Latest Post

 

बेलापुर(वार्ताहर)कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण बांधील असुन आपल्या आसापास  अवैध धंदे सूरू असल्यास किंवा कुणाचे कोणत्याही प्रकारे दबाव आणुन  शोषण होत असल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्रीरामपूर शहराचे  प्रशिक्षणार्थी आयपीएस पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी केले आहे.*

*बेलापुर येथील पोलीस चौकीत  स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी  नोपाणी यांनी मुक्त संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.*

*ते पुढे म्हणाले की,छोट्या छोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मोठमोठे गुन्हे घडतात त्यामुळे पोलिसात आलेल्या सर्व तक्रारी गांभीर्याने नोंदविण्यात याव्यात अशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील मोठी गुन्हेगारी रोखता येईल. लोकांनी पोलिसांशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास बिनधास्पतणे आपणाशी भ्रमणध्वनी क्रमांक 8459864520 वर संपर्क साधावा त्याची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल.वाळू मटका जुगार वा अन्य काही अवैध व्यवसाय सुरु असल्यास पोलीस स्टेशनशी अथवा माझ्याशी संपर्क करावा असेही नोपाणी यांनी स्पष्ट केले.पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे यावेळी उपस्थित होते.*

यावेळी झालेल्या चर्चेत माजी सरपंच भरत साळुंके यांनी झेंडा चौकात ट्रॅफिक पोलीस नियुक्त करण्याची मागणी केली. तसेच अन्य काही मुद्द्यांवर झालेल्या चर्चेत सर्वश्री.टॅक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील मुथा,पत्रकार देविदास देसाई, प्रा. ज्ञानेश गवले, नवनाथ कुताळ,बाजार समितीचे संचालक सुधीर नवले,अशोक कारखाना संचालक अभिषेक खंडागळे, अशोक गवते,अशोक पवार, अजय डाकले, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कु-हे ,पोलीस पाटील अशोक प्रधान, ,अकबर सय्यद आदींनी सहभाग नोंदविला.*

*यावेळी सर्वश्री व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रशांत लड्डा व शांतीलाल हिरण ,प्रसाद खरात ,पत्रकार दिलीप दायमा, सुहास शेलार,अशोक शेलार, किशोर कदम आदी उपस्थित होते.*

*बेलापुर पत्रकार संघ ,ग्रामस्थ व विविध संघटनांच्या वतीने यावेळी नोपाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस हवालदार अतुल लोटके, पो. नाईक. रामेश्वर ढोकणे,पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे, हरिश पानसंबळ, निखिल तमनर,साईनाथ राशीनकर आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.


श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली   उपविभागीय अधिकारी संदिप मिटके भापोसे आयुष नोपाणी  यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले पंचशील सिल्वर स्पून  या हॉटेलवर छापा टाकून  विस हजार रुपयांची दारू जप्त केलेली आहे  त्याचप्रमाणे दोन आरोपी ताब्यात घेतले असून एक फरार असल्याची माहिती आयपीएस अधिकारी आयुष नोपानी  यांनी दिली आहे.  या कारवाईमुळे शहरात अवैधरित्या  धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे या दोन कारवाईमुळे श्रीरामपुर शहरातील नागरिकांकडून  पोलीस प्रशासनाचे मोठे कौतुक केले जात आहे, धडाकेबाज कारवाई करत विस हजाराची बेकायदेशीर दारु जप्त करुन दोन जणांना अटक केली आहे. 


श्रीरामपुर  (प्रतिनिधी )-श्रीरामपुर शहरात असलेल्या एका लाँजवर पोलीसांनी छापा टाकून तीन महीलासह एका पुरुषाला ताब्यात ताब्यात घेतले असुन अवैध धंदे बंद करण्याचा पोलीसांनी विडाच उचलला आहे                                               श्रीरामपुर शहरात पोलीसांनी लाखोचा गुटखा पकडला ती गुटख्याची कारवाई वादात सापडली त्या नंतर पोलीस अधिकार्यांच्या तातडीने बदल्या झाल्या त्यातच नेवाशाहुन एक तडजोडी बाबत अधिकार्याची  क्लिप व्हायरल झाली या सर्व बाबीची पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी गांभिर्याने दखल घेवुन एखाद्या  पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरु असल्याचे आढळल्यास त्यास सबंधीत अधिकार्यास जबाबदार धरण्यात येईल असे फर्मानच पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी काढले आहे श्रीरामपुरला उपविभागीय अधिकारी म्हणून संदीप मिटके यांची तर शहर पोलीस स्टेशनला प्रशिक्षणार्थी भापोसे आयुष नोपाणी यांची नेमणूक करण्यात आली असुन या दोन्ही अधिकाऱ्यांमुळे अवैध व्यवसाय करणारांचे धाबे दणाणले आहे गुटख्यानंतर पोलीसांनी मटका देखील बंद केला असुन या पुढे अवैध व्यवसाय करणारांवर धाडाकेबाज कारवाई करण्याचा विडाच उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी उचलला आहे शहरातील शिवाजी रोडवर असणार्या लाँजवर देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहीती पोलीसांना मिळताच त्या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकला त्या वेळी तीन महीला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले या वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

श्रीरामपुर  (वार्ताहर)-संपूर्ण जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या गुटखा प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी टाकलेल्या एकलहरे  गुटखा छापा प्रकरणात काल शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने उशिरा श्रीरामपूर एस टी डेपोच्या निवृत्त कर्मचारी अन्सार आजम शेख  सह अरुण गांगुर्डे यांना ताब्यात घेतले  असल्याचे पोलीस सूत्राकडून समजते  

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागे लगत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये पोलीस यंत्रणेने प्रथमतः 54 लाखांचा  गुटखा  जप्त केला पुन्हा दोन दिवसानंतर याच भागातील एका बंद खोलीत दहा अकरा लाखाचा गुटखा असल्याची माहिती तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली होती. पोलीस पथकाने या बंद खोलीतुन 11 लाख 66 हजारांचा गुटखा सुगंधी तंबाखू पुन्हा जप्त केली.

परिसरात दोन वेगवेगळे छापे पडले पहिल्या ठिकाणी जो अवैध गुटखा सापडला त्या ठिकाणच्या मालकाचा शोध पोलीस यंत्रणेला एका आठवड्यानंतर लागला तर दुसऱ्या छापा ठिकाणच्या मालकाचा शोध अर्धा महिना लोटूनही लागत नव्हता मात्र काल पोलिसांनी  ताब्यात घेतलेल्या अन्सार आजम शेख हाच गुटखा प्रकरणाचा स्थानिक गुटखा किंग असल्याचे समजले आहे.

गुटखा छापा  ठिकाणी  गेल्या सहा महिन्यापासून गुटखा साठवून करून स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांना दिला जात असे, सदर गुटखा कनेक्शन संगमनेर मधून असल्याचे समजते , हा गुटखा  कोल्हार मार्गे याठिकाणी येत होता,  ताब्यात घेतलेल्या अन्सार आजम शेख मुळे आता अस्सल आरोपी समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे एकलहरेचे अस्सल गुटखा किंग पर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना यश आले असल्याची चर्चा  परिसरात सुरू आहे

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी अर्ध्या कोटींहून अधिक गुटखा जप्त झाला, त्या ठिकाणच्या मालक, चालकांपर्यन्त  पोलीस प्रशासन  पोहचलेले असल्याचे दिसून येत आहे. 

या गुटख्याच्या अवैध व्यवसायात तीन प्रमुख भागीदार असल्याचे बोलले जात आहे, हे तिघे अनुक्रमे बेलापूर, एकलहरे व संगमनेरचे आहे.  यापैकी संगमनेरचा जावई हा आपल्या बेलापूरच्या  सासऱ्यासोबत संलग्न राहून एकलहरेतील तिसऱ्या भागिदारासोबत जावई कोल्हार मार्गे गुलाबाच्या बागे लगत असलेल्या पत्र्याचा शेडमध्ये मध्यरात्री मोठमोठ्या ट्रकमधुन वहातुक करुन गुटख्याच्या साठवणूक  करीत होता  एकलहरेतील भागीदार आपल्या तीन भावांच्या मदतीने रातोरात  श्रीरामपूर शहरासह संपूर्ण तालुक्यातील गुटखा वितरणाचे काम करीत असे, 

ज्या ठिकाणी गुटखा साठवून अवैध व्यवसाय चालू होता, त्याच्या लगत गुलाबाचा बाग असल्याने गाडीच्या आतील भागात गुटख्याच्या गोण्या व बाहेरील बाजूस गुलाबाचे फुले भरून वाहतूक होत असल्याचे  परिसरात बोलले जात आहे.एकलहरे गुटखा कनेक्शन दुरवर पसरले असुन खोलवर तपास केल्यास बरेच मोठे मासे गळाला लागु शकतात या गुटखा प्रकरणात काहींनी मध्यस्थांचीही भूमिका बजावली असुन फार मोठी तडजोड झाल्याचीही आता जोर धरु लागली आहे.


राहुरी विद्यापीठ, दि. 03 नोव्हेंबर, 2020 प्रतिनिधी मिनाष पटेकर राहुरी:_महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे काम बंद आंदोलनाच्या दुसर्या दिवशी समन्वय संघाचे सर्व पदाधिकारी, विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी एकत्र येवून प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार घोषणा देत परिसर दणानुन टाकला. सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी आणि आश्वासीत प्रगती योजना लागू व्हावी यासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राच्या 10 जिल्ह्यातील 27 संशोधन केंद्रे, 82 योजनेत्तर योजना, 45 अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, नऊ कृषि महाविद्यालये, आठ कृषि तंत्र विद्यालये, दोन माळी प्रशिक्षण केंद्रे, चार विभागीय विस्तार केंद्रे, पाच जिल्हा विस्तार केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस उत्सपुर्तपणे घोषणा देत बंद सुरु ठेवला. 

काम बंद आंदोलनाच्या दुसर्या दिवशी विद्यापीठ मध्यवर्ती परिसारातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी एकत्र येत मोर्चा काढला व पुर्ण विद्यापीठामध्ये घोषणा देत प्रशासकीय इमारतीसमोर सर्व कर्मचारी जमले. यावेळी या मोर्चाचे नतृत्व समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. सी.डी. देवकर, उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. महाविरसिंग चौहान, सहसचिव डॉ. संजय कोळसे यांनी केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे आणि डॉ. सी.डी. देवकर यांनी सातवा वेतन आयोग आणि आश्वासती प्रगती योगनाचे निवेदन कुलगुरु आणि कुलसचिव यांना दिले. आंदोलनाला उत्तर देतांना कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले कर्मचार्यांच्या मागन्या रास्त आहे. राज्यात सर्व शासकीय कार्यालयांना सातवा वेतन आयोग लागु झाला असून राज्यातील कृषि विद्यापीठे याच्यातून वंचीत राहिले आहे. नुकतीच झालेल्या 48 वी कृषि संशोधन आणि विकास समिती बैठकीमध्ये सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजना संदर्भात मी कृषि मंत्री आणि कृषि सचिवांबरोबर याबद्दल बोललो आहे. आपल्या मागन्यांचा शासन स्तरावर विचार होणार असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी आंदोलकांना

उत्तर देतांना कुलसचिव श्री. मोहन वाघ म्हणाले आत्तापर्यंत समन्वय संघाने दिलेले सर्व निवेदने आपण मंत्रालय स्तरावर पाठविले आहे. मंत्रालयातील अधिकार्यांबरोबर विद्यापीठ प्रशासन संपर्कात असून लवकरच समारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रसंगी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर म्हणाले समन्वय संघ दोन वर्षापासून सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजनासंदर्भात शासन दरबारी मागन्या मांडत आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सातवा वेतन आयोगाची फाईल तयार होवून वर्ष झाले आहे. त्यात ज्या तृटी निघाल्या त्याची पुर्तता करुन दिलेली असून देखील फाईल लाल फितीत अडकली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकवर्ग कर्मचार्यांच्या फाईलला ज्या तृटी होत्या त्या देखील चार महिन्यापुर्वी पुर्ण करण्यात आल्या. तरी देखील शासन दरबारी दिरंगाई का होत आहे हे न उलगडणारे कोडे आहे. विद्यापीठातील कर्मचार्यांची सहनशक्ती संपली असून नाविलाजास्तव आंदोलन करुन विद्यापीठ कर्मचारी आपला रोष व्यक्त करत आहे. तरी सातवा वेतन आयोग आणि आश्वासीत प्रगती योजना पुर्वलक्षी प्रभावाने लवकरात लवकर लागु व्हावी. 

यावेळी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. याप्रसंगी डॉ. महाविरसिंग चौहान, डॉ. उत्तम कदम, डॉ. चांगदेव वायाळ व श्री. वराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी समन्वय संघाचे गणेश मेहेत्रे, मच्छिंद्र बाचकर, महेश घाडगे, जनार्धन आव्हाड, मच्छिंद्र बेल्हेकर, संजय ठाणगे, एकनाथ बांगर, बाबासाहेब अडसुरे, जनार्धन आव्हाड, व सौ. सुरेखा निमसे इ. पदाधिकारी उपस्थित होते. आजचा मोर्चा पदव्युत्तर महाविद्यालयापासून जोरदार घोषणाबाजी करत अभियांत्रिकी महाविद्यालय येथे घोषणा देवून प्रशासकीय इमारतीसमोर ठिया आंदोलन केले. या मोर्चामध्ये मध्यवर्ती परिसरातील सर्व अधिकारी व कर्मचारी सामाजीक आंतर राखत मोठ्या संख्येने उपस्थित होते.






श्रीरामपूर -  कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्या सह देशभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने, मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या उपचाराकरिता रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने, महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, संघटनेचे अध्यक्ष अशोक जोशी,उपाध्यक्ष संतोष कोठारी, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अबूभाई कुरेशी,सचिव हजी अमीन शेख ,खजिनदार तुकाराम ताक, जलील भाई शेख, फरीद शेख,नगरसेवक मुख्तार शाह, आदींच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले, यावेळी जवळपास २०० लोकांनी रक्तदान केले, सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास खासदार सदाशिव लोखंड, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सदिच्छा भेट दिली ,तसेच नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दूरध्वनी व्दारे शुभेच्छा संदेश दिला,सदरच्या भव्य रक्तदान शिबीरस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून ,२०० नागरिकांनी यावेळी रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.



 

शिर्डी (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हामध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे ,वाळूतस्करी तसेच गुन्हेगारीला  लगाम घालण्यांचे व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने आपण यापुढे करणार आहोत .असे आश्वासन अहमदनगर जिल्ह्याला नवीन आलेले कर्तव्यदक्ष असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

  अहमदनगर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी शिर्डीत आले होते. त्यांनी शिर्डी पोलीस उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पाचही पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीला पोलिस उप विभागीय अधिकारी संजय सातव

तसेच शिर्डी, कोपरगाव शहर, कोपरगाव ग्रामीण, राहाता ,लोणी, पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी उपस्थित होते .यावेळी उत्तर नगर जिल्हा तसेच शिर्डी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमध्ये, शहरांमध्ये अवैध धंदे ,अवैध व्यवसाय, वाळूतस्करी ,गुन्हेगारी या सर्वांचा आढावा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतला, यापुढे या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे, वाळू तस्करी, गुन्हेगरी त्वरित बंद व्हावेत, यासाठी सक्त सूचना त्या त्या पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना यावेळी देण्यात आल्याचे  समजते. त्यानंतर  या आढावा बैठकीनंतर शिर्डी पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक जितेश लोकचंदाणी, अध्यक्ष किशोर पाटणी, कार्याध्यक्ष राजेंद्र बनकर, सदस्य हेमंत शेजवळ, विनोद जवरेनी त्यांचा शिर्डीत प्रथम सत्कार करुन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद न घेता स्वतः शिर्डी पत्रकार संघाला आपणच या उत्तर नगर जिल्ह्यातील प्रश्न, समस्या ,अवैध धंद्या बाबत वेळोवेळी माहिती द्या, सर्वांच्या सहकार्याने आपण अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंदे वाळूतस्करी, गुन्हेगारी मोडून काढू, नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, पत्रकार ,पोलीस अधिकारी, नागरिक या सर्वांनी समन्वय साधून अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे ,आपला तसा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी पत्रकारांचेही सहकार्य आवश्यक आहे. असे यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच शिर्डीत आल्यामुळे त्यांनी साईबाबा मंदिर बंद असल्यामुळे बाहेरूनच लांबून दर्शन घेतले, सोलापूर हुन अहमदनगरला बदलून आलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यामध्ये प्रथम बदल्यांचा दणका पोलीस अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर आता ते अवैध धंदे ,गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे त्यांची धडकी अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारांनी ,वाळूतस्करांनी घेतली आहे. त्या धर्तीवर उत्तर नगर जिल्ह्यातील शिर्डीचा त्यांचा आजचा हा दौरा महत्त्वाचा ठरला आहे .त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत आढावा बैठकीत पोलीस निरीक्षकांना सक्त सूचना करत अवैध धंदे त्वरित बंद करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत असे समजते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget