Latest Post

येवला.  :-    नाशिक जिल्हा विशेष.  प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या वतीने सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या न्याय व हक्कासाठी शासन दरबारी विविध प्रश्नांवर लढा उभारून न्याय मिळून देण्यासाठी अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा उभारण्यासाठी    गाव वॉर्ड तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता.   सदस्य नोंदणीचा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहेत.. सर्वधर्मसमभाव राष्ट्रीय एकात्मता समाज भाईचारा जोडो अभियान.... मानवतेचा  विकास मानवता एकात्म ते चा संदेश देण्यासाठी.. सर्वसामान्य कष्टकरी. सर्व सामान्य शेतकरी शेतमजुरांच्या न्याय व हक्काच्या   हक्कासाठी  आयोजित. एका जाहीर बैठकीं च्या   कार्यक्रमाप्रसंगी   सामान्य जनतेचा बुलंद आवाज     महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष  जनसेवक.  समाज रक्षक समाज रत्न आदर्श युवा समाज भूषण पुरस्कार विजेते मा. श्री.शेरू भाई सादिक भाई मोमीन यांनी बोलताना यावेळी नमूद केले आहे    यावेळी.   कौमे खिदमत सोशल फाउंडेशन.   यांच्या वतीने.  शेरूभाई. मोमीन यांचा.  मान्यवरा च्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी ह. भ. प. भाष्कर महाराज दराडे शाम राव पवार तात्यासाहेब गिडगे पाटील    सोमनाथ काका रोकडे अविनाश गिरीगोसावी समीर भाई सय्यद रमजान शेख   युनूस बाबा शेख.   सुलतान बाबा शेख.  मुक्तार बाबा देशमुख.   परवेझ अहमद शेख.अर्बाज कुरेशी हुसेन भाई कुरेशी  मोबीन  खान मुलतानी एकबाल अन्सारी   जमील भाई पटेल दादाभाई तांबोळी असलम मनियार रईस शेख कयूम भाई शेख इब्राहीम चाचा आत्तार    सिद्धीक अन्सारी आदम मोमीन आश्रफ मोमीन अल्ताफ पठाण गोकुळभाई पवार   अकील शेख सुफी मो. हनीफ बाबा शेख अकील मुकादम.ज्ञानेश्वर जोगदंड.  ज्ञानेश्वर. उगले  संजय संत अहमद खान संतोष गायकवाड संदीप पगारे आकाश उबाळे सचिन साबळे बापूसाहेब रोठे सुरेश दादा कटके योगेश कटके अंबादास कटके दिनकर कटके गुलाब कमोदकर नवनाथ कमोदकर अकबर अन्सारी  अ. हमीद बाबा अन्सारी फैसल खान यावेळी प्रास्ताविक सय्यद लियाकत अली यांनी केले  व आभार प्रदर्शन पाशु भाई पटेल यांनी केले  यांच्यासह कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

श्रीरामपुर : जगभरात कोरोनाचे संकट ओढविल्याने, मागील २ वर्षांपासून कोणतेही धार्मिक सण उत्सव, जनतेला साजरा करता आले नाहीत. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे, शासनाने अनेक निर्बंध सैल केल्याने, यंदाच्या वर्षी विविध सण उत्सव, आता शासन नियमांच्या आधीन राहून साजरी करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव आला असून. येत्या ३ दिवसांनी गणेशोत्सवास सुरवात होणार आहे,मात्र दुसरीकडे कोरोनाची तिसरी लाट देखील डोके वर काढत असल्याने, प्रशासनासमोर या तिसऱ्या लाटेचा सामना करायचं मोठं आवाहन देखील उभे आहे. या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी यंदाचा गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, तसेच नागरिकांनी कोण कोणत्या नियमांचे पालन करावे यासंदर्भात चर्चा करण्यात आली, यावेळी उपस्थित गणेश भक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी तसेच उपस्थित नागरिक व आधिका-यांना, योग्य त्या सूचना देण्यात आल्या, ज्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन, आलेल्या भक्तांना सॅनिटायझर तसेच शारिरीक अंतर राखणे बंधनकारक राहणार असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेण्याच्या सूचना देत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोना जनजागृती संदर्भात सामाजिक उपक्रम घ्यावेत अशी सूचना , पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्या. यावेळी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे,तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आदींसह विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


येवला   नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी  :- पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला नगरपालिका हद्दीतील देवी खुंट नागड दरवाजा रोड येथे देवी मंदिर तर हजरत सैय्यद बाबा दर्गाह चौक   मौलाना आझाद रोड , नागड दरवाजा पर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, नगरसेवक सर्वश्री निसार शेख, मुश्ताक शेख, अमजद शेख, मलिक शेख, रईसा बानो शेख, तहेसिन बानो शेख,  राजेंद्र लोणारी, दिपक लोणारी,  मोहन शेलार,   राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, ज्येष्ठ नेते अरुण थोरात,  प्रांताधिकारी सोपान कासार, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला पोलीस निरीक्षक बी. एच. मथुरे,  सचिन कळमकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला व.  स्वागत करण्यात आले उपस्थित होते.



श्रीरामपूर(प्रतिनिधी)-शहरातून मोठया प्रमाणात गो मास पकडल्यानंतर पोलिसांनी हजारो गोवनशीय जनावरांची कातडी जप्त केली. त्यामुळे श्रीरामपूर शहरात अवैधरित्या तसेच चोरून गोवंशीय जनावरांची कत्तल तसेच गो मास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.शहरातील वार्ड नंबर २ परीसरात असलेल्या, अहिल्यादेवी नगर याठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कातडी असल्या संदर्भात, पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या आदेशावरून, शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील,पोलीस नाईक अमोल जाधव ,सचिन बैसाने,पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड, राहुल गायकवाड, तपास पथकाचे राहुल नरवडे, किशोर जाधव,गौतम लगड आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यावेळी दिपक धोंडीराम नरवडे यांच्या मालकीच्या जागेत असलेल्या घराबाहेर, एम एच १५ सी के ८०१० क्रमांकाच्या एशीअर टेम्पोत, गोवंशीय जनावरांची कातडी भरतांना पोलिसांनी पकडकी, सदरची कातडी अहमदनगरयेथील एका व्यापाऱ्याच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली. ज्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला त्याठिकाणी, अंदाजे ३ ते ४ हजार गोवंशीय जनावरांची कातडी ताब्यात घेण्यात आली आहेत. या गोवंशीय जनावरांची कातडी लाखो रुपयांची असून, ही कातडी आली कुठून,? श्रीरामपूरात या गोवंशीय जनावरांची कत्तल झाली तर नाही ना, असे अनेक प्रश्न पोलिसांच्या या कारवाईमुळे निर्माण झाले आहेत. सायंकाळच्या सुमारास ही कारवाई झाल्याने, उशिरा पर्यंत ,गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शहर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी:  गेल्या अनेक दिवसापासून माजी सैनिक व स्थानिक सामाजिक संघटना मध्ये तात्विक वाद झाला होता तो मिटवण्यासाठी अनेक वेळा त्रिदल ने प्रयास केला. यासाठी श्रीरामपूर तालुका आमदार लहुजी कानडे यांना देखील निवेदन सादर करून तक्रार केली होती व श्रीरामपूर पोलीस स्टेशन ला तक्रार केली होती परंतु काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा जैसे थे झाले आणि प्रकरण जास्त. जातीवादाची वळण घेऊ लागले या सर्व घटनेची माहिती त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मेजर संदीप भाऊ लगड यांना कळविण्यात आले. त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून समाजास पणे वाद मिटून घ्या नाहीतर आम्ही आमच्या स्टाईल ने वाद मिटवू अशी सूचना दिली. त्यानंतर कोर कमिटी अध्यक्ष मेजर अशोक चौधरी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता मेजर आठरे एस के ,  नगर उत्तर चे अध्यक्ष मेजर शरद चव्हाण , नगर उत्तर चे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार , श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानप , सैनिक सेवा संघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष अनिल लगड , उपाध्यक्ष मेजर संग्राम यादव , महिला अध्यक्ष छायाताई मोठे , अकोला तालुका अध्यक्ष मेजर सचिन नवले , मेजर बाळासाहेब बनकर ,  मेजर भागीरथ काका , मेजर राजू तोरणे , मेजर अजय तोरणे , तसेच सर्व महिला भगिनी , वीरमाता, वीरपत्नी ,वीर नारी, व तालुक्यातील तमाम  माजी सैनिक , यांच्या सहकार्याने व  सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संदीप मगर , त्रिदल सैनिक सेवा संघ तालुकाध्यक्ष अनिल लगड , यांच्या दोघांकडून लेखी व मोबाईलवर बाईट देऊन सामान्यपणे वाद मिटवला . त्यासाठी जिल्ह्यातून विविध जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे प्रसिद्धी दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. यापुढे भविष्यात माजी सैनिकाचा अपमान होऊ नये याची काळजी घ्यावी अशी सूचना दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.



राहुरी(प्रतिनिधी)-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाऊगीरी कारभारामुळे नगर मनमाड राज्य महामार्गावर जिवघेणे खड्डे झाले असून राज्य महामार्गावर मृत्यूचा सापळा बनलाय. प्रशासनाला जाग आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालूका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन केले. 

         गेल्या काही महिन्यांपासून नगर मनमाड राज्य महामार्गावर तसेच राहुरी तालूका हद्दीत मोठ मोठी खड्डे पडली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाऊगीरी कारभारामुळे राज्य महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठ मोठी खड्डे होत आहेत. त्या खड्ड्यामुळे अपघात होऊन आज पर्यंत हजारो जण मयत झाले तर तेवढ्याच संख्येने अपंग झाले आहेत. मात्र राहुरी येथील गेंड्याच्या कातडीचे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर बॅलेनटाईन चर्च समोर असाच एक मोठा जिवघेणा खड्डा पडलाय. त्या खड्ड्यात पडून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. याची दखल घेत दिनांक ५ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे तालूका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन केले. सुमारे तीन तास त्यांनी खड्ड्यात उभे राहून ये जा करणाऱ्या वाहनांना खड्ड्या पासून सावधान करत मार्ग दाखवीला. 

       सदर खड्ड्यामुळे मोठी जिवीतहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? प्रशासन कोणाचा अपघात होऊन मरणाची वाट पहात आहे का? असा सवाल गणेश पवार यांनी केलाय. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन कोणी जखमी अथवा मयत झाल्यास त्याला राहुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश पवार यांनी केली आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-सुजाण पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकावर असुन देशाच्या उभारणीत जडण घडणीत शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे असे मत प्रभारी प्राचार्या डाँ.गुंफा कोकाटे यांनी व्यक्त केले          बेलापुर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापुर येथे  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती  व शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्या वेळी बोलताना डाँ.कोकाटे पुढे म्हणाल्या की तिरत्तनी सारख्या छोट्या खेड्यातील सर्वपल्ली भारताचे राष्ट्रपती होतात तर त्यांचा आदर्श ठेवून आपण प्रत्येकाने महामानवांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे.त्यांनी लिहलेली ग्रंथसंपदा वाचून चार भिंतीच्या बाहेरची शाळा ख-या अर्थाने शिकली पाहिजे.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.तसेच एक वेगळा उपक्रम म्हणून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना राखी बांधून शिक्षक दिन साजरा केला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रा. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.विचारमंचावर कार्यालयीन अधिक्षक संदेश शाहिर , डॉ.नवाळे, डॉ ‌बाचकर ,प्रा.गायकवाड,प्रा.शेख उपस्थित होते.अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ गुंफा कोकाटे यांनी भुषविले .कार्यक्रमाचे नियोजन समिती प्रमुख सतिश पावसे यांनी केले. डॉ.अशोक माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget