Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-बेलापुरात ज्ञानेश्वर ओहोळ यांच्या ऊसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला असुन मयताचे नाव चंदु वायदंडे आहे बेलापुरातील आयोध्या काँलनीच्या पाठीमागे असणाऱ्या ज्ञानेश्वर ओहोळ यांच्या गट नंबर ४६ मधील ऊसाच्या शेतातुन दुर्गंधी येत असल्याचे ओहोळ लक्षात आले .सडलेला उग्र वास कशाचा येतो म्हणून सेवानिवृत्त मंडलाधिकारी जनार्धन ओहोळ हे पहाण्यासाठी गेले असता तेथे सडलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे लक्षात आले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधीर हापसे यांना कळवीले हापसे आपले सहकारी भारत तमनर तसेच पोलीस पाटील अशोक प्रधान यांना घेवुन घटनास्थळी पोहोचले  ही वार्ता बेलापुरात पसरताच घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली पोलीसांनी पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी रवाना केले पुढील तपास सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हे करत आहेत या बाबत नागरीकात उलट सुलट चर्चा सुरु असुन चंदु वायदंडे हा आचारी काम करत होता ,त्यामुळे त्याने आत्महत्या केली की या मागे काही वेगळे कारण आहे ? अशी चर्चा सुरु आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्याचे आमदार लहु कानडे यांच्या विशेष प्रयत्नातुन श्रीरामपुर बेलापुर  रस्त्याचे चौपदरीकरण झाले असले तरी ठेकेदाराच्या चुकीमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत तसेच रस्त्याची स्ट्रीट लाईट बंद पडली असल्याने या बाबत चिंता व्यक्त होत आहे.              विकास काय असतो हे आमदार लाहु कानडे यांच्या रुपाने श्रीरामपुर तालुक्याला समजले आमदार कानडे यांच्या विशेष प्रयत्नातुन  श्रीरामपुर बेलापुर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाले रस्त्यावर लाईट देखील लावण्यात आले परंतु सध्या रसवंती ते गायकवाड वस्तीपर्यतचे लाईट तर कायमच बंद असतात.विजेच्या पोलवर बसविलेल्या निम्म्यापेक्षा जास्त लाईट माळा  बंद अवस्थेत आहेत तसेच रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक बसविलेले आहे त्यावर रिफ्लेक्टर बसविणे गरजेचे होते रिफ्लेक्टर न बसविल्यामुळे रात्रीच्या वेळेस लवकर गती रोधक लक्षात येत नाही त्यामुळे अपघातचे प्रमाण वाढत आहे.स्ट्रीट लाईट चे काम निकृष्ट झाले असून स्ट्रीट लाईट बंद आहेत.ज्या ज्या ठिकाणी गतीरोधक बसविलेले आहे. तेथे तात्काळ रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत श्रीरामपुर ते मोसंबी बागेपर्यत रस्त्याचे काम पुर्ण झालेले आहे परंतु मोसंबी बाग ते बेलापुर पर्यंतचे डांबरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे ते काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे तसेच नादुरुस्त विज जोड दुरुस्त करुन रस्त्यावरील सर्व बंद लाईट पूर्ववत सुरु करण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )- संपुर्ण विश्वाला त्याग संयम शिल सदाचार सत्य अहींसा प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थकर वर्धमान महावीर यांची जयंती बेलापुरात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली .          या वेळी भगवान वर्धमान महावीर यांच्या प्रतिमेची  सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती पत्रकार देविदास देसाई उपसरपंच मुस्ताक शेख एकनाथ उर्फ लहानु नागले आदिंनी भगवान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला बेलापुर ग्रामपंचायत कार्यलयातही भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली मिरवणूक जैन स्थानकात आल्यानंतर तेथे भगवान महावीरांच्या जिवनावर नाटीका सादर करण्यात आली या वेळी धार्मिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या रश्मी लुंक्कड ,द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंता बाठीया ,व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या सौ कविता सुनिल मुथा यांना सन्मानित करण्यात आले सायंकाळी प्रश्न मंजुषा व भक्ती संध्या कार्यक्रम संपन्न झाला . या वेळी किराणा मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, सुवालाल लुंक्कड, संजय बाठीया ,विजय कटारीया,सचिन कोठारी, संदीप देसर्डा, सचिन कोठारी ,अमीत लुंक्कड ,आनंद लुंक्कड ,पारस लुंक्कड ,अजय डाकले, शितल गंगवाल विकी मुथा, रत्नेष बोरा ,योगेश कोठारी ,स्वप्नेश बोरा, शांतीलाल संचेती ,कांतीलाल मुथा तसेच सौ अर्चना कोठारी ,संगीता मुथा मंगलताई चेंगेडीया पदमा ताथेड ज्योती लुंक्कड ,चंद्रकला लुंक्कड ,मंगल लुंक्कड ,कविता मुथा ,पुजा गांधी ,सरला देसर्डा ,हर्षीता कोठारी, मोनाली लुंक्कड ,सोनाली लुंक्कड ,दिपाली कोठारी ,निलम देसर्डा ,राखी संचेती ,निकीता लुंक्कड ,सुवर्णा लुंक्कड ,राखी लुंक्कड आदिसह महीला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

बेलापुर(प्रतिनिधी  ) - एका मेडिकल दुकानात स्टिरॉइड्स,झोपेचे उत्तेजक द्रव्ये असणारी औषधे,गर्भपात कीट, सेक्सुअल आदी औषधांची डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय खुलेआम विक्री केली जात असुन डाँक्टर सल्ल्याशिवाय दिल्या जाणाऱ्या औषधामुळे रुग्णाच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप बेलापूर डाँक्टर असोसीएशन व मेडिकल असोसएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परीषदेत करण्यात आला आहे .    

            यावेळी  मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिपक अनभुले,उपाध्यक्ष डॉ.शैलेश पवार,सचिव डॉ.अनिल भगत,डॉ.रविंद्र गंगवाल,डॉ. भारत काळे,डॉ.मच्छिंद्र निर्मळ,डॉ.आशुतोष जोशी,डॉ.संदीप काळे,डॉ.सुधीर काळे,डॉ.मिलिंद बडधे आदींसह केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. सदर मेडिकल मधून कोरोना काळातही डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय बिनधास्त औषध विक्री केली जात असल्याचा आरोपही डाँक्टरांनी केला आहे.त्यावेळीही अन्न औषध विभागाकडे तक्रार केली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.२०२० पासून आजतागायत जिल्हाधिकारी,अन्न औषध प्रशासन विभाग आयुक्त मुंबई,आरोग्य मंत्रालय यांचेकडे अनेक तक्रारी केल्या. परंतू ठोस कारवाई होत नसल्याचे गौडबंगाल नेमके काय आहे? अशीही शंका मेडिकल असोसिएशन कडून व्यक्त करण्यात आली आहे.सदर मेडिकल मधून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व चिठ्ठीशिवाय तसेच रुग्णांना कोणतेही बिल न देता दिली जाणारी औषधे आज जरी स्वस्त वाटत असली तरी भविष्यात रुग्णासाठी ते घातक ठरू शकतात. घातक स्टिरॉइड मुळे रुग्णांचे रक्त जळते,प्रतिकार शक्ती कमी होते,शरीर फुगते या औषधांची सवय झाल्याने काही दिवसानंतर इतर कोणतेही औषध लागू होत नाही.एवढेच नाही तर मासिक पाळी येऊ नये म्हणून गोळ्या देणे,सेक्स वाढवणारी घातक औषधे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय राजरोसपणे विकली जात आहेत.याबाबत सदर मेडिकल दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

            दरम्यान मेडिकल असोसिएशनने तक्रार केल्यावर अहमदनगर अन्न औषध विभागाचे सहायक आयुक्तांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी सबंधित मेडीकलची तपासणी करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.त्यानंतर २३ मे २०२२ ते ६ जून २०२२ या १५ दिवसांसाठी परवाना रद्द करण्यात आला होता.मात्र त्या नंतरही असाच प्रकार सुरू राहिल्याने अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मेतकर यांनी ६ मे २०२४ पासून सदर मेडिकलचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे आदेश ३० जानेवारी २०२४ रोजी दिल्याचे सांगितले आहे.या बाबत मेडिकल असोसिएशनने तक्रार केली म्हणून संबधीतांनी काही डॉक्टरांना दमबाजी करणे, भिती दाखवण्याचे प्रकारही केल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय चुकीची तसेच जास्त पाँवरची औषधे दिल्यामुळे रुग्णांना तात्पुरता दिलासा मिळतो परंतु काही दिवसानंतर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.त्यामुळे अशी आरोग्यावर परिणाम करणारी औषधे डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकणाऱ्या मेडीकल दुकानावर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे .तसेच डाँक्टर व मेडीकल असोसिएशनच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजीत दादा पवार तसेच आरोग्यमंत्री, महसुल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हापोलीस प्रमुख, प्रांताधिकारी श्रीरामपुर, तहसीलदार श्रीरामपुर, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन आदिंनाही निवेदन पाठविण्यात आल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अहमदनगर जिल्हा परिषदेचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तसेच शिक्षक बँकेचे मांजी चेअरमन, पत्रकार सलीमखान पठाण   तसेच अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा सचिव रज्जाक पठाण यांचे जेष्ठ बंधु रमजान खान चाँदखान पठाण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी रविवार दिनांक  २१ एप्रिल रोजी सकाळी दहा होणार असुन अंत्ययात्रा गार्डन रेसिडेंसी फातीमा हौसींग सोसायटी येथुन निघणार आहे*

बेलापूर :(प्रतिनिधी  )- तालुक्यातील बेलापूर येथून लोणीकडे जाणारा भरगच्च भरलेल्या उसाचा ट्रॅक्टरचे जुगाड ऐन कोल्हार चौकात पलटी झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला मांसाहारी विक्री करणारा विक्रेता बालबाल बचावला                       शनिवारी दुपारी ( दि.२०) साडेचार वाजेच्या सुमाराला हि घटना घडली.उसाचा ट्रॅक्टर ऐन चढावर आल्याने पलटी झाला.लोणीच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर जुगाड ओव्हरलोड असल्याने कोल्हार रस्त्याच्या कडेला बसलेल्या 

मासांहारी विक्री करणाऱ्या दुकानावरच कोसळले.नशीब बलवत्तर

म्हणून तो विक्रेता थोड्क्यात बचावला आहे.ऊसाचा ट्रक्टर पलटी होताच दुकानदार दबला गेला असेल अशा शंकेने अनेकांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली.परतु त्याला काही दुखापत झाली नाही. सामानाचे व मांसाहारी विक्री करणाऱ्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले होते. त्या वेळी नागरिकांनी  मोठी गर्दी

केली होती. एकाच ट्रँक्टरला दोन ऊसाच्या भरलेल्या ट्राँल्या जोडल्या जातात त्याही अवस्थेत चालक भरधाव वेगाने ट्रँक्टर चालवत असतात शिवाय ट्रँक्टरवर मोठ्या आवाजात गाणे लावलेले असते .त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे शिवाय शेतकऱ्याचेही नुकसान होत आहे शिवाय चालकही १८ वर्षाच्या आतीलच असतो या सर्व बाबींची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दखल घ्यावी आशी नागरीकांची मागणी आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीती बरखास्तीला मा. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगीती मिळाली असुन मा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती जोशी यांनी जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या ४५ (१ )च्या नोटीशीच्या कारवाई विरोधात संरक्षण दिले आहे .         जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना ४५ ( १)ची नोटीस बजावली होती या नोटीस विरोधात बाजार समीतीचे सभापती सुधीर नवलेसह १२ संचालकांनी मा. उच्च न्यायालयात पिटीशन क्रमांक २९५० /२०२४ दाखल केले होते या दाव्याची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर व्ही घुगे व न्यायमूर्ती आर एम जोशी यांच्यासमोर झाली,दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती जोशी यांनी ४५ ( १ )ची कारवाई झाल्यास १५ दिवसाचे संरक्षण दिले असुन ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे मान्या केले दुसरे अपील बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दाखल केले होते त्यात त्यांनी म्हटले होते की समीतीला ४० अ  ब खाली बेकायदेशिर नोटीसा दिलेल्या आहेत .बाजार समितीचे आर्थिक वर्ष संपलेले नाही .समीतीचे नफा तोटा पत्रक तयार नाही बाजार समीतीची दोन वेळेस चौकशी झाली परंतु कुठलाच गंभीर दोष आढळून आलेला नाही त्यामुळे दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आसल्याचे अँड महेश देशमुख व अँड राहुल कर्पे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर न्यायमूर्ती एस जी मेहेरे यांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले.वादीचे वकील आँड राहुल कर्पे यांनी सांगितले की न्यायमूर्ती  मेहेरे यांनी संचालक मंडळ हे लोकनियुक्त संचालक मंडळ असुन त्यांना संरक्षण मागण्याचा पुर्ण अधीकार असल्याचे म्हटले असल्याचे सांगितले न्यायालयाच्या या आदेशामुळे श्रीरामपुर कृषी बाजार समीती जैसे थे राहणार आहे    (बाजार समीतीला एक वर्ष पुर्ण झाले नाही तरी सात महीन्यात दोनदा चौकशी केली कुठल्याही विकास कामांना परवानगी न देता विरोधकांनी अडथळे आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु संचालक मंडळाच्या चोख कामामुळै बाजार समीतीला ५०लाख रुपये वाढीव उत्पन्न मिळाले चार कोटी पन्नास लाखाच्या पावत्या झाल्या हे संस्थेच्या इतिहासात प्रथमच घडले आहे न्यायालयाचा निकाल हा विरोधकांनी केलेल्या खोट्या तक्रारीला चपराक आहे .. सुधीर नवले सभापती कृषी उत्पन्न बाजार समीती श्रीरामपुर

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget