Latest Post

श्रीरामपूर -  कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्या सह देशभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने, मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या उपचाराकरिता रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने, महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, संघटनेचे अध्यक्ष अशोक जोशी,उपाध्यक्ष संतोष कोठारी, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अबूभाई कुरेशी,सचिव हजी अमीन शेख ,खजिनदार तुकाराम ताक, जलील भाई शेख, फरीद शेख,नगरसेवक मुख्तार शाह, आदींच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले, यावेळी जवळपास २०० लोकांनी रक्तदान केले, सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास खासदार सदाशिव लोखंड, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सदिच्छा भेट दिली ,तसेच नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दूरध्वनी व्दारे शुभेच्छा संदेश दिला,सदरच्या भव्य रक्तदान शिबीरस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून ,२०० नागरिकांनी यावेळी रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.



 

शिर्डी (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हामध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे ,वाळूतस्करी तसेच गुन्हेगारीला  लगाम घालण्यांचे व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने आपण यापुढे करणार आहोत .असे आश्वासन अहमदनगर जिल्ह्याला नवीन आलेले कर्तव्यदक्ष असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

  अहमदनगर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे आज सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी शिर्डीत आले होते. त्यांनी शिर्डी पोलीस उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पाचही पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीला पोलिस उप विभागीय अधिकारी संजय सातव

तसेच शिर्डी, कोपरगाव शहर, कोपरगाव ग्रामीण, राहाता ,लोणी, पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी उपस्थित होते .यावेळी उत्तर नगर जिल्हा तसेच शिर्डी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमध्ये, शहरांमध्ये अवैध धंदे ,अवैध व्यवसाय, वाळूतस्करी ,गुन्हेगारी या सर्वांचा आढावा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतला, यापुढे या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे, वाळू तस्करी, गुन्हेगरी त्वरित बंद व्हावेत, यासाठी सक्त सूचना त्या त्या पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना यावेळी देण्यात आल्याचे  समजते. त्यानंतर  या आढावा बैठकीनंतर शिर्डी पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक जितेश लोकचंदाणी, अध्यक्ष किशोर पाटणी, कार्याध्यक्ष राजेंद्र बनकर, सदस्य हेमंत शेजवळ, विनोद जवरेनी त्यांचा शिर्डीत प्रथम सत्कार करुन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद न घेता स्वतः शिर्डी पत्रकार संघाला आपणच या उत्तर नगर जिल्ह्यातील प्रश्न, समस्या ,अवैध धंद्या बाबत वेळोवेळी माहिती द्या, सर्वांच्या सहकार्याने आपण अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंदे वाळूतस्करी, गुन्हेगारी मोडून काढू, नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, पत्रकार ,पोलीस अधिकारी, नागरिक या सर्वांनी समन्वय साधून अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे ,आपला तसा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी पत्रकारांचेही सहकार्य आवश्यक आहे. असे यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच शिर्डीत आल्यामुळे त्यांनी साईबाबा मंदिर बंद असल्यामुळे बाहेरूनच लांबून दर्शन घेतले, सोलापूर हुन अहमदनगरला बदलून आलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यामध्ये प्रथम बदल्यांचा दणका पोलीस अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर आता ते अवैध धंदे ,गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे त्यांची धडकी अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारांनी ,वाळूतस्करांनी घेतली आहे. त्या धर्तीवर उत्तर नगर जिल्ह्यातील शिर्डीचा त्यांचा आजचा हा दौरा महत्त्वाचा ठरला आहे .त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत आढावा बैठकीत पोलीस निरीक्षकांना सक्त सूचना करत अवैध धंदे त्वरित बंद करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत असे समजते.

🔸शहर पोलिसाचे डीबी स्कॉडने तिन्ही आरोपिंना घेतले ताब्यात

बुलडाणा - 29 ओक्टोबर

बुलढाणा येथील तीन युवक शॉपिंगसाठी मुंबईला गेले असता त्यांच्याजवळील पैशे संपले म्हणून त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबून एका विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूने वार करून त्याचा गळा चिरला व त्याच्या जवळील मोबाईल व नगदी 8 हजार रुपये घेऊन पसार झाले.अधिकारीच्या मोबाईल लोकेशन वरून तिन्ही आरोपीना बुलडाणा शहर पोलिसच्या डीबी पथकाने ताब्यात घेऊन नवी मुंबई पोलिसच्या स्वाधीन केले आहे.

    याबाबत पोलिसाने दिलेली माहिती अशी की बुलडाणा येथील अमित सुनील बेंडवाल 18 वर्ष,आबिद खान अयुब खान उर्फ ऑल 18 वर्ष व अदनान कुरेशी वहीद कुरेशी उर्फ बब्या 19 वर्ष हे तिघे शॉपिंग साठी मुंबईला गेले होते. या पैकी एका जवळचा पाकीट हरवला.पैशे नसल्याने त्यांनी 22 ओक्टोबर रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास सीबीडी सर्कल जॉगिंग ट्रैक जवळ,बेलापुर नवी मुंबई येथे रासत्याने पायी जात असलेले 39 वर्षीय विक्रीकर अधिकारी महेश मधुकर बिनवडे यांच्यावर अचानकपणे चाकुने वार करुण त्यांना जख्मी केले व त्यांचा जवळचा एंड्रॉइड मोबाइल व पाकिट मधील नगदी 8 हजार रुपये घेऊन फरार झाले.या हल्ल्यात महेश बिनवडे यांचा गळा चीरला व ते गंभीर जख्मी झाल्याने त्यांना उपचारार्थ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.या प्रकरणी अज्ञात आरोपीं विरुद्ध सीबीडी बेलापुर पोलीस ठाण्यात भादवीची धारा 394 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला.जख्मी बिनवडे यांच्या मोबाइलचा लोकेशन घेतला असता तो मुंबई येथे दिसला,त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर बुलडाणा येथील आरोपींनी गुन्हा केल्याचे समोर आले.याची माहिती बुलडाणा शहर ठानेदार प्रदीप सालुंखे यांना देण्यात आली.शहर डीबी स्कॉडचे शिवाजी मोरे,दत्ता नागरे व संदीप कायंदे यांनी बुलडाणा येथील आरोपी अमित बेंडवाल, आबिद खान व अदनान कुरेशी या तिघांना ताब्यात घेतले.आज 29 ओक्टोबर रोजी बेलापूर पोलीस बुलडाणा शहरात दाखल झाली असून तिन्ही आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या रॉबरीत मुम्बई येथील इतर 2 आरोपिंचा समावेश असल्याची माहिती शहर ठाणेदार प्रदीप सालुंखे यांनी असून आरोपी अमित बेंडवाल वर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे ही ते म्हणाले.आरोपींना घेण्यासाठी नवी मुंबई येथील पीएसआई एन. डी.शिंदे,पीएसआई एन. पी.सांगळे,संदीप फड,विनोद देशमुख व अज़हर शेख बुलडाणा आलेले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )- बेलापुर गावातील मुख्य पेठेतील रस्त्याची  तातडीने दुरुस्ती करुन डाबरीकरण करण्यात यावे या मागणी करीता सिध्दीविनायक युवा मंचच्या वतीने बेलापुर बु!! ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यकर्ते आजपासुन उपोषणास बसले आहे                     बेलापुर बाजारापेठेतील रस्ता अतिशय खराब झाला असुन ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे यारस्त्याची ताताडीने दुरुस्ती न झाल्यास सिध्दीविनायक युवा मंचच्या वतीने उपोषणास बसण्याचा इशारा मंचचे गोपाल जोशी राजेश सुर्यवंशी शशीकांत तेलोरे रोहीत बोरा विकी मुथ्था गोपी दाणी आदित्य जाधव यांनी दिला होता त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज साकाळपासुन हे कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणास बसले आहे.

बुलडाणा - 28 ओक्टोबर

संपूर्ण जग कोरोना महामारी मुळे हतबल झालेला आहे.कोरोना पासून वाचन्यासाठी फिजिकल डिस्टन्स,मास्क व वारंवार हाथ धुत राहणे हे उपाय सूचवलेले आहे.या नियमांचा पालन करून आपण कोरोनापासुन सुरक्षित राहु शकतात.बुलडाणा जिल्हा प्रशासन सुद्धा नागरिका मध्ये कोरोना संसर्गा बाबत जनजागृति करीत आहे.जिल्ह्यातील काही ठराविक कोविड सेंटर मध्येच कोरोना तपासणी केली जात होती त्यामुळे रुगणांना व त्यांचे नातेवाइकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता म्हणून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत सुरु 52 प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा कोरोना तपासणी सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र सांगळे यांनी दिली आहे.कोरोनाची लक्षणे दिसल्यास ग्रामीण भागातील जनतेने आपल्या गावा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची तपासणी करून  घ्यावे,अशे आवाहन सुद्धा डॉ. सांगळे यांनी केले आहे.


बुलडाणा - 27 ओक्टोबर

बँगलोरच्या रिडास इंडीया कंपनीने बुलडाणा येथील एका गुंतवणूकदाराकडून तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करून घेत मूळ परतावा व नफा न दिल्याच्या तक्रारीवरून आज 27 ऑक्टोंबर रोजी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात कंपनीमालक व इतर एका विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा शहरातील इकबाल नगर, टिपू सुलतान चौकात राहाणाऱ्या फिर्यादी मो. साजीद अब्दुल हसन देशमूख यांनी 7 मार्च 2017 ते 28 सप्टेंबर 2018 दरम्यान स्वतः व कुटुंबातील आई,वडील, भाऊ,पत्नी यांचे एनएफटी व आरटीजीएस मार्फत 11 लाख 50 हजार रुपयांची बँगलोर येथील रिदास इंडिया कंपनीत गुंतवणूक केली. त्यांना कंपनी मालक तथा डायरेक्टर मो. अय्यूब हुसेन व मो. अनिस आयमन दोघे रा. बँगलोर यांनी गुंतवणूकीच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात नफ्याचा परतावा व मूळ रक्कम परत देण्याचे आमिष दिले होते. मात्र कंपनीकडून कोणतीच रक्कम देण्यात न आल्याची व इतरही नागरीकांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्यादीने आज 27 ऑक्टोंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी चौकशी केली असता फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबातील सदस्यांना आमिष देऊन 11 लाख 50 हजार रुपयांनी त्यांना गंडविल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान कंपनी मालक तथा डायरेक्टर मो. अयुब हुसेन व मो. अनिस आयमन या दोघांविरुद्ध भांदवी कलम 420,406,409,34 सह महाराष्ट्र ठेवी वित्तीय संरक्षण अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंदकिशोर काळे करीत आहे.


बुलडाणा - 27 ओक्टोबर

धामणगांव बढे येथील स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेत स्व:ता जवळील नकली नोटा चलनात आणण्यासाठी भारतीय चलनातील खऱ्या नोटा मध्ये नकली नोटा मिसळवुन चलनात आणण्याचा प्रकार धा.बढे येथे समोर आला आहे. ही घटना 26 आक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजे दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे धामणगाव बढे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेतील 4 आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे. 

      बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका अंतर्गतच्या धामणगांव बढे परिसरातील कुरहा येथील ज्ञानेश्वर मगनसिंग पेले हा 26 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान पैसे भरण्या करीता स्टेट बँकेत आला. त्याने आपल्या सोबत नगदी 2 लाख  65 हजार रुपयाच्या नोटा आणल्या. नेहमी प्रमाणे बँकेतील कर्मचारीने नोटांचे विवरण लक्षात घेत नोटांची मोजणी करुन बँकेतील काउंटींग मशिनद्वारे तपासणी केली. यामधील 200 रु.च्या एकुण 365 नोटामध्ये तब्बल 181 नोटा नकली निघाल्या. ज्याची दर्शनी किंमत 36,200 रु. असलेल्या या चलनात आणण्या करिता खऱ्या चलनीय नोटा मध्ये समाविष्ट केलेल्या आढळुन आल्या.हा संपूर्ण प्रकार धा.बढे येथील स्टेट बँक शाखा व्यवस्थापक राजेश संजीव सोनवणे यांचे सतर्कतेने उघड झाला. या घटनेची फिर्याद शाखा व्यवस्थापक सोनवणे यांनी धा.बढे पो.स्टे.दिली असता आरोपी ज्ञानेश्वर मगनसिंग पेले, विठ्ठल सबरु मगरेसे, राहुल गोटीराम साबळे, गोटीराम साबळे यांच्या विरुध्द कलम 489(इ), 489 (उ) भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपी चारही अटक करुण त्यांना आज 27 ओक्टोबर रोजी न्यायालया समोर हजर केले असता 2 नोहेंबर पर्यंत त्यांना पोलीस रिमांड मध्ये पाठवण्यात आले आहे. प्रकरणी जि.पो.अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पो. अधीक्षक बजरंग बंसोडे, उपविभागीय पो.अधीकारी रमेश बरकते तसेच बुलडाणा एल.सी.बी.चे पो.निरीक्षक महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शना खाली धा.बढेचे प्रभारी ठाणेदार योगेश जाधव करीत आहे.या प्रकरणी आरोपी संख्या वाढण्याची शक्यता असून बुलडाणा एलसीबीचा एक पथक शोधकार्या साठी रवाना झाल्याची माहिती एलसीबी प्रमुख महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget