Latest Post

श्रीरामपूर-पूर्णवाद नगर येथील  म्हसोबा महाराज मित्र मंडळा येथे  आम आदमी पार्टीचे नेते  तिलक डुंगरवाल यांनी सपत्नीक सत्यनारायण व महाअर्थी करत असताना त्यांनी गणपती रायास रेल्वे प्रशासनाला सद्बुद्धी दे  असेही साकडे  घातले अनेक रहिवाशांनी रेल्वेच्या दोन्ही बाजूने लाखो  रुपये देऊन घर व्यापारी गाळे पन्नास वर्षांपूर्वी विकत घेतले त्यामध्ये व्यवसाय करून शहराच्या विकासाला हातभार लावला अनेकांनी आपले उद्योग व्यवसाय व्यवस्थितपणे चालू केले मात्र रेल्वे लाईन सेंटर पासून उत्तरेकडील व दक्षिणेकडील मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेण्याचे घाट घातला जात आहे यामुळे भयभीत झालेल्या शहर वासियांकडे राजकीय  पुढार्‍यांनी दुर्लक्ष केले मात्र आम्ही या विस्थापित होऊ पाहणाऱ्या  नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सुतवाच तिलक डुंगरवाल त्यांनी महाआरती प्रसंगी केले याप्रसंगी

म्हसोबा महाराज मित्र मंडळ

अध्यक्ष ऋषिकेश जऱ्हाड

सन्नी भिंगरदिवे, विनोद लोंढे, 

आपचे विकास डेंगळे,राहुल रण पिसे, बी एम पवार, रुपेश बिऱ्हाडे, दिनेश सोनवणे,नीरज वैद्य,गगन नितनवरे,अक्षय बिऱ्हाडे,सुनील पवार,गौतम त्रिभुवन,तोहित पिंजारी,नदीम पठाण, पियूष भांबुरे,आकाश म्हसे, निलेश हिवाळे आदी उपस्थित होते

बेलापुर (प्रतिनिधी  )-पंधरा आँगस्ट निमित्त तहकुब झालेली ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली असुन पहील्यांदाच तंटामूक्ती अध्यक्षांच्या निवडीवरुन तंटा पहावयास मिळाला असुन सरपंच महेंद्र साळवी यांनी कुठलीही निवड झाली नसल्याचे सांगीतल्यामुळे वादावर पडदा पडला    १५ आँगस्ट निमित्त घेण्यत येणारी ग्रामसभा ३१ आँगस्ट रोजी घेण्यात आली होती परंतु कोरम अभावी ती तहकुब करण्यात आली तहकुब करण्यात आलेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते सुरुवातीस ग्रामविकास अधीकारी मेघशाम गायकवाड यांनी मागील सभेच प्रोसिडींग वाचुन दाखविले त्यानंतर शासनाच्या विविध योजना बाबत चर्चा करण्यात आली १५ व्या वित्तआयोगांतर्गत  सन २०२४-२५ च्या आराखड्याबाबतही चर्चा करण्यात आली स्री जन्माचे स्वागत करुन गाव बाल विवाह मुक्त करण्याचेही ठराव करण्यात आले ऐनवेळी येणाऱ्या विषयात चंद्रकांत नाईक यांनी तंटामुक्त अध्यक्ष पदाकरीता प्रकाश जाजु यांच्या नावाची सुचना मांडली त्या सुचनेस ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक हे अनुमोदन देत असतानाच गावकरी मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले हा विषय विषय पत्रीकेवर नसताना घेण्याचे कारणच नाही आम्ही तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांचे कामकाज चांगले असल्यामुळे त्यांनाच मुदतवाढ दिल्याचे जि प सदस्य शरद नवले व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले त्यामुळे दोन्ही गटाकडून गदारोळ सुरु झाला त्यावर तोडगा काढत सरपंच महेंद्र साळवी यांनी हा विषय विषय पत्रीकेवर घेवुनच निवड करु असे सांगितले त्यानंतरही प्रफुल्ल डावरे व चंद्रकांत नाईक यांच्यात खडाजंगी झाली नेते मंडळीनी मध्यस्थी करुन दोघांनाही शांत केले या वेळी मारोतराव राशिनकर यांनी भंडारदरा धरणातुन के टी वेअर बंधारे भरण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात यावे तसेच गावात प्लँस्टीक बंदी करण्यात यावी अशी सुचना मांडली त्यास प्रकाश कुर्हे यांनी अनुमोदन दिले गेल्या काही दिवसापासून बेलापुर ग्रामपंचायत सत्ता बदला बाबत चर्चा सुरु होत्या सरपंच उपसरपंच यांच्याकडून दावे प्रतिदावे केले जात होते त्यामुळे आजच्या ग्रामसभेत नेकमे काय होणार याची उत्सुकता अनेकांना लागली होती मात्र परस्पर दोन्ही विरोधी गटांना वाटत होते सरपंच आमचाच आहे त्यामुळे ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्ष पदाचा वाद सोडला तर सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली ठरावीक लोकांनीच माईकच ताबा घेतल्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना आपल्य समस्या मांडताच आल्य नाही ग्रामसभेस जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले सदस्य रविंद्र खटोड भरत साळूंके चंद्रकांत नवले मुस्ताक शेख  रमेश आमोलीक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक दत्ता कुर्हे  प्रफुल्ल डावरे हाजी ईस्माईल शेख महेश कुर्हे अशोक प्रधान वैभव कुर्हे दादा कुताळ प्रसाद खरात सचिन अमोलीक कामगार तलाठी पी बी सुर्यवंशी गोपी दाणी आरुण अमोलीक एकनाथ नागले पुरुषोत्तम भराटे शफीक बागवान प्रभात कुर्हे राजेंद्र कुताळ द्वारकनाथ कुताळ नितीन नवले विशाल आंबेकर अजीज शेख संतोष शेलार आदिसह ग्रामस्थ उपस्थित होत

नेवासा (गौरव डेंगळे): येथील त्रिमूर्ती प्रतिष्ठान येथे अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सेंट मेरीज स्कूलच्या १४ वर्षाखालील मुले व मुली आणि १९ वर्षाखालील मुले या संघांनी दणदणीत विजेतेपद मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. शालेय तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये नेवासा तालुक्यातील १६ शाळांनी सहभाग नोंदवला होता. मुलांच्या १४ व १९ वर्षाखालील झालेल्या अंतिम सामन्यात सेंट मेरीज संघाने त्रिमूर्ती संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले तर मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट मेरी संघाने त्रिमूर्ती संघाचा २-१ पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्या संघांना राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक पापा शेख व विष्णू खांदोडे यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योसी, व्यवस्थापिका सिस्टर मोली, सिस्टर लीसा, सिस्टर मुक्ता तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुघलांसह विविध मुस्लिम शासकांच्या 900 वर्षाच्या इतिहासामध्ये देशांमध्ये कधीही हिंदू मुस्लिम वाद झाल्याचे इतिहासात नमूद नाही.परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये या देशाच्या एकोप्याला दृष्ट लागली. आज सर्व बाजूंनी मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र होत असले तरी मुस्लिम समाजाने आपल्या पारंपारिक प्रथा आणि रीतींमध्ये बदल करून समाजाच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासात योगदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्यातील जुन्या चाली,रीती, परंपरांचा आढावा घेऊन योग्य त्या ठिकाणी बदल करावा.आपले इतर देश बांधवांसोबत असलेले सलोख्याचे संबंध कायम ठेवून समाजाने आपला विकास साधावा. त्यासाठी मानवता संदेश फाउंडेशन सारख्या सेवाभावी संस्थांनी आता पुढे येण्याची गरज आहे. मशिदींचा वापर केवळ नमाजसाठी न करता स्टडी सेंटर म्हणून ही त्यांचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे आर्किटेक अर्षद शेख यांनी व्यक्त केली.

येथील मानवता संदेश फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "हालात बदल सकते है" या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.मिल्लत नगर मधील मिल्लत मशिदीतझालेल्या या कार्यक्रमास समाजाच्या सर्व स्तरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या विकासाचा स्वातंत्र्यपूर्व व स्वतंत्र्योत्तर काळाचा आढावा घेताना शेख यांनी अनेक दाखले देत मुस्लिम समाजाचे योगदानाची सखोल चर्चा केली.देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व बहादूर शाह जफर यांनी केलेतर त्यांच्या पूर्वी अनेक मुस्लिम शासकांनी या देशांमध्ये विकासाचे पर्व सुरू केले.मुस्लिम शासकांच्या काळामध्ये कधीही हिंदू मुस्लिम वाद झाले नाहीत नऊशे वर्ष राज्य करताना त्यांनी कधीही कोणती नावे बदलली नाहीत उलट हिंदू मंदिरांना इनामी जमिनी दिल्याचा इतिहास अस्तित्वात आहे असे सांगून अलीकडच्या काळामध्ये देशामध्ये140 कोटी लोकसंख्येमध्ये 25 कोटी असलेल्या मुस्लिम समाजाबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे परंतु या देशातील लोकशाही अतिशय प्रबळ असल्याने योग्य वेळी योग्य ते बदल येथील जनता करीत असते ती वेळ आता आलेली आहे बदल निश्चितपणे होणार आहे त्यासाठी मुस्लिम समाजाने जागरूक राहावे आपल्या भावनांना आवर घालावा प्रतिक्रिया व्यक्त करू नये तर आपल्यामध्ये एकोपा निर्माण करून विकासाचे कार्य अव्याहतपणे पुढे न्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

प्रस्ताविक भाषणात मानवता संदेश फाउंडेशनचे प्रमुख सलीमखान पठाण यांनी आगामी काळामध्ये मुस्लिम समाजाची वाटचाल काय असावी समाजाचे मूलभूत प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला काय करता येईल याबाबतची भूमिका निश्चित करणे आवश्यक असून त्यासाठीच अशा प्रकारची व्याख्याने आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास मुफ्ती मोहम्मद रिजवान,हाफिज अशपाक पठाण,

नगरसेवक अंजुमभाई शेख,मुख्तारभाई शाह, मशिद ट्रस्टचे अध्यक्ष रमजान पठाण,हाजी युसुफ शेख,अहमदभाई जहागीरदार, साजिद मिर्झा,ॲड.शफी शेख, ॲड.समीन बागवान, सलाउद्दीन शेख, सरवरअली मास्टर,

अजीज शेख,अझहर शेख, हाजी शरीफ खान,डॉ.सलीम शेख,सोहेल दारुवाला, युसूफ लाखाणी, रशीद शेख, रफिक शेख,

इरफान शेख टी सी, शकिल बागवान, जलील शेख,बदर शेख,फारुक पटेल, फिरोज पठाण, हुजेफखान पठाण, आरीफ पटेल,समीर शेख,रमजान शाह,अफरोज शाह, इम्रान पोपटिया, हाजी रियाज बागवान, शाहीन शेख आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नजीरमामू शेख,तन्वीर शेख, खालिद मोमीन, तोफिक शेख यांनी परिश्रम घेतले. इकबाल काकर यांनी आभार मानले.

श्रीरामपूर - रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंती निमित्त डी डी काचोळे माध्य. विद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेली कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक अभूतपूर्व व इतिहासिक ठरली. मिरवणुकीचे नियोजन व संयोजन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजींग कौन्सील सदस्या मीनाताई जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.  मिरवणूकीचे उदघाटन जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम पाटील यांच्या शुभ हस्ते झाले. जवळपास चार किमी लांबीच्या मिरवणुकीने शहरात विक्रम केला आहे. 

       मिरवणुकीमध्ये जवळपास ३००० पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, पालक व नागरिक होते . सवाद्य मिरवणुकीमध्ये भव्य रथ, घोडे, उंट , बँड पथक, झांज पथक, लेझिम पथक, शिवराज्यभिषेक सोहळा , विज्ञान व तंत्रज्ञानाची गगन भरारी चंद्रयान, आदी मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरांमधील चौकात चौकात संबंधित नृत्य व विविध पथकांचे सादरीकरण आकर्षक रित्या करण्यात आले. 

   राष्ट्रीय एकात्मतेचे प्रदर्शन दर्शविणारे राजस्थान, कोळी, शेतकरी पंजाबी साउथ आदिवासी दक्षिणात्य संस्कृती वारकरी आदी नृत्यांचा अविष्कार सादर करण्यात आला. सजावलेल्या ट्रॉलिमध्ये सर्वधर्मीय वेशभूषा, विविध समाज सुधारक व साधू संतांची वेशभूषा यातून समानतेचा व सर्व धर्म समभाव याचा संदेश देण्यात आला. 

शहरात ठिकठिकाणी महिलांनी अण्णांच्या पुतळ्या


चं औक्षण केलं. श्रीरामपूर आतील नागरिकांनी कर्मवीर जयंतीच्या मिरवणुकीचे विशेष कौतुक केले. तसेच प्रांताधिकारी किरण सावंत, डी. वाय. एस. पी. डॉ. बसवराज शिवपूजे, तहसीलदार मिलिंद वाघ, कामगार हॉस्पिटल वैद्य अधिकारी डॉ. रवींद्र जगधने , प्राचार्य पी व्ही बडधे, प्राचार्य डॉ. एस.ए. निंबाळकर,  प्राचार्य डॉ.एम.एस.पोंधे, मुख्याध्यापक सुनिल साळवे, मुखाध्यापिका सोनाली पैठणे, सौ. जयश्री जगताप, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना शहर प्रमुख सचिन बडधे, गणेश थोरात, सुनिल डहाळे, मेजर कृष्ण सरदार, बाळासाहेब भागडे, मा.नगरसेवक  आशिष धनवटे आदींनी मिरवणूकीत व कॉलेज रोडवरील कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी डी डी काचोळे विद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेला संस्कृतिक कार्यक्रमासह लेझिम व झांज पथकाचे सादरीकरण लक्षनीय ठरले.

मिरवणुकीमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव,  संस्कृती व संस्कृतिक वारसा, महापुरुषांचा आदर्श , महाराष्ट्राची लोकधारा, पर्यावरण रक्षण, विविध राज्यांची संस्कृती, विज्ञान व तंत्रज्ञानाची भरारी चंद्रयान, स्वच्छता व आरोग्य आदिविषयांचा संदेश देणारी मिरवणूक होती. तसेच एस.के.सोमैय्या प्राथ.विद्यामंदिर विद्यालयाची कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक, रा.ब.ना.बोरावके कॉलेज, सी.डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र  महाविद्यालय व डी डी काचोळे विद्यालय आदिंच्या मिरवणुकीचा समारोप कर्मवीर चौकातील कर्मवीर पुतळ्या जवळ समारोप झाला. यावेळी श्रीरामपूर रयत संकुलाच्या वतीने व मान्यवरांच्या वतीने कर्मवीर अण्णांना अभिवादन करण्यात आले.

       कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डी डी काचोळे माध्य. विद्यालय स्टाफ, एनसीसी विद्यार्थी, विद्यार्थी वस्तीगृह, व पालक आदींनी विशेष परिश्रम घेतले. श्रीरामपूर पोलीस स्टेशनाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ट्राफिक पोलीस आदींनी मिरवणुकीचा चोख बंदोबस्त ठेवला.

     कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन दिले. मिरवणूक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

वांगी गावच्या हद्दीमध्ये असणार्‍या नदी मध्ये शासनाने वाळूचा डेपो चालु केला या डेपोचे ठेकेदार यांनी शासनाचे सर्व आदेशाचे उल्लंघन करून स्वतःच्या फायद्यासाठी वाळू उपसा करत आहे त्या ठेकेदारावर त्वरित फायदेशीर कारवाई व्हावी त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने श्रीरामपूर येथील प्रांत अधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की शासनाने व महसूलमंत्र्यांनी नागरिकांना कमी दरात वाळू बांधकामासाठी मिळायला पाहिजे हा शासनाचा निर्णय व माननिय महसूल मंत्री राधा कृष्ण विखे पाटील साहेब यांचा  या निर्णयाच्या आमच्या सह  संपूर्ण महाराष्ट्र तील नागरीकांनी कौतुक केले कारण की गेल्या अनेक वर्षापासून रात्री अपरात्री नदीतुन मोठ्या प्रमाणात अवैध्य रितीनी वाळू चोरी करुन नागरीकांना पाच हजार ते सात हजार रुपये ब्रास ने वाळू चोर विकायचे व वाळू चोर बेहीसाब वाळू रोजच चोरुन नेत असल्याने शासनाला त्याचा कुठलाही आर्थिक फायदा होत नव्हता व तसचे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने नदीच्या कडेला असणार्‍या शेतकार्‍यांना नदीत वाळूचा साठा नसल्याने पाण्याचे साठवण होत नसल्याने शेतकर्‍यांना, शेती करण्यासाठी व तर कधी कधी मुक्या जनावरासाठी पाणी मिळत नव्हते. ह्या सर्व गोष्टीची महाराष्ट्र शासनाने व महसुल मंत्र्याने गंभीर दखल घेऊन शासनाला महसुल मिळावे व नागरिकांना कमी दरा मध्ये वाळू मिळावे व शेतकर्‍याच्या हीताचे विचार करुन नदीत वाळू साठा शिल्लक राहावे जेणे करुन पाण्याचे साठवण राहील व शेतकर्‍यांना याचा फायदा होईल ह्या सर्व गोष्टीच्या विचार करुन शासनाने ६०० रु. ब्रास ने नागरीकांना वाळू मिळावे असा कायदा बनवुन वाळू डेपो बनविले. या  डेपो चालक ठेकेदाराला नियम व अटी लावण्यात आले त्यामध्ये वाळू किती ब्रॉस उचलायचे आहे व तसेच वाळू कोठून उचलायचे ते गट नंबर चे ठिकाण ठरवुन दिले आहे. तसेच पर्यावरणाचा विचार करुन वृक्षरोपण करणे वाळू उपसा करताना मोठ्या यंत्रानाचा वापर करण्यात येऊ नये म्हणजेच जेसीबी, पोकलेंड व इत्यादी मोठ्या वाहनाचा यंत्राचा अवजाराचा वापर करुन वाळू उपसा करूनही तसेच बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करण्यात यावे असे आदेश आहे. तसेच वाळू डेपोच्या ऑफीसच्या तिथे वजन काटा लावणे व सी. सी. टीव्ही कॅमेरे लावणे वृक्षारोपण करणे व इतर नियम व अटी बंधन कारक असताना वांगी येथे सध्या चालु असललेल्या वाळूच्या डेपोच्या तिथे शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन न करता ठेकेदार स्वतः ची मनमानी करुन मोठ्या प्रमाणात पोकलैंड व इतर मोठ्या यंत्राचा वापर करुन मोठया प्रमाणात वाळू उपसा करुन शासनाचा महसुल बुडवत आहे. व मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत  असल्याने ह्या ठिकाणी वाळू शिल्लक न राहिल्याने शेतकरयांना शेतपिकासाठी व जनावरांनसाठी पाणी शिल्लक राहणार नाही व शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. आता सध्या पावसाळा चालु असताना देखील पाऊस नाही. अत्ताच दुष्काळी परिस्थिती जाणवत आहे. तर या अशा बे हिसाब वाळू उपसा केल्याने नदीच्या पाण्याच्या भरवशावर जे शेतकरी आहे त्यांना येत्या काळामध्ये पाण्याचे संकट येणार आहे व तेसच नायगाव गोवर्धन या ठिकारी असलेले वाळू डेपो याच ठेकेदाराचे आहे. सगळ्या वाळू डेपो कोणाच्या आशिर्वादाने एकच ठेकेदाराला मिळत आहे. याचा ही शोध शासनाने व अधिकार्‍याने लावावे. तसेच गोवर्धन येते असलेल्या वाळू डेपो येथे वाळू डेपो चालु झाल्या पासून ते आता पर्यंत वजन काटा नाही. म्हणजे आतापर्यंत वाळू वजन न करता ठेकेदारांनी वाळू वाहतूक केली आहे गाड्यांमध्ये नियमापेक्षा जास्त वाढवून शासनाची फसवणूक केली आहे तसेच शासनाने ठरवून दिलेल्या गट नंबर येथून मोजकेच वाळू उचलण्यात आले इतर ठिकाणाहून जास्त वाळू उचलण्यात आली आहे तसेच शासनाच्या नियम व अटी ठेकेदाराने पायदळी तुडवले आहे याचं ठेकेदाराला वांगी येथे डेपो का देण्यात आला. वांगी येथे चालु असलेल्या वाळू डेपो येथील देखील शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन करताना संबंधीत ठेकेदार दिसत नाही. अशा मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर त्वरीत कायदेशीर गुन्हा दाखल करुन शासनाचे फसवणूक केल्याने यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी व नायगाव गोवर्धन वांगी येथे ज्या गट नंबर मधून वाळू उपसा करण्याचे शासनाने ठेका दिला आहे त्या गट नंबर मधून किती वाळू उपसा झाला व शासनाला किती हिशोब दिला तसेच डेपोत किती वाळू शिल्लक आहे किती विकल्या गेले त्या सर्व वाळूची मोजमाप करण्यात यावी व सखोल चौकशी करण्यात यावी

आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या तीन ते चार दिवसांमध्ये संबंधित वाळू गटाची व वाळू डेपोच्या ठिकाणाची मोजमाप करून व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई न झाल्यास तहसीलदार व प्रांताधिकारी देखील या वाळू चोरीमध्ये सामील आहे असे समजून शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या तसेच शासनाची महसूल बुडवत असल्याने या सर्वांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर जिल्ह्याचे महसूल मंत्री श्री विखे पाटील साहेब यांच्या घरासमोर न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल आंदोलना प्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास तहसीलदार प्रांत व जिल्हाधिकारी साहेब जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले

याप्रसंगी मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवतर तालुकाध्यक्ष सतीश कुदळे शहराध्यक्ष विलास पाटणी शहर सरचिटणीस नितीन जाधव शहर उपाध्यक्ष मनोहर बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर उक्कलगाव रोडवर एकलहरे शिवारात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नईम पठाण यांच्या बंगल्यावर रात्री दरोडा पडला असुन दरोडेखोरांनी खिडकीला असणाऱ्या पडद्याने गळा आवळून नईम पठाण याचा खुन केला असुन त्यांची पत्नी बुशरा पठाण या गंभीर जखमी आहेत         या बाबत समजलेली  हकीकत अशी की नईम पठाण हे व्यवसायीक असुन एकलहरै शिवारात बेलापुर उक्कलगाव रस्त्यालगतच त्यांचा बंगला आहे .त्या बंगल्यात नईम त्याची पत्नी बुशराबी हे दोन मुलासह रहात होते  रात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान चार दरोडेखोर पाठीमागील दरवाजातुन घरात शिरले त्यात एक महीलाही होती त्या वेळी नईम पठाण याने  प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी खिडकीला असणाऱ्या परद्याचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळला त्यातच त्याचा मृत्यू झाला .पत्नी बुशराबी हीलाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली त्याही गंभीर जखमी झाल्या घरातील पाच ते सहा लाख रुपयाची रोकड घेवुन दरोडेखोर पसार झाले .बुशराबी पठाण या शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी वडील अनवर जहागीरदार यांना फोन केला एकलहरे गावचे सरपंच रीजवाना अनिस शेख यांचे पती अनिस जहागीरदार व अनवर जहागीरदार हे तातडीने घटनास्थळी आले त्या वेळी नईम पठाण हा मयत झालेला आढळला तसेच बुशराबी यां गंभीर जखमी झालेल्या होत्या त्यांना तातडीने साखर कामगार हाँस्पीटल येथे हलविण्यात आले अनिस जहागीरदार यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे  संदेश देवुन सर्वांना जागृक केले या बाबत बेलापुर पोलीसांना माहीती समजताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधीकारी बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे पी एस आय सुरेखा देवरे मँडम हे फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाली अहमदनगर गुन्हा अन्वेषणची टीम देखील गावात दाखल झाली ठसे तज्ञ तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते श्वान बंगल्याभोवतीच घुटमळले बेलापुर उक्कलगाव रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे असल्यामुळे आरोपी लवकर हाती लागण्याची दाट शक्यता असुन घटनेच्या कालावधीत एक स्वीप्ट कार या रस्त्याने गेल्याचे आढळून आले असुन अहमदनगर गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीकारी बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget