Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी:सध्या श्रीरामपूर शहरासह तालुकाभरातील विविध पान टपऱ्यांमधून स्ट्रॉंग तंबाखू असलेले किवामयुक्त फुलचंद पान आजही उपलब्ध होत असल्याने राज्य सरकारने सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखूवर घातलेली बंदी केवळ कागदावरचा फार्स ठरली आहे. स्ट्रॉंग तंबाखूजन्य फुलचंद पान हे असे पान आहे जे नजर चुकीने जरी एखाद्या इसमाने मसाला पान म्हणून खाल्ले तर खाणाऱ्यास भयंकर चक्कच येणे, त्याच्या ह्रदयाचे ठोके वाढणे,मळमळ होणे अस्वस्थ वाटणे, हातपाय गळण्यासारखे वाटणे असे भयंकर लक्षण दिसून येतात.एखाद्याचे ॲजिओप्लास्टी किंवा बायपास झालेले असल्यास सदरील पान हे त्याच्या जीवावर बेतू शकते असे हे स्ट्रॉंग तंबाखूजन्य पान आहे म्हणून असे पान विकणाऱ्या पान टपऱ्याधारकांवर वेळीच योग्य कारवाई झाली पाहिजे असे आसलम बिनसाद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.या पत्रकार पुढे असे म्हटले आहे की, श्रीरामपुर शहरामध्ये किमामचा स्वाद असलेली पाने केव्हाही मिळत आहेत. एवढेच नव्हेतर, गुटखाबंदी असतानाही काही ठरावीक ग्राहकांना महागडय़ा दरात गुटखा सहजासहजी मिळत असल्याने सरकारच्या गुटखाबंदीचा सर्रास फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू यावर महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून बंदी घातलेली आहे,ती बंदी उठवण्यायाबाबत अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. मात्र ही बंदी लागू असतानाही स्ट्रॉंग तंबाखूजन्य किवामयुक्त पान आजही ग्राहकांना सहजपणे उपलब्ध होत आहे.एके काळी लोकप्रिय असलेल्या मसाला पानाची जागा फुलचंद या पानाने घेतली असल्याने,तोंडाला सुगंध आणणारा किमाम आणि चटणी हे मुख्य घटक या पानाची वैशिष्ट्ये वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे,आणी तरुण वर्ग एकाप्रकारे अशा वेसनाच्या आहारी जात असुन अन्नभेसळ प्रतिबंधक विभाग,गुन्हे अन्वेषण आणि संबंधित स्थानिक पोलिस प्रशासन याबाबत संबंधित तंबाखूजन्य किमाम वापरणाऱ्या पानटपऱ्या धारकांवर कोणतीही उचित कार्यवाही न करता केवळ बघ्याची भुमिका बजावत असल्याने त्यांच्याही कर्तबगारीवर प्रश्न चिन्ह निर्माण होतो आहे.की बंदी असलेले माल राजरोसपणे विक्री करणारे संबंधित पानटपऱ्याधारक व्यावसायिक आणि ज्यावर ज्यांचे नियंत्रण असावे असे संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात आपसी संगनमत तर नव्हेना? जर दिवसाढवळ्या इतक्या प्रचंड प्रमाणात बंदी असलेले गुटखा, मसाला सुगंधी पानच्या नावाखाली स्ट्रॉंग तंबाखूजन्य फुलचंद पानाची राजरोसपणे विक्री होत असेल, शिवाय बंदी असलेला सर्व प्रकारचा गुटखा हा राजरोसपणे विकला जात असेल तर मग यावर आवर घालणारे संबंधित प्रशासन काय करत आहे ? असा खडा प्रश्न आज शहरासह तालुक्यातील नागरीकांच्या मनात निर्माण होतो आहे.संबंधित खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सदरील पान टपऱ्याधारकांशी जर लागे बांधे नसेलतर मग कारवाई का केली जात नाही अशीही शंका उपस्थित केली जात आहे.मात्र बातम्या आणी निवेदन देवून कोणास काहीच फरक पडणार नाही,सर्वच गेंड्याच्या कातडीचे बनले आहे,मात्र प्रश्न तरुण पिढी बरबाद होत असल्याबाबतचा आहे,याकरीता पत्रकार आसलम बिनसाद आणि तमाम सामाजिक कार्यकर्ते याविरुद्ध उग्र आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्विकारणार आहेत.तरच असले गैरप्रकार बंद होतील अन्यथा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे जसे मागे चालु राहीले तसे पुढे देखील चालुच राहणार असून करीता सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांनी देखी वेळीच सावध होऊन या गैरप्रकाराला वाचा फोडणेकामी पुढे आले पाहिजे तरच सर्व काही शक्य होवू शकणार आहे.असे तिरंगा न्युज चे संपादक आसलम बिनसाद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पाथर्डी - अहमदनगर जिल्ह्याचे वेटलिफ्टिंग खेळाडू व बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कोमल वाकळे व योगिता खेडकर यांची गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. कोमल वाकळे हिची ८७ किलो वजन गटात तर योगिता खेडकर हिची ८७ किलो वरील वजन गटात निवड करण्यात आली आहे. भारताच्या प्रतिष्ठित असलेल्या या स्पर्धेत एकूण ४३ क्रीडा प्रकारात भारतातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे संघ सहभागी होणार आहे. या आधी गुजरात येथे झालेल्या ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेमध्ये कोमल वाकळे हिने महाराष्ट्र संघास सुवर्णपदक मिळवून दिले होते. कोमल व योगिता या दोघींनी ही अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक मिळविले आहे.  

      या यशाबद्दल पाथर्डी तालुका वेटलिफ्टिंग संघटना व पार्थ विद्या  प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, शारीरिक शिक्षण संचालक व अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रा. विजय देशमुख, अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख व उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रा. संजय धोपावकर, रवींद्र सांगळे, यांनी अभिनंदन केले, व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या निवडीबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या महाराष्ट्रात एकुण ७३१८६ शाखा असुन समाजातील प्रश्नांचा अभ्यास करुन जनजागृती करणाऱ्या २७ उपसंस्था आहेत त्यामुळे राष्ट्रीय आपत्तीत मग किल्लारीचा भुकंप असो ,आसाम पुरग्रस्तांचा प्रश्न असो किंवा अलीकडील कोरोना असो सर्वात आगोदर मदत कार्य पोहोच करणाऱ्यामध्ये संघ प्रथम स्थानी असल्याचे मत ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा ,डाँ. गोरख बारहाते यांनी व्यक्त केले .                        विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वंयसेवक संघ बेलापुर शाखेच्या वतीने पथसंचलन तसेच बेलापुर जे टी एस हायस्कूलच्या प्रांगणात शस्र पुजन सोहळा संपन्न झाला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डाँ.बारहाते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे कुटुंब प्रमुख संघटक राजेंद्र देशपांडे तसेच उत्तर नगर जिल्हा कार्यवाह लहु शिंदे उपस्थित होते           

प्रा. डाँ. गोरख बारहाते पुढे म्हणाले की आजचा विजयादशमीचा दिवस म्हणजे संघ स्थापनेचा दिवस आज संघ स्थापनेला ९८ वर्ष पुर्ण होत आहे .समाजासाठी सतत काम करणारी एकमेव संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ. लोक संघाविषयी उलट सुलट चर्चा करतात पण संघाचे कार्य शिस्तबध्द तसेच संघातील प्रत्येक स्वंयसेवक हा शिस्तप्रिय आहे संघ जात भेद मानत नाही संघाच्या परमपवित्र ध्वजाखाली सर्व समान असतात म्हणून तर संघाचे संघटन दिवसेंदिवस मजबुत होत चालले आहे आसेही प्रा, बारहाते म्हणाले  या वेळी नाशिक विभागाचे कुटुंब प्रमुख संघटक राजेंद्र  देशपांडे म्हणाले की बाल तसेच तरुण मनावर संस्कार करणारा संघ हाच एकमेव परिवार आहे. आरएसएस एक संवाद आहे आज आपल्यातील समाजातील संवाद हरपत चालला आहे .संवादामधील स नाहीसा झाल्यामुळे केवळ वाद निर्माण होत आहे आपली भाषा शुद्ध हवी  आपली भुषा पेहेराव चांगला पाहीजे ,आपले भोजन सात्वीक पाहीजे तसेच भ्रमण केले पाहीजे ते करताना निरीक्षण केले जावे या सर्व बाबी संघात शिकविल्या जात असल्याचेही देशपांडे म्हणाले  प्रारंभी संघाचे घोषासह गावातुन संचलन काढण्यात आले होते .

दिनांक 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 रोजी गोवा येथे 37 वे नॅशनल गेम्स होत आहेत. हि 37 वे नॅशनल गेम्स गोवा सरकार, भारत सरकार तसेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत आहेत. या गेमचे उद्घाटन समारंभ 26 ऑक्टोबर रोजी भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. ३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये पिंच्याक सिलॅट हा खेळ प्रथमच समाविष्ट झालेला आहे आणि 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2023 रोजी कॅम्पल ग्राउंड विलेज पणजी येथे पींच्याक सिल्याट खेळाची स्पर्धा संपन्न होणार आहे. या खेळामध्ये एकूण 28 राज्यातील ३०४ खेळाडूंची निवड झाली आहे.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 20 खेळाडूंची निवड झालेली असून ते एकूण २३ पदकांसाठी खेळणार आहेत. 

खालील खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व ३७ व्या नॅशनल गेम्स २०२३ मध्ये करत आहेत.
 
धनंजय सांडूगडे (टॅडींग इव्हेंट-४५ किलो), रामचंद्र बदक(टॅडींग इव्हेंट ४५ ते ५० किलो), कार्तिक पालवे(टॅडींग इव्हेंट ५० ते ५५ आणि गंडा इव्हेंट),सोमनाथ सोनवणे(टॅडींग इव्हेंट ५५ ते ६० किलो),वैभव काळे(टॅडींग इव्हेंट ६० ते ६५ किलो, रेगू इव्हेंट आणि सोलो इव्हेंट ), मुकेश चौधरी(टॅडींग इव्हेंट ६५ ते ७० किलो), ओंकार अभंग(टॅडींग इव्हेंट ७० ते ७५ किलो आणि रेगु इव्हेंट), अंशुल कांबळे(टॅडींग इव्हेंट ८० ते ८५ किलो आणि रेगु इव्हेंट), अनुज सरनाईक(टॅडींग इव्हेंट ८५ ते ९० किलो), पियुष शुक्ला( टॅडींग इव्हेंट ९० ते ९५), धनंजय जगताप( टॅडींग इव्हेंट ९५ ते ११० किलो), कृष्णा पांचाळ (तुंगल इव्हेंट), सचिन गर्जे(गंडा इव्हेंट), जयश्री शेट्टी(टॅडींग इव्हेंट ५० ते ५५ किलो आणि रेगू इव्हेंट), किर्णाक्षी येवले (टॅडींग इव्हेंट ६० ते ६५ किलो, तूंगल इव्हेंट आणि रेगु इव्हेंट), पौर्णिमा तेली( टॅडींग इव्हेंट ६५ ते ७० किलो), दीक्षा शिंदे  (टॅडींग इव्हेंट ७५ ते ८० किलो), भक्ती किल्लेदार (८५ ते १०० किलो),रिया चव्हाण (रेगु इव्हेंट), पूर्वी गांजवे (सोलो इव्हेंट) तसेच महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून श्री. साहेबराव ओहोळ आणि प्रशिक्षक म्हणून कु. सुहास पाटील आणि कुु. अभिषेक आव्हाड यांची निवड करण्यात आली.

या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर हे २ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक श्री. किशोर येवले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान विकास स्कूल, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे पार पडले.
मागील १३ वर्ष महाराष्ट्र संघ हा पिंच्याक सिल्याट खेळामध्ये अव्वल स्थानी आहे आणि आता सुद्धा तीच कामगिरी ३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र संघाची कायम राहील अशी माहिती इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशन चे अध्यक्ष मा.श्री. किशोर येवले यांनी दिली. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजित दादा पवार साहेब आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव मा. श्री नामदेव शिरगावकर यांनी महाराष्ट्र संघाला 37 व्या नॅशनल गेम्स मध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपुर-राज्यातील सर्व शासकीय आस्थापनांमध्ये नऊ खाजगी कंपन्यांमार्फत कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सरकारच्या या धोरणामुळे सर्वसामान्य घरातील मुले जे आपल्या गरीब परिस्थितीशी झुंज देत हालाखीच्या परिस्थितीत दिवस-रात्र अभ्यास करून स्वतःच्या कर्तुत्वावर सरकारी नोकरी करून आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहत होते.अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा निर्णय अत्यंत घातक असून तो वेळीच रोखला नाही तर प्रामाणिक आणि कष्टाळू विद्यार्थ्यांचे स्वप्न भंग होईल आणि म्हणूनच त्यांचे स्वप्न पुन्हा जिवंत करण्यासाठी रस्त्यावरच उतरून याचा निषेध करावा लागणार.हे ओळखून क्षणाचाही विलंब न करता भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विद्यार्थ्यांनी श्रीरामपूर येथे सरकारी शाळा बंदीच्या व खाजगीकरणाच्या विरोधात "विद्यार्थी पँथर डरकाळी" आंदोलन केले.याचबरोबर भीम आर्मी भारत एकता मिशन व आजाद समाज पार्टीच्या वतीने देखील या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलने झाली.


                     दरम्यान श्रीरामपुरात भीम आर्मीचे विद्यार्थी नेते पॅंथर ऋषी पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व गौरव भालेराव आणि साजिद भाई शेख यांच्या नेतृत्वात "विद्यार्थी पँथर डरकाळी"आंदोलन झाले.यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्हा दौरावर आले असता,भीम आर्मीचे नेते अजय मैंदर्गीकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करत काळे झेंडे दाखवून आक्रमक पद्धतीने निषेध नोंदवला. त्याचबरोबर भीम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोक भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भाजप प्रवक्ते आमदार राम कदम यांच्या कार्यालयावर आक्रमकपणे आंदोलन झाले.भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन आणि भीम आर्मीच्या आक्रमक व जहाल आंदोलनाची धास्ती घेत सरकारने खाजगीकरण व कंत्राटी भरती चा जीआर अखेर मागे घेतला. यापुढे भविष्यात राज्य सरकारने असे चुकीचे धोरण आखत तरुण, बेरोजगार व विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे चुकीचे निर्णय घेतले तर भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन आणि भीम आर्मी भारत एकता मिशन अशाच प्रकारे आक्रमकपणे आंदोलन करत सरकारला धारेवर धरेल.असे वक्तव्य यावेळी भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  विद्यार्थीनायक पँथर ऋषी पोळ यांनी केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी): येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक श्री गौरव अरविंद डेंगळे यांची ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा राज्य नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्तीचे पत्र गोवा नेटबॉल संघटनेचे सचिव प्रतिष नाईक यांनी दिले.

गोव्या राज्यात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन होत असून देशातील २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेशातून सुमारे १०,००० खेळाडू सहभागी होणार आहेत.खंडाळा या ग्रामीण भागातील क्रीडा शिक्षक श्री गौरव डेंगळे यांना गोवा राज्याच्या नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती ही आपल्या श्रीरामपूर तालुक्याकरीता अभिमानाची बाब आहे.दिनांक १९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान डेंगळे हे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा भाग असतील.डेंगळे यांनी खेलो इंडिया युथ गेम्स साठी व्हॉलीबॉल खेळाचे तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फतोडा,मडगाव नेहरु स्टेडियमवर स्पर्धेचा उद्घाटन संपन्न आहे.गोवा नेटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डेंगळे यांचे गोवा नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष शुभम नार्वेकर,साईनाथ सोपटे,सचिव प्रतिष नाईक,गोवा टेनिसबॉल सचिव निलेश नाईक,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे,खजिनदार जन्मजय टेकावडे,श्री पार्थ दोशी,श्री राजेंद्र कोहकडे,श्री नितीन बलराज आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या

श्रीरामपूर प्रतिनिधी/  शिर्डी शहर व शहराच्या लगत मोठ्या प्रमाणावर हाॅटेल लाॅजिग परमीट रुम बीअर बार आहेत वाढत्या महावितरणच्या विज बीलामुळे अनेक व्यावसायिक बील भरताना मोठी दमछाक होताना दिसते मात्र काहीजण  नको झंझट म्हणून वेळेवर कधी दंडात्मक दंड भरून वीजबील भरत असताना  काहीनी वापरलेला वीज चोरीचा शाॅटकट.  नगर जिल्ह्यात जवाबदार शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून काम करत असलेल्या राहता तालुक्यातील युवा नेत्यांच्या भावाच्या  परमीट रुम बीअर बारवर  अशा पध्दतीने. मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्याने महावितरणच्या नाशिक येथील पथकाने  हाॅटेल गारवा परमीट रुम बीअर बार या ठिकाणी जाऊन  मयत मालकाच्या हाॅटेल वर मीटर तपासणी केली असता  त्या  विज मीटरच्या आतील पट्टीवर पिसीबीला जाणा-या केशरी रंगाच्या वायरची जागा बदलुन कपर पट्टीवर व इतर ठिकाणी रिशाॅलडीग केलेले आढळतले तसेच  तीन वर्षांपूर्वी देखील वीज चोरीची केस झाली होती त्या नंतर सुध्दा परत तपासणी  केली. त्यात देखील तांत्रिक. छेडछाड. केल्याने त्यामुळेच मीटर पळत नसल्याने बारा महिन्यांत २१८०३युनिट रुपये ४लाख ७५६५०रुपयाची वीजचोरी केली असून बील भरण्यासाठी मुदत दिली असताना बील न भरल्याने ज्या नावावर मीटर आहे त्या मयताचे वारस उल्हास पुंजाजी काळे व काही दिवसांपूर्वी ज्या इसमाला हाॅटेल चालवण्यासाठी दिले तो प्रकाश एन शेट्टी यांच्या विरोधात शिर्डी विभागातील कनिष्ठ अभियंता रोशन संजय बागुल वय २२ रा सावळीविहीर ता राहता यांनी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून विद्युत कायदा कलम १३५ नुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन अशा प्रकारे राहता तालुक्यातील किती व्यावसायिक विज चोरी करतात यासाठी नाशिक व नगर येथील महावितरणच्या पथकाकडून बारीकसारीक माहिती घेतली जात आहे  किरकोळ दोन चार हजारांच्या बीलासाठी महावितरणचे वायरमन वीजखंडीत करत असताना धनदांडगे व मोठे मंडळी कोणाच्या आशिर्वादाने वीज चोरी करत आहे याकडे काही सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष वेधले असल्याचे एका श्रीरामपूर येथील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget