Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी )-आपल्याला भविष्यात काय व्हायचे हे  निश्चित करुन ते मिळविण्यासाठी कठोर परिश्रम व जिद्द चिकाटी या बळावर  येथील अभिषेक दिलीप दुधाळ याने   युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवुन तालुक्यातील पहीला आयएएस होण्याचा बहुमान मिळवीला आहे .                  नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालात २७८ क्रमांकाने अभिषेक दुधाळने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवीला होता                                  अभिषेक दिलीप दुधाळ याने यापूर्वी वयाच्या २३ व्या वर्षी युपीएससी परिक्षा उत्तीर्ण  झाला होता त्या वेळी त्याला ६३७ रँंक मिळाली होती त्याला इंडीयन रेल्वे ट्रँफीक सर्व्हीस आयआरटीएस गृप ए हे पद मिळाले होते  या ठिकाणी सेवेत हजर होवुन पुन्हा परीक्षा देण्याचा त्याने निर्णय घेतला अन  दररोज सात तास नियमित अभ्यास सुरु ठेवला .म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर त्याप्रमाणे त्याने २०२० मध्ये दिलेल्या युपीएससी परिक्षेत देशात ४६९ वा रँंक मिळवीला  इंडीयन पोलीस सर्व्हीस हे पद मिळवुन हैद्राबाद येथे प्रशिक्षण सुरु झाले यावरही समाधान मानेल तो अभिषेक कसला त्याने पुन्हा नियमित अभ्सास सुरुच ठेवला अन पुन्हा  परिक्षा दिली.कारण त्याला जिल्हाधिकारी हे मानाचे पद मिळवायचे होते  नुकताच युपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यात त्याला २७८ रँक मिळाले आता त्यांची आयएएस म्हणून निवड झाली आहे  सलग तिन वेळा परिक्षा देवुन तिनही वेळेस वरची रँक मिळवुन जिल्हाधिकारी होणारे अभिषेक दुधाळ यांचे प्राथमिक शिक्षण बेलापुर तसेच जेटीएस हायस्कूल बेलापुर  येथे झाले  त्यापुढील शिक्षण मुंबई येथील वीर जिजामाता अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत पुर्ण केले  माहीती व तंत्रज्ञान विभागात पदवी प्राप्त केली आयटी क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून प्रशासकीय सेवेत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला याकरीता वडील दिलीप व आई संगीता दुधाळ यांची तसेच गुरुजन वर्ग तसेच मित्रांची मोलाची साथ मिळाली  दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जेएनयू एमए अर्थशास्र विभागासाठी प्रवेश घेतला त्याकरीता खाजगी शिकवणी लावली नंतर स्वंय अध्यापन करण्याचा निर्णय घेतला व कठोर अशी मेहनत घेवुन सलग तिसऱ्यांदा युपीएससी परीक्षेत यश मिळवुन तालुक्यातील पहीले आयएएस हे पद भूषविणारे अभिषेक दुधाळ हे पहीलेच होत  याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

बेलापूर- (प्रतिनिधी  )-मा. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बेलापूर ग्रामपंचायती अंतर्गत बेलापूर व ऐनतपूर महसुली गावांसाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेंतर्गत प्रत्येकी ५९ लाख रुपये असा एकूण सुमारे १ कोटी १८ लाख रुपये खर्चाचा घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रवरा नदी शुध्द होण्यास मदत होणार असल्याची माहिती गावकरी मंडळाचे नेते शरद नवले , सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंंडागळे यांनी दिली आहे. 

या बाबत बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने माहीती देताना नवले साळवी व खंडागळे यांनी सांगितले की बेलापूर येथे बाजारतळ, स्मशानभूमी, केशव गोविंद मंदिर व महादेव मंदिर परिसरातून वाहणार्‍या छोट्या ओढ्यांमधून सांडपाणी व इतर मलमुत्र प्रवरा नदीत जाते. त्यामुळे प्रवरा नदी अशुध्द व दूषित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नद्या शुध्दीकरण महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. त्यात बेलापूरची प्रवरा नदी स्वच्छ करण्यासाठी १ कोटी १८ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यामध्ये ऐनतपूरसाठी सुमारे ५९ लाख रुपये, तर बेलापूरसाठी ५९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येकी नऊ कंपोस्ट टँक, टायगर बायोफिल्टर प्लॅन्ट उभारला जाणार आहे. यामधून नदीला जाणारे अशुध्द पाणी शुध्द केले जाणार असून या पाण्याचा वापर शेती किंवा झाडांसाठी करता येणार आहे. 

दरम्यान दोन्हीही प्लान्टसाठी जागा निश्‍चित करण्याचे काम अद्याप सुरु आहे. ग्रामपंचायतीने ऐनतपूर प्लान्टसाठी स्मशानभूमिजवळ, तर बेलापूरच्या प्लान्टसाठी बाजारतळाजवळ जागा सुचविली आहे.  ऐनतपूरसाठी मंजूर झालेला प्लॅन्ट सप्टेंबर अखेर तर बेलापूरचा ऑक्टोबर अखेर पूर्ण करावयाचा आहे. 

बेलापूरच्या चार भागातून नदीपात्रात सांडपाणी जाते. या दोन्ही प्रकल्पांतर्गत स्मशानभूमी व बाजारतळ परिसरातून नदी पात्रात सोडले जाणारे पाणी अडवून शुध्द केले जाणार आहे. मात्र केशव गोविंद व महादेव मंदिराच्या भागातून जाणारे पाणी दुसर्‍या टप्प्यात एकत्रित करुन शुध्द करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या दोन प्रकल्पांतर्गत किमान ६० टक्के पाणी शुध्द होणार असल्याचे माजी जि प सदस्य शरद नवले  सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले

श्रीरामपूर प्रतिनिधी:मोहर्रम सण उत्सव मोठ्या गुण्यागोविंदाने तथा शांततेने साजरा व्हावा या करीता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये काल दि.१८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वा. येथील नुतन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे आणि पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहर्रम उत्सव कमेटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे व पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सर्व शान ए करबला मोहर्रम कमिटीचे पदाधिकारी सदस्य यांना मोहर्रम सण साजरा करताना घ्यावयाची काळजी व शहरात जातिय सलोखा कसा अबाधित राहील याकरीता घ्यावयाचा पुढाकार याबरोबरच शहरात भाईचारा आणी शांतता टिकून रहावी याकरीता घ्यावयाची खबरदारी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी शहर व परिसरातील शान ए करबला मोहर्रम कमिटीचे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.या वेळी प्रथमता श्रीरामपुरच्या परंपरे प्रमाणे आपल्या विभागाचे नुकतेच पदभार स्वीकारलेले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांना शान ए करबला कमिटी श्रीरामपूर यांच्या वतीने पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागतपर सत्कार करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


या नंतर यंदा होणाऱ्या १९ जुलै ते २९ जुलै मोहरम नियोजन संदर्भात शान ए करबला कमिटी चे अध्यक्ष आसलम बिनसाद यांनी माहिती दिली,यावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,शहरात धार्मिक,सांस्कृतिक उत्सव अशी कार्यक्रमे ही झालीच पाहिजे ज्यामुळे सामाजात एकोपा निर्माण होतो, मात्र अशी कार्यक्रम करताना जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्थाही जपली पाहिजे असे ते म्हणाले.श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी म्हणाले की, मोहर्रम उत्सव कमेटीद्वारे होणाऱ्या कार्यक्रमांची  सर्वानी पोलिसांना आधीच सूचना द्यावी, दरवर्षी प्रमाणे परवानगी दिली जाईल, कोणीही पुर्व परवानगी न घेता कामे करू नये, जेणेकरून आपल्या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही अशा सूचनाही त्यांनी दिल्या.यावेळी शान ए करबला कमिटीचे अध्यक्ष आसलम बिनसाद, पदाधिकारी रहेमानअली शाह (बादशहा बाबा),तमन्ना सुरय्या नायक, अजीज अहेमद शेख (भैय्याभाई) सर्व कमिटी सदस्य तसेच शहर हद्दीतील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी शेवटी आभार मानले.


श्रीरामपुर प्रतिनिधी- वडाळा पाटबंधारे उपविभाग श्रीरामपूर उपअभियंता यांना आपले अंतर्गत येणारे श्रीरामपूर शहरातील कॅनॉलमध्ये गोंधवणी रोड राज पेट्रोल पंपाशेजारील कॅनॉल, मिल्लतनगर येथील लोखंडी पुल परिसर, संजयनगर मुळे बंगला कॅनॉल परिसर, खबडी पुल परिसर, नॉर्दर्न ब्रँच परिसर या परिसरातून जाणा-या कॅनॉलमध्ये मोठया प्रमाणात जिवजंतू, म्हशीचे गोठे, तसेच कॅनॉलच्या कडेलाच बनविलेल्या अनाधिकृत कचराकुंडया व या कुंडयांमध्ये म्हशीचे शेण, इतर घाण टाकत असल्याने नागरीकांच्या जिवीताचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने या परिसरामधील सर्व लोकांवर कडक कायदेशिर कारवाई करावी  व संपूर्ण परिसरातील कॅनॉलमध्ये असलेली घाण, कचरा याची साफसफाई व्हावी यासाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने मेनरोड महात्मा गांधी पुतळयाजवळ आमरण उपोषण सुरु केले आहे या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी माहीत दिली तसेच राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण यांनी देखील आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या उपोषण कर्ते बाळासाहेब बागुल,

हनिफभाई पठाण,रईसभाई शेख,

रज्जाकभाई शेख जर मागण्या वेळीच मान्य नाही केल्यास हे आंदोलन आसेच चालु राहील याची संबंधित खात्याने नोंद घ्यावी असा इशारा दिला

पॅरिस १८/७ (गौरव डेंगळे):भारताने डंकर्क,पॅरिस येथे संपन्न झालेल्या FISEC-FICEP गेम्समध्ये मुलींच्या व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच पदक जिंकून इतिहास रचला.१५ जुलै २०२३ हा दिवस भारतीय व्हॉलीबॉलसाठी सुवर्णाचा दिवस असेल.अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात,संघाने उपांत्यपूर्व फेरीत चिलीचा आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रियाचा पराभव केला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताला अव्वल क्रमांकावर असलेल्या फ्लँडर्स संघाकडून १-३ निसटता

पराभव पत्करावा लागला व भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडू नंदिनी भागवत,रिया एदलाबादकर,श्रिया गोठोस्कर,अनन्या गोसावी(कर्णधार), तन्वी जोशी, ईरा ढेकणे, समृद्धी कोंढारे, संस्कृती आपटे, अनाहिता मोकाशी,ओजस्वी बचुटे,स्वरा व्यवहारे,वरदा तिलये आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत भारतासाठी रौप्यपदक पटकावले.या सर्व खेळाडूंसाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती,त्यांनी पहिलाच प्रयत्न देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कुलदीप कोंडे यांनी काम पाहिले तर संघ व्यवस्थापक म्हणून मुग्धा भागवत व श्वेता आपटे यांनी काम पाहिले.रौप्यपदक विजेत्या संघाचे मिलेनियम स्कूलचे संचालक श्री अन्वित फाटक,सौ अंचीता भोसले, प्राचार्या सौ राधिका वैद्य, प्रा सचिन घायवळ, क्रीडा प्रमूख श्री रामदास लेकावळे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत गेल्या दोन वर्षापासून मोठ्या स्वरूपात रस्त्यांची व शासकीय इमारतींची कामे युद्धपातळीवर सुरू असून सर्व कामे उत्कृष्ट स्वरूपात होत असल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे सदरील कामे उत्कृष्ट व नियमात करून घेणे करिता येथील उप अभियंता व शाखा अभियंता यांना कामाच्या ठिकाणी जाऊन गुणवत्तेत कामे करून घेणे आवश्यक असताना दुर्दैवाने शासनाचे या उपविभागाकडे विशेषता अधिकाऱ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या चार महिन्यापासून या उपविभागाकडे कामाची तपासणी व जाणे येणे करिता शासकीय वाहन नसल्याने अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली असून येथील अधिकारी साईडवर जाणे येणे करिता स्वतःच्या खाजगी वाहनाचा वापर करीत असून वाहन चालविणे करिता त्यांना स्वतंत्र ड्रायव्हर ठेवावा लागत आहे

वास्तविक पाहता तालुक्यातील ठिकठिकाणी चालू असलेल्या कामाचे अंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्या करिता व दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणे व येणे करिता किमान 40 किलोमीटरचे दररोजचे अंतर प्रति दिन 50 किलोमीटरचे अंतर होत असून यासाठी लागणारे पेट्रोल व ड्रायव्हर खर्च पाहता या अधिकाऱ्यांना न परवडणारे आहे कारण हा खर्च त्यांना आपल्या पगारातूनच करावा लागत असल्याने त्यांना मोठी झळ बसत आहे

साठ हजार ते एक लाखापर्यंत या अधिकाऱ्यांचा मासिक वेतन असून महिन्याला अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये त्यांचा इंधन खर्च व ड्रायव्हर खर्च होत असून मुला मुलींचे शैक्षणिक खर्च घर खर्च व इतर खर्च दीड ते दोन लाख रुपये होत असल्याने या अधिकाऱ्यांच्या दूरदशे कडे  शासनाने लक्ष केंद्रित करून त्यांच्या गेल्या 4 महिन्यात झालेल्या वाहतूक खर्च या अभियंत्यांना परतफेड करावी व शासकीय कामाकरिता या श्रीरामपुर सार्वजनिक बांधकाम विभागास चांगल्या दर्ज्याचे वाहन लवकरात लवकर देऊन अडचणी दूर करणे करिता व त्यांना सुविधा पुरविणे करिता आपण वरिष्ठ लेव्हलवर मंत्रिमंडळात पत्रव्यवहार करून या कर्तव्य दक्ष अधिकारी यांना यांच्या हक्कांचे लढ्यात सोबत राहून अहमदनगर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 24/7/ 2023 रोजी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह समोर रस्ता रोको आंदोलन करणार व वेळ प्रसंगी संगमनेर व अहमदनगरच्या कार्यालया समोरची आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांनी दिली आहे

श्रीरामपूर--मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यावर एक सही संतपिती ही मोहीम राबविण्यात आली याच अनुषंगाने श्रीरामपूर गांधी पुतळा येथे बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मोठे बॅनर लावून एक सही संतापाची ही मोहीम राबविण्यात आली या या मोहिमेची सुरुवात दैनिक जय बाबा चे कार्यकारी संपादक मनोज भाऊ आगे व राष्ट्रीय सह्याद्री चे संपादक करण भाऊ नवले यांच्या सहीने या मोहिमेची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी म्हणजे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही एक सही संतापची ही मोही संपूर्ण राजपूत राज्यभर राबवत आहोत सध्या राज्यात जे पक्ष सत्तेत आहेत तेच पक्ष विरोधी पक्षात देखील आहेत निवडणुकीच्या वेळेस एकमेकावर चिखल करणारे पक्षाचे नेते आमदार खासदार आज सत्तेसाठी सगळेजण शिकलात पडले आहे या लोकांना नागरिकांची मताची किंमत राहिली नाही व यांच्या पक्षाचे ध्येय धोरण विचार याचा सुद्धा विसर पडलेला आहे अशा लोकांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवावे व स्वाभिमानाने व विचारासी तडजोड न करणारे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना मतदार राजाने पाठिंबा देऊन मनसे या पक्षाला भरघोस मताने निवडून द्यावी अशी अहवाल या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे केले 

याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, शहराध्यक्ष सतीश कुदळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष नंदू चाबुकस्वार,शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी,विलास पाटणी,भासकर सरोदे,अंबादास कोकाटे ,विकी राऊत,प्रवीण कारले,सुनील करपे,रामेश्वर कोल्हे, अतुल तारडे विशाल गायकवाड,निलेश सोनवणे,दर्शन शर्मा,संदीप विशंभर,राजू शिंदे ,सचिन कदम,राजू जगताप,ज्ञानेश्वर सोनार,मनोहर बागुल,बबलू बोरकर आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget