Latest Post

बेलापूर(वार्ताहर)राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सरकारची पत ढासळली.त्यामुळे कोणी गुंतवणूकदार राज्यात यायला तयार नाहीत.राज्याला कोणीही लस द्यायला तयार नव्हते. महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे  टेंडर काढले जातात .तसेच दरपत्रकच तयार केले आहेत. राज्याची एव्हढी बिकट अवस्था कधीच झाली नव्हती. कोरोनाच्या महाभयंकर संकटात राज्य सरकारचे योगदान काय? असा सवाल  भाजपचे नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

जि. प.आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद नवले यांच्या निधीतून बेलापूर येथे पावणेतीन कोटी खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण आ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शरद नवले होते.


आ. विखे पुढे म्हणाले की,महाविकास आघाडीचे एक एक मंत्री घोटाळ्यांमध्ये अडकले. वाळु माफियांनी उत्च्छाद मांडलाय. आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा  दुर्दैवी प्रयत्न होतोय. आत्महत्याग्रस्त एस. टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सरकार न्याय देऊ शकले नाही. अपयश झाकण्यासाठी राज्यातील वसुली सरकारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. त्यात सामान्य माणूस भरडला जात आहे. दारूमुक्तीचा निर्णय घेतला.मंत्र्यांनाच पैसे पुरेनात ते जनतेला काय देणार? असा सवाल करुन त्यांनी  राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टिका केली.

याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाखाली १२० कोटी जनतेचे निशुल्क लसीकरण करण्यात आले. कोरोनाच्या काळात १ लाख ६० हजार कोटी खर्च करुन गोरगरिबांना मोफत धान्य देऊन त्यांची भुक भागविली.काश्मीरसह  देशभर पंचायत राजच्या माध्यमातून गावागावांत विकास करण्यासाठी तसेच वंचित भागांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाडसी पाऊले टाकली जात आहेत.

शरद नवले यांनी  मिळालेल्या संधीचे सोने करीत चांगले काम करुन एक नवा अध्याय रचला असे सांगत  आ. विखे यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.बेलापूरला एक मोठा सांस्कृतिक ठेवा लाभला असुन  या गावाचा नेहमी अभिमान वाटतो. त्यामुळे गावाच्या प्रस्तावित विकास कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही आ. विखे यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत येत्या ५ मे रोजी बेलापूरला कार्यक्रम घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.


अध्यक्षीय भाषणात शरद नवले म्हणाले की,पक्षभेद विसरून समविचारी लोकांना बरोबर घेऊन जनतेच्या विश्वासाला पात्र राहुन निवडणूक जाहीरनाम्यानुसार विविध विकासकामे पुर्ण करीत आहोत.गावात जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, झेंडा चौक सुशोभीकरण,उर्दु शाळा खोल्यांचे बांधकाम  आदींद्वारे कोट्यवधी रुपयांची कामे केली. त्यासाठी  आजी-माजी जि. प.अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले व सौ. शालिनीताई विखे यांनी मोठी मदत केली.पुढील काळात १२ कोटींची पाणी योजना,५० लाखांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,२५ लाखांची अद्यावत जिम आणि कम्युनिटी हॉल, प्रवराकाठी पर्यटन विकास आदी प्रस्तावित कामांसाठी सहकार्य करण्याची विनंती आ. विखेंना केली.


गावातील विविध क्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सहकार क्षेत्रातील सुयश आणि कार्याबद्दल मान्यवरांचा विखेंच्या हस्ते गौरव करण्यात आला.


 यावेळी माजी सभापती दिपक पटारे यांनी विखेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच आमदारांना जमणार नाही असे काम नवलेंनी केल्याचा उल्लेख केला.सुनील मुथा यांनी दिवंगत खा. पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्याप्रमाणेच आपण बेलापूरकडे लक्ष देण्याची विखेंना विनंती केली. सरपंच महेंद्र साळवी यांनी स्वागत केले तर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक केले.गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथ्था यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन देविदास देसाई यांनी केले.


या प्रसंगी सर्वश्री नानासाहेब शिंदे, बाळासाहेब तोरणे,जि. प. सदस्या सौ. संगीताताई गांगुर्डे, गिरीधर आसने, गणेश मुदगुले, भीमभाऊ बांद्रे,अनिल थोरात,जालिंदर कु-हे,सुधाकर खंडागळे,भाऊसाहेब कुताळ, प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,रणजित श्रीगोड,सुवालाल लुंकड, कनजीशेठ टाक,पुरुषोत्तम भराटे, साहेबराव वाबळे,पोलीस पाटील अशोक प्रधान लहानुभाऊ नागले,गटविकास अधिकारी मच्छीन्द्र धस, उपअभियंता आर. एस. पिसे, शाखा अभियंता गोराडे, बेलापूर खुर्दच्या सरपंच सौ. वर्षा महाडीक, उपसरपंच अँड. दीपक बारहाते,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे, ग्रा. पं. सदस्य रमेश अमोलिक, चंद्रकांत नवले, मुश्ताक शेख, वैभव कु-हे,सौ. प्रियंका कु-हे,स्वाती अमोलिक, तबसुम बागवान, उज्वला कुताळ, मिना साळवी आदींसह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.


श्रीरामपुरात (प्रतिनिधी) येथील भारतीय लहुजी सेना च्या वतीने श्रीरामपुरात मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. सदर उपोषणास श्रीरामपुरात एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व  प्राथमिक शाळा आहे त्या शाळेत मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर शाळा ची वालकॅमपाऊड भिंत खचली व तुटली आहे, मुतारी व शौचालय नाही इत्यादी अनेक मागणी साठी आज आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. मा संजीवनदिवे गटशिक्षणाधिकारी व शाळा चे संस्थांचे प्रतिनिधी म्हणून आलेले मा गोरे सर मुख्याध्यापक यांच्या हस्ते मा हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय अध्यक्ष मा बाळासाहेब बागुल,रज्जाक भाई शेख  जिल्हा अध्यक्ष ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख, यांना लेखी आश्वासन  दिल्यानंतर व सर्व मागण्या त्वरीत पुर्ण करू आसे बोलल्या नंतर  उपोषण सोडण्यात आले.  सदर उपोषणास रिपई चे जिल्हा अध्यक्ष सुभाष ञिभोवन,आरपीआय जिल्हा अध्यक्ष संदीप मगर, सपा चे जिल्हा अध्यक्ष जोयब जमादार,सलमान पठान शिव स्वराज्य मंच  आदी पाठींबा दिला. उपोषण यशस्वी करण्यासाठी युसूफ शेख, सुभाष कुलकर्णी,  आमजत कुरेशी, सिकंदर भाई ताबोली, रमेश खामकर, चंदू पवार, मेहमूद पठान,  आदी कार्यकरते व पालक वर्ग उपस्थित होते.

श्रीरामपूर- लेखक डॉ सलीम सिकंदर शेख-दिव्य कुरआन मधे , "  आम्ही (अल - कुरआन ) ला कद्र च्या रात्रीत अवतरीत केले आहे (१)आणि , तुम्हाला काय माहीत की, " कद्र " ची रात्र काय आहे ???(२), कद्र ची रात्र हजार महीण्यांपेक्षा ही अधिक उत्तम आहे .(३), दुत ( ईशदुत) आणि रुह(जिब्राईल अलै.)त्यात आपल्या पालनकर्यांच्या आज्ञेने प्रत्येक आदेश घेऊन उतरतात (४), लैलतुल कद्र ची रात्र पुर्णतः " शांती  "आहे.. उषःकाला पर्यंत..(५)(  दिव्य कुरआन पारा ३० सुरह नं.९७ आ.नं.१ ते ५). 

# हजरत  ईबने अब्बास  म्हणतात , प्रेषित मुहम्मद सल्ल.  सांगितले  ," लैलातुल कद्र ची रात्र रमजान महीन्याच्या अंतिम चरणात येते ,अंतिम दहाची ,नऊ ,सात किंवा पाच रात्री राहिल्या तर  या रात्री येतात.(सहीह बुखारी २०२२).

हज.आयेशा रजि. प्रेषित मुहम्मद स्व.च्या पत्नी , सांगितले की," रमजानच्या अंतिम दहा रात्री जेंव्हा येत असत  , त्यावेळेस आम्हाला प्रेषित  स्व. स्वतः ड्रेस  परिधान करून, बरोबर घरातील सर्व मंडळींना  तीलावत , प्रार्थना  करण्यासाठी संपूर्ण रात्रभर जागवीत असत." ( सहीह  बुखारी २०२४).,

   रमजान महिन्यातील पुष्कळ  अद्भूत घटना घडलेल्या आहेत, पुराणां ,   इस्लामी इतिहासामधे बर्‍याच नोंदी आढळतात .

रमजान मुबारक मधील  २१ ,२३ ,२५ ,२७ , २९   ,३० ची "लैलतुल जायजा " या पवित्र कद्र च्या  रात्री येतात . यांचं महत्त्व  शब्दातीत आहेत , ते व्यक्त करता येत नाहीत.

## या प्रत्येक  कद्र च्या रात्र  रोजच्या  दैनंदिन  रात्री (पेक्षा १०००) एक हजार महीण्यांपेक्षा ही अधिक महिन्यांच्या  रात्रीपेक्षा  जास्त  सबाब ( पुण्यं) असते . 

फक्त याच रात्रींना " लैलातुल  -कद्र '" च्या पवित्र रात्रीं संबोधतात .

दिव्य कुरआन म्हणते की, " आम्ही या रात्र मध्ये  दिव्य कुराण ग्रंथ  पृथ्वीवर  तुमच्या मार्गदर्शनासाठी अवतरीत केला आहे ," "' आणि तुम्हाला काय माहीत की ही रात्र काय असते  ",  "  तुम्हाला कधी या रात्रीचे महत्त्व जाणाले.", "तर तुम्ही स्तब्द व्हाल ,व तुम्हाला भान राहणार नाही ," (सुरह नं.९७ आ.नं.१-ते - ५)

या कद्र च्या रात्रींच  महत्त्व आहे . 

अशाच प्रकारे संपूर्ण वर्षभर ,,(१)  ईदु आजहा( बकरी ईद) रात्र(२) ईदु ल फितत्र ( रमजान ईद) रात्र ,.(३)मोहरमची आशुरा १० वी रात्रीं चे महत्वही  काही औरच सांगितले आहे. 

  # यांमध्ये कोणती रात्र  महत्त्वाची आहे , हे तज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत . कारण अल्लाह (ईश्वरा)ने या दिव्य  कद्र च्या रात्रींचं  गुपित ठेवलं .

      कुरआन म्हणते की ," जे समोर आहे आणि जे काही गुपित आहे या सर्वांचे ज्ञान फक्त(ईश्वर),अल्लाहाकडेच आहेत ,  व आपल्या ज्ञानाच्या मर्यादा ,फक्त तो पर्यंत मर्यादित आहे , जे (ईश्वराने) अल्लाहाने माणसाला प्रदान केलेले आहेत किंवा देवु  इच्छितो , या रात्रीचे  ज्ञान फक्त आल्लाहाने (ईश्वराने )आपल्या जवळ ठेवले आहेत  ".

                      मानवाला , दुआ ,नमाज , कुराण पढण करून ,नामस्मरण करून,  दया ,याचना करून .  कद्र ची रात्र  तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे शोधण्याचा प्रयत्न करा.

      (# @  काही तज्ञांनी ,एक हजार (१०००) महीन्यांच्या दिवसानुसार फक्त एका रात्रीत ,# किती -सेकंद ‌,#किती - मिनिटे, # किती -तास , # किती -दिवस, # किती- वर्षांची ईबादत ,बंदगी,होते त्यांची गोळा बेरीज केली .# एक १ सेकंद = २३ तास ईबादत , # १ एक मिनिट = ५८ दिवसांची ईबादत , # एक तास = ९ -८ वर्षे  ईबादत ,#  शेवटी एक रात्र = ८३ वर्षे (त्रेयांशी वर्षे) इयर्स , ईबादत ,बंदगी ( पुजा ) होते ..एवढी मोठी महत्वाची लैलतुल -कद्र च्या फक्त एका रात्रींचं  ##).

            # प्रेषित मुहम्मद स्व. सांगितले की, '' लैलतुल-कद्र 'च्या रात्री आल्लाह  शेवटच्या सातव्या आकाशावर  येऊन पृथ्वी तलावरील प्राणीमात्रांना व माणसांना आव्हान करतात की ,,

"" कोण आहे जे माझ्याकडे दयेची याचना करतोय की मी त्याला दया ,देईल , दाखवील '" 

 "  कोण आहे , जो करूणेची भिख मागेल ,मी त्याला करूणेची भिक देईल ", 

 " कोण आहे ,जो आपल्या केलेल्या लहान-मोठ्या पापांची क्षमा याचना मागतोय , की मी त्याला क्षमा देईल " ,

  "  कोण आहे ,जो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून माझ्याकडे मागणं मागतो मी , त्या सर्व मनोकामना पूर्ण करील ". "  सर्वांना मनोभावे माफी देईल."...

#  पुन्हा प्रेषित मुहम्मद स्व म्हणतात की,"  या लैलतुल-कद्र च्या रात्री आल्लाहा  दोन्ही हात मोकळे करून मानव जातीस अव्हान करतात  की  , "   कोण आहेत जो एक आशा आल्लाहाला कर्ज दिईल की ,जो दरिद्री नाही व अत्याचारी  तर नाहींच ,''

                 आल्लाहाचे ( ईश्वरा)हे सकाळी भोर पहाटेपर्यंत आव्हान हे , क्षमा, दया, करुणा,बक्षिसे, देण्याचे काम चालूच असते, 

पण आपणाला त्या आव्हानांची फिकीर नसते ,आपण मस्तावलेले ,सुस्तावलेले झालेलो असतो ,  विचार करण्याची मानसिकताच नसते ,

# आल्लाहाला  काय गरज कर्जाची. जशी आपली आई जेव्हा आपल्याकडून काही अपेक्षा करते व आपल्याला याचना करते की मला काहीतरी दे अगदी त्याचप्रमाणे आल्लाहा ही आपल्याला आपल्या आईप्रमाणे जाणून-बुजून आपल्याला कर्ज मागतात ( गरीब ,अनाथ ,विधवा , भुकेल्या यासाठी) आपली परीक्षा घेत असतात .त्यांना काय घेणं परंतु आल्लाह कृपावंत ,दया , देणारे . कायम आपल्याला काहीतरी देतच असतात , आपल्या इच्छांची पूर्तता करत असतात. 

संपूर्ण मानवजातीने , प्राणिमात्र व जीवजंतू हे अल्लाहाचे‌ ,त्यानेच‌ निर्माण केलेले .सर्व जगात जगाने  कितीही मागितले तरी ,  अथांग महासागरात समजा ऐक सुईच्या टोकाला जेवढे थैंब येतील तेवढे व कणभरही कमी होणार नाहीत येवढी लिला एकठ्या अल्लाहा ( ईश्वराची )आहेत.

 कृपावंत ,दयावंत सृष्टीचा  स्वामी देणाराआहेत .

परमेश्वर आपल्याला  जेवढे योग्य  व कुवती, सहनशक्ती प्रमाणेच देतात . 

अल्लाह  परमदयाळू  ,कृपावंत आहे ,ते अत्याचारी तर ते नाहीत .

 ‌‌   # हजरत आयेशा रजि.म्हणतात की ," आपण केलेल्या सर्वप्रथम पापाची क्षमा मागा कारण आपल्यासाठी तेच महत्त्वाचे आहेत ".

आज संधी आहे  , सेकंदा -  ला २३ तास , मिनिटाला ५८ दिवस ,व १ तासाला ९ वर्षे , विचार करा किती ईबादत बंदगी करुन  फायदा उचलण्याचा ,, अजुनही वेळ गेलेली नाही...उचला फायदा......

लेखक डॉ सलीम सिकंदर शेख

 

श्रीरामपूर-लेखक डॉ.सलीम सिकंदर शेख -साठी जकात अनिवार्य (कंपल्सरी) केलेली  आहेत. ज्यांच्याकडे  वर्षभर साडे बावन ५२.५ तोळे चांदी (सिल्व्हर) व साडेसात ७.५ तोळे सोने (गोल्ड) किंवा त्यांच्या किंमती एवढी रक्कम घरामध्ये वर्षभर वर्षातील सर्व गरजा भागून राहिलेली शिल्लक रक्कम वर २.५% (अडीच टक्के रक्कम) म्हणून ' जकात अनिवार्य (कंपल्सरी) केले आहेत.

जकात,घामाच्या, मेहनतीच्या,

कष्टाच्या किंवा चांगल्या कर्माच्या पैशातूनच दिली जाते,घेतली जाते.

 एक विशेष गोष्ट म्हणजे मस्जिद बांधण्यासाठी जकातीचा पैसा चालत नाही. मस्जिद बांधकाम हे लोकांच्या कष्टाच्या मेहनतीच्या, घामाच्या स्वखुशीने दिलेल्या पैशातूनच पवित्र मस्जिद चे काम (करतात) चाललेले असते व मजुरीचा खर्चही त्याच पैशातून भागवला जातो,कारण जकातीचा पैसा समाजातील पीडीत,गरीब, गरजुंसाठी आल्लाहाने वेगळाच ठेवला आहे.परंतु आजकल काही मुस्लिमद्वषी मिडियाने इस्लाम धर्माला काही खोट्या-नाट्या कुभांडांद्वारे इस्लामवर अनेक चुकीचे  दोष लावत या चांगल्या धर्मासही चुकीची वेगळीच ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे,मुस्लिमाबद्दल खोटं दाखवुन द्वेष पसरविण्याचे काम काही प्रसार माध्यमांतून चालू आहेत.

पवित्र कुरआन मध्ये सांगितले की ,"१) लाच घेतलेला व अवैध  मार्गाने केलेल्या कोणत्याही कब्जाचा पैसा ,(सु.नं.२ अल- बकराह अ.नं१८८) 

२) बेईमानीने ,बेकायदेशीररित्या कमावलेला पैसा (अल-ईमरान)

३) मूर्ती बनवणारा व मूर्तीचा धंदा करणारा,मूर्ती विकणारा याचा पैसा.(अल-मायदा.अ.नं.९०)

४) चोरी करणारा,चोरी करून त्याचा माल विकणारा,चोरीला सहकार्य करणारे,चोरीचा पैसा गडप करणाऱ्या (अल-मायदा अ.नं.३८)

५) दुकान व व्यावसायिक मापात मध्ये कमी जास्त प्रमाणात  घोटाळा केलेला पैसा चालत नाही.(अल-ततफीक नं.१३)

६) अनाथांचा मालामधुन पैसा कमावणारे व अनाथांचा माल गडफ करणाऱ्या लोकांचा.(अल-निसा अ.नं१)

७) अचानकपणे कमावलेला पैसा,धन लाभ,उदाहरणार्थ जुगार,सट्टा,मटका,लॉटरी, कमाईतून आलेला पैसा.(अल-मायदा अ.नं.९०)

८) दारूचा पैसा,दारु दुकानदार, दारु बनवणारा,दारु विकणारा, दारुचा धंदा करणारा,दारुच्या धंद्याला मदत करणारा यांचा पैसा .(अल-मायदा.नं.९०)

९) अश्लीलता आणि वेश्या व्यवसाय किंवा वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देणारा किंवा नाच-गाणे तमाशा डान्स बार इत्यादींचा पैसा चालत नाही .(अल-नूर.अ.नं.१९, ३३)

१०)ज्योतिष व्यवसाय,भविष्य वर्तवणारे,गैरकारभार करणाऱ्यांचा पैसा चालत नाही (अल-मायदाअ.नं. ९०)

(११) यांच्या व्यतिरिक्त पैशासाठी गडगंज संपत्ती गोळा करून घरातच साठवून ठेवणारे याला कंजूस म्हणतात आशांसाठी सक्त मना (मनाई)  केलेली आहेत,(सुरह अल-फुरकान अ.नं.६७),

(१२) भरपूर गडगंज पैसा कमावून घरी साठवून ठेवण्याला इस्लामने हराम ठरवलेले आहे. (अत-तौबा अ.नं.३४).

(१३) फिल्मवाले,चुकीचे कृत्य करणाऱ्या पासून जकात बिलकुल घेतली जात नाही.अशा लोकांनी स्वतःहून जकात म्हणून देवु नये कारण काही लोकांना याचे ज्ञान, माहीती नसते.#इत्यादींकडुन जकात चालत नाही व घेतलीही जात नाही,विशेष म्हणजे आशा लोकांनी जकात देऊ देखील नयेत.

## जकात कोणकोणासाठी चालते आणि कोणासाठी खर्च करावा :- --

१) आई वडील, नातेवाईक, अनाथ,पीडित शेजाऱ्यावर खर्च करावा.(अन-निसा अ.नं.३६)

२)  निराधार , अपंग लोकांवर खर्च करावा (अल-जारियात अ.नं.१०)

३) कर्ज देणे. बिगर इंटरेस्ट (बिन व्याजी) कर्ज  देणे.(कर्ज.हसना (विना व्याजदर) म्हणून देऊ शकतात),

(इस्लाममध्ये कर्ज देणे व घेणे दोन्ही निषेध आहेत, (अल-बकराहा अ.नं.२८).

 ४) जकात आदा करणे (अल -तौबा १०८)५) सदकात.आदा करणे अल-तौबा अ.नं १०८) 

जे लोक पीडित आहेत,एखाद्या नैसर्गिक आपत्तीने,भूकंपग्रस्त, धरणग्रस्त,त्सुनामी,एखादे जीवघेणे साथीचे आजार, दुष्काळी परिस्थिती,संकट परिस्थिती,इत्यादी संकटाने पीडितांसाठी,अनाथांच्या भल्यासाठी,विधवांच्या उद्धारासाठी व विधवांच्या मुलाबाळांच्या सांभाळ करण्यासाठी,.गरीब लोकांच्या उद्धारासाठी जे गरीब आजारी आहेत व ज्यांच्यामध्ये आजारपणाचा उपचारासाठी पैशाच नाहीत,ज्याच्याकडे हॉस्पिटल बिल भरण्याची ऐपत नाही अशांसाठी,ज्याचे कर्जदारांचे कर्ज आहे,.कर्ज भरण्याची ऐपत नाही अशांसाठी व गरीब घरातील मुलां-मुलींचे लग्न करण्यासाठी व त्यांच्या संभाळ करण्यासाठी , # विशेष ,माणूस कितीही मोठा असला तरी तो एखाद्या वेळी संकटात सापडलेल्या असतो व आशा वेळी कोणाकडूनतरी कर्ज घेतलेले असते,म्हणून ते कर्ज  फेडण्यासाठी जकातीचा चांगला उपयोग होतो.

भारतामधे इस्लामी शिक्षणासह विविध प्रकारच्या शाळा चालवली जातात .

            # त्या शाळांना मदरसा म्हणतात # 

आपल्या काही मुस्लिम विरोधी भारतीय सोशल मिडिया आणि काही ठराविक प्रसार माध्यमांमध्ये मुस्लिम समाजासह त्यांच्या मदरशांबददल गैरसमज पसरवून सामाजाची दिशाभुल केली जाते,मात्र सत्य वास्तविकता ही वेगळीच आहे, मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना अरबी,उर्दू भाषेत,शिक्षण दिले जातात,त्यांना देशभक्ती व  इस्लामी शिक्षण व ज्या राज्यांंच्या कायद्यानुसार स्थानिक पातळीवरील शिक्षण दिले जातात,.आशा मदरशांची व्यवस्था व बांधकाम करण्यासाठी विनीयोग करण्यात येतो.सोबतच जागोजागी शाळा-कॉलेज चालवली जातात त्यासाठी, त्यांच्या वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्यांना जेवण वगैरेसाठी.

गरीब मुलींच्या विवाहासाठी. पीडित व अनाथ मुलांच्या सर्व गरजेसाठी जकातीचा वापर करतात.

# जगातल्या बहुतेक  राष्ट्रांमध्ये व भारतामध्ये सुध्दा आरबी मदरशांना कुठलेही सरकारी अनुदान देत नाही.दिलेही जात नाही. सरकारने कोणत्याही मदरशांना अजून अनुदान दिलेले नाहीत.हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे ,असो.

परंतु काही ठराविक प्रसार माध्यमांमध्ये मुस्लिम विरोधी  गैरसमज पसरवले जातात की सरकारकडून मुस्लिम मदरशांना मुबलक प्रमाणात सरकारी अनुदान दिले जाते. हे चुकीचे आहे.

 आज लाखो अरबी मदरशांमध्ये शिक्षणाबरोबरच गरीब,अनाथ, विधवा,तथा मुलांसाठी वस्तीगृह व जेवणा - खाण्याची सोय करून त्या बरोबरच अनाथ, गरीब, विधवा,मुलां- मुलींच्या विवाहसाठी मदरशांमधे सोय केली जाते,अशामध्ये जकातीचा वापर केला जातो.भारतात देवबंद सारखा एक लाख मुलं (विद्यार्थी)  असलेला मदरसा सहारनपुर मध्ये आहे,व  भारतात असे खुप गरीब मदरसे आहेत ज्यांचा खर्च , होस्टेल , जेवणाची व्यवस्था सह लाखोंनी-कोटींनी असतो,  सर्व जकातीच्या माध्यमातून  चालवला जातो . त्यामध्ये अलिगड मुस्लिम  युनिव्हर्सिटी, दिल्लीतील हमदर्द युनिव्हर्सिटी,मौलाना आझाद युनिव्हर्सिटी असे जगात नावाजलेले  शिक्षण संस्था, युनिव्हर्सिटी व मदरसे‌ भारतात  चालू आहेत ‌.परंतु त्या नावाजलेले मोठमोठाल्या विद्यापीठांचा खर्च स्वतःच्या व्यवस्थापकीय पध्दतीने ,व काही जकातीच्या माध्यमातूनच चालतो,त्यामध्ये गरीब अनाथ विधवांचे मुलं वस्तीगगृहामध्ये  असतात व त्यांच्या पुस्तकांचा, कपड्यांचा खर्च मोफत ,मोफत हे  कॉलेज,विद्यापीठे ,मदरसे करतात त्यासाठी जकातीचा सुयोग्य वापर केलेला असतो.

 ## मदशांमधुन  :- समाजामध्ये कसे वागावे हे वास्तविक पाहता शिकलेली गरीबांची गरीब मुलं भारताच्या  व जगातील विविध ठिकाणी नोकरी करुन आनंदाने आपले जीवन व्यतीत करतात.याच जकातीच्या पैशांद्वारे दुष्काळी परिस्थितीत, नद्याच्या पुरग्रस्त परिस्थितीत, समाजोपयोगी उपक्रमाला हसत हसत मदत होईल म्हणून बरीच लोकं तिथे जाऊन जकात देत असतात..पाणी,अन्नधान्य पुरवणं. आपात्कालीन पुर परस्थितीत नद्या-नाल्यांच्या पुरामधे कोणी वाहून जात असेल तर मदशातील मुलं त्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उडी मारून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ सबाब,(पुण्यंच) काम म्हणून समोरच्या पीडीत व्यक्तीला वाचवतात हे अनेक ठिकाणच्या पुरग्रस्त ,करोना मधे ,व विविध ठिकाणच्या आपत्ती निवारण करण्याच्या ठिकाणी बघायला मिळालं ..

आशा जकातीच्या पैशांच्या माध्यमातून विविध गरजूंना मदत व  समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

औरंगाबाद : मुस्लिमधर्मियांना इतर धर्मियांपासून धोका असल्याने भविष्यात हिंसक कृती करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या घरगुती वस्तूंचा साठा करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन व्हिडीओच्या माध्यमातून करणाऱ्या ‘ तहफुझ ए दीन इंडिया’ या यु ट्यूब चॅनलचा निवेदक (अँकर) आणि यु ट्यूब मालकाविरोधात शुक्रवारी पोलिसांनी सायंकाळी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.अँकर सय्यद फारुक अहमद आणि यु ट्यूब मालक कारी झियाउर रहमान फारुकी, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन समाजात जात, धर्मावरून तेढ, वाद निर्माण होईल, अशा प्रकारची पोस्ट, व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमावर टाकणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या पाेस्ट समाजमाध्यमावर टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलिसांचे पथक सोशल मीडियावर नजर ठेवून आहे. ‘ तहफुझ ए दीन इंडिया’ या यु ट्यूब चॅनलच्या व्हॉटस् ॲपवर आलेल्या व्हिडीओमध्ये निवेदक सय्यद फारूक अहमद याने शस्त्रासारखा वापर करता येऊ शकतो, अशा घरगुती वस्तूंचा साठा करण्याचे अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले. दोन समाजात, धर्मात जातीय तेढ निर्माण होईल, यादृष्टीने हा व्हिडीओ तयार करण्याचा इशारा देण्यात आला होता. या व्हिडीओचा उद्देश पोलिसांच्या लक्षात येताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, सहायक आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौतम पातारे, सहायक निरीक्षक काशिनाथ महांडुळे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, उपनिरीक्षक राहुल चव्हाण आणि सोशल मीडिया टीमने या ट्युब चॅनलचे कार्यालय, निवेदक आणि मालकाला शोधून काढून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात उपनिरीक्षक चव्हाण यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.

अहमदनगर प्रतिनिधी-प्रार्थना सुरू असताना मोठ्या आवाजात गाणे लावू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने दोघांनी तलवार दाखवून धमकावत शिवीगाळ केल्याची घटना शहरातील लालटाकी परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.उबेद सलीम सय्यद (रा. मिसगर कॉलनी, लालटाकी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शग्या ऊर्फ विशाल खंडागळे याच्यासह एका अल्पवयीन मुलाविरूध्द आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडागळे याला अटक केली आहे. फिर्यादी सय्यद हे त्यांच्या सहकार्‍यांसोबत धार्मिकस्थळी प्रार्थना करत असताना आरोपी बाजूला असलेल्या मिसगर कब्रस्तानमध्ये मोबाईलद्वारे ब्लू टूथ स्पिकरवर मोठ्या आवाजात गाणे वाजवत होते. यावेळी सय्यद व त्यांच्या सहकार्‍यांनी तुम्ही मोठ्याने गाणे वाजवू नका, प्रार्थना चालू आहे, असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी तलवार दाखवून शिवीगाळ केली. दमदाटी करत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, अंमलदार दत्तात्रय जपे, शकील सय्यद, भास्कर गायकवाड, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, शिरीष तरटे, गौतम सातपुते आदींच्या पथकाने लालटाकी, सिद्धार्थनगर परिसरात रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील हत्यारही जप्त करण्यात आले आहे.



मक्का मधे प्रेषित , पैगंबर , झाल्यानंतर ११ वर्ष असताना , ईस्लाम विरोधी लोकांनी प्रेषित मुहम्मद स्व. व त्यांच्या सहकारी मित्रगण (सहाबा रजि.). ईस्लामच्या अनुयायींना साथ देईल,सहकार्य करील आशा लोकांचा छळ करुन त्रास दिला जात असे,तरीही त्रास सहन करूनही  पैगंबर मुहम्मद स्व. संयमाने,विवेकाने,शांतपणे अल्लाहाच्या एकेश्वरवादाचा ,सत्य धर्माचा प्रचार व प्रसार शांततेने करीत असत,त्यांच्या व जे एकेश्वरवादाचा प्रसार करीत होते ‌त्यासर्वांवर तीन वर्षापर्यंत सामाजिक व आर्थिक  बहिष्कार टाकला गेला. त्यांचं जीणं, खाणं - पिणं मोठं मुश्किल (अवघड) होतं. तीन - तीन दिवस फक्त खजुरांवर त्यांचं जींणं चालू असत, कित्येक लहान मुलं,महीला, किती दिवस अक्षरशः उपाशीच झोपलीत,माणुसकीची परीसीमाच राहीली नव्हती, छळाची परमोच्च बिंदू गाठलं, शेवटी प्रेषीतांची हत्या करण्याचे कट कारस्थान रचुन , प्रत्येक कबील्यांतुन एक तरुणांची निवड करुन घेरावही करण्यात आला. मात्र ते या कटातून सही सलामत बाहेर आलेत,ही अल्लाहा (ईश्वरा) कडून त्यांची परीक्षाच होती.

शेवटी अल्लाहाच्या ईशवानीच्या आज्ञेनुसार प्रेषित स्व.यांनी सर्वांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून मदीनेला " हिजरत " करण्याचा निर्णय घेतला ,१६ जुलै ६२२ रोजी मध्यरात्री हज. अबु- बकर रजी., हज.उमर रजी.बरोबर घेत हिजरत केली.

"'हिजरी - साल वर्षे " याच घटनेमुळे इस्लामी (हिजरी सन) वर्षाची सुरुवात झाली,हिजरत नंतर मदीना व आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी इस्लामच्या सत्यधर्माचा प्रचार - प्रसार झाला व होत होता. लाखोंच्या संख्येने लोकं इस्लामच्या सत्य धर्म  स्विकारीत होते,मदीनामधेही मक्का येथील अरबी लोकांचं प्रेषितांना व त्यांच्या अनुयायांना (सहाबा) त्रास देणं चालूच होतं. मधल्या काळात मक्का येथील अरब लोकं व प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या अनुयायांमधे  वारंवार रक्तरंजित संघर्ष घडत होतं,बरेच मोठ - मोठी युद्ध झाले होते .

हे वारंवार होऊ नयेत म्हणून  प्रेषितांनी जगप्रसिद्ध तह केला. यास इस्लामी इतिहासात खुप महत्वाचे स्थान आहे,यालाच " सुलह हुदैबीया" असे म्हणतात .

तहाची मर्यादा दहा १० वर्षांची होती, दोन्ही बाजूंनी बऱ्याच अटी ठरलेल्या होत्या,परंतु जास्त अटी या विरोधी मक्कावासींया कडून‌ लादलेल्या होत्या,एवढे असूनही प्रेषित मुहम्मद स्व. विरोधकांच्या प्रत्येक अटीला मान्यता देत होते व देण्यात आल्या देखील. (घटना मोठी आहे,  असो .) थोड्याच दिवसांत  प्रसिद्ध हुदैबिया कराराच्या उल्लंघनाची सुरुवात विरोधी मक्कावासी आरबां कडुन झाली व  वारंवार होत होतं. त्रासाला कंटाळून शेवटी हजरत  प्रेषीतांनी इस्लामी योध्दयांना घेऊन मक्का कुच करण्याचा निर्णय घेऊन दहा हजार योध्दांबरोबर कुच केली.            मक्का पोहचल्यावर तेथील प्रत्येक माणूस घाबरून जाऊन ज्याला जेथे जागा मिळेल , तिथे तो लपून बसतं,तर कोणी पळून जात होता.जिवाच्या भितीने सर्वच सैरभैर झाले होते,   कारणही तसे महत्वाचे होते,त्यांनी प्रेषित मुहम्मद स्व.व त्यांचे मित्रगण (सहाबा रजि),अनुयायांना दिलेल्या त्रास,आतोनात छळ, वेदनाला,खुनी संघर्ष,या छळाचा बदला घेण्यासाठी आलेत असे वाटत होते, कदाचित फाशी देतील,आज बदल्याचा दिवस असणार ई. प्रत्येक लहान - मोठे अक्षरशः ‌धास्तावले होते ,हा विचार विरोधी लोकांना येणं साहाजिकच होते कारणंही तसेच होते,प्रेषित आणि त्यांचे अनुयायी (सहाबा रजि.) कितीही शांत, न्याय करणारे ‌असले तरी विरोधकांच्या मनात असा विचार येणे तसे स्वभाविकच होते,कारण विरोधकांकडून त्यांना तेवढा आतोनात त्रासच ‌दिला गेला होता, कोणत्याही सद्गृहस्थाने त्याना कधीच केव्हाही कोणत्याही परिस्थितीत माफ केलेच नसते व ते माफीचे लायकही नव्हतेच.


असं म्हणतात की "ज्यांच्या जवळ शक्ति,ताकत,सैनिक असूनही जो समोरच्या कट्टर शत्रुंना शरण देतो,माफी देतो,क्षमा करतो तो मनुष्य सर्वाधिक श्रेष्ठ असतो"

                    एका घटनेचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो,उहुदच्या प्रसिद्ध लढाईमधे प्रेषित मुहम्मद स्व. यांच्यावर अत्यंत ह्रदयाने प्रेम करणारे त्यांचे चुलते हजरत हमजा रजि.हे लढाईत शहीद (हुतात्म्या) झाले,विरोधी  प्रमुख सरदार अबु सुफीयान याची पत्नी 'हिंदा"ही पैगंबरांबद्दल वैरभाव बाळगत होती,याच वैरभावापोटी "हिंदा" हिने हजरत हमजा रजि. यांचे काळीज फाडून बाहेर काढुन चावुन खाल्ले,  नाका-कानांचा हार करुन गळ्यात घालण्याचे क्रौर्य केले,  पैगंबरांच्या मक्का विजय प्राप्त केल्यावर "हिंदा" हिने आपली ओळख  न पटावी यासाठी आपल्या चेहऱ्यावर पडदा टाकला होता,  तरी ती सार्वजनिक क्षमादानात  जीव वाचवण्यासाठी  सामील झाली. परंतु पैगंबरांनी तिला ओळखळे  , काका हज. हमजा रजि. यांच्या हत्यासंदर्भाचा मुळीच उल्लेख न करता , मोठ्या मनाने क्रुर हिंदा ,ही क्षमा दिली ,. 

" हिंदा, जा ,  आज,  तुला सुध्दा माफी" 


त्यांचे रक्ताचे वैरी आशा सर्व दुश्मनांना  प्रेषित मुहम्मद स्व. यांच्याजवळ आज सर्व लष्करी ताकत,सत्ता असताना,  ते काहीही करू शकले असते,  परंतु त्यांनी एका झटक्यात उदारमनाने,उदराता दाखवून त्या अल्लाहा  (ईश्वरा) च्या शांतीदुताने  कधीच घडले नव्हते असं , न्यायदानाचे,क्षमाशीलतेचे जगात एकमेव उदाहरण  क्षमा,माफी. अमन,(शांती) दिली,

मक्केच्या पवित्र खाना -ए- काबागृहाच्या जवळच घोषणा दिली गेली की , ""  कोणावरही सुड उगविण्यात येणार नाही . ,

 जुलम करण्यात येणार नाहीत . ,

       कोणाचाही कत्ल (हत्या - खुन) करण्यात येणार नाही,

               कोणाचाही बदला घेण्यात येणार नाही .,

          जे आपआपल्या घरात आहेत,    त्या सर्वांना माफी, अमन देण्यात आले आहेत .,

            जे तलवार उचलणार नाही,त्या सर्वांना माफी अमन,सर्व लोकांना, नागरिकांना माफी देण्यात येत आहे. ,

                मात्र विरोधकांना वाटले की असे कसे घडत आहे ???   आपण केलेल्या कृत्याची शिक्षा ही तर फक्त फाशीच होती .,

मग हे ..फक्त माफी ? ..हे शब्द ऐकून कसं वाटलं असेलं त्यांना.

परंतु प्रेषित मुहम्मद स्व . यांनी हे करून दाखवले..


तो दिवस ‌२१ रमजानुल मुबारक.०८  हिजरी. .

आज  २१ रमजान .१४४३ हिजरी आहेत..

  प्रेषित मुहम्मद स्व.म्हणतात की,"'  ज्यांच्या जवळ शक्ति असूनही , जो बदल्याची भावना जोपासत नाही, सर्वांना माफ करतो,क्षमाशील असतो तोच माझ्या जवळ आणि मला प्रिय असतो तथा तोच सर्वात मोठाही असतो,कारण तो मोठ्या मनाचा असतो, अल्लाहाला (ईश्वराला) माफ (क्षमा) करणारे लोकं पसंद ((प्रिय) आहेत."लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर.९२७१६४००१४ 


#@#स @ @ ली@म@

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget