Latest Post

श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांना साहित्यिक रज्जाकभाई शेख (सर) आणि टीम संचलित दोस्ती फाऊंडेशन अहमदनगर यांच्यावतीने दिला जाणारा लोककलावंत पै. मजनूभाई शेख राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२२ या राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.लोककलावंत पै.मजनूभाई शेख यांच्या प्रथम स्मृती गौरव पुरस्कार सोहळ्यात श्रीरामपूर येथे दोस्ती फाऊंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात पत्रकार शौकतभाई शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.एस.एन.पठाण (कुलगुरू नागपूर विद्यापीठ तथा उच्च शिक्षण संचालक (म.रा.), कार्यक्रमाचे उदघाटक  मा. बाबासाहेब सौदागर (चित्रपट गीतकार,सिनेअभिनेते), मा. वसुंधरा शर्मा (सिनेअभिनेत्री, नाट्यकर्मी), मा.डॉ.वंदनाताई मुरकुटे (साहित्यिका तथा सभापती पं.स. श्रीरामपूर), रमजानखान पठाण (उपशिक्षणाधिकारी),रामदास वाघमारे (मुख्य संपादक जीवन गौरव), रज्जाकभाई शेख अध्यक्ष दोस्ती फाऊंडेशन,सुभाष सोनवणे,प्राचार्या डॉ.गुंफाताई कोकाटे,सुनील गोसावी (संस्थापक शब्दगंध) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.श्री.शेख यांना मिळालेल्या या पुरस्काराबाबत त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छापर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,श्री.शौकतभाई शेख यांचे सामाजिक क्षेत्रासह पत्रकारीता क्षेत्रातही निस्पृह तथा उल्लेखनीय कार्य आहेत,राजकारण विरहित सर्वधर्मिय सेवाभावी संस्था असलेल्या समता फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आजवर जनसामान्यांबरोबर उपेक्षित घटकांतील दुर्लक्षितांकरीता विविध सामाजाभिमुख उपक्रम राबवून आपल्या निर्पेक्ष समाजसेवेचा ठसा उमटविला आहे,तसेच आपल्या सामाजाभिमुख पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक,शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय, राजकिय आदि अशा विविध क्षेत्रातील बातम्या करताना त्यांनी सातत्याने नेहमी सत्य आणि पारदर्शी भुमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे व करत आहे, सोबतच स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश) या त्यांच्या पत्रकार/संपादकांच्या नोंदणीकृत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील नवोदित पत्रकार, संपादकांना वर्तमानपत्र क्षेत्रातील शासकीय स्थरावरील येणाऱ्या विविध आडचणींना मार्ग काढत त्यावर यशस्वीरित्या मात करण्याकामी नेहमी सातत्याने मोलाचे व महत्वाचे मार्गदर्शन असते.त्यांच्या या संपादक संघात राज्यभरातील विविध जिल्ह्यात असलेल्या सदस्यांद्वारे आज विविध वर्तमानपत्र तथा इतर प्रसार माध्यमे मोठ्या दिमाखात नियमीतपणे प्रकाशित होत आहेत.सदैव मनमिळाऊपणा आणि मितभाषी असे हस्तमुख व्यक्तीमत्व असलेले शौकतभाई शेख यांना सर्वत्रच मोठ्या आदराने व सन्मानाने शौकतभाई शेख या नावानेच ओळखले तथा संबोधले जाते.अशी त्यांनी आपल्या कार्यगुणांच्या बळावर ख्याती प्राप्त केलेली आहे.कुठलाही भेद भाव,जाती -पाती,पंथ यापलिकडे जाऊन त्यांचा सर्वच जाती - धर्म, पंथात मोठा मित्र परिवार जोडला गेला असल्याने सर्वांशी त्यांचे प्रेम, स्नेह,आपुलकी आणि सलोख्याचे तथा जिव्हाळ्याचे संबध प्रास्तापित झालेले आहे,चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य,ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन,तथा महाराष्ट्रियन मुस्लिम विकास परीषद या संस्थेचे ते अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख देखील आहेत.आपल्या पत्रकारीतासोबतच  विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचे निस्पृह सामाजाभिमुख समाजिक कार्य हे सातत्याने चालतच असतात आणि अशाच या त्यांच्या विविध कार्यांची दखल घेऊन दोस्ती फाऊंडेशनच्यावतीने त्यांना *राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार* देऊन जो त्यांचा सन्मान करण्यात आला ही खरोखरच शौकतभाईंना ही त्यांच्या कार्याची मिळालेली एक पावतीच असल्याचे अनेकांनी बोलून देखील दाखवले आहे.

श्रीरामपूर  प्रतिनिधी-  Dysp संदीप मिटके यांना घारगाव परिसरातील घाटात पोखरी शिवारात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने  वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली.  त्यावरून नाशिक ते पुणे जाणारे हायवे  परिसरातील घाटात पोखरी शिवारात  बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन दोन  परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. 

          एका महिला आरोपी विरुद्ध  घारगाव पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. 406/2022 कलम महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या कारवाईमुळे  टाकसेवाडी, पोखरी बाळेश्वर परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. 

सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला  पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI अरुण आव्हाड,   𝙰𝚙𝚒 ज्ञानेश्वर  थोरात,चा. पो. ना. मनोज पाटील पो.कॉ नितीन शिरसाठ म.पो.कॉ. मंगल जाधव यांनी केली.

श्रीरामपूर : शहरातील संगमनेर रस्त्यावर मागील काही आठवड्यांपूर्वी, रस्त्यावरील अतिक्रमनामुळे झालेल्या अपघातात. एका २१ वर्षीय फोटोग्राफी करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदर घटनेनंतर, वाढलेल्या अतिक्रमणा विरोधात, जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याने. श्रीरामपूर पालिकेच्या वतीने, श्रीरामपूर - संगमनेर रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. ज्यात नॉर्दन ब्रँच पासून, पालिका हद्दीतील संगमनेर नाक्या पर्यंत, वाहतुकीस अडथळा निर्माण होणारी अतिक्रमणे जमिनध्वस्त केली. सदरची अतिक्रमणे काढत असतांना, काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमण काढून घेत. प्रशासनास सहकार्य केले. शहरातील संगमनेर रस्त्यावरील अतिक्रमण मोहीम, पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशावरून, पालिकेचे अतिक्रमण विभागाचे संजय शेळके, इंजिनिअर अनंत शेळके, बांधकाम विभागाचे राम सरगर ,नगर पालिकेचे कर्मचारी व  शहर पोलीस ठाण्याचे, पोलीस नाईक शरद वांढेकर,सचिन बैसने, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड आदींच्या उपस्थितीत अतिक्रमणाच्या पहिल्या टप्प्यातील, अतिक्रमण काढण्यात आले.

बेलापूर वार्ताहर बेलापूरचे भूमिपुत्र अभिषेक देसाई यांची जलसंपदा विभागाचे डेप्युटी इंजिनियर पदी निवड झाल्याबद्दल यांचे विविध ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम अभिषेक यांचे पिता ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या व हितचिंतकांच्या उपस्थितीत सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहुजी कानडे यांच्या वतीने अभिषेक यांचा सत्कार करण्यात आला तर श्रीरामपूर चे तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपूरचे नगर परिषदेचे नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते हाजी अंजुम शेख बेलापूर ग्रामपंचायत चे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे सेवा सोसायटीचे चेअ

रमन सुधीर नवले स्वस्त धान्य दुकानदार व माऊली आश्रमाचे सुभाष वाघुंडे व त्यांच्या पत्नी वाघुंडे यांच्यासह तालुका काँग्रेस अध्यक्ष अरुण पाटील नाईक माजी सरपंच भरत साळुंके अनिल नाईक रवींद्र खटोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण पत्रकार दिलीप दायमा बेलापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अतुल लोटके गणेश भिंगारदे लोखंडे तमनर आदींनी सत्कार करून अभिषेक यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

नेवासा : मागील काही आठवड्यांपूर्वी नेवासा फाटा येथील हॉटेल औदुंबरवर येथे देह विक्री संदर्भात कारवाई झाल्या संदर्भात विविध प्रसार माध्यमातून,वृत्त प्रसारित करण्यात आले होते. मात्र वास्तविक पाहता सदरची कारवाई हॉटेल औदुंबर येथे नसून. हॉटेल पासून ५ हजार फुटावर नेवाश्याच्या दिशेने असलेल्या.  औदुंबर लॉज येथे झाली होती. केवळ नावातील समानतेचा गैरफायदा घेऊन. काही विघ्नसंतोषी प्रवृतीच्या लोकांनी चुकीच्या अफवा पसरून. कोणताही संबंध नसतांना, अनेक वर्षांपासून दर्जेदार आणि प्रामाणिकपणे.असंख्य ग्राहकांना सेवा देणाऱ्या हॉटेल औदुंबरची बदनामी करण्याचे षड्यंत्रामुळे, हॉटेल औदुंबर उद्योग समूहास, सामजिक प्रतिष्ठेसह, मोठ्या प्रमाणात मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. अखेर  घडलेल्या प्रकरणा यासंदर्भात, केवळ नावातील समानता आणि चुकीची माहिती देऊन.,लोकप्रियतेचे शिखर गाठणा-या हॉटेल औदुंबरला बदनाम करण्याचे काम केले जात असून. काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईचा आणि हॉटेल औदुंबरचा कोणताही एक संबंध नसल्याची माहिती,हॉटेल औदुंबरला उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही खोट्या अफवांवर भरोसा ठेऊ नये असे आवाहन हॉटेल औदुंबरचे संचालक राजेंद्र नांगरे पाटील यांनी दिली आहे.

श्रीरामपूर : अवैध धंद्यामुळे श्रीरामपूरची अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात चर्चा होत आहे. मागील काही महिन्यात अवैध धंदे बंद करावे, या मागणीसाठी विविध पक्ष, संघटनांनी अनेकदा उपोषणे, तक्रारी केल्या. परंतु, पोलीस प्रशासनाला अवैध धंदे कायमस्वरूपी बंद केलेच नाही. 'समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफभाई जमादार हे श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी सतत पाठपुरावा करत असून आजपासून (दि.5) जमादार यांनी शहरातील गांधी चौकात साखळी उपोषणास सुरवात केली आहे. यापूर्वी जमादार यांनी 22 मार्च 2022 रोजी 4 दिवस आमरण उपोषण केले होते. उपोषणास विविध पक्ष, संघटनांच्या पाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. शिव स्वराज्य मंचचे संस्थापक सलमान पठाण यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.समजावादीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जामादार यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही अवैध धंदे बंद झाले नाही. श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील सर्वच अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाई करून अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावे.  दि. १० नोव्हेंबर रोजी लेखी निवेदन देऊनही पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे गुटखा,मटका , पत्त्यांचे क्लब,सोरट वगैरे असे विविध प्रकारचे सर्वच अवैध व्यवसाय हे सर्रासपणे खुलेआम सुरुच असल्यामुळे नाईलाजाने आज (दि.०५ ) पासून मेनरोडवरील म. गांधी यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले. निवेदनाच्या प्रति वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्या आहेत.


उपोषणास भाजपाचे मारुती बिंगले, पत्रकार विलास भालेराव, आपचे हरिभाऊ तुवर, यांनी भेट दिली. शिव स्वराज्य मंचचे संस्थापक सलमान पठाण, योगेश चव्हाण, युसूफ शेख, हारून तांबोळी, दीपक आव्हाड, चंदू परदेशी, अहमद शेख, लक्ष्मण वाडीतके यांनी पठिंबा दिला.

श्रीरामपूर प्रतिनिधी:- ६ डिसेंबर या दिवशी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण, व बाबरी मशीद पडल्याने या दिवशी,कोणताही अनुचित प्रकार घडून. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या संख्येने अनुयायी अभिवादन करण्यास येत असल्याने. त्यांच्या सुविधे करिता, श्रीरामपूर पोलीस विभागात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली, श्रीरामपूर पोलीस उपविभागात.अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी,सपोनि ज्ञानेश्वर थोरात, यांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गासह,तालुका हद्दीतील हेरेगाव उंदिरगाव परिसरात १५ अधिकारी व 120 कर्माचारी यांनी पथ संचलनात सहभागी झाले होते. ज्यात  सपोनि जीवन बोरसे, सपोनि विठ्ठल पाटील, पोसई सुरेखा देवरे ,पोसई समाधान सुरवडे, पोसई रावसाहेब शिंदे,पोसई अतुल बोरसे, पोसई संजय निकम,यांच्या सह श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस तसेच राज्य राखीव दलचे जवान उपस्थितीत होते.









MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget