March 2023

अहमदनगर प्रतिनिधी-पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने

पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन  नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/गणेश वारुळे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापु फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशांनी मिळून शेतकरी, शेतमजुर असे वेशांतर करुन
संशयीतास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना तो पळुन जावु लागला अधिकारी व अंमलदारांनी संशयीताचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले याने त्याचे नाव 1) कयामुद्दीन ऊर्फ भैय्या कुतुबूद्दीन शेख, सांगीतले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली आसता अंगझडतीत एका राखाडी रंगाचे सॅकमध्ये 6 गावठी बनावटीचे कट्टे व 12 जिवंत काडतूस मिळून आले
बारकाईन चौकशी करता त्याने सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आणले असल्याचे सांगितले.
सदर घटने बाबत पोहेकॉ संदीप कचरु पवार, ने. स्थागुशा, अहमदनगर यांनी सोनई पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन सोनई  पोलीस स्टेशन गु.र.नं. 143/2023 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील कायदेशिर कार्यवाही सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बेलापुर प्रतिनिधी -जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, यांनी पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली दत्तात्रय डहाळे रा. शिर्डी हा त्याचे साथीदारासह गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी बाजारतळ, बेलापुर येथे येणार आहेत  अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने

 अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ / २१४५ मनोहर सिताराम गोसावी, पोहेकॉ / २१६४ दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे, पोहेकॉ/८७२ सुरेश माळी, पोहेकॉ/संदिप घोडके पोना / विशाल दळवी,पोना/ शंकर चौधरी,पोना/दिलीप शिंदे, पोना/संदिप  चव्हाण पोकों / सागर  ससाणे, पोकॉ/ रोहित येमुल पोकों / रणजित  जाधव व चापोहेकॉ उमांकात गावडे, चापोहेकॉ / अर्जुन बडे अशांनी मिळून वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने बेलापुर येथील बाजारतळ येथे जावुन सापळा लावुन 

 रेकॉर्डवरील इसम नामे दत्तात्रय डहाळे व त्याचे सोबत एक इसम बेलापुर बाजार वेशीतून बाजारतळाकडे पायी येतांना दिसल्याने पथकाची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे (१) दत्तात्रय सुरेश डहाळे वय ३४ रा. श्रीराम नगर, शिर्डी, (२) सुलतान फत्तेमोहमद शेख वय २९ रा. महलगल्ली, बेलापुर असे असल्याचे सांगीतले.

त्यांचे अंगझडतीत एकुण १,४५,७००/- रु. किमतीचा मुददेमाल त्यात ०४ देशी बनावटीचे पिस्टल, ८ जिवंत काडतूसे असा मुद्देमाल वरील नमुद दोन्ही इसमांचे कब्जात मिळून आला आहे.

       दत्तात्रय सुरेश डहाळे वय ३४ रा. श्रीराम नगर, शिर्डी, ता. राहाता जि. अहमदनगर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी औरंगाबाद जिल्हयात अग्नीशस्त्र सह एक तसेच खुनाचा प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर घटने बाबत पोहेकॉ / मनोहर सिताराम गोसावी नेम. स्थागुशा, अहमदनगर यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कायदेशिर कार्यवाही श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदा यांनी केलेली आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्री  स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्र बेलापुर या ठिकाणी स्वामी समर्थ प्रगट दिन वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला.                स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त बेलापुर येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्रात सकाळी आरती त्यांनंतर स्वामी चरित्र वाचन नंतर आरती  व शेवटी सहभोजन सायंकाळी पत्रकार देविदास देसाई व प्रतिभा देसाई यांच्या हस्ते आरती असा कार्यक्रम संपन्न झाला स्वामी समर्थ महाराजाच्या प्रगट दिनास परिसरातील सेवेकरी महीला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी विठ्ठल गाढे यांनी सर्व सेवेकऱ्यांचे आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील निर्मला रामराव नागले वय वर्ष ६६ या गेल्या वीस दिवसापासून बेपत्ता असुन कुणाला आढळल्यास बेलापुर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे अवाहन निर्मला नागले यांच्या नातेवाईकांनी केली आहे .                 निर्मला नागले या भोळसर स्वभावाच्या असुन वीस दिवसापासून त्या बेपत्ता झालेल्या आहेत त्यांची सर्वत्र शोधाशोध केली परंतु त्या आढळून न आल्यामुळे बेलापुर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद देण्यात आली असुन रंग सावळा उंची पाच फुट डोक्यावरील केस काळे पांढरे असुन त्यांच्या अंगात निळ्या रंगाची साडी आहे सदर वर्णनाची महीला कोठे आढळल्यास बेलापुर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे अवाहन नागले कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे

बेलापूरःमहिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम होत असून महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेऊन  महिलांनी  सक्षम व आत्मनिर्भर बनावे असे मत बेलापूर बु चे उपसरपंच अभिषेक खंंडागळे यांनी केले.        बेलापूर बुll येथील स्वरांजली महिला बचत गटाच्या महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर अंतर्गत, प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्र, राहुरीच्या वतीने,पुणे येथील श्री सिध्दी ऍग्रोटेक लिमिटेड कडून औजार बँकेचे वाटप करण्यात आले यावेळी  ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावकरी पतसंस्थेचे संचालक रावसाहेब अमोलिक हे होते.

स्वरांजली महिला बचत गटाच्या महिलांना सात लाख किमतीची कडबा कुट्टी, फवारणी यंत्र, घरघंटी,पेरणी यंत्र आदी शेती उपयोगी विविध औजारांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री.खंडागळे म्हणाले की,ग्रामीण महिला ह्या मुख्यता प्रपंचाचा गाडा हाकतात.ग्रामीण महिला ह्या मुळातच कष्टाळू असतात.बहुतांश ग्रामीण महिला ह्या शेती व्यवसायाशी निगडीत असतात.अनेक महिला शेतीत प्रत्यक्ष राबतात.अशा महिलांना औजार बँकेव्दारे उपलब्ध झालेल्या औजारांचा निश्चितच लाभ होईल.सदरची औजारे सदर महिलांना भाडेतत्वावरही देता येतील आणि त्यातून अर्थार्जन करता येईल.सदरची औजारे बचत गटांस दिल्याबद्दल श्री.खंडागळे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळास धन्यवाद दिले.                               यावेळी म.आ.वि.महामंडळाचे व्यवस्थापक महेश अबुज व बचत गटाच्या मार्गदर्शिक कल्पना काळे यांनी सदर योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तर योगेश्वर झावरे,अतुल दौले व राम झेंडे यांनी औजाराबाबत व त्याच्या वापराबाबत माहिती दिली. कार्यक्रमास स्वरांजली महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री शशिकांत तेलोरे,

निकिता तेलोरे,सविता गायकवाड ,रंजना पवार,वंदना पवार ,तरन्नुम सय्यद,नंदा पोपळघट,लता पोपळघट, निर्मला पोपळघट,नूतन पोपळघट, शशिकांत तेलोरे, पप्पू मांजरे, निशिकांत तेलोरे, रुपेश सिकची आदि उपस्थित होते.

बेलापुर (प्रतिनिधी  )-अचानक आलेला अवकाळी पाऊस व झालेली गारपीट यामुळे या भागातील शेतकरी पुर्णपणे उध्वस्त झाला असुन नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी केली आहे                         बेलापुर परिसरातील कुऱ्हे वस्ती दिघी रोड गोखलेवाडी खंडागळे वस्ती गायकवाड वस्ती परिसरास गारपीट व अवकाळी पावासाने तडाखा दिला .अचानक झालेल्या निसार्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्याचे होत्याचे नव्हते झाले आहे या नुकसानग्रस्त भागास बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले ऐनतपुर सेवा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक व्हा चेअरमन  पंडीतराव बोंबले राजेंद्र राशिनकर सुरेश कुऱ्हे नरेंद्र कुऱ्हे  वैभव कुऱ्हे शेषराव पवार राजेंद्र लगे भास्कर कुऱ्हे मल्हारी लगे आदिसह अनेकांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देवुन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी होती नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संप सुरु असला तरी मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात येतील हतबल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मीळणे गरजेचे आहे .त्याकरीता शासनाने शेतकरीपुत्र असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे

बेलापूर(प्रतिनिधी)ः  -बेलापुर बु !! परिसरातील अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे महसूल व दुग्धविकास मंञी नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांनी महसूल विभागाच्या अधिका-यांना दिले असल्याची माहिती जि.प सदस्य शरद नवले तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे, गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे यांनी दिली आहे                                   शनिवारी बेलापूर शिवारातील कुऱ्हे वस्ती,दिघी रोड,गोखलेवाडी,खंडागळे वस्ती,गायकवाड वस्ती परिसरास गारपीट व अवकाळी पावसाने तडाखा दिला.यात गहू,कांदा,हरभरा,ऊस,मका,द्राक्ष,टरबुज, डाळिंब आदि फळबाग व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची  जि. प. सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,संचालक महेश कुऱ्हे आदिंनी  शेतक-यांसह सर्वश्री नुकसानग्रस्त शेतकरी रामेश्वर नागले,दत्ता साळुंके,अनिल वाबळे, श्रीहरी बारहाते,राहुल वाबळे,अर्जुन कुऱ्हे,जालिंदर कुऱ्हे,सुधाकर खंडागळे,मनोज मेहेत्रे,दादासाहेब कुऱ्हे,संतोष अमोलिक, प्रकाश मेहेत्रे, अशोक कुऱ्हे, नामदेव मेहेत्रे, कैलास कुऱ्हे,सोहम लगे,विलास कुऱ्हे,वृद्धेश्वर कुऱ्हे, किरण कुऱ्हे, अनिल कुऱ्हे, गोरक्षनाथ कुऱ्हे, सुनिल कुऱ्हे, राजधर खंडागळे, संजय भुजाडी, वाल्मिक भुजाडी, देवराम गाढे आदी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, मका, ऊस, द्राक्ष, डाळिंब, टरबूज आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त भागाची पहाणी झाल्यानंतर  महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून नुकसानीची माहिती देण्यात आली तसेच तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.या मागणीची दाखल घेत महसूल मंञी नामदार विखे पा.यांनी तातडीने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.गावाचे लोकप्रतिनिधी तसेच महसूल मंञ्यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल आपदग्रस्त शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी बेलापुर  पोलीसांच्या मदतीने प्रवरा नदीपात्रातुन होत असलेल्या बेकायदा वाळू वहातुक करणाऱ्या वहानावर मोठी कारवाई करुन सात  लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला असुन तीन वहानावर कारवाई करण्यात आली आहे                                           उक्कलगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असुन लगेच गेल्यास वाळूची वहाने मिळून येतील अशी गुप्त खबर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली त्यांनी तातडीने आपले वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ नंदु लोखंडे यांना सोबत घेवुन छापा टाकला असता तीन वहाने वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर वाळू वहातुक करताना आढळून आली पहील्या घटनेत रमेश धनवटे व अभिषेक किशोर गायकवाड रा उक्कलगाव हे प्रवरा नदीपात्रात नाव घाटाजवळ टाटा झेनाँन गाडी क्रमांक एमएच ४१ जी ९०७९ मधुन अवैधरित्यावाळु वहातुक करताना आढळून आले पोलीसांनी २ लाख पन्नास हजार रुपये किंमतीची वाळू वाहातुक करणारी गाडी व त्यातील पाच हजार रुपये किंमतीची वाळू असा दोन लाख पंच्चावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या बाबतची खबर पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दिली  दुसऱ्या घटनेत गणेश फुलपगार उक्कलगाव व सागर साळवे राहणार बेलापुर हे उक्कलगाव शिवारात झेनाँन क्रमांक एमएच १९ एस ७३९४ मधुन अवैधरित्या वाळू वहातुक करताना आढळून आले पोलीसांनी दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीची वाळू वहातुक करणारी गाडी व त्यातील पाच हजार रुपयांची वाळू असा दोन लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तीसऱ्या घटनेत नाना बाळू गुंजाळ हा एक पांढऱ्या रंगाचा टाटा झेनाँन क्रमांक एमएच १५ ईजी १७० किंमत रुपये दोन लाख पन्नास हजार व त्यातील पाच हजार रुपयांची वाळू असा दोन लाख पंच्चावन्न हजार रुपयांचा असा एकुण ७ लाख ६५  हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त  केला असुन संबधीता विरोधात भा द वि कलम ३७९ सह भारतीय पर्यावरण संरक्षक कायदा कलम ३/१५ प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे करत आहेत  [बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  व सर्व सदस्यांनी गाव व परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पोलीसांनी मोठी कारवाई केली असुन गावातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी बेलापुर ग्रामस्थांनी केली आहे ]

श्रीरामपूर : काल सायंकाळी सव्वा ५ वाजेच्या सुमारास, तपासासाठी आलेल्या जालना पोलिस अटक करतील या भीती पोटी. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील, ३५ वर्षीय जाकीर बबन पठारे नावाच्या इसमाने. ग्रामपंचायती शेजारील दुकानाच्या शेड मध्ये,स्वतःला पेटून घेतल्याची घटना घडली होती. ज्यात जखमी पठारे यास तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जाकीर पठारे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर लोणी येथे उपचार सुरू असतांना. १२ मार्च २०२३ च्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास, उपचार सुरू असतांना जाकीर बबन पठारे याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने. दत्तनगर परिसरात शोककळा पसरली आहे. दत्तनगर येथे यापूर्वी देखील अशाच पद्धतीने एका युवकाने, स्वतः ला पेटवून आपली जीवनयात्रा संपवली होती आणि आता जाकीर पठारे याने देखील, स्वतः ला पेटून आपला जीव दिल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

बेलापूरःबेलापूर-खडाळा-अस्तगाव या कुऱ्हे वस्ती रस्त्याच्या उर्वरित कामाला पाठपुरावा करून निधी उपलब्ध करू देऊ असे आश्वसन खासदार सदाशिव लोखंडे यांनी सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील कुऱ्हे वस्ती परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले.

कुऱ्हे वस्ती वरील रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुक तसेच कुऱ्हे वस्ती परिसरातील  नागरिकांच्या वतीने खा.सदाशिव लोखंडे यांच्याकडे करण्यात आली होती.या मागणीची दखल घेत खासदार सदाशिव लोखंडे यांनी खासदार निधी मधून १० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व नुकतेच त्या निधीतून रस्त्याचे काम करण्यात आले. याबद्दल श्री. लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात बेलापूर -खंंडाळा-अस्तगाव(प्रजिमा१२)हा रस्ता कु-हे वस्ती,जवाहरवाडी,टिळकनगर,रांजणखोल,खंडाळा,अस्तगाव असा आहे.हा रस्ता वर्दळीचा असून  वाहतुकीसाठी महत्वाचा आहे.तसेच हा रस्ता झाल्यास शिर्डी या तिर्थस्थळला जाण्यासाठी अत्यंत सोयीचा होणार आहे.या रस्त्यामुळे बेलापूर -श्रीरामपूर रस्त्यावरचा वाहतुकीचा भार कमी होणार आहे. सध्या हा रस्ता अत्यंत खराब झाला असून वाहतुकीसाठी अडचणीचा झाला आहे.यामुळे सदर रस्त्याचे नुतणीकरण व मजबुतीकरण होणे गरजेचे आहे.यासाठी खासदार निधीतून या रस्त्याचे कामासाठी निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरषोत्तम भराटे, प्रभात कुऱ्हे,अशोक कुऱ्हे,बापूसाहेब कुऱ्हे, सुनिल जाधव, दत्ता साळुंके, महेश कुऱ्हे, प्रफुल्ल कुऱ्हे, बापूसाहेब निर्मळ आदी उपस्थित होते.

बेलापुर- (प्रतिनीधी )राहुरी तालुक्यातील संक्रापुर येथील जाधव डीपी नादुरुस्त होवुन अठरा दिवस होवुनही नविन डीपी न आल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात भरुन न येणारे नुकसान होत असुन तातडीने डीपी देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंर्द मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे                                       पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की संक्रापुर तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथील जाधव डी पी वर मोठ्या प्रमाणात शेतकरी अवलंबून असुन हे ट्रान्सफार्मर जळुन अठरा दिवस झाले अजुनही दुरुस्त करुन मिळालेले नाही या बाबत महावितरणकडे वारवार मागणी करुनही डीपी देण्यास टाळाटाळ केली जात आहे .राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा यांच्या जनता दरबारात देखील ही समस्या मांडलेली आहे त्या घटनेस देखील सहा दिवस उलटुन गेलेले आहे विज नसल्यामुळे सर्व पिके जळून चाललेली आहैत जनावरांच्या चारा पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असुन आपणच आमचे मायबाप आहात आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेलद्वारे केली आहे या निवेदनावर देविदास देसाई, कल्याणराव जगताप, नबाजी जगताप, बाळासाहेब जाधव, नारायण जाधव ,बाळासाहेब गुंड, नंदकुमार लोंढे, वसंत बर्डे ,संपतराव होन, पंडीतराव थोरात ,विश्वनाथ जगताप, विकास पा थोरात, कचेश्वर जगताप, राजेंद्र जगताप, विश्वनाथ पवार ,वसंत लोखंडे, बाजीराव जगताप आदीच्या सह्या आहेत

बेलापूर: छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त नगररोड,वीर सावरकर चौक याठिकाणी शिवपुतळ्याचे पुजन व आरती बेलापूरचे भुमिपुत्र पोलिस उप अधीक्षक मिलिंद शिंदे साहेब (चंद्रपूर)यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यानिमित्ताने केशव गोविंद विद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रशिक्षक अकबर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तलवार बाजीचे प्रात्यक्षिक सादर केले,या तलवार बाजीचे प्रात्यक्षिकास उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली व बक्षिसांची बरसात केली.या कार्यक्रमास मंडळाचे आधारस्तंभ सुनिल भाऊ मुथ्था,जि.प. सदस्य शरदराव नवले,पं.स.सदस्य अरुण पा.नाईक,सरपंच महेंद्र साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे , रविंद्र खटोड, भरत साळूंके,सुधीर नवले, सुवालालजी लुंक्कड, प्रशांत लढ्ढा ,शांतीलाल हिरण ,अशोक गवते ,राजेश खटोड विलासनाना मेहेत्रे, लहानुभाऊ नागले,भाऊ डाकले, पत्रकार देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, मारूती राशीनकर ,वैभव कुर्हे, भाऊसाहेब तेलोरे,सागर खरात, रमेश अमोलिक ,रावसाहेब अमोलिक ,महेश कुर्हे, मुश्ताक शेख ,प्रभात कुर्हे ,साईनाथ शिरसाठ, अमोल गाढे ,दिपक क्षत्रिय ,मोहसिन सय्यद ,आलम शेख ,समीर जाहगिरदार ,विलास सोनवणे ,सचिन वाघ ,राकेश कुंभकर्ण ,सागर ढवळे ,किशोर खरोटे , बाळासाहेब दाणी, पप्पू कुलथे,कलेश सातभाई , गजानन डावरे, शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच मंडळाच्या वतीने उद्या शनिवार दिनांक ११मार्च रोजी सायंकाळी ६वा.जे.टि.एस.हायस्कुलच्या समोरील मैदानावर प्रसिद्ध व्याख्याते श्री. सोपानदादा कनेरकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे त्या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे व कार्याध्यक्ष राहुल माळवदे यांनी केले आहे.

बुलढाणा-देशभरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या, तसेच राज्यातील सर्वात मोठ्या  यात्रेपैकी एक असलेली. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या यात्रा आज सोमवारी रोजी आरंभ झाला असून. यात्रेचा शुंभारंभ जवळपास १० ते १२ ट्रक नारळाच्या महा होळीने करण्यात आला. करोनामुळे मागील ३ वर्षे यात्रा न भरल्याने, यंदाच्या वर्षी लाखो सर्वधर्मीय भाविकांनी हजरत सैलानी बाबा यात्रेस हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या होळीसाठी सैलानी बाबा दरगाह परिसरातील मुजावर परिवाराच्या शेतात, जेसीबीच्या साहाय्याने मोठा खड्डा घेऊन, महा होळीचे दहन करण्यात आले. यावेळी शेख रफिक मुजावर, पंचायत समिती ससदय शेख मुजावर,शेख शाफिक मुजावर व इतर मुजावर परिवारातील मान्यवरांसह, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, तहसीलदार रुपेश खंडारे ,रायपूरचे पोलीस निरीक्षक राजवंत आठवले यांच्या सह लाखो भाविकांच्या साक्षीने, नारळांची महाहोळी प्रज्वलित करण्यात आली. दक्षतेचा भाग म्हणून अग्निशमन दल तैनात करण्यात आले होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-गावातील वातावरण अवैध व्यवसायामुळे दुषित होत असेल तर पोलीसांनी गावातील सर्वच अवैध व्यवसाय बंद करावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी दिला आहे                           प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सरपंच महेंद्र साळवी यांनी पुढे म्हटले आहे की गावात चाललेल्या अवैध व्यवसायामुळे गावाची शांतता धोक्यात आली असेल तर गावातील सर्व अवैध व्यवसाय त्वरीत बंद करावेत गावात गुटखा मटका जुगार बिंगो जुगार सर्व काही खुले आम सुरु आहे गावची शांतता धोक्यात आली असल्याचे वृत्त प्रकाशीत झाले असुन गावातील सर्व अवैध व्यवसाय पोलीसांनी तातडीने बंद करावेत या बाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येणार असुन हे व्यवसाय बंद न झाल्यास गावातील एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस राकेश ओला यांना भेटणार आहे गावातील कुणीही पुढारी अवैध व्यवसायाला पाठींबा देणारच नाही असे कुणी पुढारी अवैध व्यवसायाला गुपचुप पाठींबा देत असेल तर असे पुढारीही गावापुढे उघडे झालेच पाहीजे परंतु पुढाऱ्याच्या नावाखाली कुणी मलीदा लाटत असेल तर ते ही उघड झाले पाहीजे आम्ही केव्हाच अवैध व्यवसायाला पाठींबा दिलेला नाही आता या पुढे गावातील सर्व अवैध व्यवसाय बंद व्हावेत अशी बेलापुर ग्रामस्थांची मागणी आहे अवैध व्यवसायामुळे गावातील तरुण पिढी भरकटली आहे मटका गुटखा अन दारुच्या नशेत तरुण पिढी बरबाद होत आहे त्यामुळे गावातील अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत अशी मागणी सरपंच साळवी यांनी केली आहे अवैध धंद्याबाबत आमदार लहु कानडे यांनी विधानसभेत प्रश्न मांडला आता बेलापुरचे प्रथम नागरीक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे त्यामुळे आता लोकप्रतिनिधीच आवैध धंद्याबाबत आक्रमक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे

बेलापुर (प्रतिनिधी  )-ग्रामीण भागाचा विकास होण्याकरीता दळणवळणाची साधने, रस्ते  चांगली हवीत .त्यामुळेच खेड्याची ,ग्रामीण भागांची प्रगती व्हावी या करीता आमदार लहु कानडे यांनी मतदार संघात रस्त्याची कामे वेगाने करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद़्गार माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी काढले                                       बेलापुर हद्दीतील गायकवाड वस्ती सुभाषवाडी वळदगाव या दिड किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकर अंदाजीत  रुपये ४० लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभांरभ माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्या वेळी बोलताना कानडे म्हणाले की या रस्त्याच्या कामासंदर्भात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी वांरवार पाठपुरावा केला होता आमदार लहु कानडे यांनी मतदार संघातील सर्व रस्ते दुरुस्त करण्याचा चंग बांधला आहे असेही ते म्हणाले. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक म्हणाले की आमदार लहु कानडे या तालुक्याचे लोकप्रतिनीधी झाल्यापासुन श्रीरामपुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत असेही नाईक म्हणाले या वेळी बेलापुर सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले म्हाणाले की सुभाषवाडी वळदगाव या नागरीकासाठी श्रीरामपुर कडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे तसेच विद्यानिकेतन शाळेत १५०० च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत असुन हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी पालकांची अनेक दिवसापासुन मागणी होती ही मागणी आमदार लहु कानडे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तात्काळ या रस्त्याच्या कामास ४० लाख रुपयांचा निधी दिला असुन बेलापुर ते श्रीरामपुर या रस्त्याच्या कामास आमदार कानडे यांनी १६ कोटी रुपये दिले असल्याचे नवले यांनी सांगितले या वेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, श्रीकृष्ण ताम्हाणे यांनीही मनोगत व्यक्त केले .या वेळी डाँक्टर राजीव शिंदे, प्राचार्य शेळके ,किशोर नवले,अशोक भोसले,प्रमोद भोसले,दिपक निंबाळकर ,माजी सभापती दत्ता कुऱ्हे ,व्हा .चेअरमन पंडीतराव बोंबले,गणेश राशिनकर परिक्षित नवले ,विपुल नवले सागर नवले,अशोक नवले, संजय नवले ,महेश खंडागळे ,वैष्णव साळवे संदीप नवले आदिसह विद्यानिकेतन शाळेतील शिक्षक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget