January 2023

श्रीरामपूर - नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, फळांचे सुप्रसिद्ध व्यापारी हाजी जावेदभाई ईस्हाकभाई बागवान यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक हाजी मुजफ्फर पापाभाई, हाजी अंजुमभाई शेख, मुक्तार शाह, नगरसेविका जायदाभाभी कुरेशी, कलीमभाई कुरेशी,मुन्ना पठाण, कुरेशी जमात अध्यक्ष महेबूब कुरेशी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तरन्नुम मुनीर शेख, माजी अध्यक्ष रज्जाकभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते मुक्तारभाई मणियार, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अकिल सुन्नाभाई शेख,रियाज पठाण, अशपाक शेख,माजी नगरसेवक याकूबभाई बागवान, नजीर मुलानी, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई चौधरी, गफूर शाह, किशोर शिंदे,हाजी जलिल काझी,डॉ.राज शेख, सरवरअली मास्टर,अहमद शाह, शरीफ मेमन, रियाज बागवान, गनी टिनमेकर, जाफर शाह, तक्वा मशिदीचे मौलाना साहब, सादिक शेख, मुनीर दादामिया शेख, गुलामरसूल बाबा, फिरोज शेख,भैय्या आत्तार, हैदर बागवान आधी प्रमुख कार्यकर्त्यांसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची वाहवा मिळविली यावेळी जावेद बागवान यांच्यातर्फे तिन्ही शाळेतील मुलांना मिठाई वाटप करण्यात आले. शाळा क्रमांक चार व शाळा क्रमांक नऊ चे विद्यार्थी व शिक्षक देखील या कार्यक्रमात सहभागी होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक सर्वश्री फारुक शाह, वहिदा सय्यद, नसरीन ईनामदार, शाहीन शेख, अस्मा पटेल, निलोफर शेख, बशिरा पठाण, आसिफ मुर्तुजा, मिनाज शेख, एजाज चौधरी, जुनेद काकर, यास्मिन पठाण, रिजवाना कुरेशी, रेश्मा सय्यद, रिझवाना बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर बु ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती वर्षाचे औचित्य साधून गावकरी मंडळाच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील  चषक खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन प्रथम क्रमांकास रुपये ५१ हजार  द्वितीय क्रमांकास रुपये ४१ हजार तृतीय क्रमांकास रुपये ३१ हजार चतुर्थ क्रमांकास रुपये २१ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली असल्याची माहीती मा .जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली आहे.                              गावकरी मंडळाच्या वतीने खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन दिनाक ४ व ५ फेब्रुवारी रोजी या स्पर्धा भरविण्यात येणार आहे  या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघास गावकरी मंडळाच्या वतीने ५१ हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या संघास चव्हाण कन्स्ट्रक्शन श्रीरामपुर यांच्या वतीने ४१ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकाच्या संघास सुरेश शिंदे बेलापुर यांच्या वतीने ३१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे चतुर्थ क्रमांकाच्या संघास सामाजिक कार्यकर्ते शफीक आतार यांच्या वतीने २१ हजार रुपयाचे बक्षिस देण्यात येणार आहे  तसेच उत्कृष्ट संघास बाळासाहेब दाणी यांच्याकडून ५१००रुपये रोख तर उत्कृष्ट चढाई पटुस देवा गृपच्या वतीने ५१०० रुपये बक्षिस देण्यात येणार आहे साई फर्निचर रामगड यांच्या वतीने उत्कृष्ट पकडपटु करीता ५१०० रुपये तर कृष्णा कलेक्शनच्या वतीने  उत्कृष्ट खेळाडूस ५१०० रुपये अशी बक्षिसे  ठेवण्यात आलेली आहे.स्पर्धेसाठी रुपये ७०० प्रवेश फी ठेवण्यात येणार आहे.सामने दिवस रात्र खेळविण्यात येणार असुन स्पर्धा मँटवर खेळवीली जाणार आहे स्पर्धेत भाग घेवु ईच्छिणाऱ्या संघानी शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी दुपारी एक वाजेपर्यंत रिपोर्टींग करणे आवश्यक असेल खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकाकडून केली जाणार असुन एका खेळाडूस एकाच संघात खेळता येईल तसेच पंचाचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनीश्री. अनिल पटारे सर मो.९४२२२९०३९३,श्री.गिताराम पवार सर

मो.९४०३७०१००७,श्री. सतिश सोनवणे मो.८९८३६३६३८३,श्री. बंटी शेलार मो.९८३४३८०९३५,

श्री.मयुर जाधव मो.९३७०८४४८९६,

श्री.विकी अमोलिक मो.८३२९३७५४१९,

श्री.मोईन शेख मो.७३५०२३३०१५ यांच्याशी संपर्क करावा.

तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभागी व्हावे आसे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तसेच गावकरी मंडळ यांनी केले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) तालुक्याच्या ग्रामीण भागात मुंबई - पुणे सारख्या दर्जाचे शिक्षण  देऊन भविष्यातील आवाहनाला समर्थपणे सामोरे जाण्याची आणि त्याद्वारे व्यक्तिमत्वाचा विकास साधण्याची संधी न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलने उपलब्ध करुन दिली. त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान युगात काळाबरोबर अधिकाधिक वेगाने पुढे जाऊन दर्जेदार शिक्षणाची परंपरा अविरत सुरू ठेवावी असे आवाहन शिवसेना खा. सदाशिव लोखंडे यांनी केले.

बेलापूर - एकलहरे येथील न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळया प्रसंगी अध्यक्षीय भाषणात खा. लोखंडे बोलत होते. यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सौ.प्रितीताई कदम,व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. स्वाती कोयटे, संदीप कोयटे, विद्यालयाचे संस्थापक अनिल न्याती, सचिव राकेश न्याती, मुकेश न्याती, शाळा समिती सदस्या सौ. कोमल न्याती, सौ. वैशाली न्याती, शैक्षणिक संचालक धनेश गांधी, उपप्राचार्या सोनल चोबे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना सौ. प्रितीताई कदम यांनी विद्यार्थी- शिक्षक आणि पालक यांच्यातील दृढ संबंधांचे शिक्षणावर होणाऱ्या परिणामांचे महत्व विषद केले. तर सौ. स्वाती कोयटे यांनी भविष्यातील शैक्षणिक बदल आणि आव्हाने यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सौ. कोमल न्याती यांनी विद्यार्थ्याना शिक्षकां बरोबरच पालकांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांनी मंथन या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित समुद्र मंथन आणि विचार मंथन हा गाभा मानून लघुनाट्य,गीत, संगीत आणि नृत्य अशा विविध प्रभावी सादरीकरणातून विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपली संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवून उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना विविध क्षेत्रातील नैपुण्य संपादीत केल्याबद्दल पारितोषिके देउन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती राजश्रीताई ससाणे, उद्योजक नगरसेवक श्रीनिवास बिहानी, राजन चुग, संजय छल्लारे, काँग्रेस नेते हेमंत ओगले,लायन्स क्लबचे अध्यक्ष चेतन भुतडा, रोटरी क्लबचे अध्यक्ष ऋषिकेश बनकर, माजी जी.प.सदस्य शरद नवले, विराज राजे भोसले,बेलापुर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत  लढ्ढा , शांतीलाल हिरण, बेलापूर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले, एकालहरे ग्रा. पं. सदस्या सौ. अनिसा शेख, उक्कलगाव ग्रा. पं. सरपंच नितीन थोरात, बेलापूर ग्रा. पं. सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते.

संस्थापक अनीलजी न्याती व काका कोयटे यांनी प्रारंभी स्वागत केले. तर सचिव राकेश न्याती यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक वृंदानी परिश्रम घेतले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-महाराष्ट्र राज्याचे माजी गृह मंत्री स्वर्गीय आर. आर. (आबा) पाटील यांच्या नावाने दिला जाणारा सन २०२१-२२ चा मानाचा आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून बेलापूर बु., ता. श्रीरामपूर ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक (विभागून) प्राप्त झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतीना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे या पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये (विभागून) व मानचिन्ह असे आहे. स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त गावाची यादी नुकतीच अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जाहीर केला आहे.

बेलापूर बु., ग्रामपंचायतीस १०० वर्ष पूर्ण झाली असून शतकपूर्ती वर्ष साजरे होत आहे. शतकपूर्ती वर्षात ग्रामपंचायतीस पुरस्कार प्राप्त झाला असुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून गावात चौक सुशोभीकरण, भूमिगत गटारी, जॉगिंग ट्रॅक, नाव घाट सुशोभीकरण, १२६ कोटी खर्चाची पाणी पुरवठा योजना आदी विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम तसेच आरोग्य शिबिरे यांचे आयोजन करण्यात येत आहे.तसेच दिपावली निमित्त आपली खरेदी आपल्या गावातच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला होता  याचीच दखल घेत ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्रामपुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारा बद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच ,अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात, अवैध गावठी व हातभट्टी दारू व्यवसाय सुरू असल्याने. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी,स्थानिक गुन्हे शाखेस,अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसाया विरोधात कारवाईची आदेश दिल्याने. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी, तात्काळ कारवाईसाठी पथक रवाना करून. राहाता, कोपरगाव परिसरात सुरू असलेल्या. अवैध गावठी हातभट्टी दारू विरोधात कारवाई करत,१ लाख ६ हजार  रुपये किमतीचे, अवैध गावठी हातभट्टीची साधने. तसेच १९०० लिटर कच्चे रसायन व  ११० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू साठा नष्ट केला असून. या प्रकरणी हिरामण रावसाहेब पवार, राहणार वारी कोपरगाव, दयानंद वामन गायकवाड राहणार वारी कोपरगाव,म्हाळू जयराम बर्डे, राहणार शिंगवे तालुका राहाता, यांच्या विरुद्ध. महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचना व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर,पोलीस नाईक शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, राहुल सोळुंके, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव आदींच्या पथकाने आज पहाटे केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- अवघ्या चार तासात शहर पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक करुन १ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अरबाज इजाज बागवान, सर्फराज बाबा शेख असे या आरोपींचे नावे आहे. त्यांच्यावर यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, लासलगाव पोलीस ठाण्यात दोघांवर एकूण 15 गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १६) येथील रोहित सचिन मैड हा रात्री ८ वाजेच्या सुमारास रामनगर ते साईनगर कच्चा रस्ता वॉर्ड नं.1 येथुन त्याच्या कडील दुचाकीवर जात असताना त्याला दोन अनोळखी इसमांनी रस्त्यात अडवुन, त्याच्या गळ्याला
धारदार चाकु लावत मारहाण केली. तसेच त्याच्याकडील चांदीची चैन, चांदीचे ब्रेसलेट, ३ हजार रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्डसह त्याची दुचाकी बळजबरीने चोरुन पसार झाले होते.याप्रकरणी रोहित सचिन मैड याने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास येथील शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक जीवन बोरसे हे करीत असताना, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा अरबाज इजाज बागवान (वय-२३, रा.संजयनगर, वॉर्ड नं.२) व सर्फराज बाबा शेख (वय २०, रा.बीफ मार्केट जवळ, वॉर्ड नं.२) यांनी केला आहे. म्हणुन पो.नि. हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ तपास पथक रवाना केले. श्रीरामपूर पोलिसांनी सापळा लावुन शिताफिने पाठलाग करुन दोन्ही आरोपींना अवघ्या चार तासात पकडले.
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपीना दाखल गुन्ह्यात अटक करुन न्यायालयासमोर काल बुधवारी (दि.१८)
हजर केले असता न्यायालयाने आरोपीना पुढील ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडुन लाल रंगाची दुचाकी, ॲपल कंपनीचा आय फोन, १२०० रुपयांची रोख रक्कम, चांदीचे तीन भाराचे चैन व ब्रेसलेट, फिर्यादीचे आधारकार्ड व पॅनकार्ड, एक चाकु असे एकुण १ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या सुचनेनुसार स.पो.नि. जीवन बोरसे, पो.ना. रघुनाथ कारखेले, पो.कॉ. गौतम लगड, पो.कॉ. राहुल नरवडे, पो.कॉ. रमिझराजा अत्तार, पो.कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. मच्छिद्र कातखडे, पो.कॉ. भारत तमनर, पो.ना. फुरकान शेख व पो. कॉ. प्रमोद जाधव यांनी केली. गुन्ह्याचा अधिक तपास स.पो.नि. जीवन बोरसे हे करीत आहेत.


श्रीरामपूर : यावेळेची मोठी बातमी हाती आलीय. ज्यात श्रीरामपूर एमआयडीसी तील दत्तनगर ते वाकडी रस्त्यावररील, यशवंतबाबा चौकी पासून  काही अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात अंदाजे ३५ वर्षीय युवकांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून. दगडाखाली ठेचून युवकाचा खून केल्याची प्राथमिक माहिती  समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी दोन्ही अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन. मृतदेह व परिसराची पाहणी करून,युवकाच्या हत्येसंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याने. सहाय्यक पोलीस निरीक्षक मगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे,पोलीस नाईक मच्छिंद्र शेलार, रघुवीर कारखीले, पोलीस कॉन्स्टेबल खरात, गुंजाळ, गुन्हे अन्वेषण विभागाचे राहुल नरवडे, गौरव दुरगुळे,गौतम लगड, बाळासाहेब गिरी, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फुरखान शेख,प्रमोद जाधव, बिरप्पा करमल आदी पोलीस कर्मचा-यांनी,मृतदेह व परिसराचा पंचनामा करून, मयत युवकाचा मृतदेह शवविच्छेदना करीत पाठवला असून. मयत युवक कोण व कुठला, व कशामुळे त्याचा खून झाला याबाबत शहर पोलीस  पुढील तपास करीत आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी )-बेलापुर बु ग्रामपंचायत निवडणूकीत अनुसुचित जमाती महिला या जागेवर निवडून आलेल्या सुनिता राजेंद्र बर्डे यांचे जात प्रमाणपत्रच रद्द झाल्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द ठरविल्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसलै यांनी काढला असुन या निकालामुळे जनता विकास आघाडीला धक्का बसला आहे.  बेलापुर ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२१ मध्ये झाली होती त्यात प्रभाग क्रमांक  चार मधुन अनुसुचित जमाती महिला जागेकरीता गावकरी मंडळाच्या वतीने सौ.कमल भगवान मोरे तर जनता विकास आघाडीच्या वतीने सौ.सुनिता राजेंद्र बर्डे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत सौ कमल भगवान मोरे यांचा पराभव झाला. या निवडणूकीत जनता विकास अघाडीला सहा जागा तर गावकरी मंडळाला अकरा जागा मिळाल्या होत्या या वेळी सौ कमल मोरे यांनी जात पडताळणी कार्यालय नाशिक येथे अर्ज करुन बर्डे यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्यामुळे जात पडताळणी देवु नये अशी मागणी केली होती. सौ.मोरे यांच्या अर्जाची दखल घेवुन तो अर्ज चौकशी कामी उपविभागीय कार्यालय श्रीरामपुर येथे पडताळणीसाठी पाठविण्यात आला.श्रीरामपुर येथील उपविभागीय अधिकारी यांना जातीच्या दाखल्या सोबत जोडलेले पुरावे चुकीचे असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे उपविभागीय कार्यालयाने सौ. सुनिता बर्डे यांचे जात प्रमाणपत्र दिनांक १०आँक्टोबर २०२२ रोजी  रद्द केले व तसा चौकशी अहवाल जातपडताळणी कार्यालयास कळविला तसेच राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र आदेश क्र/रानिआ/मनपा/२००७ / प्रक्र६ /क-५दिनाक ३ आँक्टोंबर २००७ मधील मुद्दा क्रमांक ३ नगरपरिषद व नगर पंचायत व ग्रामपंचायत यांच्या बाबतीत ज्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे त्यांच्या बाबतीत अनर्हतेचे आदेश जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचे कळविल्यापासून त्वरीत व जास्तीत जास्त १५ दिवसाचे आत सदस्यत्व रद्द करुन संबधीताना बजवावा कुठल्याही सदस्याचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास ते तात्काळ जिल्हाधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे त्या नुसार जात पडताळणी कार्यालयाने ते पडताळणी देणे शक्य नसल्याचे कळविले.सौ.बर्डे यांचे जात प्रमाणापत्रच रद्द झाल्याने जिल्हाधिकारी डाँक्टर राजेंद्र भोसले यांनी त्यांचे ग्रामपंचायत सदस्य पदच रद्द केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी): आज दि.16/01/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना वडगाव पान ता. संगमनेर येथे  सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने  वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली.  त्यावरून सदर ठिकाणी  बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन एक परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.आरोपी नामे प्रतिक उत्तर आणि एक महिला आरोपी अशा दोघां विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गु. र.नं.23/2023, महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला  पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर  Dysp संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली PI राजेंद्र भोसले,   𝙰𝚙𝚒 ठाकरे, पो.हे .का.सुरेश औटी पो.ना.निलेश मेटकर,पो.ना.दिपक रोकडे,पो.कॉ लगड,पो.कॉ नितीन शिरसाठ, म.पो.कॉ वाकचौरे यांनी केली.*

श्रीरामपूर (प्रतिनिधी): श्रीरामपूर आरटीओ कार्यालय वतीने रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.या मार्गदर्शन सत्रासाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुरेश शिंदे व हेमंत निकुंभ उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निकुंभ म्हणाले की, अपघात टाळण्यासाठी आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. सर्व नागरिकांनी रस्त्यावर चालताना उजव्या बाजूने चालावे त्याने देखील अपघात तळतील. तसेच रस्त्यावर गाडी उभी करताना व गाडीचा दरवाजा उघडताना आपण मागे बघून दुसरे वाहन येत नसल्याची खात्री करावी मगदरवाजा उघडावा. रस्ता ओलांडताना आधी उजव्या, डाव्या मग उजव्या बाजूला बघून रस्ता ओलांडावा, नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे असे ते पुढे म्हणाले. यावेळी शिंदे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की रस्त्यावर होणाऱ्या अपघात व मदत कार्य कसं करावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अनेक नियम त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.यावेळी प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक हेमंत सोलंकी यांनी सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज त्रिपाठी तर आभार रत्नप्रभा पाटील यांनी व्यक्त केले.

बेलापूर -- काही दिवसांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध धार्मिक स्थळांवरील लाऊड स्पीकर चा कर्ण  कर्कश्य  आवाज आणि  त्यांचा कायदेशीर वेळे व्यतिरिक्त होणारा वापर याविषयी पो. नि. हर्षवर्धन गवळी यांना निवेदन दिले होते. या संदर्भात पोलिसांनी संबंधितांना नोटीसाही दिल्या होत्या..

त्याच पार्श्वभूमीवर बेलापूर येथे एका लाऊड स्पीकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरून लाऊड स्पीकर चालक सोमनाथ साळुंके यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपीने कर्ण कर्कश्य  आवाजात लाऊड स्पीकर वाजवून माननीय सर्वोच्च न्यायालयाचे, लाऊड स्पीकर चा आवाज आणि तो वाजवण्याची वेळ, याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि जनतेस पीडा उत्पन्न होईल असे वर्तन केले असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी आहे. तसेच लाऊड स्पीकर चा आवाज किती डेसिबल पर्यंत असावा याचीही मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहे. यासंदर्भात विविध धार्मिक स्थळांना नोटिसा देण्यात येऊन समज दिलेली आहे सदर कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती बेलापूर औट पोस्टचे हवालदार अतुल लोटके यांनी दिली असुन अशा प्रकारे रात्रीच्या वेळेस मोठा आवाज लावुन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईत सातत्य ठेवावे अशी नागरीकाची मागणी आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून तालुक्याला दिशा देण्यासाठी आता पत्रकारांनी पुढे येण्याची गरज आहे.माजी आमदार कै.जयंत ससाणे हे नेहमी पत्रकारांना आपले मित्र मानत होते. त्यांनी पत्रकार दिनी या शहरांमध्ये पत्रकारांच्या सत्काराची परंपरा सुरू केली. ही परंपरा करण ससाणे यांनी चालू ठेवली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देत श्रीरामपूरचा विकास आणि श्रीरामपूर जिल्हा कधी होणार या प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली.

निमित्त होते अपूर्वा हाल येथे करण ससाणे मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या सत्कार समारंभाचे.

यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीमती राजश्रीताई ससाणे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब दिघे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील बोलके, दत्तात्रय सानप, रमण मुथा,

ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, संपादक करण नवले,दिलीप नागरे, सुधीर नवले आदिंसह शहर व तालुक्यातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी आणि काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषणात माजी नगराध्यक्ष संजय फंड यांनी आज श्रीरामपूरला कोणी वारस राहिलेला नाही. श्रीरामपूरच्या विकासासाठी कोणी पुढे येत नाही. याबद्दल खंत व्यक्त केली. तोच धागा पकडून ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांनी पुढे कोणी यायचं असा प्रश्न उपस्थित करीत आता तुम्हीच नेतृत्व करा आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत असे त्यांना सांगितले.

श्रीरामपूर जिल्हा व्हावा म्हणून जी चळवळ ज्या वेगाने चालवायला पाहिजे ती सध्या मंदावल्यासारखी वाटते. शहरांमध्ये येणारे शासकीय अधिकारी सध्या आपल्या मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. चार दोन लोक जाऊन अधिकाऱ्याचा सत्कार करतात. त्यामुळे ते डोक्यावर बसतात. नगरपालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राजवट असल्याने तिथे काय चालले कुणालाच कळत नाही. शहरांमध्ये अतिक्रमणे वाढत आहेत. दिवसाढवळ्या मूळ जागा मालकांच्या जागेमध्ये अतिक्रमणे होत आहेत. गुन्हेगारी मध्ये मोठी वाढ झाली आहे. शहर व तालुक्याचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी राजकीय पक्षाचे लोक कमी पडत आहेत अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, करण नवले, ज्ञानेश गवले, भाऊसाहेब काळे, नागेशभाई सावंत आदिंनी वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

 प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड यांनी शहरातील पत्रकार भवनाचा प्रश्न नजीकच्या काळात मार्गी लागणार आहे. खासदार राजीव शुक्ला यांच्या दहा लाख रुपयांच्या निधीतून पत्रकार भवनाचे बरेचसे काम झाले आहे. उर्वरित काम आमदार लहूजी कानडे यांच्या निधीतून मार्च एंड पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली.

यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी कै. जयंत ससाणे साहेब व पत्रकार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख करत पत्रकारांनी विरोधात बातमी छापली म्हणून ससाणे साहेब कधीही नाराज झाले नाहीत. उलट त्यांनी ती बातमी सकारात्मक दृष्टीने घेऊन मूळ प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. शिर्डी संस्थानच्या माध्यमातून देखील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावला. पत्रकारांनी केलेल्या बहुमोल सूचनांची ते दखल घेत असत तसेच शहर व तालुक्याच्या विकासासाठी नेहमी पत्रकारांशी चर्चा करीत होते. आज शहरांमध्ये अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार अनिल पांडे, महेश माळवे,गौरव साळुंके,शिवाजी पवार, सुनील नवले, प्रकाश कुलथे,सलीमखान पठाण,रणजीत श्रीगोड, बरकतअली शेख, भारतीताई परदेशी, रियाज पठाण, विठ्ठल गोराणे आदिंसह तालुक्यातील पत्रकार व ससाणे मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-कोरोना काळातील अधिकचे मोफत धान्य शासनाने एक जानेवारी पासुन बंद केले असुन आता कार्डधारकांना वर्षभर माणशी पाचच किलो धान्य मोफत दिले जाणार आहे मोफत धान्य वाटपामुळे आपला दैनंदिन खर्च कसा भागवावा अशा विवंचनेत स्वस्त धान्य दुकानदार सापडले आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात केद्र सरकारने पंतप्रधान  गरीब कल्याण योजनेंतर्गत माणशी पाच किलो धान्य मोफत देण्याचा धाडसी निर्णय घेतला होता त्यामुळे विकतचे पाच किलो धान्य तर मोफतचे पाच किलो धान्य असे दर माह  माणशी दहा किलो धान्य दिले जात असे आता एक जानेवारी पासुन शासनाने माणशी पाचच किलो धान्य देण्याचे जाहीर केले असुन ते धान्य वर्षभर मोफत दिले जाणार आहे जिल्ह्यात १८०० धान्य दुकानदार असुन राज्यात ५५००० रेशन दुकानदार आहेत .धान्य मोफत वितरण करण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे आता दुकानदारांना धान्याकरीता पैसेच भरावे लागणार नाही तसेच कार्डधारकाकडून पैसेच घेता येणार नाही त्यामुळे आता दुकान भाडे विज बिल दैनंदिन खर्च घर खर्च  कसा भागवायचा असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे .दुकानदारांना धान्य वितरणामागे क्विंटलला दिडशे रुपये कमिशन दिले जात असुन त्यात वाढ करण्यात यावी तसेच धान्य वितरणाचे कमिशन दर महा दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली आहे .

बेलापुर ( प्रतिनिधी  )-कृषि प्रदर्शन अँग्रो वर्ल्ड २०२३ चा कृषि उद्योजक पुरस्कार सेंद्रिय व वैदिक शेतीचे पुरस्कर्ते साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांना प्रदान करण्यात आला                                   दिनाक ६ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान नाशिक येथील डोंगरे वसतीगृह मैदानात कृषि प्रदर्शन भरविण्यात आले होते या वेळी कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सेंद्रिय  व वैदीक शेतीचे पुरस्कर्ते साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांना खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते अँग्रो वर्ल्ड कृषि उद्योजक २०२३ हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे रासायनिक खते वापरुन मृत झालेल्या जमिनीला , शेतीला संजिवनी देण्याचे कार्य राम मुखेकर यांनी साँईल चार्जर टेक्नाँलाँजीच्या माध्यमातून सुरु केले अथक परिश्रमातून व संशोधनातून त्यांनी नैसर्गिक शेतीचे धडे शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली पूर्व परंपरागत शेती सोडुन जास्त उत्पादन घेण्याच्या नादात रासायनिक खते वापरुन शेती निर्जीव झाली त्या शेतीला कशाची गरज आहे यावर संशोधन करुन शेतकऱ्यांना वैदीक शेतीचे तंत्रज्ञान अवगत करुन दिले  रासायनिक शेती बंद करुन सेंद्रिय वैदीक शेती पिकवा आपले अन पुढील पिढीचे रोगापासून, आजारापसून संरक्षण करा रोगावर खर्च करण्याआगोदर पिकाच्या पोषणावर भर द्या पिकाला असलेल्या कमजोरीमुळे रोग येतो पिकाला पोषण भरपुर ताकद दिली तर रोगच येणार नाही  अशी त्यांची शेतकऱ्यांना शिकवण आहे शेतकऱ्यांच्या बांधावार जावुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची राम मुखेकर यांची पद्धत आहे आज महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील ईतर राज्यातील शेतकरीही आता वैदीक सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत राम मुखेकर यांच्या या कार्याची दखल घेवुन अँग्रो वर्ल्ड संस्थेच्या वतीने त्यांना या वर्षीचा कृषि उद्योजक पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे .

कोपरगाव(गौरव डेंगळे)विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी, यासाठी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव विविध स्पर्धा परीक्षांची दालन नेहमीच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत असते.या विद्यालयाचा विद्यार्थी कुमार अथर्व देवराम खेमनार याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी दिनांक ३१जुलै २०२२) ९१.६१% गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर आयोजित सी व्ही रमण या परीक्षेत अथर्वने राज्यात चौथा क्रमांक मिळविला. तसेच ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक लेखी परीक्षेत अथर्व खेमनर याने यशस्वी होऊन चमकदार कामगिरी केली असून पुणे येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी त्याची निवड झाली आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शारदा विद्यालयाच्या इयत्ता पाचवीच्या  कुमारी स्वरा दत्तू शिंदे ७४.८९%, कुमारी सृष्टी नितीन वावधने ७१.१४ % आणि कुमारी ग्रीष्मा शरद कांबळे ६८.५५% या विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे शारदा विद्यालयाच्या या विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला. त्यांच्या या उत्तुंग भरारी बद्दल शाळेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री सुहास गोडगे, माननीय प्राचार्य श्री के एल वाकचौरे आणि सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बेलापुर  (प्रतिनिधी )-नेताजी सोशल फाउंडेशन यशवंत शिक्षण सेवा मंडळाच्या वतीने दिला जाणारा श्री श्री १०८ स्वामी रामदासजी महाराज  समाज भूषण पुरस्कार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बेलापुर येथील धडाडीचे कार्यकर्ते अरुण पा नाईक यांना तर डाँक्टर सोपानराव वाघचौरे यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहीती फाउंडेशनचे

अध्यक्ष रणजीत बनकर यांनी दिली आहे.सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना नेताजी सोशल फाउंडेशन यशवंत शिक्षण सेवा मंडळाच्या वतीने दर वर्षी श्री  श्री १०८स्वामी रामदासजी महाराज समाज भूषण व जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते  संस्थेचे पुरस्कार वितरणाचे हे सलग दहावे वर्ष आहे श्री श्री स्वामी रामदासजी महाराज हे गेली ३८ वर्षापासून बारा महीन्यातुन एक महीना पढेगाव येथे वास्तव्यास राहतातया एक महीन्याच्या काळात ते धार्मिक व समाज प्रबोधनाचे काम करतात हीच प्रेरणा घेवुन नेताजी सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी स्वामीजींच्या नावाने समाज भूषण व जिवन गौरव पुरस्कार देण्याची संकल्पना सुरु केली पढेगाव व स्वामीजींचा संपर्क असलेल्या गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना समाज भूषण व जिवन गौरव पुरस्कार सुरु करण्यात आलेले आहे या वर्षीचा समाज भूषण पुरस्कार सामाजिक  व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक यांना जाहीर झाला असुन पशु वैद्यकिय क्षेत्रात अविरतपणे कार्य करणारे डाँक्टर सोपानराव वाघचौरे यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उक्कलगाव येथील ह भ प उल्हास महाराज तांबे कृषि क्षेत्रात कार्य करणारे लक्ष्मण बंगाळ तसेच धार्मिक व अध्यात्मीक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे ह भ प अमोल महाराज बडाख व युवा उद्योजक चंद्रशेखर गोरे यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे तर पशु वैद्यकिय क्षेत्रात कार्य करणारे डाँक्टर सोपानराव वाघचौरे व आदर्श माता म्हणुन ग भा   ताराबाई काळे यांना जिवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी मंगल कार्यालय हनुमान मंदीर पढेगाव येथे सकाळी दहा वाजता श्री श्री १०८ स्वामी रामदासजी महाराज यांचे शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याची माहीती नेताजी सोशल फाउंडेशन यशवंत शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष रणजीत बनकर वतीने देण्यात आली असुन या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- विदेशात वैद्यकीय शिक्षणघेतल्यानंतरही भारतात मेडिकल प्रॅक्टीस अर्थात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी एफएमजीई(विदेशी चिकित्सा स्नातक परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. मात्र, ही परीक्षा पास न होताच औरंगाबाद येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तालुक्यातील देऊळगाव माळी येथील एका डॉक्टरवर केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने छापे घालून त्यांच्याकडून दस्तावेज जप्त केलेत.तसेच, कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली आहे. देशभरातील ७३ डॉक्टर्सवर ही कारवाई करण्यात आली असून, त्यात मेहकर येथील डॉ. विनायक अभिमन्यू मगर यांच्या औरंगाबाद येथील दवाखान्यावर देखील छापा घालण्यात येऊन, दस्तावेज व सामग्री जप्त करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच मोठमोठे शहरांमध्ये मुन्नाभाई डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे नुकताच अहमदनगर जिल्ह्यात नेवासा या ठिकाणी नेवासा फाट्यावर श्वास हॉस्पिटल याला देखील आपल्याकडील योग्य ते दस्तावेज आठ दिवसात दाखल करावे या करीता पंचायत समिती आरोग्य अधिकारी यांनी नोटीस बजावली होती मात्र त्यानंतर देखील दवाखाना सुरू असल्याचं वृत्तवाहिन्यांनी वर बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि पंचायत समिती अधिकारी आरोग्य अधिकारी यांचे दाबे दणाणले त्यांना त्या क्षणी जाग आली आणि पुन्हा नोटीस बजावण्यात आली व श्वास हॉस्पिटल यास सील करण्यात आले अशाच अनेक मुन्नाभाई डॉक्टरांवर आता सीबीआयची कारवाई होणार याकरिता आता बोगस डॉक्टरांचे धावपळ झाली आहे या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे. याप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या १४ मेडिकल काउन्सिल्सलादेखील चौकशीच्या घेऱ्यात घेतले आहे.

बेलापूर (वार्ताहर) येथील नाभिक समाज संघटनेच्या वतीने शहीद भाई वीर कोतवाल यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. वीर भाई कोतवाल चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, रवींद्र खटोड, सुधीर नवले, शरद नवले, भरत साळुंके, चंद्रकांत नाईक, प्रसाद खरात , वैभव कु-हे, पुरुषोत्तम भराटे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.क्रार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजाचे स्थानिक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, सुनिल सोनवणे, गोरक्षनाथ कणसे, रमेश कुटे, विजय हुडे,नंदु भागवत,सागर हुडे, सतीश सोनवणे, विजय शेजूळ, निलेश हुडे, कृष्णा भागवत, योगेश बोरसे, नवीन भागवत, गणेश कणसे, आनंद वैदय, बबनराव रावताळे आदींनी परिश्रम घेतले.

श्रीरामपूर - महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात खाजगी कंपनीस चालवायला देण्यासाठी समांतर परवाना न मिळणेबाबत महावितरण च्या अधिकारी कर्मचारी  संपाला आप'चे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा दिला यावेळी कामगार नेते नागेश सावंत तसेच महावितरणाचे सर्व अधिकारी कर्मचारी,व आप'चे कार्यकर्ते उपस्थित होते,महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खाजगीकरण धोरण बंद करा महावितरण मध्ये खाजगी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नका कंत्राटी आऊटसोर्सिंग व सुरक्षारक्षक कामगारांना कायम करा तिन्ही कंपन्यातील रिक्त जागा भरा इम्पेनलमेंट पद्धतीचे कंत्राटीकरण बंद करा, महावितरण मधील 2019 नंतरचे उपकेंद्रे कंपनी मार्फत चालवा व उपकेंद्रात कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करा या मागण्यांसाठी हा संप चालू आहे, राज्यातील महसुली दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा ठाणे नवी मुंबई उरण, पनवेल ,तळोजा विभागासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाचे समांतर परवानासाठी अर्ज आलेला आहे असा परवाना देण्यात आला तर राज्याच्या वीज उद्योगावर त्याचे विपरीत परिणाम होतील सदरचे ग्राहक जर महावितरण कंपनीकडून खाजगी भांडवलदार यांच्याकडे गेले तर उर्वरित वीज ग्राहकांना दरवाढीचा मोठा फटका बसू शकतो व त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात वाढीव वीजदरामुळे वीज वापर करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसणार, अदानी हे पंतप्रधान  यांचे चांगले मित्र आहे आणि म्हणूनच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि आदानींच्या फायद्यासाठी देशातील एअरपोर्ट, बीएसएनएल, भारतातील बंदरे, व धारावली पूर्ण विकास प्रकल्प आणि आता महावितरण कंपनीला सुद्धा आदानी यांना देण्याचा सरकारचा डाव आहे हे सर्व राजकीय स्वार्थ व आदांच्या फायद्यासाठी चालू असल्याचा आरोप आप'चे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी केला,

शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील पोहेगाव येथील बाजारतळाजवळील डोर्‍हाळे रोड लगत असलेल्या बंधार्‍यात रविवार 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या पूर्वी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या घटनेची फिर्याद पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली होती.शिर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादंवी 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ काही तासांत गंभीर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.सदर गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मयत सोमनाथ शंकर कल्लारे (वय 33 रा. रांजणगाव, ता. राहाता) मित्रासमवेत खटकळी येथे रात्रीच्या वेळी वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी करत असताना मयताने एकाचा मोबाईल घेऊन मारहाण केली. तो निघून गेला. मात्र इतर मित्रांनी का त्रास देतो असे म्हणत असताना झालेल्या मारहाणीत मयत जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला.31 डिसेंबर रोजी मृतदेह दोन दुचाकी वरुन गोणीत बांधुन मृतदेह पोहेगाव येथे फेकून देण्यात आला. या खुनात संशयित म्हणून दिनेश फुलचंद बनसोडे (वय 22), सचिन उत्तम पवार (वय 22), प्रशांत बाळासाहेब गायकवाड (वय 22), सिध्दांत प्रमोद निकाळे (वय 20) सर्व राहणार राहाता या चौघांना शिताफीने पकडण्यात आले असून आणखी संशयिताचा शोध सुरू आहे.या खुनात जो मयत आहे त्यांच्यावर लोणी, राहाता पोलीस स्टेशन मध्ये 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच या प्रकरणात अटक करणार्‍या आलेले 4 आरोपी व पसार असलेले 3 आरोपी यांच्यावर राहाता- शिर्डी तसेच विविध ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकल चोरी तसेच विविध प्रकारचे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे, संभाजी पाटील, अंजय अंधारे, नितीन शेलार, सुर्यकांत ढाके संदिप गडाख, राजवीर बिरदवडे यांनी काम पाहिले. गुन्हा घडल्यानंतर काही तासांतच शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांच्या पथकाने या गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध लावला त्याबद्दल त्यांच्या कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget