प्रियदर्शिनी इंदिरा गांधीं मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे दिनांक २४/०७/२०२३ सोमवार रोजी दुपारी २-०० वाजता आयोजित करण्यात आले आहे
तरी शहरातील सर्व नागरिकांनी व तमाम समाज बांधवांनी विद्यार्थी तसेच पालक वर्गांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती संविधान बचाव समितीच्या वतीने करण्यात आली आहे
सत्काराला उत्तर देताना अक्षयने सांगितले की,बेसबॉल हा एक लोकप्रिय खेळ आहे ज्याचा इतिहास मोठा आहे.या खेळाचा उगम १९व्या शतकाच्या मध्यात युनायटेड स्टेट्समध्ये झाला,जरी त्याचे नेमके मूळ अस्पष्ट आहे.गेल्या काही वर्षांमध्ये, व्यावसायिक संघ,लीग आणि खेळाडूंनी व्यापक प्रसिद्धी आणि ओळख मिळवून,बेसबॉल हा एक प्रिय मनोरंजन आणि एक प्रमुख खेळ बनला आहे.भारतामध्ये देखील हा खेळ लोकप्रिय होत असून जास्तीत जास्त खेळाडूंनी या मनोरंजक खेळाकडे वळावे. पुढे बोलताना अक्षय म्हणाला की ग्रामीण भागातून मी या बेसबॉल खेळाची सुरुवात केली आणि ६ वेळा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या राज्याला पहिल्या तीन संघांमध्ये स्थान पटकावून दिले.तरी भविष्यात ग्रामीण भागातून जास्तीत जास्त खेळाडूंनी बेसबॉल खेळावे व राज्याचं,देशाचं प्रतिनिधित्व करावे असे तो म्हणाला.माझा सत्कार केल्याबद्दल मी सोमय्या विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो असे तो म्हणाला.
या बाबत बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने माहीती देताना नवले साळवी व खंडागळे यांनी सांगितले की बेलापूर येथे बाजारतळ, स्मशानभूमी, केशव गोविंद मंदिर व महादेव मंदिर परिसरातून वाहणार्या छोट्या ओढ्यांमधून सांडपाणी व इतर मलमुत्र प्रवरा नदीत जाते. त्यामुळे प्रवरा नदी अशुध्द व दूषित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नद्या शुध्दीकरण महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. त्यात बेलापूरची प्रवरा नदी स्वच्छ करण्यासाठी १ कोटी १८ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यामध्ये ऐनतपूरसाठी सुमारे ५९ लाख रुपये, तर बेलापूरसाठी ५९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येकी नऊ कंपोस्ट टँक, टायगर बायोफिल्टर प्लॅन्ट उभारला जाणार आहे. यामधून नदीला जाणारे अशुध्द पाणी शुध्द केले जाणार असून या पाण्याचा वापर शेती किंवा झाडांसाठी करता येणार आहे.
दरम्यान दोन्हीही प्लान्टसाठी जागा निश्चित करण्याचे काम अद्याप सुरु आहे. ग्रामपंचायतीने ऐनतपूर प्लान्टसाठी स्मशानभूमिजवळ, तर बेलापूरच्या प्लान्टसाठी बाजारतळाजवळ जागा सुचविली आहे. ऐनतपूरसाठी मंजूर झालेला प्लॅन्ट सप्टेंबर अखेर तर बेलापूरचा ऑक्टोबर अखेर पूर्ण करावयाचा आहे.
बेलापूरच्या चार भागातून नदीपात्रात सांडपाणी जाते. या दोन्ही प्रकल्पांतर्गत स्मशानभूमी व बाजारतळ परिसरातून नदी पात्रात सोडले जाणारे पाणी अडवून शुध्द केले जाणार आहे. मात्र केशव गोविंद व महादेव मंदिराच्या भागातून जाणारे पाणी दुसर्या टप्प्यात एकत्रित करुन शुध्द करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या दोन प्रकल्पांतर्गत किमान ६० टक्के पाणी शुध्द होणार असल्याचे माजी जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले
या नंतर यंदा होणाऱ्या १९ जुलै ते २९ जुलै मोहरम नियोजन संदर्भात शान ए करबला कमिटी चे अध्यक्ष आसलम बिनसाद यांनी माहिती दिली,यावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,शहरात धार्मिक,सांस्कृतिक उत्सव अशी कार्यक्रमे ही झालीच पाहिजे ज्यामुळे सामाजात एकोपा निर्माण होतो, मात्र अशी कार्यक्रम करताना जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्थाही जपली पाहिजे असे ते म्हणाले.श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी म्हणाले की, मोहर्रम उत्सव कमेटीद्वारे होणाऱ्या कार्यक्रमांची सर्वानी पोलिसांना आधीच सूचना द्यावी, दरवर्षी प्रमाणे परवानगी दिली जाईल, कोणीही पुर्व परवानगी न घेता कामे करू नये, जेणेकरून आपल्या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही अशा सूचनाही त्यांनी दिल्या.यावेळी शान ए करबला कमिटीचे अध्यक्ष आसलम बिनसाद, पदाधिकारी रहेमानअली शाह (बादशहा बाबा),तमन्ना सुरय्या नायक, अजीज अहेमद शेख (भैय्याभाई) सर्व कमिटी सदस्य तसेच शहर हद्दीतील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी शेवटी आभार मानले.
हनिफभाई पठाण,रईसभाई शेख,
रज्जाकभाई शेख जर मागण्या वेळीच मान्य नाही केल्यास हे आंदोलन आसेच चालु राहील याची संबंधित खात्याने नोंद घ्यावी असा इशारा दिला
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताला अव्वल क्रमांकावर असलेल्या फ्लँडर्स संघाकडून १-३ निसटता
पराभव पत्करावा लागला व भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडू नंदिनी भागवत,रिया एदलाबादकर,श्रिया गोठोस्कर,अनन्या गोसावी(कर्णधार), तन्वी जोशी, ईरा ढेकणे, समृद्धी कोंढारे, संस्कृती आपटे, अनाहिता मोकाशी,ओजस्वी बचुटे,स्वरा व्यवहारे,वरदा तिलये आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत भारतासाठी रौप्यपदक पटकावले.या सर्व खेळाडूंसाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती,त्यांनी पहिलाच प्रयत्न देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कुलदीप कोंडे यांनी काम पाहिले तर संघ व्यवस्थापक म्हणून मुग्धा भागवत व श्वेता आपटे यांनी काम पाहिले.रौप्यपदक विजेत्या संघाचे मिलेनियम स्कूलचे संचालक श्री अन्वित फाटक,सौ अंचीता भोसले, प्राचार्या सौ राधिका वैद्य, प्रा सचिन घायवळ, क्रीडा प्रमूख श्री रामदास लेकावळे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.