December 2021

अहमदनगर-  जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक बसून, एकंदरीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी माझ्या संकल्पनेतील टुप्लस योजना सर्वच पोलिस ठाण्यात  प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाई केलीच, पण त्याच्या गुन्हेगारी हालचालीवर पोलिस प्रशासनाला बारकाईने लक्ष ठेवाता आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके, नूतन नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे हे उपस्थित होते.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज  पाटील पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व संबंधित आरोपीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाईसाठी अहमदनगर जिल्हयात २०११ पासून प्लस योजना कार्यान्वयीत करण्यात आली.  योजनेसाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच कमी कालावधीत टुप्लस योजनेसाठी लागणारी माहिती तात्काळ उपलब्ध होण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर आणि स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर येथे एक पोलिस अधिकारी व दोन पोलिस अंमलदार यांची टुप्लस पथक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्याकडून  मालाविषक ज्या दोनदोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची सन २०११ पासून माहीती संकलित करण्यात आली. शरीरविषयक ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची सन २०१५ पासून माहीती संकलित करण्यात आली.  संकलित केलेली माहीती टु प्लस पथकामार्फत टु प्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आलेली आली.अहमदनगर जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२१ पासून टुप्लस योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुरुवातीस ३८४९ (मालाविषयक-१९१४,शरीरविषयक -१९२७) आरोपींचा टुप्लस योजनेमध्ये  समावेश करून त्यांची संकलित केलेली  माहिती टुप्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आली होती.जानेवारी २०११ पासून ते आजपावेतो दैनंदिन अटक आरोपीमधून नव्याने १००२ (मालविषयक ४९२, शरीराविषयक १९२७ ) आरोपी टुप्लस योजनेमध्ये समावेश करून त्यांची संकलित केलेली माहिती टुप्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आलेली आली आहे.जानेवारी २०२१ पासून ते आजरोजी पर्यंत दैनंदिन अटक आरोपींमधून नव्याने १००२ (मालविषयक ४९२, शरीराविषयक,५१०) आरोपी निष्पन्न करण्यात करण्यात आले असून आजपोवतो ४८४३ आरोपी वेबसाईटवर माहिती  भरण्यात आलेली आली आहे. ४८ ४३ आरोपीमध्ये मालाविरुद्ध एकूण २४०६ गुन्हेगार आहेत.  शरीराविरुध्द २४३६ गुन्हेगार आहेत. मालाविरूध्द गुन्हे करणारे २४०६ गुन्हेगारांमधून ५७० सराईत , प्रोफेशनल, व्यवसाईक गुन्हेगार निवडून त्यांची माहिती प्रोफेशनल क्रिमिनल वेबसाईटवर भरण्यात आलेली आहे. अशा टुप्लस वेबसाईटवर सामाविष्ठ ४८४३ आरोपींमधून आजपावेतो मालाविषयक २५० व शरीरविषयक १५१ अशा एकूण ४०१ टोळ्या निष्पन्न करण्यात आल्या आहे.  ज्या क्रियाशिल टोळया आहेत, अशा टोळयांवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.आरोपींचे मेळावे घेतली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये  जानेवारी २०२१ पासून टुप्लस योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर सुरुवातीस ३८४१ आरोपींचा टुप्लस योजनेमध्ये समावेश करण्यात आला.  अशा आरोपीचे गुन्हयांसंबंधी मत परिवर्तन करण्यासाठी अहमदनगर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला आरोपीचे मेळावे घेण्यात आले. मार्गदर्शन करण्यासाठी समाज प्रबोधनकार कायदातज्ञ व्यक्ती, न्यायाधिश यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्यात आले होते. काही ठिकाणी  स्वतः भेट देवून आरोपींना मार्गदर्शन केले. मेळाव्यात   आरोपीचे फोटो, फिंगर प्रिंट तसेच इतर माहीतीचे फॉर्म भरुण घेण्यात आले, असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.


मुंबई,नाशिक-गेल्या तीन दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एकीकडे राज्याच्या चिंतेत भर पडलेली असतानाचा नाशिकमध्येही काल (दि ३०) ओमायक्रोनचा रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे....राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून टास्क फोर्स आरोग्य विभागाच्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय जारी करण्यात आला आहे.राज्याने घेतलेला निर्णय जसाच्या तसा नाशिक जिल्ह्याला लागू होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे  यांनी म्हटले आहे. राज्याने घेतलेल्या निर्णयानुसार सांस्कृतिक, धार्मिक , राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्याला  केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. ३१ डिसेंबरला होणारी गर्दी लक्षात घेता पर्यटनस्थळावर जमावबंदी  लागू करण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.करोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील असेही काल मध्यरात्री जारी करण्यात आलेल्या नियमावलीत म्हटले आहे. राज्यात तब्बल ५ हजार ३६८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २२ रुग्ण दगावल्याची नोंद आहे. राज्यात काल(दि ३०) एकूण १९८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.राज्यात आतापर्यंत ४५० ओमायक्रॉनबाधितांची नोंद  झाली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर बेलापुर रोडवर असलेल्या ओम साई पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या नेहे यांच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी जवळपास आडीच लाख रुपयाचा ऐवज लंपास केला                                              या बाबत मिळालेली माहीती अशी की सर्व प्रथम चोरट्यांनी प्रकाश पाटील नाईक याच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु आवाजाने युवराज नाईक यांना जाग आली त्यांनी तातडीने घरातील सर्व लाईट लावले त्यामुळे चोरट्यांनी तेथुन काढता पाय घेतला त्यानंतर चाँदनगर येथे प्रवेश केला स्थानीक नागरीकांनी चोरट्यांना

पहाताच पोलीसांना फोन केला पोलीस गाडीच्या सायरनच्या आवाजामुळे चोरटे तेथुन पुढे सरकले त्या नंतर नवले वस्तीवरील दादा कुताळ यांच्या वस्तीवर ते गेले तेथेही लोक जागे असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा ओम् साई पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या बाळासाहेब नेहे यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवीला तेथे त्यांनी पाठीमागील दरवाजाला लाथ मारली दोन ते तीन लाथात तो लाकडी दरवाजा उघडला गेला चार जणांनी घरात प्रवेश केला एक जण बाहेर पहारा देत होता घरात बाळासाहेब नेहे व त्यांची पत्नी पुष्पा हे दोघेच होते त्यांना एका बाजुला बसवुन चोरट्यांनी घरात उघका पाचक केली घरातील सोन्याची अंगठी पपोत गळ्यातील मनीमंगळसूत्र कानातील झुबे असा चार तोळे दागीने व ५७ हजार रुपये रोख घेवुन चोरट्यांनी अवघ्या दहा मिनीटात तेथुन पोबारा केला पावणे तीन वाजता उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना दादा कुताळ यांनी चोर आल्याचे कळविले त्यामुळे त्यांनी तातडीने ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश दिला परंतु तोपर्यत चोरटे आपले काम फत्ते करुन पळून गेले घटना घडताच काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर कुऱ्हे वस्तीकडे कुत्री भुंकण्याचा आवाज आल्यामुळे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ हे पोलीस त्या दिशेने गेले परंतु तोपर्यत दरोडेखोर पसार झाले होते काही वेळातच पोलीस निरीक्षक संजय सानप फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले अहमदनगर गुन्हा अन्वेषनची टिमही घटनास्थळी पोहोचली श्वानपथक तसेच ठसे तज्ञांनाही बोलविण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही घटनास्थळी भेट दिली चोरटे मराठीत बोलत होते पुष्पा नेहे यांच्या कानातील दागीना लवकर निघाला नाही त्या वेळी निघत नसेल तर राहु द्या काढु नका असेही दरोडेखोर म्हणाले.


श्रीरामपूर प्रतिनिधी-कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी श्रीरामपुरातील आपले काम आटोपून पुन्हा आपल्या गावी जात असताना पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्या शेतकर्‍यास चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम, मोबाईल व मोटारसायकल घेऊन पसार झाले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी नानासाहेब लक्ष्मण नेहे हे त्यांच्या एमएच 17-बीसी 6022 हे मोटारसायकलवरुन ते त्यांच्या दौडेवाडी या गावी चालले होते. श्रीरामपूर एमआयडीसी जवळील यशवंत बाबा चौकी याठिकाणी पाठिमागून पल्सर या मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या मोटारसायकलला आडवी लावून त्यांना थांबण्यास भाग पाडले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत तुमच्याकडील रोख रक्कम काढा असे म्हणताच यांनी त्यांच्या खिशातून 250 रुपये रोख काढून दिले. तसेच त्यांच्याकडे असलेला मोबाईल व मोटारसायकल या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नानासाहेब लक्ष्मण नेहे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि कलम 392, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप व त्यांच्या पोलीस पथकाने भेट देऊन पहाणी करत चौकशी केली.


श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहर पोलिसांनी काल रात्री दोन वेगवेगळ्या घटनेत शहरातून एक गावठी कट्टा व काडतूस तसेच धारदार तलवार अशी हत्यारे जप्त केली. याप्रकरणी शहरातील वॉर्ड नं. 1 व वॉर्ड नं. 2 मधील दोन तरुणांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.याप्रकरणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संजय सानप यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी शहर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यांतर पोलिसांच्या पथकाने पहिल्या घटनेत वॉर्ड नं. 1 गोंधवणी रोड, लबडे पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर रात्री 11.50 च्या सुमारास हातात धारदार तलवार घेऊन आरडाओरड करताना इरफान सय्यद याला पकडले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल महादेव नरवडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून इरफान सय्यद (वय 19, रा. मिल्लतनगर, वार्ड नं. 1, श्रीरामपूर) याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुरनं. 868 दाखल करण्यात आला. पोलीस नाईक पवार पुढील तपास करीत आहेत.तर दुसर्‍या घटनेत श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 सुलताननगर भागात रात्री 12.10 च्या सुमारास पोलिसांनी जोएब शेख याच्याजवळून सिल्व्हर रंगाचे देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतूस ताब्यात घेतले. त्यावर 7.62 असे छापलेले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक पंकज विजय गोसावी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून जोएब अन्सार शेख (वय 28, रा. काझीबाबा रोड, वार्ड नं. 2 श्रीरामपूर) याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुरनं. 869 दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार विठ्ठल पाटील हे पुढील तपास करीत आहेत.पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी दोन्ही घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर या घटनेतील इरफान सय्यद व जोएब शेख या दोघांनाही अटक करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.


बेलापुर (प्रतिनिधी)-समता स्पोर्टस् क्लब गेल्या तीस वर्षापासुन अखंडपणे  नाताळ व नव वर्षाच्या निमित्त विविध स्पर्धा आयोजीत करत असुन बौध्दीक स्पर्धेच्या काळात भरविलेल्या धावण्याच्या स्पर्धा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे यांनी व्यक्त केले.


समता स्पोर्टस् क्लबच्या वतीने नाताळ व नव वर्षाचे औचित्य साधुन धावण्याच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील ६० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला मागील वर्षी कोरोनामुळे या स्पर्धेत खंड पडला होता  या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संविधान हिवराळे (बाळापूर अकोला), द्वितीय क्रमांक विक्रम  बोराडे (नगर), तृतीय क्रमांक देशमुख राहुल (श्रीरामपूर), चतुर्थ क्रमांक खंडागळे प्रदिप भारत (टाकळीभान), तर उत्तेजनार्थ पाचवा आणि सहावा क्रमांक अनुक्रमे अजय साबळे (खैरी), भानगुडे विजय (बोधेगाव) यांनी मिळवला. सदर स्पर्धेचे उद़्घाटन उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते तसेच, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले, जेष्ठ पत्रकार देविदास देसाई, माजी सरपंच भरत साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्या नंतर विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले, त्या वेळी ससाणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, समता स्पोर्ट क्लबच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या मैदानी खेळांच्या स्पर्धेतून नक्कीच बेलापूरातून नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील. यावेळी सचिन गुजर, अरुण पाटील नाईक, देविदास देसाई, प्रा.बाबासाहेब शेलार आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक, अनिल पवार, विलास मेहेत्रे, रमेश शेलार, शाहनवाज सय्यद, उपेंद्र कुलकर्णी, प्रकाश कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.


या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समता स्पोर्टस् क्लबचे विजय शेलार, संजय शेलार, सुहास शेलार, बंन्टी शेलार, बाबासाहेब शेलार, संतोष शेलार, अक्षय शेलार, रोहीत शेलार, प्रसाद शेलार, राहूल शेलार, रोहन शेलार, संकेत शेलार, सुयश शेलार, निनाद शेलार, ललित शेलार, निशिकांत शेलार, रामा उमाप आदिंनी विशेष परिश्रम घेतले.


बेलापुर (प्रतिनिधी  )-खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने समता स्पोर्टस् क्लबने नाताळ व नव वर्षाचे निमित्त साधुन सायकल स्पर्धाचे केलेले आयोजन हे निश्चितच कौतुकास्पद आहे असे मत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक यांनी व्यक्त केले                                         नाताळ व नव वर्षाच्या निमित्ताने  दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी बक्षिस वितरण करताना ते बोलत होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जनता अघाडीचे अध्यक्ष व खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळूंके जेष्ठ पत्रकार देविदास देसाई बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक विलास मेहेत्रे भाऊसाहेब कुताळ सुधाकर खंडागळे उपस्थित होते या वेळी बेलापुर ते रामगड व परत बेलापुर अशी सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती  या स्पर्धेत अहमदनगर येथील शशिकांत आवारे यांनी प्रथम क्रमांकाचे सायकल व रोख पाचशे रुपयाचे पारितोषिक मिळविले शिरसगाल येथील राहुल देशमुख याने द्वितीय क्रमांकाचे रोख २२२२ रुपयाचे  पारितोषिक मिळविले पाथर्डी येथील तुकाराम मरकड यांनी तृतीय क्रमांकाचे रुपये ११११रुपयाचे बक्षिस मिळविले निमगाव खैरी येथील कैलास सोनवणे यांनी चतुर्थ क्रमांकाचे  ७७७रुपयांचे पारितोषिक मिळविले तर करजगावचे चैतन्य कोल्हे याने उत्तेजनार्थ रुपये ५५५रोख पारितोषिक मिळविले मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला या वेळी ग्रामपंचायत सदस्या स्वाती अमोलीक बाबुलालाभाई शफीक आतार शहनवाज सय्यद आरपीआयचे सागर खरात समता स्पोर्टस् क्लबचे विजय शेलार संजय शेलार सुहास शेलार बंन्टी शेलार रमेश शेलार बाबासाहेब शेलार संतोष शेलार अक्षय शेलार रोहीत शेलार प्रसाद शेलार संकेत शेलार सुयश शेलार निनाद शेलार ललित शेलार निषौकांत शेलार रामा उमाप आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी विजय शेलार यांनी आभार मानले या वेळी संजय शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.



श्रीरामपूर प्रतिनिधी- ओमायक्रॉन( Omicron) या जलद गतीने पसरणाऱ्या कोविड विषाणू प्रकाराचा पहिला बाधित रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून नम्र आवाहन करण्यात येत आहे.कोविड-19 च्या संभाव्य गंभीर परिणाम तसेच लक्षणांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. तथापि श्रीरामपूर तालुक्यात प्रशासनाकडून वारंवार आवाहनासह दररोज विविध ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित करून देखील लसीचा पहिला डोस अद्याप (18 वर्षांहून जास्त वयाच्या) जवळजवळ 65-70 हजार नागरिकांनी घेतलेला नाही. तसेच साधारण 33 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याची मुदत उलटून गेली असून देखील अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही.म्हणजेच तालुक्यातील अंदाजे एक लाख (18 वर्षांवरील) सज्ञान व्यक्ती,लसीचा मुबलक पुरवठा उपलब्ध असूनदेखील कोविड पासून जाणीवपूर्वक सुरक्षित झालेले नाहीत. लस न घेणाऱ्या व्यक्तींच्या स्वतःच्या जीविताबाबतची ही उदासीनता भविष्यात गंभीर स्वरूपाची वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्याची समस्या निर्माण करू शकते.तरी लसीकरण न झालेल्या सर्व नागरिकांना पुनःश्च तात्काळ नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेण्याचे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. लसीकरणासोबतच सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे,मास्कचा वापर करणे या उपायांचा अवलंब करणे अनिवार्य आहे.पुढील काळात प्रशासनाचे भरारी पथके बाजारपेठेत,मंगल कार्यालय अशा गर्दीच्या ठिकाणी अचानक भेटी देतील व कोविडच्या प्रतिबंधात्मक नियमांचा भंग झाल्याचे, प्रत्येक दुकानातील सर्व कर्मचारी व त्यावेळी असलेल्या ग्राहकांचे दोन्ही डोस लसीकरण झालेले नसल्याचे ( हे तात्काळ तपासण्याची व्यवस्था अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे ) व मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा आस्थापना,दुकाने तात्काळ सिलबंद करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.समाजातील जबाबदार व्यक्ती,संस्था,घटकांनी आपापल्या परीने जनमानसात लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करावी व 100% लसीकरण पूर्ण करून श्रीरामपूर तालुक्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी आपण सर्वांनी तोंड दिलेल्या भयावह स्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती तहसिलदार तथा इनसिडेंट कमांडर,श्रीरामपूर.



अहमदनगर प्रतिनिधी-अहमदनगर जिल्हयामध्ये दैनंदिनरित्या 40-70 दरम्यान कोरोना बाधीत रुग्णसंख्या आढळून येत असल्याने दक्षिण आफिक्रा आणि इतर काही देशांमध्ये कोविड-19 विषाणूचा B.1.1.529 हा नवीन व्हेरिएंट आढळून आलेला असून त्यास जागतिक संघटनेव्दारे (W.H.0.) ओमायक्रॉन हे नाव दिलेले आहे. सदर नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव हा कोविड-19 विषाणूच्या पूर्वीच्या व्हेरिएंट पेक्षा अतिशय वेगाने पसरत असल्याचे आढळून आलेले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे, असे सर्व टास्क फोर्स तसेच आरोग्य विषयक तज्ञांकडून वारंवार सूचित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सांगोपांग चर्चा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये या विषयासंदर्भात नागरिकांना अधिक प्रमाणात लसीकरणासाठी प्रवृत्त करणेसाठी काही ठोस उपाययोजना करणेचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषत्वाने लसीकरण न झालेले नागरिक समूहात मिसळल्यास त्यांचे स्वतःचे आरोग्याचे दृष्टीने तसेच आजाराच्या प्रसाराच्या दृष्टीने अधिक धोकादायक ठरू शकतात ही बाब विचारात घेऊन सार्वजनिक ठिकाणी अशा नागरिकांना प्रवेश देताना त्यांचे लसीकरणाबाबत शहानिशा करणे अनिवार्य करून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणेबाबत धोरण स्विकारणेस दि.24/12/2021 रोजीच्या बैठकीत सर्व संमतीने मान्यता देण्यात आलेली आहे.त्याअर्थी, मी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर, साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन अहमदनगर जिल्ह्यात खालीलप्रमाणे निर्बध दि.25/12/2021 पासून लागू करीत आहे.

1) अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना/कार्यालये,व्यावसायिक व औदयोगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह,लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात “No Vaccine No Entry” याप्रमाणे निबंध लागू करीत आहे.
2) वरीलप्रमाणे प्रत्येक आस्थापना यांनी त्यांचे कार्यस्थळी येणा-या नागरिकांना कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरणाची किमान एक मात्रा घेतल्याची खात्री करणे बंधनकारक राहील. व
याशिवाय प्रवेश देणे प्रतिबंधित राहील.
3) कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि कोविड अनुरूप वर्तन (Covid Appropriate Behaviour) चे तसेच राज्य व केंद्र शासन निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.
4) वरील ठिकाणी प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीने योग्य पध्दतीने मास्क परिधान करणे, नाक व
तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे.
वरीलप्रमाणे सर्व संबंधितांनी कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि कोविड
अनुरूप वर्तन (Covid Appropriate Bahaviour) चे तसेच वरीलप्रमाणे शासन निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत
पालन करणे बंधनकारक राहील. यासंदर्भात कोणतेही उल्लंघन दिसून आल्यास शासन आदेश दि.27/11/2021 मध्ये नमूद केलेप्रमाणे शास्ती करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.



बेलापुर  (देविदास देसाई  )-श्रीरामपुरात पहीला ओमीक्राँनचा रुग्ण आढळला असुन ज्यांनी अजुनही कोविड लसीचा पहीला किंवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी ताबडतोब लस घ्यावी असे अवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.नायजेरीयाहुन दोन नागरीकांचे श्रीरामपुर तालुक्यात आगमन झाले होते त्याच्या आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आल्या होत्या त्या पाँझीटीव्ह आल्या त्यामुळे दोघाच्याही ओमीक्राँन टेस्ट करण्यात आल्या असुन त्यात एकाचा अहवाल पाँझीटीव्ह आल्यामुळे श्रीरामपुराकरांचा जिव टांगणीला लागलेला आहे कोविड लसीकरणाचे काम अतिशय धिम्या गतीने चालू असून लसीकरण करुन घेण्यास नागरीकांचा उत्साह कमी आहे लस सर्वत्र उपलब्ध आहे तरी देखील काही नागरीक लस घेत नाही त्यामुळे प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तालुक्यातील जनतेला अवाहन केले आहे की कोविड लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असुन नागरीकांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे प्रत्येकाने मास्क वापरणे सक्तीचे आहे घरी गेल्यावर हात स्वच्छ धुवा आपली काळजी आपणच घ्या आपण सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवा असे अवाहन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले आहे




बेलापूर (प्रतिनिधी )-दरवर्षीप्रमाणे नाताळ व नवीन वर्षानिमित्त समता स्पोर्ट क्लबच्या वतीने भव्य सायकल व रनिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात असल्याची माहीती समता स्पोर्ट क्लबच्या वतीने देण्यात आली आहे.समता स्पोर्ट क्लबच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की नाताळ व नव वर्षाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेआहे शनिवार, दि. २५/१२/२०२१ रोजी सकाळी ९.००  वाजता सायकल स्पर्धा होणार असून यासाठी प्रथम बक्षिस: सायकल, निर्मला जोगदंड यांचे तर्फे ( स्व. अजीत शेलार यांचे स्मरणार्थ), द्वितीय बक्षिस: २२२२, प्रा. बाबासाहेब शेलार यांचे तर्फे (अध्यक्ष, जागृती प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालय, बेलापूर), तृतीय बक्षिस : ११११, शाहनवाज सय्यद, सहारा ग्रुप यांचे तर्फे, चौथे बक्षिस: ७७७ (स्व. छबुबाई पावलस शेलार यांचे स्मरणार्थ) सुयश शेलार व अतिश शेलार यांचे तर्फे तर, उत्तेजनार्थ : ५५५, मनोज खर्डे व कैलास गांगुर्डे यांचे तर्फे देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रविवार, दि. २६/१२/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता खुल्या रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम बक्षिस: ३३३३ विशेष राहुल शेलार व जोएल राजेंद्र शेलार यांचे तर्फे, द्वितीय बक्षिस: २२२२ राजमहंमद शेख यांचे तर्फे, तृतीय बक्षिस: ११११ इब्राहिम शेख यांचे तर्फे (सिव्हील कॉन्ट्रॅक्टर) चौथे बक्षिस: ७७७ मा. भाऊसाहेब तेलोरे यांचे तर्फे तर उत्तेजनार्थ : ५५५ गोरख फुलमाळी यांचे तर्फे देण्यात आले आहे. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत. प्रवेश फी नाममात्र १०रु. आहे. स्पर्धेचे ठिकाण झेंडा चौक, बेलापूर बु.II असून इच्छूकांनी 9370207224, 9503902858, 9370207224 या मोबाईल नंबरशी संपर्क साधून स्पर्धेत जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन समता स्पोर्ट्स क्लबचे विजय शेलार, संजय शेलार, सुहास शेलार, बंन्टी शेलार, संतोष शेलार, अक्षय शेलार, संकेत शेलार, सुयश शेलार, निनाद शेलार, ललित शेलार, निष्कांत शेलार, रामा उमाप आदिंनी केले आहे.



श्रीरामपूर - येथील गोंधवणी भागातील नवीन पिण्याच्या पाण्याच्या तलावांमध्ये डुकरांचा मुक्तसंचार असून हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात येत असल्याने पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्ष बद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने नवीन साठवण तलाव  निर्माण केलेला आहे.मात्र या तलावाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही येथे वाजपेय असणे गरजेचे असताना तिथे वाचमेन वगैरे नाही त्यामुळे सर्व प्रकारची जनावरे त्या पाण्यामध्ये मुक्त संचार करतात तलावाच्या मागच्या बाजूने मिल्लत नगर कडील भागातून भिंत उंच नसल्याने वेगवेगळ्या प्रकारची जनावरे तलावात उतरतात यामध्ये डुकरांचा देखील समावेश आहे पाण्यामध्ये मनसोक्त डुंबत असल्याने पाणी दूषित होत आहे आणि हेच दूषित पाणी नागरिकांना पिण्यासाठी

सोडले जात आहे हे विशेष याबाबत काही जागरूक नागरिकांनी या डुकरांच्या तलावाच्या पाण्यात संचार करणारे फोटोसोशल मीडियावर पाठवून नगरपालिकेचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे मात्र पालिकेचा आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभाग यांनी या बाबीकडे सपशेल कानाडोळा केल्याने डुकरांच्या या तलावातील संचारा बद्दल प्रतिबंधात्मक कोणतीही उपाययोजना होऊ शकलेली नाही .नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी जरगावातील पाणी आपल्या घरात पीत असतील तर किमान त्याचे भान ठेवून तरी अशा जनावरांपासून या तलावाच्या संरक्षण व्हावे यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशा प्रकारची जनावरे तलावाच्या पाण्यात उतरणार नाही यासाठी वाचमेन किंवा इतर बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे केली आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने बेलापूर खूर्द मळहद शिवारात जुगार अड्ड्यावर  छापा टाकुन पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन दहा जणाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे                                              या बाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की बेलापुर खूर्द शिवारातील मळहद सातभाई वस्ती शिवारात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरु आहे लगेच कारवाई केली तर सर्व जुगारी पकडले जातील अशी खबर मिळाल्यावरुन उपविभागीय  पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी राजेंद्र आरोळे यांना संबधीत ठिकाणी छापा टाकण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या आदेशानुसार राजेंद्र आरोळे विलास उकीर्डे रविंद्र माळी रविंद्र बोडखे नितीन शिरसाठ या पथकाने दोन पंचाना सोबत घेवुन सातभाई वस्ती मळहद शिवारात छापा टाकला असता चिंचेच्या झाडाखाली आडोशाला काही ईसम तिरट नावाचा पत्त्याचा जुगार खेळत असताना आढळून आले पोलीसांनी जुगाराचे साहीत्य मोबाईल मोटार सायकली सह सर्वांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे दोन लाख एकाहत्तर हजार नऊशे वीस रूपयांचा मुद्देमाल मिळून आला या वेळी चंद्रकांत राजाराम खरोटे प्रविण कचरु मांजरे दिपक विनायक गायकवाड संजय दिनकर जगताप सुनिल दिगंबर शिदे रज्जाक सरदार शेख गौरव आण्णासाहेब घुले संजय कचरु राऊत लक्ष्मण मोरे ज्ञानेश्वर गोपीनाथ बर्डे हे तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले असुन त्यांचेवर मुंबई जुगार कायदा कलम 12अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध धंद्याबाबत श्रीरामपुरात शिवप्रहार प्रतिष्ठाणच्या वतीने उपोषण करण्यात आले होते त्यामुळे काही काळ अवैध धंदे बंद होते परंतु आता पुन्हा नव्या जोमाने गुटखा मटका जुगार बिंगो लाँटरी हे अवैध सुरु झाले असुन उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी या अवैध धंद्यांना आवर घालावा अशी मागणी नागरीकाकडून केली जात आहे.




पाथर्डी (प्रतिनिधी)-तालुक्यातील जांभळी गावाच्या शिवारात उसाच्या शेतामधे बनावट दारूची निर्मिती केली जात होती. राज्य उत्पादन शुल्कच्या अहमदनगर पथकासह पाथर्डी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. या छाप्यात बनावट तयार केलेली दारू व दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा पाच लाख 25 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बनावट दारू तयार करणारा विजय बाबुराव आव्हाड (रा. जांभळी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार अनिल बडे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी आव्हाडला अटक केली आहे. बनावट दारू निर्मितीप्रकरणी यापूर्वीही आव्हाड याला दोन वेळा अटक केली आहे. तरीही त्याने हा उद्योग सुरूच ठेवला होता. त्याने घराशेजारीच उसाच्या शेतामध्ये बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. याची खबर पोलिसांना लागली होती. मंगळवारी सकाळी पोलिसांनी आव्हाड याच्या बनावट दारू तयार करण्याच्या कारखान्यावर छापा मारला. तेथे 600 लीटर स्पिरीट, दोन पाण्याच्या टाक्या, लेबल, स्क्रिनपेंटींगचे मशीन, बुच लावण्याचे मशीन, विविध कंपनी लेबरच्या दारू बाटल्या असा मोठा ऐवज पोलिसांना सापडला. पोलीस आले त्यावेळी आव्हाड बनावट दारूची निर्मिती करत होता. आव्हाड याच्या विरूद्ध यापुर्वीही बनावट दारू प्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. त्याने पुन्हा तोच उद्योग सुरू केल्याची माहीती पोलिसांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, कौशल्यराम वाघ, पोलीस अंमलदार अनिल बडे, भगवान सानप, राहुल तिकोने, अल्ताफ शेख, देवीदास तांदळे, सागर मोहिते, भारत अंगरखे, राजेंद्र सुद्रिक, प्रतिभा नागरे, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक बी. टी. घोरताळे, ए. बी. बनकर, एस. बी. विधाटे, एन. एस. उके, यु. जी. काळे, एस. व्ही. बिटके, एस. आर. आठरे, महसुलचे विजय बेरड, सदानंद बारसे, देविदास फाजगे आदी अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली. 



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget