Latest Post

श्रीरामपुरात प्रतिनिधी- शहरातील एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व प्राथमिक  या शाळा ची पुर्ण पणे दुरवस्था झाली आहे.  मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर शाळा ची वालकॅमपाऊड भिंत खचली व तुटली आहे ,मुलांना  मुतारी व सौचलय  मोडके आहे खेळाला मैदान शौच्छालय नाही आशा अनेक कारण्यावरून भारतीय लहुजी सेना यांनी विस्तार आधीकारी संजिवन  दिवे पंचायत समिती यांना निवेदन मध्ये कळवीयात आले आहे. सदर मागणी आठ दिवस पुर्ण न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन  26/4/022 दिवसीय  करण्यात येईल असा इशारा भारतीय लहुजी सेना च्या वतीने निवेदन मध्ये  सांगीतले आहे. सदर निवेदन मध्ये मा बाळासाहेब बागुल राष्ट्रीय अध्यक्ष, हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, रज्जाक भाई शेख नगर जिल्हा अध्यक्ष, रईस शेख जिल्हाप्रसिद्धी प्रमुख, राजेंद्र त्रिभोवन जेष्ठ पत्रकार, साबीर शाहा, शेरू कुरेशी, अमजद कुरेशी, आदी च्ये सह्या आहे.

श्रीरामपूर-चित्रकार भरतकुमार उदावंत व चित्रकार रवी भागवत संचलित रंगलहरी आर्ट ॲकॅडमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगलहरी चित्रकला स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद लाभला. विविध वयोगटातील सुमारे १५०० हून अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेऊन चित्रकलेचा आनंद लुटला. स्पर्धेचे वैशिष्ठय् म्हणजे वय वर्षे ४ पासून ६५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनी देखील यात सहभाग नोंदविला.येथील रंगलहरी कला दालनाच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन किशोर निर्मळ, संदिप शाह, राजेंद्र कांबळे, अजय डाकले, दिलीप कांबळे, चेतन नलावडे, विश्वजीत सुखदरे, सुरज सोमाणी, अशोकराज आहेर, प्रसिद्ध निवेदक संतोष मते, अभिषेक खंडागळे, बिनीत शाह उदावंत, भागवत, आदींच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. किलबील, लहान, मध्यम व खुला अशा चार गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निर्मळ म्हणाले,

सांस्कृतिक वारसा वाढविणयासाठी अशा उपक्रमांचे वरचेवर आयोजन करणे गरजेचे आहे. त्यातून येणारी पिढी मनाने सशक्त बनेल . सर्वच वयोगटातील स्पर्धकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद बघून भारावलो असल्याचे ते म्हणाले.राजेंद्र कांबळे म्हणाले, कलेच्या सानिध्यात मनुष्याला किती आनंद मिळतो, हे आज पहावयास मिळाले. कुठल्याही कलेची साधना केल्यास मनुष्याच्या आयुष्यात नकारात्मकता प्रवेशच करू शकत नाही. ही कलेची ताकद असते.आयोजकांकडून स्पर्धकांना ड्रॉईंग शिट्स वाटप करण्यात आले होते तरीही काही स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खर्चाने कॅनव्हॉस, हॅण्डमेड पेपर्स आणून चित्रे काढली. कोरोनामुळे दोन ते तीन वर्षांपासून अशा स्पर्धांचे आयोजन होत नव्हते. त्यामुळे रंगलहरी आर्ट ॲकॅडमीने राबविलेल्या या उपक्रमास श्रीरामपूर तालुक्यासह, नाशिक, पुणे, कोपरगाव, राहाता येथील स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पत्रकार विकास अंत्रे, अशोकराज आहेर, श्री. धनवटे सर, संदिप कासार,  जीवन सुरूडे, सत्यजित उदावंत, अमितराज आहेर, राजेंद्र उदावंत, विजय फुलारे, ललित बनसोडे, भाऊसाहेब बनकर, प्रशांत जोर्वेकर, सोनिया कंकड, रविंद्र निकम, भारत शेंगळ, अर्चना आहेर, मिनल भागवत, पुर्वा पवार, चैतन्या आहेर, ईश्वरी भागवत, साईश भागवत, कविता बनसोडे

आदी प्रयत्नशील होते. सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक संतोष मते यांनी केले.चौकट-६५ वर्षांचा ज्येष्ठ स्पर्धक चित्रकलेतील सर्वांच्या अभिरूचीला वाव देण्यासाठी रंगलहरी आर्ट ॲकॅडमीने स्पर्धेत चार वर्षांपुढील सर्वांनाच सहभाग घेण्याची मुभा दिली होती. त्यास खुपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सर्वच वयोगटातील अनेक कलाकारांनी आपली हौस यावेळी भागवली. येथील कारभारी सलालकर या ६५ वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारानेही स्पर्धेत सहभाग घेत अतिशय सुंदर चित्र रेखाटले. विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांबरोबच अनेक शिक्षकांनीही चित्र रेखाटून स्पर्धेचा आनंद लुटला.


श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामनवमी यात्रेतील पाळण्यात बसण्याच्या कारणावरून थत्ते मैदानावर तुफान हाणामारी झाली. यात 9 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या असून त्यावरून पोलिसांनी 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मंगळवारी रात्री अंध, मूकबधीर मुलांना रहाट पाळण्यात मोफत बसविण्यात येणार होते. त्यावेळी काही तरुण पाळण्याजवळ आले. आम्हाला मोफत पाळण्यात बसू द्या, असा आग्रह त्यांनी धरला. त्यास पाळणा चालकांनी विरोध दर्शविल्याने त्यांच्यात वादावादी झाली. त्याचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाले. यावेळी चॉपरचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. अचानक हाणामारी सुरु झाल्याने धावपळ व मोठा गोंधळ झाला. त्यामुळे इतर दुकाने लागलीच बंद झाली.या घटनेत रोहित भोसले (वय 22), सुनील डुक्रे (वय21), अमोल सावंत (वय 31), निखिल वाडेकर (वय 11), जिब्राईल काकर (वय 20), सोहेल सय्यद (वय 22), रहेमान सय्यद (वय 15), ओसामा शेख (वय 20), व फरदीन खान (वय 20) हे 9 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत. ओसामा इम्रान शेख, (वय 20, धंदा चिकन दुकान, रा. दत्तनगर) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, काल रात्री 11 वा. माझा मित्र अनिकेत गायकवाड याच्याबरोबर थत्ते ग्राऊंडवर पाळण्यामध्ये बसण्याकरीता गेलो असता पाळण्याजवळ अगोदरच उभे असलेले सलीम लुल्ला, रोहीत भोसले, निखील संजय वाडेकर, सुनील मारूती डुक्रे, अमोल नागेश सावंत (सर्व रा. श्रीरामपूर) यांनी मला व गायकवाडला तसेच तेथे उभे असलेल्या सोहेल याकुब सय्यद, फरदीन लियाकत खान, रहेमान इमान पठाण, जिब्राईल सलिम कक्कर यांना तुम्ही तिकीट काढलेले आहे का? असे विचारले.यावर आम्ही त्यांना समजावून सांगत असताना आम्ही पाळण्यात फुकट बसण्याचा प्रयत्न करत असल्याचा गैरसमज करून त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून काठीने माझ्या हातावर, पाठीवर मारहाण केली. त्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव होवून मी खाली पडलो. या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुरनं 283/ 2022 प्रमाणे सलिम लुल्ला, रोहित भोसले, निखील वाडेकर, सुनील डुक्रे, अमोल सावंत व इतर सात ते आठ अनोळखी इसमांविरोधात भादंवि कलम 143, 147, 148, 149, 326, 323, 504, 506 नुसार दाखल केला आहे.

दुसरी फिर्याद अमोल नागेश सावंत (वय 34, रा. वार्ड नं. 7, श्रीरामपूर) याने दिली आहे. त्यात म्हटले आहे की, थत्ते ग्राऊंड येथील रामनवमीचा पाळण्याचा ठेका राजेंद्र भोसले यांनी घेतला असून त्यांना सहआयोजक म्हणून नागेश किसनराव सावंत, सलिम जहागिरदार, सलिम झुला, रियाज पठाण, जोएफ जमादार (सर्व रा. श्रीरामपूर) हे काम करतात. सदर ठिकाणी स्वयंसेवक म्हणून माझ्यासोबत निखील संजय वाडेकर, रोहीत भाऊसाहेब भोसले, सुनील मारूती डुक्रे व इतर स्वयंसेवक काम करतात. काल रात्री 11 च्या सुमारास सलिम झुला हे व मी पाळणा बंद करीत असताना तेथे 10-15 मुलं आले. यामध्ये अनिकेत गायकवाड, ओसामा शेख (दोघे रा. दत्तनगर), तसेच साहील याकुब सय्यद, फरदिन खान, जिब्राईल कक्कर, रहेमान इम्रान पठाण (सर्व रा. वॉर्ड. नं. 2) हे सर्वजण पाळण्यामध्ये फुकट बसण्याचा प्रयत्न करीत होते.तेव्हा मी व माझ्या सोबत असलेल्या स्वयंसेवक सहआयोजकांनी त्यांना विरोध करत पाळणा आता बंद झाला आहे, तुम्ही नंतर या, असे समजावून सांगत असताना त्यांनी आरडाओरडा करून आमच्याशी वाद घालून, शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी व काठीने आम्हाला मारहाण करत दहशत निर्माण केली. असेे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून शहर पोलीसांनी गुरनं 282/2022 नुसार अनिकेत गायकवाड, ओसामा शेख, (रा. दत्तनगर), सोहिल याकुब सय्यद, फरदिन खान, जिब्राईल कक्कर, रहेमान इमान पठाण (सर्व रा. वार्ड नं. 2, श्रीरामपूर) व इतर 8 ते 10 इसमांच्याविरोधात भादंवि कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निविक्षक संजय सानप अधिक तपास करीत आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी-आरटीओ कार्यालय परिसरातील बोगस एजंट व समाजकंटकांना या कार्यालयाच्या परिसरात येण्यास बंदी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रशासनातील प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, येथे गैरमार्गाने कार्यरत असलेल्या काही एजंटांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या समाजकंटकांच्या माध्यमातून या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर खोटे व गैरकायदेशीर काम करून घेणेकरिता दबाव आणला आहे. यापूर्वी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटक व दलालांवर कायदेशीर करावाई करण्यासाठी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती प्रज्ञा अभंग, मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील, मोटार वाहन निरीक्षक विकास सूर्यवंशी यांनी फिर्यादी दिल्या आहेत. या प्रकारामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रचंड दहशतीखाली काम करत आहेत. संबंधित समाजकंटक व एजंटांवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत कार्यालयीन कामकाज निषेध म्हणून बंद ठेवणार आहोत.बोगस एजंट व समाजकंटकांना या कार्यालयाच्या परिसरात येण्यास बंदी करण्यात यावी, अन्यथा सामूहिकरित्या काम बंद ठेवण्यात येईल, असा इशारा अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिला आहे.निवेदनावर मोटार वाहन निरिक्षक सर्वश्री पद्माकर गो. पाटील, विकास सूर्यवंशी, विनोद घनवट, धर्मराज पाटील, सुनील गोसावी, श्रीमती जयश्री बागुल, सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती प्रज्ञा अभंग, श्रीमती श्वेता कुलकर्णी, श्रीमती मयुरी पंचमुख, श्रीमती सुजाता बाळसराफ, अतुल गावडे, धिरजकुमार भामरे, हेमंत निकुंभ, मयुर मोकळ, वरिष्ठ लिपिक हर्षल माळी, दर्शन सोनावणे, अमोल मुंडे, प्रकाश शिलावट, तसेच गोकुळ सुळ, अंकुश अंडे, वैभव गावडे, रावसाहेब शिंदे, नरेंद्र इंजापुरी, शंकर काटे, श्रीकांत शिरे, विशाल पाटील, सचिन असमार, सुनील शेवरे, परेश नावरकर, हेमंत नागपुरे आदींची नावे आहेत.

श्रीरामपूर-लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख पवित्र कुरआन म्हणते की, निःसंशय अल्लाहाकडून तुमच्यावर जर कोणता प्रतिबंध असेलतर तो म्हणजे तुम्ही मृत प्राण्यांचे मांस,रक्त,डुकराचे मांस, आणि त्या गोष्टीही ज्यावर अल्लाहाव्यतिरिक्त अन्य कुणाचे नाव घेतलेले असेल त्या गोष्टी तुमच्यासाठी वर्ज्य (मनाई,मना,हराम) आहेत,

हो ..., परंतू जे लाचार असतील व जे अतिरेक करणारे नसतील अल्लाहाच्या मर्यादांचे उल्लंघन करण्याचा हेतू नसेलतर (त्यांनी जर खाल्लं), तर त्यामध्ये ‌कोणताही गुन्हा नाही,निःसंशय अल्लाहा क्षमाशील व कृपावंत आहेत"(सुराह नं.२ अल- बकराह आ.नं.१७३),

ईमानवंतांनी अन्न काय खावं व काय नाही  हे ही पवित्र कुराण मधे अधोरेखित केले आहे. कुराण नुसार समुद्रात आठरा (१८,०००) हजारापेक्षा जास्त जीव राहतात, समुद्राच्या जलचर प्राणी उदा. बेडूक ,कासव,खेकडे,मगर ई. खाण्यासं मनाई (हराम) केली गेली.त्या व्यतिरिक्त मासे व ईतर सर्व पदार्थ खाण्यांस अनुमती दिली आहे.तसेच ज्या प्राण्यांच्या पक्षींना नखे आहेत,नखांनी व दातांनी क्रुरपणे फाडून खाणारे प्राणी व पक्षी उदा.वाघ,सिंह, कुत्रा,मांजर ई. व पक्षांमध्ये उदा. चिल (घार) व वगैरे.

डुक्कर खाण्यासही मनाई (हराम) करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर अल्लाहा चे नाव घेऊन कापले नाही असे प्राणी ही मनाई (हराम) करण्यात आले आहे.

ईस्लाममधे कोणत्याही गोष्टींसाठी एक विशिष्ट पद्धत आहे तशीच प्राण्यांना (जुंबा) कापताना पध्दती सांगितले आहे .(वजू) स्वच्छ पाण्याने नमाजमधे जसे स्वच्छता करतो त्याप्रमाणेच वजू करुण,ज्या प्राण्यांची कुरबानी करणार आहे त्याला अगोदर व्यवस्थित पोटभर खाऊपिऊ घालून त्यांचं समाधान झाले पाहिजे असं शांत बसवून

ज्या सुऱ्याने त्याला जुबा (कापणार) करणार आहे,त्या सुऱ्याला व्यवस्थितपणे धार लावून घेणं.विशेषत: त्या प्राण्याच्या डोळ्यासमोर ते हत्यार न दिखवता हे केलं पाहिजे. त्याला जाणीव झाली नाही पाहिजे,त्याला दया,माया दाखवूनच जुबासाठी तय्यार करून आडवं धरुन "पहिल्या प्रथय अल्लाहाचे नामस्मरण व नांव घेऊन" च मानेच्या शिरा , श्वास नलीका,असं करीत तीन हिस्से मधे कापणे.त्या प्राण्याचे हाल हाल , (ईस्लाम क्रुर , निर्दयताला विरोध करतो) प्रक्रिया पूर्ण करणं म्हणजे "हलाल" झालं, काही लोकं "झटका" देऊन प्रक्रिया करतात यांस ईस्लाम हराम समजतो,कारण हलाल शास्त्रिय कारणं,या प्रक्रियेत प्राण्यांला निर्दयी,क्रुरता न होता व तीन वेळा हत्यार फिरवून प्रक्रिया केल्यामुळे प्राण्यांची हृदय जवळ जवळ १-१.५ दीड दोन मिनिटे पंपिंग चालू राहील्यामुळे  रक्ताभिसरण संस्था चालू असल्याने शरीरातील रक्त आतमध्ये न राहता बाहेर फेकले जाते यामुळे रक्त शिरां,शरीरात साकळले (गोठणं,थरबोसिस) होत नाही.यामुळे बॅकटेरीयाज (जिवाणू) व व्हायरस (विषाणू) तयार न होता निरोगी, हेल्थि मांस खाण्यास मिळाल्याने आजारी पडत नाही,हे शास्त्रीय कारण.

 "झटका" पध्दती फार क्रुरते, निर्दयी पद्धत मानली जाते, ईस्लाम निर्दयी पध्दतीला विरोध- मनाई करतो,झटक्यामुळे प्राण्यांची हृदय एकदम बंद पडते जी हलाल ने चलणारी हृदय क्रिया एकदम बंद होईन,पंपिंग थांबून, शिरां,शरीरात रक्त गोठले जाऊन  त्यामुळे अनेक जंतू संसर्ग होऊ शकतो व गंभीर आजाराचे कारण बनते हे शास्त्रीय कारण,पुन्हा त्या प्राण्याची निर्दयीपणे हत्या होते,हे ईस्लामला मान्य नाही.आशा प्रथेला,प्रक्रियेला मनाई "हराम" घोषीत करण्यात आले आहेत.

पुन्हा त्यावेळी वाहण्याऱ्या रक्ताला खाणं हे गंभीर आजाराचे कारण बनू शकतात म्हणून त्याचे सेवन करण्याला 'हराम ' मनाई केली.

तसेच तीक्ष्ण नखे असणारे प्राणी व पक्षीं. उदा. वाघ ,सिंह , बिबट्या,चित्ता,कुत्रा,हिंस्र प्राणी, हिंसक पशू उदा‌ चिल (घार) गिधाड इत्यादीं हे प्राणी पक्षी जंगलात सतत भांडखोर वृत्ती असल्याने त्यांना वारंवार जखमी अवस्थेत असल्याने त्यांना विविध प्रकारचे जीवाणू विषाणू व गंभीर स्वरूपाचे जीवजंतू चिकटलेले असतात धनुर्वात,रॅबिज व असे अनेक गंभीर आजार ह़ोण्याची शक्यता उदभवू शकते म्हणून  आशा प्राणी पक्षीच्या मांस सेवनास "हराम" केलेले आहे.

तसेच "डुक्कर" खाणं,पाळणं  हराम केले आहे,या प्राणी केसाळ असल्याने त्याची मानसिकता ही घाणेरड्या पाण्यात राहणे व तिथिल घाणंचं खाणे त्यामुळे त्यांच्या शरीरात असंख्य प्रकारचे जीवाणू विषाणू व जंतू संसर्ग करणारे जीवजंतू असल्याने अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते व खुप संशोधकांच्या संशोधनाने सिद्ध ही झाले की डुक्करांच्या शरीरात  जीवजंतूंचे प्रमाण जास्त आहे . यामुळे ईस्लामने  याला खाण्यांस,पाळण्यांस बंदी घातली आहे, "हराम" केले आहेत.

सृष्टीच्या निर्मित्याने नैसर्गिक रित्या जे पदार्थ प्राणी,पक्षी वनस्पतीचे अन्नधान्य म्हणून वापरले जाते अशा सर्वांची पैदास ही असंख्य प्रमाणात होत असते, जे हिंस्र प्राणी,पक्षी किटक असतात त्यांची पैदास कमी प्रमाणात होते,हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नियम ही असू शकतो.असो.अशा विविध शास्त्रांच्या कसोटीवर तपासून सिध्द झालेले ईस्लामी धारना, संहीता,संस्कृती ने जग आश्चर्यचकित होत असते. "हलाल" विश्वासावर व त्यांच्या गॅरंटीवर जग विश्वास करु राहील्याने जगात अनेक देशांमध्ये हलाल केलेल्या वस्तुंना अतिशय मागणी असल्याने तेथील स्थानिक व मल्टी नॅशनल कंपन्या या असंख्य प्रमाणात फुड, अन्नधान्य उत्पादन व विक्रीमधे उतरले आहेत.युरोपीयन युनीयन अमेरिकन देश,इंग्लंड,फ्रान्स, जर्मनी,रशिया अशा अनेक देशांमध्ये तेथील शॉपिंग मॉलमध्ये  "हलाल" प्रोडक्ट विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत व त्यांना मागणीही फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या प्रत्येक अन्नधान्य उत्पादनाच्या प्रोडक्ट,डब्ब्यावर बॉक्सवर  लिहिले असते " ईट इज ए हलाल " यह हलाल है "  व काही मल्टी नॅशनल कंपन्यांनी काही हराम मालाच्या प्रोडक्टच्या, डब्यांवर,बॉक्सवर प्रामाणिकपणे " यह हराम है " " ईट इज हराम "  .असे भावनिक आवाहन "साद" लिहून आपल्या प्रामाणिक पणाची ग्वाही देऊन शॉपिंग मॉलमध्ये भरपूर प्रमाणात विक्री केली आहे. यामध्ये काही भेसळयुक्त पदार्थ विकणारे विक्रेते यांनीही भेसळयुक्त हलाल पदार्थ विकण्यास सुरुवात केली आहे, त्यांची विक्री जास्त व्हावी म्हणून "हलाल' पदार्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, उदा. हलाल पदार्थांमधे मौलवी, मुस्लिम समाज आपल्या थुंकी टाकून विकतात हा आरोपकरुन बदनाम करीत आहेत परंतू ईस्लाम अशा विपरीत व अंधश्रद्धा प्रथेला कायमच विरोध करत आला आहे, ईस्लाम अंधश्रद्धा कदापीही मानत नाहीत .मित्रांनो "हलाल" पवित्रच आहेत व "हलाल" पदार्थ खाणे आरोग्यासाठी उत्तमच आहे.-  लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख,श्रीरामपूर 9271640014.

श्रीरामपूर -लेखक- डॉ. सलीम सिकंदर शेख "पवित्र कुराआन मजिद" हे ईमानधारकां (श्रद्धावंत) नों, तुम्ही पवित्र वस्तुंचे सेवन करावे ज्या आम्ही तुम्हाला बहाल केल्या आहेत (सुराहा नं.२ अल -बकरा आ.नं.१७२), व जे काही वैध व विशुद्ध अन्न अल्लाहाने दिले आहेत ते सर्व खा व प्या (सुराहा अल - माईदाह आ.नं.८८),

तसेच पुढे तुमच्या कष्टाच्या कमाईने अल्लाहाच्या मार्गावर हलाल कमाई (इमानदारीने कमावलेली) खर्च करा (सुरह अल - माईदाह आ.नं.८८),

 पुन्हा पुढे हे इमानवंतांनो

तुम्ही शुद्ध पदार्थ खा आणि चांगले कर्म करीत चला,तुम्ही जे काही करतात ते मी चांगले जाणतो ," सुराहा अल - मोमिनून अ.नं.५१).

ईस्लामी धारना व दंड विधाना नुसार प्रत्येक घटनेला,वस्तुला मग ती खाण्याची का असेना ती मग "हलाल"का" हराम" या गोष्टीला फार महत्त्व असते" हलाल  म्हणजेच कष्टाच्या, घामाच्या, प्रामाणिकपणे केलेल्या इमानदारीच्या कमाईने सत्य व्यवसाय,व्यवहार करुन व इस्लामच्या तार्किक पातळीवर प्रत्येक कसोटीवर सत्य,खरे व एकदम शुध्द व त्याबरोबरच शास्त्रीय सायंटिफीक दृष्टीने सिध्द होते ती गोष्ट "हलाल" त्यामध्ये तुमची कमाई ही सत्य बोलून तसेच तुम्ही जिथे काम करता ते तुम्ही ईमानदारीने केलेले आहे का ?,  तुम्ही सरकारी नोकरी ही संपूर्ण जबाबदारीने वेळ देऊन  केली आहे का ,? तराजू ही व्यवस्थितपणे व ज्यांच्याकडुन माल,वस्तू खरेदी करताना ती वाजवी दरात,भावात घेतली की नाही ,? नाही तर तुम्ही त्या व्यावसायिकांची लुबाडणूक तर केली नाही ना ? या सर्व गोष्टींची  खातरजमा करून घेतली का ?, ,जर आशा सर्व पध्दतीने घेतलेल्या व कसोटीला उतरलेले, कमावलेल्या गोष्टीला कमाईला " हलाल " म्हणतात.. आता " हराम " म्हणजेच या विरूद्ध .हलालच्या बिलकुल विरूद्ध .. सर्व कमाई ही बनवाबनवी व बनवाबनवी करून गरीबांचे,मजुरांचे,कष्टकऱ्यांचे हक्क हिरावून, चोरी,डकैत,सट्टा, जुगार,दारु दुकान,खोटे बोलून, नोकरीत असालतर करपशन ( लाच घेऊन)  करुन कमावलेल्या पैशाला "हराम " कमाई  मानली जाते,तसेच ईस्लाम दंड विधान संहितानुसार ज्याला मान्यता देण्यात आली नाही आशा वस्तू ,गोष्टी खाणे -पिणे याला "हराम" खाणे- पिणे म्हणतात.

हल्ली बाजारात,समाजात अपण सोशल मिडियावर बहुतेक ठिकाणी,बहुतांश ग्रुपवर मुस्लिम विरोधी वातावरणातील "हलाल " पदार्थाबद्दल काही विरोधी लोकं हलाल विरूद्ध अपप्रचार करून मुस्लिम विरोधी नाहक वातावरण निर्माण करीत आहेत व  समाजाचे स्वास्थ्य बिघडवत आहेत.

आज पश्चिमेकडे युरोप अमेरिका आणि इंग्लंड व असंख्य देशांत माॉल संस्कृतीने जन्म घेतला आहेत व जगातील सर्वच देशांमध्ये विविध धर्मियांचे लोकं राहतात व जगातील एकही देश असा नाही की फक्त एकच समाज तिथे वास्तव्य करून राहतो,जवळ जवळ प्रत्येक देशात सर्व धर्म समभाव जपणारे लोक आहेत,तर तिथे प्रत्येक देशात नोकरी करणारे,व्यापार व्यवहार करणारे रहात असतात, तर ज्या घरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी वेळेच नाही,आपल्या वेळेच्या कमतरतेमुळे आशा ठिकाणी तिथे घरी स्वयंपाक करून खाणारे खुप कमी प्रमाणात असतात,तिथे फुड बाजार,शॉपिंग मॉल संस्कृती आहेत त्या शॉपमधे अन्न,फुड बाजारात काही वस्तूवर "हलाल " "हराम" - यह हलाल है " ,ईट ईज ए हलाल"  ईट ईज ए हराम " असं ठिकठिकाणी या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आपल्याला दिसतात हे खुप वर्षांपासून युरोपियन युनियनमधे , अमेरिकेत,इंग्लंडमध्ये चालू आहेत अरेबियन देशाततर ईस्लाम जन्मापासून चालुच होती व आहेत,सध्या आपल्या देशात सुध्दा मोठंमोठ्या शहरांमधील शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करताना बघायला मिळते.हे पदार्थ फक्त मुस्लिमच खातात असे नाही,हे फार महत्त्वाचे आहे कारण हलाल पदार्थ फार शुद्धपणे विचारपूर्वक बनवलेले पदार्थ असतात, म्हणूनच बहुतेक युरोपियन युनियन,अमेरिकेत जाऊन आलेले दुसऱ्या समाजातील लोकांचीही मागणी हलाल फुड बद्दल वाढलेली आहे,आशा ठिकाणी मल्टी नॅशनल कंपन्यांनी अन्न प्रक्रिया उद्योगातही भाग घेऊन हलाल अन्नधान्य वितरण करीत आहेत व आपल्या बाजारपेठेतील स्थान बळकट करण्यासाठी विविध जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.तर काही भारतातील छोट्या अन्नधान्य उत्पादन व फुड इंडस्ट्रीतील आघाडीच्या कंपन्या ही बाजारपेठ मिळवून राहीलेले आहे या कंपनींच्या स्पर्धेत काही प्रामाणिक कंपन्या आपला दर्जा स्टेट्स राखून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.

व  काही भेसळ,मिसळ, मिश्रण करण्याऱ्या बाजारातील काही डुपलिकेट कंपन्या राजकीय पक्षांच्या,नेत्यांना आपल्या झाशामधे घेऊन पैसे पुरवून" हलाल" विरोधी वातावरण सोशल मिडियामध्ये निर्माण करून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी उत्तेजित करीत आहेत,परंतू खरे ते खरेच असतं,

मात्र आशा व्यापार,व्यवहार करण्याऱ्या लोकांना प्रेषित मुहम्मद स्व.स्पष्टपणे सांगतात की, जो व्यावसायिक जी वस्तू खराब व भेसळयुक्त आहेत ती वस्तू तुम्ही चांगली सांगून विकल्यास, तर तुम्ही अल्लाहाच्या निराशेच्या गर्तेत सापडलात म्हणून समजा व फरिशते (देवदूत) त्या व्यक्तींवर धिक्कार करतील" .(इबने माजा.२२४७),

(उद्याच्या भाग क्र २ या लेखात कोणकोणत्या वस्तू खाण्यास हलाल व शास्त्रीय कारणं पाहु ...)( क्रमशः ).

लेखक- डॉ. सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर ९२७१६४००१४ - (भाग क्र.१) 


अहमदनगर- ३ खूनप्रकरणात सहभागी असणारा व ८ वर्षापासून मोक्का गुन्ह्यात फरार असणा-या कुख्यात गुंडास पकडण्याची धडकेबाज कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. भरत विठ्ठल एडके (वय ३९, रा. भाईदंर, जिल्हा ठाणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. या आरोपीने अनेक गंभीर गुन्हे केले असून, याला पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी झाली आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी (दि.१८) आयोजित पञकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके आदिंसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.ही महत्त्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दिनकर मुंढे, सपोनि गणेश इंगळे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना भिमराज खर्से, सुरेश माळी, रवि सोनटक्केव चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.पुणे येथील बिल्डर फैजल खान व बेलवंडी येथील आकाश मापारी खून प्रकारणात सहभागी असणारा व तात्कालीन मुखेड (जि. नांदेड) शिवसेना तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांच्या खून प्रकारणीसह मोक्का गुन्ह्यात आठ वर्षापासून आरोपी भरत एडके हा फरार होता. दि. ३ सप्टेंबर २०१४ रोजी रात्रीच्या सुमारास जामखेड बीड रोडवरील, मोहागावचे शिवारात, अज्ञात ५-६ चोरट्यांनी त्यांचेकडील एक पांढरे रंगाची चारचाकी गाडीमध्ये पाठीमागून येऊन मला व साक्षीदार यांच्या ताब्यातील इनोव्हा गाडीस आडवी लावून थांबवून रिव्हॉल्वरचा (गावठी कट्टयाचा) धाक दाखवून, लाथाबुक्यांनी मारहाण करुन, तुमच्याकडील माल काढा असे म्हणून एका आरोपीने मयत शंकर पाटील माधवराव ठाणेकर, (मुखेड, जि. नांदेड) येथील शिवसेना मुखेड तालुकाप्रमुख यांच्या छातीवर गुप्ती सारखे धारदार हत्याराने भोकसून जिवे ठार मारुन ६ लाख ५९ हजार रु. किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व इनोव्हा कार दरोडा चोरी करुन चोरुन नेली. या भालचंद्र बापूसाहेब नाईक (वय ५३ रा. पेठवडज ता. कंधार जिल्हा नांदेड) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३०/२०१४ भादविक ३९६, ३४९, ३२३, ५०४, ५०६ सह आर्म ॲक्ट ३ /२५ व ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करुन ६ आरोपी निष्पन्न केले. त्यापैकी ५ आरोपींना तत्कालीन तपास पथकाने अटक करुन त्यांचे ताब्यातून गुन्ह्यातील ६ लाख ५९ हजार रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. यावेळी गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) कलम ३ (१) (II), ३ (२) व ३ (४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. आरोपी भरत एडके हा गुन्हा घडले पासून फरार होता.या तपासकामो स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की,आरोपी भरत एडके हा कोथरुड (जि. पुणे) येथे केटरर्सकडे काम करत आहे. आता गेल्यास तो मिळून येईल. अहमदनगर पथक तात्काळ कोथरुडेला रवाना होऊन आरोपीची माहिती घेतली. आरोपी हा चांदणी चौक, कोथरुड, ( जि. पुणे) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. तेथे अहमदनगर पोलिसांनी सापळा लावला. थोडयाच वेळात आरोपी हा संशयीतरित्या फिरताना दिसला. पोलिसांना खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. परंतु पोलिस खाक्या दाखविताच त्याने त्याचे नाव व पत्ता तसेच, जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३०/२०१४ भादविक ३९६, ३४९, ३२३, ५०४, ५०६ सह आर्म ॲक्ट ३/२५ व ४/२५ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) कलम ३ (१) (II), ३ (२) व ३ (४) बाबत चौकशी करता त्याने गुन्हा त्याचे साथीदारासह केल्याची कबुली दिली. अहमदनगर जिल्ह्याचा गुन्हे अभिलेख पडताळणी करता आरोपी भरत विठ्ठल एडके हा अहमदनगर जिल्ह्यातील चार गंभीर स्वरुपाचे गुन्ह्यात फरार आहे.श्रीगोंदा ९७/२०१५ भादविक ३९४, ३०२, २०१, १०९, ३४१, १२० (ब), ३४ प्रमाणे आरोपी भरत यास ताब्यात घेऊन जामखेड पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास जामखेड पोलीस हे करीत आहे.आरोपी भरत विठ्ठल एडके हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द विविध पोलीस स्टेशनला मोक्का, खून, खुनासह दरोडा, दरोडा, जबरी चोरी असे १० गुन्हे दाखल आहेत, असे श्री पाटील यांनी सांगितले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget