Latest Post

बेलापूर-(प्रतिनिधी  )-सुजाण व समृध्द पिढी घडविण्यासाठी ग्रंथालय गरजेचे असुन खरे ज्ञान हे ग्रंथालयातूनच मिळते असे उदगार  बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथपाल प्रा ,सतिश पावसे यांनी काढले ग्रंथालय दिनानिमित्त बोलतना.ते पुढे म्हणाले की, आधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ रंगनाथन यांचे अनन्य साधारण योगदान आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे विनामूल्य खुले करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ.रंगनाथन यांनीच रुजवला .नंतर तो जोपासण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले.  डॉ.रंगनाथन यांनी मांडलेले पाच पुस्तकालय विज्ञान सिद्धांत हे भारतीय पुस्तकालय विज्ञानाचा पाया समजले जातात. डॉ रंगनाथन यांचा वाढदिवस भारतात ग्रंथपाल दिन म्हणून आपण साजरा करतो. यानिमित्ताने वाचन संस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वाढावी यासाठी ग्रंथालयांचे महत्त्व आहे .प्रा. पावसे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेतला. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी ग्रंथालय आवश्यक आहेत .शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण देखील अतिशय महत्वाचे आहे. सार्वजनिक ग्रंथालयांची गरज ओळखून 30 जानेवारी 1928 रोजी त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाचे स्थापना केली . ग्रंथालय ही सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालय आवश्यक आहेत .पुढे ते असेही म्हणाले की,  वाचनालयांचा ग्रामीण भागात महाराष्ट्रात मोठा विस्तार होत आहे. वाचक ग्रंथालय वाचकाभिमुख होण्यासाठी नवे प्रयोग हाती घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. ग्रंथामुळे स्वतःची माहिती व ज्ञान यात भर पडते . माणूस समृद्ध होतो. त्याचे विचार समृद्ध होतात.वाचनाने माणूस विवेकी बनतो. अलीकडच्या काळात ऑनलाइन ग्रंथालयांचे महत्व वाढत आहे. त्यादृष्टीने ही नव ग्रंथ पालांना ई-लायब्ररीची देखील संधी उपलब्ध झाली आहे .सध्या बाजारात विविध प्रकारचे लायब्ररी सॉफ्टवेअर उपलब्ध आहे . त्याचा उपयोग करून बुद्धीची मशागत करावी असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय समितीचे प्रा.अशोक थोरात व प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी केले. डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे यांच्या शुभहस्ते झाले.प्रा.सुनिल विधाटे यांनी आभार मानले.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-मुलीचे बी एच एम एस पदवी प्रमाणपत्र देण्याकरीता एक  लाख ४७ हजार ५०० रुपयांची लाच घेताना होमीओपँथी मेडीकल काँलेज वडाळा येथील प्रभारी प्राचार्य व लिपीका विरुध्द लाचलुचपत विभागाने कारवाई केली असुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहै.  या बाबत मिळालेली माहीती आशी की तक्रारदार यांच्या मुलीने बी एच एम एस पदवीचे पासींग प्रमाणपत्र तसेच इंटरशिप पुर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्याकरीता मागणी केली त्या वेळी बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे वय ५२धंदा नोकरी प्रभारी प्राचार्य होमीओपँथी मेडीकल काँलेज वडाळा महादेव तालुका श्रीरामपुर राहणार मानुर तालुका राहुरी यांनी हजेरीची अँडजस्टमेंट करुन प्रमाणपत्र  देण्यासाठी पंचासमक्ष एक लाख ४५ हजार ५०० रुपयाची मागणी केली आरोपी क्रमांक दोनभारती बापुसाहेब इथापे लिपीक होमीओपँथीक मेडीकल काँलेज वडाळा महादेव यांनी ती रक्कम पंचासमक्ष  स्विकारली असता दोन्हा आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे पोलीस अधिक्षक सुनील कडासने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे पोलीस उपअधिक्षक हरिष खेडकर  पोलीस निरीक्षक दिपक करांडे हवालदार संतोष शिंदे रमेश चौधरी रविंद्र निमसे वैभव पांढरे संध्या म्हस्के हारुन शेख राहुल डोळसे यांनी सापळा यशस्वी पार पाडला.



संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या शिर्डी येथील दोन तरूण रचित पाटणी व प्रवीण गोंदकर यांचे दुहेरी हत्याकांड राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गाजले होते सदरची घटना 15 जून 2013 रोजी  मध्यरात्री घडली होती या घटनेत त्यावेळेचे श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केलेला बारकाईने तपास यामुळे यातील चींधीचोर पापी पाप्या शेख सह 12 आरोपींना नाशिक येथील मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याबरोबरच महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक निर्णयात मोक्का न्यायालयाने सदर आरोपींना एक कोटी 38 लाख इतका दंड देखील ठोठावला होता अतिशय कुशलतेने तपास करून यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी केलेला प्रामाणिक तपास पाहता त्या कामाची दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्रालय नवी दिल्ली यांच्या कडून सध्या नाशिक येथे असलेले लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना उत्कृष्ट तपास पदक देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे

    देशातील एकूण 152 जणांना उत्कृष्ट तपास पदक सन्मानपत्र व मान चिन्ह जाहीर झालेले आहे त्यात महाराष्ट्रातील 11 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यातील  नगर जिल्ह्यातील एकमेव अधिकारी (तत्कालीन श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक) सुनील कडासने यांचा  समावेश आहे यात सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे अति दुर्मिळातील दुर्मिळ खून प्रकरणात मुख्य चिंधीचोर पापी पाप्या शेख सह 12 आरोपींना त्यांनी केलेल्या तपासा मुळे नाशिक येथील मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती या खून प्रकरणानंतर नगर जिल्ह्यात मोठी घबराट पसरली होती  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाला होता मात्र अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना अत्यंत बारकाईने तपास करून यातील सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल यासाठी विशेष प्रयत्न केलेला होता. 


सदर केस ही नाशिक येथील मोक्का न्यायालयात सुरू होती त्यानंतर न्यायालयाने यातील मुख्य आरोपी चींधिचोर पापी पाप्या शेख सह बारा आरोपींना जन्मठेप व तब्बल एक कोटी 38 लाख रुपयांचा दंड सुनावला होता या तपासात उत्कृष्ट काम केले म्हणून सुनील कडासने यांना केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांच्या कडून उत्कृष्ट तपास पदक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुनील कडासने यांनी दै. साईदर्शन शी बोलतांना सांगितले की  आपण केलेल्या प्रामाणिक कामाचे अश्या सन्मानामुळे मोठे समाधान वाटते तसेच अश्या सन्मानमुळे पोलिस दलात काम करण्यास अजुन जास्त ऊर्जा मिळत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 या दुहेरी हत्याकांडात दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश लोकचंदाणी हे सरकार पक्षाच्या वतीने एकमेव साक्षीदार होते या आरोपींना शिक्षा होणेकामी लोकचंदानी यांचीही मोलाची भूमिका होती ...

संपूर्ण अहमदनगर जिल्हा तसेच नासिक जिल्हा पोलिस दलातून दबंग पोलिस अधिकारी सुनील कडासने यांचे अभिनंदन होत आहे तसेच दैनिक साईदर्शन सुद्धा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांचे आभार व्यक्त करत त्यांचे अभिनंदन याप्रसंगी करत आहे.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-नेवाशातील पोलीसाविषयी व्हायरल झालेल्या क्लिपचे वादळ शांत होत नाही तोच पुन्हा एकदा नेवासा पोलीस व वाळू तस्कर यांच्यातील संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यामुळे कायद्याचे रक्षकच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.मागील पोलीस अधिकाऱ्यांची व्हायरल झालेल्या क्लिपची चौकशी पुर्ण होत नाही तोच नेवाशातील पोलीस अधिकारी व वाळू तस्कर यांच्या संभाषणाची क्लिप सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय झालेली आहे काही दिवसापूर्वी स्वादिष्ट बिर्याणीची क्लिप महाराष्ट्रभर गाजली आता नेवासा पोलीस स्टेशनच्या जबाबदार अधिकाऱ्यांनेच वाळू तस्करांना मी बाहेर पडत आहे आपली वाहने काढुन घ्या असा मैत्रीपूर्ण सल्ला दिला असुन या संभाषणाची क्लिप सर्वत्र सोशल मिडीयावर फिरत आहे या बाबत पत्रकारांनी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करण्याचे आदेश शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले आहे एकंदरीतच पोलीस व अवैध व्यवसायाचे अर्थपूर्ण संबध आता उघड होत आहे पोलीस अधिकारी स्वतः वाळू तस्करांना वाहने पळविण्याचे या क्लिप मध्ये सांगत आहे त्यावरुन त्यांच्यातील अर्थपूण मैत्रीची कल्पना येते पोलीसा अधिकारीच जर वाळू तस्करी सारख्या अवैध व्यवसाय करणाराला पाठीशी घालत असतील तर सर्व सामांन्याचे काय हा प्रश्न निर्माण होत आहे महसुल अधिकारी  आपल्या परीने वाळू तस्करी थांबविण्याचा प्रयत्न करतात परंतु पोलीसच त्यांना पाठीशी घालतात त्यातलाच हा प्रकार असुन वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे ही क्लिप उघड झाली परअसे अनेक ठिकाणे आहेत की जेथे वाळू तस्करांना खूलेआम पाठीशी घातले जाते काही वाळू तस्कर तर कुणाला किती दिले हे अभिमानाने सांगत असतात या सर्वांचा बदोबस्त होवुन अवैध व्यवसायाला पायबंद केव्हा बसेल असा सवाल नागरीक विचारत आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- येथील मोफत कोविड केअर सेंटरचे कार्य केवळ दाते सामाजिक कार्यकर्ते डाँक्टर पत्रकार पोलीस यांच्या सहकाऱ्यानेच यशस्वीरीत्या पार पडले असल्याचे मत उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले. बेलापुर गावात मोफत कोविड सेंटर सुरु करुन अनेक रुग्णावर योग्य उपचार केल्यामुळे सर्व रुग्ण सुखरुप घरी गेले  त्या बद्दल कोविड सेंटरमध्ये विशेष योगदान देणारे पोलीस पाटील अशोक प्रधान रुग्ण कल्याण सामीतीचे विशाल आंबेकर गोपी दाणी बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांना महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योध्दा

पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या वेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते  कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख देविदास देसाई ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले मुस्ताक शेख उपस्थित होते या वेळी बोलताना महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे सस्थापक अध्यक्ष  बरकतअली शेख म्हणाले की सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देण हे पत्रकार संघाचे व पत्रकारांचे कर्तव्य आहे या पत्रकार संघास २९ वर्षाचा सामाजिक वारसा लाभलेला आहे समाजातील चांगल्या गोषौटीची संघ नेहमीच दखल घेत असतो कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्याच्या जिवाची काळजी करणारांना संघाच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचेही शेख यांनी सांगितले या वेळी पत्रकार देविदास देसाई अमीर जहागीरदार रियाज पठाण आरोग्यदुत सुभाष गायकवाड पोलीस पाटील अशोक प्रधान आदिंनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास मुस्ताक शेख दिलीप दायमा फकीर मोहमंद शेख रियाज पठाण गुलाब वायरमन कासम शेख एजाज सय्यद शफीक शेख मुसा सय्यद अमीर बेग मिर्झा अजिज शेख योगेश नागले उपस्थित होते कार्यक्रमचे सूत्रसंचलन राजमोहंमद शेख यांनी केले तर प्रास्ताविक कासम शेख यांनी केले असलम बिनसाद यांनी आभार मानले.


श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- दोन हजार रुपयाची लाच घेताना श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे संजय काळे यांना लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने रंगेहात पकडले त्यामुळे पोलीसा वार्तुळात खळबळ उडाली आहे. या बाबत मिळालेली माहीती अशी की तक्रारदार यांचे नातवावर श्रीरामपुर शहर पोलीसा स्टेशन येथे दाखल असलेल्या भा द वि कलम ३९२ च्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व चार्जशिटसाठी आलोसे संजय काळे यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली होती ही रक्कम श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनमधील बिट चौकी न ३ चे कार्यालय येथे स्विकारली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील यांच्या समवेत पोलीसा नाईक प्रकाश महाजन एकनाथ बाविस्कर पळशीकर यांनी हा सापळा यशस्वी पार पाडला असुन या कारवाई मुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार हा बहुमान मिळाला त्याबद्दल हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला या वेळी बोलताना असलम बिनसाद यांनी आपले तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या सोबत लोकडाऊन काळात काम करत असतानाचे आपले काही अनुभव याळवेली सांगितले शासकीय कामकाजा व्यतिरिक्त  जनतेची गऱ्हाणी अडचणी सोडविण्याचे काम  प्रशांत पाटील यांनी केले अन त्या कामाची जेव्हा बातमी झाली त्यावेळेस पाटील साहेबांचे माझ्या सोबत फोनवर जे बोलणं झालं ते आयकून मला हे आपल्या शहराचे तहसीलदार असल्याचे अभीमान वाटले प्रशांत पाटील म्हणाले मी कार्यालयात आलेल्या आजीची विचारपुस केली तिची किरकोळ समस्या होती ती सोडविली हे फार काही वेगळे काम केले असे मला वाटत नाही माझ्या परिवाराचे माझ्यावर संस्कारच असे झालेले आहेत की आपल्याकडे कुणीही समस्या घेवुन आला तर त्याचे समाधान करणे हे माझे पहीले कर्तव्य आहे. आणि त्यामुळे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था यांच्या

वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांचा सत्कार आम्ही करत आहोत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष  असलम बिनसाद,उपाध्यक्ष जावेद इनामदार,जुबेर भाई बिनसाद, ऍडव्हकेट अजित डोके, कलीम बिनसाद, प्रशांत गौड, सुजित कडू, सुरेश वालतुरे, ललिता ताथेंड, सलीम बिनसाद,कृष्णा धुवाविया,बाबा दुशिंग,नूर महंमद पटेल, रुपेश बोराडे, गौरव काळे, अहमदनूर कुरेशी, शकील पठाण,अबूबकर बिनसाद, शोएब पटेल,पत्रकार कासिम शेख, शफिक शेख,एजाज सैय्यद त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी उपिस्थत होते. 


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget