February 2021


बेलापुर  (प्रतिनिधी  )- पुर्वीच्या सत्ताधार्यांनी चुकीच्या पध्दतीने कामे करुन गैरप्रकार केल्यामुळे जनतेने आपल्या हाती सत्ता दिली असुन आता आपली जबाबदारी वाढली आहे  सर्वांना बरोबर घेवुन आपल्याला विकास कामे करुन गावाची वेगळी ओळख निर्माण करावयाची आहे असे मत जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले  बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत आपल्या दारी या उपक्रमाचा शुभांरभ प्रभाग क्रमांक एक मधील मळहद येथुन करण्यात आला त्या वेळी नवले बोलत होते कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी रमेश वाबळे हे होते  जि प सदस्य शरद नवले पुढे म्हणाले की मिळालेल्या सत्तेचा उपयोग  रस्ते पाणी विज आरोग्य गटारी या व्यतीरीक्त अपंग निराधार विधवा परित्यक्त्या अशा गोर गरीबांची कामे आपल्याला करावयाची आहे सार्वजनिक कामा बरोबरच सर्व सामन्य नागरीकांच्या समस्या सोडवा लवकरच गावात एक कोटी रुपयाची विकास कामे  सुरु करण्यात येणार आहे असेही नवले म्हणाले सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की प्रभाग निहाय ग्रामपंचायत आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असुन आम्ही घरोघर जावुन नागरीकांच्या समस्या समजावुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करु  असे सरपंच साळवी म्हणाले उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती करण्यात येणार असुन प्रभाग निहाय स्पर्धा वृक्षारोपण निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा आदि उपक्रम राबविण्यात येतील या वेळी पत्रकार देविदास देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले या उपक्रमांतर्गत मळहद बोरुड गल्ली तकीया मोहल्ला केशवा गोविंदा गल्ली धनगर गल्ली कुंभार वेस येथील नागरीकांच्या घरोघर जावुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या केवळ समस्या जाणून त्यावर उपाय योजनाही केली जाणार असल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे  यांनी सांगितले  या वेळी प्रफुल्ल डावरे गोविंदराव खरमाळे तबसुम बागवान मुस्ताक शेख रमेश अमोलीक माधुरी ढवळे दिलीप दायमा रमेश वाबळे सजंय रासकर तसवर बागवान संजया गोरे मोहम्मंद शेख रमेश काळे अजिज शेख विशाल आंबेकर अमोल गाढेकिरण गागरे श्रीहरी बारहाते विक्रम नाईक रत्नेश गुलदगड हुसेन शेख अन्वर बागवान भरत जाधव निलेश वाबळे शरद म्हैस शफीक बागवान दादा कुताळ कासम बागवान श्रीकांत अमोलीक ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे सचिन वाघ सचिन नगरकर रविंद्र मेहेत्रे महेश कुर्हे  उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक साहेबराव वाबळे यांनी केले तर रामदास वाबळे यांनी आभार मानले.


बेलापुर ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाकडून  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरणाचे रक्षण व संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातही या अभियानाला सुरुवात झाली आहे. बेलापुर येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली  तालुक्यातील निपाणी वडगाव व बेलापूर या दोन गावांचा सदर अभियानात समावेश आहे, पैकी बेलापूरगाव हे नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे हे अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिली.

       गावांतील पर्यावरणाचा समतोल साधावा, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्या गावांची लोकसंख्या जास्त आहे, प्रदूषणाची शक्यता जास्त आहे, अशा गावांची निवड या अभियानात करण्यात येत आहे. श्रीरामपूर  तालुक्यातील बेलापूर गावामधून अभियानास प्रारंभ झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांनुसार पर्यावरण रक्षणाच्या हेतूने सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, प्लास्टिक , घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन , देशी वृक्षारोपन आदिंसह हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. राज्यात या अभियानाअंतर्गत पंचतत्त्वानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र शासनाकडून गौरव करण्यात येणार आहे. अशी माहितीही गटविकास अधिकारी आभाळे यांनी दिली. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून अंगणात एकतरी देशी झाड लावावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी आपल्या भाषणातून केले. सरपंच महेंद्र साळवी यांनीही पर्यावरण संवर्धनासंदर्भात आपले मत प्रकट केले.

      यावेळी पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. उपमुख्याध्यापिका श्रीमती विजया दहिवाळ यांनी शपथ वाचन केले. याप्रसंगी जिप सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,पंचायत समिती गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे,जलील जनाब, रमेश अमोलिक, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे पत्रकार सुहास शेलार, कासम शेख यांचेसह जिल्हा परिषद मराठी, उर्दू  मुला-मुलिंच्या शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

अहमदनगर-करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने वेगाने पावले उचलली आहेत. नागरिकांनीही नियमांचे पालन करावे. रात्रीची संचारबंदी आधीपासूनच आहे.मात्र करोना वाढत असल्याने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता आवश्यक बनली आहे. आवश्यकता पडली तर करोना प्रतिबंधासाठी निर्बंध अधिक कडक केले जातील, अशा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.करोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी व्हीडिओद्वारे नागरिकांना केले आहे. नागरिकांनी लग्न व इतर सोहळ्यांसाठी असणारी निर्बंधाची मर्यादा पाळावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी करोना प्रादूर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. बाजारपेठांसह इतर गर्दीच्या ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश डॉ. भोसले यांनी दिले आहेत.जिल्ह्यात सध्या रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर 12 टक्के आहे. त्यात आता वाढ होताना दिसते आहे. 29 जानेवारीचा आदेश 28 फेब्रुवारीपर्यंत होता. तोच आदेश 15 मार्चपर्यंत वाढविण्यात आला आहे. आवश्यकता पडली तर त्या आदेशात आणखी निर्बंध लादण्याचा विचार केला जाईल. मंदिरे सुरूच राहतील.मात्र शिर्डीप्रमाणे सर्व मंदिरात नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्यायचे आहे. कोणत्याही मंदिरात गर्दी होणार नाही, याची दक्षता संबंधित व्यवस्थापाने घ्यायची आहे. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करीत मास्क वापरावेत.जिल्हयात सध्या 5 हजार 500 बेड उपलब्ध आहेत. व्हॉन्टीलेटर, ऑक्सिजन सिलेंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. आयसीयू सज्ज आहेत. कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. सोमवारी नगरमधील मंगल कार्यालयांमध्ये जावून कारवाई केली आहे. आता या पुढे मंगल कार्यालयात गर्दी दिसली तर ते सील केले जातील. पुढील काही दिवस हे सील उघडले जाणार नाही. मास्क वापरलेले दिसले नाही तर नागरिकांवरही दंडात्मक कारवाई होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

नाशिक - नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ सोमवारी करोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मनपा वैद्यकिय विभागाकडुन भुजबळ फार्म येथील ६० जणांचे स्वॅब घेत ते चाचणीसाठी पाठविले होते..यापैकी पालकमंत्र्यांच्या स्टाफ पैकी 11 जण पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. या सर्वावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. दरम्यान शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी महापालिकेकडुन तातडीने 5 ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्याचे केंद्र सुरू करण्यात आले आहे.नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसापासुन करोना बाधीतांचा आकडा वाढत असतांना सोमवारी (दि.22) रोजी बाधीतांचा आकडा कमी झाल्याचे समोर आली आहे. मात्र शहरात समारंभ, कार्यक्रम, लग्न याठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता करोनाचा संसर्ग वाढण्याची भिती कायम आहे. यातच पालकमंत्री छनग भुजबळ यांनी रविवारी (दि.21) रोजी शहरात अनेक कार्यक्रम व बैठकांना हजेरी लावल्यानंतर ते करोना बाधीत झाले होते.भुजबळ यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर मनपाच्या वैद्यकिय पथकाने भुजबळ फार्मवर जाऊन भुजबळ यांचे कुटुंबिय, स्टॉफ, त्यांच्या संपर्कातील कार्यकर्ते, बदोबस्तांतील पोलीस अशा संपर्कातील 60 जणांची यादी तयार करीत त्यांचे स्वॅबचे नमुने घेतले. या सर्व नमुन्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला असुन यातील 11 जण करोना बाधीत असल्याचे समोर आले आहे.या बाधीत बहुतांशी जण हे पालकमंत्री यांच्या निवासस्थानावरील स्टाफ पैकी आहे. यात चालक, अंगरक्षक यांचा समावेश असुन त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु असुन उर्वरित 9 जणावर घरीच उपचार सुरु करण्यात आले आहे.


शिर्डी-राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे.बाबांची पहाटे होणारी काकड आरती तसेच रात्रीची शेजाआरतीस भाविकांना हजेरी लावता येणार नाही. दर गुरुवारी निघणारा पालखी सोहळा बंद करण्यात आला असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.अहमदनगर जिल्ह्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाल्याने साई संस्थानकडून खबरदारी म्हणून रात्रीची शेजारती आणि पहाटेची काकड आरतीसाठी भाविकांना बंदी घातली आहे. सदरील आरत्या नित्यनेमाने मोजक्याच पुजार्‍यांच्या उपस्थितीत होणार आहे.त्याचप्रमाणे लॉकडाऊनंतर तीन आठवड्यापुर्वी सुरू करण्यात आलेली साईबाबांची पालखी सोहळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बायोमेट्रिक दर्शन व्यवस्था गुरुवारी, शनिवार, रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी आगाऊ बुकिंग करूनच दर्शनाला यावे, असेे आवाहन साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले आहे.


आज दि.  23/02/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत  वांबोरी येथील कुसमुडे वस्ती जवळ काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने  त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकला असता  आरोपी क्र 1)  संतोष नवनाथ कुसमुडे वय 34 वर्ष रा. कुसमुडे वस्ती वांबोरी ता. राहुरी 2) राहुल सतीश नन्नवरे वय 21 वर्षे रा.राहुरी वेस वांबोरी ता. राहुरी 3)  शंकर सुखदेव कात्रज वय 38 वर्षे रा. गडाख वस्ती वांबोरी ता. राहुरी 4) किरण राजेंद्र कुसमुडे रा. राहुरी वेस वांबोरी ता. राहुरी यांचेसह 1,03,200/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य  दोन आरोपी फरार असून सर्व  आरोपी विरुध्द    राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 177/2021 मुंबई जुगार कायदा कलम 12( अ)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,Dy.s.p  संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदींनी केली.

आज दि.  22/02/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत हरेगाव ते उंदिरगाव जाणारे रोडवर एका टपरी चे आडोशाला  काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत  अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने  त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकला असता  आरोपी क्र 1) सचिन लक्ष्मण गायकवाड वय 39 रा उंदीर गाव तालुका श्रीरामपूर 2)दीपक मेघन भोसले वय 45 रा.डी. क्वार्टर ता श्रीरामपूर 3) मयूर सर्जेराव पगारे वय 24 रा उंदीर गाव तालुका श्रीरामपूर यांचेसह 69,240  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य चार आरोपी फरार असून सर्व  आरोपी विरुध्द   श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 31/21 मुंबई जुगार कायदा कलम 12( अ)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,Dy.s.p  संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल भोईटे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदींनी केली.

श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा पुणे शहर यांनी राज्यातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ बनवा स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातून पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल बेलापूर उर्दू शाळेतील उपक्रमशील शिक्षिका, श्रीरामपूर तालुका महिला आघाडीच्या संघटक, तालुका संघाचे अध्यक्ष शकील बागवान यांच्या सौभाग्यवती सौ.महेजबीन शकील बागवान यांचा तसेच डाएट मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत श्री शकील बागवान सर यांचा पाचवा क्रमांक आल्याबद्दल श्रीरामपूर तालुका व शहर शिक्षक संघ, श्रीरामपूर तालुका व शहर गुरुमाऊली मंडळ, श्रीरामपूर तालुका व शहर गुरुमाऊली महिला आघाडी तसेच अहमदनगर जिल्हा उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने छोटेखानी दिमाखदार सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष सरदार पटेल, ज्येष्ठ सल्लागार अर्जुन बडोगे, शहर संघाचे अध्यक्ष राजू गायकवाड, फारुक पटेल,  शाम पटारे, सिताराम भांगरे, वाघोजी पटारे,बाबासाहेब डोखळे,जलील शेख, अनिस शेख, परविन बाजी, शाहीन बाजी, हुसेनाबानो पटेल, यास्मिन शेख, मेहरुन्निसा बाजी,नाझिया शेख, नसीबा बागवान आदि उपस्थित होते .

 प्रमुख भाषणात सलीमखान पठाण यांनी शकील बागवान व सौ बागवान  या शिक्षक जोडीने शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये हे पती-पत्नी सदैव सक्रिय असून आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन देण्याची त्यांची धडपड सतत सुरू असते असे गौरवोद्गार त्यांनी काढले .बाळासाहेब सरोदे, सरदार पटेल, अर्जुन बडोगे यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. शेवटी सौ महेजबीन बागवान यांनी सर्वांचे आभार मानले .

राहुरी - दि. २१ फेब्रुवारी २०२१- आरोग्य मंत्र्यांना समक्ष भेटून देवळाली प्रवरा च्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावू असे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. 

     देवळाली प्रवरा येथे खास बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळणे कामी तुकडेबंदी  समितीचे अध्यक्ष तथा  आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, उपाध्यक्ष तथा डॉ केमिस्ट चे चेअरमन डॉ. विलास पाटील, कोशाध्यक्ष्य तथा राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, सचिव तथा योग प्रशिक्षक किशोर थोरात, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब खांदे, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर शिवसेना पक्षाचे अध्यक्ष सुनीलभाऊ कराळे आदींची स्वाक्षरी असलेले निवेदन तुकडेबंदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राहुरी येथे भेट घेऊन निवेदन दिले असता मंत्री तनपुरे बोलत होते. 

      समितीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,  देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर हे गाव क वर्ग नगरपालिका क्षेत्र असून सण २०११ च्या जनगणने नुसार या गावची लोकसंख्या ३०९९७ इतकी आहे. तसेच या गावाच्या महसूल मंडलास लगतची ४२ गावे जोडली गेली आहेत. व या सर्व गावांचा देवळाली प्रवरा गावासी विविध कारणास्तव सततचा संपर्क येतो. 

     देवळाली प्रवरा व त्याच्या महसूल मंडलातील गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत  आहे. असे असताना देवळाली प्रवरा गावच्या जवळपास २० कि.मी.  परिघामध्ये अतिदक्षता विभागासारखी अद्यावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. 

      सध्या देवळाली प्रवरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु त्यामध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व अपुऱ्या वैद्यकीय सुविधेमुळे येथील नागरिकांना वैद्यकीय सुविधेसाठी सर्वस्वी शेजारच्या शहरांवर अवलंबून राहावे लागते. व ते येथील सर्वसामान्य जनतेला परवडत नाही. म्हणून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणे अत्यंत गरजेचे आहे.

       तरी आपणास विनंती की, मौजे देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर येथे खास बाब म्हणून अद्यावत सुविधांनी युक्त असे ग्रामीण रुग्णालय मंजूर होणे कामी आरोग्य मंत्रालयास योग्य ती शिफारस देऊन सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.  

       या निवेदनावर बोलताना मंत्री तनपुरे पुढे म्हणाले की, राहुरी येथील रुग्णालयाच्या जागेचा व देवळाली प्रवरा येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांची समक्ष भेट घेऊ व खास बाब म्हणून देवळाली प्रवरा येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळवून देऊ.


भोकर- शेतकर्‍यांची विज बंद करू नका, थकित बिल भरण्यास दोन महिन्याची मुदत द्या, शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावू नका,व्यावसायीक व घरगुती विज ग्राहकांना इतर आकार बंद करून ग्राहकांची लुट थांबवा, रोहित्रांची दुरुस्ती करा आदी मागण्यांसाठी काल भोकर येथे क्षत्रीय बेलदार सभेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे व भोकरचे पसरपंच महेश पटारे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एकतास शेतकरी व विज ग्राहकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सध्या अनेक ठिकाणी रब्बीची पिक शेवटच्या पाण्यावर आहेत, अशा परीस्थीतीत शेतकर्‍यांचा विज पुरवठा खंडीत केल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. याच शेतकर्‍यांना थकित विज बिल भरण्यास मुदत दिल्यास शेतकर्‍यांचे नुकसान टळून आपली वसुली होईल.शेतात अनेक ठिकाणी विजवाहक तारा हाताच्या अंतरावर आल्या आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवितास धोका होवू शकतो, त्यामुळे त्वरीत अशा धोकादायक विजवाहक ओढून घ्या व अनेक रोहित्रांवरील लग्झ व फ्युज खराब आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करा.घरगुती, व्यापारी व व्यावसायिक विज ग्राहकांच्या मासिक बिलात इंधन आकार, स्थीर आकार आदी प्रकारचे आकाराची आकारणी करून या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुट सुरु आहे, ती थांबवा अन्यथा यापेक्षा तिव्र अंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी अंदोलकांनी दिला. यावेळी क्षत्रीय बेलदार समाज सभेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे, भोकरचे उपसरपंच महेश पटारे, युवा कार्यकर्ते दिपक पटारे व प्रताप पटारे यांची भाषणे झाली.सुमारे तासभर चाललेल्या या रस्ता रोको आंदोलकांच्या विविध मागण्याचे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित कांबळे यांनी स्विकारत आपल्या सर्व मागण्या रास्त आहेत. वरिष्ठांशी चर्चा करून सर्व मागण्या पुर्ण करू, सध्या कुठलेच रोहित्र बंद केले जाणार नाही. सध्या बंद असलेले रोहित्र सुरु करून देत आहोत.परंतू विज बिल वसुली शिवाय पर्याय नसल्याने विज बील वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत उर्वरीत मागण्यांबाबत तातडीने कारवाई करून चांगली सेवा देवू, असे आश्वासन यावेळी श्री. कांबळे यांनी आंदोलकांना दिले. त्यांचे समवेत महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रल्हाद टाक, लाईनमन कैलास घोळवे, गजेंद्र कासार आदिंसह कर्मचारी उपस्थीत होते. या रास्ता रोको दरम्यान श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतुक खोळंबली होती.यावेळी अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष सागर शिंदे, राहुल अभंग, सतिष शेळके, रामदास शिंदे, भागवतराव पटारे, राजेंद्र चौधरी, राजेंद्र विधाटे, ज्ञानदेव चव्हाण, सुनिल विधाटे, नानासाहेब जगदाळे, भानुदास बेरड, रविंद्र मते, रमेश साठे, लहानु मते, आप्पासाहेब लोखंडे, रविंद्र आबुज, बजरंग पटारे, मुसा पठाण व राजेंद्र म्हसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व विज ग्राहक उपस्थीत होते.श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मसुद खान, पो. उप निरीक्षक अतुल बोरसे, पो. ना. आबा गोरे, पो. हे. कॉ. सतिष गोरे, रविंद्र पवार, आयुब शेख, पो. काँ. योगेश राऊत आदिंसह मोठा फौजफाटा उपस्थीत होता.


श्रीरामपूर - करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्रीरामपुरात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कालपासून दंडात्मक कारवाई सुरू केली.मास्कचे महत्त्व पटवून सांगत प्रबोधनासाठी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासनाचे कर्मचारी रस्त्यावर उतरले होते.संपूर्ण महाराष्ट्रातच आता करोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हाभर मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार काल प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस, पालिका प्रशासन यांनी श्रीरामपुरात नेवासा रोड, मेनरोड, शिवाजी रोड, संगमनेर रोडवर रस्त्याने फिरून लोकांना मास्क वापरण्याबाबत जनजागृती केली.सर्व अधिकारी रस्त्याने पायी चालत जात होते. एस. टी. बसस्थानकावर जाऊन एसटीतील प्रवाशांना मास्क वापरण्याबाबत यावेळी त्यांनी आग्रह केला. याशिवाय एस. टी. कंट्रोलर यांना तशाप्रकारे प्रवाशांना आवाहन करण्यास सांगितले. तसेच विनामास्कच्या कोणत्याही प्रवाशास एसटी बसमध्ये बसू देऊ नये, अशा सूचना त्यांनी वाहक व चालकांना दिल्या. याशिवाय रस्त्याने विनामास्क जाणार्‍या वाहन चालकांवरही यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली.शहरातील जे दुकानदार मास्क न लावता दुकानात बसलेले दिसले त्यांनाही 100 रुपयेप्रमाणे दंड आकारण्यात येऊन पुन्हा विनामास्कचे आढळल्यास यापेक्षाही मोठी दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे व्यापारी तसेच मास्क न लावणार्‍या वाहन चालकांची धांदल उडाली. करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून प्रत्येकाने मास्क वापरावे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, डिवायएसपी संदीप मिटके, पो.नि सानप, मुख्याधिकारी गणेश शिंदे आदींनी केले.

नाशिक - शहरात आठवडाभरात झालेले 5 खून तसेच रोज होणार्‍या घटनांमुळे कायदा सुव्यवस्था मोडीत निघाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवजयंती उरकताच पोलीस आयुक्त दीपक पाण्डे्य यांच्या आदेशानुसार पोलीस पथकांनी शहरातील गुन्हेगारांची धरपकड सुरू केली असून त्यांच्या घराची झाडाझडती घेत घातक शस्त्र बाळगणार्‍या 6 संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घातक शस्त्रसाठा जप्त केला असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.अकबर उर्फ भुर्‍या शेख (रा. खडकाळी, जुने नाशिक), किशोर बाबुराव वाकोडे, निखिल उर्फ निक्कु बेग (दोन्ही रा. कथडा), प्रवीण रामदास कुमावत (रा. पोटिंदे चाळ, मखमलाबाद रोड), मदन मारुती पवार (रा.नवनाथनगर, पेठरोड), ऋषिकेश अशोक निकम (रा. आंबेडकरनगर, मालधक्का रोड) अशी पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे असून या संशयितांना विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुरूवारी पोलीस अधिकार्‍यांसोबत बैठक घेत कारवाईचे आदेश दिले होते.शहरातील 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार, तडीपार गुन्हेगारांसह विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या गुन्हेगारांचे ठावठिकाणे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.पंचवटी, भद्रकाली, उपनगर, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी गोपनीय माहिती घेत पंधरा ठिकाणी छापेमारीचे सत्र राबविण्यात आले. बेकायदेशीरपणे स्वत:जवळ शस्त्रे बाळगणार्‍या संशयितांची माहिती संकलित केली.ही माहिती मिळताच पोलीस आयुक्त पाण्डे्य यांनी त्या संशयितांच्या घरांची झाडाझडती घेण्याचे वॉरंट देत जादा मनुष्यबळही पुरविले. त्यानुसार सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांनी घरझडती घेत एकाचवेळी पंधरा ठिकाणी छापे टाकले.यावेळी सहा संशशितांना जेरबंद करून पैकी पाच संशयितांकडून 1 गावठी कट्टा, 2 जीवंत काडतुसे, 4 कोयते, 2 तलवारी, 1 चाकू, चॉपरसारखे हत्यारे पोलिसांनी जप्त केली. संशयितांविरुध्द शस्त्रबंदी कायदा, विना परवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमध्ये 17 पोलीस निरिक्षक, 38 उपनिरिक्षक, 206 अंमलदार आणि 35 महिला पोलीस सहभागी झाले होते.

राहुरी( प्रतिनिधी मिनाष पटेकर )-नासिक विभागाचे पोलिस महानिरिक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी राहुरी पोलिस ठाणेच्या कामकाजाचा आढावा घेत तालुक्यातील गुन्हेगारी व पोलिसांच्या अडीअडचणी व कायदा व सुवेवस्थे बाबत माहिती घेतली व सुचना केल्या.

यावेळी राहुरी पोलिस ठाणेत पोलिस महानिरिक्षक डाॅ.प्रताप दिघावकर येताच त्यांचे अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे व पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांनी गुलाब पुष्प देवुन स्वागत करत मानवंदना देण्यात आली.

यावेळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांचा पोलिस उपधिक्षक संदिप मिटके यांनी सन्मान केला.

पोलिस महानिरिक्षक दर्ज्याचे अधिकारी राहुरी पोलिस ठाणेत भेट देण्याची हि पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

त्यांनी राहुरी पोलिस वसाहातीत जावुन पडझड झालेल्या घराची पाहणी करत सुचना केल्या तसेच गुन्हात जप्त असलेली व बेवारस पडुन असलेल्या वाहानांची विल्लेवाट लावण्याच्या सुचना केल्या अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे,पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांना सुचना केल्या तसेच पोलिस ठाणे बाहेर विजय सप्तपदी अभियनाच्या लावलेल्या फलकाचे पाहणी केली व कौतुक करत महसुला प्रशासनास सहकार्य करण्याच्या पोलिस विमागास सुचना दिल्या. तसेच देवळाली प्रवरा येथिल नविन पोलिस ठाणे बाबत अंतराष्ट्रिय खेळाडु आप्पासाहेब ढुस व राष्ट्रिय जल पुरस्कार प्राप्त असलेले शिवाजी घाडगे यांनी डाॅ दिघावरकर,पोलिस अधिक्षक यांच्याशी चर्चा केली.



 

शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी हे जागतिक तिर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी जगभरातून येणार्‍या भाविकांना जवळपासच्या पर्यटनस्थळाची माहिती 

तसेच मार्गदर्शन मिळावे या मूळ हेतूने अद्ययावत वातानुकूलित साईतिर्थ पर्यटन पोलीस मदत केंद्र उभारणी करण्यात आली असल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली असून यामुळे साईमंदिर परिसरात आता पॉलिसी, साईयंत्र विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

मंगळवार दि. 16 रोजी दुपारी साईमंदिर प्रवेशद्वार क्रमांक चारसमोर शिर्डी नगरपंचायतच्या जागेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून साईतिर्थ पर्यटन पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. या कक्षाचे उद्घाटन डिजिटल पद्धतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी कोपरगाव विधानसभेचे आ. आशुतोष काळे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, नगरसेवक सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे राकेश कोते, शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, शिर्डी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. न्याहाळदे, साईमंदीर सुरक्षा यंत्रणेचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक श्री. दातरे आदी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान शिर्डी शहरात वर्षाकाठी सुमारे दोन कोटींपेक्षा भाविक साईदरबारी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. एखादी घटना घडल्यानंतर भाविकांना तात्काळ पोलिसांची मदत उपलब्ध होईल या मूळ उद्देशाने या पोलीस मदत कक्षाची निर्मिती केली आहे. यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च आला असल्याचे समजते.

याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सातव यांनी सांगितले की, साईमंदिर परिसरात भाविकांना पॉलिसी करणारे तसेच साईयंत्र विक्रेते मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी सदरची पोलीस कक्षाची मदत मिळणार आहे. या पोलीस मदत केंद्रात प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.

बहुभाषिक भाविकांबरोबर संवाद साधण्यासाठी बहुभाषिक पोलीस मित्रांची मदत घेतली जाणार आहे. एकंदरितच या अद्ययावत पोलीस कक्षामुळे भाविकांना सुरक्षा मिळणार असून लुटमार करणार्‍यांंवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

राहुरी प्रतिनिधी मिनाष पटेकर-दिनांक १६ फेब्रुवारी रोजी राहुरी कृषी मंडळ अधिनस्त मौजे आरडगाव व पाथरे खुर्द येथे जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील शास्रज्ञ डॉ अनिल दुरगुडे उपस्थित होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की आजच्या परिस्थितीत जमीनीच्या आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. मातीपरिक्षण करून खतांचा संतुलित वापर करणे गरजेचे आहे. यावेळी भरमसाठ खतांचा वापर केल्याने होणारे नुकसान यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व शेतकरी बांधवांच्या शंकांचे निरसन केले. मातीपरिक्षण करण्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन व मदत केली जाईल असे तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी सांगितले.

कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी मंडळ  कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, सहाय्यक  कृषी अधिकारी बाळासाहेब सूळ,आकाश गोरे,बिरू केसकर, शिवप्रसाद कोहोकडे, कैलास मकासरे, मंगेश बनकर व भिमराज गडधे यांनी विशेष परिश्रम घेतले. मौजे आरडगाव येथे सुनील मोरे, बाबासाहेब जाधव, ज्ञानेश्वर काळे, कुशाबापू ढेरे, मच्छिंद्र भुसारे,अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब म्हसे, योगेश वाघ,संजय म्हसे, चिमाजी डोईफोडे व सूर्यभान म्हसे तसेच पाथरे खुर्द येथे गिताराम घारकर,रखमाजी जाधव, नारायण टेकाळे,बाळासाहेब जाधव,शिवाजी टेकाळे, हरिभाऊ जाधव,वामन पवार, नानासाहेब पवार, दीपक जाधव, विजय जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.



श्रीरामपूर -श्रीरामपुर तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रीया पार पडली असून खर्च सादर करण्याची मुदत संपूनही अद्यापपर्यंत ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नाही, अशा उमेदवारांनी खर्च सादर करावा अन्यथा असे उमेदवार मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार निर्रह ठरविण्यात पात्र राहतील, असा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे.श्रीरामपूर तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रीया पार पडली. ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे विवरण एक महिन्याच्या आत दाखल करणे आवश्यक होते. त्यांनी एकत्रित खर्चाचे विवरणपत्र मुदतीत दि. 17 फेब्रुवारी 2021 पुर्वी सादर करणे आवश्यक होते.मुदत संपूनही निवडणूक खर्चाचे विवरण सादर न करणार्‍या उमेदवारांनी केलेल्या कालमर्यादेत निवडणूक खर्चाची विवरणे सादर करण्यात कसुर करतील, त्यांना पाच वर्षाच्या कालावधीसाठी निर्रह ठरविण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला प्रदान करण्यात आलेला आहे.तरी अद्यापपर्यंत ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नाही, अशा उमेदवारांनी खर्च सादर करावा अन्यथा असे उमेदवार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 1 4-ब(1) अन्वये निर्रह ठरविण्यात पात्र राहतील, असा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे.

नगराध्यक्षा आदिकांकडे नगरसेवक अंजुम शेख यांची मागणी.
श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार पाहता रेल्वे रुळाच्या पलिकडील भागात हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानची गरज असूनमिल्लतनगरजवळ याबाबत विकास योजनेत आरक्षण मंजूर आहे. सदर हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानच्या जागा संपादनाची प्रक्रिया श्रीरामपूर नगरपालिकेने तातडीने सुरू करावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक अंजुम शेख यांनी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.अंजुम शेख यांनी नगराध्यक्षा आदिकांना हे निवेदन दिले. त्याप्रसंगी नगरसेवक ताराचंद रणदिवे, राजेंद्र पवार, रज्जाकभाई पठाण, अस्लमभाई सय्यद, एस. के. खान आदी उपस्थित होते.श्रीरामपूर शहरातील रेल्वेलाईनच्या उत्तरेकडील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती झालेल्या आहेत. नागरिकांच्यादृष्टीने मुलभूत सुविधा या वसाहतींच्या जवळच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध व्हाव्यात म्हणून नगरपरिषदेने विकास योजना मंजूर केलेल्या असून विषयांकीत आरक्षणे ठेवलेली आहेत. सदर स्मशानभूमीसाठी आरक्षण क्र. 40 हे 0.72 हेक्टरवर तर मुस्लिम कब्रस्तानसाठी आरक्षण क्र. 41 हे 0.68 हेक्टरवर असून त्याचा सिटी सर्व्हे नंबर 2176 आहे. सदर क्षेत्र हे मिल्लतनगर येथील साठवण तलावाच्या शेजारी आहे.कॉलेज रोडला जी मुस्लिम समाजासाठी दफनभूमी आहे. वाढती लोकसंख्या पाहता नवीन दफनभूमीची निश्चित गरज आहे. त्याचप्रमाणे हिंदू स्मशानभूमीचे शहरातील अंतर पाहता याच भागात नवीन स्मशानभूमीची गरज आहे. शिवाय या दोन्हीही विषयांसाठी जागेचे आरक्षण मंजूर असल्याने तातडीने पालिकेने जर या दोन्ही कामांसाठी जागा संपादनाची प्रक्रिया सुरू केल्यास नागरिकांच्यादृष्टीने हे मोठे काम होणार आहे.कारण भविष्यात जर जागांचे भाव वाढले तर जागेच्याही किंमती वाढतील आणि नगरपालिकेला या जागा अधिग्रहीत करणे कदाचित खर्चिकही होईल. त्यापेक्षा तातडीने सदर दोन्ही कामांसाठी पालिकेने अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केल्यास आणि सर्वसाधारण सभेत यावर निर्णय घेतल्यास पुढील दोन-पाच वर्षात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन नागरिकांसाठी ही गरजेची सुविधा होईल म्हणून आपण लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी या पत्रकात अंजुम शेख यांनी केली आहे. याबाबत नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अंजुम शेख यांनी सांगितले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-शहरातील प्रवरा डाव्या कालव्यातून एका तरुणाचा मृतदेह वाहून जात असताना नागरिकांनी पाहिले असता

त्याचा मृतदेह पोलिसांच्या मदतीने वॉर्ड नं. 7 मधील अक्षय कॉर्नरच्या परिसरात अडवून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काल सकाळच्या दरम्यान एका तरुणाचा मृतदेह पाटातून वाहून जात असताना नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलीस तात्काळ कॅनालच्या कडेला पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह अक्षय कार्नर परिसरात कालव्यातून बाहेर काढला.
त्यावेळी त्याचे खिसे तपासले असता त्याच्या खिशात मतदान ओळखपत्र आढळून आले. त्यानुसार हा तरुणाचे नाव जुनेद झाकिर पटेल (वय 30, रा. मिल्लतनगर) असे असल्याचे पोलिसांनी कळाले. काल सकाळी अक्षय कार्नर परिसरात काही नागरिकांनी कालव्यातील पाण्यात एक मृतदेह वाहत येताना पहाताच हा मृतदेह पहाण्यासाठी गर्दी केली होती. मयत तरुणाच्या खिश्यात मतदान कार्ड, मोबाईलसह काही पैसे मिळाल्याचे आढळून आल्याचे समजते.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दुपारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जुनेद यांच्या मागे आईवडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-राजकीय दृष्ट्या महत्वाची समजल्या जाणार्या बेलापुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी महेंद्र जगन्नाथ साळवी यांची बिनविरोध तर अभिषेक खंडागळे हे अकरा विरुध्द सहा मतानी विजयी घोषीत  करण्यात आली साळवी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गोसावी यांनी सरपंच पदी साळवी व उपसरपंच पदी खंडागळे   यांच्या नावाची घोषणा केली           

राजकीय महत्वाची समजल्या जाणार्या बेलापुर ग्रामपंचायत १७ जागेकरीता झालेल्या निवडणूकीत गावकरी मंडळाला ११ तर जनता विकासा अघाडीला सहाच जागा मिळाल्या होत्या सरपंच निवडीत काही गडबड होणार नाही याची गावकरी मंडळाने पुरेपुर खबरदारी घेवुन सर्व सदस्यांना सहलीला पाठविले होते त्या नंतर भास्करराव खंडागळे यांच्या निवासस्थानी  पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक झाली गावकरी मंडळाचे श्रेष्ठी जि प सदस्य शरद नवले भाजपाचे  सुनिल मुथा भास्करराव खंडागळे भाजपा ओबीसी प्रांत उपाध्यक्ष प्रकाश चित्ते आर पी आय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात उपसभापती बाळासाहेब तोरणे रणजीत श्रीगोड लोकसेवा विकास अघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश भाकरे  प्रकाश पा नाईक जालींदर कुर्हे रावसाहेब अमोलीक हाजी ईस्माईल शेख साहेबराव वाबळे आदिंनी चर्चा करुन राखीव जागेकरीता निवडून आलेल्या महेंद्र साळवी रमेश अमोलीक स्वाती अमोलीक मीना साळवी या चारही जणांना पंधरा महीने सरपंच पद देण्याचे सर्वानुमते ठरले त्या नुसार महेंद्र साळवी यांनी सरपंच पदाकरीता अर्ज दाखल केला सरपंच पदाकरीता एकच अर्ज आल्याने त्याना  सरपंच      म्हणून बिनविरोध घोषीत करण्यात आले उपसरपंच पदाकरीता अभिषेक खंडागळे व खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड याचे अर्ज दाखल झाल्याने निवडूक घेण्यात आली त्यात अभिषेक खंडागळे यांना अकरा मते मिळाली खटोड यांना सहा मते मिळाली   गावकरी मंडळाने बोलविलेल्या बैठकीस प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे अकबर टिन मेकरवाले विशाल आंबेकर भास्कर बंगाळ मोहसीन सय्यद सुधाकर खंडागळे संजय गोरे सुभाष अमोलीक बाळासाहेब दाणी अनवर सय्यद अजीज शेख नवाब सय्यद बबलु कुर्हे जिना शेख जाकीर शेख उमर शेख सुभाष अमोलीक सुरेश अमोलीक सचिन वाघ शशीकांत तेलोरे  सागर ढवळे रत्नेश गुलदागड रमेश काळे यादव  काळे हेमत मुथा  आदी  उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाबासाहेब गोसावी यांनी काम पाहीले त्यांना ग्रामसेवक राजेश तगरे व कामगार तलाठी कैलास खाडे यांनी सहाकार्य केले  या वेळी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके पोपट भोईटे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.

राहुरी |प्रतिनिधी-राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना दि.1 फेब्रुवारी रोजी घडली असून.

याबाबत राहुरी पोलिसांत अज्ञात इसमा विरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीचे राहुरी फॅक्टरीहून रिक्षातून अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ही घटना घडल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. अपहरण झालेल्या मुलीचे वय 17 वर्षे 5 महिने असून ती गुंजाळे येथे आपल्या कुटुंबाबरोबर राहते. दि. 1 फेब्रुवारी रोजी रात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजे दरम्यान अज्ञात इसमाने त्या मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले.

मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुध्द भादंवि. कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुशांत दिवटे करीत आहेत.

१ फेब्रुवारी २०२१ - श्रीरामपूर | शिर्डीत पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा हा लोकशाहीला काळिमा फासणारा असून, पत्रकारांच्या न्याय्य हक्कावर गदा आणणारा आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या पत्रकारांवर दाखल झालेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अन्यथा; राज्यभर तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना निवेदन देण्यात आले. 

            ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे हे मनमानी भूमिका घेत आहेत.  दोन महिन्यापूर्वी साईबाबा मंदिर परिसरात एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या दोन प्रतिनिधींसह कॅमेरामन वर शासकीय कामात अडथळा आणणे, साथरोग नियमांचे उल्लंघनकेल्याचा ठपका ठेऊन  शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. या प्रकारामुळे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थानाच्या अधिकाऱ्यांनी २ महिन्यानंतर गुन्हा दाखल केल्याने यामागे सुडाची भावना असल्याचा आरोप पत्रकार संघटनेने केला आहे. यावेळी  जयेश सावंत, दत्तात्रय खेमनर, अस्लम बिनसाद, स्वप्नील सोनार, अभिषेक सोनवणे, विठ्ठल गोराणे, 

राजेश बोरुडे, निलेश भालेराव, सुहास शेलार, सचिन उघडे, प्रभात शिंदे, वृषीकेश पोळ, अजहर शेख, अल्फाज जुनानी, कैफ मेमन, अफान कुरेशी, आकिब शेख, मोईज पठाण, सोहेल पठाण आदी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget