बुलडाणा - 18 ऑक्टोबर
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जलसंधारणाच्या “बुलढाणा पॅटर्न'ला राष्ट्रीय मान्यता देण्यात आली आहे आणि निती आयोग यावर आधारित राष्ट्रीय धोरणाची आखणी करत असल्याच्या माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.बुलडाणाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची संकल्पना देशभर पोहोचली आहे.
महाराष्ट्र शासनाने जलसंवर्धनासाठी सदर पॅटर्नचा अवलंब करावा असे आवाहन नितिन गडकरी यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गडकरी यांनी म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच जलमार्ग नाले आणि नदी यांच्या खोलीकरणाच्या कामांमध्ये निघालेल्या मातीचा वापर करून राष्ट्रीय महामार्गचे बाधकाम आणि जलसंवर्धन यांच्या कामाचा समन्वय साधला गेला
आहे. परिणामी बुलढाणा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाणी साठवणुकीची क्षमता वाढली
आणि हे बुलढाणा पॅटर्न म्हणून देशभरात ओळखले जाऊ लागले. जलस्त्रोतांच्या खोलीकरणांच्या कामामध्ये मुरुम, माती व आवश्यक दगड हे वापरल्या गेली परिणामी राज्य सरकारला कुठलाही खर्च न होता सुमारे 22,500 टी.एम.सी. एवढी पाणीसाठवण क्षमतेत वाढ झाली, असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नमुद केले आहे.
बुलडाणाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या कल्पक विचाराने बुलडाणा ते अजिंठा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात पहिल्यांदा पैनगंगा नदी व इतर लहान तलावांचे खोलिकरण करुण निघालेले मुरुम मागच्या कामात उपयोगी आणला गेला होता.शासन हिताची ही संकल्पना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना आवडली व त्यांनी महाराष्ट्र सह देशातील इतर राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात याला आमलात आनायचे सूचना दिल्या आहे.
Post a Comment