Latest Post

 बुलढाणा - 10 अप्रैल- कोरोना वायरस का विषय संपूर्ण देश मे बडा गंभीर मुद्दा बना हुआ है जिस से निपटने के लिए शासन हर मुमकिन कोशिश कर रहा है किंतु इस मुसीबत की घडी में भी कुछ लोग जातीय रंग देकर सोशल मीडिया के माध्यम से समाज मे नफरत और अफवाह फैलाने का काम कर रहे है.बुलढाणा जिले में व्हाट्सएप पर कोरोना को लेकर अफवाह फैलानेवाले एक डॉक्टर पर रायपुर पुलिस थाने में अपराध दर्ज किया गया है.हालांकि प्रशासन इस बात से सचेत कर रहा है कि, सोशल मीडिया पर कोरोना के संबंध में कोई अफवाह और जातीय भावना को आहत करनेवाली पोस्ट वायरल ना करें.
    बुलढाणा तहसील अंतर्गत के ग्राम रायपुर निवासी डॉक्टर पी.आर.खंडागले ने चार-पांच दिन पहले अपने परिसर के  व्हाट्सएप ग्रुप पर कोरोना को लेकर एक विशेष समाज को  जिम्मेदार बताते हुए उनसे किसी प्रकार की वस्तु ना खरिदे ऐसी एक पोस्ट 3 एप्रैल को वायरल किया था. यह पोस्ट वायरल होने के बाद कुछ जागरूक नागरिक रायपुर पुलिस स्टेशन गए और उन्होंने पुलिस को डॉ.खंडागले की आपत्तिजनक पोस्ट से अवगत कराया.विशेष धर्म के लोगों के प्रति समाज मे द्वेष फैलाने के इस मामले की गंभीरता को समझते हुए रायपुर पुलिस थाने में पुलिस कांस्टेबल विजय पैठने की शिकायत पर एक खास समाज के प्रति कोरोना को लेकर अफवाह फैलानेवाले आरोपी डॉ.पी.आर.खंडागले के खिलाफ  भादवी की धारा 505(2) तथा आपदा व्यवस्थापन कानून 2005 की कलम 52,54 के तहत 7 अप्रैल को अपराध दर्ज किया गया है.मामले की अधिक जांच थानेदार सुभाष दुधाल के मार्गदर्शन में जारी है.

(भारतकुमार उदावंत व रवी भागवत)
श्रीरामपूर- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्वच स्तरातून जनजागृती सुरू आहे. आशा वेळी व्यंगचित्रकार मागे कसे राहतील.समाजसेवेचा वसा घेतलेले येथील व्यंगचित्रकार भारतकुमार उदावंत व रवी भागवत या जोडगोळीने व्यंगचित्रांच्या माध्यमातून जन जागृती सूरु केलीय. विशेष म्हणजे ही व्यंगचित्रे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असल्याने त्यांच्या या कामाला देशभरातून दाद मिळत आहे.
कोरोनाने जगभर हाहाकार माजविलेला असतानाही शहरी व ग्रामीण भागातील अनेक लोक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरून सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडवताना दिसत आहेत, त्यांच्या या कृत्यामुळे ते त्यांच्यासोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. आशा महाभागांना कोरोनाच्या भयावह वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी भागवत व उदावंत यांनी व्यंगचित्रांचा मार्ग निवडला. त्यास दोघांनीही समर्पक घोषवाक्य व वातरतीकांची जोड दिली.
उदावंत व भागवत यांच्या व्यंगचित्रात यमराज केंद्रस्थानी ठेवण्यात आला असून त्यास त्यांनी कोरोनाचे रूप दिले आहे. आता तरी हो 'शहाणा, बाहेर जाण्यास नको शोधू बहाणा', 'घरात थांबणे हीच खरी देशसेवा', 'गर्दी आहे कोरोनाचे ठिकाण, त्यापेक्षा पसंत करा मकान', 'रस्त्यांवर फिरणाऱ्या मूर्खांचा जिरेल माज, घरी बसणाऱ्याना मिळणार दीर्घायुष्याचा ताज', 'कचरा टाकलं उघड्यावरी, विषाणू येतील तुमच्या घरी', ,'बचना है, बाचाना है, घरमे रहकर कोरोना को हराना है', ;करोनाशी द्यायची आहे फाईट, त्यासाठी घरी राहणे काय आहे वाईट', आशा एकचढ एक घोषवाक्ये व वात्रटिकांच्या मदतीने दोघांचेही समाजप्रबोधन सुरू आहे. ही घोषवाक्ये मराठी सोबतच हिंदी आणि इंग्रजी असल्याने व्हाट्सआप, फेसबुक, ट्विटर, हॅलो, शेयरइट, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांमधून त्यांच्या या उपक्रमास मोठी पसंती मिळत आहे. राज्याबरोबरच गुजरात, कर्नाटक, हायद्राबाद आदी ठिकाणाहून अनेक चाहत्यांनी त्यांना दूरध्वनी करून कामाचे कौतुक केले असल्याचे उदावंत यांनी संगीतले.
गुरू-शिष्याच्या या जोडीने यापूर्वीही अनेकदा आपल्या कलेचा उपयोग करून समाजातील गरजूंना मदत उभी केली आहे. चार वर्षांपूर्वी चैताली येतील दीपक राजगुडे या ब्लड कॅन्सरच्या रुग्णासाठी दोघांनी रस्त्यावर उतरून लोकांची चित्रे काढली, त्यास कला रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला त्यानंतर नांदूर येथील मनीष सादाफळ या या प्लास्टिक ऍनिमिया च्या रुग्णासाठी तसेच भोकर येथील रामकृष्ण भोईटे या दाम्पत्याच्या अनाथ मुलांसाठीही असाच उपक्रम राबविला. त्यांनी आशा उपक्रमातून आतापर्यंत एक लाखाहून अधिक राशी उभारली व संपूर्ण रक्कम संबंधितांना शासकीय अधिकाऱ्यांमरफत सुपूर्द केली आहे.
याशिवाय चित्रकलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ते सातत्याने जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमोर व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके सादर करतात. पन्नास हुन अधिक शाळा महाविद्यालयांमध्ये त्यांनी आतापर्यंत आपली प्रात्यक्षिके सादर केली आहेत. याशिवाय अनेक दैनिके, मासिके व दिवाळी विशेषांकातून त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित होत असतात. दोघेही सातत्याने व्यसनमुक्ती, हुंडाबळी, विजबचत, पाणी बचत, एड्स जनजागृती, वृक्ष बचाव आदी सामाजिक विषयांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रबोधन करीत असतात.आतापर्यंत त्यांच्या व्यंगचित्रांची मुबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, सोलापूर आदींसह अनेक ठिकाणी प्रदर्शने भरली आहेत. उदावंत यांच्या गणपती व मूषक यांच्या व्यंगचित्र मालिकेचे राज्यात एकाच वेळी शंभर ठिकाणी प्रदर्शने होण्याचा विक्रम झाला आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन राज्यसरकारने त्यांना २००९ साली महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने सन्मानीतही केले आहे. उदावंत यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन दोन वर्षांपूर्वी मुंबई येथील जहांगीर कलादालनात भरले होते. त्यासही त्यावेळी मोठा प्रतिसाद लाभला. भागवत यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या 30 पुस्तकांची महाराष्ट्र शासनाने प्रगत शिक्षण महाराष्ट्र या योजनेसाठी गेल्यावर्षी निवड केली होती. तसेच या दोघांच्याही पाठीवर कलारसिक माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची थाप पडली आहे.
सत्यजितचेही पाऊलावर पाऊल
भरतकुमार उदावंत यांचा मुलगा सत्यजित हादेखील उत्कृष्ट उदयोन्मुख चित्रकार आहे. काही वर्षांपूर्वी चित्रकलेच्या फाउंडेशन परीक्षेत तो राज्यात पहिला आला होता. समाजप्रधानाच्या कार्यात त्याने उदावंत भागवत या गुरुशिष्याच्या पाऊलावर पाऊल ठेवले आहे. त्यानेही हा महामारीच्या काळात डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्या कार्यास सॅल्युट करणारे चित्र रेखाटले आहे, त्याच्या या चित्रासदेखील कलारसिकांची मोठी पसंती मिळत आहे.

शिर्डी - लॉकडाऊन संपलेनंतर व संपुर्ण जनजीवन सुरळीत झालेनंतर रक्‍ताची गरज भासण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे नियमित रक्‍तदान करणा-या रक्‍तदात्‍यांना व रक्‍त संकलन करणा-या संघटनांनी आपले नावं, मोबाईल नंबर, रक्‍तगट श्री साईनाथ रक्‍तपेढी, शिर्डी येथे नोंदवावीत असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
श्री.डोंगरे म्‍हणाले, सध्‍या महाराष्‍ट्र शासनाकडून विविध सामाजिक संस्‍था व संघटंना रक्‍तदान शिबीराचे आयोजन करणेबाबत सूचना देणेत येत आहेत. याकरीता असंख्‍य रक्‍तदाते स्‍वतःहुन रक्‍तदान करणेकामी पुढे येत असले तरी कोरोना विषाणु हा फुप्‍फुसाचा आजार असलेमुळे त्‍यासाठी रक्‍ताची फारशी गरज भासत नाही. तसेच आजतागायत श्री साईनाथ रक्‍तपेढीमध्‍ये पुरेसा रक्‍तसाठा उपलब्‍ध असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाने १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्‍यात आल्‍यामुळे वारंवार होणारे रस्‍ते अपघात हे पुर्णपणे थांबलेले आहेत. तसेच तातडीची आवश्‍यकता सोडून इतर रुग्‍णांना रुग्‍णालयात न जाण्‍याच्‍या सूचना देखील सरकारी पातळीवर देण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍यामुळे दैनंदिन अथवा प्‍लॅन शस्‍त्रक्रिया या सध्‍यास्थितीला पुढे ढकलण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍यामुळे म्‍हणावी तितकी रक्‍ताची गरज रुग्‍णालयास भासत नाही.
तसेच सर्वसाधारणपणे रक्‍तदानानंतर विविध प्रकारच्‍या चाचण्‍या होऊन ते रक्‍त ३५ दिवस रक्‍तपेढीमध्‍ये  साठवले जाते. रक्‍ताची मागणी बघता व त्‍याची टिकाऊ क्षमता पाहता रक्‍तसाठा सांभाळणे अवघड आहे. मागणी नसेल तर दात्‍यांचे हे अमुल्‍य रक्‍त वाया जाण्‍याची शक्‍यता आहे. रक्‍तदात्‍याने एकदा रक्‍त दिल्‍यानंतर पुढील तीन महिने रक्‍तदान करु नये असा नियम आहे. त्‍यामुळे आता गरज नसताना रक्‍तदान केले तर अशा नियमित रक्‍तदात्‍यांची टंचाई ही लॉकडाऊन संपलेनंतर व संपुर्ण जनजीवन सुरळीत झालेनंतर भासण्‍याची शक्‍यता आहे.
याकरीता नियमित रक्‍तदान करणा-या रक्‍तदात्‍यांनी, ज्‍यांना रक्‍तदान करावयाची इच्‍छा आहे व रक्‍त संकलन करणा-या संघटनांनी आपले नावं, मोबाईल नंबर, रक्‍तगटासह श्री साईबाबा संस्‍थानच्‍या श्री साईनाथ रक्‍तपेढी, शिर्डी येथे नोंदवावेत जेणे करुन रक्‍ताची टंचाई भासल्‍यास रक्‍तदात्‍यांना संपर्क करुन रक्‍त उपलब्‍ध करता येईल. तसेच अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीकरीता (०२४२३) २५८५२५ या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क करावे असे ही श्री.डोंगरे यांनी सांगितले.


श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- वांरवार सांगूनही नागरीक रस्त्यावर फिरताना दिसत आहे आता रस्त्यावर फिरु नका हे सांगण्यासाठी पोलीसांनी रुट मार्चचे नियोजन केले असुन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हे आपल्या सर्व पोलीसा सहीत रस्त्यावर ठाण मांडून आहे विनाकारण फिरणार्यावर कडक कारवाई  करण्याचा ईशारा पोलीसांच्या वतीने देण्यात आलेला आहे     
रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हे स्वतः रस्त्यावर उभे असुन रस्त्याने जाणार्या येणार्यांची कसुन चौकशी केली जात आहे कुणालाही विनाकारण फिरु न देण्याचा चंगच पोलीसांनी बांधला आहे पोलीस अधिकारी प्रत्येकाची कसुन चौकशी करत आहे ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशांची देखील  कसुन चौकशी केली जात आहे खरोखर काम आहे की विनाकारण फिरत आहे याची शहनिशा केली जात आहे कुणालाही दुचाकी वरुन शहरात फिरु दिले जाणार नाही विनाकारण फिरणार्या वहानावर देखील  कारवाई  सुरु करण्यात आलेली आहे या माध्यमातुन नागरीकांनी घराबाहेर न पडण्याचे व आपली  व आपल्या कुटुंबाची काळजी आपणच घ्यावी असे अवाहन करण्यात आले आहे        कोरोनाचा फैलाव होवु नये या  करीता शासकीय पातळीवर विविध उपाय योजना केल्या जात असुन पोलीस बांधव आपल्या जिवाची बाजी लावुन नागरीकांना  घरात थांबण्याचे अवाहन करत असताना नागरीक मात्र बिनधास्त भटकंती करताना दिसत आहे काही ठिकाणी  विनाकारण फिरणार्यावर कारवाई देखील झालेली आहे तरी देखील  परिस्थितीचे गांभीर्य फिरणारांना वाटत नाही त्यामुळे आता पोलीसांनी कठोर पाऊल उचलले आहे अति महत्वाचे काम असेल तरच घराबारेहा पडा अन्यथा कारवाईला सामोरा जा असा ईशारा पोलीसांनी दिला आहे चौकाचौकात पोलीस कडक पहारा देत आहे असे असले तरी काही लोक हा विषय गांभिर्याने घेताना दिसत नाही सुरुवातीला पोलीसांनी विनंती करुन पाहीली रस्त्यावर दिसणारी गर्दी कमी होत नसल्याचे पाहुन आता पोलीस आधिकार्यांनीच कारवाईचा बडगा उगारला आहे यातुन तरी नागरीकांनी बोध घ्यावा व घरातच थांबावे असे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी केले आहे.

 बेलापूर  (प्रतिनिधी  )-लाँक डाऊन असातानाही बेलापूर झेंडा चौकात भाजीपाला घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडायची  अनेक वेळा सांगुन देखील  काहीच फरक न पडणार्या लोकांना बेलापूर पोलीसांनी चांगलाच हिसका दाखविला अन काही मिनिटातच गर्दी सामसुम झाली  कोरोना पसरु नये म्हणून सर्वत्र उपाय योजना चालु आसताना गावात मात्र दररोज सकाळी झेंडा चौक परीसरात बाजार भरत होता अनेक जण कारण नसताना तेथे गर्दी करत होते या बाबत बेलापूर पोलीसांनी अनेक वेळा
दररोज भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी                          आज पोलीसांच्या  कारवाई नंतर मोकळा झालेला चौक
सुचना केल्या विंनत्या केल्या परंतु लोक तात्पुरते दुर जात व पोलीस निघुन जाताच पुन्हा बाजार भरत असे कोरोना पसरु नये म्हणून  संयम  नियम पाळणे आवश्यक असताना सर्व नियम धाब्यावर बसवुन बिन दिक्कत खरेदी विक्री चालायची अखेर बेलापूरातील कार्यकर्ते प्रकाश जाजु यांनी या बाबत मा प्रांताधिकारी अनिल पवार यांना दुरध्वनी करुन कळविले प्रांताधिकारी पवार साहेबांनी तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना सुचना केली अन उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल मदने यांनी बेलापूर पोलीसांना गर्दी हाटविण्या बाबत सुचना केल्या त्या सुचने नुसार आज साकाळी नेहमी प्रमाणे भाजी विक्रेते व खरेदीदार यांची गर्दी  झाली अन पोलीसांनी आक्रमक पावित्रा घेतला अनेक मोटार सायकलीच्या हवा सोडून देण्यात आल्या काही गाड्याचे ईंडीकेटर फोडण्यात आले काहींना लाठीचा प्रसादही मिळाला अन काही मिनिटातच हा परिसर सामसुम झाला  पोलीसांनी अशीच भुमिका ठेवावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अवाहना नुसार बेलापूरात वीस अति गरीब कुटुंबाना किराणा व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले -             प्रत्येकाने आपापल्या ईच्छेप्रमाणे गावातील गरीब कुटुंबांना मदत करावी असे अवाहन प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार पाटील यांनी केले होते  त्याच्या अवाहनाला प्रतिसाद देत  महावितरणचे चेतन जाधव मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी व पत्रकार देविदास देसाई यांच्या सहयोगातुन २० कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप सरपंच राधाताई बोंबले पोलीस नाईक गणेश भिंगारदे बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांच्या हस्ते करण्यात आले  मंडलाधीकारी बाबासाहेब गोसावी यांनी गावातील पाच गरीब कुटुंबांना मोफत किराणा देण्याचा निर्णय घेतला ही बाब महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव यांना समजताच त्यांनी गरीब कुटुंबाकरीता पाच हजार रुपयांचा किराणा दिला पत्रकार देविदास देसाई यांनी देखील या उपक्रमात सहभाग नोदविला मंडलाधिकारी गोसावी महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव पत्रकार देविदास देसाई यांच्या सहकार्यातुन वीस  गरीब कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले या वेळी मिलींद दुधाळ पाणी पुरवठा समीतीचे उपाध्यक्ष मनोज श्रीगोड  दिलीप दायमा मनोज क्षिरसागर ज्ञानेश्वर भांड विष्णुपंत डावरे दिपकसा क्षत्रियआदि उपस्थित होते

शिर्डी। जितेश लोकचंदानी ।निवासी संपादक।  सध्या देशात कोरोना मुळे मोठे संकट निर्माण झाले असून महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे, देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात झाले आहेत, त्यामुळे राज्यात  मोठी आपत्कालीन परिस्थिती  निर्माण झाली आहे  ,राज्यात सध्या लॉक डाऊन सुरू आहे ,अशा लॉक डाऊनच्या आपत्कालीन काळात राज्यातील आमजनतेला कोणतीही अडचण भासू नये किंवा काही अडचण असल्यास शासनाला किंवा त्या खात्याशी संबंधित मंत्री सचिव यांच्याशी संपर्क करता यावा म्हणून शासनाने सर्व मंत्री व सर्व जिल्ह्याचे पालक मंत्री व  मुख्य सचिव यांचे मोबाईल नंबर जनसामान्यांसाठी दिले असून सर्वसामान्यांनी जर आरोग्याविषयी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते भरण्याविषयी तसेच नियमित धान्यपुरवठा होण्यासंदर्भात काही अडचणी असल्याबाबत त्वरित खाली दिलेल्या त्या-त्या विभागातील मंत्री, पालकमंत्री सचिव यांच्याशी संपर्क साधावा, अशा आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही अडचण असल्यास आम जनतेने शासना पर्यंत आपले प्रश्न, समस्या या मंत्री,  अधिकारी यांच्या नंबरवर संपर्क  साधावा, त्यामुळे शासनाला अशा अडचणी ,प्रश्न सोडवण्यासाठी त्वरित निर्णय घेता येतील, तसेच प्रत्येकाने कोरेनाचा संसर्ग टाळण्यासाठी व या कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी आपापल्या घरातच या लॉकडाऊनच्या काळात राहून सहकार्य करणे गरजेचे आहे, प्रत्येकाने दक्षता घेऊन व लॉक डाऊन चे नियम पाळून शासनाला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे, हे शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लवकरच या आपत्कालीन परिस्थितीतून आपण बाहेर निघू असा विश्वास राज्य शासना द्वारे देण्यात आला आहे व एका पत्रकाद्वारे जातील आम जनतेसाठी  सर्व पालकमंत्र्यांचे मोबाईल नंबर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासनाने खुले केले आहेत, त्याचा अवश्य व गरजू व्यक्तींनी लाभ घेऊन अडचणी च्या काळात हहसरकारकडे आपले गाऱ्हाणे मांडणे व त्या सोडून घेण्यासाठी प्रयत्न करावा, असे
  फोन नंबर व मंत्री व पालकमंत्री यांची नावे पुढील  प्रमाणे आहेत,
राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांचा लँडलाईन नंबर।022_26590077,022_26590066 असा असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मोबाईल नंबर 985 0051222असा आहे, तसेच शेतकऱ्यांना कर्ज हप्ते भरण्यासाठी काही अडचण आल्यास सहकार विभागाचे ,सचिव श्रीमती आभा शुक्ला यांचा मोबाईल नंबर 9910010807 असा आहे, तसेच अन्नधान्य पुरवठा संबंधी काही अडचण असल्यास अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव श्री महेश पाठक यांचा मोबाईल नंबर 93 23 78 7007  असा त्याचप्रमाणे आरोग्य संदर्भात आम जनतेला काही अडचण असल्यास त्यांनी शासनाशी संपर्क करण्यासाठीh सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव श्री व्यास यांच्याशी9870505956यावर संपर्क साधावा ,त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री यांचे नावे व फोन नंबर पुढील प्रमाणे आहेत,नामदार अजित पवार पुणे(९८५००५१२२२) नामदार असलम शेख मुंबई शहर (९८९२९१५५५७)नामदार आदित्य ठाकरे मुंबई उपनगर(९८२१३५६५२९) आमदार एकनाथ शिंदे ठाणा(९८२०९७५७७९),नामदार अदिती तटकरे रायगड(९८३३१२५३२३) ना,अनिल परब रत्नागिरी(९८२०४१३५०५) नामदार उदय|सामंत सिंधुदुर्ग(९८६०३९०९०९)नामदार दादाजी भुसे पालघर(९४२२०७०५९३) नामदार छगन भुजबळ नाशिक(९९३०३३९९९९) नामदार अब्दुल सत्तार धुळे(९९२२०४३६७) आमदार के सी पाडवी नंदुरबार(९८६९२०३०६०)नामदार गुलाब पाटील जळगाव(९४२२७५८४४)
 नामदार हसन मुश्रीफ अहमदनगर(९८१२४१९४६२) नामदार बाळासाहेब पाटील सातारा(९८२२०५०४४४)ना, जयंत पाटील सांगलीB (९८२१२२२२२८)ना,दिलीप वळसे-पाटील(९८२०२२३९२३) ना,बाळासाहेब थोरात कोल्हापूर(९८५०५५२७७७ ना,सुभाष देसाई औरंगाबाद(९८२१०३७०४०)ना,राजेश टोपे जालना (९६१९१११७७७)नवाब मलिक परभणी (९८६७३५५०१४)श्रीमती वर्षा गायकवाड (७७३८२२३३४५)ना,धनंजय मुंडे(९८५०७७७७७७) ना,अशोक चव्हाण नांदेड (९८१९३२४९९९)ना,शंकराव गडाख उस्मानाबाद (९८२२४३७९९९ना,)अमित देशमुख लातूर (९८२१४७७७७७)यशोमती ठाकूर अमरावती (७७४५०८११११)बच्चू कडू अकोला(९८९०१५३४९१) शंभूराजे देसाई वाशिम (९८२२७७१५५५)ना,राजेंद्र शिंगणे बुलढाणा (९९२११२९६६९)ना, संजय राठोड यवतमाळ (९७६५५९४१११)नितीन राऊत नागपूर (९४२२१०२४३४)सुनील केदार वर्धा( (९४२२१०८३६०)सतीश पाटील भंडारा (९८२३०१२९०५)ना,अनिल देशमुख गोंदिया (९८६९०१०४००)ना,विजय वडेट्टीवार चंद्रपूर(९६६५६९९९९९)ना, जितेंद्र आव्हाड सोलापूर९८२००५५३००)आदी पालकमंत्र्यांचे वरील नंबर असून योग्य व महत्वाचे समस्‍या निर्माण झाली तर आपण या नंबरवर थेट संपर्क करून पालकमंत्री किंवा शासनाकडे आपली अडचण मांडू शकतो, मात्र उगाच किरकोळ अडचणी संदर्भात या संकट समयी पालकमंत्री किंवा शासकीय अधिकाऱ्यांचा वेळ घेऊन टाइमपास करणे योग्य नाही, तरी त्याचीही सर्व आम जनतेने काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget