Latest Post

शिरडी ( राजेंद्र गडकरी ) - गेल्या दोन महिन्यापासून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोनाशी  प्रशासनातील योध्दे पोलीस, डॉक्टर, नर्सेस,सफाई कामगार, प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे मनापासून आभार मानण्यासाठी  घरात बसून साईबाबांकडे प्रार्थना करायची असुन  सर्वांवर बाबानी आपले आशिर्वाद कायम ठेवावे... तसेच या कोरोना विषाणूचा संपूर्ण जगातून लवकरात लवकर नायनाट करावा यासाठी साईबाबांकडे साकडे घालण्यासाठी।प्राथना करवयाची आहे,
कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांसाठी , कोरोनाच्या नायनाटासाठी  सामुहिक पध्दतीने साईबाबांकडे प्रार्थना करून.श्री साई निर्माण ग्रुप शिर्डी व साई संदेश प्रतिष्ठान रुई, द्वारकामाई प्रतिष्ठाण शिर्डी यांच्या माध्यमातून साईबाबांच्या आशीर्वादाने विजय  कोते यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तेथे साईसच्चरित्र पारायण सर्व सदस्यांच्या सहकार्याने येत्या गुरुवारपासून एकाच वेळी शिरडीतील प्रत्येक घरात सामूहिक साईसच्चरित्र वाचन करून गुरूवार दु.12 ची आरती सहकुटुंब करून आपआपल्या देवघरात साईबाबांच्या नावाचा सामूहिक गजर करावयाचा आहे ,व आपल्या देवघरातूनचं बाबांचे मनोभावे दर्शन घेऊन सहकुटुंब आशिर्वाद घेवून.कोरोना   हरवण्यासाठी   बाबाना विनतीं करावयाची।आहे,  बाबाच्या कथांचे श्रवण, किर्तन चिंतन करतील त्यांच्या ठायी भक्तीचा उगम होईल आणि अज्ञानाचा नाश होईल म्हणून प्रत्येकाने या साईचरित्राचे मनोभावे श्रवण वाचन करुन व
  अध्याय वाचन स्वतः किंवा घरातील सदस्यांनी घरीच करायचे आहे ,त्यासाठी श्री साई निर्माण ग्रुपच्या माध्यमातून   गुरुवारी 14 मे रोजी  श्री साईसच्चरित्र ग्रंथाच्या सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन केलेले असून या पारायण सोहळ्यात  भाग घेणाऱ्या साई भक्तांनी नोंदणी केल्या नंतर सर्व भक्तांना लकी ड्रा द्वारे अध्याय नंबर दिले जाणार आहेत,बुधवारी संध्याकाळी  सहभागी झालेल्या भक्तांची नावे आणि साई कृपेने त्यांना मिळालेले अध्याय यांची यादी ग्रुपवर प्रसिद्ध केली  जाईल,
 सामुहिक अध्याय वाचनाची रूपरेषा.हीअशी ऱाहाणारआहे, सकाळी 11वा. स्तवन मंजिरी वाचनास सुरुवात करून आपल्याला मिळाल्याल्या अध्यायाच्या वाचनास सुरुवात करून दु.12 वाजता सहकुटुंब बाबांची आरती करावी,या साईसच्चरित्र पारायणास जास्तीत जास्त साई भक्तांनी सहभाग नोंदवून सदगुरू श्री साईबाबांचे शुभाशीर्वाद घ्यावे. शिरडीतील प्रत्येक भागातील नागरिकांनी  आपल्या भागातील खालील व्यक्तींशी संपर्क साधणे गरजेचे आहे,नाव नोंदणी व सहभागासाठी :- फोन ,मेसेज,  किंवा WhatsApp वर खालील व्यक्तींशी संपर्क करावाअसे आवाहान करण्यात आले आहे,.
असे पाच गुरूवार करायचे आहे, या गुरूवारी शिरडीतून या साईसच्चरित्र पारायणास सुरूवात होईल, त्यानंतर पुढील गुरूवारी 21 मे रोजी राहाता तालुका, 28  मे रोजी अहमदनगर जिल्हा, 4 जून रोजी संपूर्ण भारत देश, व पाचव्या गुरुवारी 11 जूनला संबंध जगात साईसच्चरित्राचे वाचन हे साईभक्त करणार आहेत.असे आवाहान करण्यात आलेआहे,त्यासाठी
 संपर्क -विजय कोते  8308079079.,संजय गोंदकर  9623669191.,मंगेश त्रिभुवन 9511915151.,विकास महाराज गायकवाड 9623969191.,दादा गोंदकर  9623234141.,अशोक गोंदकर  9623999191., जगन्नाथ गोंदकर  9822249313.,रामा गागरे 9881802588.,राजेंद्र स. कोते 9623269191.,उत्तम कोते 9822551010.
 ताराचंद कोते 9096919191.,वैभव शास्री कुलकर्णी 9975544551.,प्रशांत गोंदकर 9011722121.,भरत चांदोरे  9011116300.,गणेश सोमवंशी 9623049191.,धनंजय साळी  9921529999.,अभिजीत कोते 9975819581.,    राहूल मगर  8308079079.,साई कोते 9657079191.,सुधीर सुपेकर  9511559191.हे आहेत,तरी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा ,असे आवाहन साईं निर्माण ग्रुप व  द्वारकामाई  प्रतिष्ठानकडुन करण्यात आले आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असुन तलावा पासुन ते पाणी शुध्दीकरण केंद्रापर्यत असणार्या सर्व यंत्रणेची साफसफाई वेळेवर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या बाबत प्रसाद खरात यां नागरीकाने पाणी शुध्दीकरण तलावाचे काही फोटो काढुन व्हाँटसअप वर टाकले होते त्यामुळे ग्रामस्थांनी पाणी पुरवाठ्याकडे लक्ष देवुन गावाला शुध्द पाणी पुरवठा करा लोकांच्या आरोग्याशी खेळू नका
अशा कमेंट गृपवर टाकल्या होत्या त्यांची दखल घेवुन गावातील जागृक नागरीक व पत्रकारांनी समक्ष जावुन पाणी पुरवठा विभागाची पहाणी केली या वेळी तलावातून आलेले पाणी तुरटी व टि सी एल टाकुन स्वच्छ केले जात असल्याचे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी पत्रकारांना सांगितले या वेळी टँक केव्हा साफ केला टाकी केव्हा साफ केली पाणी पुरवठ्याला भेट देणारे आधिकारी केव्हा आले या बाबत विचारले असता रजिस्टर ग्रामपंचायत कार्यालयात असल्याचे सांगण्यात आले पाणी शुध्दीकरण तलावातील साचलेला गाळ केव्हा  वाँश आऊट केला या बाबतही निश्चित तारीख व वेळ सांगता आली नाही पाणी शुध्दीकरण करण्याचे तीन हौद असुन या तिनही हौदातुन पाणी शुध्दीकरण कले जाते परंतु हे हौद कमीत कमी आठ दिवसातून एकदा वाँश आवुट केले पाहीजे परंतु तसे होताना दिसत नाही ज्या फिल्ट्रेशन टाक्यातुन पाणी गाळल जात त्या वेळी पाण्यातील सुक्ष्म कण वाळूच्या कणात साचले जातात व ही वाळू घट्ट दगडा सारखी होत त्या मुळे पाण्याच्या टाकीतील प्रेशर वाढत ,ज्या वेळी ठरावीक दाबा पेक्षा जास्त दाब टाकीत होतो,हे दाखवण्या साठी टाकीला प्रेशर गेज असतो,अशा वेळी टाकी रिव्हर्स फ्लो ने टाकी स्वच्छ करावी  लागते ,या प्रक्रीयेत पाण्याच्या टाकीत जाणारा प्रवाह बंद करून ,बाहेर पडणाऱ्या बाजूने पाणी टाकीत सोडले जात त्यामुळे वाळू उपळते व त्यात अडकलेले मातीची कण मोकळी होतात व फ्लश पाईप वाटे बाहेर पडतात.याला रिव्हर्स फ्लशींग अस म्हणतात.अशा प्रकारे गाळ व्यवस्थेची देखभाल ठरावीक दिवसांनी सतत करावी लागते. गावाला पाणी पुरवठा करणार्या टाकीत केवळ तीन किलो टि सी एल पावडर टाकली जात असल्याची नोंद त्या ठिकाणी असलेल्या रजिस्टर मध्ये आढळून आली परंतु नेमके प्रमाण किती हे ही संबंधित कर्मचार्याला सांगता आले नाही त्यातही टि सी एल टाकण्याच्या नोंदी देखील  वेळेवर घेतल्या गेलेल्या नाहीत सदर रजिस्टरमध्ये मार्च पर्यंतच नोंद केलेली आढळून आली या बाबत असे का आसे विचारले आसता महीना अखेरीस महीन्याची नोंद ओढतो असे सांगण्यात आले मग आता मे महीना सुरु असुन एप्रिल महीन्याच्या नोंदी कधी ओढणार या बाबत समाधान कारक उत्तर देता आले नाही  तसेच पाणी पुरवठ्याला जोडलेल्या विज मोटारी करीता असलेला विज वाहक पँनल बोर्ड उघड्यावरच होते  त्यातील काही तारा फ्यूजा उघड्यावरच पडलेल्या होत्या यामुळे एखाद्या पाणी पुरवठा कर्मचार्याच्या जिवीताला धोका होवु शकतो हे पदाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले असता तातडीने पँनल बोर्डची दुरुस्ती केली जाईल असे अश्वासन रविंद्र खटोड यांनी दिले खरात यांनी टाकलेला फोटो व प्रत्यक्ष पहाणी करताना दोन्ही फोटोत असलेला फरक ग्रामस्थ व पत्रकाराच्या लक्षात आला पत्रकार येण्यापुर्वी बर्याच ठिकाणी साफ सफाई केल्याचे दिसुन आले   गावाला पाणी पुरवठा करणारी स्वतंत्र यंत्रणा असली तरी ती कार्यरत नसल्याचे जाणवले उपसरपंच रविंद्र खटोड बाजार समितीचे संचालक सुधीर नवले जावेद शेख यांनी पाणी पुरवठ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याचे अश्वासन दिले या वेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले सरपंच असतानाच जल शुध्दीकरण केद्राचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असाताना पाणी पुरवठ्याचा निधी दुसरीकडे वापरल्यामुळे आज ही अवस्था झाली असुन आज त्याच कामाचे नियोजन केल्यास तिप्पट खर्च  लागणार असल्याचे सांगितले बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणारी योजना ही सन १९७० साली कार्यन्वित झाली असुन त्या वेळळेची लोकसंख्या गृहीत धरुन ती योजना सुरु केली होती आज लोकसंख्या चार पटीने वाढली आहे त्यामुळे जल शुध्दीकरण केंद्राचेही विस्तारीकरण करणे गरजेचे  असुन पाणी शुध्दीकरण करताना रिव्हर्स फ्लँशिंग पध्दतीचा वापर केल्याचे दिसतच नाही  ही गंभीर बाब आहे असल्याचे मत सुधाकर खंडागळे यांनी व्यक्त केले 
उपसरपंच रविंद्र खटोड जावेद शेख बाजार समितीचे संचालक सुधीर नवले सुधाकर खंडागळे भास्कर बंगाळ व पत्रकार उपस्थित होते.

श्रीरामपुर (प्रतिनिधी )- श्रीरामपुर- संगमनेर रस्यावर प्रभात दूध डेरी जवळ दुचाकी व ट्रक यांच्यात आज सायंकाळी ५ :३०च्या दरम्यान भीषण अपघात होऊन या अपघातात २ जणांचा मृत्यु झाला आहे.या बाबत घटनास्थळी समजलेल्या माहिती वरुन बाळासाहेब यशवंत कोते (शिर्डी ) व अनिल निकम (कोपरगाव ) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समजले आहे . दोघेही श्रीरामपूर बस डेपोचे सहाय्यक आधिक्षक व सहाय्यक निरिक्षक परिवहन महामंडळ कर्मचारी असल्याचे समजते. अपघात ग्रस्त ट्रक मध्ये लोखंडी सळया असल्याचे समजले आहे.

शिर्डी लगतच्या निमगाव कोर्राळे गावात ११मे रोजी पहाटे ४वाजेच्या सुमारास साईबाबा संस्थान च्या भोजनालयात काम करत असलेल्या भागवत दामोधर साळवे यांची होंडा शाईन  एम एच १७सी बी २११४व नातेवाईक संखाराम गोविंद विर यांची बजाज डिस्कव्हर एम एच १७ अॆ एच ५८३४व हिरो होंडा एम एच १७वाय६०२२अशा जवळपास एक लाख रुपये किंमतीच्या दुचाकी पेट्रोल टाकून  कोणीतरी खोडसाळ पणे पेटवून दिल्याने  मोठी खळबळ उडाली आहे
एक महिन्यापूर्वी शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांची नवी कोरी कार पेटवून देण्यात आली होती अजुन या आरोपींचा शिर्डी पोलीसांना तक्रार दाखल करुन हि तपास लावण्यात यश आले नसताना संचारबंदी व लाॅकडाउन सुरू असताना अडचणी मध्ये आलेल्या रोजंदारीवर काम करत असलेल्या साळवे यांच्या सह नातेवाईक लोकांच्या दुचाकी पेटवून देणारया आरोपींचा शिर्डी पोलीसांनी शोध घ्यावा  अशी मागणी भागवत साळवे यांनी. शिर्डी पोलीसात दिलेल्या तक्रारीत केली या घटनास्थळी  शिर्डी पोलीसांनी भेट देऊन पाहणी केली आहे   या कुटुंबातील लोकांना आधार देण्यासाठी संरपच शिल्पा कातोरे उपसरपंचअजय जगताप माजी उपसरपंच विजय कातोरे सामाजिक कार्यकर्ते कैलास कातोरे  चेअरमन राजेंद्र गाडेकर ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ कातोरे माजी सदस्य धनंजय पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी तलाठी भाऊसाहेब मांढरे ग्रामविकास अधिकारी आर के गायकवाड हजर होते  तीन दुचाकी पेटवून नुकसान करणारा जो कोणी संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माध्यमातून असा प्रकार करत असेल अशाच शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास कातोरे यांनी केली आहे.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लोकडाऊन सुरु असून या आपत्तीजनक परिस्तिथीत गोरगरीब सर्व सामान्य  कुटुंबांना कामधंदे नसल्याने पोटाचा प्रश्न पडत आहे  राज्याचे माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सिंधुताई विखे पाटील अन्नदान योजने अंतर्गत गोरगरिबांना पाच रुपयात भोजन पाकिटे देण्यात येत असून या योजनेचा सावळीविहीर  बु तालुका राहता येथे आज रविवार पासून शुभारंभ करण्यात आले                                                      सावळीविहीर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर अंतरा अंतरावर गोलाकार निशाणी करून लाभार्थींना उभे करत शोषलं  डिस्टन्स  पाळत या भोजन पाकिटांचे वितरण करण्यात आले यावेळी राहाता कु उ बा समितीचे संचालक बाळासाहेब जपे सरपंच रुपाली आगलावे शिवाजी आगलावे गणेश आगलावे शांताराम आगलावे ग्राम पंचायत सदस्य व  कार्यकर्ते उपस्तिथ  होते यावेळी लोकडाऊनच्या नियमाचे पालन करून भोजन पाकीट वाटण्यात आले आहे  नोंदणी करण्यात आलेल्या सुमारे ७०० गरजवंतांना हि पाकिटे देण्यात आली या एका पाकिटामध्ये  लापशी व खिचडी होती यावेळी येथे चोख नियोजन  ठेवण्यात आले होते                                                                                         या योजनेमुळे गावातील गरजवंत व रस्त्या वरून येणाऱ्या जाणाऱ्या काही परप्रांतीय मजुरांनाही कार्यकर्त्यांनी हि अन्न  पाकिटे कार्यकर्त्यांनी स्वतः घेऊन मोफत वाटली हि योजना दररोज राज्यात लोवकडाऊ असे पर्यंत  सुरु राहणार आहे सर्वांनी अन्न पाकिटे  घेतांना सोशल डिस्टन्स पाळावे मास्क लावावे गर्दी करू नये असे आव्हान यावेळियावेळी करण्यात येत होते.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )साईबाबांच्याभूमीत चालत असलेले अवैद्य  व्यवसाय बंद  होत नाही येथे मोठा पोलीस फौज फाटा असतांना व लोकडाऊन मध्ये जिल्हा बंदी असतांना गांजा सापडला जातो अवैद्यरित्या दारू पकडली जाते हे सर्व इतकी कडक पहारा  असतांना शिर्डीत हा माल  येतेच कशे  असा प्रश्न निर्माण होत आहे  गांजा चरस अफिम दारू वेश्याव्यवसाय पाकिटमारी गुन्हेगारी  विरोधात अनेकदा शिर्डीतील सामाजिक संस्था समाजसेवक व ग्रामस्थानीं अनेकदा आंदोलने केली आहे अनेकदा उपोषणे झाली तरीही शिर्डीतील अवैद्य व्यवसाय सुरूच आहेत तेही लोकडाऊनच्या काळात त्यामुळे पाणी कुठं मुरतंय हे आजून गुलदस्त्यात आहे ह्या सर्व अवैद्य  वस्तूंची वाहतूक होतीच  कशी तसेस या अवैद्य धंद्यांची पोलीस पत्रकारपरिषदेत सांगतात कि अवैद्य धंदे चालू असलेतर  कळवा काळविणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल मग अनेकदा कळविणाऱ्यांचे  नाव कसे बाहेर येतात  अवैद्य धंदे दारूधंद्यावाल्यांना छाप्या  अगोदर  कशी व कोण खबर देतो त्याची चोकशी घेणे गरजेचे आहे शिर्डी व परिसरात अवैध दारू गांजा वैश्यव्यवसाय लोकडाऊनकाळांत सर्व बंद असतांना चालतो तर मग पोलीस काय करीत आहेत पोलिसांनी ठरवले तर मंदिरा समोरून चप्पल सुद्धा चोरी जाऊ शकत नाही. असा सवाल शिर्डीकर करत असून सर्वात मोठं असणाऱ्या अहमदनगर जिल्यात आंतराष्ट्रीय तीर्थ क्षेत्र शिर्डीत चालणाऱ्या या धंद्याबाबत कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस आधीक्षक अखीलेशकुमार सिंग यांचीही जबाबदारी मोठी वाढली  आहे त्यांनीच आता शिर्डीतील व परिसरातील अवैध धंद्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे व गुप्त चौकशी करून  अवैध धंद्यांवर धाडी  टाकणे गरजेचे आहे अशी परिसरातुन मागणी होत  आहे.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा/  राजेंद्र गडकरी
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दारूबंदी केली होती ,मात्र लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दारू बंदी उठविण्यात आली, त्यामुळे राहता येथील प्रसाद वाईन्स  मध्ये मद्य घेणाऱ्यांसाठी मोठी गर्दी झाली, 400 ते 500 लोकांचा जमावला या वाईन्स मालकाने  आपल्या मालकीच्या साई सिद्ध संकल्प लॉन्स मध्ये सर्वांची बसण्याची व्यवस्था केली, जमाव बंदी आदेश असतानाही या लॉन्स मध्ये हे लोक  एकत्रित बसली लॉकडाउनच्या काळात कोणतेही लॉन्स, मंगल कार्यालय उघडण्यास बंदी असताना या लॉन्सचा उपयोग वाईन शॉप साठी  करण्यात आला त्याच प्रमाणे या प्रसाद वाइन्स मालकाने व राहता नगरपालिकेची बॅरिकेट्स लावण्यासाठी  परवानगी ही घेण्यात आली नाही  बॅरिकेट्स रोडवर  लावणे चुकीचे असताना येथे बॅरिकेट्स लावण्यात आले होते, त्याचप्रमाणे कोणतेही फलक सूचना न दिल्याने नियमाचे उलंघन केल्याने   बिंदास न्यूज  व जनमत मराठी न्यूजच्या बातमीत दाखवले. कर्तव्यदक्ष अधिकारी  तहसीलदार कुंदन हिरे व पोलिस उपविभागीय अधिकारी  सोमनाथ वाघचौरे यांनी लक्ष देऊन हे वाईन शॉप बंद केले व या प्रसाद वाईन्स मालकावर विविध गुन्हे दाखल केले आहेत, अधिक तपास पोलीस निरीक्षक  करत आहेत, या प्रसाद वाईनचे परवानाही रद्द करण्यात यावा, अशी मागणी  होत आहे ,या काळात जमावबंदी आदेश असतानाही लोक जमा करणे, लॉकडाउनचे नियम न पाळणे या सर्वांमुळे राहता शहर व परिसरात आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन  अश्या घटना परत घडू नये म्हणून दक्षता घेण्याची गरज आहे  ह्या पुढे अशे प्रकार कोणी करीत असेल व नियमाचे पालन करणार नसेल तर त्यावरही गुन्हे दाखल करून सक्त कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार कुंदन हिरे व  उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी बिंदास न्यूज शी बोलतांना सांगितले त्यामुळे सर्वांनी नियमाचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget