लॉकडाऊनचे नियम सर्वसामान्यांसाठी। मग नगरपंचायत कर्मचारी व अधिकारी यांना मोकळीक कशी।।
शिर्डी जितेश लोकचंदानी-श्री साईबाबा मुळे देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या शिर्डी शहरात सध्या कोरोना मुळे लॉकडाऊन सुरू आहे, तरी काही लोक लॉक डाऊन चे नियम मोडून फिरत असतात ,अश्या नियम न पाळणाऱ्या लोकांवर नगरपंचायतीने एक पथक बनवून दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, हा निर्णय चांगला आहे ,मात्र नगरपंचायत चे काही कर्मचारी व अधिकारी कुठेही धूम्रपान करतात, मात्र यांच्यावर कानाडोळा केला जातो , नियम मोडणार्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का। की, दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण।। अशी तर शिर्डी नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांची व या पथकाची रीत आहे काय। असा सवाल शिर्डीकर मधून होत आहे,
शिर्डीत सध्या लॉक डाऊन सुरू आहे ,सर्वव्य्स्वसाय बंद आहे, रस्ते ओस आहे, तरीही काही लोक विनाकारण फिरतात, तोंडाला मास्क बांधणे ,सोशल डिस्टन्स पाळणे ,धूम्रपान करणे, रस्त्यावर कोठेही थुंकणे ,असा प्रकार या लोकांकडून होतो, अशा लोकांवर नगरपंचायत एक पथक बनवून आता लक्ष देत आहे ,असे नियम मोडणाऱ्या व्यक्तीला प्रथम वेळी पाचशे रुपये दंड ,दुसऱ्या वेळी दोन हजार रुपये दंड, तिसऱ्या वेळी पाच हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असे नगरपंचायत तिने घोषित केले आहे, हा निर्णय नगरपंचायत चा चांगला आहे आता सध्या लॉक डाऊन सुरू आहे, बंद होईल मात्र इतर वेळीही शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारोंच्या संख्येने साईभक्त येत असतात ,अनेक ठिकाणी रस्त्यावर गुटखा खाऊन थुकंणाऱ्यांची संख्या मोठी आहे, सिमला,मुंबई सारख्या राजधानीच्या ठिकाणी रस्त्यात थुकंल्यानंतर लगेच दंड आहे , मात्र शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थस्थानाचे शहर आहे, येथे स्वच्छ ,सुंदर शहराचा देशाचा तीसरा क्रमांकचा पुरस्कार शिर्डी शहराला मिळाला आहे ,असे असतांनाही शिर्डीत रस्त्यावर , कुठेही,कोणत्यीही ठिकाणी गुटखा खाऊन थुंकून रांगोळ्या काढल्याचे चित्र दिसत असते व तो अस्वच्छतेचा मेसेज पूर्ण देश-विदेशात जातो येथे श्री साईंच्या दर्शनासाठी लोक अनवाणी रस्त्याने फिरत असतात त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे हा निर्णय नगरपंचायतीने चांगला केला आहे, परंतु फक्त हा लॉक डाऊन काळापुरता निर्णय योग्य नाही ,त्यानंतरही तो अमलात येणे गरजेचे आहे ,तसेच हा नगरपंचायतीचा कायदा,हा नियम सर्वसामान्यांसाठीआहे, पण मग आपले नगरपंचायत कर्मचारी ,आधिकारी सुद्धा हा नियम मोडतात, कुठेही धूम्रपान करतात, काहीजण तोंडाला मास्क लावत नाहीत, तेवढ्यापुरते तेवढे मास्क लावून परत काढून टाकले जाते ,किंवा सोशल डिस्टंन्स पाळत नाही, अश्या नियम मोडणाऱ्या कर्मचार्यांवर कारवाई कोण करणार। असा प्रश्न साईभक्त ,शिर्डीकर विचारत आहे, ।।आपले झाकायचे व दुसऱ्याचे वाकून पाहायचे ।।असा हा प्रकार शिर्डी नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सध्या होत आहे, सर्वसामान्यांना आहे तोच नियम आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठीही पाहिजे व नगरपंचायत कर्मचारी ,अधिकारी यांनी नियम मोडला तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे ,पण तसे होताना दिसत नाही ,यामुळे शिर्डी नगरपंचायत कर्मचारी अधिकारी नियम पाळण्यास तयार नाही ,तेव्हा प्रथम आपण नियम पाळण्यात शिकले पाहिजे, नंतर दुसऱ्याला नेम सांगणे उचित ठरेल , असे शिर्डीकरांमधून बोलले जात आहे.