Latest Post

नाशिक  प्रतिनिधी - गोदावरी नदीवरील ऐतिहासिक रामसेतू पंचवटी व नाशिक शहराला जोडणारा मोठा दुआ आहे. हा रामसेतू तोडण्याच्या हालचाली स्मार्ट सिटीचे अधिकारी करत आहेत, असे सांगत त्याला आमचा विरोध असल्याचे रामसेतू बचाव अभियानच्या कल्पना पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.रामसेतूमुळे नाशिक शहरातून पंचवटीला येण्यासाठी सोयीचे ठरते. या पुलावर गेल्या अनेक वर्षापासून शेकडो छोटे व्यावसायिक आपला रोजगार करून पोट भरत आहेत. हा रामसेतू कायमचा नष्ट करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.स्मार्टसिटी योजनेंतर्गत नारोशंकर मंदिराजवळील दोन सांडवे तोडण्यात आल्याने नागरिकांना ये - जा करण्यासाठी रामसेतूची मदत घ्यावी लागत आहे. रामसेतू तोडला तर नाशिक व पंचवटीतील रहिवाशांना जाण्यायेण्यासाठी प्रचंड अडचणीचे ठरणार आहे.तरी रामसेतू तोडण्यास आमचा कायमच विरोध राहील, विशेष म्हणजे रामसेतूची उभारणी इंग्रजकालीन आहे. तरीही रामसेतू अजून ताठ मानेने उभा आहे, अशी माहिती कल्पना पांडे यांनी दिली.रामसेतूवरून शेकडो वेळा गोदावरीच्या पुराचे पाणी गेले असतानाही रामसेतू तसाच आहे. शासनाचा विकास करण्याचा उद्देश असला तरी ऐतिहासिक स्थळे कशी शाबूत राहतील हा उद्देशही नजरेसमोर ठेवावा. ज्या स्मार्टसिटी योजनेअंतर्गत रामसेतू तोडण्याचा प्रयत्न होत आहे, त्या स्मार्टसिटीच्या कामांचा दर्जा कसा आहे हे सांगणे नको. दोन-तीन महिन्यातच पुराच्या पाण्याने फरशा कशा वाहून गेल्या होत्या हे समोर आलेले आहे. त्यामुळे स्मार्टसिटीच्या विकासाबाबत सुसूत्रता अजिबात नाही,असा आरोप त्यांनी केला.कारण नसताना रस्ते खोदायचे व दोन-तीन महिने तशाच अवस्थेत ठेवायचे, त्या खड्ड्याला बुजवण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा पदरात पाडून घ्यायचा हाच यामागील उद्देश आहे,असेही पांडे यांनी सांगितले.रामसेतू बचाव अभियान यशस्वी होण्यासाठी नाशिक शहरातील नागरिकांची सह्यांची मोहीम सुरु करण्यात येणार आहे . यावेळी पांडे यांच्यासह सुनंदा जगत, सुनंदा जगताप, स्वप्नील आहेर, सचिन खिंडारे, संदीप बोरकर, सुभाष पोतदार, संजय वाली उपस्थित होते.


पुणे प्रतिनिधी - गावाचा विकास होतांना भौतिक सामाजिक व अशा मूलभूत अशा सुविधा झाल्या पाहिजेत यासाठी शासनाच्या ग्राम विकासाच्या विविध योजना राबवतांना प्रत्यक्ष अमंलबजावणी   होतांना लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाटोदा आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील उपस्थित होते.ग्रामगौरव आणि शब्दसारथी संस्थेतर्फे कृषि व ग्राम विकासाचे धोरण काल,आज व उद्या या परिसंवादाचे आयोजन लॉ कॉलेज रस्त्यावरील प्रसाद अपार्टमेंटच्या आवारात करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे गोल्डमॅन प्रशांत सपकाळ,ग्रामगौरवचे विवेक ठाकरे,कु.धनश्री ठाकरे, अमोल मचाले,पराग पोतदार, विशाल घोडेस्वार,सुनिल शेटे, प्रिया

गायकवाड,आर्यन आखाडे, वाय.डी. पाटील,शरद चौधरी आदी उपस्थित होते. परिसंवादाच्या सुरुवातीला ग्रामगौरवच्या राज्यस्तरीय कॉर्पोरेट कार्यालायाचे उदघाटन वृषभ व बैलगाडीचे पूजन करून उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. आदर्श गावाचा आदर्श घेण्याची गरज राज्यात लौकिकपात्र काम केलेल्या ग्रामपंचायतींना शासन आदर्श गाव म्हणून पुरस्कृत करते या आदर्श गावांचे अनुकरण व आदर्श घेण्याची गरज आहे.आपल्या गाव स्वउत्पन्नातून आत्मनिर्भर कसे होईल, यासाठी प्रत्येकाने विचार केला पाहिजे,असे परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शक भास्कर पेरे-पाटील यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले.सुनील सुतार,गौरव ठाकरे,राजू भडके,शरद चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

अहमदनगर- पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल  असणारे,  ११ वर्षापूर्वीचा खूनाचा गुन्हा उघड झाला आहे. वाहनचालकाचा खून करुन प्रेत सिंधखेड राजा, (जि. बुलढाणा) येथे जाळून पुरावा नष्ट करुन नावात बदल व ओळख लपवून राहणारे आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. भरत मारुती सानप असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि.११) पञकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके व स्थानिक गुन्हे शाखेतील तपासी अधिकारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी जिल्हयातील गंभीर स्वरुपाचे ना उघड खून, दरोडा, जबरी चोरी उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्याकडून  अहमदनगर यांना जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणणे बाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शेवगाव    उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे व पोनि श्री कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि गणेश इंगळे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाने, पोना भिमराज खसे, सुरेश माळी, रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार व चापोहेकॉ बबन बेरड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्ह्यांचा आढावा घेत असतांना पोनि श्री.कटके यांना गुप्तबातमीदार मार्फत माहिती मिळाली की, पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०७/२०११ भा.द.वि.कलम ३६४, ३९४, ३४ प्रमाणे घातपाताचे दृष्टीने अपहरण व जबरी चोरी करण्याचे उद्देशाने गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी भरत मारुती सानप हा अद्यापपर्यंत फरार असून, त्याची कोणतीही माहिती नाही. या दाखल गुन्ह्याची  माहिती अशी की, दि. २३ मार्च ११ रोजी   नितीन सखाराम सोनवणे (वय २४, धंदा ड्रायव्हर, रा. यमुनानगर, सर्व्हे नं. १९९, विमाननगर, पुणे नगर रोड, पुणे-१४) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, दि.११ मार्च १९ रोजी भाऊ  अनिल सखाराम सोनवणे (वय २९) हा व त्याचा वाहनचालक  भरत मारुती सानप (रा. खडकवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे त्याचे जवळील माल ट्रक (नं. एमएच-१२-एव्ही-६४४९) अशी घेऊन रायपुर येथे बायडींग वायर भरण्यासाठी गेले होते. दि. १६ मार्च ११ रोजी रायपुर येथून ५ लाख ४८ हजार  ९४० रु.ची बायडींग वायर भरुन पुणे येथे येण्याकरीता निघाले होते. दि.१८ मार्च २०११ रोजी सकाळी ते जालना येथे आल्याबाबत  भाऊ अनिल सोनवणे याने फोन करुन सांगितले होते. त्यानंतर त्याचा फोन लागला नाही. दि. २१ मार्च ११ रोजी  मालट्रक बेवारस अवस्थेमध्ये भगवानगड (ता. पाथर्डी) येथे मिळून आली होती. ट्रकमधील बायडींग वायर नव्हती तसेच ट्रकचे कॅबीनमध्ये रक्ताचे डाग दिसले होते. तसेच भाऊ अनिल सोनवणे याच्या सोबतचा  चालक भरत सानप याचा फोन बंद होता. यावरुन भरत सानप याने भाऊ अनिल सोनवणे यास जबर मारहाण व घातपात करण्यासाठी अपहरण करुन ट्रक मधील ५ लाख ४८ हजार ९४० रु.कि.ची. बायडींग वायर बळजबरीने चोरुन नेली आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत  खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील स्वंतत्र पथक स्थापन करुन मिळालेल्या माहितीचे आधारे सूचना करून  गुन्ह्यातील फरार आरोपीबाबत माहिती घेऊन अटक करण्याबाबत आदेश दिले. पथकाने गुन्हा व गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती घेतली असता आरोपी भरत मारुती सानप (रा. खडकवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) हा सध्या कन्हेरवाडी (ता. परळी, जि. बीड) येथे स्वतःचे नावात बदल करुन व ओळख लपवून राहत आहे. अशी माहिती तपास पथकास मिळाल्याने त्यांनी आरोपीचा याचा शोध घेऊन त्यास कन्हेरवाडी (ता. परळी, जि. बीड) येथून ताब्यात घेतले. यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिमान मारुती सानप (वय ३७, रा. खडकवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे चुकीचे नाव सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. मी अभिमान मारुती सानप असून तसे आधारकार्ड पथका समक्ष सादर केले. परंतु तपास पथकाची पूर्णखात्री होती की,  हाच भरत मारुती सानप आहे. त्यामुळे पथकाने त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे कसून चौकशी करता त्यांचेकडे असलेल्या ओळखी बाबतच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी केली. त्यामध्ये त्याचेकडे सन २००६ मधील मतदान ओळखपत्र सापडले. त्यावर त्याचे नाव भरत मारुती सानप असे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याने मीच भरत मारुती सानप असे असल्याचे सांगून पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. १०७/२०११ भा.द.वि.कलम ३६४, ३९४, ३४  गुन्हा केल्याने मला पोलीसांनी पकडू नये म्हणून मी माझी ओळख लपवून नावात बदल करुन अभिमान या नावाने राहत होतो. अशी कबुली देऊन अनिल सोनवणे हा नेहमी मला माझ्या पत्नी विषयी वाईट बोलायचा त्याचा मला राग होता म्हणून देवरीगाव (जि गोंदिया) येथे ट्रकचे टायरमधील हवा चेक करण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्यावेळी आमच्यामध्ये वाद झाले. मला त्याचा राग आल्याने मी त्याचे डोक्यात टायरमधील हवा चेक करण्यासाठी टायर वाजवण्यासाठी माझ्या हातात असलेला व्हील पान्हा त्याच्या डोक्यात मारला होता. त्यावेळी तो जागेवर बेशुध्द झाल्याने मी त्यास तसाच उचलून गाडीचे केबिनमध्ये टाकला होता. मी ट्रक चालवित सिंधखेडराजा (जि. बुलढाणा) येथे आल्यावर अनिल सोनवणे याची हालचाल बंद झाल्याने तो मयत झाला आहे, असे समजून मी त्यास सिंधखेडराजा ते जालना जाणारे रोडवरील खदानजवळ नाल्यावरील पुला जवळ ट्रक थांबवून ट्रकमधील अंथरुन व पांघरुन घेण्याचे कपडे व नाल्याजवळील सुकलेले गवत त्याचे अंगावर टाकून त्यास पेटवून देवून तेथून निघून आलो. त्यांनतर माझ्या ओळखीचे सुनिल आश्रुबा सानप, परमेश्वर उत्तम दराडे यांचे मदतीने ताब्यातील ५ लाख ४८ हजार ९४० रु.कि.ची बायडींग वायरची विल्हेवाट लावली होती.अशी माहिती आरोपी अभिमान ऊर्फ भरत मारुती सानप सांगितल्याने ही बाबतची खात्री करण्यासाठी पोलीस पथक सिंदखेडराजा पोलीस ठाणे (जि. बुलढाणा) येथे जाऊन पोलीस ठाण्यातील अभिलेखाची खात्री केली असता दि. १९ मार्च २०११ रोजी सिंधखेडराजा पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२/११ भादविक ३०२, २०१ प्रमाणे खून करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले आहे. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मिळून न आल्याने गुन्ह्याची अ-वर्ग समरी करुन गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आलेला होता.गुन्ह्यांची खात्री होऊन आरोपी निष्पन्न झाल्याने तपास पथकाने आरोपीस  अभिमान ऊर्फ भरत मारुती सानप यास ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात  हजर केले आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.अशा प्रकारे पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाचे गुन्ह्यात आरोपीस अटक करुन ११ वर्षापूर्वी घडलेल्या व सध्या गुन्ह्याची वर्षापुर्वी घडलेल्या व सध्या गुन्ह्याची अ-वर्ग समरी करुन गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आलेल्या खुनाचा गुन्हा उघडकिस आणून आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

बेलापुर  प्रतिनिधी  - कर्नाटकातील एका महाविद्यालयाने हिजाब काढण्यास नकार देणार्‍या सहा विद्यार्थिनींना प्रवेशबंदी केली होती. मात्र  हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे. त्या प्रकरणावरुन सध्या कर्नाटक सह देशभरात वादंग निर्माण झाला आहे.या बाबीचे समर्थनकरुन आंदोलन मोर्चे काढणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे करण्यात आली आहे , या बाबत हिंदुत्ववादी संघनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की विद्यार्थ्यांनी समानता, अखंडता आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होणार नाही असे कपडे परिधान करावेत. शाळा, कॉलेज, विद्यापीठ येथे शिक्षण घेणारे सर्व समान पातळी वर असावीत म्हणून  ठरावीक गणवेश नेमून देतात, सर्व विद्यार्थ्यांनी त्याचे पालन करावे असे निर्देश असतात. परंतु कर्नाटक मधील एका कॉलेजात काही विद्यार्थिनींनी आम्हाला हिजाब घालून वर्गात बसण्याची मागणी केली, त्यांची मागणी नामंजूर करताच याला काहींनी धार्मिक वळण देत दोन समाजात तेढ निर्माण होईल अशाप्रकारे हे प्रकरण उचलून धरले. तसेच त्यावरून प्रचंड गदारोळ माजवण्यात आला, त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्ववादी विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालून कॉलेजमध्ये विरोध दर्शवला, परंतु सामाजिक एकोप्यास बाधा आणण्याच्या दुष्ट हेतूने, सदर प्रकरण चुकीच्या पद्धतीने सोशल मीडिया व इतर माध्यमातून प्रसारित केले. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातही अनेक शहरांमध्ये या प्रकाराला धार्मिकतेचा रंग देण्याचा प्रयत्न झाला .काही शहरामध्ये पहिले हिजाब फिर किताब अशा प्रकारचे बॅनर बाजी केली गेली .तर काही ठिकाणी ,  मोर्चे काढले गेले  वास्तविक पाहता हे प्रकरण कर्नाटक राज्यातल्या एका कॉलेज पुरते मर्यादित होते, परंतु त्यास देशव्यापी प्रश्न बनवले गेले. अशा देशद्रोही प्रवृत्तींना वेळीच रोखण्याची गरज आहे. नाही तर उद्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये धार्मिक वाद वाढीस लागतील. सर्वसाधारणपणे शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षणासाठी येतात तिथे कुठल्याही जातीत व धर्मात भेदभाव केला जात नाही,अशा घटनामुळे भविष्यात शैक्षणिक सह इतर क्षेत्रात सुद्धा याचे विपरित परिणाम दिसून येतील, त्यामुळे आमची प्रशासनास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे की कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात व देशात हा वाद विकोपास जाऊ नये यासाठी शासनाने व प्रशासनाने योग्य असा निर्णय घेऊन, त्याची त्वरित सक्तीची अंमलबजावणी करावी. 

  शासनाने ठरवून दिलेल्या गणवेशाचा देखील  वापर होतो की नाही याचीही  सखोल चौकशी करावी. शासनाचे अनुदान घेऊन देखील विद्यार्थ्यांना गणवेश  देत नसेल तर अशा मदरसा, शाळा महाविद्यालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच यापुढे शाळा व कॉलेजमध्ये मुस्लीम युवती हिजाब घालून आले तर हिंदू युवती देखील हिंदू धर्मातील पोशाख परिधान करुन येतील व बौद्ध, ख्रिश्‍नच देखील आपल्या धर्माच्या पारंपारिक पोशाखात महाविद्यालयामध्ये येतील. अशा पद्धतीने जर सुरु झाले तर पुढील काळामध्ये शाळा व कॉलेजमध्ये नमाज अदा करणे, हिंदू धर्मा प्रमाणे प्रार्थना करणे अशा प्रथा सुरु होतील. परंतु अशा या घटना होऊ नये यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत म्हणून त्वरीत गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. जेणे करुन महाविद्यालयामध्ये धार्मिक तेढ निर्माण होणार नाही व यांच्या समर्थनार्थ आंदोलन, मोर्चे काढणार्‍या पक्ष, संघटनांच्या लोकांवर देखील कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल राज्य उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, विश्‍व हिंदु परिषदचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, हिंदू एकता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, रुपेश हरकल, बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, आरएसएसचे देविदास चव्हाण, विजय ढोले, शिवसेना युवा सेनेचे शहर प्रमुख निखिल पवार, शिवप्रतिष्ठानचे  प्रविण पैठणकर, सौ. पुष्पलता हरदास बीजेपी महिला आघाडी ओबीसीसेल (जिल्हाध्यक्ष) यांनी सदर घटनेचा निषेध करुन मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी  शिवप्रहारचे चंंद्रकांत आगे, श्रीराम सेवा संघाचे कुणाल करंडे, बंडूकुमार शिंदे, मनसे विधान सभा अध्यक्ष संतोष डहाळे, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष समर्थ सोनार, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अक्षय सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष संतोष भालेराव, बाळासाहेब हरदास ,रोहित भोसले, विकास डेंगळे, योगेश ओझा, लखन उपाध्ये (तालुका उपाध्यक्ष) आध्यात्मिक आघाडीचे शहर प्रमुख रुद्रप्रताप कुलकर्णी,  निलेश गिते, रविराज बेलदार, पंकज करमासे, प्रविण फरगडे, लखन माखिजा, सुरज यादव, मंगेश छतवाणी, आदेश मोरे, नितीन ललवाणी, प्रसाद कांबळे, किशोर वडितके, रमेश घुले, प्रविण शिंदे, विशाल अंभोरे, विजय आखाडे आदी हिंदुत्वादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगमनेर प्रतिनिधी- हिजाबच्या धार्मिक हक्कासाठी व अल्पसंख्याक समुदायावर होणारे सांप्रदायिक अतिक्रमण रोखण्यासाठी मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या वतीने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, मा. प्रधानमंत्री, भारत सरकार, कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोग, मा. मुख्यमंत्री, कर्नाटक राज्य यांना मा. तहसिलदार, संगमनेर यांचे मार्फत निवेदन देऊन संविधानिक मार्गाने सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी संत ईग्नाथी चर्चचे प्रमुख धर्मगुरु फा. सतीशजी कदम, मुस्लिम धर्माचे संगमनेर शहर काझी रकीबजी सैय्यद, दार-उल-उलूम बरकात-ए- शेर-ए-नेपालचे मौलाना हाफिज रेहान रजा बरकाती, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अनिलजी भोसले, वरिष्ठ आर. टी. आय. कार्यकर्ते मुझफ्फरजी शेख, न्यूज एन. एम. पी. चे मुख्य कार्यकारी संपादक शौकतजी पठाण, पत्रकार इम्रान शेख, न्यूज एन. एम. पी. चे सह संपादक जमीर शेख, मुनीर शेख, इम्रान पटेल, शहेबाज शेख, मोहसिन मनियार आणि बुरखा - हिजाब परिधान केलेल्या शबनमजी जावेद शेख, निलोफरजी सैय्यद, तैबाजी जावेद शेख, सादियाजी पठाण, सकिनाजी पठाण या महिला सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-तालुक्यात सर्वात मोठी सेवा संस्था असणाऱ्या बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक दिनांक ६ मार्च रोजी होत असुन काल झालेल्या छानणीत दहा जणाचे अर्ज फेटाळण्यात आले असुन १३ जागेकरीता ८८ उमेदवार निवडणूक रिंगणात असुन दिनांक  २४फेब्रुवारी रोजी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे  बेलापुर सेवा संस्थेची निवडणूक दिनांक ६ मार्च रोजी होत असुन तेरा जागेकरीता एकुण ९९ जणांनी अर्ज दाखल केले होते त्यातील दहा उमेद़्वारांचे उमेद़्वारी अर्ज अवैध ठरविण्यात आले असुन त्या सर्वांना निवडणूक निर्णय अधिकारी एस पी रुद्राक्ष यांनी लेखी आदेश दिलेले आहेत  त्यात बोंबले संजय दादा ,मेहेत्रे शाम रामभाऊ , लबडे अशोक सहादु , कुऱ्हे रावसाहेब नामदेव , नवले नितिन मोहन , लबडे विलास रामभाऊ , शेलार संजय छबु , अमोलीक बाबासाहेब सखाराम , बंगाळ भास्कर तुकाराम , खंडागळे देविदास नामदेव या दहा जणांचे उमेद़्वारी अर्ज फेटाळण्यात आले आहेत.तशा नोटीसाही संबधीतांना बजावण्यात आलेल्या आहेत .जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व उपसरपंच आभिषेक खंडागळे यांचा एक पँनल तर बाजार समितीचे संचालक सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड यांचा दुसरा पँनल तर प्रकाश मेहेत्रे यांचा तिसरा पँनल राहण्याची दाट शक्यता आहे

श्रीरामपूर प्रतिनिधी-कर्नाटक या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या महिलांचा पेहराव हिजाब (बुरखा) याला काही समाजकंटक विरोध करून मोठ्या प्रमाणे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालय येथे माननीय तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.यावेळी समाजवादीचे अहमदनगर उत्तर

जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, आसिफ तांबोळी,आय्युब पठाण, दानीश शहा,दिशान शेख,आयाज मिर्झा, मुबशिर पठाण, जकरिया सय्यद, अफरोज शहा ,मोसीन कुरेशी,महीला शहराध्यक्ष सुलताना शहा,तमन्ना शेख, अफसाना शेख, शाईन शेख ,स्वालिया शेख, यास्मिन शेख,हसीना मंसूरी,हजरा शहा, सोनी शाह, शाईन शाह,सकीना शेख, साईबा शेख, महेक शेख, नसरीन शाह, खुशबू शेख,यावेळी गौसे आजम सेवाभावी संस्था तसेच अलबदर ग्रुप,जे.जे. फाउंडेशन.आदी उपस्थित होते.मुस्लिम समाजाच्या महिलांचा पेहरावा हिजाब (बुरखा) यास कर्नाटक राज्य मधील समाजकंटक याला विरोध करीत आहे. हिजाब (बुरखा) मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे इस्लाम धर्मात मुली व महिलांना अत्यावश्यक असून अनेक पिढ्यांपासून मुस्लिम मुलगी व महिला हिजाब (बुरखा) परिधान करून शाळेत व महाविद्यालयात देखील जात आहे. आजपर्यंत कोणतेही शाळा व विद्यालयांमध्ये हिजाब घालून आलेल्या मुलींना कधीही शाळेमध्ये येण्यास नाकरण्यात आलेले नाही.तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ ते २८ मध्ये देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या धर्माचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) अन्वे सर्वांना बोलण्याचे व राहण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. तसेच स्वातंत्र्य भारतात आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत कुणीही कोणाला कोणते गणवेश घालावे हे कुणीही सांगितलेले नाही किंवा कोणतेही धर्माचे लोकांनी जे काही गणवेश घातलेले आहे त्याच कधीही विरोध केलेला नाही.परंतु कर्नाटकात मागील काही दिवसापासून संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारापासून सामान्य जनतेला विशेष मुलींना वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना पहिल्यापासून संरक्षण दिलेले आहे. तसेच एकेठिकाणी सरकार हे बेटी पढाव बेटी बचाव हा नारा देत आहे. परंतु दुसरे ठिकाणी हिजाबविरोधात घोषणाबाजी देत आहे. ही आपली भारतीय संस्कृती नाही. अशा समाजकंटकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच हिजाब घालणाऱ्या मुलींना शिक्षण नाकारणाऱ्या संविधान विरोधी कर्नाटक सरकारचा श्रीरामपूर समाजवादी पार्टीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला असून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.




MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget