Latest Post

कोपरगाव (गौरव डेंगळे): येथील सोमैया विद्या विहार संचलित 

श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे वाहन चालक श्री.शरद अशोकराव त्रिभुवन यांना 

सन २०२३-२४ च्या सर्वोत्तम कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले.

श्री शारदा इंग्लिश मिडीयम  स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन दरम्यान श्री.शरद त्रिभुवन यांना प्रमुख पाहुणे श्री.संदीप कोते,

सौ .सारिका कोते,के.जे.सोमैया कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी .एस.यादव,विधीज्ञ 

श्री. सी.एम.वाबळे, शाळेचे प्राचार्य श्री.के.एल.वाकचौरे,उपप्राचार्या सौ.शुभांगी अमृतकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह  प्रमाणपत्र व रोख रक्कम ५०००/- प्रदान करण्यात आले.

श्री.त्रिभुवन हे सन २०१६ पासून शारदा शाळेमध्ये वाहन चालक म्हणून काम करत असून आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मागील सलग २  वर्षापासून सोमैया वार्षिक पुरस्कार सोहळ्यासाठी पुरस्कारार्थी म्हणून त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते.संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या भल्या करीता प्रत्येक कामाला त्रिभुवन हे कायम तत्पर असतात. वाहन  चालक म्हणून ते आपली कामगिरी अतिशय चोख  बजावतातच परंतु त्याचबरोबर शाळेतील सर्व कामामध्ये शिक्षकांना सहकार्य देखील करतात.शाळेतील विविध कार्यक्रमासाठी मंडप उभारणी तसेच शाळेतील विविध रंगरंगोटीचे काम यामध्ये ते आपल्या सहकाऱ्यांची नेहमीच मदत करतात.शारदा संकुल हे जणू आपलं घरच आहे अशी भावना त्यांच्या मनात नेहमीच असते.त्यांच्या याच अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना हा सर्वोत्तम कर्मचाऱ्यांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.श्री.शरद त्रिभुवन यांचे या पुरस्काराबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, शाळेचे माननीय प्राचार्य श्री.के.एल.वाकचौरे,उपस्थित प्रमुख अतिथी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

श्रीरामपूर, शिर्डी लोकसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्हीआयपी गेस्ट श्रीरामपूर या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठकी व प्रवेश सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांनी केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष विशाल भैया कोळगे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात विशाल भैय्या कोळगे म्हणाले की सध्या देशामध्ये 2024 लोकसभा निवडणूक होणार आहे सध्या देशांमध्ये भाजपचा सरकार आहे या सरकारच्या काळात महागाई बेरोजगारी खाजगीकरण भ्रष्टाचार ईडी सीबी आयचा गैरवापर फोडाफोडीचे राजकारण यामुळे जनता त्रस्त झाली आहे या सरकारला खाली खेचण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडी बरोबर युती हो या ना हो परंतु आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपला खासदार निवडून द्यायचा आहे यासाठी जनजन पछाडा जीवाचं रान करा असा आव्हान कोळगे यांनी कार्यकर्त्यांना केले, यावेळेस असंख्य महिलांनी पुरुषांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला तसेच काही कार्यकर्त्यांना महत्त्वाची जबाबदारी देऊन पदही दिले  त्यामध्ये महिला आघाडीच्या श्रीरामपूर  महासचिव म्हणून दर्शना ताई काळे तालुका संघटक वैशालीताई मुसळे तालुका उपाध्यक्ष ताई जाधव शहराध्यक्ष रिंकू लोखंडे तालुका संघटक रेखाताई बर्डे कार्याध्यक्ष नीताताई साळवे तसेच फादर बॉडी चे  तालुका उपाध्यक्ष शिवा भाऊ साठे तालुका कार्याध्यक्ष प्रमोद भाऊ बारसे तालुका संघटक कृष्णा महांकाळे तालुका संघटक रमेश दिवे शहर उपाध्यक्ष कुणाल भाऊ वाघ  व विद्यार्थी तालुका बॉडी सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष संघराज त्रिभुवन शहराध्यक्ष रितेश पाळंदे तालुका उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष  सौरभ जगताप निखिल विघावें कार्याध्यक्ष सार्थक नवले यांच्या निवडी करण्यात आल्या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून जिल्हा महासचिव अनिल भाऊ जाधव जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत दोंदे साहेब महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शोभाताई नवले पाटील तालुका सल्लागार ऍड अण्णासाहेब मोहन जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव दिवे सल्लागार लक्ष्मणराव मोहन तालुका कोषाध्यक्ष वसंतराव साळवे  बाबाभाई शेख प्रवीण भाऊ साळवे अब्बास भाई शेख सुमेध भैय्या पडवळ किशोरभाऊ ठोकळ सोपनिल गायकवाड प्रफुल्ल बारसे सुयोग तोरणे रोहित अमोलिक सचिन चक्रनारायण अक्षय चक्रनारायण आकाश भाऊ  आदित्य यादव, प्रशांत चव्हाण कैवल्य लावंड जैद शेख सौरभ जगताप नयन  नवले अजय कमाने तनिष्क वैद्य ओम लेकुरवाळे राज वाकचौरे रवींद्र शिंदे,अक्षय कांगणे, सुरज विटेकर विशाल बनकर, प्रकाश वेताळ ऋषिकेश औताडे,तेजस जगताप , रितेश पाळंदे,,यश गायकवाड,साहिल अटांगरे,निलेश येवलेअधिक कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप सुमेधभैय्या पडवळ यांनी केला

श्रीरामपुर (प्रतिनिधी) :अहमदनगर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने २१ वर्षाखालील मुले व मुली यांची पुणे विभागीय निवड चाचणी स्पर्धेकरिता -  जिल्हास्तरीय निवड चाचणी सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ सकाळी १०:०० वा महाले पोदार,श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पुणे विभागीय व्हॉलीबॉल सचिव श्री नितीन बलराज यांनी दिली.पात्र खेळाडूंची जन्मतारीख १/१/२००४ पुढील असावी. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी खालील कागदपत्रे आपल्याबरोबर घेऊन यावेत M V A फॉर्म,स्वतःचे ३ पासपोर्ट साईज फोटो,बोर्ड सर्टिफिकेट,ओळखपत्र,आधार कार्ड,जन्मतारखेचा दाखला,शाळेचे किंवा,महाविद्यालयाचे बोनाफाईट.निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी श्री राजेंद्र कोहकडे,श्री शलींद्र त्रिपाठी,श्री सुनील चोळके,श्री पापा शेख,श्री दत्ता घोरपडे,श्री नितीन गायधने आदिशी संपर्क साधावा.


सूचना: येताना सर्वांनी MVA भरून आणायचा आहे. निवड चाचणीसाठी MVA फॉर्म भरणाऱ्या खेळाडूंनाच सहभागी होता येईल.

बेलापुर  ( प्रतिनिधी  )- कँप्टीव्ह मार्केट योजनेतंर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रीका धारक प्रत्येक कुटुंबाला  दर वर्षी एक साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एकुण ८८०३७ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहीती जिल्हा पुरवठा अधीकारी हेमा बडे यांनी दिली आहे .कँप्टीव्ह मार्केट योजनेतंर्गत अंत्योदय लाभार्थी ( २० किलो तांदुळ व १५  किलो गहु मिळणारे लाभार्थी ) यांना प्रति कुटुंब दर वर्षी  एक साडी वाटप करण्याचा निर्णय शासनाने १० नोव्हेंबर २०२३ रोजी घेतला होता त्या करीता महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल  संस्था म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे .महामंडळामार्फत अंत्योदय शिधापत्रीका धारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करुन ते  दुकानाच्या नावानुसार विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या तालुका स्तरावरील गोदामापर्यत पोहोचविण्यात येणार आहे .महामंडळाने सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS )यंत्रणेकडील गोदामापर्यत साड्यांचा पुरवाठा केल्यानंतर तेथुन अंत्योदय शिधापत्रीका धारक कुटुंबापर्यत साडी वाटप करण्याची व त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आहे .अहमदनगर जिल्ह्यातील ८८०३७ अंत्योदय लाभार्थी कुटुंबांना या योजनेतंर्गत एक साडी प्रति कुटुंब मिळणार आहे  त्यात नगर तहसील ४७४६पारनेर ३६३८ पाथर्डी ६२७६ कर्जत ३५४७ शेवगाव ९७५८ जामखेड ५६३८ श्रीगोंदा ८७४४ संगमनेर ६३८६ कोपरगाव ६७७८ अकोले ६१९९ श्रीरामपुर  ५७३४ नेवासा ७१५७ राहाता ५५९२ राहुरी ६१५२ नगर एफडीओ १७०१ या प्रमाणे लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे होळी सणापूर्वी अंत्योदय लाभार्थ्यांना साडी वाटप करण्याचे शासनाचे निर्देश आहेत                                [शासनाने केवळ अंत्योदय लाभार्थ्यांना साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचा त्रास, कटकटी वाढणार आहे सर्वच कार्डधारक साड्यांचा आग्रह धरुन धान्य दुकानदारांशी वाद घालणार आहेत.                            देविदास देसाई  जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना अहमदनगर  ]

शिव छत्रपती क्रीडा संकुलान बालेवाडी पुणे येथे पहिली साऊथ येशिया चॅम्पियनशिप 2024, 3 व 4 फेब्रुवारी 2024 या दोन दिवशीय पाहिली साऊथ येशीया तायकोन स्पर्धा पार पडली त्या मध्ये 5 देश सहभागी झाले होते त्या मध्ये भारताचा पहिला क्रमांक प्राप्त केला. सहभागी झालेले देश1) भारत 2) नेपाळ, ३) भूतान, 4) बांगला देश, 5) श्रीलंका हे देश या स्पर्धा साठी सहभागी झाले होते त्या मध्ये भारताचा पहिला क्रमांक आला. व दुसरा क्रमांक नेपाळ ने प्राप्त केला. व तिसरा क्रमांक भूतान ने प्राप्त केला. तायकोन संघटनेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ आप्पा शिंदे सर  व तायकोन संघटने चे महासाचिव श्री ऑ. राज वागडकर सर  याच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. व या स्पर्धसाठी साठी संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले व  संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र चे विद्यार्थ्यांना संस्थाक श्री सचिन पवार, सचिव अशोक शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले. संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्रचे विजयी विद्यार्थी 

1) वेदांत शेजुल.दोन Gold, २) दीप्ती महेंद्र जगताप Bronze,Silver, 3) निकिता सुनिल जगताप Silver,Silver, 4) निकिता कैलास जगताप. Bronze,Gold  5) तृप्ती रमेश वाघ.Bronze,Silver 6) स्वामींनी दत्तात्रय दरेकर.Bronze,bronze, 7) ओम दिगंबर लोहकने.Gold,Gold, 8) श्रावणी गणेश शेजुळ.Silver,gold, 9) श्रुतिका बापु वाघ.Gold  10) तेजस संजय राऊत Bronze,gold, 11)अधिरज अनिल अरांडे Gold,Gold, 

संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र चे  प्रमुख मार्गदर्शक सचिन पवार ,प्रशिक्षक श्री अशोक शिंदे, सचीन जाधव, अमोल माळी, व प्रशिक्षक आदित्या माळी , ओम लोहकने, सार्थक शिंदे, रोहन घोडके  रवींद्र शिंदे , व महिला प्रशिक्षक रेश्मा शिंदे, प्रतिभा गायकवाड , दिपीका पोल , येश्र्वर्या जोगदंड . संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या विजय होण्यामागे यांनी अधिक परिश्रम घेतले

बेलापूरःराजकीयदृष्ट्या बहुचर्चित बेलापूर बु!!ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महसूल मंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या नेतृत्वाखालील व जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखालील गावकरी मंडळाच्या स्वाती उत्तमराव अमोलिक यांची निवड झाली.निवड चुरशीची होईल अशी चर्चा असताना ११-६ अश्या मोठ्या फरकाने विजय मिळवून सुधीर नवले, रविंद्र खटोड,अरुण पाटील नाईक, भरत साळुंके यांच्या नेतृत्वा खालील जनता विकास आघाडीला गावकरी मंडळाने धक्का दिला.                                           बेलापूर बु!!ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीसाठी मंडल अधिकारी  श्री.भिमराज मंडलिक यांचे अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली.बैठकीस  उपसरपंच अभिषेक खंडागळे,सदस्य मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,वैभव कु-हे,मीना साळवी,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,महेन्द्र साळवी,रविन्द्र खटोड,भरत साळुंके,शिला पोळ,रंजना बोरुडे,छाया निंबाळकर उपस्थित होते.सरपंच पदासाठी गावकरी मंडाळाकडून स्वाती अमोलिक तर जनता आघाडीकडून रमेश अमोलिक यांनी उमेदवारी केली.गावकरी मंडळाकडे दहा तर विरोधकांकडे सहा असे संख्याबळ होते तर माजी सरपंच महेंद्र साळवी यांची भूमिका गुलदस्त्यात होती. असे असताना स्वाती अमोलिक यांना अकरा तर रमेश अमोलिक यांना सहा मते मिळाली.विरोधकांचे एक मत फुटल्याची चर्चा निवडीनंतर रंगली होती. निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सत्कार समारंभ व आभाराची सभा संपन्न झाली.यावेळी बोलताना जि.प.सदस्य शरद नवले यांनी विरोधकांचा समाचार घेतला ते म्हणाले की विरोधकांना चांगले काम देखवत नाही.सातत्याने विकासकामात अडथळे आणण्याचे एकमेव काम विरोधक करतात.नाम.राधाकृष्ण विखे पा. यांनी गावासाठी १२६ कोटीची पाणी पुलावठा योजना तसेच ४ कोटी किमतीची आठ एकर जागा साठवण तलावाला मोफत दिली.पण विरोधकांत चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत नाही.  विरोधकांच्या घाणेरड्या राजकारणाचा परिणाम गेली वर्षभर गावाच्या विकास कामांवर झाला.पण आता विरोधकांना गावकरी मंडळाने चोख उत्तर दिले असून यापुढील काळात ठप्प झालेल्या विकासकामांना गती दिली जाईल.सरपंच व उपसरपंच व सदस्यांनी चोख कारभार व विकास कामे करावीत बाकी आडव्या जाणाऱ्या मांजरांचा बंदोबस्त करण्याचे कामा मी करीन असे श्री.नवले म्हणाले.                          उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की,आजचा विजय हा गावकरी मंडळाच्या एकजुटीचा व ग्रामास्थांचा आहे. विरोधकांचे चाणक्य सरपंच निवडीबाबत शेखी मिरवित होते तसेच मोठा घोडेबाजार करू पाहत होते परंतु  आजचा विजय मिळवून राजकीय शकुनी मामांना सडेतोड उत्तर दिले आहे.विरोधकांच्या वल्गनांचा व अहंकाराचा आज फुगा फुटला आहे. महसूलमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या सहकार्याने विकास कामांचा रथ आम्ही हाकीत आहोत.हा रथ अडविण्याचा विरोधकांनी आटोकाट प्रयत्न केला पण आजच्या दणदणीत विजयाने विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे.आजवर आम्ही सबुरीने घेतले पण यापुढे माञ नाठाळपणा केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल.यापुढील काळात नाम.विखे पा.यांच्या सहकार्याने  तसेच समन्वयाने गावाचा विकास केला जाईल त्यास सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन श्री.खंडागळे यांनी केले.यावेळी जालिंदर कुऱ्हे, हाजी इस्माईल शेख,विष्णुपंत डावरे,सुधाकर खंडागळे,बाळासाहेब दाणी, पुरुषोत्तम भराटे,एकनाथ नागले,भाऊसाहेब कुताळ,मोहसीन सय्यद,अँड.अरविंद साळवी,रावसाहेब अमोलिक,गोपी दाणी आदींची भाषणे झाली.यावेळी कार्यकर्ते,हितचिंतक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडणुक आधिकारी श्री.मंडलिक यांना कामगार तलाठी श्री. प्रविण सूर्यवंशी,श्री.अक्षय जोशी, ग्रामविकास अधिकारी श्री. मेघशाम गायकवाड यांनी सहकार्य केले.पोलिस यंञणेने चोख पोलिस बांदोबस्त राखून निवडणूक शांततेत पार पाडली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - शहरातील नॉर्दन ब्रांच पासून वॉर्ड नंबर दोन मधून गेलेल्या प्रवरा कालव्याला काल दुपारपासून मोठे भगदाड पडले.त्यामुळे वैदूवाडा पुलापासून थोड्या अंतरावर या भागातून पाणी शेजारच्या रस्त्यावर तसेच आसपासच्या घरांमध्ये शिरले.जवळच नगरपालिकेची मोठी गटार असल्याने बरेचसे पाणी त्या गटारीत वाहून गेले. दुसऱ्या बाजूला फातेमा कॉलनीच्या बाजूने सुद्धा दुपारपासून पाणी फातमा कॉलनीतील प्रमुख रस्त्यांवर वाहत आहे.काल दुपारी उर्दू शाळेची मुले या पाण्यामध्ये खेळताना काही नागरिकांनी त्यांना हाकलले अन्यथा यातून एखादी मोठी दुर्घटना घडली असती. दुपारपासून आता रात्री अकरा वाजेपर्यंत प्रचंड पाणी वाया गेले असून परिसरातील

नागरिकांना सुद्धा याचा मोठा त्रास झाला आहे.परंतु पाटबंधारे खाते किंवा नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदरचा कालवा अनेक ठिकाणी उखडला आहे. वैदू वाड्यात पुलाजवळ तर या कालव्याचे पात्र एखाद्या नदीसारखे झाले आहे. शेजारीच रस्ता असल्यामुळे अनेक दुचाकी स्वार त्यात पडले आहेत. तसेच येथून नागरिक व विद्यार्थ्यांची नेहमी ये जा चालू असते. याबाबत पालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या तरी सुद्धा अद्याप दखल घेतली गेली नाही. काल कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेल्याने हे पाणी ओव्हरफ्लो होऊन कालव्याच्या बाहेर पडले.त्यातच दोन ठिकाणी भगदाड पडल्याने सदर पाणी नागरी वस्तीमध्ये शिरले. पाटाला पाणी आल्यानंतर पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवणे बंधनकारक आहे. मात्र या बाबीकडे पाटबंधारे खात्याच्या या अक्षम्य दुर्लक्ष बद्दल जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात पाटबंधारे खात्याच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे तसेच या पाण्यामुळे नुकसान झालेल्या घरांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget