Latest Post

बुलडाणा - 21 ऑक्टोबर

बुलडाणा तालुक्यातील सैलानी जवळ एका शेतातुन जात असताना 15 ते 20 मोकाट कुत्र्यानी एका 9 वर्षीय मुलावर हल्ला चढविला व त्याचे लचके तोडत असताना त्यांने आरडाओरड केली ते ऐकून आई धावत आली असता आईवर सुद्धा कुत्र्यांनी हल्ला केला. यात 9 वर्षे मुलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झालेली आहे.ही घटना 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उंबरखेड़ शिवारात घडली आहे.

   


 लातूर जिल्ह्यातील धर्मापुर येथील शेख तस्लीम मागील काही काळापासून सैलानी येथे आपल्या परिवारसह राहत आहे.सद्या ते रमेश शेवाळे यांच्या शेतात राहतात.आज 21 ओक्टोबरला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास 9 वर्षीय मुलगा शेख अरमान काही किराणा सामान आणण्यासाठी सैलानी कडे जात असताना अचानकपणे 15 ते 20 मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करत त्याचे लचके तोडले, आरडाओरड ऐकून त्याची आई नसीम बी बचावासाठी धावत गेली असता त्याच्यावर ही कुत्र्यांनी हल्ला केला यात तीही गंभीर जखमी झाली. त्याच्या मदतीला काही लोक धावत आले तेव्हा कुत्रे पळून गेले. गावातील लोकांनी त्यांना उचलून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरने शेख अरमान याला मृत घोषित केले तर आई नसीम बी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) पूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या कर्तृत्वाने भारताची शान जगात उंचावण्याचे कार्य केले. भारताला बलशाली बनवताना त्यांनी पुस्तकांशी मैत्री केली. त्यांचे अग्निपंख हे पुस्तक मी दोनदा वाचले. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी कष्ट करून नावलौकिक प्राप्त केला. त्यांचे कार्य भारतातील सर्वांसाठी व येणाऱ्या पिढीसाठी दीपस्तंभासारखे आहे. वाचन प्रेरणा दिनापासून प्रेरणा घेऊन उर्दू शाळेने आयोजित केलेला आजचा सोहळा प्रशंसनीय आहे. सर सय्यद अहमदखान यांनी सामाजिक सुधारणेसाठी मोठे कार्य केले आहे. या थोर विभूतींचे स्मरण सतत होणे आवश्यक आहे असे अनमोल विचार शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी व्यक्त केले .

परमवीर शहीद अब्दुलहमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा नंबर पाच मध्ये थोर समाजसुधारक सर सय्यद अहमद खान व भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जयंती सोहळा तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका वितरण व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा तसेच मान्यवरांचा सत्कार सोहळा संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री पटारे बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाकभाई पठाण हे होते.व्यासपीठावर समाजसेवक कलीम कुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेसचे प्रदेश सचिव सोहेल बारूदवाला, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड.समीन बागवान, शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर एहतेशाम शेख, इम्तियाज खान, बिलालशहा, हारुन शाह आदी उपस्थित होते .

आपल्या प्रमुख भाषणात पटारे यांनी शाळेच्या प्रगतीचे मुक्तकंठाने कौतुक करून प्रत्यक्षपणे जयंती सोहळा साजरा करून शाळेने समाजासमोर एक उदाहरण घालून दिल्याचे सांगितले . यावेळी बोलताना उम्मती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी शाळेसाठी सर्वतोपरी मदत शासनाकडून मिळवून देण्याचे आश्वासन दिले.ॲड.समीन बागवान व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक भाई पठाण  यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले . 

याप्रसंगी वाचन प्रेरणा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी कथा व उतारा वाचन केले . शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना इक्रा हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले . तसेच इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या ताहेरा अतहरहसन रिजवी, फरहान बिलाल शाह व अल्फिया हारून शाह यांचा भेटवस्तू देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चाने सर्व विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .शाळेला नेहमी सहकार्य करणारे सोहेल बारूदवाला यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सचिवपदी नियुक्तीबद्दल  व  ॲड. समीन बागवान यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .शाळेच्या शिक्षिका शाहीन शेख यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तसेच मोहम्मद आसिफ यांनी सर सैय्यद अहमदखान यांच्या जीवनकार्याचा परिचय आपल्या व्याख्यानातून करून दिला.

शाळेचे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये लॉक डाऊनच्या काळात शाळेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली .पालक व विद्यार्थी शाळेमध्ये येण्यास खूप आतुर आहेत .परंतु शासनाच्या आदेशाशिवाय नियमित शाळा सुरू करता येत नाही असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन मोहम्मद आसिफ यांनी केले तर आभार फारुक शाह यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, जमील काकर, शाहीन शेख, अस्मा पटेल, निलोफर शेख,बशीरा पठाण,मिनाज शेख, एजाज चौधरी, सदफ शेख, रिजवाना कुरेशी आदींनी विशेष परिश्रम घेतले .


बुलडाणा - 21 ओक्टोबर

बुलडाणा तालुक्यातील भडगाव येथे कार्यरत तलाठी संजय जगताप यांनी महसला तलाठी कार्यालयात कार्यरत कोतवाल योगेश सपकाळ यालाच नव्हे तर सर्व कोतवालांना आई,बहिनी व बायका वरुण अश्लिल भाषेत मोबाइलवर शिवीगाळ केली तसेच विदर्भवाद्या हो आत्महत्या करने तुमच्या नशीबी आहे,,आत्महत्या करा,पंचनामा करुण तुम्हाला 1 लाख देऊ, अशी मागरूरीचा भाषा करणाऱ्या तलाठी  संजय जगतापला आखेर निलंबित करण्यात आले आहे.

    17 ओक्टोबर रोजी तलाठी संजय जगताप याने फोनवार दारुच्या नशेत सर्वच कोटवालांना अश्लील शिवीगाळ केली होती.या घटनेला निंदनीय सांगत हा प्रकार थांबला पाहिजे म्हणून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा शाखा बुलडाणाच्या वतीने जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी एकत्र येऊन 19 ऑक्टोबरला बुलडाणा तहसील कार्यालयात प्रदर्शन करुण आपली मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते.निवेदनात तलाठी संजय जगताप यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती.या गोष्टीला तहसीलदार रूपेश खंडारे यांनी गंभीरतेने घेऊन तात्काळ तलाठी संजय जगतापला निलंबित करण्यासाठी प्रस्ताव तैयार करुण उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांना पाठविल असता उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी तलाठी संजय जगतापला शासकीय कर्तव्यात कसूर व गैरवर्तन केल्याने एका आदेशाने निलंबित केले आहे.


बुलडाणा - 18 ऑक्टोबर

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जलसंधारणाच्या “बुलढाणा पॅटर्न'ला राष्ट्रीय मान्यता देण्यात आली आहे आणि निती आयोग यावर आधारित राष्ट्रीय धोरणाची आखणी करत असल्याच्या माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.बुलडाणाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची संकल्पना देशभर पोहोचली आहे.

      महाराष्ट्र शासनाने जलसंवर्धनासाठी सदर पॅटर्नचा अवलंब करावा असे आवाहन नितिन गडकरी यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गडकरी यांनी म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच जलमार्ग नाले आणि नदी यांच्या खोलीकरणाच्या कामांमध्ये निघालेल्या मातीचा वापर करून राष्ट्रीय महामार्गचे बाधकाम आणि जलसंवर्धन यांच्या कामाचा समन्वय साधला गेला

आहे. परिणामी बुलढाणा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाणी साठवणुकीची क्षमता वाढली

आणि हे बुलढाणा पॅटर्न म्हणून देशभरात ओळखले जाऊ लागले. जलस्त्रोतांच्या खोलीकरणांच्या कामामध्ये मुरुम, माती व आवश्यक दगड हे वापरल्या गेली परिणामी राज्य सरकारला कुठलाही खर्च न होता सुमारे 22,500 टी.एम.सी. एवढी पाणीसाठवण क्षमतेत वाढ झाली, असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नमुद केले आहे.

     बुलडाणाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या कल्पक विचाराने बुलडाणा ते अजिंठा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात पहिल्यांदा पैनगंगा नदी व इतर लहान तलावांचे खोलिकरण करुण निघालेले मुरुम मागच्या कामात उपयोगी आणला गेला होता.शासन हिताची ही संकल्पना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना आवडली व त्यांनी महाराष्ट्र सह देशातील इतर राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात याला आमलात आनायचे सूचना दिल्या आहे.


बुलडाणा - 16 ऑक्टोबरबु

लडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सफाई कामगार या पदा कार्यरत कैलास बेंडवाल यांच्या कार्याची दखल घेत मा. राज्यपाल यांच्या हस्ते मुंबई येथे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

         देशासह संपूर्ण जगासमोर कोरोना महामारी मुळे मोठे संकट उभे आहे.अशा वेळी अनेक लोक कोरोना योद्धा म्हणून समाजात काम करीत आहेत. यामध्ये रुग्णालयात काम करून आपली सेवा देणाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे.या कोवीड-19 साथरोगाच्या पार्श्वभुमीवर असामान्य काम करणाऱ्या डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आरोग्य कर्मचारी,सफाई कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचा सत्कार मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता राजभवन,मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.मागील 33 वर्षापासून सफाई कर्मचारी पदावर काम करीत आपली अविरत सेवा देत या कोरोना काळात ही कैलाश बेंडवाल यांनी उत्कृष्ट काम करून इतर कर्मचाऱ्या कडून ही नियोजन बद्धरित्या काम करून घेत आहे.अत्यंत मनमिळावू व आपल्या कामाशी प्रामाणिक असलेल्या कैलाश बेंडवाल यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मा. राज्यपालांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे या वेळी मंचकावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे प्रामुख्याने उपस्तिथ होते.


श्रीरामपुर  (खास प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यातील एक व्यक्ती हिमाचल प्रदेश येथे मानसिक संतुलन हरवलेल्या स्थितीत चार महीन्यापासुन भटकत असुन तेथील सामाजिक सांघटनेच्या कार्याकर्त्याने बिनधास्त न्यूजला ही बातमी पाठविली असुन तालुक्यात या व्यक्तीचे कुणी नातेवाईक असेल तर त्यांनी तातडीने संपादक बिनधास्त न्यूजशी किव्वा पवन बोहरा ९८१६४६२५५९ हिमाचल प्रदेश, संपर्क साधावा असे अवाहन करण्यात येत आहे . सदरची व्यक्ती ही हिमाचल प्रदेश मधील सिरमौर जिल्ह्यातील पावाटा तालुक्यात मानसिक संतुलन हरवल्यामुळे भटकंती करत आहे ती व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील श्रीरामपुर तालुक्यातील असल्याचे सांगत असुन तेथील पवन बोहरा या सामाजिक कार्यकर्त्याने बिनधास्त न्यूजशी संपर्क साधला असुन आपल्या बिनधास्त न्यूजमधुन या बातमीला प्रसिद्धी दिल्यास एका व्यक्तीला आपले नातेवाईक व घर परिवास परत मीळू शकतो अशीही अपेक्षा पवन बोहरा यांनी व्यक्त केली आहे.



श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील गोंधवणी रोडवरील दशमेश चौकामध्ये दररोज भरणारा रस्त्यावरील भाजीपाला बाजार हा मोठ्या अपघातास निमंत्रण ठरण्याची शक्यता असल्याने सदर बाजार दुसरीकडे हलविण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे . गेल्या काही दिवसापासून दशमेश चौकामध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व दुकानदारांनी आपली दुकाने थाटण्यात सुरुवात केली आहे . सुरुवातीला एक दोन असणारी दुकाने आता मोठ्या संख्येने वाढली असून चौकाच्या चार ही बाजूला सदर दुकानदार भररस्त्यावर बसतात .या संपूर्ण परिसरामध्ये भाजीमंडई नसल्याने व कोरोनामुळे नगरपालिकेने देखील येथे भाजी विकण्यास परवानगी दिली आहे . मात्र आता ही परवानगी जनतेसाठी डोकेदुखी ठरली आहे . राज्य मार्ग असलेला हा रस्ता वैजापूर, कोपरगाव, पुणतांबा,

खैरी निमगाव, गोंधवणी इत्यादी भागात जातो . त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहतूक असते .या चौकातील चारही दिशांना  वाहनांची वर्दळ सतत सुरू असते . कॉलेज रोड, प्रांत व तहसील कार्यालय तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेत या चौकातून जावे लागते .पंजाबी कॉलनीतून येणारी वाहने तसेच काजी बाबा रोड वरून येणारी वाहने यांची देखील येथे सतत वर्दळ असते .भाजीपाला विकणारे दुकानदार रस्त्याच्या एकदम कडेला खूप पुढे येऊन बसतात . त्यामुळे चौकांमध्ये वळणाऱ्या गाड्यांसाठी सुद्धा मोठी अडचण निर्माण होत आहे . त्यातच भर म्हणून चौकामध्ये नगरपालिकेच्या बोरचे पाणी भरण्यासाठी सातत्याने पाण्याच्या गाड्या उभ्या असतात . त्यामुळे येथे पाण्यामुळे सतत रस्ता ओला असतो . या भागातील दुकानदार, बँकांचे एटीएममध्ये येणाऱ्या ग्राहकांना भाजी बाजारातील लोकांचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील ही दुकाने वेळीच दखल न घेतल्यास मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारी ठरू शकतात. तरी येथील भाजीबाजार हा मागच्या बाजूला खालच्या  काजी बाबा रोडवर हलविल्यास लोकांची सोय होईल आणि अपघाताचा धोका टळेल. तरी याबाबत नगरपालिकेने तातडीने दखल घेण्याची मागणी या परिसरातील दुकानदारांनी केली आहे .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget