श्रीरामपूर नगर पालिकेच्या प्रभाग क्रं-12 मधील नागरिकांना रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे भोगाव्या लागणाऱ्या मरण यातना तून सुटका मिळावी*- एड समिन बागवान.

श्रीरामपूर नगरपालिकेतील अविभाज्य भाग असणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून त्यामुळे भागातील नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत,प्रभागात संजय नगर सोसायटी, रामनगर,संजयनगर परिसर,ईदगाह परिसर,अचानक नगर,गोपीनाथनगर परिसर,मिल्लतनगर च परिसर,उस्मानिया मस्जिद परिसर असा विस्तृत भाग आहे,यात सगळीकडे रस्ते खराब झालेले असल्याने नागरिक हैराण झालेले आहेत पावसाळ्यात या रस्त्यावर पायी चालणे मुश्किल होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये अबाल वृद्ध,गर्भवती असणाऱ्या माता भगिनींना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते,अशा परिस्थितीत भागातील नागरिकांच्या वतीने आज निवेदन देण्यात येऊन त्यामध्ये सर्व रस्ते हे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण अथवा गरजेप्रमाणे पेविंग ब्लॉक चेच करण्यात यावे अशी विनंती करण्यात येऊन रस्त्यांची सद्यस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली रस्ते होत असताना माती मिश्रित मुरुमाची न होता दीर्घ काळ टिकणारी अशी पक्क्या स्वरूपात करण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली,
सदर निवेदनाची तात्काळ दखल न घेण्यात आल्यास नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी आंदोलने करण्याची वेळ आजच्या कोरोना सारख्या महामारी मध्ये येऊ नये अशी नम्र विनंती या वेळी करण्यात आली.
यावेळी सदर निवेदनाची एक प्रत नगराध्यक्षा अनुराधताई आदिक यांना देण्यात आली,यावेळी प्रभागातील असंख्य नागरिकांनी निवेदनावर सह्या करून सदर निवेदन हे कोरोना चे प्रशासनिक नियमांचे पालन करून प्रातिनिधिक स्वरूपात शरीफ भाई शेख,राहुल कुलकर्णी, रवि बोर्डे,मनीष पंचमुख, इम्रान भाई दारुवाला,इम्रान पटेल,बबलू म्हस्के,अभिजित चक्रे,आयुब पठाण,अविनाश पंडित आदी मोजक्या नागरिकांच्या उपस्थितत देण्यात  आले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget