Latest Post

श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत गेल्या दोन वर्षापासून मोठ्या स्वरूपात रस्त्यांची व शासकीय इमारतींची कामे युद्धपातळीवर सुरू असून सर्व कामे उत्कृष्ट स्वरूपात होत असल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे सदरील कामे उत्कृष्ट व नियमात करून घेणे करिता येथील उप अभियंता व शाखा अभियंता यांना कामाच्या ठिकाणी जाऊन गुणवत्तेत कामे करून घेणे आवश्यक असताना दुर्दैवाने शासनाचे या उपविभागाकडे विशेषता अधिकाऱ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या चार महिन्यापासून या उपविभागाकडे कामाची तपासणी व जाणे येणे करिता शासकीय वाहन नसल्याने अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली असून येथील अधिकारी साईडवर जाणे येणे करिता स्वतःच्या खाजगी वाहनाचा वापर करीत असून वाहन चालविणे करिता त्यांना स्वतंत्र ड्रायव्हर ठेवावा लागत आहे

वास्तविक पाहता तालुक्यातील ठिकठिकाणी चालू असलेल्या कामाचे अंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्या करिता व दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणे व येणे करिता किमान 40 किलोमीटरचे दररोजचे अंतर प्रति दिन 50 किलोमीटरचे अंतर होत असून यासाठी लागणारे पेट्रोल व ड्रायव्हर खर्च पाहता या अधिकाऱ्यांना न परवडणारे आहे कारण हा खर्च त्यांना आपल्या पगारातूनच करावा लागत असल्याने त्यांना मोठी झळ बसत आहे

साठ हजार ते एक लाखापर्यंत या अधिकाऱ्यांचा मासिक वेतन असून महिन्याला अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये त्यांचा इंधन खर्च व ड्रायव्हर खर्च होत असून मुला मुलींचे शैक्षणिक खर्च घर खर्च व इतर खर्च दीड ते दोन लाख रुपये होत असल्याने या अधिकाऱ्यांच्या दूरदशे कडे  शासनाने लक्ष केंद्रित करून त्यांच्या गेल्या 4 महिन्यात झालेल्या वाहतूक खर्च या अभियंत्यांना परतफेड करावी व शासकीय कामाकरिता या श्रीरामपुर सार्वजनिक बांधकाम विभागास चांगल्या दर्ज्याचे वाहन लवकरात लवकर देऊन अडचणी दूर करणे करिता व त्यांना सुविधा पुरविणे करिता आपण वरिष्ठ लेव्हलवर मंत्रिमंडळात पत्रव्यवहार करून या कर्तव्य दक्ष अधिकारी यांना यांच्या हक्कांचे लढ्यात सोबत राहून अहमदनगर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 24/7/ 2023 रोजी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह समोर रस्ता रोको आंदोलन करणार व वेळ प्रसंगी संगमनेर व अहमदनगरच्या कार्यालया समोरची आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांनी दिली आहे

श्रीरामपूर--मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यावर एक सही संतपिती ही मोहीम राबविण्यात आली याच अनुषंगाने श्रीरामपूर गांधी पुतळा येथे बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मोठे बॅनर लावून एक सही संतापाची ही मोहीम राबविण्यात आली या या मोहिमेची सुरुवात दैनिक जय बाबा चे कार्यकारी संपादक मनोज भाऊ आगे व राष्ट्रीय सह्याद्री चे संपादक करण भाऊ नवले यांच्या सहीने या मोहिमेची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी म्हणजे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही एक सही संतापची ही मोही संपूर्ण राजपूत राज्यभर राबवत आहोत सध्या राज्यात जे पक्ष सत्तेत आहेत तेच पक्ष विरोधी पक्षात देखील आहेत निवडणुकीच्या वेळेस एकमेकावर चिखल करणारे पक्षाचे नेते आमदार खासदार आज सत्तेसाठी सगळेजण शिकलात पडले आहे या लोकांना नागरिकांची मताची किंमत राहिली नाही व यांच्या पक्षाचे ध्येय धोरण विचार याचा सुद्धा विसर पडलेला आहे अशा लोकांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवावे व स्वाभिमानाने व विचारासी तडजोड न करणारे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना मतदार राजाने पाठिंबा देऊन मनसे या पक्षाला भरघोस मताने निवडून द्यावी अशी अहवाल या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे केले 

याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, शहराध्यक्ष सतीश कुदळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष नंदू चाबुकस्वार,शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी,विलास पाटणी,भासकर सरोदे,अंबादास कोकाटे ,विकी राऊत,प्रवीण कारले,सुनील करपे,रामेश्वर कोल्हे, अतुल तारडे विशाल गायकवाड,निलेश सोनवणे,दर्शन शर्मा,संदीप विशंभर,राजू शिंदे ,सचिन कदम,राजू जगताप,ज्ञानेश्वर सोनार,मनोहर बागुल,बबलू बोरकर आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

सोमैया विद्या विहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे म्हणून प्रखर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी दिनांक २२ व २३जुलै रोजी राज्यस्तरीय भव्य मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या ही वर्षी या स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. 

या स्पर्धेसाठी 

प्रथम पारितोषिक रोख रक्कम ७०००/स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,

द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ५००० /स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,

  तृतीय पारितोषिक रोख रक्कम ३००० /स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,तसेच

उत्तेजनार्थ प्रत्येकी १०००/रुपयाचे दोन पारितोषिक.

असे बक्षिसाचे स्वरूप राहील.

ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इयत्ता आठवी ते दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचा गट या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेचे विषय व अधिक माहितीसाठी आपल्या शाळेमार्फत खाली दिलेल्या नंबर वर लवकरात लवकर संपर्क साधावा.

टीप -सदर स्पर्धेसाठी शाळेमार्फत केलेली नाव नोंदणीच ग्राह्य धरली जाईल.

संपर्क-श्री तुरकणे सर (९९२२३०१६६८)

श्री नन्नवरे सर (७०६६६०३३३३)

 सौ.होन मॅडम (७५५८४७९९६०)

बेलापुर (प्रतिनिधी  )-येथील जवान सुजित श्रीकांत शेलार हा मातृभूमीची सेवा करुन सेवानिवृत्त होवुन गावी परतला त्या वेळी गावाकऱ्यांनी श्रीरामपुर रेल्वे स्थानकापासून ते बेलापुर पर्यत उघड्या जीपमधुन मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला                                                  येथील सौ शकुंतला व श्रीकांत शेलार यांचे चिरंजीव सुजित हे १५ आँगस्ट २००१ साली नाशिक येथे सी आर पी एफ मध्ये भरती झाले होते श्रीनगर जम्मू येथे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती  आसाम येथे झाली .त्यांनी शिलाँग अरुणाचल या ठिकाणी सेवा केली सन २००५ ते २००८ या कालावधीत श्रीनगर येथे ड्यूटी केली सन२००८ ते २०११ या कालावधीत नवि दिल्ली येथे विविध महत्वाच्या जागेवर गर्द ड्यूटी केली सन २०११ मध्ये त्यांची बदली ९९ बटालीयन रँपिड अँक्शन फोर्स येथे झाली त्या वेळी तेलंगाना वेगळे होण्याचा विषय सुरु होता त्या वेळी दंगल सदृश्य अनेक भागात सेवा करण्याची संधी मिळाली .सन २०१५ ते २०१८ या काळात नक्शलप्रभावी क्षेत्र छत्तीसगढ येथेही सेवा करण्याची संधी मिळाली या भागात तर जिव मुठीत धरुनच काम करावे लागत होते त्या ही परिस्थितीत मेजर सुजीत शेलार यांनी अनेक ठिकाणी फिरुन नक्शली कारवाया हाणून पाडल्या .सन २०१८ ते २०२३ या कालावधीत जम्मु येथे सेवा देवुन शिपाई पदावर भरती झालेले मेजर सुजीत शेलार हे हवालदार या पदावरुन सेवानिवृत्त झाले सन २००१ ते सन २०२३ या कालावधीत त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला.काही प्रसंग तर जिवावर बेतले होते त्या ही परिस्थितीत त्यांनी देशाची सेवा करुन नक्शलवाद्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला या काळात अनेक सन्मानही त्यांना मिळाले असा हा जवान सीआरपीएफची सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त होवुन घरी परतला त्यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले फटक्याची अतिषबाजी करुन उघड्या जीपमधुन त्यांची मिरवणूक काढली जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बाजारा सामितीचे सभापती सुधीर नवले दत्ता कुर्हे   अरुण पा नाईक विलास मेहेत्रेशिवाजी वाबळे व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले भास्कर बंगाळ वैभव कुऱ्हे सुनिल कुर्हे साहेबराव क्षिरसागर मेजर किरण शेलार प्रकाश कुमावत भगीरथ मुंडलीक पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार बंटी शेलार विजय शेलार स्वप्निल मुंडलीक संजय शेलार बाबा शेलार आंदींनी मेजर सुजित यांचे पुष्पहार घालुन स्वागत केले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथे उर्दू माध्यमातून इयत्ता पहीली ते बारावी पर्यंत शिक्षण दिले जात असुन उर्दू माध्यमाची अंगणवाडी सुरु करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने शिक्षण विभागाकडे करण्यात आलेली आहे                    या बाबत मुस्लिम समाजाच्या वतीने माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की बेलापुर गावात पाच दे सात हजार मुस्लिम बांधव रहात असुन येथे मुलांना उर्दू माध्यमातून शिक्षण घेता यावे या करीता इयत्ता पहीली ते बारावी पर्यंतचे वर्ग आहे मात्र मराठी माध्यमातून अंगणवाडीत शिक्षण घेतलेल्या मुलांना इयत्ता पहीलीचे उर्दू माध्यमाचे शिक्षण अतिशय अवघड वाटते त्यामुळे मुलांना अंगणवाडीतुनच उर्दू माध्यमाचे शिक्षण मिळाल्यास त्यांची अधिक प्रगती होईल त्या करीता बेलापुर येथे जागा देखील उपलब्ध आहे तसेच मुलांना शिकविण्यासाठी उर्दू माध्यमाची शिक्षीका देखील आहे तरी शासनाने आमच्या योग्य मागणीची योग्य ती दखल घेवुन तातडीने अंगणवाडी सुरु करण्यास परवानगी द्यावी आशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर सर्वश्री आसीफ शेख ,शफिक आत्तार ,मोहसीन सय्यद ,अजिज शेख उर्फभैय्या   ,जब्बार आतार , शफीकं बागवान ,हाजी ईस्मईल शेख ,समिर जहागीरदार सर्फराज सय्यद मुश्ताक आतार ,जावेद पिंजारी ,फिरोज कुरेशी ,रियाज तांबोळी ,इरफान पठाण ,अकिल पटेल जब्बार वाघवाले ,बाबा सय्यद आदिंच्या सह्या आहेत.

हरेगाव : दि. ८ जुलै २०२३ रोजी संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल येथे वृक्षदिंडी वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला.

वनविभाग हरित सेना यांच्या सहकार्याने विद्यालयात गेल्या 23 वर्षापासून हा उपक्रम राबविला जातो, संत तेरेजा मुलींच्या विद्यालयाची यासाठी वनविभागाकडून निवड करण्यात आली आहे वनविभागाचे वनरक्षक श्री  के निर्वाण, श्री जाधव व श्री आहेर व श्री कानडे याप्रसंगी उपस्थित होते.जागतिक तापमान वाढ, पावसाचे घटत असलेले प्रमाण, वाढते प्रदूषण या समस्यांसाठी "झाडे लावणे" अत्यंत महत्त्वाचे असून वसुंधरा स्वच्छ, सुंदर व सुरक्षित ठेवण्यासाठी मानवाची भूमिका व जबाबदारी अत्यंत  महत्त्वाची आहे. "झाडे लावा व निसर्गाचा समतोल" सांभाळा असा संदेश श्री जाधव साहेब यांनी याप्रसंगी मुलींना दिला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सिस्टर ज्योती सर्व शिक्षक व विद्यार्थिनी यांनी रोपे हाती घेऊन घोष फलकासह ग्रामस्थांना वृक्ष लागवडीसाठी  प्रेरणा दिली. अतिशय उत्साहात घोषणा देत वृक्ष दिंडी काढून जनजागृती केली. "पर्यावरण सांभाळा झाडे लावा" असा संदेश दिला. याप्रसंगी पालकांना रोपे वाटप करण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते मुलींना सुमारे पाचशे रोपांचे वितरण करण्यात आले. हरित सेनेचे ववनाधिकारी, माननीय मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती व विद्यार्थिनी यांच्या शुभहस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पारंपारिक वेशभूषेत मुलींनी दिंडीत सहभागी होत आपले वृक्ष प्रेम घोषणा देत व्यक्त केले व आपल्याला मिळालेले रोप वाढविण्याची जबाबदारी घेतली. या वृक्षदिंडीचे व वृक्षारोपण समारंभाचे प्रास्तविक श्री सुहास ब्राह्मणे यांनी केले, व विद्यालयाच्या वतीने माननीय वनाधिकाऱ्यांचा सत्कार श्री आदिनाथ आघाव यांनी केला. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला झाला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  एखाद्या खाजगी शाळेत असणाऱ्या सर्व सुविधा नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुलहमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये निर्माण करण्यात आल्या आहेत.शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्तम आहे. या शाळेच्या कार्याचे इतर शाळांनी अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः जिल्ह्यातील सर्व उर्दू शाळांनी शाळा क्रमांक पाचचा आदर्श घेऊन काम करावे.

शाळेचे पालक म्हणून या शाळेच्या प्रगतीचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन संविधान बचाव समितीचे अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे नेते अहमदभाई जहागीरदार यांनी केले.

पालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक पाचचा ३७ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री जहागीरदार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रमजान पठाण,सामाजिक कार्यकर्ते साजिद मिर्झा, जलीलभाई काझी, हाजी युसूफभाई, विजय शेलार,आयाज तांबोळी, सरवरअली सय्यद मास्टर,सलाउद्दीन शेख, पंचायत समितीचे साधन व्यक्ती शाहीन शेख, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख, उपाध्यक्ष अजीम शेख, शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन,शिक्षक सचिन शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य शबाना राजमोहम्मद शेख, नगरसेवक कलीमभाई कुरेशी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते साजिद मिर्झा यांनी शाळा क्रमांक पाच ने उत्तम प्रगती केली असून या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत.ही नगरपालिका विभागातील जिल्ह्यातील एक प्रमुख आदर्श शाळा आहे. शाळेचे सर्व शिक्षक हे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत.मुलांसाठी सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.शैक्षणिक दर्जा देखील उत्तम आहे.हीच कामगिरी पुढील काळातही कायम राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सेवा दलाचे मास्टर सरवरअली सय्यद यांनी माझ्या कुटुंबातील सर्व मुले या शाळेत शिकली आहेत.येथील शिक्षक अतिशय कष्टाळू आहेत याचा मला अभिमान वाटतो.पालकांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन येथे केले जाते तसेच मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते त्याबद्दल शाळेच्या सर्व शिक्षक वर्गाला धन्यवाद दिले.

काँग्रेस नेते विजय शेलार यांनी आपल्या भाषणातून नगरपालिकेची जिल्ह्यातील एक नावाजलेली शाळा म्हणून या शाळेचा सर्व श्रीरामपूरकरांना अभिमान आहे. समाजातील गोरगरीब मुलांचे जीवन घडविण्याचे कार्य खऱ्या अर्थाने या शाळेत सुरू आहे असे सांगून शाळेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन यांनी नगर जिल्ह्यातील नगरपालिका विभागातील सर्वात मोठी शाळा आणि सर्व सोयी सुविधा असणारी शाळा म्हणून शाळा क्रमांक पाचचा जिल्हाभरामध्ये उल्लेख केला जातो. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे कार्य मोलाचे आहे असे सांगून प्रशासन अधिकारी राजेश डामसे यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी १ जुलै १९८७ साली शाळा अस्तित्वात आल्यानंतर आजपर्यंत सव्वाचार हजार विद्यार्थी या शाळेत शिकून गेले आहेत.शाळेमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असून प्रत्येक वर्गात आता डिजिटल पॅनल बोर्ड खासदार निधीतून उपलब्ध झाले आहेत.शाळेची सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा,विज्ञान प्रयोगशाळा,खेळाचे भरपूर साहित्य या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडविण्याचे कार्य आमचा शिक्षक वर्ग करीत आहे. या कार्याला पालकांची देखील चांगली साथ मिळते.पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब यांचे विशेष सहकार्य आम्हाला मिळत असते.या शाळेचे विद्यार्थी आज समाजामध्ये उत्तम प्रकारे आपले सेवा कार्य करीत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले.

हाजी युसुफ शेख यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांचा तसेच शाळेच्या सर्व शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीतर्फे वर्धापन दिनानिमित्त यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास पालक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेचे इमारतीवर तसेच प्रत्येक वर्गात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षिका वहिदा सय्यद,नसरीन इनामदार,शाहीन शेख, अल्ताफ शाह,अस्मा पटेल,निलोफर शेख, बशिरा पठाण,मिनाज शेख,एजाज चौधरी, रिजवाना कुरेशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ शहा यांनी केले तर आभार एजाज चौधरी यांनी मानले.

                    *चौकट*

उर्दू शाळा क्रमांक पाच चे विद्यमान मुख्याध्यापक सलीमखान पठाण हे या महिना अखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या काळामध्ये शाळेची मोठी भरभराट झाली.भविष्य काळात त्यांच्या नंतरही शाळेच्या प्रगतीची ही वाटचाल अशीच सुरू राहावी अशी अपेक्षा सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.

दरवर्षी शाळेचा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरी करणारी जिल्ह्यातील उर्दू शाळा क्रमांक पाच ही एकमेव शाळा आहे.यानिमित्ताने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो.याबद्दल पालकांनी शाळेच्या शिक्षक वर्गाचे विशेष अभिनंदन केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget