Latest Post

बेलापूर:(प्रतिनिधी  )- कोरोना काळात बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने चालविण्यात आलेले कोविड सेंटर हे सर्वासाठी प्रेरणादायी ठरले आहे.या सेंटरमुळे शासन यंञणेवरील ताण हलका होवुन सर्वसामान्य कोवीडग्रस्तांनाही दिलासा मिळाला असल्याचे मत तहसीलदार प्रशांत पाटिल यांनी व्यक्त केले.                               बेलापूर येथील प्राथमिक शाळेतील मोफत कोवीड सेंटरचा तहसीलदार प्रशांत पाटील यांचे हस्ते धन्वंतरी पूजन  व वृक्षारोपण करुन समारोप करण्यात आला त्या वेळी बोलताना. तहसीलदार पाटील  म्हणाले की,कोरोना संकटाने सर्वांनाच चिंतेत टाकले होते.अशा संकट समयी बेलापूरकरांनी मोफत कोवीड सेंटर सुरु केले.या सेंटर मध्ये एकूण २५० रुग्णांवर मोफत औषधोपचार तसेच  त्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या कोविड सेंटर करीता समाजसेवी संस्था,दानशूर व्यक्तींनी देणग्या देवून तसेच अन्नदान करुन दिलेले योगदानही आदर्शवत व प्रेरणादायी असुन कोरोनाची तिसरी लाट येवू नये अशीच आशा बाळगु या परंतु तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यासाठी बेलापुरकर सक्षम आहेत याची खात्री पटली  या कोवीड सेंटरमुळे शासनाचे काम देखील सोपे झाले नागरीकांची तपासणी करणे त्यांना क्वारंटाईन करणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही कामे जि प शरद नवले सरंपच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे व त्यांच्या टिमने यशस्वीपणे पार पाडली पोलीस पाटील अशोक प्रधान यांनीही फार मेहनत घेतली आपल्या सर्वांच्या कष्टाचे चिज म्हणजे रुग्ण बरा होवुन घरी गेला  असल्याचे पाटील म्हणाले.                            या वेळी जि.प.सदस्य शरद नवले,सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले  उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी देणगीदार,अन्नदान देणारे दाते त सेच रुग्ण सेवा करणारे  स्वयंसेवक,ग्रामस्थ,पञकार आदिंचे आभार मानले.या प्रसंगी,रणजित श्रीगोड,अजय डाकले,देविदास देसाई,नवनाथ कुताळ, विष्णुपंत डावरे,शांतीलाल हिरण,प्रशांत लढ्ढा,जालिंदर कु-हे,भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ,प्रकाश नवले,प्रफुल्ल डावरे,पुरुषोत्तम भराटे,प्रविण लुक्कड,पंकज हिरण,यादव काळे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,पोलीस पाटील अशोक प्रधान,डॉ.मच्छिंद्र निर्मळ, डॉ.सुधीर काळे,डॉ.रविंद्र गंगवॅल, बाळासाहेब दाणी,मोहसिन सय्यद,अशोक राशिनकर,अकबर सय्यद,हर्षद दुधाळ,सुहास शेलार,शफीक आतार,किरण गागरे,गणेश बंगाळ,शफीक बागवान,विशाल आंबेकर,दादासाहेब कुताळ,प्रशांत मुंडलिक,राहुल माळवदे,रोहित शिंदे,कामगार तलाठी कैलास खाडे,ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे, सचिन वाघ,गोपी दाणी,अशोक मेहेत्रे,सुधीर करवा,अरुण अमोलिक, नितीन नवले,दिलीप अमोलिक,किशोर खरोटे,सतीश शेलार,हर्षद दुधाळ,सोमनाथ जावरे,शुभम नवले,अजय शेलार,रावसाहेब अमोलिक, विशाल शेलार,भास्कर वारे,महेश कु-हे,सद्दाम आतार,नंदू शेलार,सुनील साळुंके,बाळासाहेब शेलार,भारत बुर्गुल,केशव काळे,अजित शेलार,प्रतिक काळे,सुखदेव गायकवाड, निखिल शेलार,अनिकेत भडके,सोनू खैरे,फिरोज सय्यद, सुभाष शेलार,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यात ७२ हजार आशा व ४ हजार गट प्रवर्तक (बी.एम) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत

आहेत. माहितीचे अचुक संकलन व अहवाल सादरीकरण, लसीकरण, व्ही.एच.एन.एस.सी. सभा, प्राथमिक आरोग्य

केंद्र स्तरावरील बैठक ही सर्व कामे करावी लागतात. याशिवाय त्यांना विविध ७० कामावर आधारीत मोबदला

कोरोना १९ पुर्वकाळात मिळत असे ती रक्कम कामानुसार सरासरी २००० रु. असले परंतु त्यांना कोरोना संबंधित

काम दररोज ८ तास करावे लागते त्यामुळे ती रकम मिळणे बंद झाले आहे.गट प्रवर्तक या सुशिक्षित व पदविधर महिला असुन त्यांना सुमारे २५

आशा स्वयंसेविकेवर (Ashe Worker)

साठी ठेवावे लागते. त्याकरिता त्यांना दरमहा सुमारे ११६२५ इतके मानधन मिळते त्यातील बरीचशी रकम ग्राम भेटी

देताना प्रवासापोटी खर्च होतात. त्यामुळे वस्तुस्तः कामाचा मोबदला फार कमी मिळतो.आशा स्वयंसेविका यांचे वेळा वाधक असुन त्यांनी आपले घरदार सांभाळुन आठवड्यातुन ४ दियस काम

करावे व तेही २ ते ३ तास असावे असे सेवाधर्ती अटीमध्ये आहे.

सन २०२१ पासुन ग्रामिण व शहरी भागात आशा व गटप्रवर्तकांचे प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र व

कारंटाईन कॅम्प येथे सकाळ पासुन ८ तासाची उघुटी लावली आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रात तर आशांना

घेऊन अॅन्टीजेन टेस्ट करावी लागत होती ती आता आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांना देण्याबाबत नुकताच आदेश

काढला आहे. दैनदिन लसीकरणाच्या आढाव्या पासुन शासनाच्या सर्व योजनांचा तसेच आशांनी (Asha Worker) केलेल्या

सव्र्हेचा कामाचा दैनदिन आढावा गटप्रवर्तक यांना वरीष्ठांना सादर करावा लागते. त्यामुळे गटप्रवर्तकावर अत्यंत बोजा पडत आहे. त्या स्वताच्या जबाबदारीवर उदार होऊन कुटुंबाची पर्वा न करता राष्ट्रीय कर्तव्य समजुन जोमाने

काम करत आहोत मात्र या कामाचा मोबदला त्यांना काहीही मिळत नाही ही वेठ बिगारी व सक्त विनामुल्य मजुरी

काम करत आहोत मात्र या कामाचा मोबदला त्यांना काहीही मिळत नाही ही वेठ बिगारी व सक्त विनामुल्य मजुरी

करुन घेणे व किमान वेतन कायद्यातील तरतुदीचा सारासार भंग आहे हे भारतीय सविधान २१ व २३ व्या

कलमानुसार निषिध्द आहे.

महत्वाच्या मागण्या है महानगर पालिकेमधील कोविडचे काम करण्यासाठी दररोज आशांना यापुर्वी ३०० रु. मोबदला दिला मात्र मार्च

२०२१ पासुन तो दिला नाही तो कमीत कमी ५०० रु. दरमहा देण्यात यावा. ग्रामिण विभागातील आशा स्वयंसेविका यांना कोबिड - १९ चे काम करण्याबाबत दरमहा १००० रु. व गट

प्रवर्तक यांना ५०० रू, भत्ता देण्यात येत होता. मार्च २०२१ नंतर देण्यात आली नाही जी दिली ती अत्यल्प

आहे. अनेक जिल्हा परिषद ग्रामपंचायत मार्फत 4000 रु. प्रोत्साहन भत्ता देतात परंतु अनेक ठिकाणी तो दिला जात

नाही तो दिलाच पाहिजे. नागरी व ग्रामिण भागातील आशांना व गट प्रवर्तकांना कोणताही भेदभाव न करता दररोज ३०० रू. देण्यात

आलाच पाहिजे. आशा वर्कर यांना१८ हजार बेतन व गट प्रवर्तक यांना २१000 हजार रुपये दरमहा पगार द्यावा. आशा व गट प्रवर्तकवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी कडक योजना करुन कडक शासन करावे.

ज्या आशा व गट प्रवर्तक कोविंड - १९ मध्ये काम करताना १ ते २ महिने कोवित बाधीत असलेमुळे त्यांचे

पेमेंट मानधन निघाले नाहीत ते निघलेच पाहिजे.

कॉ. सुरेश पानसरे उत्तर विभाग संघटक,सौ. सुवर्णा मधुकर थोरात कार्याध्यक्ष अॅड.कॉ. सुभाष लांडे जिल्हाध्यक्ष अंज.कॉ. सुधीर टोकेकर राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सेक्रेटरी व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी आदींच्या सह्या आहे.

श्रीरामपुर/प्रतिनिधी :-  हिंदू जननायक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस  सालाबाद प्रमाणे याही वर्षी 

मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुर येथील मनसे कार्यालय येथे केक कापून व १५३ वृक्ष वाटप करून मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला. 

राज ठाकरे यांचा वाढदिवस श्रीरामपूर येथील मनसे कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे मनाले की पक्षाच्या स्थापनेपासून दर वर्षी आम्ही राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष वाटपाचे कार्यक्रम करत असतो यावर्षी ५३वा वाढदिवस असल्याकारणाने १५३ झाडे वाटण्यात आले एवढी  झाडे 

वाढण्याचे कारण की कोरोना आजारामुळे अनेकांना ऑक्सिजनची कमतरता जाणवले आहे हे दिलेले झाडे आपल्या घरासमोर व आपल्या भागात काळजीपूर्वक सर्व कार्यकर्त्यांनी लावावेत जेणेकरून आपल्या या उपक्रमाची दखल घेऊन इतर नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावतील व झाडे झाडांचे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यास कोणालाही ऑक्सिजनची गरज भासणार नाही हो तसेच प्रदूषण देखील कमी होईल तसेच सदैव नागरिक निरोगी राहतील झाडांमुळे मनुष्याला अनेक फायदे आहे हे आपल्या आज वाजतील नागरिकांना सर्व कार्यकर्त्यांनी समजून सांगावे व मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपण करण्यास पुढाकार घ्यावी याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व  पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाकड्या ची आतिषबाजी करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला त्याप्रसंगी 

जिल्हा सचिव तुषार बोबडे. उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप. तालुकाध्यक्ष गणेश दिवसे. शहराध्यक्ष सचिन पाळंदे. विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष राहुल दातीर.विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ. प्रसिद्धीप्रमुख स्वप्नील सोनार कामगार सेना सुपर चिटणीस नंदू गंगावणे कामगार सेना तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष गोरक्षनाथ येळे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष करण कापसे तालुका चिटणीस विष्णू अमोलिक शहर संघटक निलेश सोनवणे शहर सचिव अमोल साबणे. तालुका उपाध्यक्ष नवनाथ बोर्डे. शिवनाथ फोपसे. शहर उपाध्यक्ष राजू शिंदे. लखन कडवे. गणेश राऊत. प्रसाद शिंदे. 

विद्यार्थी सेना तालुका सचिव विकी राऊत. विद्यार्थी सेना शहर सचिव अक्षय सूर्यवंशी. सचिन धोत्रे. रतन वर्मा. अभिमन्यू    धर्म जिज्ञासू. अतुल तारडे

प्रवीण कारली. संकेत शेलार. आकाश कापसे. प्रमोद शिंदे. नितीन पवार. चंदू गांगुर्डे. सागर इंगळे.चंद्र शिंदे. रमेश शिंदे. दशरथ शिंदे. अशोक शिंदे. बजरंग शिंदे. गौतम शिंदे. राहुल शिंदे. मारुती शिंदे. सुरेश शिंदे. आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथे विजेच्या पोलवर काम करत असताना विजेचा शाँक लागुन एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे त्यास तातडीने साखर कामगार रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे                                    या बाबत समजलेली माहीती अशी की बेलापुर येथील विजेच्या खांबावरील मेंन्टेनन्सचे काम खाजगी ठेकेदारा मार्फत करण्यात येत होते त्यांच्या मार्फत गणेश भाऊसाहेब साळुंके हा पोलवर चढुन देखभाल दुरुस्तीचे काम करत होता ज्या पोलवर काम करायचे होते त्या पोलवरील विज प्रवाह बंद करण्यात आला होता त्या पोल शेजारीच आणखी एक विजेचा सप्लाय सुरू होता बंद विज प्रवाह असलेल्या पोलवरील काम आटोपुन साळुंके हा विज प्रवाह सुरु असलेल्या शेजारच्या पोलवर चढला विजेच्या तारांना स्पर्श होताच त्यास  जोरदार शाँक बसला व तो खाली फेकला गेला   त्याच्या ओरडण्यामुळेमुळे आसपासचे नागरीक जमा झाले हवालादार अतुल लोटके उपसरपंच अभिषेक खंडागळे  महावितरणचे चेतन जाधव मधुकर औचिते यशवंत नाईक गौरव सिकची विशाल आंबेकर संतोष शेलार गणेश टाकसाळ किरण बारहाते आदिंनी जखमी अवस्थेत असलेल्या साळुंके यास तातडीने साखर कामगार हाँस्पीटल येथे दाखल केले असुन त्यास अति दक्षता विभागात ठेवण्यात आले असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

(प्रतिनिधी राहुरी मिनाष पटेकर) राहुरी  कृषी मंडळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन २०२१-२२ अंतर्गत पाथरे येथे शेतकऱ्यांना बांधावर बियाणे, कामगंध सापळे यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. या अभियानात पाथरे खुर्द,टाकळीमियाँ, मोरवाडी,राहुरी, शेणवडगाव,मालुंजे खुर्द, खुडसरगाव, केंदळ बु,मांजरी, कोंढवड, वळण, मुसळवाडी गावातील ३८ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना बांधावर बियाणे कामगंध सापळे वाटप,उगवण क्षमता चाचणी, रूंद सरीवरंबा पेरणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच खुडसरगाव येथे एक गाव एक वाण अंतर्गत युएस ७०६७ या कपाशीच्या वाणाची लागवड करण्यासाठी आवाहन करण्यात आले. यामुळे एकात्मिक कीड व रोग नियंत्रण होत असल्याचे मंडळ  कृषी अधिकारी प्रशांत डहाळे म्हणाले. यावेळी तालुका  पर्यवेक्षक तुळशीराम पवार, राणू आंबेकर,सहाय्यक कृषी अधिकारी आकाश गोरे,बिरु केसकर,चंद्रकांत म्हसे, शिवप्रसाद कोहोकडे, बाळासाहेब सूळ तसेच शेतकरी हरिभाऊ जाधव,दिपक जाधव, संभाजी टेकाळे,रामकृष्ण टेकाळे, विजय जाधव,शंकर जाधव,चित्तू पवार, चांगदेव टेकाळे, ज्ञानेश्वर अकोलकर, सुरेंद्र जाधव व अविनाश सोळुंके उपस्थित होते.



बेलापुर(वार्ताहर) समाजात सामाजिक काम करणाऱ्या सर्वांनाच अनुदानाचा लाभ दिला जातो मग  चौथा स्तंभ म्हणून  ओळखल्या जाणा-या पत्रकारांना मानधन का नको ? असा सवाल  महाराष्ट्र संपादक व पत्रकार सेवा संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार  आगे यांनी केला आहे .      

पत्रकार मनोज आगे यांची संपादक पत्रकार सेवा संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी  म्हणून निवड झाल्याबद्दल बेलापुर व परिसरातील पत्रकारांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ  पत्रकार अशोक गाडेकर  होते. तर प्रमुख आतिथी म्हणून नरेंद्र लचके,जेष्ठ पत्रकार मारुती राशिनकर  तसेच बाजार समिती संचालक सुधीर नवले उपस्थित  होते.


 सत्काराला उत्तर देताना आगे पुढे म्हणाले की,खासदार -आमदार लोकांसाठी काम करतात पोलीस अधिकारी विविध खात्यातील सरकारी कर्मचारी जनतेसाठी काम करतात त्यांना पगार मिळतो, मानधन मिळते मग पत्रकारही सतत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळेची,आपल्या जिवाची पर्वा न करता लढत असतात. यंत्रणेतील दोष जनतेसमोर आणण्याची ताकद फक्त पत्रकारातच आहे.  हे त्रिवार सत्य असतानाही सर्वांना सेवानिवृत्ती वेतन मिळते विविध क्षेत्रातील लोकांना अनुदान मिळते मग जनतेसाठी काम करणाऱ्या पत्रकार अनुदान मिळण्यापासून वंचित का ?असा सवाल करुन आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग पत्रकारांच्या हितासाठी करणार असल्याची ग्वाही त्यांनी  दिली.  जिल्ह्यातील ज्येष्ठ व ज्या पत्रकारांनी सतत पंधरा वर्षे पत्रकारिता केली अशा पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून सरकारी पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. अधिस्विकृती   कार्ड मिळविण्यासाठी अनेक पत्रकारांनी प्रयत्न केले मात्र  किचकट नियमांमुळे  शासनाचे पत्रकारितेचे कार्ड काही ठराविक पत्रकार वगळता कुणालाही मिळाले मिळू शकले नाही  ग्रामीण भागातील पत्रकारांनाही यासाठी संघटनेच्या माध्यमातून राज्याध्यक्ष किसनभाऊ  हासे याच्या नेतृत्वाखाली न्याय मिळवून देवू असेही आगे म्हणाले .

यावेळी बेलापूर पंचक्रोशीतील पत्रकार व बाजार समिती , व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने  आगे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी  देविदास देसाई, प्रा. ज्ञानेश गवले ,नरेद्र लचके ,नवनाथ कुताळ बाजारा समितीचे संचालक सुधीर नवले  ,दिपक क्षत्रिय, आदिंनी मनोगत व्यक्त केले.

 अध्यक्षीय भाषणात बोलताना अशोक गाडेकर यांनी सत्कारमूर्ती मनोज आगे यांच्या पत्रकारितेतील वाटचालीची माहिती दिली. तसेच ग्रामीण भागांतून त्यांना संधी मिळाली याबद्दल कौतुक केले.त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील समस्यांची जाणीव असल्याने त्या सोडविण्यासाठी ते  प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षाही व्यक्त केली.  यावेळी सुनील नवले, दिलीप दायमा ,सुहास शेलार , बाबा शेख, किशोर कदम, दीपक क्षत्रीय, गोविंद साळुंके, अशोक शेलार, शरद थोरात ,अभिजित रांका, अतिश देसर्डा  उपस्थित होते.


श्रीरामपूर प्रतिनिधी- शर्टच्या वरच्या खिशात डावीकडे मोबाईल ठेवल्याने तो ह्रदयाजवळ असतो तथा ह्रदयाचे ठोके देखील वाढवतो, म्हणून वरच्या खिशात मोबाईल ठेऊ नये असे सांगितले जाते आणि ते सत्यही आहे, आणि पॅंटच्या खिशात मोबाईल ठेवल्यास पडून जाने अथवा फुटतुट होत आडचणीचे ठरते मग इतरत्र कोठे मोबाईल ठेवणार ?

यावर जालिम उपाय शोधला आहे तो श्रीरामपूर येथील सुप्रसिध्द अब्बु बॅग प्रोडक्शनचे


संचालक कलिमभाई बिनसाद यांनी,आपल्या दंडावर मोबाईल ठेवण्याची त्यांनी अनोखी शक्कल लढविली आहे आणि ती खुपच फायदेदायी देखील आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत आणि मोबाईल अत्यावश्यक सेवा म्हणून आपण वापरत असाल तर या पावसात आपल्या मोबाईलचा रक्षण देखील होणार आहे याकरिता अबू बॅग प्रोडक्शन मध्ये वार्ड नंबर 3 सैलानी बाबा दर्गा शेजारी उपलब्ध होतील मोबाईल नंबर 9579499909 आता त्यांचा हा अनोखा उपक्रम बघुन चित्रपटात देखील अशाच प्रकारचे दंडावर मोबाईल ठेवण्याचे उपक्रम बघावयास मिळाल्यास नवल वाटनार नाही.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget