Latest Post

शिर्डी (राजेंद्र गडकरी )-राहता तालुका अद्यापपर्यंत कोरोना मुक्त आहे व या पुढेही कोरोना मुक्त राहावा यासाठी राहाता तालुक्यातील सर्व कोरोना वारियर्स मोठे प्रयत्न करत आहेत, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे, या तिसऱ्या टप्प्यात मात्र अनेक ठिकाणाहुन,काही शहरातील व्यक्ती ग्रामीण भागात, गावागावात येत आहेत, मात्र त्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे व तशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांना, कोरोना ग्राम सुरक्षा समितीला देणे आवश्यक  आहे, असे आवाहन करण्यात येत आहे,राहाता तालुका यापुढेही कोरोना मुक्त रहावा, यासाठी सर्वजण आपापल्या परीने मोठा प्रयत्न करीत आहे ,त्यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका यांचाही मोठा हातभार आहे, राहाता तालुक्यात श्री साईबाबा संस्थान हॉस्पिटल, प्रवरा हॉस्पिटल ,राहाता व पुणतांबा ग्रामीण रुग्णालये व सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तसेच उपकेंद्रे आहेत, या सर्व रुग्णालयील वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहेत ,राहता तालुक्यातील ग्रामीण भागातही ही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मोठी दक्षता घेण्यात येत आहे,
तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना ग्राम सुरक्षा समितीच्या स्थापना करण्यात आल्या आहेत, बाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वॉरनटाईन किंवा संस्था विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे, त्यासाठी  प्रत्येक गावात  शाळा रूम किंवा अंगणवाडी रूम  ताब्यात घेऊन व्यवस्था करण्यात आली आहे, शिर्डी येथे साईबाबा संस्थान चे साई आश्रम फेज टू मध्ये विलगीकरण कक्ष करण्यात आला आहे  ,लॉकडाउनमध्ये अडकलेल्या व काल उत्तरप्रदेश मधून आलेल्या काही परप्रांतीयांना दक्षता म्हणून त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना  येथे विलगीकरण कक्षात  ठेवण्यात आले आहे , तसेच सावळीविहीर येथेही  दोन जणांना आरोग्य तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे,तसेच तालुक्यातुन आत्तापर्यंत  परप्रांतीय अनेक जण राहता तालुक्यातून  आपापल्या घरी ,परराज्यात  परतत आहेत, जात आहेत व जाणार आहेत, या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य प्रमाणपत्र देण्याचे काम वैद्यकीय अधिकारी व त्यांचे पथक करत आहेत, राहता तालुक्यातील शिर्डी येथील साईनगर रेल्वे स्टेशन वरून उत्तर प्रदेश व।इतर  राज्यासाठी यापूर्वी तीन रेल्वे गेल्या आहेत, व आज शनिवारी चौथी रेल्वे परप्रांतीयना जाण्यासाठी सोडण्यात येत आहे, या सर्वांची आरोग्य तपासणी वैद्यकिय पथक करत असतात, तसेच शिर्डी बस स्थानकातूनही राज्यातील श्रमिक, मजूर, कामगार ,वीटभट्टी वरील कामगार यांना आपापल्या राज्यात,आपल्या गावी जाण्यासाठी बसेस सोडण्यात आल्या आहेत, बसने जाणाऱ्या तसेच इतर वाहनातून जाणाऱ्या परप्रांतीय लोकांची आरोग्य तपासणी ही वैद्यकीय पथक करत आहे, शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र देण्यात येत आहे, सध्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अहोरात्र काम सुरू असून या सर्व कामकाजासंदर्भात माहिती देताना राहता तालुक्यातील सावळीविहीर  येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर गागरे यांनी सांगितले की , राहता तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, यामधील वैद्यकीय अधिकारी ,सर्व आरोग्य कर्मचारी आरोग्य सेविका ,आशा वर्कर सर्वजण अहोरात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहे, शिर्डी येथे साई पालखी निवारा येथे 142 निराधार व परप्रांतीय लोकांना सुरक्षे साठी ठेवण्यात आले होते त्यांची भोजन व्यवस्था साईबाबा संस्थांनी केली होती, निवासाची व्यवस्था केली होती, त्यांची आरोग्य तपासणी सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येत होती, त्यातील काही टीबी व इतर आजाराचे रुग्ण यांची तपासणी व उपचार करून त्यांना विविध ठिकाणी पुढील उपचारासाठी  दाखल करण्यात आले तर काही बरे होऊन आपापल्या घरी त्यांना सोडण्यात आले, सावळीविहीर येथून दररोज परप्रांतीयांना आरोग्य तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र दिले जात आहे, परप्रांतीयांची हेळसांड होऊ नये म्हणून अहोरात्र प्रयत्न केले जात आहे, सध्या बाहेर गावावरून आपल्या गावात कोणी नवीन व्यक्ती आल्यास त्वरित ंसबंधित अधिकार्‍यांशी संपर्क करावा तसेच त्या व्यक्तिने प्रथम आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे सांगत डॉक्टर गागरे पुढे म्हणाले की, परप्रांतीयांना जाण्यासाठी कोणतीही अडचण यायला नको म्हणून  लॉकडाउनचे नियम पाळत त्यांना आरोग्य तपासणी करून बस स्थानक म्हणा, रेल्वेस्टेशन म्हणा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे आरोग्य प्रमाणपत्र दिले जात आहे, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे व पं स,चे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे तसेच राहाता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य कर्मचारी अहोरात्र त्यासाठी परिश्रम घेत आहे, नागरिकांनीही ही प्रशासनाला सहकार्य करावे, आपली स्वतःची, कुटुंबाची गावाची, राज्याचे, देशाची सुरक्षितता पाळण्यासाठी लॉक डाऊनचे नियम पाळावेत, विनाकारण कुठेही फिरू नये गर्दी करू नये ,मास्क लावावे, जर कोरोना संदर्भात प्राथमिक लक्षणे वाटली तर त्वरित वैद्यकीय बअधिकारी किंवा  आरोग्यकर्मचाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहनही यावेळी डॉक्टर श्रीधर गागरे यांनी  केले आहे.

राहाता (तालुका प्रतिनिधी)राहाता शहरात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार झाला असून जमावाने एका आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तर दोघे पसार झाले. राहाता पोलिसांनी तिघा जणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.तीन दिवसांपूर्वी राहाता येथील गोदावरी कालव्यावरील पत्री पुलाजवळ वैभव ताठे या तरुणास, या तीन आरोपींनी मारहाण करून त्याच्याकडील सहा हजार रुपये बळजबरीने चोरून नेले. सदर आरोपी काल शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास याच परिसरात पल्सर मोटार सायकलवर फिरताना, वैभव ताठे यास दिसून आले.ताठे याने याबाबतची माहिती आपल्या भावाला आणि सहकार्‍यांना दिली. त्यांनतर संबंधित सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने मदतीला धावून येऊन त्यांनी आरोपीला घेरले. पल्सर मोटारसायकलवर असलेल्या तीन आरोपींनी मोटारसायकल तेथेच टाकून बाजूच्या शेतामध्ये पळ काढला. त्यांचा पाठलाग करत जमाव त्यांच्यामागे धावला. यावेळी आरोपीतील एकाने त्याच्या जवळील गावठी कट्ट्यातून जमावाच्या दिशेने गोळीबार केला. तर एकाने हातातील कोयता उगारला आणि परत पळ काढला. पळत असताना यातील हातात कोयता असलेला आरोपी शेतातील बांधाला पाय अडकून पडल्याने नागरिकांच्या तावडीत सापडला तर दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या आरोपीला जमावाने बेदम मारहाण केली आणि राहाता पोलिसांना घटनेची माहिती दिली.राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाने पकडलेल्या आरोपीस ताब्यात घेत दोघा पसार आरोपींचा नागरिकांसह परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधाराचा फायदा घेत ते दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर घटनेची माहिती काळताच श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी दाखल होत पहाणी केली तर तपसाबाबत सूचना केल्या.यातील नारायण म्हस्के या आरोपीस राहाता पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात वैभव ताठे याच्या फिर्यादीवरून जबरी चोरी आणि आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस करत आहेत.सदर आरोपींच्या मागावर तीन दिवसांपासून श्रीरामपूरचे पोलीसही असल्याचे कळते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) शहराच्या साठवण तलावांमध्ये एक मृतदेह सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या गोंधवणी येथील साठवण तलावात शुक्रवारी एक मृतदेह अढळला. सोमनाथ नारायण आव्हाड (वय 40. रा, नवीन घरकुल, पाण्याच्या टाकीजवळ) असे मृताचे नाव आहे. हा तीन दिवसांपासून घरातुन बेपत्ता झाला होता. तलावातील पाण्यात शुक्रवारी दुपारी त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. नागरिकांनी या प्रकाराची माहिती पोलीस आणि पालिका प्रशासनाला दिली. त्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह पाण्याबाहेर काढला. पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविलात्यामुळे नगरपालिकेने याबाबत तातडीने दखल घेत तलाव काठोकाठ भरलेला असल्यामुळे त्यामध्ये पावडर टाकून निर्जंतुकीकरण केले असून ज्या तलावांमध्ये मृतदेह सापडला त्या तलावाचे पाणी सध्या वापरले जात नसल्याचे आज आढळून आले.
 साठवण तलावांमध्ये मृतदेह सापडल्यामुळे शहरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क केला असता दोन दिवसापूर्वी सदर इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून आज तो मृतदेह वर आला होता. त्यामुळे तो तातडीने पाण्याबाहेर काढण्यात आला.  पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही अशी माहिती नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या संदर्भात माहिती घेण्यासाठी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी इत्यादींना वारंवार संपर्क करूनही त्यांचे फोन लागत नव्हते. ज्यांचे वाजत होते, त्यांनी फोनच घेतला नाही. त्यामुळे आमच्या प्रतिनिधीने  साठवण तलावावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता नवीन साठवण तलावांमध्ये कॅनलमधून पाणी येण्याचे सुरू असून तलाव जवळजवळ भरत आला आहे . तेथील कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता तलावांमध्ये ब्लिचिंग पावडर च्या गोण्या सोडून पाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगण्यात आले.
 तलावाची सुरक्षा वाऱ्यावर

 दरम्यान साठवण तलावाच्या संरक्षण भिंतीची एक बाजू तुटली असून पाण्याच्या टाकीजवळ भिंत तुटल्याने बाहेरचे लोक सर्रास तेथे शिरतात. टाकीवर बसून जुगार खेळतात.तेथील तलावाला वर लावलेली सुरक्षा जाळी सुद्धा तुटलेली आढळली. कोणताही वाचमेन तेथे नव्हता .शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाच्या सुरक्षेबद्दल खूपच हलगर्जीपणा होत असून याबाबत नगरपालिकेने तातडीने पावले उचलण्याची मागणी शहरातील जागरुक नागरिकांनी केली आहे .

शिर्डी (जितेश लोकचंदानी)-देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असून देशातील सर्व मंदिरे बंद आहेत ,शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद असून येथे तरीही ही ऑनलाईन देणगी मोठ्या स्वरूपात मिळत आहे, श्री साईबाबा संस्थान मध्ये सुमारे सहा हजार कर्मचारी असून त्यांना पगार वेळेवर मिळत आहे, मात्र एक वृत्तपत्र व एका वृत्त वाहिनी वर  साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या काळातील एप्रिल महिन्यात येथे देणगीचा ओघ कमी झाल्यामुळे स्वतःची एफडी मोडून साई संस्थानला कर्मचाऱ्यांचा पगार करावा लागला, असे वृत्त देण्यात आले आहे, व श्री साईबाबा संस्थान ने आपल्या गुंतवणुकीतून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार केल्याचे त्या  वृत्तपत्र व  वृत्तवाहिनीने म्हटले होते, मात्र हे वृत्त चुकीचे असून या वृत्ताची दखल घेऊन व चौकशी करून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय संस्थान प्रशासन घेईल, या एका वृत्तपत्रातील चुकीच्या वृत्तामुळे श्री साईबाबा संस्थान चे प्रशासन अधिकारी, कर्मचारी व साईभक्त त्यांच्यामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली होती ,पण या वृत्तपत्रातील या निराधार वृत्ताचे  खंडन श्री साईबाबा संस्थान चे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी केले आहे, तसेच अशा प्रकारचे कोणतेही वृत्त आम्ही कोणत्याही वृत्तपत्राला व वृत्त वाहिनीला  दिलेले नसून हे वृत्त चुकीचे असल्याचे श्री साईबाबा संस्थान चे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले,देशात लॉक डाऊन मुळे सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद आहेत, देशात शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर 17 मार्च दुपारी तीन वाजेपासून साईभक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे, त्यामुळे येथे साईभक्त येणे बंद झाले आहे, तरी येथे न येता करोडो साईभक्त दररोज ऑनलाईन दर्शन घेत असतात तसेच ऑनलाईन देणगी श्रीसाईबाबा संस्थानला पाठवत असतात, श्री साईबाबांवर करोडो साईभक्तांची श्रद्धा असल्यामुळेच साई संस्थानला देणगीचा ओघ सुरूच आहे, लॉकडाउनच्या काळातही श्री साईबाबा संस्थानला देणगी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन सुरू आहे तसेच श्रीसाईबाबा संस्थांकडे गंगाजळी मोठ्या स्वरूपात आहे, मात्र श्री साईबाबा संस्थानने लॉकडाउनच्या काळात देणगीचा ओघ कमी पडल्यामुळे आपल्या सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार स्वतःची एफडी मोडून केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे, हे वृत्त प्रसिद्ध व वृत्त वाहिनी वर प्रसारित  होताच श्री संस्थानच्या कर्मचारी, अधिकारी, तसेच साईभक्त व शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली होती, या संदर्भात श्री साईबाबा संस्थांनचे जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता या वृत्तपत्र व वाहिनित  निराधार वृत्ताचे त्यांनी खंडन करत असे कोणतेही प्रकार साई संस्थांनी केला नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच या संदर्भात साई संस्थांनचे उपकार्यकारी अधिकारी श्री रवींद्र ठाकरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने असे कोणतेही ही वृत्त कोणत्याही वृत्तपत्रांना दिलेले नाही,या वृत्ताचे त्यांनी खंडन करत असे वृत्त चुकीचे आहे, असे सांगितले, या वृत्ताचे खंडन केल्यामुळे शिर्डी व परिसरात व साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांमध्ये या वृत्तामुळे निर्माण झालेली भीती दूर झाली आहे, देशात तिरुपती नंतर शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान सर्वात श्रीमंत असे देवस्थान आहे येथे सुमारे 2500 कोटी रुपयांची संस्थांची ठेव असल्याचे बोलले जाते, तसेच श्रीसाईबाबा संस्थांकडे साई भक्तांनी दिलेल्या देणगीतून विविध मुकुट, हार ,भांडी अशा विविध वस्तू सोन्या-चांदीच्या आहेत, साई संस्थांनकडे मोठ्या प्रमाणात निधी आहे, श्री साईबाबा संस्थान चे कर्मचारी-अधिकारी यांना यापुढे कधीही ही पगार देणेकामी संस्थानला कधी अडचण येणार नाही ,असे अनेक साई संस्थांनचे कर्मचारी ,अधिकारी तसेच शिर्डी कर व साईभक्त खाजगीत बोलत आहेत.

शिर्डी(  जय शर्मा )-कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून अनेक दिवस आपल्या घरात ,शेतात राहणारे मेंढपाळ आपल्या मेंढ्या, शेळ्या  घेऊन आता नाविलाजाने गावोगाव भटकंती करत चाऱ्याच्या शोधार्थ फिरत असल्याचे दिसत आहे,तशी सुरुवात झाल्याचे दिसू लागले आहे,
गेल्या  52 दिवसापासून कोरोणाचा  प्रादुर्भाव  रोखण्यासाठी देशात लॉकडॉऊन सुरू आहे, सर्व बंद आहे, त्यामुळे सर्व जण घरात आहे, शेळ्या, मेंढ्या,घरी,शेतात होत्या,पाळीव जनावरेही आपल्या दारात प्रत्येकाने बांधून ठेवले आहेत, मात्र आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे ,त्यामुळे आता तापमानही वाढले आहे, अनेक ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई हळूहळु भासायला सुरुवात झाली आहे, शेळ्या ,मेंढ्या, जनावरांना चारा, पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल होत आहे, ५१,५२, दिवस आपापल्या गावात ,घरात शेतात राहणारे मेंढपाळ  आता नाविलाजाने दरवर्षाप्रमाणे मेंढ्यांच्या कळप घेऊन आपल्या गावा बाहेर पडले आहेत, दुसरे गावात जाऊन ,चाऱ्याच्या शोधार्थ भटकंती करत आहेत, मेंढ्यांना शेळ्यांना चारा ,पाणी यांची आवश्यकता असल्याने नाविलाजाने आम्ही आमच्या घरून बाहेर पडलो आहे ,मात्र आम्ही गावाएेवजी ,शेतामध्ये रानामध्ये,वनामध्ये  एकांत मुक्काम करतो ,लॉक डाऊंनच्या नेमात राहतो ,मास्क वापरतो, गावात किंवा रस्त्याने जाण्याऐवजी आड बाजूने मेंढ्यांचे कळप घेऊन, चाऱ्याच्या शोधार्थ आम्ही जात असतो, लॉक डाऊन मुळे अनेक गावात  बाहेरील व्यक्तीला परवानगी नाही त्यामुळे आम्हीही  आडबाजूच्या रस्त्याने, माळरानात ,शेतात वस्ती करून तेथेच राहतो, लहान मुले व वयस्कर, वृद्ध माणसे यावर्षी आम्ही घरीच ठेवली आहेत, आम्हालाही कोरोनाची भीती आहे, आमच्या मेंढ्या ,शेळ्या यांनाही ही  कोरोणाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण घरी आमच्या शेतात मेंढ्या ,शेळ्यांना मुबलक चारा व पिण्यास पाणी नसल्यामुळे नाविलाजाने आम्हाला घराबाहेर, गावा बाहेर पडावे लागत आहे, घरी राहून या मेंढ्यांना चारा पाणी कुठून देणार। तसेच बाजारात विक्री करण्यासाठी ही बाजार बंदआहे, मग आम्ही काय करणार। असे सांगत आम्ही जवळजवळ चाळीस पंचेचाळीस दिवस गावात, घरातच कसेबसे काढले, मात्र आता शेळ्या-मेंढ्यांच्या पोटापाण्याचा विचार करून आम्ही एक एक किंवा दोघे घरातील माणसे बाहेर पडलो आहे, मेंढ्यांच्या चारा, पाण्यासाठी ते करणे भाग पडत आहे, लॉक डाऊन च्या या तिसऱ्या टप्प्यात रानोमाळ फिरणार्‍या भटकंती करणार्‍या, पोटापाण्यासाठी चारा पाण्यासाठी फिरणाऱ्या  मेंढपाळ साठी शासनाने लॉक डाऊनच्या नियमात थोडीशी आमच्यासाठी तरी शिथीलता करावी ,कारण आम्ही घरी किंवा आमच्या शेतात चारा पाण्याअभावी राहू शकत नाही ,त्यामुळे आम्हाला गावोगाव भटकंती करणे गरजेचे आहे, परंतु असे करताना आम्ही  गावाच्या बाहेर रानात, वनात मुक्काम करत असतो, कोणालाही  गर्दी किंवा त्रास होऊ नये म्हणून याची काळजी घेत आहे ,या गोष्टीचाही शासनाने विचार करावा,, असे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मेंढपाळ बोलताहेत ,अाता।अनेक मेंढपाळ ड्राय भागातून बागायत भागात आल्याचे दिसून येत आहे.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. मात्र नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. तसेच सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे अवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आयेाजित करण्यात आलेल्या बैठकीत संगमनेर शहर, धांदरफळ, कुरण, घुलेवाडीसह तालुक्यातील सर्व गावांचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, प्रांतधिकारी शशिकांत मंगळुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, पोलिस निरीक्षक अभय परमार, सुनिल पाटील, पी.वाय.कादरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदि बैठकीत उपस्थित होते.
            यावेळी ना.बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरातील हॉटस्पॉट तसेच धांदरफळ बु., कुरण, घुलेवाडी येथील परिस्थिती व प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आढावा घेतला. तसेच संगमनेर शहर व तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रशासनाला महत्वाच्या सूचना केल्या. याप्रसंगी ना.थोरात म्हणाले कि, कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील दोन महिन्यांत लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. मात्र आता नागरिकांनी शासनाने लागू केलेल्या नियमांसह स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे. कोरोनाचा मुकाबला आपण सतर्क राहुन करु या. नागरिकांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देवून प्रशासनाने काही कडक नियम केले आहेत. नागरिकांनी त्याचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना संकटात महसूल, पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांसह अनेक विभागांचे कर्मचारी व पदाधिकारी, स्वयंसेवक चांगले काम करत आहेत. या काळात तालुक्यातील नागरिकांनी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करीत गरिब, रोजंदारीवरीलल मजूर व परप्रांतीय कामगार यांना मानवतेच्या भावनेतून चांगले सहकार्य केले आहे. हे काम कौतूकास्पद आहे. आपण राज्यपातळीवर काम करतांना मदत कक्षातून परप्रांतीय मजूर, गोरगरिब यांच्यासाठी सातत्याने काम करत असून दररोज जिल्हानिहाय मदतकार्याचा आढावा घेत आहे. नागरिकांच्या मिळालेल्या सहकार्यातून अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी. धांदरफळ, कुरण, संगमनेर शहर व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
            आ.डॉ.तांबे म्हणाले कि, कोरोना संकटात अनेक शासकीय विभागांचे कर्मचारी सेवा देत आहेत. या सर्वांच्या आरोग्य विम्याबाबत अधिक काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. पावसाळयाच्या सुरुवातीला दरवर्षीप्रमाणे सर्दी, ताप, खोकल्याची साथ येवू शकते. यामुळे घाबरुन न जाता आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, ग्रामीण भागात नागरिकांनी मोठी काळजी घेतली आहे. शहरात अनेक स्वयंसेवक गोरगरिबांना अन्न पाकिटे पुरविण्याचे काम करत आहेत. भाजीपाल्यासह अत्यावश्यक सेवा ऑनलाईन मागणीद्वारे पुरविले जात आहे.  सध्याच्या काळात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असेही त्या म्हणाल्या.  यावेळी प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे यांनी कोरोनाचे रुग्ण, तालुक्यातील क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती, त्यांना दिलेल्या सुविधा यासोबत प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबांधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. तहसीलदार अमोल निकम यांनी परप्रांतीय मजूर व त्यांची सद्य परिस्थिती याबाबत माहिती दिली.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)
 राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे  छत्रपती संभाजी महाराज  जयंतीनिमित्त  नगर-मनमाड रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या परप्रांतीयांना अन्नदान व पाण्याचे बाटल्या  वाटप करून आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात आली,सध्या कोरोणाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरू असून लाकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक परप्रांतीय आपापल्या राज्यात परत जात आहेत, काही बसेस ,काही रेल्वेने, काही आपापल्या साधनाने आपापल्या राज्यात परतत आहेत, मात्र काही आपल्या मोटर सायकलवर ,सायकलवर, तर कोणी पायी जाताना नगर-मनमाड महामार्गावर दिसत आहे, आशा पायी सायकलवर, मोटरसायकलवर ,रिक्षा किंवा इतर साधनाने नगर-मनमाड रस्त्यावरून परराज्यात जाणाऱ्या परप्रांतीयांना सावळीविहीर येथील शिवसेना शाखेच्या वतीने भोजन देण्यात आले, तसेच कडक उन्हाळा असल्यामुळे परप्रांतीयांना पिण्याचे पाणी रस्त्याने सर्व हॉटेल्स दुकाने बंद असल्यामुळे मिळणे मुश्किल होते ,अशावेळी येथील शिवसेना शाखेच्या वतीने भोजना बरोबरच पाण्याच्या बाटल्याही या परप्रांतीयांना मोफत वाटप करण्यात आल्या, छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मिरवणूक व इतर कार्यक्रम लॉकडाऊन मुळे बंद आहेत, हे सर्व कार्यक्रम रद्द करून या कार्यक्रमाचा खर्च सावळीविहीर बुद्रुक शिवसेना शाखेच्या वतीने परप्रांतीयांना अन्नदान करून खर्च करण्यात आला ,हा उपक्रम काल दिवसभर येथे राबविण्यात आला, या उपक्रमासाठी सावळीविहीर येथील शिवसेनेचे किरण जपे, दिनेश आरणे ,  निखिल कापसे, सागर आरणे, विशाल वर्पे ,सौरभ पळसे ,गणेश कापसे ,अतुल चव्हाण,भूषण औटी, विवेक जपे आदींनी परिश्रम घेतले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget