Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी)  राहाता पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून पोलीस हवालदार अजित पठारे गंभीर जखमी केल्या प्रकरणातील पसार झालेल्या आणखी एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथून अटक केली आहे. अमित उर्फ सुरेंद्र विजय सांगळे (वय- 35 रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.नोव्हेंबरला पोलीस हवालदार रशिद बादशहा शेख व अजित पठारे हे खाजगी दुचाकीवरून राहाता शहरात शासकीय नोटीस बजावण्यासाठी जात होते. दुपारीच्या वेळी चितळे रोडवर गर्दी असलेल्या ठिकाणी दोन इसम तोंडाला रुमाल बांधलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते गंठणचोर असल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांना अडविण्यात आले. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. यात पोलीस पठारे हे गंभीर जखमी झाले होते.पोलिसांनी गावठी कट्ट्यासह आरोपी श्रीरामपुरातील शिरसगावच्या सचिन ताकेला ताब्यात घेतले होते. तर एक आरोपी पसार होता. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पसार आरोपी अमित सांगळे हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, पोलीस हवालदार सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, दत्ता गव्हाणे, संदीप पवार, संतोष लोढे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, संदीप दरंदले, मच्छिंद्र बर्डे, बबन बेरड, सचिन कोळेकर यांनी मिळून तळेगाव ढमढरे येथे सापळा लावून आरोपीस शिताफीने अटक केली. गुन्ह्याबातत त्याने कबूली दिली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली.संगमनेर, राहुरी, लोणीत गुन्हे अटक केलेला आरोपी अमित सांगळे यांच्याकडे पोलिसांनी विचार केली असता इतर ठिकाणी गंठण चोरी केलेल्या गुन्ह्यांची उकल झाली. सांगळे याने गोळीबारात अटक केलेल्या आरोपी सचिन लक्ष्मण ताके यांच्या साथीने संगमनेर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत तीन, राहात्यातील लोणी आणि राहुरीत गंठण चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)  येथील श्रीस्थानकवासी जैन संघाच्या अध्यक्षासह विश्वस्तांवर सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 66 व 67 अन्वये श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरच्या धर्मदाय उपायुक्त श्रीमती हिरा शेळके यांच्यावतीने निरीक्षक ज्ञानेश्वर आंधळे यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली आहे.जैन संघाचे अध्यक्ष रमेश लोढा, विश्वस्त श्रेणिक गुजराणी, रमेश गुंदेचा, विजय चोरडिया, कल्याण कुंकूलोळ, अभय मुथा व सुरेशकुमार गदिया यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आंधळे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, श्री स्थानकवासी जैन संघाच्या वरील विश्वस्तांनी सन 2002 ते 2017 या कालावधित वेळेत हिशोब पत्रके व चेंज रिपोर्ट सादर केले नाही. समाजाने वेळोवेळी मागितलेली माहिती दिली नाही. मनमानी कारभार केला जातो अशी तक्रार प्रविण रिखबदास टाटीया व दीपक हुकूमचंद दुग्गड यांनी केली आहे.तक्रार अर्जावरून धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक वर्षा सुरकुटला यांनी तक्रारीचा चौकशी अहवाल सन 2013 मध्ये सादर केला होता. तक्रारीत तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवून विश्वस्तांनी 1997 पासूनचे हिशोब पत्रके दाखल केलेले नाही. वारंवार नोटिसा पाठवूनही कागदपत्रे सादर केली जात नसलेबाबत अहवाल देऊन गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली होती.अहवालाच्या अनुषंगाने नगर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी वेळोवेळी नोटिसा पाठवूनही श्री स्थानकवासी जैन संघाने खुलासा केला नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडे पत्रव्यवहार करून विश्वस्तांवर कलम 66 व 67 प्रमाणे फौजदारी कार्यवाही करणेबाबत मागणी केली होती.येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी 24 जुलै 2019 रोजी परवानगी दिली. विश्वस्तांचा कार्यकाल पाच वर्षांचा असून कायद्यानुसार बदल झाल्याच्या तारखेपासून 90 दिवसांत अहवाल सादर करावा लागतो. मात्र 2002 पासून 2017 पर्यंत असा अहवाल वेळेत दाखल केला नाही. त्यामुळे विश्वस्त कलम 66 प्रमाणे फौजदारी कायर्र्वाहीस पात्र ठरतात असा निष्कर्ष पुणे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी काढला आहे व कारणे दाखवा नोटीस बजावूनही खुलासा केला नाही.तसेच कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विश्वस्तांवर कलम 66 व 67 प्रमाणे फौजदारी दाखल करण्यास कलम 83 अन्वये परवानगी देण्यात आली त्यानुसार निरीक्षक आंधळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी (तालुका प्रतिनिधी)-राहुरी शहरात काल सोमवारी पहाटे दरोडेखोरांच्या टोळीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना जेरबंद करण्यासाठी पहाटे सव्वातीन वाजता पोलीस पथक गेले. पोलीस पथक पाहताच दरोडेखोरांनी थेट पोलिसांवरच विटांच्या तुकड्यांनी हल्ला चढविला. पोलिसांनी हा हल्ला परतवून लावत चार अट्टल दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने पकडले. मात्र दोन दरोडेखोर पसार झाले. त्यांचा शोध सुरू आहे.दरोड्याचे साहित्य, दोन दुचाकीसह एक लाख 42 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. एका चारचाकी वाहनातून दोघे पसार झाले. सागर गोरख मांजरे (वय 22, रा. पाईपलाईन रस्ता, यशोदानगर जवळ, नगर), अविनाश अजित नागपुरे (वय 20, रा. भिंगार, ता. नगर), काशिनाथ मारुती पवार (वय 37, रा. बजरंगवाडी, ता. संगमनेर), गणेश मारुती गायकवाड (वय 24, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पसार दोन आरोपींची नावे अद्याप समजलेली नाहीत. आरोपींकडून गॅस कटर, एक कमर्शियल एलपीजी सिलेंडर, एक ऑक्सिजन गॅस सिलेंडर, एक तलवार, टॉमी, लोखंडी कटावणी, लोखंडी कात्री, लोखंडी गज, लोखंडी पोखर, लोखंडी सुरा, चार मोबाईल, दोन दुचाकी असे साहित्य जप्त केले.याबाबत माहिती देताना पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी सांगितले की, गोकुळ कॉलनी येथे पहाटे तीन वाजता एका मोबाईल शॉपीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दरोडेखोरांची टोळी उभी असल्याची माहिती राहुरी पोलिसांना समजली. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक यशवंत राक्षे, कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, सुनील शिंदे, सोमनाथ जायभाये, सुशांत दिवटे, रवींद्र मेढे, अमित राठोड, गृहरक्षक दलाचे जवान सतीश कुलथे, ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.दोन दुचाकी, एक चारचाकी वाहन व दरोडेखोरांची टोळी कामगिरीच्या तयारी होती. पोलीस पथकाला पाहिल्यावर जवळच असलेल्या विटांच्या ढिगार्‍यातून विटांचे तुकडे पोलिसांच्या दिशेने फेकून दरोडेखोरांनी धूम ठोकली. मात्र यातील एकास पोलिसांनी पकडले. दरोडेखोरांचा पोलीस पथकाने पाठलाग सुरू केला. एकाला व्यापारी पेठ, एकाला राहुरी खुर्दच्या मुळा नदीवरील पुलाच्या जवळ, एकाला राहुरी फॅक्टरीच्या दिशेने धसाळ पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी पकडले.दरोडेखोरांचा म्होरक्या असलेला सागर मांजरे हा श्रीरामपूर येथील बालाणी यांच्या घरावरील दरोड्याच्या प्रकरणातून दीड महिन्यापूर्वी श्रीरामपूर कारागृहातून सुटलेला आहे. त्याच्यावर श्रीरामपूर, तोफखाना (नगर) व एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत. तीन दिवसांपूर्वी राहुरी एमआयडीसी जवळील सागर गुंजाळ यांच्या दुकानातून गॅस कटर व सिलेंडर चोरल्याची कबुली मांजरे याने दिली. इतर तीन दरोडेखोरांवरील गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असेही पोलिस उपअधीक्षक मदने यांनी सांगितले.

बेलापूर( प्रतिनिधी )- उक्कलगाव शिवारात शेती महामंडळाच्या जमिनीत मनुष्याच्या  हाडाची कवटी सापडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे                    याबाबत मिळालेली माहिती अशी की उक्कलगाव खंडाळा रोडवर शेती महामंडळाची गट नंबर 312 या जमिनीत ही मानवी हाडांची कवटी दिसून आली उक्कलगाव येथील दिलीप मारुती थोरात हे खंडाळा मार्गे उक्कलगावला जात असताना शेती महामंडळाच्या गट नंबर 312 मध्ये रस्त्याच्या कडेला लघवी करण्याकरिता उभे राहिले असता त्यांना तेथे मानवी हाडांची कवटी दिसली त्यानुसार त्यांनी तातडीने बेलापूर पोलीस स्टेशनला खबर दिली घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तसेच बेलापूर पोलिस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदेवे कॉन्स्टेबल पोपट भोईटे निखिल तमनार बाळासाहेब गुंजाळ आदींनी तातडीने  घटनास्थळी भेट दिली ती मानवी हाडाची  कवटी ताब्यात घेतली ही घटना परिसरात समजतात सर्वत्र खळबळ उडाली आहे नेमकी या नेमकी याठिकाणी ही मानवी हाडांची कवटी कशी आली याबाबत तर्कवितर्क केले जात आहे जंगली प्राण्याने हे या कवटीचे माणूस खाल्लेले असून हा घातपाताचा प्रकार आहे किंवा कसे काय याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी देखील  घटनास्थळाला भेट दिली आहे

बुलडाणा- (कासिम शेख) 25 नोव्हे
  रस्ता बांधकाम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या सैलानी येथील घर कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही तर घरातील लाखो रुपयांच्या इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान झाले आहे.
     बुलडाणा जिल्ह्यातील हातणी ते जालना जिल्ह्यातील भोकरदनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या रस्त्याचे काम सुरु आहे.धार्मिक स्थळ सैलानीतून हा मार्ग जात असल्याने सैलानीमध्ये रोडचे खोदकाम सुरु आहे.ठेकेदाराकडून खोदकाम कुठे कमी तर कुठे जास्त करण्यात येत आहे. सैलानी येथील मो.नफीस हाजी मो.अय्यूब यांच्या घराला कोरुन रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर रोजी पूर्ण घरच कोसळला. या घरात गावातील विद्यार्थी अभ्यास करतात. सुदैवाने घर कोसळण्याच्या वेळी घरात कोणीही नव्होता.घरमालक मो.नफीस हे इलेक्ट्रिक कंत्राटदार असल्याने त्यांचे इलेक्ट्रिकचे मोठे साहित्य ठेवलेले होते. घर पडल्याने लाखोंचे पूर्ण सहित्याचे नुकसान झाले.  नुकसान भरपाई देण्याची मागणी मो.नफीस यांनी संबंधिताकडे केली आहे.

   
भाविकांना होत आहे नाहक त्रास

हातणी ते भोकरदनपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरु होऊन बरेच दिवस झाले. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. संपूर्ण रस्ता खोदून ठेवलेला आहे. रस्ता खोदल्याने पावसाळ्यात रस्त्यावर चिखल साचला होता. त्यामुळे चिखली-सैलानी मार्गावरील जड वाहतूक बंद आहे. चिखली आगाराची बससेवा बंद असल्याने अमरावती, नागपूर, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड या भागातून येणाऱ्या भाविकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. वाहतूक बंद असल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येऊ शकत नाही. दरम्यान सैलानी येथे रस्ता बांधकाम करताना घरे कोरुन रस्ता बनविण्यात येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून रविवारी सैलानीत एक घर कोसळले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र घरातील सदस्य घाबरलेले आहेत.


चोरीच्या गौणखनिजचा कामात वापर?

या रासत्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गौणखनिज वापरली जात आहे.या बद्दल विश्वसनीय सूत्राकडून अशी माहिती मिळाली की काही ठिकाणाहुन गौणखनिज मुरुम आनल्या जात आहे पण त्याची रायल्टी कमी ब्रासची काढली आहे तर उत्खनन मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे.सदर रायपुर ते दुधा परिसरातील खोदन्यात आलेल्या ठिकाणचे महसूल विभागाकडून मोजमाप करुण संबंधित ठेकेदारावर कारवाई होने गरजेचे आहे.

अहमदनगर - कोतवाली पोलिसांनी धकेबाज कामगिरी केली आहे. कायनेटिक चौक, इलाक्षी शोरूम मागे, यशोधन हॉटेल जवळ एका खोलीत स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या 17 जणांना रेडहॅन्ड पकडले. यावेळी जुगाराच्या साहित्यासह 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की इलाक्षी शोरुमचे मागे, यशोधन हॉटेलजवळ, एका खोलत तिरट नावाचा जुगार खेळ चालू आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी या ठिकानी छापा टाकला. यामध्ये 17 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर महा.जु.का.कलम ४, ५ प्रमाणे पोकॉ शाहीद सलीम शेख, नेमणुक- कोतवाली पोलीस स्टेशन, यांनी फिर्याद दाखल केली. यामध्ये आरोपी बंडु मिठ्राव दारूनकर वय-४३ रा.वाघमळा, सावेडीगाव.सुशांत संजय फुंदे वय-२८ रा.सुर्यानगर, सनि पॅलेस, पोपट भानुदास मोरे वय-४० रा.अंबिका हॉटेलसमोर,केडगाव, ज्ञानेश्वर मन्छिंद्र दौडकर वयः ३२ वर्षे रा. मारुती मंबिराजवळ, तोफखाना, मुकेश प्रताप कंडारे वय-३१ रा. सर्जेपुरा, जेजेगलली, आरीफ मेहबुब शेख वय-४२ वर्षे रा.शांती कंस्ट्रक्शन, गोंविदपुरा, श्रीकांत धोंडीराम फसले वय-३३ वर्षे रा.दिपनगर, भुषणनगर, केडगाव, प्रशांत रामदास भुसारे वय- २७ वर्षे रा.कापरेमळा,केडगाव,गणेश पोपट लॉढे वय-२९ वर्षे रा.कापरेमळा, केडगान, अनिल वामोवर सातपुते वय-३८ वर्षे रा.शाहूनगर, पारनेर जि.अहमदनगर. पोपट रामभाऊ औटी वय-५८ वर्षे रा. सुतारगलली, पारनेर, इमाम इब्राहीम पठाण वय-६२ वर्षे रा. अचना हॉटेलमागे केडगाव, मनोहर बिश्काथ कोडम वय-४४ वर्षे रा.नित्यसेवा हासिंग सोसा, वसंत टेकडी, सावेडी, किरण बबनराव मुके वय-६७ वर्षे रा.गणेशनगर, कलयाणरोड, सचिन सुरेश दिवाने वय-३३ वर्षे रा.साईराम सोसा, कलगाणरोड, राविन काशिनाथ उदगीरकर वय-३६ वर्षे रा. बालीकाश्रम शाळेच्यमागे,बालीकाश्रम रोड, विजय ज्ञानदेव गायकवाड वय-३० वर्षे रा.बोहरीचाळ, रेलवेस्टेशन,कायनेटीक चौक, हे इलाक्षी शोरुमचे मागे, यशोधन हॉटेलजवळ, एका खोलत तिरट नावाचा जुगार खेळ असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून १,३५,३०० रुपये त्यात १०,३०० रुपये रोख रक्कम व १,२५,००० रुपयांचे मोबाईल व एक करीझमा मोटारसायकल व तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे पत्ते, जुगाराचे साहित्य आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला

पुणे : पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्ररदारांसोबतच गैरवर्तन करत त्यांना धमकवणाऱ्या तसेच लाच लुचपत विभागाने कारवाई व गुटख्याचे गोडाऊन फॊडणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. तर दोन कर्मचारी निलंबित केले आहे. धडक करवाई साठी प्रसिद्ध असणारे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.पोलीस शिपाई हुकूमसिंग रामसिंग भाटी व पोलीस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड अशी पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या कार्मचाऱ्यांची नावे आहेत. तर, पोलीस हवालदार श्रावण प्रभू गुपचे आणि पोलीस नाईक नितीन मधुकर कदम अशी निलंबित केलेल्या कार्मचाऱ्यांची नावे आहेत.हुकूमसिंग भाटी हे मुख्यालयात नेमणुकीस होते. यापूर्वी मुंबईत नोकरीस होते. त्यावेळी २००२ मध्ये त्यांच्यावर मुंबई लाच लुचपत विभागात ४२०, १२० (ब) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचे हे कृत्य विकृत व घृणास्पद असून पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा आणणारे आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. २२ नोव्हेम्बर) अधीक्षक पाटील यांनी त्यांना खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.तर पोपट गायकवाड हे पुणे ग्रामीण पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस होते. दरम्यान मे महिन्यात त्यांना कोल्हापूर येथील एका गुन्ह्याच्या तापासाठी पाठविण्यात आले होते. परंतु, गायकवाड हे गैरहजर राहिले. तसेच परवानगी न घेता अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावी गेले. तेथे साथीदारांच्या मदतीने गुटख्याचे गोडाऊन फोडले आणि ५ लाख रुपयांचा गुटखा बेकायदेशीर रित्या आणून तो विक्री केला. त्यांचे हे कृत्य पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा आणणारे असल्याने त्यांना खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.
तर हवालदार श्रावण गुपचे यांनी दौड पोलीस ठाण्यात कर्तव्यास असताना एका तक्रारदारालाच लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. हा प्रकार जुलै महिन्यात घडला होता. याबाबत त्यांच्यावर दौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची गंभीर दाखल घेऊन पाटील यांनी गुपचे यांना सेवेतून निलंबित केले आहे. तसेच पोलीस नाईक नितीन कदम हे पौड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर असताना मद्यपान केले. त्याचा व्हिडिओ इन्स्ट्राग्रामवर व्हायरल झाला होता. हा प्रकार गेल्या महिन्यात घडला होता. याची शहानिशा केल्यानंतर कदम याना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांना सुरक्षित वातावरण आणि तात्काळ सहकार्य देण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget