Latest Post

औरंगाबाद /प्रतिनिधी ÷ फिरोज शेख ÷  आज दि रोज धावत्या स्कूल बस मध्ये मतिमंद मुली चा विनयभंग करून विडीऔकिल्प वायरल झाल्याची घटना औरंगाबाद येथे काही दिवस आगोदर घडली या घटनेनंतर पुर्ण महाराष्ट्र भर संताप व्यक्त करण्यात आला आहे पुर्ण औरंगाबाद शहर व ग्रामीण भागात पुर्ण शाळा , कॉळेज मध्ये जाऊन स्कूल बस चालक व मालक बस ची पहाणी करण्यात येत आहे व पुर्ण चालकांनी चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे या पुढे पुन्हा विद्यार्थीचा छळ होईल आशा घटना टाळण्यासाठी विविध उपयोजना करण्यास सूचना दिल्या व पुर्ण गाडी चे कागदपत्रे हे ही पुर्ण कमप्लेट ठेवावीत  तसेच आज बेगमपुरा पोलिस हद्दीत येणार्या ऑक्स्फर्ड व किड्स आय टी वल्ड होणाजी नगर येथे पोलिस उप निरीक्षक एस. सानप व आदी पोलिस कर्मचारी व  अक्षदा मॅडम खुडे   
तबरेज खान सर योगेश जाधव सर आदी मान्यवर व स्कूल बस चालक व मालक व पालक मोठ्या संख्येने  उपस्थित होते

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- मार्क वाढवुन देण्यासाठी विद्यार्थीनी कडे शरीर सुखाची मागणी करणार्या नराधम प्राध्यापका विरूध्द अखेर विनयभंग तसेच अँट्राँसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आसुन शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणार्या या घटनेचा सर्वच स्तरातुन तिव्र संताप व्यक्त केला जात आहे येथील बारावीच्या वर्गात शिकणार्या एका विद्यार्थीनी कडे बाबुराव पांडुरंग कर्णे रा श्रीरामपूर या नराधम शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली यामुळे ती विद्यार्थीनी घाबरली घरी ती रडत असाताना पालकांनी तिला विश्वासात घेवुन विचारले असता बाबुराव कर्णे या प्राध्यापकाने मार्क वाढवुन देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली असुन मागणी पुर्ण केली तर
आयुष्य बरबाद होते अन पुर्ण केली नाही तर वर्ष बरबाद होते काय करावे हे त्या विद्यार्थीनीला समजेना त्यामुळे ती फार घाबरली ही घटना गावात समजताच ग्रामस्थ पालक वर्गातुन तिव्र संताप व्यक्त झाला सकाळी १० वाजताच ग्रामस्थ शाळेत जमा झाले सदर शिक्षकाला निलंबीत करा त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याला गावकर्याच्या ताब्यात द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्या वेळी काहींनी वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे शाब्दिक चकमकी पण झाल्या चार पाचशे ग्रामस्थ घोषणा देत शाळेतुन पोलीस स्टेशनला गेले त्या ठिकाणी अनेकांनी आपल्या भाषणातुन चिड व्यक्त केली त्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तेथे आले ग्रामस्थांचा त्या शिक्षका बद्दल रोष लक्षात घेवुन त्यांनी संबधीतावर कारवाई करण्याचे अश्वासन देवुन गाव बंद ठेवु नका ठोस कारवाई करतो असे अश्वासन दिले त्यानंतर बाबुराव पांडूरंग कर्णेयाचे विरुध्द भादवि कलम ३५४ अ तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल अँट्राँसिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )  विद्यार्थी जीवनामध्ये खेळांना अतिशय महत्व असून श्रीरामपूर शहरातून क्रीडाक्षेत्रातील चांगले खेळाडू निर्माण व्हावेत. मुलांमधील क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यासाठी क्रीडा महोत्सव आवश्यक असून नगर पालिका शाळा क्रमांक पाच शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. खेळाडू व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करीन असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक हाजी अंजूमभाई शेख यांनी केले.
पालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नगरसेवक अंजुमभाई शेख, ताराचंद रणदिवे, मुक्तार शहा, नगरसेविका समीना शेख, जायदाबी कुरेशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक पठाण, कलीम कुरेशी, ॲड शफी अहमद शेख, अॅड. कलीम शेख, शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन, आदींच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोहेल बारूदवाला,  डॉ. तोफिक शेख, फिरोज पोपटीया, जमील शहा, शाहरुख बागवान, साबिर मिस्तरीअमिन शेख, बाळासाहेब सरोदे, तरन्नुम मुनीर शेख, युनूस सत्तार शेख, हाजी इब्राहिम शाह पोस्टमन आदींसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वी शहरातील सर्व नगरपालिका व खाजगी शाळांच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जात होत्या. मात्र गेल्या काही वर्षापासून या स्पर्धा बंद झाल्यामुळे शहरातील विविध शाळांतील खेळाडूंना प्रोत्साहन व उत्तेजन मिळणे दुरापास्त झाले होते. यासाठी शाळा क्रमांक पाचच्या शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळा पातळीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये धावणे , लिंबू चमचा शर्यत,  स्लो सायकलिंग, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी आणि सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये कबड्डी, खोखो, लंगडी, संगीत खुर्ची आदि खेळांच्या स्पर्धा घेतल्या गेल्या. शाळा व्यवस्थापन समितीतर्फे विजेत्या सर्व मुलांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा शिक्षक बॅंकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी केले. सूत्रसंचालन आसिफ मुर्तुजा तर आभार फारुक शहा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एजाज चौधरी, युवराज पाटील, सुयोग सस्कर, यास्मिन शेख तसेच वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, शाहीन शेख, आसमा पटेल निलोफर शेख, बशीरा पठाण, मिनाज शेख, सदफ शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.

शिर्डी प्रतिनिधि पाथरीकरांनी साईबाबांचा  जन्मस्थान पाथरी येथे सांगून वादाला सुरुवात केली आहे साइबाबान्नि संपूर्ण हयातीत कधीच जातपात सांगितली नाही कधीच आपन कुठ जन्माला आलो असे कधीच कोनाला सांगितले नाही साईबाबाह्या संताने सर्वांना सर्वधर्मसमभाव शिकवण दिली त्यांच्या मुखातून कायम अल्ला मालिक अल्ला भला करेगा रामजी भला करेगा असे निघत असे अश्या सन्ताबाबत पाथरीकरांनी जे विष पेरले त्या विरोधात तमाम साइभक्ताण्णी नाराजगि व्यक्त केली पाथरीकरांनी आधी राष्ट्रपती यांना खोटे सांगितले त्यानंतर उद्धव ठाकरे यांना खोटेनाटे सांगून त्यांच्या तोंडून वदूण घेतले असता आजूणच वाद वाढत गेला त्याचा परिणाम शिर्डी बंद पर्यंत झाला शिर्डीच्या ग्रामस्थांनी शिर्डी बंद पुकारला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील साईभक्त ग्रामस्थांना मुंबई येथे चर्चे साठी दुपारी मंत्रालयात बोलवले आहे त्यातून तोडगा निघनारच असल्याने व साइभक्तान्चे होत असलेले  हाल पाहून बंद असलेले व्यवहार  पुन्हा चालू करण्याचे एकमताने ठराव केला आहे परंतु आज होणाऱ्या बैठकीत जर तोडगा निघाला नाही  तर पुन्हा शिर्डीकर शांत बसणार नाहीत पुढच्या काळात ह्या पेक्षा अधिक  तीव्र आन्दोलन केले जाईल. आज मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत शिर्डीतील शिष्टमंडळ जाणार आहे ह्या शिष्टमंडळात  कैलासबापू कोते
कमलाकर कोते
विजय जगताप
नितिन उ, कोते
जगन्नाथ सु. गोंदकर
विजय तु. कोते
दत्तात्रय कोते
सुजित ज्ञा. गोंदकर
सुनिल भा. गोंदकर
रमेशभाऊ गोंदकर
दिपक वारूळे
शब्बीर सय्यद
प्रमोद गोंदकर
संजय शिंदे
सचिन पा.कोते
अभय शेळके
सुधाकर शिंदे
ज्ञानेश्वर गोंदकर
बाबासाहेब कोते
गणीभाई पठाण
दत्तात्रय गोविंद कोते
जितेश लोकचंदानी
मंगैश त्रिभुवन
अशोक बा.गोंदकर
प्रमोद आहेर
नवनाथ दिघे
महेंद्र शेळके
राजेंद्र भा.गोंदकर
रतिलाल लोढा
संदिप पारख
अशोक पवार
रविंद्र गोंदकर
सचिन शिंदे
विनायक रत्नपारखी
रमेश बिडये
पोपट शिंदे
हरिश्चंद्र कोते
सचिन चौगुले
सलिम पठाण
नसिर दारूवाले
सलिम शेख
गफार पठाण
गोपीनाथ गोंदकर
नितीन शेळके
अशोक खं.कोते
आप्पासाहेब कोते
विनायक कोते
राजेंद्र शिंदे
गणेश कोते
उत्तमराव कोते
एकनाथ गोंदकर
सुनील सो. बारहाते

*पंचक्रोशीतील शिष्टमंडळ*
राजेंद्र चौधरी
कैलास कातोरे
भानुदास कातोरे
गणेश आगलावे
संदिप वाबळे
फकीरा लोढा
शरद मते
विजय कातोरे
अशोक धनवटे
नितीन कापसे हे असतील आज होणाऱ्या बैठकीत सर्वांचे लक्ष लागले आहेत.

शिरसगाव[वार्ताहर]येथील ग्रामीण साहित्यिक प्रा.डॉ बाबुराव दत्तात्रय उपाध्ये यांना “विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान”चा महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्कार जाहीत झाला असून हा पुरस्कार रविवार दि ३० जानेवारी रोजी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.श्रीरामपूर येथील बोरावकेनगरमधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा दुसरा वर्धापन दिन ३० जानेवारी रोजी श्रीरामपूर आगाशे सभागृह  येथे सकाळी १०-३० वा. आयोजित करण्यात आला आहे.त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान उपाध्यक्ष डॉ राजीव रावसाहेब शिंदे,यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रतिष्ठान संस्थापक सुखदेव सुकळे लिखित”समर्पित प्रकाशयात्री”या चिंतनात्मक चरित्रग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.या ग्रंथात सुखदेव सुकळे यांनी आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड,डॉ बाबुराव उपाध्ये,माजी प्राचार्य टी इ शेळके,यांचा चरित्रात्मक शब्दवेध घेतलेला आहे.डॉ उपाध्ये यांनी ७ ओगस्ट १९८४ ते ३० जून २०१७ या ३३ वर्षे काळात रयत शिक्षण संस्थेच्या सातारा,पुणे,कर्जत,श्रीरामपूर शाखेत मराठी प्राध्यापक म्हणून काम केले.विविध वाड:मय प्रकारात ३० पुस्तके प्रसिद्ध असून त्यांना आतापर्यंत ३३ पुरस्कार मिळाले आहेत.ते पुणे विद्यापीठाचे मराठी विषयाचे एम फील/पी एच डी चे नार्गादर्शक होते.त्यांचे ८ अभ्यासकांनी पी एच डी व १७ अभ्यासकांनी एम फील पदवी प्राप्त केली.त्यांच्या जीवनावर आधारित ६ जीवनग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.विविध नियतकालिकामध्ये ७५ शोधनिबंध लिहिले असून ते सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहि:शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते म्हणून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत,त्यांनी ६ ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.व ३००० व्याख्याने झाली आहेत.त्यांनी”आईची माया”ही कथा पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होती.सध्या दोन संदर्भग्रंथ अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.त्यांना पुरस्कार जाहिर झाल्याने अनेकांनी अभिनंदन केले आहे.

कोल्हार प्रतिनिधी (साईप्रसाद कुंभकर्ण ) :-  कॉ.पी.बी.कडू पाटील यांचे कार्य स्मरणात राहण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे. कॉ.पी.बी.कडू पाटील  यांचे कार्य अत्यंत प्रभावशाली असेच आहे असे प्रतिपादन सह्याद्री देवराई अभियानचे अभिनेता सयाजी शिंदे यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ.पी.बी.कडू पाटील तृतीय स्मृतीदिन,मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक समारंभ व  कॉ.पी.बी.कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार प्रदान समारंभ प्रसंगी रयत संकुल सात्रळ येथे केले.त्यांनी सांगितले कि प्रत्येकांनी आज किमान एक झाड लावले पाहिजे त्याचप्रमाणे पाच वर्ष त्यांचा वाढदिवस साजरा केला पाहिजे आजची शिक्षण पद्धती ही व्यक्तिगत जीवन जगण्याची आहे त्याऐवजी निसर्गासाठी कसे जगता येईल हे पाहावे कारण देश मागे गेला तर शेतकरी मागे राहील यासाठी या भयानक परिस्थितीचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आपल्या वागण्याने जग बदलता येते.यासाठीच आपण निसर्गासाठी बदल केला पाहिजे यावेळी त्यांनी कविवर्य अरविंद जगताप यांची काव्यरचना विद्यार्थ्यांसमवेत गायली तसेच युवानेते पंकज कडू पाटील यांच्या सहकार्याने पाच हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला.   
कॉ.पी.बी.कडू पाटील तृतीय स्मृतीदिन समाजक्रांती पुरस्कार समारंभ कॉ.पी.बी.कडू पाटील फौंडेशन,सात्रळ यांचे विद्यमाने मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील  स्मृती पारितोषिक वितरण समारंभ रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व कॉ.पी.बी.कडू पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.अरुण कडू पाटील यांनी करतांना सांगितले कि  आप्पांच्या कार्याचा वसा चालविण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोतच यासाठी त्यांच्या स्मृती दिनी वेगेवेगळे पुरस्कार देऊन नामवंत वक्त्यांना आमंत्रित करून विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमास सर्वांची साथ लाभाल्यानेच अप्पांचे हे कार्य पुढे चालू शकलो आहे. यावेळी त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
कॉ.पी.बी.कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार जेष्ठ साहित्यिक मा.फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या संदेशात कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या कार्याबद्दल सांगितले की जे समाजासाठी सुंदर जीवन जगतात त्यांची स्मृती कायम राहते त्याप्रमाणेच कॉ.पी.बी.कडू पाटील यांनी आपल्या  कार्याने  स्मृती कायम ठेवली आहे.त्यामुळे आपल्या सर्वांची आज जबाबदारी बनते की कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या कार्याचा वसा आपण सर्वांनी पुढे चालू ठेवणे गरजेचे आहे.तोच वसा या संकुलात जपला हि अभिमानाची गोष्ट आहे
महाराष्ट्र राज्य आदर्श गाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त शेती आणि मातीसाठी कॉ.पी.बी.कडू पाटील यांचे कार्य थोर असेच आहे आज मात्र पाणी चळवळ उभी करणे गरजेचे आहे अभिनेता सयाजी शिंदे यांच्या देवराई प्रकल्पाबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की दैवत्वाचे नाव ठेवून वनराई नटविण्याचे कार्य अभिनेता सयाजी शिंदे यांनी केले विस्तापित माणसाला प्रस्तापित कसे करता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे होय.आज आपण सर्वांनी निसर्गाच्या विविधतेसाठी झटले पाहिजे सर्वजन आज विषयुक्त अन्न खात आहोत देशाला अन्न पुरविना-या पंजाबची अवस्था आज कॅन्सरग्रस्त अशी झाली आहे  यासाठी सर्वांनी पर्यावरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून पाणी चळवळ उभी करणे गरजेचे आहे
याप्रसंगी कॉ.पी.बी.कडू पाटील फौंडेशन,सात्रळ यांचे विद्यमाने  दिला जाणारा  कॉ.पी.बी.कडू पाटील समजक्रांती पुरस्कार जेष्ठ साहित्यिक मा.फादर फ्रान्सिस दिब्रिटो रु.५१,००० /- व सन्मानपत्र त्यांच्या वतीने त्यांची पुतणी लुसि दिब्रोटो यांनी स्वीकारला  व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृति परितोषिक श्री. कवडे वसंत सुदाम कृतिशील मुख्याध्यापक,पुंजाजी रामजी भोर विद्यालय,ठाणगाव ता.सिन्नर रु.११,००० /- व स्मृतीचिन्ह उपक्रमशील शिक्षक पुरस्कार - कचरे रविंद्र पांडुरंग उपशिक्षक,छत्रपती शिवाजी विद्यालय,बेलवंडी ता.श्रीगोंदा -रु.११,००० /- व स्मृतीचिन्ह सावित्रीबाई फुले उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार- सौ.शेख तैसिन जावेद उपशिक्षिका,महात्मा फुले विद्यालय,भाळवणी ता.पारनेररु.११,००० /- व स्मृतीचिन्ह स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार प्रथम क्रमांक  रु.५,००१/- व स्मृतीचिन्ह -लक्ष्मीबाई भाउराव पाटील प्राथमिक विद्यालय,अहमदनगर स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार द्वितीय क्रमांक  रु.३,०००/- व स्मृतीचिन्ह डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर, ता.कोपरगाव  एस.एस.सी.परीक्षा उत्तर विभागात प्रथम खेमनर संचित ठकाजी  पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय,लोणी   -रु.१,१०१/- व स्मृतीचिन्ह एस.एस.सी.परीक्षा उत्तर विभागात प्रथम - मुली.पवार वैष्णवी पांडुरंग  श्री गणेश विद्यामंदिर आमंळनेर भांड्याचे ता. पटोदा    रु.११०१/- व स्मृतीचिन्ह एच.एस.सी परीक्षा मार्च - विभागात प्रथम --कला शाखा   कु.दुतारे स्वाती गौरव  राधाबाई काळे महिला महाविद्यालय,अहमदनगर  रु.११०१/- व स्मृतीचिन्ह एच.एस.सी परीक्षा मार्च - वाणिज्य शाखा कु.शिंदे ऋतुजा नानासाहेब  एस एस जी एम कॉलेज,कोपरगाव रु.११०१/- व स्मृतीचिन्ह एच.एस.सी परीक्षा मार्च - विज्ञान शाखा काळे गणेश रमेश    महात्मा गांधी विद्यालय,कर्जत    रु.११०१/- व स्मृतीचिन्ह
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी पंचायत समितीचे सभापती धोंडीभाऊ सोनवणे हे होते
या कार्यक्रमास मा.आमदार सुधीरजी तांबे,आमदार लहुजी कानडे ,उत्तर विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दादाभाऊ कळमकर, मा.मीनाताई जगधने, मा.रावसाहेब मस्के पाटील,कॉ.बाबा आरगडे,माजी सचिव प्राचार्य शिवाजीराव भोर, प्रा.डॉ.गहिनीनाथ विखे,बाळासाहेब केरूनाथ विखे,भाऊसाहेब थोरात,कारखान्याचे एम.डी घुगरकर साहेब, माजी सहसचिव श्रीरंग झावरे, विभागीय अधिकारी संजय नागपुरे,उपविभागीय सरदार साहेब,गोविंदराव मोकाटे,शब्बीरभाई देशमुख, बबनराव कडू पाटील, एस.के,रयत सेवक संघाचे सरचिटणीस मा.भाऊसाहेब पेटकर,गणेश पाटील कडू ,पर्यवेक्षक श्री साळुके बी .एल. मुख्याध्यापिका जोगदंड जे.ए.,युवा नेते किरण कडू पाटील ,पंकज कडू पाटील ,विक्रांत कडू, सन्मानीय सर्व शाखाप्रमुख, संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.सिराज मन्सुरी व श्री.मंगेश कडलग यांनी केले.तर मा.दिलीप शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

मा.ना.श्री.छगन भुजबळ, मंत्री, अन्‍न व नागरी पुरवठा, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget