Latest Post

बेलापूरः(प्रतिनिधी  )-आमची पायरी ओळखण्या आधी आपण कोणत्या पायरीवर उभे आहात हे ओळखा.हिंमत असेल तर   तोंड उघडून दाखवावेच.योग्य वेळी  तुम्ही केलेल्या कारन्यामांचा जाहिर पंचनामा करणारच आहोत.तसेच अंधारातले काळे कारनामे उजेडात आणणारच आहोत.असे सडेतोड उत्तर गावकरी मंडळाच्या वतीने प्रसिद्धीस  दिले आहे 

 गावाकरी मंडळाच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की  जशास तसे उत्तर देण्याची  भाषा वापरुन आपले हसे करुन घेवू नये.

हिंमत असेल तर .रविन्द्र खटोड यांनी आमच्याविरुध्द तोंड उघडूनच दाखवावे  कोण आव आणतं आणि कोण काय नाटकं करतो याची आम्हाला इत्तंभूत माहिती आहे.आमच्या धंद्याच्या उचापती करणारांनी आपल्याखाली काय जळतंय ते बघावे.आमच्या नादी लागून उगाच इज्जतीचा पंचनामा करुन घेवू नये.जशास तसे उत्तराची भाषा करणा-या .खटोड यांनी आपल्याला भिडण्याची  हिंमत दाखवावी  म्हणजे कोणात किती दम आहे हे कळेल.आमचे बावन पत्ते ओपन आहेत.आमचे काय धंदे आहेत हे जग जाहिर आहे.आपण कधी लपून छपून धंदे वा उद्योग करीत नाही.

 भेकडासारखे उद्योग करुन गच्चीवरुन  पळून जाण्या सारख्या घटनांमुळे  कार्यकर्त्याचे प्रपंच उध्वस्त होण्याची वेळ येते हे सगळ्या गावाने अनुभवले आहे.कार्यकत्यांना कामापुरते मामा बनवायचे आणि नंतर वा-यावर सोडून द्यायचे हे आता ध्यानात येवू लागले आहे.  शनीच्या अवकृपेमुळेच आपल्यावर गाव सोडण्याची वेळ आली हे विसरू नये .तसेच बापजाद्यांच्या पुण्याईवर किती दिवस जगणार, आधी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करा आणि आपली पायरी ओळखून बोला.दुसर्यावर बिनबुडाचे आरोप करुन स्वतःचा बचाव करु नये.आम्हाला बदनाम करुन स्वतःच्या बदनामीवर पांघरुण घालू नये.आमचेवर वायफट आरोप केले आणि दमबाजीची भाषा वापरली तर जशास तसेची भाषा वापरणारांना  पळता भुई थोडी होईल असा इशारा  दिला आहे.

          जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले म्हणाले की विरोधक आडवे येतात हि सबब सांगून किती दिवस जनतेपासून पळणार.आपण सरपंच असताना गावात काय विकास कामे केली होती हे जनता विसरलेली नाही.त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण विकास कामांना किती निधी मिळवून दिला याचाही तपशील आपण देणार आहोत.दरवेळी विरोधक  अडवणूक करतात अशी सबब सांगून आपले नाकर्तेपणावर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न  करु नये.गेल्या दहा वर्षात काय काय घडले आहे हे जनतेला पूरते ठाऊक आहे.त्यामुळे स्पर्धा करायची तर चांगल्या  कामांची करा.उगाच खोटेनाटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करु नये अन आता जनताही सुज्ञ झालेली आहे .येत्या निवडणूकीत जनता  दहा वर्षातील कामगिरीचे आॕडीट करुन सत्ताधां-यांचा हिशोब चुकता करील असा विश्वास श्री.नवले यांनी व्यक्त केला.


शेवगाव (प्रतिनिधी  )- शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत याने आपल्यावर असलेल्या गुन्ह्याची माहीती दडवुन शासन सेवेतील सचोटी व कर्तव्य परायणता राखली नसल्यामुळे तात्पुरती पद नियुक्ती समाप्त करत असल्याचा आदेश राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिला आहे   शेवगाव येथील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत यांनी बोगस चारित्र्य पडताळणीची कागदपत्रे जोडून शासकीय नोकरी मिळवीली असुन त्याचेवर कायदेशीर कारवाई करुन सेवेतुन बडतर्फ करावे अशी मागणी संकेत कळकुंबे मिनाताई कळकुंबे यांनी केली होती पवनसिंग बिघोत हा पुरवठा निरीक्षक पदावर रुजु होण्यापूर्वी १७ सप्टेंबर २०१६ रोजी त्याचेवर सिडको पोलीसा स्टेशन औरंगाबाद येथे पोलीस तोतयागीरीचा गुन्हा दाखल झालेला होता या व्यक्तीस सेवेतुन बडतर्फ करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती या बाबत वरिष्ठ पातळीवर निवेदनेही देण्यात आली होती तरी देखील संबधीत व्यक्तीवर कारवाई न झाल्यामुळे संकेत कळकुंबे व मिनाताई कळकुंबे यांनी अहमदनगर येथील तहसील कार्यालयापुढे उपोषण सुरु केले त्यांच्या उपोषणासा जय भगवान महासंघ व रिपब्लीकन पार्टी गवई गटाने पाठींबा दिला होता या उपोषणाची वरिष्ठ पातळीवरुन तातडीने दखल घेण्यात आली या तक्रारी वरुन बिघोत याची चौकशी करणे कामी समिती गठीत करण्यात आली  बिघोत यांची नेमणूक करताना अट क्रमांक ३२ नुसार पोलीस तापासणीची कार्यवाही ही आक्षेपार्ह असल्यास व नियुक्ती दिली असल्यास कोणतीही पूर्व सुचना न देता सेवेतुन काढुन टाकण्यात येईल असे स्पष्ट नमुद करण्यात आले होते समितीने दिलेल्या अहवालात पी आर बिघोत विरोधात गुन्हा न्यायप्रविष्ट असला तरी  गुन्ह्याची माहीती शासन सेवेत रुजु होते वेळी उघड न करता लपवुन ठेवलेने कारवाईस पात्र असल्याचे सर्व सदस्यानी नमुद केले आहे  त्यामुळे पी आर बिघोत यांचे पुरवठा निरीक्षक पदावरील पदस्थापना संदर्भात जाहीरातीतील अट क्रमांक ३२ तसेच ईकडील नियुक्ती आदेश१८-२-२०१९ मधील अटी व शर्तीचा भंग केला त्यामुळे पी आर बिघोत यांची तात्पुरती पदसेवा समाप्त करण्यात येत असल्याचा आदेश राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिला आहे.

श्रीरामपुर (प्रतिनिधी  )-राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने शंभर टक्के आधार सिडीग व मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या सुचना दिल्या असुन तालुक्यातील दुकानदारांनी वेळेत हे काम पुर्ण करावे तसेच नागरीकांनीही सहकार्य करावे आसे अवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात तहसीलदार पाटील यांनी पुढे म्हटले आहे की  राष्ट्रीय अनसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेचे श्रीरामपूर तालुक्यात एकुण  1 लाख 78 हजार 232 इतके लाभार्थी असून 1लाख 41 हजार 695 (79.50%) इतक्या लाभार्थ्यांचे आधार सिडींग झालेले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी विशेष

मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार,मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे.

याकरीता रास्तभाव दुकानांतील ई-पॉस

उपकरणांमधील ekyc  व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे.याकरिता 31जानेवारी 2021 पूर्वी प्रत्येक रेशनकार्ड मधील लाभार्थ्यांचे 100 टक्के

आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दिष्टाने श्रीरामपूर  तालुक्यात सर्व स्वस्त धान्य दुकानात हा कार्यक्रम  राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिकेतील

लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाचे सिडींग करण्यात येणार आहे. 31 जानेवारी 2021 पूर्वी या लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक सिडींग करण्याचे अधिकार  सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना देण्यात आले आहेत.ekyc  पडताळणी व मोबाईल सिडींग सुविधा प्रत्येक रास्तभाव धान्य दुकानात आहेत.रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या कुटुंबातील

सर्व सदस्यांचे आधारकार्ड घेऊन संबंधित रास्तभाव धान्य दुकानात जावुन ekyc पडताळणी पूर्ण करुन घ्यावी. याकरिता

संबंधित लाभार्थी यांनी वैयक्तिकरित्या दुकानात जाऊन आधारकार्ड व अंगठ्याचा ठसा pos  मशिनवर द्यावयाचा आहे.

ekyc  करताना कुंटुंबातील किमान एका सदस्याचा चालू मोबाईल क्रमांक देणे

आवश्यक आहे.  ekyc 31 जानेवारी 2021पर्यंत करुन घेणे बंधनकारक असून 31

जानेवारी 2021 पर्यंत आधारसिडींग न झालेस सदर लाभार्थ्यांना अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून निलंबित करण्यात

येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.राष्ट्रीय अन्नसुरक्षा

योजना व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमधील

लाभार्थ्यांचे 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दीष्टाने श्रीरामपूर तालुक्यात मोहिम राबविण्यात येत आहे. रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक करावे, असे आवाहन श्री. प्रशांत पाटील, तहसीलदार श्रीरामपूर 

यांनी  केले आहे.


श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- अभिरुप युवा संसद यांच्या वतीने आयोजीत युवक बिरादरी स्पर्धेत श्रीरामपुर येथील चंद्ररुप डाकले काँलेजने दुसरा क्रमांक मिळविला असुन या काँलेजचा विद्यार्थी विशाल नवनाथ देसाई याने प्रखर वक्ता हा बहुमान मिळविला आहे                                                  एम आय टी काँलेज पुणे येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातुन स्पर्धक आलेले होते या स्पर्धेत पहीला क्रमांक मुंबईच्या टिमने मिळविला द्वितीय क्रमांक श्रीरामपुर येथील सी डी जे काँलेजने मिळविला सी डी जे काँलेज मधील विद्यार्थी विशाल नवनाथ देसाई याची प्रखर वक्ता (संसद पटु )म्हणून निवड झाली आहे दिनांक १२ जानेवारी रोजी मुंबई येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे महाराष्ट्रातुन एकुण ३८ स्पर्धकांची निवड करण्यात आली असुन त्यातुन प्रखर वक्ता निवडण्यात येणार आहे  विशाल देसाई यास नाऊर येथील रविंद्र देसाई सी डी जे काँलेजचे घोडके सर पुणे येथील इंगोने सर याचे मार्गदर्शन लाभले  विशाल देसाई यांच्या यशाबद्दल जेष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई पत्रकार देविदास देसाई पत्रकार संदीप जगताप प्रगत प्राथमिक सोसायटी नाऊरचे चेअरमन माणीक देसाई प्रताप देसाई आदिंनी अभिनंदन केले आहे.



बेलापुर (प्रतिनिधी  )-कार्यकर्त्यांना दमबाजी करण्याची भाषा बंद करा अन कोण नालायक कुणाचे काय धंदे आहे हे सार्या गावाला ठाऊक आहे त्यामुळे आमच्या नादी लागाल तर जशास तसे उत्तर देवु  असे अवाहन जनता विकास अघाडीचे रविंद्र खटोड यांनी दिले आहे                              जनता विकास अघाडीच्या प्रचाराचा शुभारभ श्री हरिहर केशव गोविंद मदिर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव वाबळे हे होते   रविंद्र खटोड पुढे म्हणाले की सुस्कृंत असल्याचा आव आणू नका कोण लायक कोण नालायक ही जनता ठरवेल आपली पायरी ओळखुन बोला आमची जिभ घसरली तर बरेच काही बाहेर येईल अन किती दिवस एकच कँसेट जनतेसमोर घासणार आम्ही शनि देवाचे भक्त आहोत हे सांगण्याची कुणाला गरज नाही  आमचे तोंड उघडण्यास भाग पाडू नका नाही तर बरेच काही बाहेर येईल असेही खटोड म्हणाले बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले म्हणाले की गावात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली परंतु विरोधकांनी केवळ दबाव तंत्राचा वापर करुन त्रास देण्याचे काम केले बेलापुर ग्रामपंचायतीची २७ वेळा चौकशी केली परंतु एक रुपयाचाही भ्रष्टाचार आढळला नाही जि प सदस्य असताना आपण काय दिवे लावले केवळ लोकांची उणे-दुणे काढण्याचेच काम केले प्रत्येक कामात अडथळा आणला गावाच्या पाणी पुरवठ्याची सर्वात मोठी चार कोटी १७ लाख रुपयाची पाणी पुरवठा योजना काही काळ रखडली होती आता त्या कामाला पुन्हा गती येणार आहे त्या करीता जनता विकास अघाडीच्या सर्व १७ उमेदवारांना निवडणूक द्या असे अवाहन नवले यांनी केले  आपल्या भाषणात बोलताना भरत साळुंके म्हणाले की काळजी करु नका सर्वांचा हिशोब चुकता करु या अघाडीच्या माध्यमातून जुन्या नव्यांचा मेळ घालुन सर्वा जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मुस्लिम कब्रस्थानचा प्रश्न सोडविला दहावा घाटाचा प्रश्न मार्गी लावला त्यातही विरोधकांनी अडथळे आणले ग्रामपंचायतीत काम करताना चुकीचे काम केले नाही चुकीच्या कामाला पाठीशी घातले नाही अन एक रुपयाही खाल्ला नाही असेही साळुंके म्हणाले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक म्हणाले की कै मुरलीधर खटोड व कै जयंतराव ससाणे हे विकास पुरुष होते त्यामुळे त्यांचे फोटो लावले त्यात कुणाला त्रास होण्याचे कारण नाही आरोप विचारा पूर्वक कराआम्ही आज पर्यत जनतेशी ईमान राखण्याचेच काम केले त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे असेही पाटील म्हणाले या वेळी गोविंद वाबळे शैलेश पवार चंद्रकांत नाईक हैदरभाई सय्यद आदिंनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन अभिजित राका यांनी केले


बेलापुर (प्रतिनिधी  )-गावात चाललेली दादागीरी भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी गावकरी मंडळाला विजयी करा गावकरी मंडळाची सत्ता आल्यास गावाची दशा बदलुन योग्य दिशा देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करु अशी ग्वाही गावकरी मंडळाचे प्रमुख व जि प सदस्य शरद नवले यांनी दिली. बेलापुर ग्रामपंचायतीच्या १७ जागे करीता होणार्या  गावकरी मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद मदिर येथे माजी जि प अध्यक्ष मिस्टर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाला  या वेळी  बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की गावकरी मंडळ सत्तेत आल्यावर पहीले प्राधान्य गावाला शुध्द पाणी देण्याचे नियोजन करु गावातील सर्व रस्ते डांबरीकरण करु तसेच वाड्या वस्त्यावरील रस्तेही दुरुस्त करु प्रवरा नदीत पडणारा कचरा बाजार तळावर पडणारा कचरा या कचर्याचा एक कोटी रुपयाचा घन कचरा प्रकल्प राबवु त्या करीता शेती महामंडळाची जमीन ताब्यात घेवु गावातील १७०० लाभार्थ्याची नावे ड वर्ग मध्ये असुन या सर्वांना आपल्याला घरकुल योजनेचा लाभ द्यावयाचा आहे  त्याच बरोबर गावात सर्व सामान्यासाठी संस्कृतीक भवनाची निर्मिती करुन तेथे विवाहची सोय करण्यात येईल तसेच तरुणासाठी जिम व महीलासाठी जाँगीग ट्रकची व्यवस्था केली जाईल असेही जि प सदस्य शरद नवले यांनी सांगीतले या वेळी बोलताना भाजपाचे सुनिल मुथा म्हणाले की दहा वर्ष ग्रामपंचायतीचा वापर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी करणार्या नतद्रष्ट ठेकेदारांनी गावाला बदनाम केले विकास कामे कसे करावी याचा आदर्श समाजापुढे ठेवणारे कै ,जयंतराव ससाणे व कै .मुरलीधर खटोड यांना बदनाम करु नका भ्रष्टाचारामुळे गावाचा बट्ट्याबोळ झाला असुन गावाचा कायापालट करावयाचा असेल तर गावाकरी मंडळाला विजयी करा ज्यांनी शनि देवाला फसविले आपल्या निष्ठावंत कार्याकर्त्याला फसविले ते लोक मोठ मोठे अमिषे दाखवुन खोटी अश्वासने देवुन आपली मते मिळवतील व पाच वर्ष सत्ता भोगतील अन सत्तेतुन पैसा संपत्ती अन संपत्तीतुन पुन्हा सत्ता हे समीकरण आता हाणून पाडा असेही मुथा म्हणाले

श्रीरामपूर- पूर्वीपेक्षाही आजची पत्रकारिता प्रगल्भ झालेली आहे पत्रकारांना नवनवीन माध्यमे व त्यामध्ये झालेले बदल आत्मसात करून अनुभव व मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर भावी काळात वाटचाल करावी लागेल जो बदल स्वीकारणार नाही त्याची पत्रकारिता विशिष्ट अशा एका ढाच्यातच राहील त्यामुळे त्याचा परिणाम प्रसार माध्यमावर होऊन त्यांची आर्थिक झळ प्रसार माध्यमे चालवणाऱ्यांना सोसावी लागेल असा इशारा सिटिजन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नागेश सावंत यांनी दिला कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिन पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते सिटिजन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या वृत्तपत्रे संघटनेने बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन हा पत्रकार दिनाचे आगाशे सभागृहात या ठिकाणी आयोजित केली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार पदमाकर शिंपी हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की पत्रकारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे कोरोणाच्या संकटावेळी पत्रकारांनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडले कुटुंबाची काळजी न करता सामान्यांना माहिती  पुरविण्याकरिता कसोसिने प्रयत्न केले अशा पत्रकारांचा गुणगौरव होणे हे नवोदित पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचा खरा क्षण ठरेल असे ते म्हणाले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, अरुण पाटील, सुधीर वायखिंडे, मराठा स्वयंसेवक संघाचे राजेंद्र भोसले, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा अध्यक्ष असलम बिनसाद, पत्रकार सलीम पठाण, सुनील लोखंडे, जयेश सावंत, रोहित भोसले, प्रवीण जमदाडे, राहुल रणपिसे, बाबा वाघ, श्रीमती वैशाली थोरात, अमोल सावंत, रोहित डुकरे, यांच्यासह  प्रसारमाध्यमे व विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget