आज झालेल्या पहिल्या सामन्यात वरद कुंभकर्णच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने मध्य प्रदेशवर २२ धावांनी विजय मिळवला.नाणेफेक जिंकून मध्यप्रदेश संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.महाराष्ट्र संघाने निर्धारित १५ षटकांमध्ये ५ गडी बाद १०८ धावा फटकावल्या. महाराष्ट्र संघाकडून वरदने नाबाद २५,आरमने १७ धावा तर सर्वेशने १२ धावांचे योगदान दिले.मध्यप्रदेश संघाकडून राहुल व रोहितने १-१ गडी बाद केला.१०९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मध्य प्रदेशचा संघ वरद व आराम यांच्या भेदक माऱ्यापुढे टिकाऊ धरू शकला नाही व संघ १२ षटकात ८६ धावांवर गारद झाला.वरद व आराम प्रत्येकी ३-३ गडी बाद केले तर मितांश व या दोन्ही प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
मध्यप्रदेश संघाकडून रोहितने सर्वाधिक १२ धावांची योगदान दिले.२५ धावा व ३ गडी बाद करणारा वरद सामन्याचा सामनामानकरी ठरला. साखळीतील दुसऱ्या सामनात महाराष्ट्राची गाठ पडेल ती बलाढ्य छत्तीसगड संघाबरोबर.
Post a Comment