या अर्थाने आज आलेला आहे शनि महाराजाचे दोन्ही भक्त पुजारी शनि महाराजांच्या भेटीचे निमंत्रण घेवुन आलेले आहे बहुधा शनि देवानेच त्यांना माझ्याकडे पाठविले असावे त्यामुळे शनि जयंतीला मी शनि महाराजांचे दर्शन घेण्याकरीता शिगंणापूर तसेच बेलापुर येथे येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - जगभरातील मुस्लिमांचा सर्वात मोठा सण असलेली रमजान ईद काल शहर व तालुक्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या  निमित्ताने ईदगाह मैदान व जामा मशीद तसेच शहरातील अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली.सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हिंदू- मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईद व अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर सुद्धा शुभेच्छांचा पाऊस पडला.

याप्रसंगी ईदगामध्ये दुवा करताना शहर काळजी मौलाना अकबर अली यांनी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी आपल्या देशाला उद्देशून गौरोद्गार काढले होते.मुझे जमीन ए हिंद से मोहब्बत की महक आती है असे हजरत पैगंबर यांनी सांगितले होते.परंतु आज या देशाला कुणाची तरी नजर लागली आहे. देशाचे वातावरण बिघडले आहे.त्यासाठी आज आपण सर्वजण मिळून दुआ करू या. या देशांमध्ये सुख,शांती, समृद्धी नांदू दे.सर्वांच्या समस्या दूर होऊ दे आणि एकोपा आणि भाईचारा निर्माण होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली.

जामा मशीद व ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस  अविनाश आदिक, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,उपनगराध्यक्ष करण ससाणे,युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक कानडे,सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, हेमंत ओगले,संजय छल्लारे, लकी सेठी,दीपक कदम, जयंत चौधरी, भाउसाहेब मुळे, विजय खाजेकर,

तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, डिवायएसपी संदीप मिटके,

मुख्याधिकारी गणेश शिंदे,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,नाना पाटील,महेंद्र त्रिभुवन, किशोर त्रिभुवन,संदीप मोकळ,अरुण मोकळ, तलाठी घोरपडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

आगामी नगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक पाहता या वर्षी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये शुभेच्छा फलकांची स्पर्धा दिसून आली. 

नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक म्हणून शुभेच्छा दिल्या. पोलीस खात्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जामा मशीद मध्ये आलेल्या मान्यवरांचे स्वागत डॉक्टर राज शेख,नगरसेवक मुख्तार शाह, रज्जाक पठाण, तनवीर रजा,जावेद शेख यांनी केले. महिनाभर रमजान निमित्ताने रमजान, कुरआन व इस्लाम धर्माबद्दल मौलिक माहिती विविध वर्तमानपत्रे व सोशल मीडिया मधून प्रसारित केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचा जामा मशीद ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात आला. मौलाना मोहम्मद ईमदादअली यांनी धार्मिक प्रवचन दिले तर मुफ्ती अतहर हसन यांनी नमाजची ईमामत केली.जामा मशिदीचे विश्वस्त शकूर भाई शेख यांची कमतरता यावेळी जाणवली.

ईदगामध्ये मुफ्ती रिजवानुल हसन शेख यांनी धार्मिक प्रवचन दिले. नमाजची इमामत मौलाना सय्यद अकबर अली काझी यांनी केली.याप्रसंगी लखनऊ येथील मदरसा नदवातुल उलेमाचे मुफ्ती अब्दुल्लाह मखदुम हुसेन यांची प्रमुख उपस्थिती होती.ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी मुझफ्फर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.


चौकट

पोलीस विभागातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईद मुबारक म्हणत स्वागत करण्यात आले.पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक गवळी व त्यांचे सर्व सहकारी यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प दिले.

नगरपालिकेतर्फे यावेळी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ईदगाह भोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नमाज नंतर सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर प्रमुख राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी शहरातील मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर येथील ईदगाह मैदानावर मौलाना शकील अहमद यांनी ईदची नमाज अदा केली मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान तसेच  मस्जिद मध्ये ईद उल फित्रची नमाज अदा करुन एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईद साजरी केली              येथील उक्कलगाव चौफुलीवर असलेल्या ईदगाह मैदानावर मौलाना शकील अहमद यांनी सर्व मुस्लीम बांधवांना महीनाभर केलेले उपवास तसेच अल्लातालाकडे केलेली याचना मंजुर होवुन गावात तालुक्यात जिल्ह्यात तसेच राज्यात देशात शांतता नांदुन सुख समृद्धी व भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या या वेळी मा जि प सदस्य शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचा चेअरमन रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके  आरपीआयच्या वतीने रमेश अमोलीक पत्रकारांच्या वतीने देविदास देसाई  पोलीसांच्या वतीने ऐपीआय बोरसे प्रदेश तेली महासंघाच्या वतीने एकनाथ उर्फ लहानु नागले भाजपाचे प्रफुल्ल डावरे आदिंनी मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या तसेच हिंदु बांधवांना अक्षय तृतीयाच्या तसेच परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रशासनाच्या वतीने योग्य  सहकार्य केल्याबद्दल ऐपीआय बोरसे यांचा सत्कार सर्फराज सय्यद जाकीर शेख जब्बार अत्तार शफीक बागवान  यांनी सत्कार केला या वेळी जाफरभाई आतार मोहसीन सय्यद अब्रार सय्यद हाजी ईस्माईल शेख यांनी हिंदु बांधवांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या

रमजान ईद मुबारक २०२३ 

ईद मुबारक दिन २२-०४-२०२३ 

"  इस्लाम समजून घेताना  "

।।।   ईद - उल  -फितत्र ;- आनंद - बक्षिसे मिळण्याचा दिवस,.....!!!

लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख.

बैतुशशिफा दवाखाना ,श्रीरामपूर.

९२७१६४००१४ 

इस्लाम   अरबी शब्दाचा अर्थ " शांती --अमान '" 

 शांतीच्या मार्गावर चालणारा , अर्थात अमन पसंत.

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री स्वर्गीय सौ. सुषमा स्वराज‌जी . या युनोच्या संमेलनांमधे  सहभागासाठी गेल्या होत्या . जगातील नेत्यांसमोर भाषण करताना , इस्लाम चा  हिंदी भाषेमधील अर्थ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या  परखड ओघवत्या  शैलीत सुनावले की "  इस्लाम शब्द का  अर्थ शांती होता है  ; " " " शांती 'होता है "  शांती " ,  और अंग्रेजीमे  अर्थ. "पीस..पिसफुल"  है ., आपको शायद तो पता है  ; और मालुम  होना भी चाहिए ‌ ;;  याद भी होना चाहिऐ  "   जबरदस्त भाषणाची सुरुवात करून पुन्हा पुढे संपूर्ण भाषण ओघवतं झाले.असो...!!!

इस्लाम मुळात जगात आलाच  अराजक परिस्थितीत निर्माण झालेली , नितीमत्ता शिल्लक राहिलेले नव्हती , बाप जन्मालेल्या जिवंत मुली गाडुन बक्षिसे मिळवीत होता , नाद गाणं नंगानाच हैदोस घातला जात होता, प्रत्येक माणसांकडे रणडया  या प्रतिष्ठेचं चिन्हं समजलं जातं होते , प्रत्येक घराघरात दारू तर प्रतिष्ठेची बाब झाली होती . सावत्र आईशी ही लग्न करण्याला चुकीचे समज नव्हते.. नितीमत्ता शिल्लक राहिलेले नव्हती. पत्नी फक्त हौसेचे साधन म्हणून वापरली जात होती. महिलांना तर कवडीमोल किंमतीत उपलब्ध होत होती. एवढ्या मोठ्या भयानक परिस्थिती एक उगवता सूर्य चंद्र त्या अरबी भुमीत सच्चा न्यायीक व्यक्ति अल्लाह ने प्रेषित म्हणून हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या रुपाने रानटी वाळवंटात प्रेमाचा संदेश देण्यासाठी पैंगंबर म्हणून पाठवलेत. त्याचबरोबर अल्लाहने आपला संदेश घेऊन  ईशदुत हजरत जिब्राईल (जिब्राल्टर) अलै. यांच्या द्वारा वेळोवेळी मानव-कल्याणासाठी संदेश घेऊन २३ वर्ष घेऊन आलेत ,त्याच २३ वर्षाच्या अभुतपूर्व क्रांती ने आज १४४४ वर्ष जगाला दिशा देण्याचे काम केले. त्याच  दिशेने बघुया..

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांना अभुतपूर्व क्रांती घडवून आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील व भिती ही दाखवावी लागेल, आळशी वाळवंटातील लोकांसाठी काही उत्साही वातावरण निर्माण करणे गरजेचे होते. पुढे बघू या.

इस्लाम लोकांना  अल्लाह (ईश्वराचे ) भय बाळगण्याचे तसेच  संपूर्ण समर्पण करण्याचा आदेश देतो .एकाच अल्लाह ( ईश्वरा) ची आराधना करावी. अर्थात एकेश्वरवादाची शिकवण देतो . या जगात आणु - रेणु - चंद्र - सुर्य - तारे - पृथ्वी - हे ब्राह्मंड ( गॅलॅक्सि , Univers) चे प्रत्येक क्षण - क्षण,कणं न कणं निर्माण करून तो आप- आपल्या काटेकोर वेळा पाळुन चालवणारा फक्त एकटाच अल्लाह ( ईश्वर) आहे. माणवजातीला जन्माला घालणारा ही तोच अल्लाह आहेत व परलोक घेऊन जाणारा ही तोच अल्लाह आहेत. मनुष्य फक्त एक नाटकातील पात्रे आहेत... म्हणुनच " अल्लाहु अकबर "  या तीनही लोकांत, सृष्टीला चालवणारा फक्त एकटाच अल्लाह (ईश्वर)आहे.म्हणुन एकाच अल्लाह( ईश्वरा)ची आराधना करावी म्हणजे एकेश्वरवादाची शिकवण. असो.

त्यासाठीच , हजरत मुहम्मद स्व सल्लम यांना मानव कल्याण - जन सुधारणा  मार्गदर्शन करण्यासाठी प्रेषित- पैंगंबर -संदेश वाहक  म्हणून अंतिम प्रेषित म्हणून घोषित केले..

  प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांना एका खेड्यूतांनी प्रश्न विचारला, " पैंगंबर मुहम्मद स्व सल्लम ," " दिईन ( धर्म) म्हणजे काय ??

लगेच उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य उच्चारले, " अद् - दिईन - नु - नसीह‌..!  , अद् -दिईन -नु -नसीह!! , अद्-दिईन- नु- नसीह !!! 

अर्थात:- !  लोक- कल्याण -हाच- दिईन ( धर्म‌) आहे !

             !! लोक -कल्याण- हाच -दिईन (धर्म‌ )आहे !!

            !!! लोक- कल्याण -हाच- दिईन (धर्म‌ )आहे !! 

अल्लाहच्या लोक- कल्याणकारी योजना राबविण्यात आल्यात . 

ईस्लामचे  संस्कार मूल्यं:-  "  आपल्यासमोर कोणी लहान- मोठ्ठां , पुरुष -महिला - दिसताच, त्यांना आदराने :- "अस्सलामुआलैकुम- व- रहमतुल्लाह -व - बरकातहु " असा नमस्कार घालतात , अर्थात " तुमच्यावर आल्लाहाची शांती असो - कृपादृष्टी-दया- बरकत असो ". या वाणीत  जिव्हाळा - विश्वास - प्रेम भावना व अल्लाह चे आशिर्वाद सुध्दा   !! 

  = उत्तरादाखल समोरील बांधव  त्याला  , " वालेकुम-स्सलाम - व- रहमतुल्लाह -व- बरकातहु ".  अर्थ ही तसाच मार्मिक ;- " माझ्याप्रमाणे तुझ्यावरही  अल्लाहची शांती - कृपादृष्टी - बरकात असो." म्हणजेच डब्बल आशिर्वादच . 

 उत्तराने समोरच्या  मनाला   प्रेम ,वात्सल्य ,  मनाला आपुलकीने 

  चांगले चिंतित आहेत. आपुलकीच्या उत्तराने किती हायसे वाटत असणार ,. कितीही मोठा- मनुष्य-.गरीब - भिकारी- मालक  , एक गुन्हेगार  असो.  सात जन्माचा दुश्मन असला ,तरी ,  किंवा बादशहा ला एक गुलाम , किंवा ‌कैदेत असणाऱ्या गुन्हेगाराला बाहेरून येणाऱ्या बादशहा -राजा सुध्दा  अशाच प्रकारे  अदरानेच " सलाम " करणार  -व -  पुन्हा समोरच्या कडून उत्तर  ही  याच भावनेने  येणार - देणार..!!

किती आदरयुक्त -प्रेमाची भावना इस्लामने जगाला दिली आहे ..

म्हणूनच , प्रेषित हजरत मोहम्मद सल्ल. , सांगितले आहे की , " कोणी उच्च- निच नाही  , कोणी श्रेष्ठ नाही , कोणी मालक नाही , कोणी काळा व  गोरा नाही ,  सर्व समान एकाच अल्लाह ने  निर्माण केले आहे.    समता बंधुताची शिकवणी दिली .

  तुमचा मित्र , नातेवाईक  कोणी खूप दिवसांनी आला तर त्याचे स्वागत एकमेकास आलिंगन - गळे भेटून देतात यामुळें एकमेकांच्या हृदयात - मनामध्ये  तुम्ही मिसळले जाऊन , एक प्रकारे विरोध नाहीसा होतो.   कट्टर दुश्मन असेल ; तरी  समोर जेव्हा समेट घडवून आणला जातो  ,तर  ,त्यावेळेस एकमेकांची गळाभेट घेऊनच  दुश्मनी संपवतात .

प्रेषीत मुहम्मद स्व . सल्लमांनी  सांगितले  ," तुम्ही तीन दिवसांपेक्षा जास्त काळ अबोल राहता कामा नये नाहीतर तुम्ही मुसलमानच नाही ".

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी. सांगितले ," तुम्ही एकमेकांत समेट घडवून आणा व अल्लाहला   समेट घडवून  आणणारे जास्त प्रिय आहे."

 प्रेषीत मुहम्मद स्व. सल्लम म्हणतात ,"  सर्व प्राणीमात्र ईश्वराची लेकरेआहेत म्हणून त्याने निर्माण केलेल्या मानवाशी प्रेम करतो , सर्व मानवजातीस सामाजिक न्याय देतो .

 पवित्र कुरआन म्हणतो की, " आम्ही तुम्हाला सर्वांना एकाच स्री व  एकाच पुरुषा पासून निर्माण केले आहे , ; मग तुमचे विविध राष्ट्र -देश - विविध ( कबील्यांत) भावक्यात व  विविध वंशात विभागले गेले ; जेणेकरून तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे  ; परंतु अल्लाह जवळ श्रेष्ठ तोच असणारं आहे जो चारित्र्याने श्रेष्ठ असणारा आहे " (  पारा नं. २६ ,सुराह नं ४९ सुराह हुजूरात आ.नं.१३ वी )

         ‌‌दिव्य कुरआन म्हणतो की ," ज्याने अनुरेणू इतके सत्कर्म केले असेल त्याचे फळ त्याला   तितकेच मिळेल ;   व ;  ज्याने  जितके दुष्कर्म ,कुकर्म ,वाईट कर्म त्याचे फळ त्याला  त्याचप्रमाणे भेटतील".  

अल्लाह ने पैगंबर मार्फत दुष्कर्म करणाऱ्यांना दोजख ( नरका) ची भिंती दाखवून  त्याच कुकर्म करणाऱ्या कडून सदाचार करून घेतले. जे अरब लोक जिवंत मुली गाडुन बक्षिसे मिळवीत होते तेच अरब लोक मुलींचे उत्साहाने कन्यादान करण्यात सबाब समजू लागले. महिलांना मान सन्मान मिळू लागला. 

गरीब -गरजू - अनाथ मुलांना - पीडीतांसाठी जकातीचे पैशे वाटून खुशाली आली कालांतराने गरीबांच्या अर्थव्यवस्थे मोठी होऊन गरीब लोक जकात देण्याची पात्रता निर्माण झाली..

अल्लाह चे भय व कठोर कायदे आणुन अराजकता माजलेल्या वाळवंटात प्रेमाचा संदेश व सुव्यवस्था अबाधित झाली. 

श्रीमंत लोकांना गरीबीची जाणीव होण्यासाठी रमजान मुबारक रोजा ठेवणं अनिवार्य करण्यात आले . यामुळे प्रत्येक श्रीमंत लोकांना गरीबीची, भुकेले कसे जगत असणार याची जाणीव निर्माण होऊन त्यांच्या जकातीच्या पैशातुन गरीबांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारली गेली 

आपण  २९  दिवस  उन्हाळ्यात अल्लाहच्या मर्जी संपादन करण्यासाठी रोजे  ठेवून अल्लाहाचे आराधना- उपासना- ईबादत- नामस्मरण केले .  खुप तहान लागलेली असतानाही अल्लाहच्या मर्जी साठी भुकेची तमा न बाळगता १३-१४ तास  सहन केले,  तसेच घरातील  चार- पाच वर्षाच्या  लहान  बाळगोपालांनीही भर उन्हाळ्यात रोजे ठेवुन , तरावीह नमाज , दिवसभराचे पाच वेळी नमाज आदा केलीत ,  अजूनही कामधंदे -व्यवहार  सुरळीत झाले नसले ,  तरी , आपले अर्थीक गणिते संभाळून  प्रपंचाची अर्थव्यवस्था  व्यवस्थित करून . जकात- सदकाह - फितत्राह आजुबाजूच्या गरजू-पीडित-बेसहारा ,अनाथ ,विधवा तसेच योग्य व्यक्तीला  दानधर्म देऊन ,  सामाजिक बांधिलकी जपली. तसेच कळत- नकळत काही चूक तर झाली नाही ना हे क्षनोक्षनी याची काळजी घेऊन ,‌ २९ रोजे  सहन करुन   पुर्ण करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले . अल्लाहाशी  निरोगी आयुष्यासाठी , मुक्ततेची  क्षनोक्षनी दुआ केली. 

,जगातील  सर्व प्राणी - मानवांना  निरोगी आयुष्यासाठी रोजा ठेवून  , स्वतः उपाशी राहून  , दुसऱ्या समाजातील बांधवांना जे  बेघर आहेत ,उपाशीपोटी आहेत ,आशां गरजूंना  अन्न-पाणी , औषधे, झोपण्यासाठी निवारा व  पायी चालणाऱ्यां वाटसरूंना  चप्पल , मानसिक आधार दिला .मदत  केली‌,

     ‌तसेच  भारतीय बांधव आहोत . आपण सर्व बंधुभाऊ -भाई- भाई आहोत ,  पहाटे पासून.ते संध्याकाळ पर्यंत जेवढे काही करता आले तेवढी समाज सेवा अल्लाह (ईश्वर)  सेवा  तन-मन-धना ने   करून  आपण कोणत्याही लोभाची, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता येवढं सगळे केलं . 

हे सर्व लोक कल्याण -हाच-दिईन धर्म‌ मध्ये च येते म्हणून ..

       प्रेषित मुहम्मद स्व यांना विचारला गेलेला प्रश्न ,"  दिईन धर्म‌ म्हणजे काय ? " 

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी ,उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य उच्चारले की " अद् -दिईन-  नु -नसीह " 

अर्थात :- " लोक कल्याण हाच (धर्म  ) दिईन  नु नसीह  "!! .

हे सर्व समजून उमजून घेऊन अल्लाह व प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांची मर्जी संपादन करण्यासाठी सहन केलत , खरोखरच सहनशीलता दाखवली याचं फळ , बक्षिसे अल्लाह ( ईश्वर) जरुर आपण केलेल्या सहनशीलतेप्रमाणेच निश्चितच मिळणार आहे, अल्लाहचा  बक्षीस-ईनाम प्राप्तीचा  दिवस आहे . निश्चितच  आपल्याला अल्लाहा बक्षीस  देणारच आहे  ,    कोणाला  किती हे आल्लाहा च ठरवणारे आहेत .जसे आपली आईवडील आपल्या मुलांची परीक्षा घेतल्यानंतर बक्षिसे देतात ,

 प्रेषीत मुहम्मद स्व. म्हणतात कि, " अल्लाहा आपल्याला ७०  आई पेक्षा ही जास्त प्रेम करतो ,'"

एक आई  लेकराला जेवढे प्रेम करीत असते ,ते अल्लाहा( ईश्वर) आहेत ,विचार न केलेला बरं." आल्लाहा जीवसृष्टीच्या प्रत्येक जीवजंतू वर आई सारखेच प्रेम करतात ,

 अल्लाह( ईश्वर) चा आजचा ईदु-ल - फितर चा  इनाम-बक्षीस- पारितोषिक वितरणाचा दिवस आहे . पारितोषिके तर मिळणारच आहे...

    आपला बंधुभाव -एकात्मता -स्नेह वृद्धिंगत व्होवो हीच अल्लाहा रबबुल आलमीन जवळ दुआ मांगतो....आमीन .... 🌹🌹🌹

(ईद - उल - फितत्र ) रमजान ईद मुबारक हो ... शुभेच्छा. 🌹🌹🌹

लेखन :- डॉ सलीम सिकंदर शेख 

बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

    9271640014.

🌹🌹 @ डॉ @ स@ ली@ म@ शे@ ख@

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्री जुने बालाजी मंदिर बेलापुर चे अध्यक्ष श्री हरिप्रसाद जी व्यास यांचे सुपुत्र तसेच राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार पूजनीय स्वामीजी श्री गोविन्द देवगिरिजी महाराज व भागवताचार्य पंडीत महेशजी व्यास यांचे पुतणे डाॅ श्री मुकुंद हरिप्रसाद व्यास यांची भारतीय प्रबंधन संस्थान नागपुर च्या अध्यक्ष (डीन )पदी नियुक्ति झाली असुन त्यांच्या नियुक्तीने बेलापुरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे                      मागील वर्षी डाँक्टर मुकुंद व्यास यांनी  प्रोफेसर म्हणून त्यांना पदभार स्विकारला होता आता त्यांची भारतीय प्रबंधन संस्थान नागपुरच्या अध्यक्षपदी (डीन )निवड करण्यात आलेली आहे  त्यांची इतक्या मोठ्या संस्थेवर नियुक्ति मुळे बेलापुरच्या वैभवाता आणखी भर पडली आहे या नियुक्ति बद्दल जि.प सदस्य  शरदराव नवले,जनता आघाडीचे अध्यक्ष रविंन्द्र खटोड, तालुका काॅंग्रेस अध्यक्ष अरुण पाटील नाईक, सरपंच महेंद्र साळवे उपसरपंच श्री अभिषेक खंडागळे  बेलापुर कार्यकारी सोसायटीचे चेअरमन  सुधीर नवले,भा जा पा चे प्रफुल्ल डावरे माहेश्वरी समाज चे हरिप्रसाद जी खटोड ,जैन समाजाचे श्री शांतिलाल गांधी,छन्याति समाजाचे श्री रमेशजी दायमा,गोसेवक श्री नंदलाल डागा पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा आदिंनी अभिनंदन केले आहे।।

रमजान मुबारक - २०२३ - रोज़ा २९ शुक्रवार दि. २१-०४ -२०२३ 

*"इस्लाम समजून घेताना"*

लेखन- डॉ. सलीम सिकंदर शेख, 
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

प्रेषित मुहम्मद स्व.सल्लम यांना एक प्रश्न विचारला गेला की ;  दिन-दिईन- (धर्म) म्हणजे काय ??.

यावर प्रेषित स्व.सल्लम यांनी  तीन वेळा एकच वाक्य उच्चारले की, अद दिईन नु नसीह ! , अद दिईन नु नसीह !! ,  अद दिईन नु नसीह !!!,

   अर्थात:- !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌ ) ,  

                 !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌ ), !!

                   !!  लोक कल्याण हाच दिईन (धर्म ) !! आहे...

 !    आज जुम्मातुल विदाह - व लैलतुल जा-य-जा ची अवलोकनाची रात्रं...!!

विदाह - या शब्दाचा अर्थ होतो अंतिम, पुन्हा परत न येण्यासाठी,आपण कालच्या लेखात उल्लेख केला होता अंतिम विदाह - म्हणजेच अखेरच्या पुन्हा परत न येण्याच्या  प्रवासाला तसेच प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांच्या हज्जतुल- विदाह,लग्नाच्या दिवशी मुलीला विदाह करतात त्याला ही विदाह म्हणून संबोधतात,असो.

रमजान महीन्यातील शेवटच्या जुम्माला -जुम्मातुल विदाह म्हणतात,याचं महत्त्व फार आहे, प्रत्येक जुम्माला एक क्षण महत्वपूर्ण असतो,त्यावेळी प्रत्येक दुआ याचना कबुल (पुर्ण) होतात, रमजान विदाह तर अजुनही महत्वाचे असणार त्या मंगलमय क्षणांची संधी साधण्यात मोठेपणा असून आदली रात्र लैलतुल कद्रची हजारों महीन्यांची एकच  कद्र च्या रात्रींचाही फायदा उचलला पाहिजे.

आज जुम्माची येणारी रात्र " लैलतुल जा-य-जा "-  अर्थात  उर्दू शब्द आहे, आपल्या प्रत्येक कामाचं जायजा घेणं ; मराठीत  " अवलोकन "होतो. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्यक्तींच्या महत्वपूर्ण   गुणात एक खास गुण बघायला मिळातो,तो स्वतःच - स्वतः चे  अवलोकन करणं,  काय चुकलं ?  काय साध्य करायचे ? काय बाकी आहेत‌ ?,  छोट्या- छोट्या गोष्टींमध्ये चुकीचं झालेत का ?  , मग काय बरोबर केले पाहिजेत ?, याचं अवलोकन करणं.चुका झाल्याशिवाय सुधारणा होत नसते. मग माणुस चुकीतूनच पुढे  शिकत असतो. चुकांची गोळाबेरीज करून पुन्हा पुढे जायचं आहेत; सुधारणा करायची आहे ती आजच्या लैलतुल जा-य-जा  व  लैलतुल कद्र च्याच  रात्रीमध्ये , अल्लाह जवळ क्षमा - दया - याचना करून पुन्हा -पुन्हा  चुकीचे होणार नाहीत हे स्पष्ट शब्दात अल्लाह जवळ सांगणे,

 उदाहरणार्थ:- आपल्या खास जवळच्या मित्राला सर्व खासगी गोष्टी  सांगतो, त्या खाजगी गोष्टी मित्र सोडून कोणालाही सांगत नाहीत अशा आयुष्यातील प्रत्येक लहानाहुन -ही -लहान खाजगी गोष्टी ही अल्लाह जवळ एका मित्रांसारखंच सांगणे, तो अल्लाह आहे व्यक्तिगत म्हणणं पुर्ण (कबुल) करतात, म्हणुनच त्यांना अल्लाह म्हणतात.

 पापं - गुन्हे - चुका अल्लाहला सांगुन रिते होवून जाणे.‌ पुढे चांगले संस्कार मुल्यं शिकण्याची, जोपासण्याची तय्यारी करणे व  आयुष्यातील पुढील पडावासाठी - प्रवासासाठी तयारी सुरू केली पाहिजे  तर  मनुष्य या जगात पण प्रगती करतो व अंतिम प्रवासाचीही म्हणजे मृत्यूनंतरची यशस्वी होण्यासाठीही तय्यारी करतो " अर्थात  दुनिया भी और आखिरत भी बनानी होती है ! "   दोन्ही ठिकाणीचा फायदाच फायदा ..आज लैलतुल जा-य-जा ला फायदा उचलला गेला पाहिजे, भरपूर तिलावत करुन अल्लाह रब्बुल आलमीन ला राजी करून देशाच्या शांततेसाठीही दुआ याचना करून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी दुआ याचना करणे.

                 तसेच हे फक्त रमजान स्पेशल पुरतेच न थांबता बारा ही महिने सबाब -पुण्यं कमवायला हवेत, सेवा कार्य सतत करणं याच   गोष्टींना- " सदका - ए-जारीया " म्हणतात,लोक कल्याणकारी कामे केल्याने सुद्धा सबाबच भेटतं. 

                  प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांना एक प्रश्न विचारला गेला की ,दिन- दिईन- (धर्म) म्हणजे काय ?,

   प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांनी उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य  तोंडातून उच्चारले ," अद  दिईन नु नसीह !,"अद दिईन नु  नसीह !!, "अद दिईन नु नसीह !!!

      अर्थात :- !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌ ) !!

                   !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌‌ ) !!,

                    !! लोक कल्याण हाच दिईन ( धर्म )!!!उदाहरणार्थ :- (१) स्वतः साठी जी दुआ याचना मागतो, त्यामधे दुसऱ्या लोकांसाठी निरोगी आयुष्यासाठीही दुवा मागणे, आजारी रुग्णांसाठी ते निरोगी व्हावे म्हणून अल्लाह जवळ दुआ मागणे, इतर गरजेचे वेळी दुआ याचना करणे ,(२) मुलांसाठी  चांगले संस्कार मुल्यं शिक्षण द्यावीत, (३) दुसऱ्यांना चांगले उपयोगी सल्ले द्यावीत ; चुकीचे सल्ला देऊ नयेत,चुकीच्या गोष्टी पासून लोकांना सावधान करावेत,(४) दुसऱ्यासबघून चेहऱ्यावर हास्य यावेत,त्यांचे हासून स्वागत करावे ,(५) कुठल्याही अडचणींसमयी मदतीस धावून जावेत,आपल्या कुवतीप्रमाणे होईल तेवढी मदत करावी, (६) समोरच्याला वेळप्रसंगी काम यावे ,खास वेळे काढून वेळ द्यावा, (७ ) चांगल्या प्रकारे शिक्षण द्यावीत, मुलांना संस्कार -संस्कृती- रितीरिवाज -परंपरा- मुल्य शिक्षण द्यावीत, (८ ) आणिबाणीच्या परिस्थिती त्यांना धीर द्यावा, (९ ) वाईट सवयी लागल्या असतील तर त्यांना वारंवार चांगले संस्कार देऊन ,त्या  वाईट सवयींपासून परावृत (अलिप्त) व्हायला मदत करावी. मोटीवहेशनल शिबीर राबवावित, (१०) प्रत्येकाशी अदबीने व शांत धीम्या आदरयुक्त भावनेतून बोलावे ,हितगुज करावेत, (११)   भांडणे करूच नये,वाद विवाद टाळावेत, किंवा नजर अंदाज करावेत , (१२) प्रत्येकांचा आदर सन्मान करावा, (१३) शेजारी, मित्र ,आप्त परिवाराच्या सुख दुःखात सहभागी होऊन मदत करावी, (१४) ज्या परंपरा रितीरिवाज त्रासदायक आहेत त्यांना हद्दपार करावेत, (१५) शक्यतो मित्रांमध्ये,परीवारात, समाजातील लोकांमध्ये मेलमिलाफ,समेट करावं.घडवावे, (१६) कोणी आपल्या चांगल्या विचारांपासून भटकत असेल तर त्याला चांगल्याप्रकारे समुपदेशन  देऊन सरळ मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावे.(१७) रस्त्याने चालत असताना रस्त्यावरील लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या वस्तू बाजुला कराव्यात. (१८) उन्हाळ्याच्या दिवसांत पाणपोई सुरू करावीत, (१९) शाळा,मदरसा, कॉलेज, शिक्षण संस्था उभाराव्यात ,(२०) धर्मदाय दावाखाने चालू करावीत, (२१) झाडं लावावीत व निसर्गाचं संवर्धन करावेत, निसर्गाच्या कोणत्याही प्रकारच्या वस्तुची देखभाल करावीत, निसर्गाच्या कोणत्याही प्रकारची हानी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

          .इ.अनेक गोष्टी या मानवी कल्याणासाठी अल्लाह जवळ " सबाब - ए- जारीया ' मध्ये येतात  . तुम्ही केलेल्या गोष्टी जो पर्यंत या जगात त्यांच्यांमुळे लोकांना फायदा होतो ,तो पर्यंत तुम्हाला सबाब भेटत राहील. यालाच सबाब - ए ,- जारीया म्हणतात. (कायम भेटणारे पुण्यं) अर्थात  तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर ही त्याचं पुण्यं (सबाब) भेटेल. 

अशा पुष्कळशा समाजोपयोगी गोष्टी आहेत ते बारांही महीने केल्याने तुम्हाला सबाबच भेटेल, तिचं एखादी चांगली गोष्ट तुम्हाला  तुमच्या कयामतच्या अंतिम दिवशी तुम्हाला जन्नतुल फिरदौस स्वर्गात जाण्यासाठी जरूर कामी येईल, तर शक्य असेल तेव्हा प्रत्येक समाजातील लोकांची मदत होईल तेवढी करावी...

    विशेष गोष्ट म्हणजे :- अंतिमतः  आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आभार मानतो, जेवढं आभार मानले तेवढे थोडेच राहतील,महिनाभर ," इस्लाम समजून घेताना" लेख मालिका रोज काळजीपुर्वक वाचुन आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवलीत.यासाठी सर्वांचे खुप खुप मनापासून धन्यवाद मानतो. त्यात प्रामुख्याने 

(१) दैनिक राष्ट्र सह्याद्री चे संपादक मा.श्री.करण नवले साहेब,आणि दैनिक राष्ट्र सह्याद्री वृत्तपत्र समुहाचे खुप मनापासून आभार मानतो ,

(२) दैनिक शौर्य स्वाभिमानचे

खंबीर मार्गदर्शक तथा स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि दैनिक साईसंध्याचे संपादक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, संपादक मा.श्री.उद्धव फंगाळ साहेब, व्यवस्थापकीय संपादिका सौ.किरण वाघ मॅडम आणि संपादक मंडळ तथा दैनिक शौर्य स्वाभिमान वृतपत्र समुह मेहकर जि.बुलढाणा, (३) दैनिक समतादुत चे संपादक इंजि. मोहसीन शौकत शेख आणि संपादक मंडळ,, (४) आंतरराष्ट्रीय वर्ल्ड पार्लमेंट न्यूज बुलेटीन  शाखा श्रीरामपूर चे क्रिकेट अंपायर ,समालोचक तज्ज्ञ श्री. दत्ता विघावे सरांनी २१० देशात मालिका पोहोचवण्याचं मोठं काम केलेत. 

(५) माहिती व कायदा वर्तमानपत्र व न्यूज पोर्टल बेलापूर चे अस्लमभाई सय्यद, अमन सय्यद, आणि संपादक मंडळ, (६) दैनिक बिनधास्त न्यूज चे अस्लमभाई बिनसाद, (७) दैनिक धुमाकूळचे इम्रान मुसा पटेल, (८) दैनिक मेमन रिपोर्टर चे अफजलभाई मेमन, (९) शेवगाव ताजी खबरे चे अलीमभाई शेख, (१०) दैनिक कॉमन न्युजचे अलताफभाई शेख, अहमदनगर , पुणे , मुंबई, ठाणे , सोलापूर, कोल्हापूर, सातारा, कराड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नासिक, जळगाव,धुळे,नांदुरबार, नागपूर,येथील दैनिकांनी व बहुतांश साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल्स संपादकांनी आपल्या प्रसार माध्यमांतील जागेच्या हिशोबाने सदरील मालिका प्रकाशित केली, आणि वाचक वर्गाने देखील यास भरभरुन साथ दिली.या सर्वांच्या सहकार्यामुळेच लेखन मालिका लिहीण्याची मला संधी प्राप्त झाली.करीता या सर्वांचा मी मनस्वी आभारी आहे.. असेच प्रेम सदैव माझ्या व माझ्या परीवारावर राहु द्यावेत,भारतात सर्व धर्म समभाव एकता अखंडता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न व दुआ करीत रहावेत ही नम्र विनंती .

सर्व वाचकांना, हितचिंतकांना, पत्रकार,संपादक महोदयांना ईद च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा -ईद मुबारक

आपला मित्र 

डॉ.सलीम सिकंदर शेख

 मोबा: ९२७१६४००१४ 


बेलापुर (प्रतिनिधी  )-श्री साई पावन प्रतिष्ठाण ,श्री साई सेवा समिती, भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती जयपुर यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री साईबाबा मंदिरांच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन जयपुर फुट व कँलीपर क्रचेस व व्हील चेअर यांच्या वतीने गरजु व विकलांग व्यक्तीसाठी आयोजित  शिबीरात १२९ विकलांग व्यक्तींना विविध साहीत्याचे मोफत वाटप करण्यात आले           श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन दिव्यांग व्यक्तीसाठी विविध साहीत्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साई पावन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कैलास चायल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच महेंद्र साळवी माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे करण ससाणे सचिन गुजर प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन सुरेश वाबळे श्रीरामपुर केमिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष जालींदर भवर ,शरद सोमाणी, संतोष भंडारी, शिवाजी कपाळे, प्रविण लुक्कड, शरद नवले, अरुण पा नाईक, रविंद्र खटोड, गणपत मुथा, पंडीत महेश व्यास, अशोक राशिनकर आदि मान्यवर उपस्थित होते या वेळी माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे सचिन गुजर माजी नगरसेवक अशोकनाना कानडे शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे सुरेशराव वाबळे शरद सोमाणी सुनिल मुथा आदिंनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांगाकरीता आयोजित करण्यात आलेल्या शिबीराचे कौतुक करुन चांगला उपक्रम राबविल्याबद्दल कैलास चायल व त्यांच्या सर्व टिमला धन्यवाद दिले  या शिबीरात दिव्यांगाना २५ व्हील चेअर ,२० कुबड्या  ७ वाँकर १० तिन पायांची काठी १० साधी काठी तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातुन आलेल्या ४४ दिव्यांगाना जयपुर फुटचे वितरण करुन त्यांना डाँक्टर  नारायण व्यास यानी रुग्णाना व्यवस्थीत चालवून स्वतः खात्री करुन घेतली  तसेच  २० पोलीओग्रस्त रुग्णांना कँलिपर बसवुन देण्यात आले डाँक्टर नारायण व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञ समीर बुतकर ,प्रमोद सिंग ,जितेंद्र तोमर ,राजेश देऊगळे राधेशाम संकपाळ लक्ष्मण गायकवाड निलेश जाधव यांनी पाय बसविण्यासाठी तसेच कँलिपर बसविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले तीन दिवस चाललेल्या या शिबीरात शेगाव धुळे येवला  लासलगाव साक्री मालेगाव वैजापुर बुलढाणा नाशिक तसेच जिल्ह्यातील संगमनेर शेवगाव राहुरी शिर्डी राहाता श्रीरामपुर येथील दिव्यांगानी सहभाग घेतला होता .विविध भागातुन आलेल्या दिव्यांगाची तीन दिवस राहण्याची चहा नाष्टा व भोजनाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते शिबीराचा समारोप सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुंक्कड यांचे उपस्थितीत करण्यात आला या वेळी किराणा मर्चड असोसिएशनचे शांतीलाल हिरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा संजय भोंडगे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा दयानंद शेंडगे ,अनिल पवार ,अमोल गाढे , अनिल मुंडलीक ,राजेंद्र बनभेरु ,भरत बाठीया ,रविशेठ चुग ,राजेंद्र थोरात ,अशोक अंबिलवादे ,दत्तात्रय मुसमाडे आदिसह नागरीक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री साई पावन प्रतिष्ठाणचे सचिव राजेंद्र लखोटीया उपाध्यक्ष दिपक सिकची ,खजिनदार संजय लढ्ढा सहसचिव रामविलास झंवर प्रशांत बिहाणी ,रमेश पवार शशिकांत कापसे ,प्रमोद कर्डीले, दिपक क्षत्रीय,धनंजय पवार, श्वेता मेडीकल आदिंनी विशेष परिश्रम घेतले प्रकाश जाजु मित्र मंडळाच्या  वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक सिकची यांनी केले तर राजेंद्र लखोटीया यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.ज्ञानेश गवले यांनी केले

रमजान मुबारक २०२३*

गुरुवार दि. २०-०४-२०२३- रोजा २८

*"इस्लाम समजून घेताना"*

लेखन- डॉ. सलीम सिकंदर शेख ,

बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर


---------------------------------------------


आपण जन्म - जीवन कसे जगावे व मृत्यू बाबत बघितले होते, आज आपण मृत्यूनंतर दफन- कबर - कयामत - पुनर्जन्म वर चर्चा करू यात‌...

पवित्र कुरआन म्हणतो की,"  कुल्लू नफसून जायकतुल मौत "

 अर्थात :- हर जानदार चीज को मौत का मजा चखना है.." 

आम्ही तुम्हाला याच मातीत मिसळणार आहेत ".

जगात लाखोंच्या संख्येने मोठीं मोठें सम्राट - बादशहा -राजे दार्शनिक - खुप मोठे योद्धे होउन होउन गेलेत ज्यांनी निरंकुश सत्ता हुकूमत प्रस्थापित केले भोगल्यात -आप- आपल्या मस्तित , धुंदीत - मी पणापणे निरंकुश सत्ता हुकूमत चालविल्या परंतु त्या सर्वांना या जगातुन अलविदा होवे लागले. व आज ते कोणत्यातरी गावाच्या - शहरातील एका सामसुम जागी असलेल्या कब्रस्तानात ( स्मशानभूमीत) दफन आहेत व आपल्या अखिरतच्या जन्नतुल फिरदौस च्या यशप्राप्तीसाठी कोणीतरी प्रार्थना -दुआ- याचने ची वाट बघतायेत , मित्रांनों हे अंतिम सत्य कोणत्याही परिस्थितीत चुकलं नाहीच,असं म्हणतात की, अमेरिकनं पॉप स्टार मायकेल जॅक्सन याने १५० वर्ष जगण्यासाठी खुप काही केलं , प्रत्येक गोष्टीत वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार करून आपलं खाद्यपदार्थ खान ,झोपनं, आपलं व्यक्तिगत सर्व कार्यक्रम हे वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार करून चांगल्या प्रकारे राबविले जात होता परंतु त्याला मरण फक्त ४७-४८ व्या वर्षीच आले.असो.

एकदा हजरत प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांच्या जवळ एक अन्सारी व्यक्ती येवून प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांना विचारले की, " या रसुलूल्लाह स्व सल्लम. सर्वांत हुशार व समजदार व्यक्ती कोण असते? कोण असू शकतात ?,

 त्यावर हजरत मुहम्मद पैगंबर स्व सल्लमांनी उत्तर (जबाब)दिला की ," सर्वात हुशार समजूतदार व्यक्ती तो आहे ,जो दिवसांत जास्त वेळा आपल्या मृत्यूचा विचार करणारा " आपली प्रत्येक कृती मृत्यूला सामोरे ठेवून सदाचाराने करणारे व वागणारे "..

  पुन्हा प्रेषित मुहम्मद स्व सल्लम म्हणतात की," तुम्ही कायम कब्रस्तानात ( जिथे मृत्यूनंतर दफन केले जाते) -- स्मशानभूमी (= जिथे मृत्यूनंतर जाळण्याचा विधी केला जातो) जात जा !! जावे !!.

तुम्हाला तुमच्या मृत्यूची भिंती दिसून आली पाहिजे, या कब्रस्तानात- स्मशानभूमीत गेल्यानंतर तुम्हाला काही तुमचं केलेल्या चांगल्या किंवा वाईट -चुकीच्या गोष्टी आठवल्या पाहिजे ; जेणेकरून तुम्हाला मृत्यूनंतर या कब्रस्तानातल्या कोणत्या कबरीत आपण दफन केले जाऊ  याची लगेच आठवण आली पाहिजे ;  आठवणी जाग्या झाल्या सारखं होईल .. तुम्ही कोणतेही काम कार्य करताना आपल्याला या जगातुन अलविदा ( अलविदा :- या जगातुन कायमचाच निरोप) , अंतिम निरोप घेऊन जावंच लागणारं आहे म्हणून चांगले काम केले पाहिजेत..

          प्रेषित मुहम्मद स्व सल्लम म्हणतात की," प्रत्येक चांगला माणूस आपल्या मृत्यूनंतर काय होणार याची काळजी घेत असतो.".

मृत्यूनंतर कब्रस्तानातल्या एका कबरीमधे आपणास दफन केले जाईल ,त्यानंतर तेथील यमदूत कोण ? कोणते प्रश्न विचारला जाईल??  आपल्या शरीराच्या धडाला काय ? काय ? यातना भोगव्या लागतील ,हे फक्त कबरीमधील धडाला माहीत...??     तुमचे तुमच्या मागिल कर्मानुसार -कृतीनुसार, चांगल्या- वाईट कामानुसार तुमच्या शिक्षा ठरलेल्या आहेत; त्या सर्व चांगल्या- वाईट शिक्षा फक्त तुम्हाला स्वतःलाच भोगावे लागतील.. कबरीमधे दुसरा कोणीच येणार नाहीत. तुम्ही केलेल्या बऱ्यावाईट कामांचं फळ तुम्हां फक्त एकट्यालाच भोगावे लागतील...

पुन्हा प्रत्येकाला " कयामत " अर्थात:- आफत, -  तबाही- विनाशकारी दिवस --  प्रलयं- विपत्त्ति-शेवटचा न्याय निवाडयाचा दिवस -किंवा सृष्टीच्या सर्वनाशाचा दिवस , किंवा सृष्टीचा जलमय होण्याचा दिवस .

तुम्हाला जो अर्थ समजून घेण्यासाठी घ्यायचा तो घ्यावा .

मुस्लिम - ख्रिश्चन - यहुदी (ज्यू) धर्मातील ग्रंथानुसार सृष्टीच्या सर्वनाशाचा दिवस येणार आहे .

तसेच  श्रीमद्भगवद्गीता च्या अनुसार असं म्हणतात की,दोन कल्पो च्या नंतर सृष्टीचा अंत होत असतो.दोन कल्पोंचा अर्थ दोन हजार चतुर्युग यालाच दुसरा काव्य पुर्ण होणे यानंतर प्रलयंकारी (कयामत अर्थात) सृष्टीचा विनाश होत असते. असो.

           त्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतल्यापासून जेवढे मृत्यू झाले त्या सर्वांना कयामतच्या ( अंतिम न्याय निवाडयाच्या दिवशी) एकत्र करुन प्रत्येकाला आपल्या कामाचा हिशोब जाब द्यावा लागणार आहेत.. प्रत्येक मानवाला त्या दिवशी पुन्हा एकदा पुनर्जन्म मिळणार आहेत.. मग तुमची लाखों करोंडौं वर्ष जरी तुमच्या मरणाला झाली असतील तरी तुम्हाला या मातीतुन पुन्हा जन्माला घातले जाणार आहेत ,हे पवित्र कुरआन म्हणतो...

     मागील लेखात आपण पवित्र कुरआन म्हणतो बघितले होते की ," तुम्हाला याच मातीतून दुसऱ्यांदा पुनर्जन्म कयामत च्या दिवशी देणार आहेत"  तुमच्या हिशोबासाठी व त्यानंतर अनंत काळ तुम्ही तुमच्या कर्तुत्वा- कर्मानुसार नरक ( दोजख ) किंवा जन्नतुल फिरदौस ( स्वर्गात) मधे अनंत काळ ,तेथे कधीच मृत्यू नाहीत.. आशा ठिकाणी कायमच राहणार आहे.

पवित्र कुरआन म्हणतो की," जेव्हा कानांचे पडद्ये फुटतील तेवढा आवाज होईल , सर्व सृष्टीत अंधकारमय होईल,संगळ अस्त व्यस्त होईल ,त्या दिवशी माणूस सैरावैरा पळू लागतील सख्खे भाऊ - बहिण एकमेकांना ओळखणार नाही, आईवडील आपल्या मुलांना ओळखणार नाही, पती पत्नी एकमेकांना ओळखणार नाही,त्या वेळी- दिवशी अशी परिस्थिती राहील की  प्रत्येकालाच प्रत्येकाच स्वतःचच पडेल ..त्या दिवशी प्रत्येक माणसाचं असेच राहीलं ..( सुराह नं.८० ,आ.नं.३३ ते ३७),  जर स्वर्गात ( जन्नतुल फिरदौस,) की नरकात (दोजख) राहवयाचे यासाठी जीवनात कायम चांगले काम करणं फार गरजेचे आहे ... त्यासाठी मग..आपले व्यवहार-, वागणुक - आपले आचार - विचार,  चांगले संस्कार मुल्यं, शिक्षण, चारित्र्य निष्कलंक होण्यासाठी सतत कार्यरत रहा व सतत आपल्या अंतिम दिवसांची काळजी काळजीपुर्वक घेत राहणे गरजेचे आहे. हेच फक्त आपल्या हातात आहे... अंतिम सत्य कोणी ही नाकारु शकत नाहीत..हेच सत्य आहे...

(लेख वाचून आवडल्यास नक्कीच आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा व आपल्या परिवारास मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवावेत...)

आपला मित्र 

डॉ.सलीम सिकंदर शेख

 बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपुर

मोबा: 92716 40014

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मुस्लिम बांधवाच्या पवित्र उपवास ( रोजा )महीन्यात अल्लातालाकडे ज्या मागण्या विनवण्या केल्या असतील त्या सर्व पूर्ण होवुन हींदु मुस्लिम बांधवाचा आपापसातील स्नेह असाच वृद्धींगत होवो अशी अपेक्षा श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व काँग्रेसचे कार्याध्यक्ष  सचिन गुजर यांनी व्यक्त केली                            बेलापुर येथील जामा मस्जिद येथे बेलापुर काँग्रेस कमीटी व सुधीर नवले मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी गुजर बोलत होते या प्रसंगी बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक प्रगत बागायतदार संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक आदिंनी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या या वेळी जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके शिवाजी पा वाबळे  ,बेलापुर एज्युकेशन संस्थेचे राजेश खटोड भास्करराव बंगाळ ,सेवा संस्थेचे व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले माजी चेअरमन राजेंद्र सातभाई देविदास देसाई अतिश देसर्डा प्रदिप शेलार ,अंतोन आमोलीक ,विश्वनाथ गवते ,अयाजभाई सय्यद जाकीर शेख प्रकाश कुऱ्हे  जावेद शेख दत्ता कुमावत मोहसीन सय्यद जाफरभाई आतार वैभव कुऱ्हे रमेश अमोलीक अनिल पवार विक्रम नाईक आदिसह मुस्लिम बांधव उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मुस्लिम बांधवांचा पवित्र उपवासाचा महीना सुरु असुन मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या  सण निमित्त ईश्वरा कडे हेच मागणे मागतो की गावातील हिंदु मुस्लिम बांधवाचे प्रेम असेच वाढत राहो असे उद्ःगार मा.जि प सदस्य शरद नवले यांनी काढले  गावकरी मंडळाच्या वतीने बेलापुर येथील जामा मस्जिद येथे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी मा .जि प सदस्य शरद नवले बोलत होते या वेळी  सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यानी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या व येणाऱ्या रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान यांनी रमजान महिन्याचे उपवास केल्याबद्दल त्यांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या वेळी प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे,मौलाना शकील अहमद,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,देविदास देसाई, खरमाळे,सुभाष अमोलीक, तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,अँड.अरविंद साळवी  दिलीप दायमा,अन्वर सय्यद,भाऊसाहेब तेलोरे, संजय बाठीया,मोहसीन सय्यद,जिना शेख,बाबुलाल पठाण,रावसाहेब अमोलिक,अमोलिक,विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे,राजेंद्र वारे,भैय्या शेख,प्रशांत मुंडलिक,मास्तर हुडे,सद्दाम आतार,टिंकू राकेचा,दादासाहेब कुताळ,मुन्ना बागवान, रफिक बागवान, जाकीर मिस्तरी,बाळासाहेब शेलार, अजित शेलार,जब्बार आतार,विनायक जगताप,जब्बार पठाण,रिजवान आतार,अली सय्यद,बाबा सय्यद, रियाज शेख, इरफान जहागीरदार,कैफ काजी, अँड. आयाज सय्यद, अल्तामश तांबटकर, वासीम जहागीरदार, सलमान तांबोळी, युसूफ पिंजारी आदी उपस्थित होते.

नेवासा प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे हॉटेल दीपक असून नेवासा तालुक्यातील नगर औरंगाबाद महामार्गावर, मौजे प्रवरासंगम येथे गट  न. 146/1 न  तेथे बोगस बांधकाम परवानगीच्या आधारे परमिट रूम लायसन्स मंजूर केले आहे.वस्तुस्थिती अशी की, नगर रचना विभाग अहमदनगर यांच्याद्वारे सदर जागेवर 115 मीटर अंतर सोडून बांधकाम परवानगी मंजूर करण्यात आली होती. पण सदर परवानगीच्या विपरीत, हॉटेलचे बांधकाम महामार्ग लगत अगदी 15 मीटर वर करण्यात आले आणि सदर ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्या पोटी कागदोपत्री परमिट रूम लायसन्स, महामार्गापासून 115 मीटर लांब दाखवून मंजूर केले. जागेवरील हकीगत अशी की, महामार्गापासून 115 मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम नाही. महामार्ग लगत 15 मीटरवर अवैध बांधकाम करून तेथे परमिट रूम लायसन्स चालविण्यात येत असून अवैध दारू विक्री होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निकषानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या लगत स्थित असलेले अनुज्ञप्ती मंजूर करताना किमान 75 मीटर अंतर सोडणे अनिवार्य आहे पण हॉटेल दीपक येथे अवैधरित्या परमिट रूम लायसन्स मंजूर करून चालविण्यात येत आहे. सदर हॉटेल हे नगररचना विभागाच्या मंजूर नकाशाच्या "ओपन स्पेस" जागेत असून अवैध रित्या बांधलेले आहे. या वर आत काही कारवाई केली जाईल का ? या कडे तालुका व जिल्ह्यातील नागरिक कांचे लक्ष लागुन आहे.

श्रीरामपुर (वार्ताहर) - आई वडीलांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी व समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याची अंगी असलेली महत्वकांक्षा यामुळेच  सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने व श्रीरामपुर करांच्या सहकार्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असुन आपण दिलेले प्रेम स्नेह कधीच विसरु शकणार नाही असे मत श्रीरामपूर येथून बदली झालेले तहसिलदार प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथुन नुकतीच बदली झालेले तहसिलदार प्रशांत पाटील यांचा अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व श्रीरामपुर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने आयोजीत निरोप अर्थात सन्मान सोहळ्यास उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई हे होते. यावेळी नायब तहसिलदार ज्योती गुंजाळ, अव्वल कारकुन सुहास पुजारी, क्लर्क मिलींद नवगिरे, माऊली वृद्धाश्रमाचे संचालक सुभाषराव वाघुंडे, संघटनेचे जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, सुर्योदय पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप गायके, पत्रकार लालमहमद जहागीरदार, भाऊसाहेब वाघमारे, गोपीनाथ शिंदे, सुभाष चोरडीया, प्रकाश गदीया आदि प्रमुख उपस्थीत होते.

तहसीलदार पाटील पुढे म्हणाले की संविधानाने दिलेल्या शक्तीचा वापर सर्वसामान्यासाठी करायचा असतो. चांगल्या कुटूंबात जन्माला आलो तर चांगलं करायला काय हरकत आहे हे लक्षात ठेवून काम करत राहायचे असते. निष्कलंक व्यक्तीमत्व असलेले शिक्षक वडीलांनी कडक शिस्तीने केलेल्या संस्कारातून हे सर्व शक्य होत आहे. अचानक येणाऱ्या  संकट काळास अनेक लोक संधी समजतात अन् हात धुवून घेतात परंतु तालुक्यातील सर्व दुकानदारांनी मग तो स्वस्त धान्य दुकानदार असो किराणा दुकानदार असो सर्वांनी कोरोना काळात प्रशासनाला सहकार्यच केले त्यामुळेच आपण यशस्वीपणे कोरोनावर मात करु शकलो  पुरवठा विभागाने व तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी चांगले काम केले.सर्वांच्या सहकार्यामुळेच आदर्श तहसीलदार होण्याचा बहुमान मिळाला असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगीतले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, पत्रकार लालमहमद जहागीरदार, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, माऊली वृद्धाश्रमाचे सुभाषराव वाघुंडे, भाऊसाहेब वाघमारे आदिंनी तहसिलदार प्रशांत पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यात सव्वाचार वर्षात केल्या कामांचा संदर्भ देत आपले अनुभव सांगत कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व, कुशल प्रशासक, उत्तम मार्गदर्शक व सकारात्मक विचारांचा ठेवा असलेले व्यक्तीमत्व म्हणजेच तहसिलदार प्रशांत पाटील हे असल्याचे अनेकांनी आपल्या  भाषणातून व्यक्त केले.तहसीलदार पाटील यांच्याविषयी अनुभव सांगताना प्रत्येक जण भावूक होत होता यावेळी काही काळ स्वत: तहसिलदार पाटील हे ही मनोगतं व्यक्त करताना भावूक झाले होते.

यावेळी देवराम गाडे, बाळासाहेब राठोड, मुरलीधर वधवाणी, राजन वधवाणी, वनराज ढाले, योगेश नागले, राजेंद्र वाघ, गणेश चव्हाण, उमेश दरंदले, अजीज शेख, प्रेम छतवाणी, विकी काळे, सुकदेव वाघमारे, आप्पा शिरोळे, सद्दाम शेख, नुरूद्दीन शेख आदिंसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत झुरंगे यांनी केले, प्रास्ताविक राजन वधवाणी यांनी केले तर आभार रज्जाक पठाण यांनी मानले.

श्रीरामपूर : तालुक्यातील प्रशासन नागरिकांसाठी आहे की, लोकांच्या जीवनाशी खेळणा-यांसाठी. असा प्रश्न पढेगाव येथील पडोळे कुटुंबाच्या व्यथेमुळे  समोर आला आहे. शासन नियमानुसार लोकवस्ती पासून ५०० फूट अंतर सोडून, कुकुट पालनाचा व्यवसाय करण्याचा नियम असतांना देखील, तालुका तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या परवानगी न घेता. पडोळे यांच्या घरापासून १५० फुटावर कोंडीराम उंडे यांनी सुरू केलेल्या, कुकुट पालन शेड उभारल्यामुळे, २०२२ साला पासून पडोळे कुटुंबाला जीवन जगणे अवघड झाले असून. पोल्ट्री फॉर्ममुळे पडोळे यांच्या घरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांच्या घरात दुर्गंधी तसेच माशांचे साम्राज्य निर्माण झाल्याने. पडोळे कुटुंबातील सदस्यांना वारंवार उलटी,ताप,मळमळ यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. ३ वर्षांपासून होत असलेल्या शारिरीक,मानसिक  त्रासाला कंटाळून, स्थानिक तसेच जिल्हा आरोग्य विभागास तक्रार करून देखील अद्याप कोणताही कारवाई न. झाल्याने,पडोळे कुटुंबियांचे आयुष्य जगणे कठीण झाले असून. प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

श्रीरामपूर  : संपूर्ण राज्यात श्रीरामपूर शहराची ओळख,श्रीराम जन्मोत्सव व श्रीराम नवमी यात्रेमुळे निर्माण झालेली असल्याने. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यासह परराज्यातून,मोठ्या प्रमाणात व्यापारी तसेच रहाट पाळणे वाले येत असतात. परंतु यंदाच्या वर्षी अनेक वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या, श्रीराम जन्मोत्सव व श्रीराम नवमी यात्रेच्या नियोजन करतांना. प्रशासनाच्या बेजबाबदार व निष्काळजीपणाच्या भुमिकेमूळे,यात्रा भरणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना. रासकर नगर याठिकाणी,आनंद मेळा नावाने उत्सव भरविण्यात आला. मात्र केवळ गावातील काही विघ्नसंतोषी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी वारांवर प्रशासनावर दबाव आणल्याने, पालिका व पोलीस प्रशासनाला दडपशाही करून.१० दिवस चालणारी यात्रा चौथ्या दिवशी बंद पडली. त्यामुळे बाहेरून आलेले व्यापारी व रहाट पाळणे चालकांवर उपासमारीची वेळ आली असून. शहरातील सर्व सामान्य जनतेला यात्रेचा आनंद घेता आला नसल्याने, जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष व संतापाची लाट उसळल्याने. रहाट पाळणे सुरू करा या मागणी करिता. शहरातील जनता रस्त्यावर उतरली आहे. सदरच्या मागणी करिता भगवाधारी ग्रुप, बजरंग दल,विश्व हिंदू परिषद, शिवसेना ठाकरे गट, सिटीझन जस्टीस प्रेस कॉन्सिल,महाराष्ट्र  सर्वोदयोग कामागर कर्मचारी युनियन,भोईराज युवा प्रतिष्ठाण आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी अनिल पवार,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे आदींना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रशासनामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जात असलेल्या व्यावसायिकांनी आशा प्रकारे त्रास होत असेल तर ,यापुढे श्रीरामपूरच्या यात्रेवर न येण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका अधिका-यां समोर स्पष्ट केले. सदरच्या आंदोलनास सुरज यादव गौतम जावरे, सागर वाडीले,अर्जुन मापारी,यश बनसोडे,राहुल मापारी, रणरागिणीच्या सपनाताई थेटे,अमित मुथ्था, अनिल लगड,शक्तीराज सिंग,गणेश चव्हाण,अमोल सावंत,सेनेचे राहुल ,अकिल मानियार, नितीन बनसोडे, मच्छिंद्र शिंदे, सुनील डुकरे आदींसह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जगाला अहींसा व शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती बेलापुरात मोठ्या उत्सहात संपन्न झाली भगवान महावीरांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली जैन बांधव मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते जैन स्थानकापासून मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली बेलापुरच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला मिरवणूक जैन स्थानकात आल्यानंतर जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके आदिंनी सर्वांना भगवान महावीर जयंती निमित्त मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या तालुक्याचे आमदार लहु कानडे तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक यांनीही जैन स्थानकात जावुन भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पुजन करुन जगाला मानवतेचा संदेश देणारे भगवान महावीरांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले या वेळी मा.जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले भास्कर बंगाळ पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा प्रकाश कुऱ्हे दत्ता कुऱ्हे सुवालाल लुंक्कड शांतीलाल हिरण सचिन कोठारी प्रविण बाठीया अभिजित राका सुभाष बोरा अमीत लुक्कड अतिश देसर्डा विजय कोठारी विजय कटारीया संजया बाठीया योगेश कोठारी सांतोष ताथेड मनिष मुथा संदीप देसर्डा शितल गंगवाल आदि उपस्थितीत  होते

श्रीरामपूर (प्रतिनिधी )-शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातुन मोफत गहु व तांदूळ वितरण करण्यात येत असल्यामुळे आनंदाचा शिधाही उधारीवर द्यावा अशी रांज्य संघटनेची मागणी शासनाने मान्य केली असुन जिल्ह्यात फक्त स्वयः घोषणापत्र घेवुन उधारीवर आनंदाचा शिधा दिला जात असल्यामुळे अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,पुरवठा मंत्री त्याचबरोबर  महसुल तथा पालकमंत्री यांना धन्यवाद दिले आहे                                           अहमदनगर जिल्ह्यातील १८८३ धान्य दुकानदारांमार्फत माहे जानेवारी २०२३ पासुन शासनाने  कार्डधारकांना मोफत गहु वा तांदूळ वितरीत करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दुकानदारांना मोफत आलेला माल मोफतच वितरीत करावा लागतो त्यातच शासनाने गुढी पाडवा व डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले परंतु दुकानदारांना मागील मोफत धान्य वितरीत केल्येल्या धान्याचे मार्जिन अद्याप मिळालेले नाही त्यामुळे दुकानदारांना आर्थिक अडचण आहे त्यामुळे आनंदाचा शिधा उधारीवर द्यावा अशी मागणी राज्य फेडरेशनच्या वतीने करण्यात आली होती त्या योग्य मागणीची  दाखल घेत शासनाने उधारीवर शिधा देण्याचे आदेश सर्व जिल्हा कार्यालयाला दिले असुन अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचा शिधा पोहोच झाला असुन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी दुकानदाराकडून स्वयः घोषणापत्र भरुन उधारीवर आनंदाचा शिधा देण्याचे आदेश दिले असुन या आदेशामुळे दुकानदारांना दिलासा मिळाला आहे दुकानदारांना प्रथमच उधारीवर माल देण्यात आला असुन त्या बद्दल अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरवठा मंत्री नामदार रविंद्र चव्हाण महसुल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष गणपतराव डोळसे सचिव बाबुराव ममाणे अशोक ऐडके संजय पाटील संजय देशमुख आदिचे अभिनंदन केले आहे या पत्रकावर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे मंगेश छतवाणी बाबा कराड शिवाजी मोहीते कैलास बोरावके गणपतराव भांगरे  काशिनाथ अरगडे रावसाहेब भगत मुनिर देशमुख ज्ञानेश्वर वहाडणे अजीज शेख भाऊसाहेब वाघमारे राजेंद्र थोरात विश्वासराव जाधव प्रकाश भोसले आदिंच्या सह्या आहेत

श्रीरामपुर  ( प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यासाठी गुढी पाडवा व डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा श्रीरामपुर गोदामात आलेला असुन सोमवार दिनाक ३ एप्रिल पासुन तालुक्यात वितरण सुरु करण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे                                   या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात तहसीलदार पाटील यांनी पुढे म्हटले आहे की तालुक्यात सहकारी संस्था, महीला बचत गट, खाजगी व्यक्ती असे एकुण ११० स्वस्त धान्य दुकाने असुन तालुक्यात असणाऱ्या कार्डधारकासाठी तालुक्यासाठी एकुण ३६८४० आनंदाचा शिधा उपलब्ध झाला असुन सोमवार दिनांक ३ एप्रिल २०२३ पासुन शासकीय गोदामातुन हा शिधा दुकाननिहाय वितरीत करण्यात येणार आहे प्रति कार्ड एक या प्रमाणे हा शिधा वाटप करण्यात येणार असुन त्यात एक किलो साखर एक किलो चना डाळ एक लिटर पामतेल एक किलो रवा अशा प्रकारे हा शिधा वाटप करण्यात येणार आहे प्रति किटची किमत १०० रुपये असणार आहे तालुक्यातील कार्डधाराकांनी १०० रुपयात हा शिधा आपल्या जवळील रेशन दुकानातुन घेवुन जावा या बाबत कुणाची काही तक्रार असल्यास पुरवठा विभागाशी सांपर्क साधावा असे अवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget