रोजा :- हलाल पदार्थ खाणे शरीरासाठी सर्वोत्तम पवित्र अन्न आहेत..

श्रीरामपूर-लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख पवित्र कुरआन म्हणते की, निःसंशय अल्लाहाकडून तुमच्यावर जर कोणता प्रतिबंध असेलतर तो म्हणजे तुम्ही मृत प्राण्यांचे मांस,रक्त,डुकराचे मांस, आणि त्या गोष्टीही ज्यावर अल्लाहाव्यतिरिक्त अन्य कुणाचे नाव घेतलेले असेल त्या गोष्टी तुमच्यासाठी वर्ज्य (मनाई,मना,हराम) आहेत,

हो ..., परंतू जे लाचार असतील व जे अतिरेक करणारे नसतील अल्लाहाच्या मर्यादांचे उल्लंघन करण्याचा हेतू नसेलतर (त्यांनी जर खाल्लं), तर त्यामध्ये ‌कोणताही गुन्हा नाही,निःसंशय अल्लाहा क्षमाशील व कृपावंत आहेत"(सुराह नं.२ अल- बकराह आ.नं.१७३),

ईमानवंतांनी अन्न काय खावं व काय नाही  हे ही पवित्र कुराण मधे अधोरेखित केले आहे. कुराण नुसार समुद्रात आठरा (१८,०००) हजारापेक्षा जास्त जीव राहतात, समुद्राच्या जलचर प्राणी उदा. बेडूक ,कासव,खेकडे,मगर ई. खाण्यासं मनाई (हराम) केली गेली.त्या व्यतिरिक्त मासे व ईतर सर्व पदार्थ खाण्यांस अनुमती दिली आहे.तसेच ज्या प्राण्यांच्या पक्षींना नखे आहेत,नखांनी व दातांनी क्रुरपणे फाडून खाणारे प्राणी व पक्षी उदा.वाघ,सिंह, कुत्रा,मांजर ई. व पक्षांमध्ये उदा. चिल (घार) व वगैरे.

डुक्कर खाण्यासही मनाई (हराम) करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर अल्लाहा चे नाव घेऊन कापले नाही असे प्राणी ही मनाई (हराम) करण्यात आले आहे.

ईस्लाममधे कोणत्याही गोष्टींसाठी एक विशिष्ट पद्धत आहे तशीच प्राण्यांना (जुंबा) कापताना पध्दती सांगितले आहे .(वजू) स्वच्छ पाण्याने नमाजमधे जसे स्वच्छता करतो त्याप्रमाणेच वजू करुण,ज्या प्राण्यांची कुरबानी करणार आहे त्याला अगोदर व्यवस्थित पोटभर खाऊपिऊ घालून त्यांचं समाधान झाले पाहिजे असं शांत बसवून

ज्या सुऱ्याने त्याला जुबा (कापणार) करणार आहे,त्या सुऱ्याला व्यवस्थितपणे धार लावून घेणं.विशेषत: त्या प्राण्याच्या डोळ्यासमोर ते हत्यार न दिखवता हे केलं पाहिजे. त्याला जाणीव झाली नाही पाहिजे,त्याला दया,माया दाखवूनच जुबासाठी तय्यार करून आडवं धरुन "पहिल्या प्रथय अल्लाहाचे नामस्मरण व नांव घेऊन" च मानेच्या शिरा , श्वास नलीका,असं करीत तीन हिस्से मधे कापणे.त्या प्राण्याचे हाल हाल , (ईस्लाम क्रुर , निर्दयताला विरोध करतो) प्रक्रिया पूर्ण करणं म्हणजे "हलाल" झालं, काही लोकं "झटका" देऊन प्रक्रिया करतात यांस ईस्लाम हराम समजतो,कारण हलाल शास्त्रिय कारणं,या प्रक्रियेत प्राण्यांला निर्दयी,क्रुरता न होता व तीन वेळा हत्यार फिरवून प्रक्रिया केल्यामुळे प्राण्यांची हृदय जवळ जवळ १-१.५ दीड दोन मिनिटे पंपिंग चालू राहील्यामुळे  रक्ताभिसरण संस्था चालू असल्याने शरीरातील रक्त आतमध्ये न राहता बाहेर फेकले जाते यामुळे रक्त शिरां,शरीरात साकळले (गोठणं,थरबोसिस) होत नाही.यामुळे बॅकटेरीयाज (जिवाणू) व व्हायरस (विषाणू) तयार न होता निरोगी, हेल्थि मांस खाण्यास मिळाल्याने आजारी पडत नाही,हे शास्त्रीय कारण.

 "झटका" पध्दती फार क्रुरते, निर्दयी पद्धत मानली जाते, ईस्लाम निर्दयी पध्दतीला विरोध- मनाई करतो,झटक्यामुळे प्राण्यांची हृदय एकदम बंद पडते जी हलाल ने चलणारी हृदय क्रिया एकदम बंद होईन,पंपिंग थांबून, शिरां,शरीरात रक्त गोठले जाऊन  त्यामुळे अनेक जंतू संसर्ग होऊ शकतो व गंभीर आजाराचे कारण बनते हे शास्त्रीय कारण,पुन्हा त्या प्राण्याची निर्दयीपणे हत्या होते,हे ईस्लामला मान्य नाही.आशा प्रथेला,प्रक्रियेला मनाई "हराम" घोषीत करण्यात आले आहेत.

पुन्हा त्यावेळी वाहण्याऱ्या रक्ताला खाणं हे गंभीर आजाराचे कारण बनू शकतात म्हणून त्याचे सेवन करण्याला 'हराम ' मनाई केली.

तसेच तीक्ष्ण नखे असणारे प्राणी व पक्षीं. उदा. वाघ ,सिंह , बिबट्या,चित्ता,कुत्रा,हिंस्र प्राणी, हिंसक पशू उदा‌ चिल (घार) गिधाड इत्यादीं हे प्राणी पक्षी जंगलात सतत भांडखोर वृत्ती असल्याने त्यांना वारंवार जखमी अवस्थेत असल्याने त्यांना विविध प्रकारचे जीवाणू विषाणू व गंभीर स्वरूपाचे जीवजंतू चिकटलेले असतात धनुर्वात,रॅबिज व असे अनेक गंभीर आजार ह़ोण्याची शक्यता उदभवू शकते म्हणून  आशा प्राणी पक्षीच्या मांस सेवनास "हराम" केलेले आहे.

तसेच "डुक्कर" खाणं,पाळणं  हराम केले आहे,या प्राणी केसाळ असल्याने त्याची मानसिकता ही घाणेरड्या पाण्यात राहणे व तिथिल घाणंचं खाणे त्यामुळे त्यांच्या शरीरात असंख्य प्रकारचे जीवाणू विषाणू व जंतू संसर्ग करणारे जीवजंतू असल्याने अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते व खुप संशोधकांच्या संशोधनाने सिद्ध ही झाले की डुक्करांच्या शरीरात  जीवजंतूंचे प्रमाण जास्त आहे . यामुळे ईस्लामने  याला खाण्यांस,पाळण्यांस बंदी घातली आहे, "हराम" केले आहेत.

सृष्टीच्या निर्मित्याने नैसर्गिक रित्या जे पदार्थ प्राणी,पक्षी वनस्पतीचे अन्नधान्य म्हणून वापरले जाते अशा सर्वांची पैदास ही असंख्य प्रमाणात होत असते, जे हिंस्र प्राणी,पक्षी किटक असतात त्यांची पैदास कमी प्रमाणात होते,हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नियम ही असू शकतो.असो.अशा विविध शास्त्रांच्या कसोटीवर तपासून सिध्द झालेले ईस्लामी धारना, संहीता,संस्कृती ने जग आश्चर्यचकित होत असते. "हलाल" विश्वासावर व त्यांच्या गॅरंटीवर जग विश्वास करु राहील्याने जगात अनेक देशांमध्ये हलाल केलेल्या वस्तुंना अतिशय मागणी असल्याने तेथील स्थानिक व मल्टी नॅशनल कंपन्या या असंख्य प्रमाणात फुड, अन्नधान्य उत्पादन व विक्रीमधे उतरले आहेत.युरोपीयन युनीयन अमेरिकन देश,इंग्लंड,फ्रान्स, जर्मनी,रशिया अशा अनेक देशांमध्ये तेथील शॉपिंग मॉलमध्ये  "हलाल" प्रोडक्ट विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत व त्यांना मागणीही फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या प्रत्येक अन्नधान्य उत्पादनाच्या प्रोडक्ट,डब्ब्यावर बॉक्सवर  लिहिले असते " ईट इज ए हलाल " यह हलाल है "  व काही मल्टी नॅशनल कंपन्यांनी काही हराम मालाच्या प्रोडक्टच्या, डब्यांवर,बॉक्सवर प्रामाणिकपणे " यह हराम है " " ईट इज हराम "  .असे भावनिक आवाहन "साद" लिहून आपल्या प्रामाणिक पणाची ग्वाही देऊन शॉपिंग मॉलमध्ये भरपूर प्रमाणात विक्री केली आहे. यामध्ये काही भेसळयुक्त पदार्थ विकणारे विक्रेते यांनीही भेसळयुक्त हलाल पदार्थ विकण्यास सुरुवात केली आहे, त्यांची विक्री जास्त व्हावी म्हणून "हलाल' पदार्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, उदा. हलाल पदार्थांमधे मौलवी, मुस्लिम समाज आपल्या थुंकी टाकून विकतात हा आरोपकरुन बदनाम करीत आहेत परंतू ईस्लाम अशा विपरीत व अंधश्रद्धा प्रथेला कायमच विरोध करत आला आहे, ईस्लाम अंधश्रद्धा कदापीही मानत नाहीत .मित्रांनो "हलाल" पवित्रच आहेत व "हलाल" पदार्थ खाणे आरोग्यासाठी उत्तमच आहे.-  लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख,श्रीरामपूर 9271640014.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget