राहुरी प्रतिनिधी मिनाष पटेकर-दिनांक १६ फेब्रुवारी रोजी राहुरी कृषी मंडळ अधिनस्त मौजे आरडगाव व पाथरे खुर्द येथे जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील शास्रज्ञ डॉ अनिल दुरगुडे उपस्थित होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की आजच्या परिस्थितीत जमीनीच्या आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. मातीपरिक्षण करून खतांचा संतुलित वापर करणे गरजेचे आहे. यावेळी भरमसाठ खतांचा वापर केल्याने होणारे नुकसान यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व शेतकरी बांधवांच्या शंकांचे निरसन केले. मातीपरिक्षण करण्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन व मदत केली जाईल असे तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी सांगितले.
कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, सहाय्यक कृषी अधिकारी बाळासाहेब सूळ,आकाश गोरे,बिरू केसकर, शिवप्रसाद कोहोकडे, कैलास मकासरे, मंगेश बनकर व भिमराज गडधे यांनी विशेष परिश्रम घेतले. मौजे आरडगाव येथे सुनील मोरे, बाबासाहेब जाधव, ज्ञानेश्वर काळे, कुशाबापू ढेरे, मच्छिंद्र भुसारे,अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब म्हसे, योगेश वाघ,संजय म्हसे, चिमाजी डोईफोडे व सूर्यभान म्हसे तसेच पाथरे खुर्द येथे गिताराम घारकर,रखमाजी जाधव, नारायण टेकाळे,बाळासाहेब जाधव,शिवाजी टेकाळे, हरिभाऊ जाधव,वामन पवार, नानासाहेब पवार, दीपक जाधव, विजय जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment