Latest Post


कोपरगाव (गौरव डेंगळे) – ट्रॅडिशनल शोतोकन कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने दरवर्षी आयोजित होणारी वार्षिक ब्लॅक बेल्ट परीक्षा आणि प्रशिक्षण शिबिर यंदा दिनांक ४ मे ते ६ मे २०२५ दरम्यान कोपरगाव येथे यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरात व परीक्षेत राज्यभरातून एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथून ७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.

या शाळेतील आपेक्षा भगत,साईशा जोरी आणि भार्वी थोरात यांनी उत्तम कामगिरी करत प्रथमच ब्लॅक बेल्ट प्राप्त केला. तर हर्ष लंगोटे याने दुसऱ्या डिग्रीचा ब्लॅक बेल्ट (2nd Dan) मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सरस ठोळे,आदर्श भगत, धनश्री सोनवणे, अनन्या पुनकर व शिवकन्या घोरपडे यांनी ब्लॅक बेल्ट कॅम्पमध्ये सहभागी होऊन प्रात्यक्षिकांद्वारे कराटेच्या तंत्रांची प्रगती साधली.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षिका वर्षा देठे यांचा 'बेस्ट इन्स्ट्रक्टर' म्हणून सन्मान करण्यात आला.त्यांनी दीर्घ काळापासून शिस्तबद्ध प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,नेतृत्वगुण आणि आत्मसंरक्षण कौशल्य विकसित केले आहे.त्यांच्या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे  शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, शिक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाने, नथाली फर्नांडिस यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या परीक्षा व शिबिराचे आयोजन शिहान सुदर्शन पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कराटेचे शारीरिक व मानसिक महत्व पटवून दिले. शिबिरात काता (तांत्रिक हालचाली), कुमिटे (लढाईचे तंत्र), ब्रेकिंग टेक्निक्स, डिसिप्लिन, शारीरिक तंदुरुस्ती आणि कराटेचे मूलभूत तत्त्वज्ञान यावर विशेष भर देण्यात आला.

या यशामुळे श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचा गौरव वाढला असून,पालक व शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षिकेचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

बेलापूर (प्रतिनिधी)--सनातन संस्थेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्रासाठी कार्य करत असलेले परमश्रद्धेय डॉ. जयंत आठवले यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोवा येथे 17, 18 ,व 19 मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून भारताला पुन्हा तेजस्वी, समर्थ बनवण्याचा आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना करण्याचा हा जागर आहे, असे गौरवोद्गार ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी महोत्सवासाठी पाठवलेल्या शुभसंदेशात काढले आहेत.


  सनातन संस्थेचे डॉ आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पाठविलेल्या संदेशात स्वामी गोविंददेव गीरीजी महाराज यांनी पुढे म्हटले आहे की, ‘सनातन संस्थेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कार्याची फलश्रुती म्हणून आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते निष्काम भावनेने व स्वयंशिस्तीने सनातन धर्माचा प्रसार करत आहेत. या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवनाचा स्वाध्याययज्ञ, सेवायज्ञ आणि लोकजागरणयज्ञ सुरू केला आहे. हे कार्य अत्यंत विलक्षण आहे आणि त्यातूनच सनातन राष्ट्राच्या अभ्युदयाचा मार्ग उजळणार आहे.


    या महोत्सवात विविध राष्ट्रनिष्ठ नेते, धर्माचार्य, कार्यकर्ते आणि सनातनप्रेमी एकत्र येऊन विचारमंथन करणार आहेत. या मंथनातून केवळ नवनीत नव्हे, तर अमृत उदयाला येईल आणि याच अमृतकलशातून सनातन राष्ट्राला नवतेज प्राप्त होईल. आज भारताला समर्थ राष्ट्र बनवायचे असेल, तर सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वांची आवश्यकता आहे. भारताच्या सामर्थ्यावरच जगात समता, बंधुता आणि खरी स्वतंत्रता टिकू शकते. म्हणूनच हे कार्य एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या संस्थेचे नसून, धर्माचे आणि राष्ट्राचे कार्य आहे.


    त्यामुळे सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रनिष्ठ कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, धर्मगुरूंनी आणि सामान्य भक्तांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या श्रद्धेचे आणि सेवाभावाचे योगदान द्यावे.  भारताच्या सुंदर, समृद्ध भविष्यासाठी हा महोत्सव एक सुवर्णसंधी आहे. या महामंथनातून मिळणाऱ्या तेजाने भारत गगनभरारी घेईल आणि सनातन धर्माचा दिव्य प्रकाश संपूर्ण जगात पसरेल. म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या दिव्य कार्यात सहभागी होऊ  आणि भारताला त्याच्या सनातन तेजाने पुन्हा उभे करूया, असेही आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

बेलापूर( प्रतिनिधी)-- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्य दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते करून पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात जे 15 निष्पाप नागरिक मारले गेले त्या नागरिकांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.                          पहेलगाम हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला शब्द दिला होता की यातील एकालाही माफ केले जाणार नाही त्या पद्धतीने तिनही सैन्य दलाच्या मदतीने अतिरेकी प्रशिक्षण देणारे 9  केंद्र उध्वस्त करण्यात आले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त  केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी देशातील निष्पाप नागरिकांवर व लहान मुलावर गोळीबार केला त्यात पंधरा नागरिक मरण पावले व एक जवान शहीद झाला. त्यांनाही बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विष्णुपंत डावरे, हाजी इस्माईल शेख, प्रफुल्ल डावरे, संजय भोंडगे,विलास मेहत्रे, रवींद्र खटोड, प्रशांत लड्डा, गोपी दाणी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुवालाल लुक्कंड,शांतीलाल हिरण ,बाळासाहेब दाणी,अशोक प्रधान, सतीश सोनवणे ,रत्नेश गुलदगड, डॉक्टर रवींद्र गंगवाल, भास्कर बंगाळ, बाबुलाल पठाण, राजेंद्र राशिनकर ,विजय कटारिया,रामनाथ शिंदे ,प्रवीण बाठीया, औदुंबर राऊत,मधुकर अवचिते,  ज्ञानेश्वर कुलथे इस्माईल आतार दिलीप दायमा संजय शिंदे सतिश सोनवणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास देसाई यांनी केले तर विष्णुपंत डावरे यांनी आभार मानले



अहिल्यानगर ,प्रतिनिधि वजीर शेख -शिर्डी येथे दिनांक ३मे२०२५ शनिवार रोजी शिर्डीत हॉटेल शांतीकमल ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२५ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन येथे करण्यात आले होते वजीर शेख यांना आभिनय पत्रकार क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल व प्रेम चित्रपटासाठी क्षेत्रातील लवकरच प्रेम योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास प्रसिध्द हॉटेल व्यवसायिक व समाज सेवक. किशोर कालडा शेठ संगमनेर, दिग्दर्शक अल्ताफ शेख पुणे, व प्रेम मराठी चित्रपट दिग्दर्शक सुदाम संसारे वंदना गव्हाणे अभिनेत्री इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याठिकाणी सुदाम संसारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला हा पुरस्कार दिल्याबद्दल रोहीणी वैभव बागडे यांनी पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख सुदाम संसारे व वंदना गव्हाणे अभिनेत्री यांचे आभार मानले

पाटणा, ५ मे २०२५(गौरव डेंगळे)– बिहारमध्ये सुरू झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ स्पर्धेला आज भव्य सुरुवात झाली. देशभरातील युवा खेळाडूंनी आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करत स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ऊर्जा आणि उत्साहाची नोंद केली.

पटण्याच्या पाटलिपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, सर्व राज्यांच्या खेळाडूंची मिरवणूक आणि प्रमुख नेत्यांचे प्रेरणादायी भाषण झाले. बिहारचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीत खेळांना अधिकृत सुरुवात झाली.


पहिल्या दिवसाचे ठळक घडामोडी:


अॅथलेटिक्स (धावण्याचे प्रकार): धावण्याच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या धावपटूंनी सुरुवातीलाच चांगली कामगिरी केली. हरियाणा आणि केरळच्या खेळाडूंनी मध्यम अंतराच्या शर्यतींमध्ये वर्चस्व दाखवले.


कुस्ती: हरियाणाने अपेक्षेप्रमाणे कुस्तीत वर्चस्व राखत मुलांच्या ६० किलो फ्रीस्टाईल प्रकारात पहिले सुवर्णपदक पटकावले.


नेमबाजी आणि तिरंदाजी: पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या नेमबाजांनी अचूकतेचं दर्शन घडवलं. ईशान्य भारतातील तिरंदाजांनी उत्कृष्ट स्थैर्य व नियंत्रण दाखवलं.


जलतरण: कर्नाटकच्या जलतरणपटूंनी पहिल्याच दिवशी दोन विक्रम मोडून स्पर्धेची रंगत वाढवली. मुलांच्या १०० मीटर फ्रीस्टाईल आणि मुलींच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात नवे विक्रम नोंदले गेले.



पहिल्या दिवशी खेळाडूंनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धेची उंची अधिकच वाढली आहे. पुढील काही दिवसांत ५००० हून अधिक खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपली चमक दाखवणार असून, नवे तारे उदयास येतील अशी अपेक्षा आहे.

"डॉ.प्रकाश गरुड,प्रमोद भारुळे उपाध्यक्ष, विष्णू गायकवाड कार्याध्यक्ष तर विनायक सापा,देवदत्त साळवे प्रधान सचिव"

अहिल्यानगर( प्रतिनिधी):---  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त 

 सहाय्यक पोलीस आयुक्त बाबासाहेब बुधवंत,उपाध्यक्ष पदी प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.प्रकाश गरुड तर कार्याध्यक्ष पदी विष्णू गायकवाड यांची निवड झाली आहे.


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाखांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा जिल्हा प्रेरणा मेळावा  रविवार दि.४ मे रोजी सकाळी १० वाजता नगर येथील शार्दुल नर्सरी,नालेगाव येथे  संपन्न झाला. 

समितीचे राज्य कार्यवाह कॉ.बाबा आरगडे, राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे, राज्य सरचिटणीस अड.रंजना गवांदे या राज्य निरीक्षकांच्या उपस्थितीत पुढील दोन वर्षांकरिता अहिल्यानगर  जिल्हा कार्यकारिणी

निवडण्यात आली.


*नवीन जिल्हा कार्यकारिणी अशी....*


श्री.बाबासाहेब  बुधवंत (जिल्हा अध्यक्ष),डॉ.प्रकाश गरुड व  श्री. प्रमोद भारुळे (जिल्हा उपाध्यक्ष),श्री.विष्णू गायकवाड (जिल्हा कार्याध्यक्ष), श्री.विनायक सापा व श्री.देवदत्त साळवे (जिल्हा प्रधान सचिव), अड.अभय राजे (कायदेशीर सल्लागार), श्री.सुखदेव फुलारी (सोशल मीडिया विभाग जिल्हा कार्यवाह),  श्री.शशिकांत गायकवाड (बुवाबाजी संघर्ष विभाग जिल्हा कार्यवाह), श्री.कारभारी गायकवाड (जात पंचायत मुठमाती अभियान विभाग जिल्हा कार्यवाह),

श्री.दीपक शिरसाठ (संविधान जागर विभाग जिल्हा कार्यवाह), श्री.बी.के.चव्हाण (विविध उपक्रम विभाग जिल्हा कार्यवाह),प्राचार्य अशोक गवांदे (निधी संकलन विभाग जिल्हा कार्यवाह),श्रीमती छाया बंगाळ

(महिला सहभाग विभाग जिल्हा कार्यवाह)


यावेळी अशोक सब्बन,कॉ.आप्पासाहेब वाबळे,कॉ.भारत आरगडे, अनिता सापा, प्रा. किसन शेवाळे, अरविंद गाडेकर, काशिनाथ गुंजाळ, हरिभाऊ उगले, विनायक ताकपेरे, शशिकांत जाधव, भावना भारुळे, शब्बीरभाई पठाण, रामचंद्र जाधव, संजय शिरोळे, एड. अभय राजे, शुभम पात्रकंठी, दीपक शिरसाठ, अड. राहुल बुधवंत यांचे सह  जिल्ह्यातील अकारा शाखाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


निरीक्षक कॉ.बाबा आरगडे, डॉ.ठकसेन गोराणे, अड.रंजना गवांदे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब बुधवंत,उपाध्यक्ष डॉ. प्रकाश गरुड,कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, अशोक सब्बन  यांनी मार्गदर्शन करून संघटना वाढीकरिता सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, शाखांच्या नियमित साप्ताहिक शाखा बैठका घ्याव्यात, समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्ते शाखेत जाणिवपूर्वक जोडून घ्यावेत, महिला व युवांना जोडून घेऊन पुढील दोन महिन्यांत प्रत्येक शाखेचे शाखा कार्यकर्ता व शिक्षक प्रशिक्षण शिबीर आयोजित करावेत, शाळा- महाविद्यालयात व्याख्यानांचे आयोजन करावे,सर्वांनी अंनिप या मासिकाचे वर्गणीदार व्हावे, आँनलाईन सभासद नोंदणी केलेल्या सभासदांना त्या त्या ठिकाणी जोडून घ्यावे असे आवाहन केले.

शशिकांत गायकवाड यांनी आभार मानले.

हम होंगे कामयाब  या गीताने प्रेरणा मेळाव्याचा समारोप झाला

बेलापूर ( प्रतिनिधी)-श्रीरामपुर तालुक्यातील कडीत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या सहा गाव पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या जलजीवन कामावरील पाईपला भीषण आग लागून  लाखो रुपयांचे  ठेकेदाराचे नुकसान झाले.अग्नीशामक बंड वेळेवर दाखल झाल्याने मोठी हानी टळली.                      सहा गावाला पाणी पुरवठा करणार्या खंडीत पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनला अचानक आग लागली .सदरील आगेची भीषणता मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवरा कारखान्याच्या अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास वेळ लागला शेजारी च शंभर दीडशे फूट अंतरावर असलेले नारळाचे झाडे देखील पेटले. उष्ण वातावरण असल्याने धुराचा लोळ एवढा मोठ्या प्रमाणात होता की दोन अग्निशमन दल येऊन देखील आग आटोक्यात येत नव्हती. सदर कामावरील सुपरवायझर यांच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागली असल्याचे नागरिक बोलत होते. सहा गावातील व कोलारसह नागरिक आगार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र वातावरणातील उष्णता व आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला सदर ठेकेदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. तालुक्यात व जिल्ह्यात जलजीवांचा कामाचा खेळ खंडोबा आणि ठिकाणी पहावयास मिळाला यामध्ये ही घटना घडल्याने अनेक ठिकाणी आपापसात नागरिक बोलताना सांगत होते की जलजीवन म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा अतिशय दिन मे गतीने या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते त्यातच ही आग लागल्याने अजून एक दीड वर्ष पुढे लुटल्याने नागरिक बोलत होते. याआधी देखील ट्रांसफार्मर शिफ्टिंग करताना सदरील पाईप ने पेट घेतला होता तरीही सुपरवायझरने दक्षता घेतली नसल्याचे नागरिक बोलत होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget