Latest Post

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवुन जलसंपदा विभागात उपअभियंता पद मिळविणाऱ्या बेलापुरातील दोन जणांना आज सायंकाळी मा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे                महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सन २०१९ ला परीक्षा उत्तीर्ण झालेले तालुक्यातील बेलापुर गावातील दोन जणाना आज सायंकाळी आठ वाजता यशवंतराव प्रतिष्ठाण सभागृह मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे त्यात अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक ,जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांचे चिरंजीव अभिषेक देसाई व निखील सुनिल शहाणे यांचा समावेश आहे त्या बद्दल देसाई  व शहाणे परीवाराचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .

श्रीरामपूर : सायंकाळी ७ ते सव्वा ७ वाजेच्या सुमारास, तालुक्यातील श्रीरामपूर नेवासा मार्गावर असलेल्या. खोकर फाटा येथील अन्नपुर्ण मंगल कार्यालया समोर, ऊस घेऊन जात असलेली एम एच १८ एन ८९६२ क्रमांकाची ट्रक बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभी असतांना. नेवासाहून - श्रीरामपूर ला येत असलेली एम एच १७ सी यु ३२८४ क्रमांकाची दुचाकी येऊन धडकल्याने आपघात झाला. या आपघातात दुचाकीवर असलेले, श्रीरामपूर येथील २० वर्षीय गणेश राजू ससाणे व २१ वर्षीय योगेश अशोक यादव हे युवक गंभीर जखमी झाले होते. सदर आपघाता संदर्भात माहिती मिळताच, तालुका पोलीस ठाण्याचे पीएसआय अतुल बोरसे पोलीस हवालदार मन्सूर शेख,अनिल शेंगाळे व चालक चांद भाई पठाण यांनी घटनास्थळी दाखल होऊन. त्यांनी दोन्ही युवकांना तात्काळ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात आणले असता. डॉक्टरांनी दोन्ही युवकांना मयत घोषित केले, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वच साखर कारखान्याचे गाळप सुरू झाल्याने. मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक देखील  सुरू झाली आहे. ही ऊस वाहतूक करत असतांना, साखर कारखाना तसेच ऊस उत्पादक शेकऱ्यांनी, शासनाच्या नियमांचे पालन करून, अंधारात देखील ऊस वाहतूक करणारे वाहने दिसतील,तसेच चांगल्या अवस्थेतील वाहनांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेत ऊस वाहतूक केल्यास अनेक आपघात टळतील, त्याच बरोबर आरटीओ व पोलीस प्रशासनाने  देखील उपाय योजना कराव्यात अशी मागणी, नागरिकां मधून केली जात आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या. श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणुकी संदर्भात,औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला असून. यासंदर्भात माजी सभापती दिपक पटारे यांनी, कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत,तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभाग घेता यावा. याकरिता काही आठवड्यांपूर्वी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका दाखल केली होती. सदरच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान,  न्यायालयाने पटारे यांच्या बाजूने निकाल देत. शासनाच्या नवीन अद्यादेशानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक घ्यावी असे आदेश दिले असून. श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणुक १५ मार्च २०२३ नंतर होणार असल्याची माहिती, याचिका कर्त्यांचे वकिल ॲड. विनायक होन व ॲड. सिध्देश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.

श्रीरामपूर : शहरातील रेव्हीन्यू कॉलनी येथील समाज मंदिरा समोरील ओपन स्पेस मध्ये ,एका अनोळखी इसमाने आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास, बंद अवस्थेतील ट्रक बॉडीला ,फेट्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची समोर आल्याने, खळबळ उडाली आहे. सदरची बाब लक्षात येताच, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, सामाजिक कार्यकर्ते रितेश एडके व स्थानिक नागरिकांनी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच सहाय्यक फौजदार श्रीधर हापसे पोलीस नाईक संजय पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन. घटनेचा पंचनामा करून अज्ञात इसमाचा मृतदेह,उत्तरीय तपासणी करिता पाठवला असून. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून. मयत इसम कोण, कुठूला व त्याने आत्महत्या का केली। याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस तपास करीत आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी): येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे ७ विद्यार्थी पूर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष खैरनार, ऋग्वेद गांगुली,मोहित माळवे अनुष्का राठी,सावरी खटाणे तर उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अस्मिता रासकर,मोहीन पाटील यांनी चांगले गुण मिळवून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रामशेठ टेकावडे,सचिव प्रतिक्षित टेकावडे, सदस्य जन्मजय टेकावडे, प्राचार्य डॉ योगेश अरुण पुंड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर प्रतिनिधी- कुटुंबाच्या उपजीविकेसाठी सर्वच जण काही ना काही खटाटोप करता. ज्यात शासनाच्या परवानगी घेऊन, संगमनेर नगरपालिके समोरील ८० परवाना धारक रिक्षा चालक, इमाने इतबारे, राजहंस रिक्षा स्टॉप रिक्षा चालवून आपले पोट भरत असतांना. जाणीवपूर्वक ८० रिक्षा धारकांच्या अन्नात माती काळविण्यासाठी.खोट्या तक्रारी केल्याने, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता. ४५ वर्षांपासून इमानदारीत कष्ट करणाऱ्या रिक्षा चालकांवर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवाहन विभागाने, दडपशाहीचा वापर करून. सदर परमिटधारक रिक्षा चालकांना हुसकून लावल्याने. ४५ वर्षात कोणत्याही प्रकारची तक्रार नसतांना. आमच्यावर हा अन्याय का असा सवाल करत.वाहन चालक मालक सामजिक संघाच्या वतीने. श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवाहन विभागास निवेदन देण्यात आले. यावेळी खोट्या तक्रारींची शहानिशा न करता. जर आमच्या अन्नात माती काळवणार असाल तर, ८ दिवसात शासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून असा इशारा. चालक मालक सामजिक संघाने दिला आहे. यावेळी कुमार  परदेशी, पप्पू गोरे, मोरेश्वर परदेशी, विकास ढमाले , शाम आव्हाड ,आसिर मन्यार, सोपान चोळके, आनंदा पानसरे, मोईन शेख,विक्रांत जाधव, सचिन चौधरी, अन्वर शेख,रिपाई वाहतूक आघाडीचे सलीम शेख आदींसह, चालक मालक सामजिक संघाचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): येथील श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचा श्रीराम अकॅडमी सीबीएससी स्कूलचा टेबलटेनिस १४ वर्षाखालील मुलांचा संघाने शालेय जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले. सोमवार दि २८ नोव्हेंबर रोजी सोमय्या विद्यामंदिर साखरवाडी कोपरगाव येथे जिल्हास्तरीय शालेय १४,१७ व १९ मुलांच्या टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.१४ वर्षाआतील मुलांच्या गटांमध्ये जिल्हाभरातून १५ शाळांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात श्रीराम ॲकॅडमी संघाने दि ग सराफ संगमनेर संघाचा पराभव करून शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.या विजेत्या संघातील चिराग दुधेडिया ,सक्षम दळवी ,श्लोक ढाके,अभिज्ञान वेंकटरमन,वेदांत कोरडे आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच १७ वर्षाआतील श्रीराम अकॅडमी मुलांच्या संघाने शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रामशेठ टेकावडे,सचिव प्रत्यशित टेकावडे,सदस्य जन्मजय टेकावडे, प्राचार्या जयश्री पोटघन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघाला क्रीडाशिक्षक अल्ताफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget