Latest Post

मडगाव,गोवा(गौरव डेंगळे): येथील के एस सी आर क्रिकेट मैदानावर टी ट्वेंटी क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने १८ राज्यांचे निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.

आज झालेल्या पहिल्या सामन्यात वरद कुंभकर्णच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने मध्य प्रदेशवर २२ धावांनी विजय मिळवला.नाणेफेक जिंकून मध्यप्रदेश संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.महाराष्ट्र संघाने निर्धारित १५ षटकांमध्ये ५ गडी बाद १०८ धावा फटकावल्या. महाराष्ट्र संघाकडून वरदने नाबाद २५,आरमने १७ धावा तर सर्वेशने १२ धावांचे योगदान दिले.मध्यप्रदेश संघाकडून राहुल व रोहितने १-१ गडी बाद केला.१०९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मध्य प्रदेशचा संघ वरद व आराम यांच्या भेदक माऱ्यापुढे टिकाऊ धरू शकला नाही व संघ १२ षटकात ८६ धावांवर गारद झाला.वरद व आराम प्रत्येकी ३-३ गडी बाद केले तर मितांश व या दोन्ही प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

मध्यप्रदेश संघाकडून रोहितने सर्वाधिक १२ धावांची योगदान दिले.२५ धावा व ३ गडी बाद करणारा वरद सामन्याचा सामनामानकरी ठरला. साखळीतील दुसऱ्या सामनात महाराष्ट्राची गाठ पडेल ती बलाढ्य छत्तीसगड संघाबरोबर.

श्रीरामपूर प्रतिनिधी:ये

थील गोंधवणी रोड अत्यंत वर्दळीचा रस्ता असुन शहराच्या इतर रस्त्याच्या तुलनेत हा रस्ता तसा खुपच चिवळ देखील आहे.

या रस्त्यावर नेहमी प्रचंड प्रमाणात वाहतूक त्यात पाटाच्या पुलावर अनेक वाहन धारकांनी अनाधिकृत पार्किंग निर्माण केली असल्याने दररोजच अपघातांच्या घटना हे तसे नित्याचेच,म्हणाव्या लागेल.मात्र आज सकाळी ११:०० वाजेच्या दरम्यानं गोंधवणी रोड पाटाच्या पुलाजवळील कलगीधर हॉल शेजारी ,श्री.गुरुवाडा यांच्या घरासमोर एक सिमेंटचा ट्रक पलटी होता होता वाचला,सुदैवाने यात कोणतीच जीवीत हानी नाही

सदरील सिमेंट ट्रक मागे घेत असताना चक्क तो नगर पालिका जनरल गटार चेंबरमध्ये एक चाक गेल्याने ट्रक पलटी होता होता वाचला यात सुदैवाने कोणतीच जीवीत हानी झाली नाही हे एक चांगलच म्हणावे लागेल.

शहरात उघडे गटारीचे चेंबर्स आणी बेशिस्त वाहतूकीवर न राहिलेले शहर पोलिसांचे नियंत्रण अशी स्थिती असल्याने कारण 

याकडे संबंधित पोलिस यंत्रणा आणी नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमधून नाराजगीचा सुर निघत आहे.

गौरव डेंगळे (पणजी):गोवा येथे संपन्न झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत,वेटलिफ्टिंग स्पर्धेत बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्र दीपक कामगिरी केली. कु. कोमल वाकळे हिने ८७ किलो वजन गटात २०५ किलो वजन उचलून सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तर कु. योगिता खेडकर हिने +८७ किलो वजन गटात १९८ किलो वजन उचलून महाराष्ट्र संघास कास्यपदक मिळवून दिले. भारताच्या प्रतिष्ठित असलेल्या या स्पर्धेत एकूण ४३ क्रीडाप्रकारात, २८ राज्य, ८ केंद्रशासित प्रदेशतील १० हजार खेळाडूंनी सहभाग घेतला. यशाबद्दल पाथर्डी तालुका वेटलिफ्टिंग असोसिएशनचे व पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रा. संजय धोपावकर, रवींद्र सांगळे यांनी अभिनंदन केले. त्यांना जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख यांचे  मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल जिल्ह्यातून खेळाडूंवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

बेलापुर - १५ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीला मोबाईलवर नागडे फोटो पाठवणारा बेलापूरचा लिंगपिसाट,३२ वर्षीय योगेश साहेबराव पवार याच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल…१५ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीला मोबाईलवर नागडे फोटो पाठवणारा बेलापूरचा लिंगपिसाट,३२ वर्षीय योगेश साहेबराव पवार याच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल…बेलापूर बुद्रुक गावातील एका हिंदुत्ववादी संघटनेचा प्रमुख म्हणून काम करणारा लिंगपिसाट,३२ वर्षीय आरोपी योगेश साहेबराव पवार,रा.नवले गल्ली,बेलापूर बुद्रुक,श्रीरामपूर याने १५ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीला सहा महिन्यापासून पाठलाग करून,तिच्या मोबाईलवर स्वतःचे नागडे फोटो आरोपीने पाठवून अतिशय नीचपणे वर्तणुक करुन तिचा विनयभंग केला म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 1154/2023 प्रमाणे कलम 354-D,509,506 व पोक्सो कायद्यातील कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   या १५ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीने पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आरोपी योगेश साहेबराव पवार याने ०६ महिन्यापासून तिचा पाठलाग केला,तसेच २७ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तिला मोबाईलवर इंस्टाग्रामच्या माध्यमातून आरोपीने स्वतःचे नागडे फोटो पाठवले,तसेच आरोपीने तू मला आवडतेस,आपण लग्न करू ,आपण रूम घेऊन भेटू ,तुझे कपडे काढलेले फोटो मला पाठव,मला तुझे ओपन फोटो पाठव असे म्हणत शरीरसुखाची मागणी केली.यावर या १५ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीने नकार दिला असता आरोपी योगेश साहेबराव पवार तिला शिवीगाळ करून कोणाला काही सांगू नको,नाहीतर बघून घेण्याची तिला धमकी दिली.त्यानंतर मुलीने तिच्या वडिलांना आरोपी योगेश साहेबराव पवार याच्या कृत्यांबद्दल सांगितले.त्यानुसार मुलीच्या वडिलांनी,परिवाराने काल संध्याकाळी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. 

  याबाबत १५ वर्षे अल्पवयीन हिंदू मुलीच्या वडिलांनी आम्हाला सांगितले की,३२ वर्षीय योगेश साहेबराव पवार हा व त्याचे सहकारी हे माझ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसह परिसरातील मुलींना नवरात्रीमध्ये दुर्गा माता दौड कार्यक्रमाला घेऊन जायचे.तसेच त्याने या मुलींना केरला स्टोरी पिक्चर दाखवण्यासाठी श्रीरामपूर शहरातील एका थिएटरमध्ये देखील त्याच्या मित्रांसह नेले होते.त्यावेळी योगेश साहेबराव पवार याचे बेलापुरातील व श्रीरामपुरातील मित्र उपस्थित होते. हिंदुत्वाचे काम असल्यामुळे मी माझ्या मुलीला त्याच्या सोबत जाऊ दिले.परंतु योगेश साहेबराव पवार या आरोपीने माझ्या अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेऊन असे अतिशय हीन व नीचपणाचे कृत्य केले आहे.   या प्रकरणी अशी धक्कादायक माहिती समजते की,श्रीरामपूर शहरातील काही संघटनेच्या लोकांनी व बेलापुरातील काही नेतेमंडळींनी या अल्पवयीन हिंदू मुलीच्या परिवारावर पोलीसात केस करु नका असा दबाव टाकला. जेणेकरून लिंग पिसाट योगेश साहेबराव पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये व त्याचे काळे कृत्य जगासमोर येऊ नये.परंतू या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आपल्या इज्जतीचा विषय असल्यामुळे या दबावाला जुमानले नाही व माघार घेतली नाही.

श्रीरामपूर प्रतिनिधी:सध्या श्रीरामपूर शहरासह तालुकाभरातील विविध पान टपऱ्यांमधून स्ट्रॉंग तंबाखू असलेले किवामयुक्त फुलचंद पान आजही उपलब्ध होत असल्याने राज्य सरकारने सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखूवर घातलेली बंदी केवळ कागदावरचा फार्स ठरली आहे. स्ट्रॉंग तंबाखूजन्य फुलचंद पान हे असे पान आहे जे नजर चुकीने जरी एखाद्या इसमाने मसाला पान म्हणून खाल्ले तर खाणाऱ्यास भयंकर चक्कच येणे, त्याच्या ह्रदयाचे ठोके वाढणे,मळमळ होणे अस्वस्थ वाटणे, हातपाय गळण्यासारखे वाटणे असे भयंकर लक्षण दिसून येतात.एखाद्याचे ॲजिओप्लास्टी किंवा बायपास झालेले असल्यास सदरील पान हे त्याच्या जीवावर बेतू शकते असे हे स्ट्रॉंग तंबाखूजन्य पान आहे म्हणून असे पान विकणाऱ्या पान टपऱ्याधारकांवर वेळीच योग्य कारवाई झाली पाहिजे असे आसलम बिनसाद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.या पत्रकार पुढे असे म्हटले आहे की, श्रीरामपुर शहरामध्ये किमामचा स्वाद असलेली पाने केव्हाही मिळत आहेत. एवढेच नव्हेतर, गुटखाबंदी असतानाही काही ठरावीक ग्राहकांना महागडय़ा दरात गुटखा सहजासहजी मिळत असल्याने सरकारच्या गुटखाबंदीचा सर्रास फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू यावर महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून बंदी घातलेली आहे,ती बंदी उठवण्यायाबाबत अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. मात्र ही बंदी लागू असतानाही स्ट्रॉंग तंबाखूजन्य किवामयुक्त पान आजही ग्राहकांना सहजपणे उपलब्ध होत आहे.एके काळी लोकप्रिय असलेल्या मसाला पानाची जागा फुलचंद या पानाने घेतली असल्याने,तोंडाला सुगंध आणणारा किमाम आणि चटणी हे मुख्य घटक या पानाची वैशिष्ट्ये वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे,आणी तरुण वर्ग एकाप्रकारे अशा वेसनाच्या आहारी जात असुन अन्नभेसळ प्रतिबंधक विभाग,गुन्हे अन्वेषण आणि संबंधित स्थानिक पोलिस प्रशासन याबाबत संबंधित तंबाखूजन्य किमाम वापरणाऱ्या पानटपऱ्या धारकांवर कोणतीही उचित कार्यवाही न करता केवळ बघ्याची भुमिका बजावत असल्याने त्यांच्याही कर्तबगारीवर प्रश्न चिन्ह निर्माण होतो आहे.की बंदी असलेले माल राजरोसपणे विक्री करणारे संबंधित पानटपऱ्याधारक व्यावसायिक आणि ज्यावर ज्यांचे नियंत्रण असावे असे संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात आपसी संगनमत तर नव्हेना? जर दिवसाढवळ्या इतक्या प्रचंड प्रमाणात बंदी असलेले गुटखा, मसाला सुगंधी पानच्या नावाखाली स्ट्रॉंग तंबाखूजन्य फुलचंद पानाची राजरोसपणे विक्री होत असेल, शिवाय बंदी असलेला सर्व प्रकारचा गुटखा हा राजरोसपणे विकला जात असेल तर मग यावर आवर घालणारे संबंधित प्रशासन काय करत आहे ? असा खडा प्रश्न आज शहरासह तालुक्यातील नागरीकांच्या मनात निर्माण होतो आहे.संबंधित खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सदरील पान टपऱ्याधारकांशी जर लागे बांधे नसेलतर मग कारवाई का केली जात नाही अशीही शंका उपस्थित केली जात आहे.मात्र बातम्या आणी निवेदन देवून कोणास काहीच फरक पडणार नाही,सर्वच गेंड्याच्या कातडीचे बनले आहे,मात्र प्रश्न तरुण पिढी बरबाद होत असल्याबाबतचा आहे,याकरीता पत्रकार आसलम बिनसाद आणि तमाम सामाजिक कार्यकर्ते याविरुद्ध उग्र आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्विकारणार आहेत.तरच असले गैरप्रकार बंद होतील अन्यथा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे जसे मागे चालु राहीले तसे पुढे देखील चालुच राहणार असून करीता सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांनी देखी वेळीच सावध होऊन या गैरप्रकाराला वाचा फोडणेकामी पुढे आले पाहिजे तरच सर्व काही शक्य होवू शकणार आहे.असे तिरंगा न्युज चे संपादक आसलम बिनसाद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पाथर्डी - अहमदनगर जिल्ह्याचे वेटलिफ्टिंग खेळाडू व बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कोमल वाकळे व योगिता खेडकर यांची गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. कोमल वाकळे हिची ८७ किलो वजन गटात तर योगिता खेडकर हिची ८७ किलो वरील वजन गटात निवड करण्यात आली आहे. भारताच्या प्रतिष्ठित असलेल्या या स्पर्धेत एकूण ४३ क्रीडा प्रकारात भारतातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे संघ सहभागी होणार आहे. या आधी गुजरात येथे झालेल्या ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेमध्ये कोमल वाकळे हिने महाराष्ट्र संघास सुवर्णपदक मिळवून दिले होते. कोमल व योगिता या दोघींनी ही अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक मिळविले आहे.  

      या यशाबद्दल पाथर्डी तालुका वेटलिफ्टिंग संघटना व पार्थ विद्या  प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, शारीरिक शिक्षण संचालक व अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रा. विजय देशमुख, अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख व उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रा. संजय धोपावकर, रवींद्र सांगळे, यांनी अभिनंदन केले, व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या निवडीबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या महाराष्ट्रात एकुण ७३१८६ शाखा असुन समाजातील प्रश्नांचा अभ्यास करुन जनजागृती करणाऱ्या २७ उपसंस्था आहेत त्यामुळे राष्ट्रीय आपत्तीत मग किल्लारीचा भुकंप असो ,आसाम पुरग्रस्तांचा प्रश्न असो किंवा अलीकडील कोरोना असो सर्वात आगोदर मदत कार्य पोहोच करणाऱ्यामध्ये संघ प्रथम स्थानी असल्याचे मत ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा ,डाँ. गोरख बारहाते यांनी व्यक्त केले .                        विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वंयसेवक संघ बेलापुर शाखेच्या वतीने पथसंचलन तसेच बेलापुर जे टी एस हायस्कूलच्या प्रांगणात शस्र पुजन सोहळा संपन्न झाला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डाँ.बारहाते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे कुटुंब प्रमुख संघटक राजेंद्र देशपांडे तसेच उत्तर नगर जिल्हा कार्यवाह लहु शिंदे उपस्थित होते           

प्रा. डाँ. गोरख बारहाते पुढे म्हणाले की आजचा विजयादशमीचा दिवस म्हणजे संघ स्थापनेचा दिवस आज संघ स्थापनेला ९८ वर्ष पुर्ण होत आहे .समाजासाठी सतत काम करणारी एकमेव संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ. लोक संघाविषयी उलट सुलट चर्चा करतात पण संघाचे कार्य शिस्तबध्द तसेच संघातील प्रत्येक स्वंयसेवक हा शिस्तप्रिय आहे संघ जात भेद मानत नाही संघाच्या परमपवित्र ध्वजाखाली सर्व समान असतात म्हणून तर संघाचे संघटन दिवसेंदिवस मजबुत होत चालले आहे आसेही प्रा, बारहाते म्हणाले  या वेळी नाशिक विभागाचे कुटुंब प्रमुख संघटक राजेंद्र  देशपांडे म्हणाले की बाल तसेच तरुण मनावर संस्कार करणारा संघ हाच एकमेव परिवार आहे. आरएसएस एक संवाद आहे आज आपल्यातील समाजातील संवाद हरपत चालला आहे .संवादामधील स नाहीसा झाल्यामुळे केवळ वाद निर्माण होत आहे आपली भाषा शुद्ध हवी  आपली भुषा पेहेराव चांगला पाहीजे ,आपले भोजन सात्वीक पाहीजे तसेच भ्रमण केले पाहीजे ते करताना निरीक्षण केले जावे या सर्व बाबी संघात शिकविल्या जात असल्याचेही देशपांडे म्हणाले  प्रारंभी संघाचे घोषासह गावातुन संचलन काढण्यात आले होते .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget