October 2022

श्रीरामपूर-शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा विडा उचलून,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या कारवाई होत असतांना. एकजण घातपाटाच्या उद्देशाने, गावठी कट्टा व जिवंत बाळगत असल्या संदर्भात. पोलीस निरीक्षक गवळी यांना गोपीनिय माहिती मिळताच, त्यांनी शहर गुन्हे तपास पथकाचे सपोनि जिवन बोरसे यांना कारवाईचे आदेश दिले. रात्री १० वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे, आपल्या जीवाची पर्वा न करता. सपोनि बोरसे हे काही सहका-यांना सोबत घेऊन. छत्रपती शिवाजी चौकापासून काही अंतरावर, सापळा लावुन बसलेले असतांना. त्यावेळी २ इसम विनानंबर पांढऱ्या रंगाच्या एक्टीवावर, टिळकनगर हुन श्रीरामपूरच्या दिशेने येतांना पाहून. पोलिसांनी मोठ्या शिताफीने, गौरव संजय रहाटे, वय वर्ष २२, राहणार दत्तनगर, व रुपेश किरण जाधव, वय वर्ष १८,राहणार कामगार हॉस्पिटल, वॉर्ड नं. ६, या दोघांना  एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह,

१ लाख १ हजारांच्या मुद्देमालासह रंगेहाथ पकडून. आरोपीं विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून. आरोपींनी गावठी कट्टा कोठून आणि कोणत्या उद्देशाने आणला या बाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदरची कारवाई सपोनि जिवन बोरसे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस शिपाई गौतम लगड, राहुल नरवडे,रमिझराजा अत्तार,गणेश गावडे,गौरव दुर्गुळे,मच्छिद्र कातखडे, भारत तमनर आदींनी यशस्वीरीत्या पारपडली असून. आरोपींना न्यायालयात हजर केले असता. अधिक तपासा करिता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आल्याची माहिती, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जगातील सर्व देश हे भारताकडे कुतुहलाने व उत्सुकतेने पहात असुन येणारा काळ हा भारत मातेच्या उत्कर्षाचा भरभराटीचा व वैभव संपन्नतेचा असणार आहे जागतीक पातळीवर आपल्या देशाला विशेष महत्व प्राप्त होणार असल्याचा विश्वास राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेवगीरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांनी व्यक्त केला                                              बेलापुर येथील जुने बालाजी मंदीर येथे आयोजित अन्नकुट उत्सवात भावीकांना उपदेश करताना महंत गोविंद देवगीरीजी महाराज पुढे म्हणाले की या देशात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोवींदाने राहतात  या देशात वेगवेगळे उत्सव सण उपासणा केल्या जात असल्यामुळे देशाची शोभा दिवसेंदिवस वाढत आहे  जगातील एकमेव भारत देश असा देश आहे की तेथे विविध भाषा वेगवेगळ्या परंपरा रितीरीवाज चालीरीती असुनही या देशात ऐकोपा आहे सुख समृद्धी आहे याचे कारण आपल्या सर्वांची एकच भावना आहे की आपण सारे भारत मातेची लेकुरे आहोत आपल्या देशाची एक व्यक्ती इंग्लंडचा पंतप्रधान होवु शकते ही अभिमानाची गोष्ट आहे बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आपली खरेदी गावातच करा ही सुंदर संकल्पना गावकऱ्यांनी राबविली आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा देशाचा विकास करावयाचा असेल तर आपल्या वस्तु गावातच खरेदी करा देशी वस्तुंचाच वापर करा आपली मुले शहराकडे आकर्षित होत आहे नोकरीच्या मागे पळताना गाव गावातील माणसांना विसरत चालले आहे हे कुठेतरी थांबले पाहीजे त्याकरीता उच्च शिक्षणाची सुविधा गावातच मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत जगातील सर्व मुस्लीम राष्ट्रांची परिषद इंडोनेशियात होत आहे  काळानुरुप मुस्लिम बांधव देखील  बदलण्याच्या विचारात आहेत.असे सागुंन ते पुढे म्हणाले की  आपल्या देशाच्या वतीने नेतृत्व करण्याची, विचार मांडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली असुन भगवान केशव गोंविंद महाराज व आपल्या ग्रामस्थांच्या कृपेने नक्कीच यश येईल असेही आचार्य महंत गोविंददेवागीरीजी महाराज म्हणाले ओमप्रकाश व्यास व व्यास परिवारातील बालगोपालांनी देवाचा अतिशय सुंदर पध्दतीने शृंगार केला होता या वेळी अन्नकुटचे यजमान सौ स्नेहलशरद नवले व शरद मोहनराव नवले यांचा सप्त्नीक सत्कार करण्यात आला या वेळी  सखाहारी मुळे लिखीत गोमाता कथा अमृत तसेच मोहनराव खानवेलकर लिखीत भगवान श्री हरिहर केशव गोविंद महात्म्य या ग्रंथाचे प्रकाशन तसेच बेलापुर पाणी पुरवठा योजनेस शासनाकडून १२६ कोटी रुपये मंजुर झाल्याबद्दल त्या माहीती पत्रकाचे अनावरण स्वामीजींच्या हस्ते अनावरण करण्यात आले  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोपाल उपाध्याय यांनी केले तर ट्रस्टचे सचिव पंडीत महेश व्यास यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवान व शहीद झालेल्या पोलीस बांधवांना श्रध्दांजली वहाण्याचा तसेच भारतीय जवान व पोलीस बांधव यांच्या प्रति सद़्भावना व्यक्त करण्यासाठी एक पणती जवानांसाठी हा उपक्रम फ्रेंडस् फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने राबविण्यात आला.फ्रेंड़्स फाँर एव्हर गृप व समस्त ग्रामस्थांच्या वतीने देशाचे रक्षण करताना जे जवान शहीद झाले तसेच आपले कर्तव्य बजावताना जे पोलीस बांधव शहीद झाले त्यांना श्रध्दांजली वहाण्यासाठी तसेच भारतीय जवान व कर्तव्य बजावणारे पोलीस बांधव यांच्या प्रति सद़्भावना व्यक्त करण्यासाठी गेल्या नऊ वर्षापासुन पाडव्याच्या दिवशी सायंकाळी सात वाजता हा उपक्रम राबविण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व भारत मातेचे पुजन करुन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली बेलापुरच्या मुख्य चौकात असलेल्या ध्वजस्तंभाभोवती हजारो पणत्या माजी सैनिक तसेच पोलीस बांधव व ग्रामस्थ यांच्या हस्ते प्रज्वलीत करण्यात आल्या या वेळी शहीद जवान शहीद पोलीस बांधव आत्महत्या केलेले शेतकरी बांधव या सर्वांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली या वेळी शहीद जवान अमर रहे जय जवान जय किसान वंदे मात़़्रम भारत माता कि जय अशा घोषणा देण्यात आल्या या वेळी माजी जि प सदस्य  शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सचिव देविदास देसाई,रणजित श्रीगोड,मारुती राशिनकर,विष्णूपंत डावरे दिलीप दायमा,दिपक क्षत्रिय, गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे, अजीज शेख,भीमराज हुडे,ग्रामपंचायत सदस्य,मुस्ताक शेख तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे मोहसीन सय्यद, शिवाजी वाबळे,लहानु नागले, बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके गणेश भिंगारदे  हरिष पानसंबळ  पोलीस पाटील अशोक प्रधान कैलास चायल,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा,रावसाहेब अमोलीक बाबुलाल पठाण,शफीक बागवान सुधीर तेलोरे,महेश कुऱ्हे, गणेश बंगाळ,दत्तात्रय मुसमाडे,रफिक शेख,जयेश अमोलीक,गयाज पठाण,वैभव कुऱ्हे,योगेश दायमा पोपट नवले, समीर जहागीरदार, जब्बार पठाण,सुरेश सूर्यवंशी, अवधूत कुलकर्णी, जयेश अमोलिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी फ्रेंड़्स फाँर एव्हर गृपचे विष्णूकांत लखोटीया, शशिकांत तेलोरे,राजेश सुर्यवंशी वेणूगोपाल सोमाणी,अभिषेक खंडागळे,सुमित सोमाणी विशाल वर्मा,मयुर साळूंके,सुभाष शेलार योगेश जाधव, संदीप जाधव ऋतुराज नाईक, विजय कोठारी प्रभात कुऱ्हे  निशीकांत लखोटीया,रविंद्र कुऱ्हे,साईनाथ शिरसाठ आदिनी विशेष प्रयत्न केले उपसरपंच अभिषेक  खंडागळे यांनी आभार व्यक्त केले.

श्रीरामपूर : शाळा आणि ज्ञानार्जन हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक सर्वश्रूत समीकरणच आहे.शाळेतून घेतलेले धडे प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचे काम विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांचे सर्वत्र कौतुक होत असते.गावकर्‍यांसोबत इतरांनीही कौतुक करावे असा दीपोत्सवाचा उपक्रम उंबरगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत साजरा केला.  

असा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत यावे हीच मुळात आनंद देणारी बाब आहे. ज्या शाळेत आपण ज्ञानाचे धडे घेतो,त्याच ज्ञानरूपी शिदोरीच्या सहाय्याने विद्यार्थी भविष्यात मार्गक्रमण करतो, अशा शाळेत रोषणाई केली जावी अशा उद्देशाने विद्यार्थ्यांनी दिवाळी प्रथम शाळेत साजरी केली.


उंबरगाव येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक शकील बागवान यांनी पुढाकार घेत दिवाळी सुट्टीपूर्वी विद्यार्थ्यांना दीपावलीचे महत्त्व पटवून देताना पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करताना फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते.त्याचवेळी सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेतच दिवाळी साजरी करण्याचा संकल्प मांडला.सर्व विद्यार्थ्यांनी होकार देत प्रत्यक्ष दिवाळी साजरी करण्याचे नियोजन केले. 

दिवलीच्या दिवशी रंगी बेरंगी कपडे परिधान करून नटून थटून आलेला प्रत्येक विद्यार्थी पणतीसह आला. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच आनंदाची पणती प्रत्येक


वर्गासमोर दीप लावून तो वर्ग सुशोभित केला.पणत्यानी रोषणाई करून संपूर्ण शालेय परिसर प्रकाशमय करून समृद्ध केला. फटाके न फोडता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा खराखुरा आनंद यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला.सर्व विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकासह एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

आगळ्यावेगळ्या या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील काळे,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,सरपंच किशोर कांडेकर,माजी सरपंच चिमाजी राऊत,राजेंद्र राऊत,जितेंद्र भोसले,मुख्याध्यापक लताबाई पालवे व सर्व शिक्षकांनी उपक्रमाचे कौतुक केले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-दिपावलीच्या सणाकरीता व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सजवुन ठेवली परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बाजारपेठेत मंदीचे सावट स्पष्ट जाणवत होते            दिपावली सणाकरीता व्यापाऱ्यांनी दुकानात भरपुर माल भरुन ठेवला होता या वर्षी दिवाळी चांगली होईल अशी सर्वांनाच अपेक्षा असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व्यापारी कष्टकरी सर्वांच्या आनंदावर पाणी पडले बेलापुर बाजारपेठेची आसपासच्या गावांमुळे दर वर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते खासकरुन शेती चांगली पिकली तर बाजारपेठ फुलुन जाते परंतु या वर्षी सर्वच पिके जोमात होती परंतु आलेल्या पावसामुळे ती सर्व कोमात गेली पाऊस येण्या आगोदर सर्वच भागात सोयाबीन कापसु मका ही पिके जोरात होती त्या पिकाच्या जोरावर काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते परंतु अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या वाती झाल्या तर

सोयाबीनला जागेवरच मोड फुटले सोयाबीन, कापुस बाजारात आले असते तर आर्थिक उलाढाल वाढली असती परंतु आता केवळ बालबच्च्याकरीता नाईलाजास्तव सण साजरा करण्याची वेळ सर्वावरच आली आहे अनेकांनी थोडे फार फराळ बाजारातुनच विकत आणुन सण साजरा केला आहे  शेतीतील पिकाचे नुकसान झाल्यामुळे कष्टकरी वर्गांना देखील काम मिळेनासे झाले आहे नुकसानीचे पंचनामे करुन निदान दिवाळीला तरी सण साजरा करण्यापुरती मदत शासनाकडून मिळेल ही अपेक्षा होती पण ती ही फोल ठरली आहे याचा परीणाम सर्व बाजारपेठावर झालेला दिसत असुन व्यापारी ग्राहकाच्या प्रतिक्षेत दुकानात बसुन आहे बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त  ग्राहकांनी आपली खरेदी गावातच करावी या करीता भव्य अशी बक्षिस योजना जाहीर केली व्यापारी वर्गाकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला परंतु हाता-तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास हिरावला गेल्यामुळे व्यापारी बँका पतसंस्था सहकारी संस्था सर्वावरच मोठा परिणाम झाला आहे

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-अतिवृष्टीमुळे शेतकरी व कष्टकरी वर्गाचे झालेले नुकसान व सणासुदीचा काळ लक्षात घेता सर्वांची दिवाळी गोड व्हावी या करीता आनंदाचा शिधा देण्याचा धाडसी निर्णय शासनाने घेतला असुन या निर्णयामुळे गरीबांना दिपावलीचा आनंद घेता येणार असल्याचे मत खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केले                                   श्रीरामपुर तालुक्यात आनदांचा शिधा दुकानात पोहोच झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित वितरण होते की नाही हे पहाण्याकरीता खासदार लोखंडे यांनी रेव्हेन्यू सोसायटीच्या धान्य दुकानास भेट देवुन पहाणी केली वाटप व्यवस्थित सुरु असल्याचे पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले त्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किटचे वितरणही करण्यात आले या वेळी त्याच्या समवेत भाजपाचे पदाधिकारी प्रकाश चित्ते राजेंद्र देवकर सुधीर वायखेडे संदीप वाघमारे कैलास भणगे नंदकिशोर आरोटे राजेंद्र त्रिभुवन उपस्थित होते रेव्हेन्यू सोसायटीच्या दुकानाचे सेल्समन रज्जाक पठाण यांनी आभार मानले

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-शासनाने गोरगरीबांना दिवाळी भेट देताना शंभर रुपयात साखर रवा हरबरा डाळ व पामतेल या चार वस्तूचा आनंदाचा शिधा वस्तुंचे वाटप श्रीरामपुर तालुक्यात सुरु झाले असुन ग्रामीण भागातही वाटप सुरु झाले आहे .मांडवे तालुका श्रीरामपुर येथे या किटचे वाटप सुरु करण्यात आले        या वेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य  शंकर चितळकर म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकरी तसेच गोरगरीबांना दिवाळी सणाचा आनंद लुटता यावा या करीता शंभर रुपयात चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला असुन  शासनाचा हा निर्णय खरोखरच सर्वसामान्यांना वाढत्या महागाईच्या काळात नक्कीच दिलासा देणारा आहे अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झालेल्या शेतकऱ्यांना ऐन सणासुदीच्या अर्थात दिवाळीच्या काळात भाजपा सरकारने या गोरगरीब जनतेला मोठा मदतीचा हात दिलेला आहे या वेळी  पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव चितळकर सरपंच निखील वडीतके उपसरपंच गोविंद तांबे ग्रामसेवक संदीप बडाख अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई गंगाराम भोसले  आण्णासाहेब गेठे शहाजी वडीतके बबनराव सोपान चितळकर  साहेबराव चितळकर गोकुळ पवार विजय काबुडके आण्णासाहेब ढोणे पांडुरंग पटांगरे बाबासाहेब शेंडे ज्ञानेश्वर वडीतके शिवाजीराजे वडीतके विष्णू सोनवणे  आदींसह तांबे वाडी तसेच मांडवे येथील रेशनकार्ड धारक महिला आणि लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी )महाराष्ट्र  शासनाच्या वतीने गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी या करीता शंभर रुपयात साखर तेल रवा व चनाडाळ हा आनंदाचा शिधा श्रीरामपुर तालुक्यात पोहोच झाला असुन त्याचे वितरण उपविभागीय आधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष देविदास देसाई भाऊसाहेब वाघमारे रज्जाक पठाण गोपीनाथ शिंदे शिवाजी सईद माणिक जाधव गोदाम व्यवस्थापक अर्जुन सानप गोदामपाल मिलींद नवगीरे पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले आहे.  सणासुदीचा काळ लक्षात घेता सर्व दुकानदारांनी आंनदाचा शिधा प्रत्येक कार्डधारकांना मिळेल याची काळजी घ्यावी तसेच दुकानात माल पोहोच होताच दुकानदारांनी तात्काळ वाटप सुरु करावे कुणाचीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी तक्रार येणाऱ्या दुकानावर कडक कारवाई करण्यात येईल असा ईशारा उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिला आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राकेश ओला यांची नियुक्ती झाली आहे. राज्यातील 24 पोलीस अधिक्षकांच्या बदली बाबतचे आदेश गृह विभागाने गुरूवारी रात्री काढले.दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना अद्याप पदस्थापना मिळालेली नाही. 

यांच्या जागी मा. राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश ओला हे सध्या पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे कार्यरत आहेत. ते एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि हसतमुख अधिकारी म्हणून राकेश ओला यांची ओळख आहे. राजस्थान येथील जयपूर मधील पोलिस घराण्यात त्यांचा जन्म झाला असुन. २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले राकेश ओला हे सरळ सेवा भरतीने सहायक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली होती. त्यावेळी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी

टोळीने अहमदनगरसह संपूर्ण राज्यात हैदोस घातला होता. या टोळीचा त्यांनी छडा लावून टोळीचे कंबरडे मोडले. मे १६ मध्ये त्यांची मालेगावला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. जातीय दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या मालेगावात त्यांनी मे २०१७ पर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली. तेथून ते जून २०१७ ला नागपुरात पोलीस उपायुक्त

म्हणून बदलून आले. येथे त्यांना परिमंडळ दोनची जबाबदारी देण्यात आली. नागपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तोतया पोलीस बनून लुटणाऱ्या

टोळीचा तसेच कारची काच फोडून रोकड आणि मौल्यवान चिजवस्तूंची बॅग लंपास करणाऱ्या टोळीचा त्यांनी छडा लावला. याशिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांचाही छडा लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमीका बजावली आहे. राकेश ओला यांनी यापूर्वी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. सध्या ते नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे अधीक्षक होते.आता नगर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणुन त्यांना नियुक्ती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा नगर जिल्ह्यात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांनी 1 ऑक्टोबर 2020 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांनी जिल्हा पोलीस दलात ई-टपाल प्रणाली, टू-प्लस योजना प्रभावी राबवली.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्रीरामपुर तालुक्यात बेलापुर विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही जिल्ह्यात अव्वल नंबरची सोसायटी ठरली असुन या संस्थेच्या संचालक मंडळाने १५%लाभांश १०किलो साखर दिवाळीचा फराळ देण्याचा निर्णय घेतला असुन सभासद हीत जोपासतानाच संस्थेचा विकास साधण्याचाही प्रयत्न केला आहे  असे गौरोद़्गार आमदार लहु कानडे यांनी काढले                                 दिपावली निमित्त बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या सभासदांना १५ टक्के डीव्हीडंट १० किलो साखर तसेच फराळ वाटप व सेवकांना बोनस वाटपाच्या  कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते  या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे काँग्रेसचे

तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक  भगवान  सोनवणे अजय डाकले कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळूंके राजेश खटोड दत्ता कुऱ्हे  आदि मान्यवर उपस्थित  होते आमदार लहु कानडे पुढे म्हणाले की सध्याच्या शासनाने सर्वांनाच गाजर दाखविण्याचे काम  केले आहे महाविकास अघाडी सरकारने अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले होते त्यांना तिलांजली देण्याचे काम या शासनाने सुरु केले आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी भुईसपाट झाला आहे त्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली पाहीजे शेती कायमच तोट्यात चालल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम जिल्हा बँकेने हाती घेतले आहे शेतकऱ्यांना विज व पाणी हे महत्वाचे आहे हे लक्षात घेवुन शेतकऱ्यांना विंजेसंदर्भात येणाऱ्या अडचणीचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की श्रीरामपुर तालुक्यात उच्च दाबाने विज पुरवठा व्हावा अशी यंत्रणाच अस्तित्वात नाही त्यामुळे तालुक्यात हाय पाँवर सब स्टेशन मंजुर करण्यात आले असुन लवकरच त्याचे काम सुरु होणार आहे ,तालुक्याचा शाश्वत स्वरुपात विकास व्हावा हे आपले स्वप्न आहे श्रीरामपुर ते देवळाली या रस्ता चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असुन चांगल्या कामांना खिळ घालणाऱ्या अपप्रवृत्ती विरोधात भक्कमपणे उभे राहीले पाहीजे असेही ते म्हणाले  जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे म्हणाले की जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप देण्यासाठी कर्ज योजना सुरु करण्यात आली असुन त्याचा लाभ घ्यावा असे अवाहन ससाणे यांनी केले या वेळी बोलताना संस्थेचे चेअरमन सुधीर नवले म्हणाले की केवळ कर्ज देणे व वसुल करणे या वर अवलंबून न रहाता संस्थेने पेट्रोल पंप स्वस्त धान्य दुकान खत डेपो असे दुय्यम व्यवसाय सुरु केल्यामुळे संस्था नफ्यात आलेली आहे सन २०१४ पासुन सभासदांना लाभांश देण्याचे काम संस्था करत आहे १५ वर्षापासुन संस्थेचा कारभार काटकसरीने केल्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा संस्था आमच्या ताब्यात दिली आहे त्यांच्या विश्वासाला तडा जावु दिला जाणार नाही आगामी काळात शाँपींग काँम्प्लेक्स मंगल कार्यालाय बांधण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही नवले म्हणाले  आमदार कानडे यांनी श्रीरामपुर  ते देवळाली या रस्ता चौपदरीकरण कामाकरीता सोळा कोटीचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल तसेच गावातील स्मशानभुमी दलीत वस्ती वाबळे वस्ती करीता निधी दिल्याबद्दलही त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला या वेळी त्रिंबकराव कुऱ्हे नंदकिशोर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले तुकाराम मेहेत्रे  शेषराव पवार अनिल नाईक अंतोन अमोलीक प्रदीप शेलार अयाज सय्यद जाकीर शेख प्रविण शेलार सुनिल नाईक उत्तम मेहेत्रे रावसाहेब कुऱ्हे राजेंद्र सातभाई अशोक कुऱ्हे विश्वनाथ गवते आदिसह सभासद मोठ्या सख्येंने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास मेहेत्रे यांनी केले तर सचिव विजय खंडागळे यानी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-"कांदे घ्या ,वांगे घ्या, बटाटे घ्या काहीही घ्या लई स्वस्त लावले आहेत काका काकु "अशी हाक बेलापुर मराठी शाळेत लहान मुलांनी भरविलेल्या बाजारात ऐकु आली अन पालकांनीही मनसोक्त खरेदी केली                                        विद्यार्थ्यांना बालपणीच व्यवहार ज्ञान अवगत व्हावे या करीता शाळेत बाजार भरविण्याची सांकल्पना पुढे आली त्याच संकल्पनेनुसार  बेलापुर जिल्हा परिषद मराठी मुले व मुलींच्या शाळेत चिमुरड्यांनी बाजार भरविला होता भाजी पाल्याच्या दुकानापासुन फळे तसेच खाऊचीही दुकाने लावण्यात आली होती लहान लहान मुले मुली आपला माल कसा चांगला आहे तो खरेदी कराच असा आग्रह करत होती पालकांनीही या बाजाराचा आनंद लुटत  खरेदी केली लहानग्यांच्या बाजाराचे उद़्घाटन शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष अजीज शेख यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी शालेय शिक्षिका मुख्याध्यापिका राजाबाई कांबळे संजय भालेराव शांताबाई गागरे ढुमणे देवढे यांनी बाजार भरविण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले या वेळी सौ रोशनी अजिज शेख ज्योती शेलार तबस्सुम सय्यद भाग्यश्री कुमावत भारती प्रधान मिनाक्षी दायमा रेश्मा पठाण जबीन शेख दिशा मोरे गौरी शेलार नंदीनी मगर अंजुम शेख राणी सोनवणे सना शेख शबाना शेख अनिल मोकाशी मास्टर हुडे किशोर खरोटे राजु शेख सुल्तान शेख मोसीन ख्वाजा रीजवान आतार ईरफान पठाण प्रकाश पवार मुक्तार सय्यद आदी उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )- जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शालेय व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षपदी अजिज अहमद शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे                             बेलापुर जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका लता बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पालक संघाची बैठक बोलविण्यात आली होती या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अजीज अहमद शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या नावाची सूचना श्रीकांत कोटकर यांनी मांडली तर रमेश लगे यांनी त्यास अनुमोदन दिले या वेळी सुरेखा सोनवणे शितल गायकवाड लाता परदेशी आनिल मोकाशी मास्टर हुडे किशोर खरोटे राजु शेख सुल्तान शेख मोसीन ख्वाजा रिजवान आतार मोसीन शेख ईरफान पठाण प्रकाश पवार आदिसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपमुख्याध्यापीका विजया दहीवाळ यांनी आभार मानले

श्रीरामपूर तालुका व परिसरातून ट्रॅक्टर चोरणार्‍या टोळीस काल श्रीरामपूर पोलिसांनी चार जणांना जेरबंद कले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ट्रॅक्टर, ट्रॉली, आर्मीचर व चार मोबाईल असा एकुण 12,90,000/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात राहाता तालुक्यातील तिघेजण असून चौथा हा वैजापूर तालुक्यातील बाबतारा येथील आरोपी आहेत.श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी, जबरी चोरी, दरोडा असे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक, मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, स्वाती भोर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग, संदीप मिटके यांनी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना सुचना दिल्या होत्या. त्यावरुन पोलीस निरीक्षक यांनी श्रीरामपूर शहर तपास पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. रघुनाथ नानासाहेब उघडे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर यांचा ट्रॅक्टर हा त्यांचे राहते घरासमोरुन दि. 24 जून 2022 रोजी रात्री चोरीला गेला होता, त्यावेळी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. 554 / 2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास श्रीरामपुर शहर पोलीस करत असताना, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर ट्रॅक्टर चोरणारी टोळी श्रीरामपूर परिसरात परत ट्रॅक्टर चारणारी टोळी येणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांना सांगुन, त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथक रवाना करण्यात आले.या पोलीस पथकाने सापळा लावुन यातील किरण शांताराम लासुरे-(वय 25) प्रल्हाद गोरक्षनाथ बरवंट (वय 45) दोघेही रा. शिंगवे, ता. राहाता, रामा बाळासाहेब यादव (वय 29) रा. 14 नं. चारी, राहाता, ता. राहता, मच्छिंद्र भाऊसाहेब गायकवाड, (वय 27) रा. बाबतारा, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद यांना जेरबंद करुन त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करुन त्यांचेकडून पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली, आर्मीचर व चार मोबाईल असा एकुण 12 लाख 90 हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील वावी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 229/2022 भादवि कलम 379, तसेच श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 386/2022 भादंवि कलम 379 असे गुन्हे उघडकीस आणले आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल रमिझराजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बढे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर यांनी केली असुन, दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे करीत आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर आतिक्रमण करुन अतिक्रमण काढण्यास गेलेल्या ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांना धक्काबुक्की करुन दमदाटी केल्याबद्दल गायकवाड वस्ती येथील सोमा दुशिंग,हर्षदा दुशिंग ,कांचन दुशिंग,रेखा दुशिंग या चार जणा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                      या बाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की गायकवाड वस्ती येथे बेलापुर ग्रामपंचायत मिळकत नंबर १३०४ मध्ये ५०बाय ५० मिटर जागा असुन त्या जागेत ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी विहीर अंगणवाडी समाज मंदीर पाच गाळे आहेत बेलापुर  श्रीरामपुर रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरु असुन रस्त्यावरील आतिक्रमण तातडीने हटविण्यात आली त्यात दुशिंग यांचेही अतिक्रमण होते त्याचे रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत जागेत अँगल गाडले ही बाब सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांच्या लक्षात येताच सौ रेखा फकीरा दुशिंग यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावुन समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही काहीही करा मी अतिक्रमण करणारच असे ठणकावुन सांगितले तसेच माझे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करुन ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करील अशी धमकी दिली त्या नंतरही ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी सचिन साळूंके सचिन नगरकर किशोर झीने यांना गायकवाड वस्ती येथील अतिक्रमण केलेल्या ठिकाणी पाठवुन अतिक्रमण न करणे बाबत नोटीस देण्यास गेले असता त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांंनी ती नोटीस घरावर डकवीली  .                             *अतिक्रमण धारक महीलेच्या मुलीचे शोले स्टाईल आंदोलन*      त्याच वेळी सौ रेखा दुशिंग यांची मुलगी हर्षदा दुशिंग हीने जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीवर चढुन शोले स्टाईलने आंदोलन केले आमचे अतीक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर टाकीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याची धमकी दिली त्या वेळी सर्वांना शोलेची आठवण झाली कारण त्या शोलेतही बेलापुर अन रामगड होते इथेही बेलापुर व रामगड आहे अखेर त्या मुलीची समजुत काढुन तीला खाली सुखरुप उतरविण्यात आले सोमा दुशिंग याने सरपंच महेंद्र साळवी यांना तलवारीने काटा काढील आशी धमकी दिली कुणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली  त्या वेळी ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यात आली त्यात त्यांना मुका मार लागला त्या नंतर सरपंच साळवी  उपसरपंच खंडागळे  व ग्रामविकास अधिकारी तगरे यांनी पोलीस निरीक्षक  हर्षवर्धन गवळी यांच्या कानावर हा प्रकार घातला दुशिंग परिवाराला समजावुन सांगण्याचा प्रयत्न सुरु असतानाच  दुशिंग परीवाराने तेथेही दादागीरी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ग्रामविकास आधिकारी राजेश तगरे यांच्या फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ९२५/२०२२ भा द वि कलम ३५३  ,३३२,३०९ ,५०४, ५०६ ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे हे करत आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-मुस्लीम धर्माचे संस्थापक मोहंम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात जश़्ने ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्सहात संपन्न झाली   ईदगाह मैदान अ्लाउद्दीन बाबा चॉक पासून मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली मिरवणूक बेलापुरच्या मुख्य झेंडा चौकात येताच नागरीकांच्या वतीने जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड मा,सरपंच भरत साळूंके तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे  पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम आदिंनी केले या वेळी मिठाईचे वाटप करण्यात आले. तुळजा भवानी मंदीर चौकातही मिरवणूक आल्यानंतर तेथेही मुस्ली बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच खाऊचे वाटप करण्यात आले त्यानंतर मिरवणूक जामा मस्जिद येथे आली तेथे मिरवणूकीचे रुपांतर सभेत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामा मस्जिदचे मुख्य ट्रस्टी जाफरभाई आतार हे होते या वेळी विद्यार्थ्यांनी मोहंम्मद पैगंबर यांच्या जिवनावर भाषणे केली .या वेळी जिं प सदस्य शरद नवले ,जामा मस्जिदचे ट्रस्टी हाजी बहोद्दीन सय्यद सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे हाजी ईस्माईल शेख गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे पत्रकार देविदास देसाई भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रफुल्ल डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे नियोजनजामा मस्जिद ट्रस्ट व अंजुमन कमीटी बेलापुर यांनी केले होते कार्याक्रम यशस्वीतेसाठी मोहसीन बहोद्दीन सय्यद जब्बार  आतार शफीक बागवान असीफ शेख शफीक आतार कौसर सय्यद जब्बार बागवाले अजीज शेख सर्फराज सय्यद जुबेर आतार कैफ काझी वसीम शेख समीर शेख सुलतान शेख मुख्तार सय्यद आदिंनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी ईस्माईल शेख यांनी केले तर सूत्रसंचलन मोहसीन सय्यद यांनी केले मुनीर बागवान यांनी आभार व्यक्त केले.

श्रीरामपूर-आगदी १५००ं वर्षांपूर्वी  रानटी -क्रुर-अमानवीय प्रथा- रितीरिवाजांनी व्यापलेला  वाळवंटातील व जगातील जनसमुदायाला एक अल्लाहा( ईश्वरा)ची शिकवण देत समस्त जगाने एका अल्लाहाची प्रार्थना करावी . त्यामध्ये कोणीही शुद्र-उच्च-नीच - काळा - गोरा नाही,  जगातील सर्व मानव जात ही एकच आदम ची लेकरे आहोत . 

म्हणुनच ती इस्लामी ज्ञान,शिक्षण घेवू शकते, ठराविक जाती जमातीत जन्माला तरच तुम्ही  शिकण घेऊ शकता हा चुकीचा समज  प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांनी नाकारला, त्यांनी प्रत्येक 

विद्वानांना जास्त महत्त्व दिले, उदा.विद्वान-ज्ञानी  फक्त धार्मिक ज्ञान हेच फक्त महत्त्वाचे नसून  सर्व समावेशक ज्ञान  महत्वाचे आहे उदा.अर्थ,रसायन, वैद्यकीय, क्रीडा,लष्कर ई. विविध क्षेत्रातील विद्वान , तत्वज्ञ, ज्ञानी असलेल्यांना  ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सर्व मानवजातीला कायमची खुली केली. चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या,ज्ञानाच्या,  क्षेत्रात पुर्वीही खुप प्रगत  होता, तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " चीनला जावुन ज्ञान घेवा लागलं तरी,  ज्ञान घेण्यासाठी चिनला जा", असा पुरोगामी दुर-दृष्टीकोनाचा  सल्ला प्रेषित मुहम्मद स्व.नी दिला.

 ज्ञानाच्या, कौशल्याच्या , तंत्रज्ञानाच्या जोरावर कोणी-कितीही मोठा होवू शकतो . पुढे जावू शकतो.

त्यामध्ये , राज्य कारभार सांभाळण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावं लागतं हा विचारच हजरत मुहम्मद पैगंबरांनी नाहीसा करून टाकून प्रत्येक्षात आचरणातून दाखवून दिले. 

समतेचा संदेश देणारे पहिले क्रांतिकारक प्रेषित मुहम्मद स्व.नींआपल्या २३ वर्षांच्या प्रेषित कालावधीतच समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून माणसाला माणूस म्हणून माणसाप्रमाणे कसे वागवावे याचे उदाहरण समस्त जगाला दाखवून दिले . अरब देशात काळा - गोरा  भेदभाव मोठ्या प्रमाणात होता, गुलामगिरी च्या प्रथेने कळस गाठलेला .काळ्या निग्रो लोकांना माणूस म्हणून जगताना मान्यताच नव्हती , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात केली जात असे,  गुलामगिरीला हद्दपार-नष्ट करून एका जैद नावाच्या काळया निग्रो  गुलामाशी आपल्या सख्ख्या आत्या बहीणी चा विवाह लावून काळ्या-गोऱ्यांचा भेदभाव नष्ट केला.

हजरत बिलाल रजि. (काळ्या  वर्णाचे) गुलाम म्हणून विकले गेलेल्यांना गुलामगिरीतून मुक्त करून  मक्का विजयी दिवशी पवित्र काबागृहावर चढून "अजान" देण्याचा आदेश देऊन  समस्त जगाला कोणीही अपवित्र नसते हे दृश्य दाखवून दिले. इस्लामच्या सिद्धांतानुसार एकाच अल्लाहा (ईश्वरा) ची , आदम ची संतान आहेत. सर्व रंगाचे-वर्णाचे- वंशाचे , सर्व एकच आहेत, हा भेदभाव इस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय,हक्क,संधी देतो,हा पुरोगामी क्रांतिकारी समतेचा विचार प्रेषितांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिला.

जगातील स्त्रियांनाही आपल्या वारसाहक्कात, मालमत्तेत वाटा आहे. तो वारसा हक्क  मिळवून देणारा जगभरात पहिला  क्रांतीकारक विचार प्रेषित मुहम्मद स्व.यांनीच दिला. त्याकाळात किरकोळ कारणावरून  वादविवाद होऊन त्याचे भयंकर रूपांतर हत्या -खुन, सतत च्या  कुठेतरी लढाई यामुळे  विधवां व अनाथांचे प्रमाण प्रचंड  प्रमाणात असल्याने विधवांना अतिशय हाल-अपेष्टां -त्रासांना- कुप्रथांना तोंड द्यावे लागत असत व अनाथ मुलांना तर  आधारच मिळत नसतं . विधवांना वेगवेगळ्या नजरेतून पाहिलं जातं होतं . विधवा -घटस्पोटींचे शब्दात वर्णन करणे अवघड होते .     हे सर्व बघुन विश्वातील पहिला घटस्फोटीत-विधवा-महिला पुनर्विवाहची संकल्पना मांडून जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलेशी स्वतः विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद यांनी  स्वत:ची पत्नी बनवून बहुमान दिला. पैगंबरांनी आपले  विवाह घटस्फोटीत व विधवा  महिलांशीच करून प्रत्येकीला सम-समान पातळीवर ज्ञाय 

- हक्क स्वाधीन करून  काळाच्या प्रवाहात सामील करून मान -सन्मान - बहुमान प्राप्त करून समस्त जगाला दाखवले.

     🌺कन्यावध - स्री भ्रुणहत्या हे पाप आहे हे सांगणारे प्रेषित मुहम्मद स्व. पहीले  क्रांतिकारी पुरुष,

अरब जगात १५०० वर्षांपूर्वी स्त्री भृणहत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या,समाजमनाच्या नसानसात ही कुप्रथा भिनलेली होती, जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जात असे,जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरण्याची क्रुर प्रथा होती,  स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं प्रतिकं समजलं जातं होते. परंतु प्रेषित मुहम्मद स्व.यांनी कन्यावधाला समुळ नष्टच करण्यासाठी अल्लाहाचे भय दाखवत पारलौकिक जीवनाचे नरक - स्वर्ग प्राप्ती बक्षीसांची सत्यता दाखवली.

पवित्र कुराणात सांगितले की,"  जिवंत पुरलेल्या मुलीला जेव्हा (कयामतच्या दिवशी) विचारलं जाईल की कोणत्या अपराधाची शिक्षा तुला दिली गेली आहे ?" तर ती सांगेल की माझा काहीही दोष,गुन्हा नसताना विनाकारण माझी हत्या करण्यात आली आहे,हे या लोकांनी मोठे पातक केले आहे, दोषींना शिक्षा देऊन मला इन्साफ (न्याय) मिळावा" 

तेव्हा अल्लाहा च्या शिक्षेपासून तुम्ही वाचू शकणार नाही,हे ऐकल्यानंतर ज्या -ज्या व्यक्तींनी आपल्या कोमल मुलींना पुरलं होते,त्या प्रत्येक व्यक्ती पश्चाताप करत धायमोकळून ढसढसा रडू लागलीत ,हे आम्ही काय मोठे पातक -पाप केलीत म्हणून,

    प्रेषित मुहम्मद स्व.सांगितले की," ज्यांना एक अथवा अधिक मुली असेल त्या पालकांनी, प्रेमाने,आपुलकीने त्या मुलींचे व्यवस्थिरित्या पालनपोषण, शिक्षण करून  उत्तम वर ( नवरा)बघून त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले. तर ,त्या प्रत्येक व्यक्तीला जन्नतुल फिरदौस (स्वर्गात)मधे महाल भेटेल . तसेच ज्या व्यक्तींना दोन- तीन पेक्षाही अधिक मुली असेल, तर त्यांनी न कंटाळता त्या मुलींचे संगोपन व्यवस्थित करून उत्तम वर(नवरा) बघुन त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले तर जन्नत  (स्वर्गा)त  माझ्या शेजारी त्यांचं महाल असेल व त्याचा मोबदला त्यांना अत्यंत चांगलाच असेल..

अशाप्रकारे वास्तविकतेचे धडे देत  अल्लाहा (इश्वर) चे  प्रिय  होण्यासाठी सत्कर्म अपेक्षित असल्याचे  सांगितले.

प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांना १)हज.जैनब २)हज.रुकैयया,३) उममे कुलसूम ४) हज.फातिमा रजि.या चार मुलींचे संगोपन करुन त्यावेळच्या प्रतिष्ठित व्यापारी व घराण्यात लग्न करून दिलेत.त्यामध्ये " करबला युध्दातील जगाच्या कल्याणासाठी ७२ हौतात्म्य पत्करलेले हजरत इमाम हुसेन व हजरत इमाम हसन च्या आई हजरत फातिमा रजि. या सर्वांत छोट्या मुलीचा समावेश ही होतो .

हे स्वकर्तृत्वाने जगाला दाखवले.

यामुळे ज्यांच्या घरात मुली जन्माला  होत्या त्यांच्या चेहऱ्यांवर  चेहरे उजळून निघाले.

प्रेषित मुहम्मद स्व. यांनी लोकांकडून  जगप्रसिद्ध  आराफात च्या अंतिम संबोधनात  शपथेवर , "माझ्या जवळ प्रतिज्ञा (शपथ) घ्या की, अल्लाहा शिवाय इतर कोणालाही पुंजणार नाही , चोरी, व्यभिचार करणार नाही, मुलींची - कन्यावध करणार नाही.आपल्या वडिलांच्या संपत्तीतून मुलींचाही हिस्सा - वाटा आहेत. तो द्यावा.  बंधुंनो,पतीचे पत्नीवर हक्क आहे ,तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला (बायकांना) प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा ,कठोर निष्ठुर होवू नये, त्यांच्या प्रती दयाळु रहा,  तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे , तर तीची काळजी घ्यावी,  पत्नीचे जे काही आधिकर असतील ते सर्व तीला द्यावे,  तीने तुमच्यावर विश्वास टाकला आहे , तर तीच्या त्या विश्वासाचा विश्वासघात करू नका. तुम्हाला( महाप्रलया) कयामतच्या  दिवशी अल्लाहा समोर आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागेल,या दिवसाची कायम आठवण ठेवा,." ..🌹

असे प्रेषितांनी आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक  वर्गातील समुहाची व विशेषतः महीलांची तळमळ व्यक्त केली,काळजी घेतली.

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे ,पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहित स्तुती करत लिहीतात की, 

 अर्थ :- - " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला,गुलामगिरी नाकारली,जातिभेद,जाती- पाती बुडासकट नष्ट केले,अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला,सर्वत्र अभेद-समता, बंधुभाव कायम केला !! 

पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ.इक्बाल लिहीतात की, "एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !! ना कोई बंदा रहा,ना बंदा नवाज !!"

अर्थात :- मस्जिदमधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा- राष्ट्रपतीच्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहु शकतो,यावेळी कोणं गुलाम नाहीत कोणं मालक नाही,अशी समता - समानता त्यांनी प्रस्थापीत केली.

प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व .यांना ,लिहीता-वाचता येत नव्हते,तरी सुद्धा सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व पटवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला.

"न भूतो न भविष्यते" घडवलेल्या क्रांतीचे श्रेय स्वतः न घेता सर्व श्रेय हे जगत निर्मात्यां अल्लाहा ला दिलेत.असे म्हणत की, " मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत"


लेखक- डॉ.सलीम सिकंदर शेख

बैतुश्शिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर

९२७१६४००१४.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-हज़रत मोहम्मद पैगंबर  जयंतीच्या ( ईद मिलाद )निमित्ताने  गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा मुले , बेलापुर, येथे विकलांग विद्यार्थ्यांना  शालेय साहित्य वाटप  करुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने  पैगंबर जयंती साजरी करण्यात आली           या वेळी मां.जि प सदस्य शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर  सोसायटीचे चेअरमन  सुधीर नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामपंचायत सदस्य शफीक बागवान मुस्ताक शेख हाजी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद हवालदार अतुल लोटके आदि मान्यवर उपस्थित होते  यावेळी पंचायत समिती सदस्य व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटिल नाईक आपल्या भाषणात म्हणाले की  मोहम्मद पैगंबरएक थोर समाज सुधारक होते यांनी समाजत असणाऱ्या  अनेक रूढी परंपरा स्री भ्रुण हत्या तसेच  महिलावर होणारे  अत्याचार यावर आळा घातला मोहम्मद पैगंबर यांनी जीवनात सर्वात जास्त शिक्षणाला महत्व दिले गौसे आजम ही सेवाभावी संस्थाही अशाच पध्दतीने सामाजिक कार्य करत आहे .अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहीले पाहीजे असेही नाईक म्हणाले  या वेळी जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे  चेअरमन सुधीर नवले आदिंनी मनोगत व्यक्त करताना  गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या कामाचे कौतुक केले व पुढील कार्याकरीता शुभेच्छा दिल्या या वेळी मान्यवरांच्या हस्ते विकलांग विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले , मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, मोहसिन सय्यद, बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटेके , जीना शेख,जिल्हा परिषद मराठी शाळा मुळे पालक समती अध्यक्ष राजू भाई सय्यद मुख्यधापक कांबले मैडम, व सर्व शिक्षक वर्ग,गौसे आजम सेवा भावी संस्था संस्थापक  मुख़्तार भाई सय्यद, अध्यक्ष सुल्तानभाई शेख, महा सचिव नौसाद भाई शेख, तालुका अध्यक्ष सोनू भाई शेख, सईद सय्यद, भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक भाई शाह, मोहसिन ख्वाजा भाई शेख,इ उपस्थित होते गौसे आजम सेवा भावी संस्थचे संस्थापक अध्यक्ष मुख़्तार सय्यद यांनी  आभार व्यक्त केले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रखर राष्ट्रवाद, देशभक्ती, सामाजिक समरसता जोपासण्याचे काम राष्ट्रीय स्वंयसेवक संघ करत असुन सर्वाना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी गेल्या ९७ वर्षापासून संघाचे कार्य अविरतपणे चालु आहे असे   प्रतिपादन रा स्व.संघाचे नासिक विभाग प्रचारक सुवेदजी देशमूख यांनी केले.

बेलापूर येथील रा.स्व. संघाच्या विजय दशमी दसरा उत्सवात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माऊली वृध्दाश्रमाचे संस्थापक सुभाष वाघुडे हे होते,तर तालुका सहकार्यवाह निलेशजी हरदास, देविदासजी चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपेंद्र कुलकर्णी यांच्या 

।"संघ विजयी पथ पर बढ चले."। या गीताने करण्यात आली.

आपल्या भाषणात देशमुख म्हणाले भारताची गौरवशाली संस्कृती,परंपरा आहे. आपल्यातील शौर्य,शक्ती,तेजाची उपासना करण्यासाठी या दिवशी शस्राचे पूजन केले जाते असेही ते म्हणाले

अध्यक्षीय भाषणात सुभाष वाघुंडे म्हणाले—देशात वृद्धाश्रमे ही समाजासाठी कलंकित बाब आहे.वृद्धाश्रमे असू नये हे जरी अपेक्षीत असले तरी निराधारांना आधार देणे.ह्याच मुळ उद्देशाने मी वृद्धाश्रम सुरु केलेला आहे राष्ट्रीय स्वंयसेवक संघामुळे जिवनाता शिस्त लागते आपल्यातील राष्ट्र प्रेम जागृत होते समाजाचे काहीतरी देणे लागतो या संकल्पनेतुन सुरु केलेल्या माऊली आश्रमात सध्या १९ आजी आजोबा सेवा घेत आहे .सुमारे २८ आजी आजोबांना मी घरवापसी केल्याचे त्यांनी सांगितले..

यावेळी रा.स्व.संघाचे घोषासह पथसंचलन काढण्यात आले.संघस्थानावर सुर्य नमस्कार,नियुद्ध, अग्र्निप्रलय,प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.कार्यक्रमाचे सुञसंचलंन देवेंद्र गोरे यांनी तर आभार रविंद्र कोळपकर यांनी  मानले.कार्यक्रमास परिसरातील संघप्रेमी नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते,

बेलापुर  (प्रतिनिधी  )-संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची वार्षीक सर्वसाधारण सभा अंत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन महेबुब शेख हे होते या वेळी सजंय जगताप यांनी मयत सभासदाचे सभासदत्व रद्द करुन वारसास सभासद करुन घ्यावे तसेच सातबारा नसलेल्या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची सुचना केली त्यास कल्याणराव जगताप यांनी अनुमोदन दिले ऐनवेळच्या विषयात तोट्यात असणारी संस्था उर्जितावस्थेत कशी येईल या करीता करण्यात येणाऱ्या उपाय योजनावर चर्चा झाली .गावात सुरु असलेले धान्य दुकान शेजारच्या गावास जोडले असुन कार्डधारकांना चार किलोमीटर दुर अंतरावर धान्य नेण्याकरीता जावे लागते त्यातच मशिन बंद असल्यास माघारी यावे लागते ही कार्डधारकांची, गोरगरीबांची होणारी हेळसांड थांबविण्याकरीता गावाचे धान्य दुकान गावातच सुरु करण्याची मागणी ऐन वेळच्या विषयात करण्यात आली .संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांनी सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली .संस्थेचे चेअरमन  महेबुब शेख यांनी लांडेवाडी ते देवळाली चिंचोली या एक किलोमीटर  रस्त्याच्या दुरुस्तीचे काम स्वः खर्चाने केल्याबद्दल सभासदांनी त्यांचा सत्कार करुन आभार मानले . या वेळी संस्थेचे सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक उपसभापती योगीता चव्हाण यांनी केले तर सचिव गीताराम काळे यांनी अहवाल वाचन केले प्रकाश नलगे यांनी सहकार्य केले शेवटी संचालक देविदास देसाई यांनी सर्वांचे आभार मानले

बेलापुर (प्रतिनिधी  )-संक्रापुर तालुका राहुरी येथील लांडेवाडी ते देवळाली चिंचोली फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संक्रापुर सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांनी स्वःखर्चाने केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला            संक्रापुर ग्रामस्थांना राहुरी,  देवळालीला जाण्याकरीता लांडेवाडी ते चिंचोली देवळाली हाच ऐकमेव रस्ता आहे मात्र पावसामुळे या रास्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली होती या रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले होते या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत शासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला होता परंतु शासन स्तरावर काहीच हालचाल झाली नाही संक्रापुर सहकारी संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांना या रस्त्याने जाणाऱ्या नागरीकांचे हाल पहावेना मग त्यांनी पदरमोड करुन या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला लांडेवाडी ते चिंचोली देवळाली फाटा या एक किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती स्वखर्चाने करुन नागरीकांची गैरसोय दुर केली त्याबद्दल संस्थेचे संचालक जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला या वेळी संस्थेचे माजी चेअरमन नबाजी जगताप संजय जगताप कल्याणराव होन भरतरीनाथ सालबंदे बाजीराव जगताप त्रींबक गताप विजय रोकडेकुंडलीक खेमनर बाळासाहेब गुंड भाऊसाहेब जगताप बबन खेमनर राजेंद्र जगताप रोहीदास खपके सुभाष दाते बाळासाहेब जगताप डाँक्टर सुरेश जगताप दावल शेख आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापूर(प्रतिनिधी )--विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कुणीही हरवु शकत नाही असे उद़्गार नाशिकच्या प्राईम अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा. विकास मालकर यांनी व्यक्त केले. बेलापूर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग, करिअर कट्टा विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करियर गायडन्स चर्चासत्रात  बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समीतीचे चेअरमन राजेश खटोड होते तर संस्थेचे विश्वस्त रविंद्र खटोड शेखर डावरे हे प्रमुख उपस्थित होते .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, उत्तम करिअर, चांगली नोकरी, पदवी व पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम , मानसन्मान प्रतिष्ठा ,पारितोषिके, बक्षीसे इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्राप्त होते.त्यामुळे सरळ सेवा परीक्षांमधून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करावी.सिलेक्शन कमिशन , महाराष्ट्र लोकसेवा आयोग, रेल्वे रिक्रुटमेंट बँकिंग आदि स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात .उपलब्ध पदांची संख्या ही कधी शंभरात तर कधी हजारात असते. त्यात आपल्याला टिकायचे असेल तर अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. भारतात सर्वात जास्त लोक भारतीय रेल्वेमध्ये काम करतात. त्या खालोखाल नंबर लागतो तो भारतीय सैन्य दलाचा. सरकारी नोकरीमध्ये ठराविक कालावधीनंतर तसेच विभागीय परीक्षा द्वारे बढतीच्या संधी देखील प्राप्त होतात. सरकारी नोकरीत जायचे असेल तर स्पर्धा परीक्षांना सामोरे जावेच लागते .त्यांचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती आत्मसात करावी लागते. मानव्यविद्या शाखेतील सर्व विषयांचा अभ्यास करावा लागतो.दुस-या सत्रात न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य योगेश पुंड यांनी मोटिव्हेशनल स्पीच दिले. करियर करण्यासाठी नियोजन, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी असेल तरच यशाचे शिखर गाठता येते असे ते म्हणाले.खुल्या सत्रामधे विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने प्रश्न विचारले व मान्यवरांनी निराकरण केले, अध्यक्षीय सूचना विजया फलके हिने मांडली तर अध्यक्षीय अनुमोदन पुजा सोनवणे  हिने दिले..चर्चासत्राचे संयोजन स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. विठ्ठल सदाफुले,करीअर गायडन्सचे समन्वयक डॉ.अशोक माने ,अंतर्गत गुणवत्ता विभागाचे समन्वयक डॉ. बाबासाहेब पवार,प्रा विकास नालकर यांनी केले.या चर्चासत्रासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.महाविद्यालयाच्या प्राचार्या गुंफा कोकाटे यांनी प्रास्ताविक केले .पायल म्हस्के हीने सूत्रसंचलन केले तर मनीषा मुसमाडे हीने आभार मानले .

श्रीरामपूर प्रतिनिधी-अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहरालगत असलेल्या रांजणखोल (ता. राहाता) येथील गोदामावर छापा टाकून विनापरवाना साठविलेलीसुमारे 6 कोटी 50 लाख रुपये किमतीचीदूध पावडर व व्हे पावडरचा साठा जप्त केला.अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करीत असल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान संबंधिताच्यावतीने हजर झालेल्या अधिकार्‍यांनी या साठ्याबाबत कोणताही समाधानकारक खुलासा केला नाही, अथवा कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत.सहाय्यक आयुक्त स. पा. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन अहमदनगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी सहाय्यक आयुक्त प्रमोद काकडे, अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार व नमुना सहाय्यक अधिकारी प्रसाद कसबेकर यांनी सदरची कारवाई केली.याठिकाणच्या पावडरचे नमुने प्रयोशाळेत पाठविण्यात आले असून अन्न नमुने अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रौ उत्सवानिमित्ताने माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही योजना राबविण्यात येत असुन महीलांनी या योजनेचा लाभ घेवुन आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे अवाहन मा.जि प सदस्य शरद नवले यांनी केले आहे           माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेचा शुभारंभ बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्या स्वाती अमोलिक,तंटामुक्ती चे माजी अध्यक्ष प्रकाश कुऱ्हे,संदीप शेरमाळे बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँक्टर देविदास चोखर डाँक्टर मृण्मयी कुटे डाँक्टर मंजुश्री जाधव, गावकरी पतसंस्थेचे संचालक सचिन वाघ, सागर ढवळे,किशोर कदम, बापूसाहेब वडितके उपस्थित होते आपल्या भाषणात नवले पुढे म्हणाले की बेलापुर ग्रामपंचायतीचे शतक महोत्सव आहे त्या निमित्ताने ग्रामपंचायती मार्फत महीलांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे या वेळी माहीती देताना डाँक्टर देविदास चोखर म्हणाले की आरोग्य विभागाच्या वतीने १८ वर्षावरील सर्व महीलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे नऊ दिवस नवविवाहीत गरोदर स्तनदा तसेच वयोवृद्ध महीलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे सर्व महीलांची आरोग्य तपासणी करुन महीला सबलीकरण करण्याचा शासनाचा मानस आहे या तपासणीत गंभीर आजार असणाऱ्या महीलाना तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार असुन या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बारा गावे येत असुन सहा उपकेंद्र आहेत त्या सर्व ठिकाणी ही तपासणी मोहीम राबविली जाणार असल्याचे डाँक्टर चोखर यांनी सांगितले या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे स्वाती अमोलीक यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी आरोग्य सहाय्यक प्रशांत गायकवाड श्रीमती ग्रेटा कदम श्रीमती नेहुलकर रत्ना नागले आशा कुताळ महेंद्र मेश्राम गणेश टाकसाळ संतोष शेलार श्रीमती सय्यद पंडीत पत्रकार देविदास देसाई  किशोर कदाम दिलीप दायमा आदिसह नागरीक उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )- राष्ट्रीय नवरात्रौ उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलापुर विभागाच्या वतीने श्री दुर्गामाता दौड २०२२चे आयोजन करण्यात आले असुन या दुर्गामाता दौडमुळे गावाचे वातावरण भक्तिमय झाले आहे .                       दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलापुर विभागाच्या वतीने श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी साडेपाच वाजता सर्व युवक युवती गावातील शनि मंदिरासमोर एकत्र होतात श्री छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याला अभिवादन करुन गावातील प्रत्येक गल्लीतुन ही फेरी जात असते वेगवेगळी पद्य गात जागो हिंदु जागो अशी हाक देत ही दौड जनजागृती करत आहे गावातील महीला देखील या दौडचे भक्तीभावाने स्वागत करत आहे महीला आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढुन ध्वजाचे पुजन करुन तरुणांचा उत्साह वाढवत आहेत देव देश धर्म ही भावना जागृत ठेवुन माता तुळजाभवानी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आशिर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांचे अपूर्ण स्वप्न पुर्ण करण्यासाठी प पू गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतुन तरुण पिढीला व्यसनापासुन दुर करणे समाजात लव्ह जिहादचे प्रमाण वाढत आहे जबरदस्तीने धर्मांतराचे करण्याचे प्रकार वाढत आहे, त्याकरीता जनजागृती करणे हिंदु संघटन करणे नागरीकात आपापसात प्रेमभाव निर्माण करणे हे मुख्य कार्य डोळ्यासमोर ठेवुन श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान बेलापुर विभाग कार्य करत आहे , गावातुन फेरी पुर्ण झाल्यानंतर देविच्या मंदिरात आरती करुन दौडची सांगता होते .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget