Latest Post

बुलडाणा - 26 ऑगस्ट
कोरोना बाधितांच्या संख्या दिवसागणिक वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकुण 2744 कोरोना बाधित रुग्ण संख्या झाली असून सध्या 761 रुग्णांवर उपचार सुरु आहे. अशा स्थितीत बुलडाणा शहरात हायटेक कोविड रुग्णालयांसह मकबधीर विद्यालय,आयुर्वेद महाविद्यालय या 2 कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधितांसह संशयितांवर उपचार केले जात आहे. सर्वच डॉक्टर अहोरात्र सेवा करत, घरापासून लांब राहून आपले कर्तव्य बजावत असून हे डॉक्टर्स कोरोनाच्या कुरुक्षेत्रात समाजासाठी देवदूतच बनले  आहे.या 2 कोविड सेंटर मध्ये 10 डॉक्टरांचा चमू आळीपाळीने ड्युटी करत आहेत. एका डॉक्टरला आठ तास ड्युटी करावी लागत आहे. डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन २४ ऑगस्टला बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी व्हिसी द्वारे दिलेल्या निर्देशानुसार बुलडाणा इंन्सीडंट कंमाडर तथा तहसिलदार संतोष शिंदे यांनी नव्या ८२ खाजगी आयुष डॉक्टरांची ड्यूटी यादी प्रसिद्ध केली असून रुग्णसेवा आणखी सुकर होणार आहे.या बाबत तहसिलदार संतोष शिंदे म्हणाले की बुलडाणा तालुक्यातील ८२ खाजगी आयुष डॉक्टरांना अधिग्रहीत करण्यात आले असुन मुकबधिर विद्यालय व आयुर्वेदिक महाविद्यालय या २ कोवीड सेंटर येथे वेगवेगळ्या वेळेत आपली सेवा देणार असून त्यांचे ड्यूटीचे वेळ पत्रक ही ठरवून दिलेले आहे.

बुलडाणा - 25 ऑगस्ट 
बुलडाणा विधानसभा मतदार संघात शिवसेनाकडून 3 वेळ आमदार राहिलेले विजयराज शिंदे आखेर आज मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात दाखल झाले आहे.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा दुप्पटा त्यांच्या गळ्यात टाकून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
     विजयराज शिंदे शिवसेनेत असतांना खासदार प्रतापराव जाधव यांच्या कडून त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप शिंदे यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी विजयराज शिंदे यांचे उमेदवारीचे तिकीट कापुन खासदार प्रतापराव जाधव यांचे खंदे समर्थक संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती.विजयराज शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेऊन निवडणूक लढविली. मात्र त्यांना शिवसेनेचे गायकवाड यांनी पराजित केले. त्यांनी दुसऱ्या क्रंमाकाची मते घेतली होती. अशात आपला राजकीय पुनर्वसन व्हावे म्हणून विजयराज शिंदे काही पक्षांच्या नेत्यांशी भेटत होते. आज 25 ऑगस्ट रोजी विजयराज  शिंदे यांनी भाजपा च्या शीर्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई स्थित सागर या निवासस्थानी भाजपा मध्ये प्रवेश घेतला.यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व जळगाव जामोदचे आ.डॉ.संजयजी कुटे,भाजपा जिल्हाध्यक्ष व खामगांव आ.एड आकाश फुंडकर, चिखली आमदार श्वेताताई महाले, बुलढाणा भाजपाचे नेते योगेंद्र गोडे सह विजयराज शिंदे यांचे काही समर्थक ही उपस्थित होते.

बुलडाणा - 25 ऑगस्ट
महावितरणच्या वतीने ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळातील वीजबिले ही अत्यंत वाढीव आणि चुकीच्या रिडींगद्वारे देण्यात आली आहेत. नेहमीपेक्षा तीप्पट तर काहींना पाचपट रकमेची बिले आल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे. याबाबत सर्वसामान्यांच्या वाढत्या तक्रारी पाहता चुकीची वीजबिले माफ करावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी लाऊन धरली आहे. यासाठी त्यांनी आंदोलनेही केले मात्र त्याउपरही कोणतीच दखल न घेतल्याने त्यांनी आक्रमक होत २४ ऑगस्टच्या सायंकाळी बुलडाणा अधीक्षक अभियंता देव्हाते यांचे कक्ष गाठले, त्यांनी चुकीची उत्तरे दिल्याने तुपकरांनी कार्यालयातच ठिय्या मांडला व तब्बल चार तास ठिय्या मांडल्यानंतर रविकांत तुपकर अधिक आक्रमक झाल्याचे पाहून अधीक्षक अभियंता यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीत आलेली संपूर्ण चुकीची वीजबिले माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. तुपकरांच्या या आंदोलनामुळे हजारो सर्वसामान्य विद्युत ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चुकीच्या वीजबिले आणि महावितरणाचा सावळा गोंधळ याबाबत माहिती देण्यासाठी रविकांत तुपकर यांनी आज 25 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथील पत्रकार भवन मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.या वेळी तुपकरांनी मीटर रीडिंग, विज बिल वाटप करणाऱ्या विविध एजन्सी व महावितरणच्या अधिकाऱ्यां मध्ये साटेलोटे असल्याचा आरोप ही करत या  पुढे जर विज कनेक्शन कट करायला एमएसईबीचा कोणी अधिकारी आला तर त्याला कपडे काढून नागडा फटके देऊ,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी राज्य मंत्री रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

बुलडाणा - 24 ऑगस्ट
बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे आपला राजकीय पुनर्वसन करण्याच्या तैयारीत असून ते भाजपची वाट धरणार असल्याची जोरदार चर्चा बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली असून उद्या 25 ऑगस्ट रोजी ते भाजपात आपले काही कार्यकर्त्यां सोबत प्रवेश घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
      भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांशी विजयराज शिंदे यांचे बोलणेही झाल्याचे समजते. याबाबत विजयराज शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मला नेहमी भरभारुन साथ देणारे व माझी ताकत असलेले माझे कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे लवकरच बुलडाण्याच्या राजकारणात भूकंप घडणार आहे .1995 पासून तब्बल तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर  निवडून येवून बुलडाणा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांचे शिवसेना पक्षवाढीत खूप मोठे योगदान आहे.शिवसेनेचे शाखाप्रमुख ते आमदार,जिल्हा प्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा विजयरथ रोखला होता.शिवसेनेचे बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेने कडून उमेदवारी मिळाली नव्होती व त्यांचे कट्टर राजकीय विरोधक संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती.ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापल्याने विजयराज शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर बुलडाणा विधानसभा मतदार संघातुन निवडणूक लढवत दुसर्‍या क्रमांकाची मते घेतली मात्र त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी संजय गायकवाड आमदार झाले आहे.आता आपला राजकीय पुनर्वसन व्हावा म्हणून विजयराज शिंदे आता भाजपाच्या वाटेवर असून उद्या मुंबई येथे त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे.

मधुकर वक्ते कोपरगाव प्रातिनिधी
      कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे वृक्षारोपण पर्यावरणाचा समतोल बिघडण्याला वाढलेले प्रदूषण जरी कारणीभूतअसले तरी बेसुमार होत असलेली वृक्षतोड व नष्ट होत असलेली वनराई हेदेखील कारणीभूत आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून अनियमित व कमी प्रमाणात होत असलेले पर्जन्यमान,अति उष्णता,काही भागात कमी पर्जन्यमान तर काही भागात महापूर अशा अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. हि परिस्थिती अशीच राहिली तर भावी पिढीचे भविष्य हे निश्चितपणे अंधकारमय होऊ शकते. त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असून फक्त वृक्ष लागवड न करता लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणे हि आपली सामाजिक जबाबदारी असून प्रत्येकाने हि जबाबदारी कर्तव्य समजून पार पाडावी असे आवाहन  संजय वक्ते व त्यांचे मित्र पोपट सोळके  यांनी दिली आहे.या दोन मित्रांनी वृक्षारोपण करून एक निसर्गा विषय कृतज्ञता व्यक्त केली . यावेळी वृक्षारोपण करतांना दिनकर सोळके, तेजेस वक्ते, राजू वक्ते, अनिल वक्ते, मधुकर वक्ते ,दिपक गरूड,आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर नगरपालिकेतील अविभाज्य भाग असणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून त्यामुळे भागातील नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत,प्रभागात संजय नगर सोसायटी, रामनगर,संजयनगर परिसर,ईदगाह परिसर,अचानक नगर,गोपीनाथनगर परिसर,मिल्लतनगर च परिसर,उस्मानिया मस्जिद परिसर असा विस्तृत भाग आहे,यात सगळीकडे रस्ते खराब झालेले असल्याने नागरिक हैराण झालेले आहेत पावसाळ्यात या रस्त्यावर पायी चालणे मुश्किल होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये अबाल वृद्ध,गर्भवती असणाऱ्या माता भगिनींना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते,अशा परिस्थितीत भागातील नागरिकांच्या वतीने आज निवेदन देण्यात येऊन त्यामध्ये सर्व रस्ते हे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण अथवा गरजेप्रमाणे पेविंग ब्लॉक चेच करण्यात यावे अशी विनंती करण्यात येऊन रस्त्यांची सद्यस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली रस्ते होत असताना माती मिश्रित मुरुमाची न होता दीर्घ काळ टिकणारी अशी पक्क्या स्वरूपात करण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली,
सदर निवेदनाची तात्काळ दखल न घेण्यात आल्यास नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी आंदोलने करण्याची वेळ आजच्या कोरोना सारख्या महामारी मध्ये येऊ नये अशी नम्र विनंती या वेळी करण्यात आली.
यावेळी सदर निवेदनाची एक प्रत नगराध्यक्षा अनुराधताई आदिक यांना देण्यात आली,यावेळी प्रभागातील असंख्य नागरिकांनी निवेदनावर सह्या करून सदर निवेदन हे कोरोना चे प्रशासनिक नियमांचे पालन करून प्रातिनिधिक स्वरूपात शरीफ भाई शेख,राहुल कुलकर्णी, रवि बोर्डे,मनीष पंचमुख, इम्रान भाई दारुवाला,इम्रान पटेल,बबलू म्हस्के,अभिजित चक्रे,आयुब पठाण,अविनाश पंडित आदी मोजक्या नागरिकांच्या उपस्थितत देण्यात  आले.

बुलडाणा - 23 ऑगस्ट
बुलडाणा एलसीबीच्या एका पथका द्वारे केलेली कार्रवाईची बातमी फेसबुकच्या पेजवर पोस्ट झाली असता खामगांव येथील एका विघ्नसंतोषीने पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी कमेंट त्या फेसबुक पेजच्या पोस्ट खाली केल्याने त्याच्या विरोधात खामगांव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा म्हणजेच एलसीबीची भूमिका महत्वाची असते. एलसीबीचे अधिकारी,कर्मचारी जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडते.अनेक वेळा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले सुद्धा होतात परंतु काही विघ्नसंतोषींना एलसीबीची चांगली कामगिरी डोळ्यात सलते. बुलडाणा एलसीबीच्या एका पथकाने बुलडाणा येथील एका अट्टल मोबाइल चोराला अटक करून त्याच्याकडून काही मोबाइल जप्त केले होते.याची बातमी "पब्लिक ऍप" च्या फेसबुक पेजवर 25 जुलै रोजी प्रसारित झाली होती.या बातमी संदर्भात कमेंट बॉक्स मध्ये खामगांव येथील आरोपी विठ्ठोबा पंढरी वाघमारे याने एलसीबी पथकाची अर्थात पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी व आक्षेपहार्य कमेंट पोस्ट केली आहे. याची बुलडाणा एलसीबीला माहिती झाली.या प्रकरणी फेसबुक वापरकर्ता इसम विठ्ठोबा पंढरी वाघमारे याने अत्यंत बेजबाबदारपणाने सदरची पोस्ट प्रसारित केल्याने पोलिस दला विषयी समाजा मध्ये अप्रीतिची भावना निर्माण झाली आहे,त्यामुळे बुलडाणा एलसीबीच्या वतीने या प्रकरणी कॉन्स्टेबल नदीम शेख यांच्या तक्रारीवर फेसबुक पेजवर पोलिसा विरोधात आपत्तीजनक टिप्पणी करणाऱ्या आरोपी विठ्ठोबा पंढरी वाघमारे विरुद्ध पोलिस (अप्रीतिची भावना चेतावणे) अधिनियम 1922 ची कलम 3 अन्वये खामगांव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget