Latest Post

श्रीरामपूर प्रतीनिधी- राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मधील कृषी मंत्री अब्दूल सत्तर यांनी, टीका करतांना दिल्या शिवी, तसेच  संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात वापलेल्या अपशब्दामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असुन. राज्यभरात अब्दूल सत्तर यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वांच्या चालता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी अब्दूल सत्तर यांच्या थोडी लाज शिल्लक असेल तर त्यांनी, आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन, राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केलं आहे. सदरच्या आंदोलनास शहरातील महिला भागणींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या धाडसी कर्तबगारीमुळे त्यांचा कार्यकाळात कार्येक्षेत्रातील गुन्हेगारीवर मोठा वचक बसलेला असल्याने तथा श्रीरामपूर विभागातील त्यांचा शासकीय सेवेचा कार्यकाल पुर्ण होत असल्याने अन्य ठिकाणी त्यांच्या बदलीची चर्चा होत असुन शासनाने त्यांची अन्यत्र बदली न करता श्रीरामपूर विभागातच आणखी त्यांना शासकीय सेवेचा कार्यकाल वाढून द्यावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल निवेदन पत्राद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांची कामे ही खुपच चांगली आणि पारदर्शकता ठेवणारी आहे, कार्येक्षेत्रातील गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करणारी आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण करणारी आहे,करीता त्यांना श्रीरामपूर विभागातच आपल्या सेवेचा कार्यकाळ वाढवून मिळावा कारण ऐकेकाळी श्रीरामपूर शहर व परिसर हे गुन्हेगारीचे गड मानली जात असे, मात्र श्री. मिटके साहेबांनी अनेक गुन्हेगारांना योग्य धडा शिकवत त्यांना वठणीवर आणले आहे, म्हणून त्यांची अन्यत्र बदली न करता त्यांच्या शासकीय सेवा कार्याचा कार्यकाल याच ठिकाणी वाढून देत याठिकाणीच त्यांना कार्यरत ठेवण्यात यावे,अन्यत्र कोणत्याही ठिकाणी त्यांची बदली करु नये असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनाच्या प्रति पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलिस उपमहानिरीक्षक नाशिक,जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पोलिस प्रमुख अहमदनगर,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. आबु असिम आझमी आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी- शहरातील वार्ड नंबर ३, येथील शिवसर्कल याठिकाणी. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारीजी वाजपेयी, आयलॅंड विकसित करण्याच्या नावाखाली पालिकेतील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी.एकाच कामाचे दोन वेळा निविदा काढुन. आयलॅंडच्या कामात केलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात, श्रीरामपूर नगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,याकरिता यापूर्वी पुरावे देऊन. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी,घेराव,उपोषण,बैठा सत्याग्रह  यासारखे आंदोलन केल्यानंतर. कारवाईचे आश्वासन देऊनही, कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने. कुंभकर्णी झोपी गेलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी, श्रीरामपूर नगरपालिके समोर ढोल बजाव आंदोलन केलंय. सदरच्या आंदोलनास माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगरसेवक आशिष धनवटे,शशांक रासकर,सचिन गुजर, सुनील बोलके, आदींसह शहरातील नागरिक तसेच काँगेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी  )-येथील नवशा हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नकोट उत्सव मोठ्या उत्सहात संपन्न झाला बेलापुर बु!! येथील पेठेतील नवशा हनुमान हा भक्तांच्या नवसाला पावणारा हनुमान म्हणून प्रसिध्द आहे दररोज सकाळ पासुन सायंकाळ पर्यत भावीक या मंदीरात दर्शनासाठी येत असतात सालबाद प्रमाणे या ही वर्षी 56 भोग चे नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली त्या नंतर भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी पाचशे , दोनशे, शंभर व पन्नास रुपयांच्या नोटा तसेच दहा वीस रुपयांच्या  कोऱ्या करकरीत नोटांनी नवशा हनुमान मूर्तीची सुंदर पध्दतीने सजावट करण्यात आली  तसेच फुल पुष्पहार माळांनी व विद्युत रोषणाईने श्री नवशा हनुमान मूर्तीला मनमोहाक असे रुप प्राप्त झाले होते ही सजावट पाहू अनेक हनुमान भक्तांनी या सजावटी करणाऱ्यांचे मन भरुन कौतुक केले पाच  मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत अन्नकोट उत्सव संपन्न झाला सायंकाळी सात वाजता आरती करण्यात आली त्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश दायमा सौ स्नेहल दायमा तसेच मुकुंद चिंतामणी यांनी विशेष परिश्रम घेतले

बेलापूर प्रतिनिधी-स्त्री - पुरुष समानता राहावी. याकरिता राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे अनेक महिला उच्च पदस्थांनी बसल्या आहेत. मात्र महिलांवर दबाव आणून, त्यांच्या कामात अडथळे ,तसेच नामधारी करून दुसरेच निर्णय घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार श्रीरामपूर तालुक्यात ५ हजार लोकवस्तीच्या, बेलापूर खुर्द ग्रामपंचातीत समोर आला आहे. महिला सरपंच पदाचे आरक्षण पडल्याने,सौ वर्षा महाडिक ह्या बहुमताने पदस्त झाल्या. परंतु नामधारी सरपंच करून, होत असलेल्या भ्रष्टाचार सहन न झाल्याने. जनतेला दिलेले वाचनासाठी, स्वतः महिला सरपंच सौ महाडिक यांनी,पितळ उघडे केलं आहे.  अनेक वेळा विरोध करूनही, पाऊने ५ लाख रुपये खर्च करून. ग्रामपंचायतिच्या मागील बाजूस बांधण्यात आलेले शौचालायात ना पाण्याची सोय,ना प्रशस्त टाळी, त्यामुळे बंद असवस्थेतीत शौचालयाचा, ग्रामस्थांना वापर करता येत नसल्याने. ग्रामस्थ देखील संताप व्यक्त करीत असून. शौचालय सुरू करा नाहीतर पाडून तरी टाका अशी मागणी करीत आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या,शौचालयाच्या निकृष्ठ कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी. याकरिता महिला सरपंच सौ महाडिक आता, न्यायालयाचा दरवाजा ठोकणार असल्याची माहिती दिली आहे.







.

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर, जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच पोलीस कारवाईचा आढावा घेण्यासाठी. पोलीस अधीक्षक राकेश ओला विविध पोलीस ठाण्यांना भेट दिली. यावेळी श्रीरामपूर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने, पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे स्वागत करण्यात आले. सदरच्या स्वागत कार्यक्रमा प्रसंगी तिरंगा न्यूजचे संपादक अस्लम बिनसाद,एस न्यूज मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक जयेश सावंत, न्यूज सुपर वन चे अभिषेक सोनवणे  उपस्थितीत होते. सदरच्या स्नेह भेटी वेळी झालेल्या चर्चे दरम्यान, श्रीरामपूर येथील जुन्या आठवणींना उजाळा देत. अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी देखील उपस्थित होते.

अहमदनगर प्रतिनिधी-अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांची पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये बदली झाली. त्यांच्या जागेवर सुहास मापारी यांची नियुक्ती झाली आहे. मापारी यांनी यापूर्वी महसूल उपजिल्हाधिकारी तसेच श्रीरामपूरला प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर हे गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होते.यमगर हे पुणे जिल्ह्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यावेळेस त्यांना पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली नव्हती. यमगर नगर येथे एक वर्षभर कार्यरत होते. शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची प्रतिमा होती. शेवगाव तालुक्यातील बनावट बिगरशेती प्रकरणाचा तपास केला होता. सुहास मापारी हे नगरला उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूरचे प्रांताधिकारी म्हणून झाली. मापारी यांची अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget