October 2021

अहमदनगर प्रतिनिधी :- दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात होणारी गर्दी विचारात घेता अहमदनगर शहर पोलीस दलाच्या वतीने कापड बाजार व्यापारी असोसिएशन यांची बैठक घेतली त्या बैठकीला आमदार श्री संग्राम जगताप उपस्थित होते.

मागील दीड वर्षापासून धोरणामुळे ठप्प झालेला व्यवहार पूर्वपदावर येत आहे आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात खरेदी करता नागरिकांची झुंबड उडत असते. कोरोना चे नियम पालन करून व्यापार पूर्वपदावर आणण्याचा पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने सदरची बैठक बोलविण्यात आली होती बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर

बाजारामध्ये गर्दी होऊ नये आणि कोरोना चा संसर्ग पुन्हा वाढ नये याकरता पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजार मध्ये महिला मोठ्या संख्येने खरेदी करता येत असतात हे ध्यानात घेता कापड बाजारांमध्ये अतिरिक्त महिला पोलिस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे असे DySP संदीप मिटके यांनी कळविले.

व्यापारी व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आव्हान पोलीस विभागातर्फे करण्यात आलेले आहे. बैठकीनंतर आमदार संग्राम जगताप व Dysp संदीप मिटके यांनी कापड बाजारांमध्ये पायी फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. सदरच्या बैठकीस आमदार संग्राम जगताप, Dysp संदीप मिटके, PI संपत शिंदे,PI ज्योती गडकरी,PI भोसले, API देशमुख, कापड बाजार व्यापारी असोसिएशनचे संभव काठेड,  कुणाल नारंग, ईश्वर  बोरा  , प्रतीक बोगवत , विजय गुगळे,  विक्रम मुथा,  आनंद मुथा,  रवी कितनी, धीरज पोखर्णा, केतन मुथा,  संजय  चोपडा, विशाख वैद्य,  प्रकाश  बायड, संजय बोगावत , रवी कराचीवाला ,  धीरज मुनोत , दीपक नावालानी उपस्थित होते.




श्रीरामपूर प्रतिनिधी:-  दि.02/02/2020 रोजी पीडित महिला ही तिच्या बहिणीच्या आजारी मुलाला भेटण्यासाठी पढेगाव येथे जाण्यासाठी बेलापूर रिक्षा स्टँडवर गेली असता तेथे आरोपी आसिफ कबिर पठाण रा . हरेगाव ता श्रीरामपूर हा तेथे जाऊन तिस खोटे बोलून त्याच्या मोटरसायकलवर  बसण्यास भाग पाडून तिला नगर मनमाड रोड ने राहुरी कृषी विद्यापीठाजवळील मुळा उजवा कालव्या जवळील रोडणे धरणाच्या दिशेने विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत झाडाझुडपात नेऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे व मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणून पीडितेस  बळजबरी करू लागला पीडितेने त्यास विरोध केला म्हणून आरोपीने त्याची जवळील सत्तुरने पीडितेच्या गळ्यावर छातीवर ,दंडावर, हाताचे पंजे व इतर भागावर वार करून  पीडितेस जातीवाचक शिवीगाळ   केली त्यानुसार  राहुरी पो.स्टे. Cr.no 74/2020  अ. जा.ज. प्र. का.क. 3 (2), (5),प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास Dy.S.P.  राहुल मदने यांनी करून चार्जशीट न्यायालयात दाखल केले. सदर गुन्ह्याच्या तपासात उपविभागीय  पोलीस अधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथील म. पो. ना. अश्विनी पवार यांनी मोलाची कामगिरी केली सदर प्रकरणात ॲड. अनिल ढगे यांनी सरकारी पक्षाची  बाजू मांडली. मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री ए. एम. शेटे साहेब यांनी आरोपींना भादवि कलम 307  अन्वये दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व 25000/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3(2),(5), अन्वये सात वर्षे  सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.  या दोन्ही शिक्षा एकत्रित  भोगावयाच्या आहेत असा हुकूम झाला

.        सदर खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले त्यात Dy.s.p.राहुल मदने यांची साक्ष महत्त्वाची ठरली, आणि विशेष बाब म्हणजे खटल्याचे कामकाज सुरू झाल्यापासून 27 दिवसात निकाल लागला. पैरवी अधिकारी म्हणून H.c. तुपे यांनी काम पाहिले.


अहमदनगर- एमआयडीसी मधील झेन कंपनीतील कॉपर पट्टया चोरुन नेणारे सराईत चोरट्यांना पकडून ७ लाख २९ रु हजार रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. सिताराम उर्फ शितल उर्फ गणेश भानुदास कु-हाडे (वय ३३ मुळ रा. चितळी रेल्वे स्टेशन, चितळी, ता. राहाता हल्ली रा. वडगाव गुप्ता अ.नगर), राहुल सुरेश जाधव (वय २९ रा. पाण्याचे टाकी जवळ, प्रवारा संगम ता. नेवासा),  पंकज बापू गायकवाड (वय २७ रा. गोधवणी ता. श्रीरामपूर), आकाश रामचंद्र भोकरे (वय २३ रा. कायगावटोक, ता. गंगापुर जि. औरंगाबाद) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यता घेतले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकातील सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ विजय वेठेकर, पोहेकॉ संदिप पवार, पोना ज्ञानेश्वर शिंदे, पोना सुरेश माळी, पोना शंकर चौधरी, पोना विशाल दळवी, पोना दिपक शिंदे, पो.कॉ. योगेश सातपुते, पोकाॅ मेघराज कोल्हे, पो.कॉ. मच्छिद्र बड़े, पोकॉ कमलेश पाथरुड, पो.कॉ. आकाश काळे व चापोहेकॉ बबन बेरड आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यविरुध्द यापूर्वी दरोडा, चोरी, बेकायदा गावठी कट्टे जवळ बाळगणे, विनयभंग, दारु व जुगार अशी गुन्हे दाखल आहेत.आरोपी कुन्हाडे याचेविरुध्द नाशिक, कोपरगाव यासह अन्य ठिकाणी एकूण  १७ गुन्हे आहेत.  झेन इलेक्ट्रॉनीक कंपनीचे व्यवस्थापक शिवाजी भागाजी कुदनर ( रा. आदर्शनगर, नागापूर, अहमदनगर हे एमआयडीसी अहमदनगर) हे येथे दि.२२ ऑक्टोबर  २०२१ रोजी पहाटे ४.४० वा. सुमारास कंपनीमध्ये वॉचमन  सोन्याबापू विजय पळसकर व विलास परासराम नेवसे हे कंपनीमध्ये डयूटीवर असतांना अनोळखी ६ ते ७ चोरटयांनी कंपनीमध्ये जाऊन वॉचमन यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून व जिवे मारण्याची धमकी दिली.  कंपनीमधील १७ सीसीटीव्ही कॅमेरे फोडून कंपनीचे शटर लोखंडी कटावणीने तोडून कंपनीमधील १७ लाख ५० हजार रु. किमतीच्या चांदीचा मुलामा असलेल्या कॉपर पटयांचे १० बॉक्स दरोडा टाकून चोरुन नेले, या झेन इलेक्ट्रॉनीक कंपनीचे व्यवस्थापक शिवाजी भागाजी कुदनर ( रा. आदर्शनगर, नागापूर, अहमदनगर हे एमआयडीसी अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरनं. ६९९/२०२१ भादवि कलम ३९५, ४५२,३२४,५०६,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


अहमदनगर प्रतिनिधी:- Dy.s.p. संदीप मिटके यांना अहमदनगर शहरातील वाणी नगर तसेच केडगाव  मध्ये अंबिका नगर येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे  तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वाणी नगर, तसेच कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील अंबिका नगर केडगाव परिसरात बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन  03 पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका करण्यात आली आहे. Psi समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 1) दीपक एकनाथ लांडगे वय 30, 2)  सागर जाधव या आरोपी विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन  येथे Cr no. 947/2021  स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956  चे कलम  3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एका पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आली.पोलीस नाईक शाहिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश पोपट ओव्हाळ रा. माळीवाडा अहमदनगर याच्या विरुद्ध  कोतवाली पोलिस स्टेशन येथे cr. No. 799/2021 महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 2 पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आलेली आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्याची अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. या दोन्ही कारवायांची वैशिष्ट्य म्हणजे उच्चभ्रू वस्तीमध्ये भाड्याने फ्लॅट  घेऊन महिलांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता.अहमदनगर शहरामध्ये बऱ्याच काळानंतर या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमुळे अहमदनगर शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, मा. डॉ. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके , PI संपत शिंदे, PI. गडकरी P.s.i. समाधान सोळंकी, स.फौ. राजेंद्र आरोळे ,पो.हे.का सुरेश औटी पो.कॉ. तरटे, अमोल शिरसाट, चेतन मोहिते, गौतम सातपुते, सचिन जाधव, शाहिद शेख, विष्णू भागवत, सुमित गवळी, दीपक रोहकले, LPC जयश्री सुद्रिक, LPC प्रियंका भिंगरदिवे आदींनी केली.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-घनकचरा प्रकल्प सुरू करणे,गावाचा सन २०२२-२३चा  विकास आराखडा तयार करणे,पाणीयोजना,रस्ते गटारी व नवीन कामाचे वाटप शासकीय नियमानुसार करणे,राष्ट्रीय तंबाखू  नियंञण कार्यक्रमाची अंमलबाजावणी आदी विषयांवर साधक बाधक चर्चा होऊन बेलापूरची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

           मंगळवार दि २६ रोजी बेलापूरची ग्रामसभा सरपंच महेंद्र साळवी यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाली.यावेळी निरीक्षक म्हणून पंचायत समितीचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, उपसरपंच अभिषेक खंडागळे,भरत साळुंके,रविंद्र खटोड,सुधीर नवले,सुधाकर खंडागळे,रणजित श्रीगोड,चंद्रकांत नाईक,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवरांनी ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा केली.बेलापूरची लोकसंख्या जास्त असल्याने कचरा मोठ्याप्रमाणात जमा होतो. तो नदीकाठी टाकला जातो त्यामुळे प्रवरा नदीचे पावित्र्य धोक्यात आलेले आहे.म्हणून घनकचरा प्रक्रिया व व्यवस्थापन प्रकल्प तात्काळ उभा करणे,जुनाट झालेल्या पाणी योजनांची दुरुस्ती करणे अथवा नवीन करणे, आवश्यक त्या ठिकाणी रस्ते,गटारी तयार करणे आदी विषयावर साधक बाधक चर्चा झाली.गावात घनकचरा व्यवस्थापन कामाची चर्चा अनेक वर्षांपासून सूरु आहे मात्र कार्यवाही होत नसल्याची खंत जेष्ठ नेते सुधाकर खंडागळे यांनी व्यक्त केली.यावर यादृष्टीने प्रयत्नशिल असल्याचा खुलासा ग्रामपंंचायतीकडून करण्यात आला.

कामांचे टेंडर देतांना ३३ टक्के सुशिक्षित बेरोजगार अभियंता,३३ टक्के मजूर सोसायटी व ३४ टक्के खुले असे देणे बंधनकारक असतांना तसे होत नाही.असा आरोप विरोधी गटाचे भरत साळुंके व सुधीर नवले यांनी केला.त्यावर सर्व टेंडर नियमात दिले असल्याचा खुलासा सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे  यांनी केला.शेवटी तंबाखू व धूम्रपान करणार नाही अशी शपथ ग्रामस्थांना देण्यात आली.विषयपञिकेवरील आमचा गाव आमचा विकास,कोविड नियमांचे पालन करुन शाळा सुरु करणे,जलजीवन मिशन, नविन घरकुल बांधकामे,यासह विविध विकास कामांचा आढावा आदी विषयांवर चर्चा होवून विषयांना मंजुरी देण्यात आली.

श्रीरामपूर (वार्ताहर) तेथील महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात रविवारदिनांक 24 10 2021 रोजी दुपारी दोन वाजता कोरोना योद्धा सन्मानपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम तसेच पत्रकार संघाचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्र दान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली हे होते अध्यक्षपदाची सुचना पत्रकार कासम शेख यांनी मांडलि त्याला अनुमोदन असलम बिनसाद यांनी दिले कार्यक्रमास पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद प्रदेश उपाध्यक्ष बी के सौदागर प्रदेश युवा कार्याध्यक्ष संदीप पवार अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद पत्रकार सलाउद्दीन शेख पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष हनिफ भाई तांबोळी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड शहराध्यक्ष रियाज पठाण बेलापूर शाखाप्रमुख एजाज

सय्यद श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष कासम शेख श्रीरामपूर तालुका संघटक राज महंमद शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शेख बरकत आली ,हनिफ भाई तांबोळी , सलाउद्दीन शेख असलम बिनसाद, कासम भाई शेख ,हाजी इस्माईल भाई शेख, एजाज सय्यद, आदींनी मार्गदर्शनपर भाषणे केली कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्या व मदतीचा हात उंचावणाऱ्या बेलापूर गावातील समाजसेवक व डॉक्टरांना यावेळी कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार संघामध्ये नव्याने दाखल झालेले अनिता तिडके ,समीना शेख ,अश्विनी अहिरे ,व अमन शेख यांना  शेख बरकत अली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले यात अनिता तिडके यांना अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष तर समीना शेख यांना अहमदनगर महिला जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले त्याचबरोबर अश्विनी आहिरे यांना श्रीरामपूर तालुका महिला संघटक पदी तर अमन शेख यांना राहुरी तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले कोरोना योद्धा सन्मानित हाजी इस्माईल शेख यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की कोरोना काळात मी व माझ्यासारख्या अनेक लोकांनी मोठे मन करून रुग्णांना सहकार्य केले तसेच गोरगरीब व गरजू लोकांना किराणा सामानाचे व इतर साहित्याचे किट वाटप केले या काळात अनेकांनी को बीड सेंटरला भरीव मदत केली अशा लोकांच्या कार्याचा आढावा घेतापत्रकार संघाने कोरोना योद्धा या सन्मान पत्राने सन्मानित करून सर्वांचे मनोधैर्य वाढविले आहे
पत्रकार संघाच्या या स्त्रूत्य कार्याचे आपण कौतुक करीत असून या सन्मानाबद्दल मी पत्रकार संघाचा आभारी आहे असे ते म्हणाले यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेख बरकत अली म्हणाले की पत्रकार संघाचा विस्तार महाराष्ट्रात मोठ्या गतीने होत असून ठीक ठिकाणी
आपण दिलेले जिल्हाध्यक्ष व झोनल अध्यक्ष व त्यांच्या अंतर्गत काम करणारे शहर व तालुका अध्यक्ष प्रामाणिकपणे काम करीत असून पत्रकार संघाचा विस्तार करणे हे त्यांचे लक्ष्य आहे पत्रकारांनी सत्यता पडताळून बातम्या प्रसिद्ध केल्यास पत्रकार अडचणीत येणार नाही परंतु अशा प्रामाणिक पत्रकारांनी बातमी

  छापल्याचा रोष धरून कोणी पत्रकारांना मारहाण करीत असेल किंवा त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारितेवर गदा आणण्याचा प्रयत्न करीत असेल अशा वेळेस पत्रकार संघ त्या पत्रकाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहून त्याचे सामर्थ्य वाढविण्याचे व त्याला न्याय मिळवून देण्याचे काम करतो पत्रकार संघ हा पत्रकारांचा सुरक्षा कवच असल्याने संघातील कोणत्याही पत्रकाराने घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही पत्रकारांनी निर्भयपणे आपले कर्तव्य बजावले पाहिजे आमची साथ अशा पत्रकारांना शेवटपर्यंत मिळेल याची गवाही आपण या ठिकाणी देत आहोत असे त्यांनी सांगितले यावेळी बेलापूर शाखेचे उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद पत्रकार रमेश शिरसाट पत्रकार नदीम शेख राहता तालुका उपाध्यक्ष शब्बीर कुरेशी पत्रकार अहमद शेख पत्रकार जावेद के शेख यांच्यासमवेत तालुक्यातील छोट्या वृत्तपत्रांचे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते पत्रकारांचे आभार पुणे शहराध्यक्ष हनीफ भाई तांबोळी यांनी मानले.


श्रीरामपूर (वार्ताहर) शिर्डी येथील दैनिक साई दर्शन चे संपादक जितेश लोक चंदानी यांचे विरुद्ध दाखल झालेला खोटा गुन्हा चौकशी करून मागे घेण्यात यावा या मागणीकरिता महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने दि 23 10 2021 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय विभाग श्रीरामपूर यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदन देताना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा अध्यक्ष आसलम बिनसाद पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी के सौदागर बेलापूर येथील शाखाप्रमुख एजाज सय्यद श्रीरामपूर तालुका संघटक राज मोहम्मद शेख श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष कासम भाई शेख बेलापूर शहर संघटक मोहम्मद अली शेख पत्रकार रिजवान शेख कुमारी अश्विनी आहेर आदी मान्यवर उपस्थित होते सदरील निवेदनात नमूद करण्यात आले की साई दर्शन चे संपादक जितेश लोक चंदानी हे गेल्या अनेक वर्षापासून साई भक्तांच्या व जनतेच्या अडचणींबाबत निर्भीडपणे वृत्तपत्रातून लिखाण करीत आहेत त्यांच्या लिखाणामुळे दुखावलेल्या लोकांनी लोक चंदानी यांच्या लिखाणावर व पत्रकारितेवर गदा आणण्याच्या दुष्ट हेतूने पोलीस स्टेशनला चंदानी यांच्याविरुद्ध खोटी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे अशाप्रकारे षड् यंत्र रचणाऱ्या अधिकारी व पुढाऱ्यांचा महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ निषेध नोंदवित असून या प्रकरणी त्वरित चौकशी होऊन दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा पस्वरूपाचेत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र  आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


बेलापूरः(प्रतिनिधी  )- बेलापूर ग्रामपंचायत महिला व बालकल्याण तसेच वंचित घटकांच्या विकासासाठी वचनबध्द असून त्यासाठी ग्रामपंचायतने कृतीशील आराखडा बनविला असल्याची माहिती सरपंच महिन्द्र साळवी यांनी दिली. बेलापूर ग्रामपंचायतीने महिला,वंचित घटक तसेच बाल सभेचे सावता मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उपसरपंच अभिषेक खंडागळे ,ग्रामसेवक राजेन्द्र तगरे,सदस्य तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,रमेश अमोलिक,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भाराटे,ज्येष्ठ पञकार देवीदास देसाई,विष्णूपंत डावरे, दिलिप दायमा ,पोलिस पाटील अशोक प्रधान आदि प्रमुख उपस्थित होते.     यावेळी बोलताना उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सदर ग्रामसभेविषयी सविस्तर विवेचन केले.ते म्हणाले की,गावाची बहुसंख्या महिलां व वंचित घटकांची आहे.त्यामुळे या घटकाच्या विकासासाठी विविध शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.महिला,  वंचित घटक व बालकांच्या विकास योजनांचा सर्वकष आराखडा मंजूर होताच त्याची अंमलबजावणी केली जाईल.महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला जाईल.बालविकासासाठीही विविध शासकीय योजनांसाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील असे श्री.खंडागळे यांनी स्पष्ट केले. पञकार देवीदास देसाई यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करुन मौलिक सुचना व मार्गदर्शन केले.सभेत आमचा गाव आमचा विकास आराखडा,कुपोषित बालक आढावा,जलजीवन मिशन,घरकुल योजना,महिला वाचनालय,बचत गट नविन स्थापना आदिवर चर्चा झाली. सभेस महिला नागरिक,महिला बाचत गटाच्या प्रतिनिधी,अंगणवाडी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


बेलापुर ( देविदास देसाई ) - श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील महावितरणच्या विद्युत प्रवाहाच्या तारेला चिटकून मयत झालेल्या नाऊर येथील अतिशय गरीब कुटुंबातील कै.विलास अशोक देसाई( वय 40 ) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने, शिवाय घरात एकुलता एक कमविता असल्याने त्याच्या कुटुंबापुढे मोठे संकट उभे ठाकले होते.मात्र नाशिक येथील गणगोत ग्रृप व श्रीरामपूर येथील स्वामी सहजानंद भारती सोशल मीडियाच्या ग्रुपच्या माध्यमातून तसेच ठाण्याचे उद्योजक मंगेश नवले यांनी मयत विलासच्या घराच्या कामासाठी दिलेल्या ३० हजाराच्या मदतीमुळे तब्बल 3,19000 रू. इतकी रक्कम जमा झाली असून यातील 2, 50,000 रक्कम फिक्स डिपॉझिट तर इतर दशक्रियाविधी च्या खर्चासह सुपूर्द करण्यात आली आहे.

  सविस्तर असे कि, तालुक्यातील नाऊर येथील गरीब कुटुंबातील तरुण कै.विलास देसाई हा दोन महिन्यापूर्वी महावितरण विद्युत प्रवाह असलेल्या तारेला चिटकून दुर्दैवी निधन झाले होते त्याच्या वडिलांचे अकरा महिन्यापूर्वीच निधन झाले होते, त्यात घरामधील एकटा कमवता असलेला तरुण मुलगा गेल्याने  मयत विलासची आई, पत्नी, २ मुली व १ मुलगा यांच्यापुढे आभाळ च फाटले होते.मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व सामाजिक देणगीदारांच्या सहकार्याने पत्रकार देविदास देसाई व कृष्णा देसाई यांनी सुचविल्या प्रमाणे नाशिक येथील गणगोत ग्रुपचे ॲडमिन राहुल क्षीरसागर व नाऊर येथील पत्रकार संदिप जगताप ग्रुप ॲडमिन असलेले स्वामी सहजानंद भारती या ग्रुपच्या माध्यमातून तसेच ग्रामविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या सह पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष देविदास देसाई यांच्या सर्वांच्या माध्यमातून सुमारे दोन लाख 89 हजार इतकी रोख रक्कम महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून थोर देणगीदारांच्या सहकार्याने जमा करण्यात आली. तसेच ठाणे येथील उद्योजक मंगेश जी नवले यांनी मयत विलासच्या घराला छत नसल्याने तत्परतेने ३० हजाराची मदत करून घरावरील अँगल , पत्रे व इतर वस्तु घेऊन दिल्याने मोठा आधार निर्माण झाला.

    या कुंटूबाच्या मदतीसाठी ग्रामविकास अधिकारी टी.के. जाधव, राहुल क्षीरसागर पत्रकार संदिप जगताप कृष्णा देसाई  यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातुन अनेकांना अवाहन करून १०० रुपयापासुन २ ते ५ हजारापर्यंत मदत जमा करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी जाधव यांचेकडे ७१६०४ रु तर  मयत विलास च्या १० वी च्या गृपच्या माध्यमातुन १०९११ रु तर पत्रकार संदिप जगताप ५३०१२ तसेच ठाण्याचे उद्योजक मंगेश नवले यांची घरासाठी ३० हजाराची मदत तर पत्रकार देविदास देसाई यांच्या माध्यमातुन तब्बल १, ५०००० अशी एकूण ३ लाख १९ हजाराची मदत उपलब्ध झाल्याने "सोशल मिडियातुन - सोशल वर्क" राज्यात आदर्श ठरणार असुन एखाद्या गरीब कुंटूबासाठी चांगले काम केल्याने सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-ग्रामपंचायतीचा जसजसा वसुल होईल त्या प्रमाणे मागासवर्गीय निधी व इतर निधीचे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येईल आसे अश्वासन गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांनी दिल्यामुळे आपल्या उचित मागण्यासाठी दलीत बांधवांनी सुरु केलेले उपोषण मागे घेण्यात आले             ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय १५% फंडातील निधीतुन मागासवर्गीय कुटुंबाला लाभ न दिल्याच्या निषेधार्थ विजय शेलार संजय शेलार भाऊसाहेब तेलोरे यांनी बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर   उपोषण सुरु केले होते  ग्रामपंचायत सदस्य रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक जावेद शेख अय्याज सय्यद अकील बागवान अनिल पवार हारुन शेख भुषण चंगेडीया यांनी उपोषणास पाठींबा दर्शविला होता प्रज्ञा तेलोरे सिमा हिरण जाईबाई तेलोरे मिना पारखे हिराबाई मोरे  सिमा तेलोरे दामीनी गायकवाड  चंदाबाई खरात सुभीद्रा खरात लता तेलोरे बेबी अमोलीक मंगल साठे रोहण शेलार रमेश शेलार विजु तेलोरे नितीन तेलोरे राहुल तेलोरे हे ही उपोषण कर्त्याबरोबर उपोषणास बसले होते  दलीत समाजाने आपल्या योग्य मागण्यासाठी सुरु केलेल्या उपोषणाची आमदार लहु कानडे यांनी तातडीने दखल घेवुन या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सुचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या त्यानुसार गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस टि पी ओ आर डी अभंग हे बेलापुर येथे आले त्यांनी ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांच्याशी चर्चा केली त्या वेळी निधी अभावी मागासवर्गीयांच्या निधीचे वाटप करता आले नसल्याचे तगरे यांनी गटविकास अधिकारी धस यांच्या निदर्शनास आणून दिले त्या वेळी जसा निधी उपलब्ध होईल तसे १५ % मागासवर्गीय निधीचे वाटप करण्यात येईल असे अश्वासन गटविकास अधिकारी धस यांनी उपोषणकर्त्यांना दिले या अश्वासनावर उपोषणकर्त्याचे समाधान झाल्यामुळे त्यांनी उपोषण स्थगीत करण्याचा निर्णय घेतला.

श्रीरामपूर प्रतिनिधी- Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर शहरातील गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी  गोंधवणी परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला. 

आरोपी. क्र.) 1 अशोक काशिनाथ शिंदे 

45,500/-  रु. कि.चे 650 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

3500/- रू किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 2.  मंगल कचरू गायकवाड

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

3000/- रू  किमतीची 30  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं.  अं.)

आरोपी. क्र.) 3.   बाप्पू नागू गायकवाड

45,500/-  रु. कि.चे 650 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3500/- रू  किमतीची 35  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 4.    अर्जुन दौलत फुलारे

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3000/- रू  किमतीची 30  लिटर तयार गावठी हातभट्टी  दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

---------------------------------------------

 एकूण 1,88,000/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पो. स्टे.  येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भल्या पहाटे अचानक केलेल्या या कारवाईमुळे  श्रीरामपूर शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे गोंधवणी येथील महिलां कडून Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक होत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके , ASIराजेंद्र आरोळे,. पो. कॉ. नितीन शिरसाठ,  व आर. सी. पी. पथक श्रीरामपूर आदींनी केली.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय १५% फंडातील निधीतुन मागासवर्गीय कुटुंबाला लाभ न दिल्याच्या निषेधार्थ बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर दलीत बांधवांनी  उपोषण सुरु केले असुन निधी वाटप न करण्याची कारणमीमांसा दर्शविणारा फलक ग्रामपंचायतीच्या वतीने शेजारीच लावण्यात आला आहे                                         कोरोनाच्या परिस्थितीत हाताला काम नाही त्यात दिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे मागासवर्गीय कुटुंबाला ग्रामपंचायत मागासवर्गीय १५% फंडातील निधीतुन मागासवर्गीय कुटुंबाला लाभ देणे अपेक्षित होते बेलापुर ग्रामपंचायतीने दलीत बांधवांना १४ लाख रुपये देणे आवश्यक असताना शिल्लक नसल्याच्या नावाखाली दलीत बांधवांना या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप विजय शेलार  यांनी केला असुन निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने का होईना सण लक्षात घेता वाटप करावे असेही शेलार म्हणाले या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले ग्रामपंचायत सदस्य रविंद्र खटोड भरत साळूंके चंद्रकांत नाईक सोसायटीचे चेअरमन अनिल नाईक अय्याज सय्यद उपस्थित होते दलीत समाजाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंडप टाकुन उपोषण सुरु करण्यात आले आहे तर त्या मंडपा शेजारीच

बेलापुर ग्रामपंचायतीने हिशोबाचा लेखा जोखाच फलकाच्या माध्यमातून नागरीकासमोर मांडला आहे त्यात  म्हटले आहे की सन २०१९-२०२० या काळात मागील सत्ताधाऱ्यांनी १५ लाख ७५ हजार रुपये वाटप करणे गरजेचे होते ते केले गेले नाही १० वर्षापासुन ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी कुठलेही प्रयत्न केले गेले नाही दर चार वर्षांनी फेर आकारणी होणे गरजेचे असताना ते केले नाही मागील काळात व्यापारी व ईतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी देणे बाकी रकमा दिलेल्या आहेत सन २०-२१ काळातील महीला व बालकल्याण १० % निधी व अपंग कल्याण ५ % निधीचे वाटप करण्यात आलेले आहे बेलापुर ग्रामपंचायतीला कर्मचारी पगार गणवेश बोनस मागासवर्गीय निधी अपंग कल्याण निधी महीला बाल कल्याण निधी वाटपासाठी २५ लाख रुपयांची गरज असुन ग्रामपंचायतीकडे केवळ ७० हजार रुपयेच शिल्लक असल्याचे फलकात नमुद करण्यात आलेले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- महाराष्ट्र पोलीस हे २४ तास नागरीकांना सेवा देत असुन आपल्या कुटुंबापासून दुर राहुन आपला जिव धोक्यात घालून समाजसेवा करणाऱ्या पोलीस खात्याला मी वंदन करतो अशा शब्दात जि प सदस्य शरद नवले यांनी पोलीसाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या                                        पोलीस स्मृती दिनानिमित्त बेलापुर ग्रामपंचायत ,बेलापुर पत्रकार ,व ग्रामस्थांच्या वतीने कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस बांधवांना श्रध्दांजली वहाण्याकरीता तसेच कार्यरत पोलीस बांधवांचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते .या वेळी बोलताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक म्हणाले की गुन्हेगारीची लवकर उकल करणारे महाराष्ट्र पोलीस हे राज्यात अघाडीवर आहे .दुसऱ्याचे कुटुंब वाचविण्यासाठी आपला जिव धोक्यात घालुन नागरीकांना सेवा देणारे हे पोलीस दादा आहेत .ते आपली काळजी घेतात आपलीही जबाबदारी आहे त्यांची काळजी घेण्याची. कोरोना काळात सर्व जण घरात असताना पोलीस दादा आपले कर्तव्य बजावत रस्त्यावर उभा होता बेलापुर पोलीसांचे काम देखील अतिशय चांगले असुन रात्रीच्या गस्तीसाठी त्यांना चार चाकी वाहन गरजेचे आहे तसेच बेलापुर पोलीस चौकीची इमारत देखील सुस्थितीत असणे आवश्यक आहे तालुक्याचे आमदार लहु कानडे यांच्या मार्फत येथील पोलीस ईमारतीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस दादांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो असेही नाईक म्हणाले. या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई  तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे महावितरणचे चेतन जाधव अकबर टिनमेकरवाले यांनीही शहीद पोलीस बांधवांना श्रध्दांजली अर्पण करुन आपल्या भावना व्यक्त केल्या या वेळी ग्रामपंचायत  सदस्य मुस्ताक शेख अजिज शेख पत्रकार दिलीप दायमा किशोर कदम शफीक आतार बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे हरिष पानसंबळ पोपट भोईटे  निखील तमनर महेश ओहोळ महेश कुऱ्हे केशव कुऱ्हे  सचिन वाघ शोएब शेख सुनिल साळूंके रफीक शेख  आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.



गळनिंब(प्रधिनिधी)पुरूषांनी स्वत: कमावलेल्या प्राॅपर्टीमध्येच स्वत:चा अधिकार परंतु वडिलांच्या प्राॅपर्टीमध्ये मुलाप्रमाणे मुलीचाही समान हक्क असून वंश परंपरेने चालत आलेल्या पुरूषप्रधान संस्कृतीने महीलांच्या अधिकारावर खर्‍या अर्थाने गदा आल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश मा.एन.के.खराडे साहेब यांनी गळनिंब,कुरणपूर,फत्याबाद येथे  विधी सेवा समिती व वकील संघ श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरा प्रसंगी केले.

    यावेळी व्यासपीठावर श्रीरामपूर वकील संघाचे अँड.आर.डी.भोसले,अँड.आहेर अँड.पंकज म्हस्के,गळनिंबचे सरपंच शिवाजी चिंधे,कुरणपूरच्या सरपंच सौ.मनिषा पारखे,प्रवरा बॅंकेचे मा.संचालक हनुमान चिंधे आदी होते.     

अँड.पंकज म्हस्के यांनी मार्गदर्शन करताना समाजातील वृध्द,निराधार व अपंग व्यक्तींना सरकारच्या वतीने देण्यात येणार्‍या विविध योजनांचा लेखाजोखा मांडला.अँड.आर.डी.भोसले यांनी विधी सेवा समितीच्या वतीने समाजातील घटकांना मोफत न्याय कसा देता येईल याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष कैलास चिंधे यांनी  मार्गदर्शन केले.   प्रास्तविक व सुत्रसंचालन अँड.रविंद्र हाळनोर यांनी केले.    यावेळी आण्णासाहेब शिंदे,साहेबराव भोसले,ज्ञानदेव जाटे,बापूसाहेब वडितके,बाळासाहेब वडितके,शांताराम चिंधे,बापूसाहेब तुपे,का.पोलिस पाटील चंद्रकांत ओहोळ,सोपान जाटे,विधी सेवा समितीचे संदिप शेरमाळे,शहाजी वडितके,अजित देठे,कैलास ऐनोर,डाॅ.सुनिल चिंधे,मनोहर चिंधे,संजय कुदनर,सुधाकर पिलगर,विधी सेवा समितीचे करंदिकर साहेब,ग्रामसेवक राजू ओहोळ,बाळासाहेब भोसले,राहूल चिंधे आदी उपस्थित होते.आभार सिध्देश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी मांडले.



श्रीरामपूर (वार्ताहर)जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महाराष्ट्र प्रदेश सहसचिवपदी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांचा सत्कार शिर्डी व कोपरगाव येथील पत्रकारांनी श्रीरामपूर येथील पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात जाऊन केला, बुधवार दिनांक 20 10 2021 रोजी पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शेख बरकत आली यांचा  सत्कारार्थी बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेख बरकत अली हे होते अध्यक्ष स्थानाची सूचना

कासम शेख यांनी मांडली त्यास अनुमोदन नरेंद्र पाटील यांनी दिले या सत्काराच्या कार्यक्रमास पत्रकार विजय खरात ,रवींद्र जगताप, संदीप गोरे, अनिल गांगुर्डे ,राहुल कोकणे, एजाज भाई शेख, मोहम्मद अली सय्यद, राज मोहम्मद शेख, अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया चे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद ,पेपर मास्टर अकबर शेख, रियाज खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकार खरात, रवींद्र जगताप, नरेंद्र पाटील ,आदींनी शाल श्रीफळ बुके व हार देऊन बरकत अली यांचा सत्कार केला उपस्थितांसमोर शेख बरकत अली, रवींद्र जगताप, नरेंद्र पाटील, कासम भाई शेख, असलम बिन साद ,एजाज सय्यद आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी अध्यक्षीय भाषणात शेख बरकत आली यांनी सांगितले की राहता व शिर्डी येथील पत्रकारांनी मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या राज्य सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार केला असून विशेषता त्यांनी त्यांच्या परिसरातील गोरगरीब अन्याय पीडित व तळागाळातील लोकांच्या कामाची जबाबदारी आपल्यावर टाकली असून ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडून त्यांची विश्वास पुरती करू ज्या प्रमाणे आपण गेल्या 29 वर्षापासून पत्रकार संघाच्या माध्यमातून अन्याय पीडित जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करीत असून विशेषता पत्रकारांवर बातमी  छापल्या च्या रोष आत्मक भूमिकेतून ज्या ज्या ठिकाणी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत अगर त्यांच्यावर दावे दाखल झाले आहेत व पत्रकारांना मारहाण झाली आहे अशा ठिकाणी पत्रकार संघाचा ग्रुप त्यांच्या पाठीशी उभा राहून अशा संकटातून त्यांची सुटका करतो व त्यांना न्याय मिळवून देतो अशा पद्धतीने आपण मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून जनतेची कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पत्रकार रवींद्र जगताप यांनी आपल्या भाषणात सध्या ओबीसी, एसटी, एन टी व अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांची दुर्दशा झालेली असल्याचे सांगून या समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असल्याने अशा समाजातील पीडित जनतेकडे मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करून शेख यांनी न्याय निवाडा केल्यास त्यांच्यावरील अन्याय नक्कीच थांबतील असे ते म्हणाले या बैठकीस बेलापूर व श्रीरामपूर भागातील पत्रकार उपस्थित होते उपस्थितांचे आभार रामगड येथील पत्रकार राज मोहम्मद शेख यांनी मानले.
kopar


अहमदनगर  जिल्ह्यात मालमत्ता विषयक   गुन्ह्याकरिता कुप्रसिद्ध असलेल्या सुरेश निकम टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.  एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी  ऋतिक प्रेमचंद  छजलानी यांनी Cr. No. 254/ 2021 IPC 395,120( ब )नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध सुरेश निकम टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर.सुरेश निकम  सह टोळीतील अन्य 6 सदस्यांना अटक करण्यात आली होती. सुरेश निकम  टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मा. श्री मनोज पाटील( पोलीस अधिक्षक), मा. श्री. सौरभ अग्रवाल मा. श्री. अजित पाटील यांनी  सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dysp संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. सदर टोळीवर या पूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1)  सुरेश रणजीत निकम ( टोळी प्रमुख) 1) एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे  2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 3) एमआयडीसी पो. स्टे.l 868/20 IPC 399, 402,आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 4) एमआयडीसी पो. स्टे.l 210/15 IPC 394, 397,341प्रमाणे 5) एमआयडीसी पो. स्टे.l 112/15 IPC 394,395,427,34प्रमाणे  2) विकास बाळू हनवत ( टोळी सदस्य)1)  एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे 2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 

3) एमआयडीसी पो. स्टे.l 868/20 IPC 399, 402,आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 4)एमआयडीसी पो. स्टे.l 397/19 IPC 392, 341, 411 प्रमाणे 5)  सोनई पो.स्टे.l 131/21 IPC 394,34  प्रमाणे 6)सोनई पो.स्टे.l 311/20 IPC 392,341,411  प्रमाणे 3) करण शेलार ( टोळी सदस्य) 1))  एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे 2) एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे  3)सोनई पो.स्टे.l 131/21 IPC 394,34  प्रमाणे 4)एमआयडीसी पो. स्टे.l 868/20 IPC 399, 402,आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 4) रोहित शिंदे. ( टोळी सदस्य) 1)एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे 2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 5) सागर जाधव ( टोळी सदस्य) 1) एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे 2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 3)एमआयडीसी पो. स्टे.l 210/15 IPC 394, 397,341प्रमाणे 4)एमआयडीसी पो. स्टे.l 112/15 IPC 394,395,427,34प्रमाणे 6)  सतीश अरुण बर्डे ( टोळी सदस्य) 1) एमआयडीसी पो. स्टे.l 254/21 IPC 395, 120( ब) प्रमाणे 2)एमआयडीसी पो. स्टे.l 132/21 IPC 395,  आर्म ॲक्ट 4/25प्रमाणे 3)एमआयडीसी पो. स्टे.l 210/15 IPC 394, 397,341प्रमाणे 4)एमआयडीसी पो. स्टे.l 112/15 IPC 394,395,427,34 प्रमाणे 7) विधी संघर्ष बालक (टोळी सदस्य)

सदर गुन्ह्यात  एक विधी संघर्ष बालकाचा समावेश असून त्याचेवर एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.पुढील तपास मा. मनोज पाटील पोलिस अधीक्षक, अ.नगर, डॉ.सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक अ.नगर,मा. डॉ. दिपाली काळे  अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शन खाली  Dysp संदीप मिटके हे करीत आहेत.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget