Latest Post

बेलापुर  ( प्रतिनिधी  )- कँप्टीव्ह मार्केट योजनेतंर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रीका धारक प्रत्येक कुटुंबाला  दर वर्षी एक साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एकुण ८८०३७ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहीती जिल्हा पुरवठा अधीकारी हेमा बडे यांनी दिली आहे .कँप्टीव्ह मार्केट योजनेतंर्गत अंत्योदय लाभार्थी ( २० किलो तांदुळ व १५  किलो गहु मिळणारे लाभार्थी ) यांना प्रति कुटुंब दर वर्षी  एक साडी वाटप करण्याचा निर्णय शासनाने १० नोव्हेंबर २०२३ रोजी घेतला होता त्या करीता महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल  संस्था म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे .महामंडळामार्फत अंत्योदय शिधापत्रीका धारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करुन ते  दुकानाच्या नावानुसार विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या तालुका स्तरावरील गोदामापर्यत पोहोचविण्यात येणार आहे .महामंडळाने सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS )यंत्रणेकडील गोदामापर्यत साड्यांचा पुरवाठा केल्यानंतर तेथुन अंत्योदय शिधापत्रीका धारक कुटुंबापर्यत साडी वाटप करण्याची व त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आहे .अहमदनगर जिल्ह्यातील ८८०३७ अंत्योदय लाभार्थी कुटुंबांना या योजनेतंर्गत एक साडी प्रति कुटुंब मिळणार आहे  त्यात नगर तहसील ४७४६पारनेर ३६३८ पाथर्डी ६२७६ कर्जत ३५४७ शेवगाव ९७५८ जामखेड ५६३८ श्रीगोंदा ८७४४ संगमनेर ६३८६ कोपरगाव ६७७८ अकोले ६१९९ श्रीरामपुर  ५७३४ नेवासा ७१५७ राहाता ५५९२ राहुरी ६१५२ नगर एफडीओ १७०१ या प्रमाणे लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे होळी सणापूर्वी अंत्योदय लाभार्थ्यांना साडी वाटप करण्याचे शासनाचे निर्देश आहेत                                [शासनाने केवळ अंत्योदय लाभार्थ्यांना साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचा त्रास, कटकटी वाढणार आहे सर्वच कार्डधारक साड्यांचा आग्रह धरुन धान्य दुकानदारांशी वाद घालणार आहेत.                            देविदास देसाई  जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना अहमदनगर  ]

शिव छत्रपती क्रीडा संकुलान बालेवाडी पुणे येथे पहिली साऊथ येशिया चॅम्पियनशिप 2024, 3 व 4 फेब्रुवारी 2024 या दोन दिवशीय पाहिली साऊथ येशीया तायकोन स्पर्धा पार पडली त्या मध्ये 5 देश सहभागी झाले होते त्या मध्ये भारताचा पहिला क्रमांक प्राप्त केला. सहभागी झालेले देश1) भारत 2) नेपाळ, ३) भूतान, 4) बांगला देश, 5) श्रीलंका हे देश या स्पर्धा साठी सहभागी झाले होते त्या मध्ये भारताचा पहिला क्रमांक आला. व दुसरा क्रमांक नेपाळ ने प्राप्त केला. व तिसरा क्रमांक भूतान ने प्राप्त केला. तायकोन संघटनेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ आप्पा शिंदे सर  व तायकोन संघटने चे महासाचिव श्री ऑ. राज वागडकर सर  याच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. व या स्पर्धसाठी साठी संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले व  संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र चे विद्यार्थ्यांना संस्थाक श्री सचिन पवार, सचिव अशोक शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले. संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्रचे विजयी विद्यार्थी 

1) वेदांत शेजुल.दोन Gold, २) दीप्ती महेंद्र जगताप Bronze,Silver, 3) निकिता सुनिल जगताप Silver,Silver, 4) निकिता कैलास जगताप. Bronze,Gold  5) तृप्ती रमेश वाघ.Bronze,Silver 6) स्वामींनी दत्तात्रय दरेकर.Bronze,bronze, 7) ओम दिगंबर लोहकने.Gold,Gold, 8) श्रावणी गणेश शेजुळ.Silver,gold, 9) श्रुतिका बापु वाघ.Gold  10) तेजस संजय राऊत Bronze,gold, 11)अधिरज अनिल अरांडे Gold,Gold, 

संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र चे  प्रमुख मार्गदर्शक सचिन पवार ,प्रशिक्षक श्री अशोक शिंदे, सचीन जाधव, अमोल माळी, व प्रशिक्षक आदित्या माळी , ओम लोहकने, सार्थक शिंदे, रोहन घोडके  रवींद्र शिंदे , व महिला प्रशिक्षक रेश्मा शिंदे, प्रतिभा गायकवाड , दिपीका पोल , येश्र्वर्या जोगदंड . संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या विजय होण्यामागे यांनी अधिक परिश्रम घेतले

बेलापूरःराजकीयदृष्ट्या बहुचर्चित बेलापूर बु!!ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महसूल मंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या नेतृत्वाखालील व जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखालील गावकरी मंडळाच्या स्वाती उत्तमराव अमोलिक यांची निवड झाली.निवड चुरशीची होईल अशी चर्चा असताना ११-६ अश्या मोठ्या फरकाने विजय मिळवून सुधीर नवले, रविंद्र खटोड,अरुण पाटील नाईक, भरत साळुंके यांच्या नेतृत्वा खालील जनता विकास आघाडीला गावकरी मंडळाने धक्का दिला.                                           बेलापूर बु!!ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीसाठी मंडल अधिकारी  श्री.भिमराज मंडलिक यांचे अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली.बैठकीस  उपसरपंच अभिषेक खंडागळे,सदस्य मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,वैभव कु-हे,मीना साळवी,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,महेन्द्र साळवी,रविन्द्र खटोड,भरत साळुंके,शिला पोळ,रंजना बोरुडे,छाया निंबाळकर उपस्थित होते.सरपंच पदासाठी गावकरी मंडाळाकडून स्वाती अमोलिक तर जनता आघाडीकडून रमेश अमोलिक यांनी उमेदवारी केली.गावकरी मंडळाकडे दहा तर विरोधकांकडे सहा असे संख्याबळ होते तर माजी सरपंच महेंद्र साळवी यांची भूमिका गुलदस्त्यात होती. असे असताना स्वाती अमोलिक यांना अकरा तर रमेश अमोलिक यांना सहा मते मिळाली.विरोधकांचे एक मत फुटल्याची चर्चा निवडीनंतर रंगली होती. निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सत्कार समारंभ व आभाराची सभा संपन्न झाली.यावेळी बोलताना जि.प.सदस्य शरद नवले यांनी विरोधकांचा समाचार घेतला ते म्हणाले की विरोधकांना चांगले काम देखवत नाही.सातत्याने विकासकामात अडथळे आणण्याचे एकमेव काम विरोधक करतात.नाम.राधाकृष्ण विखे पा. यांनी गावासाठी १२६ कोटीची पाणी पुलावठा योजना तसेच ४ कोटी किमतीची आठ एकर जागा साठवण तलावाला मोफत दिली.पण विरोधकांत चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत नाही.  विरोधकांच्या घाणेरड्या राजकारणाचा परिणाम गेली वर्षभर गावाच्या विकास कामांवर झाला.पण आता विरोधकांना गावकरी मंडळाने चोख उत्तर दिले असून यापुढील काळात ठप्प झालेल्या विकासकामांना गती दिली जाईल.सरपंच व उपसरपंच व सदस्यांनी चोख कारभार व विकास कामे करावीत बाकी आडव्या जाणाऱ्या मांजरांचा बंदोबस्त करण्याचे कामा मी करीन असे श्री.नवले म्हणाले.                          उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की,आजचा विजय हा गावकरी मंडळाच्या एकजुटीचा व ग्रामास्थांचा आहे. विरोधकांचे चाणक्य सरपंच निवडीबाबत शेखी मिरवित होते तसेच मोठा घोडेबाजार करू पाहत होते परंतु  आजचा विजय मिळवून राजकीय शकुनी मामांना सडेतोड उत्तर दिले आहे.विरोधकांच्या वल्गनांचा व अहंकाराचा आज फुगा फुटला आहे. महसूलमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या सहकार्याने विकास कामांचा रथ आम्ही हाकीत आहोत.हा रथ अडविण्याचा विरोधकांनी आटोकाट प्रयत्न केला पण आजच्या दणदणीत विजयाने विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे.आजवर आम्ही सबुरीने घेतले पण यापुढे माञ नाठाळपणा केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल.यापुढील काळात नाम.विखे पा.यांच्या सहकार्याने  तसेच समन्वयाने गावाचा विकास केला जाईल त्यास सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन श्री.खंडागळे यांनी केले.यावेळी जालिंदर कुऱ्हे, हाजी इस्माईल शेख,विष्णुपंत डावरे,सुधाकर खंडागळे,बाळासाहेब दाणी, पुरुषोत्तम भराटे,एकनाथ नागले,भाऊसाहेब कुताळ,मोहसीन सय्यद,अँड.अरविंद साळवी,रावसाहेब अमोलिक,गोपी दाणी आदींची भाषणे झाली.यावेळी कार्यकर्ते,हितचिंतक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडणुक आधिकारी श्री.मंडलिक यांना कामगार तलाठी श्री. प्रविण सूर्यवंशी,श्री.अक्षय जोशी, ग्रामविकास अधिकारी श्री. मेघशाम गायकवाड यांनी सहकार्य केले.पोलिस यंञणेने चोख पोलिस बांदोबस्त राखून निवडणूक शांततेत पार पाडली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - शहरातील नॉर्दन ब्रांच पासून वॉर्ड नंबर दोन मधून गेलेल्या प्रवरा कालव्याला काल दुपारपासून मोठे भगदाड पडले.त्यामुळे वैदूवाडा पुलापासून थोड्या अंतरावर या भागातून पाणी शेजारच्या रस्त्यावर तसेच आसपासच्या घरांमध्ये शिरले.जवळच नगरपालिकेची मोठी गटार असल्याने बरेचसे पाणी त्या गटारीत वाहून गेले. दुसऱ्या बाजूला फातेमा कॉलनीच्या बाजूने सुद्धा दुपारपासून पाणी फातमा कॉलनीतील प्रमुख रस्त्यांवर वाहत आहे.काल दुपारी उर्दू शाळेची मुले या पाण्यामध्ये खेळताना काही नागरिकांनी त्यांना हाकलले अन्यथा यातून एखादी मोठी दुर्घटना घडली असती. दुपारपासून आता रात्री अकरा वाजेपर्यंत प्रचंड पाणी वाया गेले असून परिसरातील

नागरिकांना सुद्धा याचा मोठा त्रास झाला आहे.परंतु पाटबंधारे खाते किंवा नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदरचा कालवा अनेक ठिकाणी उखडला आहे. वैदू वाड्यात पुलाजवळ तर या कालव्याचे पात्र एखाद्या नदीसारखे झाले आहे. शेजारीच रस्ता असल्यामुळे अनेक दुचाकी स्वार त्यात पडले आहेत. तसेच येथून नागरिक व विद्यार्थ्यांची नेहमी ये जा चालू असते. याबाबत पालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या तरी सुद्धा अद्याप दखल घेतली गेली नाही. काल कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेल्याने हे पाणी ओव्हरफ्लो होऊन कालव्याच्या बाहेर पडले.त्यातच दोन ठिकाणी भगदाड पडल्याने सदर पाणी नागरी वस्तीमध्ये शिरले. पाटाला पाणी आल्यानंतर पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवणे बंधनकारक आहे. मात्र या बाबीकडे पाटबंधारे खात्याच्या या अक्षम्य दुर्लक्ष बद्दल जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात पाटबंधारे खात्याच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे तसेच या पाण्यामुळे नुकसान झालेल्या घरांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिर्डी (गौरव डेंगळे): द केरळ स्टोरी या चित्रपटातून हिंदीत पदार्पण करणारी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सिद्धी इदनानी आज शिर्डीत श्री साईबाबा चरणी लीन झाल्या.सिद्धी इदनानी ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी तमिळ आणि तेलुगु सिनेमांमध्ये दिसते. जम्बा लकिडी पंबा या तेलगू चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. वेंधु थानिधाथु काडू या तमिळ चित्रपटातील भूमिकेसाठी तिला "पावई" म्हणून समीक्षकांनी प्रशंसा केली होती.सिध्दी इदनानी

 श्री साई समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. सन २०२३ हे वर्ष सिद्धीसाठी खास ठरलं आहे .या वर्षातील तिचा द केरला स्टोरी हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. यावेळी त्यांचा शाल व साई मार्गदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी निखिल रुपारेल,आशना म्हांबरे,राजदीपसिंह जाधव आदी उपस्थित होते.

श्रीरामपुर (प्रतिनिधी  )- ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ओबीसी समाजाच्या ३५० जातीवर हा अन्याय असुन या आरक्षणास आमची हरकत असल्याचे लेखी पत्र श्रीरामपुर तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले या  वेळी बोलताना समता परिषदेचे नेते चंद्रकांत झुरगे म्हणाले की मंडल आयोगाच्या शिफारशी नुसार आम्हाला आरक्षण मिळालेले आहे या आरक्षणात असलेला अठरा पगड जातीचा समाज गोर गरीब दिन दलीत कुटुंबाचा समावेश  आहे त्यामुळे ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास सर्वात मोठ्या असणाऱ्या ओबीसी समाजावर अन्याय होईल.तसेच मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली चुकीची व आक्षेपार्ह असुन सगेसोयरे या बाबत काढलेला आदेशही चुकीचा असल्याचे झुरंगे म्हणाले या वेळी नायाब तहसीलदार व्ही आर कल्हापुरे यांनी निवेदन स्विकारले त्यानंतर  ओबीसी समाजाच्या वतीने आमदार लहु कानडे यांनाही निवेदन देण्यात आले त्या वेळी बोलाताना आमदार लहु कानडे म्हणाले की तिन चाकाचे हे शासन सर्व सामान्यांना मुलभुत गरजांच्या प्रश्नापासुन दुर ठेवण्यासाठी ही जातीयवादाची खेळी खेळत आहे सर्व सामान्य नागरीकांना आपल्या हक्कापासुन वंचित ठेवण्यासाठी हे जातीयवादाचे विष कालवले जात आहे सुज्ञ मतदारांनी वेळीच सावध व्हावे असेही ते म्हणाले या वेळी दत्तात्रय साबळे बेलापुरचे माजी सरपंच भरत साळूंके यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी सुभाष गायकवाड विठ्ठल दुधाळ वासंत लिंगायत सुनिल ससाणे अनिल मुंडलीक अशोक शिरसाठ राजेंद्र साताभाई राजेंद्र टेकाडे मारुती राशिनकर शिवाजी जेजुरकर प्रकाश कुर्हे कलेश सातभाई जाकीर शेख एकनाथ नागले अशोक गवते फैय्याज बागवान दिपक गीरमे किरण बोरावके बाबासाहेब ढगे आदिसह तालुक्यातील ओबीसी बांधव उपस्थित होते

भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत सोलर पँनल बसविण्याचा प्रयत्न - आ. कानडे  

बेलापूर-श्रीरामपूर रस्ता केल्याने आ. कानडे यांचा सत्कार, अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव   

श्रीरामपूर- बेलापूर गाव सुंदर करण्याच्या दृष्टीने प्रवरा नदीकाठच्या दोन्ही बाजूला घाट करण्याचा तसेच मतदार संघातील प्रत्येक ग्रामपंचायतीत सोलर पँनल बसविण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.

    बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याचे १८ कोटी रुपये खर्चाचे चौपदरीकरण करून त्यावर दीड कोटी रुपये आमदार निधीतून स्ट्रीट लाईट बसविल्याबाद्द्ल बेलापूर येथे ग्रामपंचायतीच्यावतीने आ. कानडे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद नवले, माजी सरपंच महेद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, अजय डाकले, इस्माईल शेख व्यासपीठावर उपस्थित होते. 

आ. कानडे म्हणाले, गेली साडे चार वर्ष कुठल्याही भानगडीत न पडता तालुक्यात असलेले प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले. कामांच्या बाबतीत भेदभाव केला नाही. माझ्या अनुभवाचा ज्ञानाचा फायदा तालुक्यातील जनतेचे प्रश्न, रस्ता, विज ,पाणी, महीला व तरुणांच्या समस्या, बेरोजगारी याकडे लक्ष देवुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. भविष्यात अजुन पुष्कळ कामे करावायाची आहेत. अनेक ठिकाणी कामाचे श्रेय लाटण्याची स्पर्धाच सुरु झालेली असते त्यामागे टक्केवारी हे वेगळेच कारण असते. शासनाचा निधी हा एकदाच येत असतो त्यामुळे कामे दर्जेदार करा, हा सर्वसामान्यांचा पैसा आहे याबाबत जनतेत जनजागृती करा. 

   कायदा, घटना एवढी मोठी आहे कि, त्यातून कोणी वाचू शकत नाही, त्यामुळे ज्याने त्याने जबाबदारी ओळखून वागले पाहिजे, आमदार म्हणून तुम्हाला खाली पाहण्याची वेळ येणार नाही, असेच आपण वागलो असून यापुढेही वागेल, हल्ली नेत्यांच्या गाडीत गुन्हेगार कसे येतात, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे,असे यापूर्वी कोणीही बोलले नाही. याबाबत विधानभवनात बोलणारा आपण एकमेव आमदार असल्याचे ते म्हणाले.      

     सचिन गुजर म्हणाले, रस्त्याच्या माध्यमातून श्रीरामपूर-बेलापूर ही दोन गावे जोडण्याचे काम आ. कानडे यांनी केले आहे. जलजीवन योजनेसाठी त्यांनी मदत केली. दुसरा कोणी असता तर त्यांनी या योजनेत खोट कशी येईल,असे पहिले असते. परंतु आ. कानडे यांनी गट तट न पाहता विकस कामे केली. बेलापुरकरांनीही राजकारणापलीकडे जाऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले. ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. राजकारणापलीकडे जाऊन गावात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पूर्वीपासून सुरु असल्याचे सांगून अरुण पाटील नाईक यांनी आ. कानडे यांनी गावात केलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती दिली.  

      जि.प.चे माजी सभापती शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी, ग्रामसभेत केलेल्या ठरावानुसार या सत्कार समारंभाचे आयोजन केल्याचे सांगून आ. कानडे यांच्या संकल्पनेतून पुणे, मुंबई प्रमाणे बेलापूर-श्रीरामपूर रस्ता झाल्याचे नमूद करून हा रस्ता जिल्ह्याचे रोल मॉडेल ठरणार असल्याचे सांगितले. जलजीवन योजनेतील त्रुटी सांगून ही योजना कशी मार्गी लागेल, याविषयी आमदार कानडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे श्री. नवले म्हणाले. या योजनेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी मदत केल्याचे ते म्हणाले. 

     यावेळी माजी सरपंच महेंद्र साळवी, इस्माईल शेख, लहानु नागले, मोहसीन सय्यद, पत्रकार ज्ञानेश गावले, देविदास देसाई, भाजपाचे प्रफुल्ल डावरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाऊसाहेब कुताळ, चंद्रकांत नाईक, प्रसाद खरात,शफिक बागवान, मुस्ताक शेख, बाळासाहेब दाणी, जाकीर हसन शेख, बाबूलाल पठाण, समीर जहागीरदार, बाळासाहेब वाबळे, विशाल आंबेकर, राहुल माळवदे, दादासाहेब कुताळ, भाऊसाहेब तेलोरे,विजय अमोलिक, रफिक शेख, जीना शेख, भैय्या शेख, महेश कुऱ्हे,सचिन वाघ,शफिक आतार, अँड. अरविंद साळवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी प्रारंभी प्रास्ताविक करून शेवटी आभार मानले. 

......

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget