Latest Post

सिल्लोड, ता.(04) : धानोरा (ता.सिल्लोड) येथील पूर्णावाडी परिसरातील शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने सोमवार (ता.4) रोजी सकाळी निधन झाले. परतीच्या पावसाने तालुक्यात थैमान घातल्याने जनावरांच्यासाठी असलेला चारा देखील वाहून गेला आहे. मयत झालेले शेतकरी कृष्णा काकडे (वय.38)यांचा प्रपंच दुभत्या जनावरांच्या दुधावरच अवलंबून होता. गेल्या दोन दिवसांपासून ढसाढसा रडत जनावरांना झाडांचा पाला खाऊ घालणारे काकडे प्रचंड तणावाखाली होते. आज सकाळी या काळजीपोटी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांच्या मृतदेहावर शेतवस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

बेलापूर  ( प्रतिनिधी )-- इतर पिकाबरोबरच डाळींब पिकाचेही पंचनामे करुन डाळींब उत्पादकांना नुकसान भरपाई  देण्यात यावी अशी मागणी डाळींब उत्पादक शेतकरी रवींद्र खटोड यांनी केली आहे             पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले पावसाचे पाणी फळ बागामध्ये साचल्यामुळे कालही ठिकाणी  मुळकुज फळकुज तर अनेक ठिकाणी  फुलगळीचे प्रमाण वाढले आहे डाळींबामध्ये प्रामुख्याने जुन मध्ये मृग सप्टेंबर मध्ये हस्त तर जानेवारीत आंबिया आसे तीन बहार धरले जातात सार्वाधिक बहार हा हस्त बहार धरला जातो अन नेमक्या याच बहारामधे अतिवृष्टी झाली आहे सप्टेंबर महिन्यात हस्त बहाराची  छाटणी पानगळ ही कामे केली जातात अनेक शेतकऱ्यांनी हस्त बहार धरला त्यांच्या डाळींबाची चांगली  सेटींगही झाली काहु ठिकाणी  फळ सेटींग चांगली  झिलेली असताना अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी फुल गळती झालेली आहे तयार होत असलेल्या फळामधे पाणी शिरल्याने फळकुजही वाढली आहे बागेत पाणी साचल्याने मुळकुजही वाढली आहे बहार धरल्या नंतर दोन महीन्यात मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे तरी डाळीब शेतीचे पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई  देण्यात यावी अशी मागणी  खटोड यांनी केली आहे

श्रीरामपूर-शहरातील विविध भागातील रस्ते पूर्णपणे उखडले गेले आहेत सर्व रस्त्यावर जागोजागी मोठं-मोठे खड्डे निर्माण झालेले आहे,पावसाचे पाणी या खड्ड्यात जमा होऊन रस्त्यातील साचलेल्या पाण्यामुळे अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले अनेक जीव अपघातात गेले अनेक जन कमी अधिक प्रमाणात अपंग झाले, काही व्यक्ती आजही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत या सर्व प्रकारास घटनेस श्रीरामपूर नगर पालिकेतील सत्ताधारी हेच जबाबदार आहेत,शासनयोजणे अंर्तगत नगरपालिका निधीमधून शहरातील सर्व रस्त्याची देखभाल,दुरुस्ती, डागडुजी,होणे गरजेचे असताना राजकीय द्वेषाने पछाडलेल्या सत्ताधार्यांनी रस्त्याची कामे करण्यास जाणून बुजून टाळले आहे.व आजही टाळत आहेत त्यामुळे शहर वासीयांवर मानव निर्मित आपत्तीने इच्छा नसताना मरणे अपंग होणे हे नशिबी येत आहे व आलेले आहे असा आरोप आम आदमी पार्टी चे जिल्हा अध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी रास्तारोको प्रसंगी केला.
सत्ताधारी मात्र विकासाच्या गप्पा मारण्यात मशगुल आहेत,विकासाचे गाजर दाखवून सामान्य माणसाची नगरपरिषदेने घोर फसवणूक केली आहे देवाज्ञा झालेले व अपंग झालेल्या यांचा तळतळाट श्रीरापमुर नगरपषदेतील सत्ताधाऱ्यांना लागणार आहे असे तालुका अध्यक्ष विकास डेंगळे म्हणाले.
विकासाच्या वल्गना करणाऱ्या नगरपरिषदेला देव सद्बुद्धी देवो आणि शराहतील सर्व रस्त्याची मजबुतीकरण्यासह डांबरी करण त्वरीत होवो नागरिकांची मरणाची वाट पाहू नका तुम्हाला येथेच सर्व फेडावे लागेल,देव तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा कामगार नेते नागेशभाई सावंत यांनी दिला,नगरपालिका सत्ताधार्यांनी शहरातील रस्त्यांचे कामे न केल्या मूळे आज दिनांक 3 -11- 2019 सकाळी 10 वाजता संगमनेर नेवासा रोड बसस्टँड शेजारी रास्ता रोको करण्यात आला होता
शहरातील रस्त्याचे कामे त्वरित न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला.यावेळी महाराष्ट्र सर्वोद्योग कामगार कर्मचारी युनियन,मराठा सेवा संघ, आदी संघटनानी पाठिंबा दिला.

यावेळी रस्त्यावर 3 स्पायडरमॅन कसरत पहिला मिळाले स्पायडरमॅन-लक्ष चोरडीया,राज डेंगळे,वेद भोसले.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी यात आप चे जिल्हा अध्यक्ष तिलक डुंगरवाल,कामगार नेते नागेश भाई सावंत तालुका अध्यक्ष विकास डेंगळे,राहुल रणपिसे,तालुका मीडिया अध्यक्ष प्रविण जमधडे,मराठा स्वयं सेवक संघाचे राजेंद्र भोसले, आम आदमी पार्टी चे राजुभाई शेख,भारत डेंगळे, सलीम शेख,रोहित भोसले,राजेश पाटील,दीपक परदेशी,रोहित भोसले,अक्षय कुमावत,  यशवंत जेठे,हरिभाऊ तुवर,जयेश पाटील,आनंद पाटील,बाबासाहेब गवारेभैरव मोरे,,राजू यादव,अक्षय गिरमे,नितेश हिंगमिरे, रमेश भोरे,देवराज मूळे, राजू राहिंज,दीपक पांचाळ,किरण डेंगळे,सागर देवकर,किरण गायकवाड, देवेंद्र गोरे,अनिकेत धनगे, दीपक वावधने,प्रशांत बागुल,पप्पू जेठे,रोहन उंडे, शाम कांबळे,प्रवीण लगडे ,भागवत बोंबले,देवराज मुळे, राहुल डांगे,बी.एम.पवार,योगेश तांबे,संदीप सिंगटे, राहुल केदार,दिनेश यादव,सुनील धनवटे, सतीश धनवटे,अनिल जाधव ,सचिन जगरवल,अनिरुद्ध कुलकर्णी,आदी कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते


अहमदनगर (प्रतिनिधी) स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून साकत शिवरात(ता.नगर) 3 लाख रुपये रोख रक्कम, घड्याळ, मोबाईल, गॉगल, वॉलेट असा एकुण 3 लाख 76 हजाराचा मुद्देमाल लुटणार्‍या टोळीतील एकाला नगर तालुका पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन तासात अटक केली आहे. समाधान गजानन काळे(वय- 27 रा. दहिगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अद्याप सात जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.शुक्रवारी(दि.01) पुणे येथील व्यापारी संभाजी शिवाजी इंदळकर(वय-44) यांना अनओळखी नंबर वरून फोनद्वारे 3 लाखात अर्धा किलो सोने देतो म्हणून बतावणी केली. यासाठी त्यांना साकत(ता.नगर)येथे एका शेतात बोलवण्यात आले. इंदळकर तेथे येताच 8 जणांनी त्यांच्या जवळील 3 लाख रुपये रोख रक्कम, घड्याळ, मोबाईल, गॉगल, वॉलेट असा 3 लाख 76 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- संक्रापूर  तालुका राहुरी  येथील जाधव वस्तीवर असणार्या विद्युत वाहीनीवर विज पडल्यामुळे ती विद्युत वाहीनी ( डी पी ) जळाली असुन सदर डी पी तातडीने दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे                      परवा रात्री अचानक आकाशात विज चमकली अन जोराचा आवाज झाला अन परिसरातील लाईट गेली दुसर्या दिवशी सकाळी ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचार्या समवेत विज गेल्याचे कारण शोधले असता विज पडून डी पीच जळाली असल्याचे महावितरणच्या कर्मचार्याने सांगितले दोन दिवसापासून येथीला नागरीक अंधारात असुन परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे तरी तातडीने डी पी दुरुस्त करावी आशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे


सिल्लोड, प्रतिनिधी : तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले असून हजारो हेक्टरवरील मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रात्री झालेल्या या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व लहान- मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहिल्या. यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री झालेल्या या पावसाने मागील विक्रम मोडीत काढले. तालुक्यात रात्री सरासरी 78 मि. मी. पाऊस झाला. या पावसात तालुक्यातील काही गावांमध्ये जुन्या घरांची पडझड झाली असून दोन वर्षांपासून कोरडा असलेला निल्लोड प्रकल्प तुडुंब भरला आहे. सिल्लोड शहरातील काही भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. या पावसात धामणी- पिरोळा येथील मेंढपाळांच्या 25 मेंढया दगावल्या आहेत. रात्री झालेल्या या मुसळधार  पावसामुळे नागरिकांनी रात्र अक्षरशः  जागून काढावी लागली.

         तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला असून  शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मका, सोयाबीन, ज्वारी, कपाशी आदी पिकांची अक्षरशः दाणादाण उडाली. तालुक्यात रात्री सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यात सर्वाधिक 100 मि. मी. पाऊस निल्लोड मंडळामध्ये झाला. त्याखालोखाल भराडी 95, बोरगाव बाजार 84, अजिंठा 72, अंभई 69, गोळेगाव 68, आमठाणा 68, तर सिल्लोड मंडळात 67 मि. मी. पाऊस झाला. या पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याने काही माती बांधांना फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. परंतु लोकप्रतिनिधी व नागरिकांनी वेळीच दखल घेत सांडव्याची रुंदी वाढवल्याने संभाव्य धोका टळला.

       गेल्या पंधरादिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मका, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांच्या ऐन सोंगनीच्या हंगामातच पावसाने लावून धरल्याने मकाच्या कणसांना कोंब फुटली आहे, तर कपाशीच्या परिपक्व कैऱ्या कुजत आहेत. गेल्या पंधरादिवसात तालुक्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली असून या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अनेक रस्त्यांवरील वाहतुक ठप्प
रात्री झालेल्या या पावसामुळे अजिंठा- बुलढाणा मार्गावरील रायघोळ नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होती. शिवाय अंभई- उंडणगाव, उपळी- भराडी, केळगाव- आमठाणा, म्हसला- भराडी या रस्त्यावरील पुलांवरुन पाणी वाहत असल्याने काही तास वाहतूक ठप्प होती. सिल्लोड- औरंगाबाद महामार्गावरील बनकिन्होळाजवळील पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी निल्लोड, सताळ पिंप्रीकडून वळवण्यात आली होती.


25 मेंढया दगावल्या


   रात्री झालेल्या या मुसळधार पावसात धामणी- पिरोळा येथील अशोक गोरे, शिवाजी गोरे, सखाराम गोरे या मेंढपाळांच्या 25 मेंढया दगावल्या आहेत. एकीकडे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले, तर दुसरीकडे मेंढया दगावल्याने या मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दगावलेल्या मेंढयाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या मेंढपाळांनी केली आहे. दरम्यान पशुधन अधिकारी, तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला.

धानोरा येथे नागरिकांचे स्थलांतर

 
धानोरा येथील माती बांध तुडुंब भरुन सांडव्यातून पाणी निघाल्याने नदीला पूर आला. यामुळे शेतवस्त्यांवरील घरांना पाणी लागले होते. शिवाय माती बांध फुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेत शेतवस्त्यांवरील नागरिकांना सुरक्षास्थळी हलवण्यात आले होते.

आता ओला दुष्काळ

      सलग दोन- तीन वर्षांपासून कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला होता. यंदा पावसाच्या मेहेरबानीमुळे पिके जोमात आली होती. परंतु ऐन सोंगनीच्या हंगामात परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. यामुळे दोन- तीन वर्षांपासून कोरड्या दुष्काळामुळे, तर यंदा ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.2, परतीचा पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत, शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा, नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल अशी ग्वाही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

परतीच्या पावसामुळे सिल्लोड तालुक्यात झालेल्या नुकसानीची पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोलताना ना. शिंदे बोलत होते.

या दरम्यान शिवसेना सचिव अनिल देसाई, शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार, उदयसिंग राजपूत, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड देवयानी डोंनगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना अटी व शर्ती बाजूला ठेवून पीक विमा काढलेल्या व विमा न काढलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्याची तसेच रब्बी पिकासाठी बियाणे व खते मोफत देण्यात यावे, जनावरांना आता दावणीवर चारा उपलब्ध करण्याची मागणी केली.

यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांचे पूर्ण नुकसान झालेले आहेत. विमा कंपनी यांना नुकसान भरपाई देण्यासाठी फार किचकट अटी न लावता नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जितके नुकसान तितके भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना रब्बीसाठी मदत तसेच जनावरांना चारा देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शिंदे यांनी दिली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget