Latest Post

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा उम्मती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोहेलभाई दारुवाला यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजातील उपेक्षित घटकांना अन्नधान्य किटचे वितरण करत त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी श्रीरामपूर नगर पालिकेच्या मा.उपनगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,माजी उप नगराध्यक्ष हाजी अंजुमभाई शेख,अॅड.जयंत चौधरी,शहर काझी मौलाना अकबरअली सहाब,मा.नगरसेवक हाजी मुख्तारभाई शेख,राजेश अलघ, रविंद्र गुलाटी, कलिम कुरेशी, साजिद मिर्झा,रर्ईस जहागीरदार, अल्तमश पटेल, लड्डू शेख सर, शौकत शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

"जो निर्पेक्षतेने समाजाची सेवा करतो,उपेक्षित आणि रांजल्या- गांजल्या गोर-गरीबांच्या सुख: दुःखात नेहमी अग्रक्रमाने धाऊन येतो तोची खरा समाजाचा खरा समाजसेवक असतो" सदरील वाक्य हे सोहेलभाईंचे निर्पेक्ष कार्य आणि समाजसेवेप्रसंगी तंतोतंत खरे ठरते,

श्री.सोहेलभाई यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही बडेजाव न करता केक सेलिब्रेशन पटाखे,ढोल,ताशे,डिजे या सर्व बाबींना फाटा देत,आपणही समाजाचे काही देणे लागतो केवळ हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन परिसरातील उपेक्षित आणि गरजु समाज घटकांना अन्नधान्य किटचे वाटप करत एका अनोख्या पद्धतीने उम्मती फाऊंडेशनतर्फे हा वाढदिवस साजरा करण्यात आला,

तसे वर्षाच्या बाराही महिने उम्मती फाऊंडेशनतर्फे विविध सामाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवली जातातच,मागे कोरोना महामारी काळात उम्मतीतर्फे परिसरातील उपेक्षितांना घटकांना अन्नधान्य किट,किराणा किट, औषधोपचार,सोबतच सातत्याने विविध आरोग्य शिबीरे आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सामाजाची सेवा ही उम्मतीतर्फे अखंडित आणि अविरतपणे चालुच असते,खरेतर इतरही सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी उम्मती फाऊंडेशनच्या कार्यांचे अनुकरण करत त्यांचा आदर्श घ्यावा असे उपस्थित सर्वच पाहुणे मंडळींनी यावेळी बोलुन दाखविले तथा सोहेलभाईंनी आता राजकारणात यायला हवे यामुळे त्यांच्या सामाजिक कार्यांना अधिक बळकटी प्राप्त होऊन आधिकाधिक उपेक्षित घटकांच्या अनेको समस्यांचे निराकरण होणेकामी मोठी शक्ती प्राप्त होऊ शकेल असेही याप्रसंगी हाजी अंजुमभाई शेख म्हणाले.

याप्रसंगी अॅड.आरिफ शेख, अॅड.मोहसिन शेख,तौफिक शेख,रि.पोलिस जमादार इब्राहिमभाई शेख,मुद्दस्सिर शेख,जाकीर शहा,अकबर शेख,शहानवाज दिलावर सर, महेबुब शहा,आदी मान्यवर उपस्थित होते,

या प्रसंगी समाजातील उपेक्षित घटक असलेल्या परिसरातील गरजु अनेक नागरीकांनी लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उम्मती फाऊंडेशनच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

श्रीरामपूर प्रतिनिधी - बहूजन समाजाचे प्रेरणास्थान असणाऱ्या हजरत टिपू सुलतान यांचा अवमान करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यासाठी व सामाजिक, धार्मिक सलोखा बिघडवलेवरुन गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई करणेसाठी बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा आदी समविचारी पक्ष व संघटनांनी गांधी पुतळ्यासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांमार्फत फडणवीस यांच्यावर कारवाईची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांंच्याकडे केली.निवेदनात म्हंटले आहे कि, आपल्या महाराष्ट्र राज्याला सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचा व गौरवशाली इतिहासाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. विद्यमान राज्य विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांचेबाबत अवमानकारक वक्तव्य करून समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. अशोभणीय कृत्य करुन देवेंद्र फडणविस हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे तसेच धार्मिक दृष्ट्या वातावरण कलुषित करून हिंदू-मुस्लिम असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हजरत टिपू सुलतान यांच्याविषयी त्यांनी केलेले वक्तव्य हे बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत.वास्तविक पाहता हजरत टिपू सुलतान हे मुलनिवासी बहुजनांच्या हक्क अधिकारासाठी लढणारे योद्धे होते. हजरत टिपू सुलतान हे हिंदु विरोधी किंवा बहुजन विरोधी नव्हते. त्यांनी १५६ हिंदु मंदिरांना मदत केलेली आहे. शृंगेरी मंमठावर सांगलीच्या पटवर्धनाने व्यक्तीने हल्ला केला होता तेव्हा तो मठ वाचवण्यासाठी हजरत टिपू सुलतान यांनी मदत केली होती. हिंदू महिलांना कमरेच्या वरती वस्त्र घालण्याचा अधिकार तत्कालीन कर्मठांनी नाकारला होता. तो अधिकार मिळवून देणारा एकमेव राजा हजरत टिपू सुलतान होय. हजरत टिपू सुलतान यांच्या सैन्यात ६० टक्के हिंदू सैन्य होते. यावरून असे सिद्ध होते की टिपू सुलतान हे हिंदू विरोधी किंवा हिंदूंचे दुश्मन नव्हते हा इतिहास आहे. जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल होऊन उचित कारवाई करण्यात आली नाही तर येणाऱ्या काळात मोठ्या स्वरूपात राज्यव्यापी व राष्ट्रव्यापी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व यातून राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हंटले आहे.यावेळी बहुजन क्रांती मोर्चा संयोजक आर एम धनवडे, बहुजन मुक्ती पार्टी सुरेश चौदन्ते, जिल्हाध्यक्ष दिलीप बदधे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे डॉ. हमीद शेख, एम. एम. पठाण, रियाज अन्सारी, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे कर्डक, एमआयएमचे आदिल मखदुम, सजिद मिर्झा, डॉ. अशोक शेळके, संतोष गायकवाड, प्रमोद शेळके, राजू लोंढे, सुरेशचंद्र भोसले, पंडित पगारे, सुनील गाडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- रासायनिकच्या अति वापरामुळे शेत जमीनीचा पोत खराब होत चालला असुन नापीक होत चाललेल्या जमीनी सुपीक होण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अंगीकार करणे गरजेचे आहे असे मत माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पा .यांनी व्याक्त केले बेलापुर तालुका श्रीरामपुर येथील पत्रकार देविदास देसाई यांच्या साँईल चार्जर टेक्नाँलाँजी या सेंद्रिय खत व वैदीक औषधाच्या दुकानास आमदार राधाकृष्ण विखे पा यांनी भेट दिली त्या वेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की रासायनिक औषधाचा  वापर

वाढला आहे जमीनी नापीक होत चालल्या आहेत तसेच रासायनिक फवारणी केलेल्या शेतमालामुळे आपले आरोग्य देखील बिघडले आहे जास्त उत्पादन घेण्याच्या नादात रासायनिकचा वापर वाढत चालला आहे कसदार व विषमूक्त अन्न  पिकविणे आता गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीची कास धरावी असे अवाहनही आमदार विखे पा .यांनी केले आहे या वेळी जि प सदस्य शरद नवले माजी सभापती दिपक पटारे माजी सभापती नानासाहेब पवार संचालक मुक्ताजी पटांगरे सुधीर नवले  राधाकृष्ण आहेर कैलास बोर्डे उपसभापती नितीन भागडे उपसभापती तोरणे नाना शिंदे गिरीधर आसने विश्वनाथ मुठे डाँक्टर आसने  भास्कर कोळसे अकबर टिन मेकरवाले आदिसह नागरीक उपस्थित होते पत्रकार देविदास देसाई यांनी आभार मानले.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-तालुक्यात सर्वात मोठी असलेल्या बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरुझाली असुन आजपासुन उमेद़्वारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे                           एकुण तेरा जागेसाठी ही निवडणूक होत असुन एकुण १०२५ सभासदापैकी केवळ ६९० सभासदांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे आठ संचालक सर्वसाधारण दोन महीला  एक ओबीसी एक एससी व एक भटक्या विमूक्त असे एकुण तेरा सांचालक निवडले जाणार आहे तेरा जागेकरीचा फाँर्म भरण्याची मुदत दिनांक २ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत  फाँर्म भरणे दिनांक ९ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता छाणणी दिनांक १० फेब्रुवारी उमैद़्वार यादी प्रसिध्द करणे दिनांक १० फेब्रुवारी २०२२ ते २४ फेब्रुवारी  २०२२ माघार  घेणे दिनांक २५ फेब्रुवारी  चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिध्द करणे दिनांक ६ मार्च रोजी सकाळी ८ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे ,मागील वेळेस बाजार समितीचे संचालक सुधीर नवले जनता अघाडीचे रविंद्र खटोड यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या होत्या तरा जि प सदस्य शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक अभिषेक खंडागळे यांच्या गटाला ४ जागा मिळाल्या होत्या त्या नंतर तीन संचालाक अपात्र झाले होते या संस्थेची आर्थिक उलाढाल मोठी असुन संस्थेच्या मालकीचा पेट्रोल पंपआहे स्वःमालकीची भव्य अशी ईमारत आहे संस्थेकडे दोन स्वस्त धान्य दुकान आहेत संस्थेकडे खत डेपो आहे अशी उत्पन्नाची साधने आहेत.

अहमदनगर प्रतिनिधी- अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एक इसम हा गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथे येणार आहे. आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोउनि/सोपान गोरे, सफौ/राजेंद्र देवमन वाघ, संजय खंडागळे,पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, पोना/भिमराज खसे, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी येथे जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच एक इसम विठामाधव थिएटर, राहुरी फॅक्टरी येथे मोटार सायकलवर येतांना दिसले, त्यांना हाताने इशारा करुन मोटार सायकल थांबविण्यास सांगितले त्यावेळी त्यांनी मोटार सायकल रोडच्या कडेला थांबविली पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता १) किशोर बाळासाहेब खामकर वय ३२, रा. राजुरी, ता. राहाता २) किशोर साईनाथ शिणगारे वय २८, रा. गोमाळवाडी, ता. नेवासा असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये दोन गावठी बनावटी कट्टे, सहा जिवंत काडतूसे, व प्लेझर मोपेड असे एकूण १,२१,२००/रु.किं.चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर बाबत सफौ/राजेंद्र देवमन वाघ, ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच दरम्यान श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त खबन्याकडून माहिती मिळाली कि, दोन इसम गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी औरंगाबाद नगररोडने अहमदनगरकडे येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी वर नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांना खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार बातमीतील नमूद ठिकाणापासून गाडी रस्त्याचे कडेला आडोशाला लावून शेंडी बायपास चौकामध्ये, ता. जि. अहमदनगर येथे सापळा रचुन थांबले असता, दोन इसम संशयीतरित्या हे त्यांचेकडील बजाज प्लॅटींना काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर औरंगाबाद कडुन येतांना दिसले असता, त्यांना हाताने इशारा करुन मोटार सायकल थांबविण्यास सांगीतले असता, मोटार सायकल चालकाने मोटार सायकलचा वेग कमी केला. त्यावेळी त्याच्या मागे बसलेल्या इसमास पकडले असता मोटार सायकल चालकास संशय आल्याने तो तसाच मोटार सायकल घेवुन औरंगाबादच्या दिशेने पळून गेला त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आलेला नाही. पकडलेल्या इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता १) अभय अशोक काळे वय २४, रा. शिरसगांव, ता.नेवासा, जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याची अगंझडती घेतली असता त्यांच्या कब्जात देशी बनावटीचे दोन पिस्टल (गावठी कट्टा) व सहा जिवंत काडतुसे असा एकुण ५१,२००/- रु.किं.चा मुद्देमाल मिळुन आला त्यास त्याचा जोडीदार मोटर सायकलस्वार याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विवेक लक्ष्म शिंदे (फरार) रा.घोगरगांव रोड, टाकळीभान, ता. श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर असे सांगितले. वर नमुद दोन्ही गुन्ह्यातील आरोपीकडे सदर देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्ट) कोठुन आणले याबाबत विचारपुस केली असता, त्यांनी सदरचे गावठीकट्टे व जिवंत काडतुस हे सागर रोहिदास मोहिते (फरार) रा. शिरसगांव, ता.नेवासा याचेकडुन घेतले बाबत सांगितले.वरील प्रमाणे राहुरी व एमआयडीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन चार पिस्टल (गावठी कट्टे), १२जिवंत काडतसे व एक प्लेझर मोपेड गाडी असा एकुण १,७२,२००/-रु.कि.चा मुद्देमाल व तीन आरोपी ताब्यात घेवून राहुरी व एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई राहुरी व एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे विवेक लक्ष्मण शिंदे (फरार) हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खालील प्रमाणे विविध पोलीस ठाणेस चोरी व विनयभंग करणे असे एकुण ०२ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. १) श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. २०१/२०२१ भादविक ३५४, ३२३, ५०४, ५०६ २) गंगापुर पोलीस स्टेशन, जिल्हा औरंगाबाद २८४/२०२० भादविक ४६१, ३८०, ३४ आरोपी नामे सागर रोहिदास मोहिते (फरार) हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खालील प्रमाणे विविध पोलीस ठाणेस मारहाण करणे, आमली पदार्थ, दारुबंदी व घातकशस्त्रे बाळगणे व विक्री असे एकुण ०६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.१) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ६६/२०१५ भादविक १४३, ३२३ २) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. २०४/२०१५ मुं.दा.का.क. ६५ (ई) ३) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२/२०१७ मुं.दा.का.क. ६५ (ई) ४) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२२/२०१७ भादविक ३२३, १४३ सह आर्म अॅक्ट ३/२५ ५) सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. २०/२०१४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ ६) अंबड पोलीस स्टेशन जिल्हानाशिक गु.र.नं. ३१०३/२०१६ एनडीपीएस २०, २२ सदर कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर, श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर, श्री.संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे.


अहमदनगर प्रतिनिधी-नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या तालुक्यातील मक्तापूर येथील एका सराईत गुन्हेगारास नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याच्या पोलीस पथकाने कट्ट्यासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत नगरच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, एक इसम गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सोनई येथे येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिंळाल्याने त्यांनी आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, हवालदार मनोहर गोसावी, संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, कॉन्स्टेबल सागर ससाणे, आकाश काळे, जालिंदर माने, रोहित येमूल व चालक हवालदार बबन बेरड अशांनी मिळून कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथे सापळा लावला.तिघे सचिन वसंतराव कोळेकर रा. मक्तापूर ता. नेवासा याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा 26 हजार रुपये किमतीच्या वस्तू मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले.सचिन वसंतराव कोळेकर याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. सेकंड 35/2022 आर्म अ‍ॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

कोपरगाव प्रतिनिधी-कोपरगाव तालुक्यातील जवळके नावाचे छोटेसे गाव आणि या गावातली तीन युवक फिरोज  मनियार, अक्षय थोरात अन् सागर दरेकर संगीताच्या क्षेत्रामध्ये स्वतःच नशीब आजमावत आहेत. त्यांच तिसर गाण गर्लफ्रेंड   होशीलका ? हे गाणे नुकतेच  FSA PRODUCTION ह्या युट्युब चॅनेल वर प्रदर्शित झाले आहे. आशिष श्रावणी दिग्दर्शित या गाण्यात शाळा वेबसिरीज फेम अनुश्री माने तसेच सेजल अमनेकर, अक्षय थोरात , सागर

दरेकर यांनी  अभिनय केला असून प्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक फिरोज मणियार तसेच महाराष्ट्राच्या नामवंत गायिका सोनाली सोनवणे यांनी या गण्यास आवाज दिला आहे.अधिक माहिती अशी की, यातील फिरोज  हा स्थापत्य अभियांत्रिकी आहे. त्याच्या या स्वप्नाला त्याचे मित्र अक्षय थोरात (एम कॉम) आणि सागर दरेकर  (विद्युत अभियांत्रिकी ) यांची खंबीर साथ मिळत आहे.घरची बेताची परिस्थिती आणि त्यातून घेतलेले शिक्षण यात नोकरीच्या मागे न लागता तिन्ही युवक एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. आणी त्यांची स्तुती ही  एवढ्यासाठीच त्यांनी कुणाचाही आधार न घेता आपले तिसरे गाणे प्रदर्शित केले. ह्या क्षेत्रामध्ये आजकाल खूप तरुणी- तरुणांचा सहभाग वाढत चाललेला दिसतोय पण तुमच्यात जिद्द आणि त्यासाठी धडपड असणं आवश्यक आहे. हीच जिद्द धडपड घेऊन फिरोज मणियार व त्याच्या सह टीम ने चांगली भरारी घेतली आहे.यापूर्वी त्यांची दोन गाणी सादर झालेले असून त्यातील एक गाणे झी म्युझिक सारख्या मोठ्या वाहिनीने घेतलेले आहे तर त्यांच्या 'FSA PRODUCTION' या निर्मिती अंतर्गत चालणाऱ्या यूट्यूब चैनल वर ही त्यांचे अनेक चाहते आहेत.आज सर्व सुविधा सोयी उपलब्ध असतांना युवक नवीन काही  करण्यास हिम्मत करत नाहीत परंतु आपल्या परिस्थितीला शिक्षणाला कुठेही आडवे येऊ न देता आर्थिक परिस्थितीशी झगडत या युवकांनी जे क्षेत्र निवडले आहे त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्याची धडपड करत आहेत ती निश्चितच अभिनंदनीय आहे.फिरोज या क्षेत्रात कसा आला हे विचारला असता साईंच्या दरबारी भजन गात गात निर्माण झालेली आवड पुढे स्वप्न झाली आणि त्यातच करिअर करायचं ठरलं. गीतकार ,संगीतकार आणि गायक ह्या तिन्ही आघाड्यांवर आव्हान पेलताना दोन्ही जिवलग मित्र मोलाची साथ देत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द,नवीन शिकण्याची तयारी आणि मेहनती स्वभाव यामुळे हे तारे संगीत क्षेत्राच्या आकाशात नक्कीच चमकतील ही खात्री आहे.या युवकांच्या प्रयत्नास साईबाबा संस्थांनचे अध्यक्ष नामदार आशुतोष दादा काळे तसेच युवा नेते सुमित दादा कोल्हे,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनिष जाधव आदी मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget