Latest Post

शिर्डी -सध्या शिर्डी मध्ये लॉक डाऊन सुरू आहे, पोलीस व प्रशासन या काळात सर्वांना घरात राहण्याचे आवाहन करतात, मात्र काही नागरिक तरीही रस्त्यावर विनाकारण फिरत असतात, अशा नागरिकांना आजही पोलिसांनी कान पकडून उठाबशा काढायला लावून शिक्षा दिली, तसेच दंडात्मक कारवाई केली ,शिर्डीत या कालावधीत सर्व घरात असताना व वारंवार सूचना करूनही अनेक जण सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने किंवा भाजीपाला ,किराणा, मेडिकल घेण्याच्या नावाखाली खोटे सांगून फिरत असतात, अशांची चर्चा करून व योग्य कागदपत्र तपासून खरे असल्यास सोडून दिले जाते, मात्र खोटे सांगून फिरणाऱ्यांना उठाबशा काढणे,दंडात्मक कारवाई करणे, मोटरसायकली जप्त करून घेणे ,अशा शिक्षा सध्या शिर्डी पोलीस विनाकारण फिरणारांना देत आहेत ,आजही सकाळी शिर्डीत पोलिसांचे पथक तैनात करून अशा विनाकारण फिरणार यांवर कडक कारवाई करण्यात आली, यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे शिर्डी पोलिसांनी सांगितले, त्यामुळे प्रत्येकाने विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, सामाजिक दुरी व मास्क लावावे  व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

श्रीरामपूर - कोरोनो व्हायरसची सध्याची परिस्थिती बघता पोदार जंम्बो किडस् या शाळेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे . ज्यामध्ये पोदार जंम्बो किडसूच्या मुलांच्या सुरक्षततेकडे बघुन मुलांना घरी राहण्यास सांगण्यात आले . मुले घरी दैनिक खेळ खेळत तर खेळतातच या शिवाय त्यांना शिकविण्यासाठी आपल्या शिक्षकांना आणि मित्रांसोबत जोडून राहावे . यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे . या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी एक अदभुत योजना तयार केली . कि ज्यामध्ये  पाच कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे जसे शारिरीक . भाषा, सामाजिक , भावात्मक आणि संज्ञात्मक या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे . या होम बेस्ड ऑनलाईन पद्धतीचा पालक आणि विद्यार्थी खुप चांगला प्रतिसाद देत आहे . या कालावधी मध्ये मुलांचे नुकसान होऊ नये हे लक्षात घेऊन पोदार _ जंम्बो किडस या शाळेचे संचालक श्री. सचिन महाले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . छाया कितरा मॅडम यांनी मुलांना ऑनलाईन पद्धतीद्वारे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मुलांचे नुकसान होणार नाही . विदयार्थना व्हिडिओद्वारे ऑनलाईन लेक्चर देण्यात येत आहे . यामध्ये शाळेतील शिक्षिका सौ. सुहाणी बागवाणी, सौ. सुनिता वाघ. कु. वनिता वधवाणी, सौ. सानवी रोहेरा , सौ.मीना गोराणे,या शिक्षकांचे तसेच शाळेतील दीदी सौ.मीरा पटारे यांचे अनमोल मार्गदर्शन  मिळत आहे .

(जय शर्मा ) शहरालगतच्या निघोज येथील गावात कोरोणा आजाराच्या पाश्र्वभूमीवर सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून गावातील गरिबांना मदत करण्यासाठी निघोज ग्रामपंचायतीच्या माजी. संरपच मनिषा प्रसाद मते सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मते यांच्या पुढाकाराने जवळपास प्रतिकुटब ७किलो गव्हाची किट करून जवळपास ११पोते धान्याचे वितरण माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील व खा डॉ सुजय विखे   यांच्या प्रेरणेतून उपक्रम राबविण्यात आला यावेळी बोलताना प्रसाद मते यांनी सांगितले  लाॅक डाउन व संचारबंदी यामुळे शिर्डी पचंक्रोशीत  अनेक गावाचे अर्थकारण अडचणी मध्ये आले लहान हातावर असलेल्या कुटुंबांना यांचा मोठा त्रास झाला आहे अशा वेळी  लोकांना पाठबळ देण्यासाठी देशहितासाठी आपली जबाबदारी हि या मागे भुमिका असल्याचे सांगितले व घरोघरी. जाऊन थेट वितरण करण्यात आले लोकांनी मास्क वापरुण  आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केले यावेळी पोलीस पाटील नानासाहेब गव्हाणे  बाबासाहेब मते ज्ञानदेव मते   संयाजी गाडेकर उद्योजक संजय गव्हाणे संजय मते मते संतोष मते भाऊसाहेब मते  रविद्र गाडेकर  विष्णु गाडेकर विजय गाडेकर  आदींसह विविध युवकांनी पुढाकार घेतला होता.

शिर्डी, प्रतिनिधि जय शर्मा )27: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अत्यंत प्रभावीपणे का म करत आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. येणाऱ्या खरीप हंगामातील पिकांचे नियोजन, बी-बियाणे, रासायनिक खते, औषधांची उपलब्धता इत्यादी बाबींच्या पूर्वतयारीचा आढावा महसूलमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे घेतला त्यावेळी ते बोलत हेाते.
            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री महसूल मंत्री थोरात यांनी घेतलेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, महसूल मत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुभाष काटकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण अरगडे सहभागी झाले होते.
            येणाऱ्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने बी-बियाणे, रासायनिक खतांचे व औषधांचे नियोजन करावे, तालुक्यात कुठेही याचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच गेल्या दोन-तीन वर्षांपासून खरीप पिकाची मागणी लक्षात घेवून ज्या वाणांस चांगला प्रतिसाद मिळतो त्या वाणांच्या बियाण्याची उपलब्धता मुबलक होईल याचे नियोजन करावे, असे निर्देश महसूल मंत्री थोरात यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणाकरिता तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्षाची स्थापना तात्काळ करावी, भरारी पथकाचे काम सुरु करावे, पिक विमा भरपाईमध्ये पिक कापणी प्रयोगाचे महत्व काय आहे याबाबत गावपातळी पर्यंत जागृती करणे याबाबत नियोजन करण्यासाठी मंत्रीमहोदयांनी मार्गदर्शन केले.
            तालुक्यातील शेतकरी उत्पादक गटांच्यामार्फत लॉकडाऊनच्या काळात मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरी भागातील ग्राहकांना भाजीपाला पुरवठा करणाऱ्या मुल्य साखळीचे सबलीकरण करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. याकरीता शेतकऱ्यांच्या गटास अनुदानीत पॅक हाऊस उभारणी करुन देणे, शितवाहन उपलब्ध करुन देण्याची त्यांनी सूचना केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांना स्थलांतर करण्याची वेळ येवू नये व गावातच त्यांना काम उपलब्ध होईल अशा सूचना देतांना मनरेगाअंतर्गत शेततळे व कंपार्टमेंट बंडीगच्या कामाचे नियोजन कृषी विभागाने करावे असे सांगितले. तालुक्यातील काही गावांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निदर्शनास आणून दिले. याकरिता महसूल व ग्रामविकास विभागांनी योग्य समन्वयाने टँकर मंजूरीची कार्यवाही त्वरीत पूर्ण करुन आवश्यकतेप्रमाणे पाणी पुरवठा करण्याबाबतच्या सूचनाही प्रशासनला दिल्या.

शिर्डी जय शर्मा-राहता तालुक्यात विशेषतः शिर्डी व परिसरात या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या काही किराणा, रेशन दुकानदारांकडून तसेच गॅस एजन्सी वाल्यांकडून सर्वसामान्यांची आर्थिक लुटमार होत असून शासकीय अधिकारी, पोलीस सुद्धा याकडे थातूरमातूर कारवाई करून दुर्लक्ष करीत आहेत, जर येत्या चोवीस तासाच्या आत या लोकांवर,या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात आली नाही,  तर प्रांताधिकारी शिर्डी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दैनिक साईदर्शन चे संपादक जितेश लोकचंदानी शिर्डी यांनी दिला आहे,कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकं डाऊन सुरू आहे, त्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे, सर्वजण आपापल्या घरात आहेत, काम धंदा नसल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब, मजदूर, कामगार यांना आर्थिक चणचण भासत आहे, अशा संकटकाळात रेशन दुकानदार मात्र शिधापत्रिकाधारकांना नियमात असतानासुद्धा मोफत प्रत्येकी पाच किलो तांदूळ देण्याऐवजी दोन किलो तांदूळ देत आहेत, किराणा दुकानदार किराणा मालाचे भाव अव्वाच्या सव्वा भाव लावीत आहे ,तसेच दुकानाची वेळ ठरवलेली असतानाही दुकान सुरू ठेवले जाते, काही दुकानात गुटखा होलसेल विक्री केली जाते, अशाच  सावळीविहीरला एका किराणा दुकानात छापा टाकला असता अगोदर खबर।लीक झाल्याने गुटखा लंपास झाला, मात्र प्लास्टिक पिशव्या हाती सापडल्या, अशा घटना येथे घडताहेत, संवत्सरच्या एका गॅस एजन्सीवाल्याकडून सावळीविहीर येथील लोकांकडून 740 रुपयांऐवजी 780 रुपये उज्वला गॅस सिलेंडरचे घेतले जात आहेत, शिवाय लॉकडाऊन चे नियम पाळले जात नाही , बंदी असतानाही अनेक ठिकाणी रात्रीचे कूपनलिका खोदण्याचे काम अवैधरित्या परवानगी नसताना अनेक ठिकाणी सुरू असते ,अनेक जण भाजीपाला विक्रीच्या नावाने रस्त्याच्या कडेला बसून नियमभंग करतात मात्र या लोकांवर थातुरमातुर कारवाई अधून-मधून केली जाते, परत जैसे थे परिस्थिती निर्माण होते ,शिर्डी व परिसरात दारु, बियर साठा मोठ्या प्रमाणात असून जादा दराने विक्री होत आहे, सावळीविहीरला परमिट रूम फोडण्यात आले,बियरसाठा शिर्डीला पकडण्यात आला ,राहत्याला देशी दारू दुकान फोडले ,मात्र थातुरमातुर कारवाई झाली ,होलसेल गुटखा विक्री करणारे दुकानदार, किराणामाल अव्वाच्या सव्वा किमतीला विकणारे व वेळेचे बंधन न पाळणारे किराणा दुकानदार ,शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ असतानाही त्यात गफला करणारे रेशन दुकानदार, व उज्वला गॅस सिलेंडरचे जादा पैसे घेणारे गॅस एजन्सी वाल्यांकडून  ग्राहकांची होणारी आर्थिक लूट  त्वरित थांबवावी व अशा  सर्वांची गुप्त पद्धतीने चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ,जर 24 तासाच्या आत या लोकांवर गुप्त पद्धतीने चौकशी करून  कडक कारवाई झाली नाही तर प्रांताधिकारी कार्यालय, शिर्डी यांच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा  दैनिक साईदर्शन चे संपादक जितेश लोकचंदानी यांनी  दिला आहे.

शिर्डी (जय शर्मा )
 राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे अमोल किराणा स्टोअर्स मध्ये गुटख्याची होलसेल विक्री होत असलेल्या संशयावरून  पोलीस व अन्नभेसळ अधिकार्‍ यांनी धाड टाकली, मात्र त्या अगोदरच ही खबर लिक झाल्याने या अधिकाऱ्यांच्या हाती गुटखा ऐवजी प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकपत्रवाळ्या हाती लागल्या, या छाप्याची बातमी सावळीविहीर व परिसरात पसरताच सर्वत्र चर्चेला उधाण आले होते, खोदा पहाडऔर निकल गये प्लास्टिक अशी परिस्थिती त्यामुळे झाली,
 राहता तालुक्यातील सावळीविहीर येथे गावात कोठारी यांचे अमोल किराणा स्टोअर्स आहे, या दुकानात विविध कंपन्यांचे गुटखा विक्री केली जात असल्याचा संशय जिल्हा अन्नभेसळ प्रतिबंधात्मक अधिकाऱ्यांना होता, तसेच अहमदनगर पोलीस नियंत्रण कक्षाततूनही तसे आदेश देण्यात आले होते ,त्यावरून अन्न भेसळ अधिकारी व पोलीस यांनी रविवारी दुपारी  येथे या अमोल किराणा स्टोअर्स दुकानांमध्ये छापा टाकला व दुकानांमध्ये  तपासणी केली, मात्र या छाप्याची खबरआगोदरच लिक झाल्याचा संशय आता व्यक्त होत आहे, कुणीतरी ही खबर।लिक केल्यामुळे या शासकीय अधिकाऱ्यांच्या हाताला गुटखा लागला नाही ,पण  या दुकानात प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या, प्लास्टिकला बंदी असताना प्लास्टिक पिशव्या दुकानात सापडल्याने तशी कारवाई करण्यात येत आहे ,मात्र ही खबर कोणी लिक केली  याचा तपास होणे गरजेचे आहे, या अगोदर काही दिवसापूर्वीच या दुकानात छापा टाकण्यात आला  होता, व त्यावेळी  माल सापडला होता मात्र चिरीमिरी वर  हे प्रकरण दाबून टाकण्यात आले ,अशी चर्चा आहे, यावेळी मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी प्रामाणिक व आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा छापा टाकला, परंतु कुणीतरी ही बातमी लिक केल्यामुळे अधिकाऱ्यांचा वेळ ,श्रम वाया गेले, अशीही नागरिकांत चर्चा होती, हा गुप्त छापा असताना ही खबर कोणी दिली, याची चौकशी होणे गरजेचे आहे, यात कोणता शासकीय कर्मचारी तर नाही ना।। अशी शंका व्यक्त होत आहे, तसेच सध्या लॉक डाऊन सुरू आहे, लॉक डाऊन काळात सावळीविहीर।बु।। ग्रामपंचायतहद्दीत सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत किराणा दुकान उघडे ठेवणे गरजेचे आहे, तसेच या काळात विनाकारण भाव वाढ करणे किंवा जादा भाव घेणे गुन्हाअसताना तरी काही लोकांकडून या आदेशाचे उल्लंघन होत आहे, या सर्व गोष्टींकडे पोलीस, स्थानिक प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहेत, पोलिसांचे एक दोन चक्कर होतात, जीप येते, परंतु नंतर मात्र येथे सर्व आलबेल सुरू होते, पोलीस जिपवरील स्पीकरचा आवाज ऐकताच सर्व आपली दुकाने पटापट बंद करतात, पोलीस गेले की परत उघडतात, यापुढे तरी कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे ,अशी नागरिकांची मागणी आहे.

साकुरी/कोरोणा आजाराच्या पाश्र्वभूमीवर  संचारबंदी व लाॅकडाउन व शिर्डी शहरातील बंद असलेल्या साईबाबा मंदिर यामुळे  संगळे व्यवसाय  जवळपास बंद पडलेले आहेत शिर्डी नगरपंचायत कार्यश्रेत्रात मोठ्या प्रमाणावर शिर्डी नगर पंचायत च्या मालकीची विविध काॅम्पलेक्स मध्ये विविध प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी गाळे बांधुन दिले आहे  मात्र अडचणी त आलेली बाजारपेठ यामुळे उपजिवीका चालवणे अवघड झाले आहे  अशा वेळी  महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेवून सहा महिने भाडे आकारणी करु नये अशी मागणी भाजपचे अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्य व  राहता तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब काशिनाथ गाडेकर  यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे
    अगोदरच वाढलेले गाळ्याचे भांडे होत नसलेला व्यापार साईभक्त भाविकांची नसलेली गर्दी अशी संकटाची मालीका सुरू असताना  १३मार्च रोजी बंद  झालेले  साई मंदीर कोरोणाच्या महामारी. मुळे   असलेली संचारबंदी व लाॅकडाउन   वाढत असलेल्या या आजाराने बाजारपेठेत जवळपास सहा महिन्यांत तरी पुर्व पदावर येईल अशी खात्री दिसत नसल्याने  राज्यसरकारने ज्या ज्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत   ग्रामपंचायत  बाजारसमिती या माध्यमातून भव्य काॅम्पलेक्स बांधुन गाळे भाडे तत्वावर दिली आहे त्याच्या साठी जलदगतीने युद्ध पातळीवर निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget